Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 03/07/2022 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav… आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.

वाचने 20170
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

चाटूगिरीची महत्तम मर्यादा. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेची खिल्ली उडवताना धवल क्रांती, हरीत क्रांती, तेल बियांचं उत्पन्न वाढविणे या गोष्टी आणि त्यांचं यश लक्षात नाही घ्यायचं. सरसकट गरीब माणूस दिसताच कामा नये असा पोरकट हट्ट धरायचा. आणि ना खाऊंगा न खाने दूंगा याचं यश काय असं विचारलं तर सरकारी भ्रष्टाचार कमी करण्याबद्दल मोदी कधी बोलले होते असा प्रश्न विचारायचा. वा रे वा!

चाटूगिरी वगैरे जरा बाजूला ठेवा सरकारी भ्रष्टाचार

कमी करण्याबद्दल

मोदी कधी बोलले होते सरकारी भ्रष्टाचार

पूर्णपणे नष्ट

होईल यात काही मूलभूत फरक आहे का? भ्रष्टाचार जगातून संपूर्णपणे कधीही नष्ट होणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

धाग्यावर महत्त्वाच्या बातम्या, निरिक्षणं, विश्लेषणं अक्षरशः शोधावी लागताहेत. क्लिंटन, निनाद तुमचे खरंच मनापासून कौतुक. केवढा तो अभ्यास आणि सगळ्या गोंधळातही अलिप्तपणे माहिती मांडण्याची हातोटी. _/\_ बाकी तेच ते वाद अन् भांडणे.. मला कधी कधी दाट शंका येते की येथे राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यकर्ते भांडताहेत का काय..!! :-) जाता-जाता: धाग्याचे नाव "ताज्या उखाळ्या पाखाळ्या" असे ठेवावेसे वाटले! ;-)

मोदी नी तर सत्तेत येण्यापूर्वी जे अकलेचे तारे तोडले होते ते नेट वर बघण्यासारखे आहेत... आता मात्र एकही भक्ताड त्याबद्दल बोलत नाही.. अळी मिळी गुप चीळी

In reply to by सुबोध खरे

पेत्ताड ला कशी दारू ची नशा असते तसे भक्ताड .. लिंब्रांडू वगैरे म्हणतात की नई ? अगदी तसेच्च

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा , आता हये कोणी रुपया पडलाय , सरकार झक्क मारताय.. प्रधान सेवका च्या म्हणाण्यानुसार सरकारं कराप्ट असेल तर रुपया पडतो

In reply to by कपिलमुनी

चुक. रूपया ऊसी देश का गिरता है जिस देश का प्राईममीनीस्टर गिरा हुआ हो. असं बोलले होते ते. चिन घुसखोरी करतोय, रूपया पडतोय पण ह्यापेक्षा महत्वाचं काम शिवसेनेचे आमदार फोडणे होते.

आपले पंतप्रधान फार अभ्यास न करता भाषणबाजी करतात,परंतु त्यांना सांभाळून घेण्यासाठी पक्षाची मोठी फौज धावून येत असल्याने लोकं अशा गोष्टी विसरून जातात. केंद्र सरकारच्या धोरणशून्यतेच्या अभावी अनेक योजना चालवणे कठीण झाले आहे. देशातील अन्नधान्य उत्पन्नाचा आढावा न घेतल्याने " पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे " बारा वाजले. सरकारी गहू खरेदी कमी झाल्याने ह्या योजनेअंतर्गत गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. गव्हाला पर्याय तांदूळ कसा होऊ शकतो? अशा पंतप्रधानांकडून घसरणाऱ्या रुपयाबद्दल फार अभ्यासपूर्ण ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल.

In reply to by आग्या१९९०

आपले पंतप्रधान फार अभ्यास न करता भाषणबाजी करतात ते ही कुणीतरी लिहून दिलेलं असतं हे मागे टेलीप्राॅम्पटर कांडावेळी कळाले. पतिरकार परिषद कधीही घेत नाहीत कारण झारली मूठ सव्वा लाखाची. पत्रकार ऊघडं पाडतील मग कळेल की फक्त फोटो काढणे हेया शिवाय काहीही येत नाही.

पत्रकार ऊघडं पाडतील मग कळेल की फक्त फोटो काढणे हेया शिवाय काहीही येत नाही हे त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही ठाऊक असल्याने ते त्यांना पत्रकारांच्या तोफेच्या तोंडेपासून दूर ठेवतात. फक्त त्यांच्या वक्तृत्वाचा आणि अभिनयाचा वापर करून घेतात. ' रायवळ ' पत्रकारांसमोर बिनधास्त मुलाखती देतात. करण थापरने सगळा वाह्यातपणा केल्याने बिथरले.

अन्न धान्य आणि डेअरी प्रोडक्ट ला ५% जीएस्टी लावणार म्हणे... भक्ताडाना अजून एक ऑर्गझम ..

In reply to by श्रीगुरुजी

सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ? मुद्दा सोडून सोयोस्कर बगल द्यायची... फक्त भाजप प्रो पो टाकायचे..

In reply to by कपिलमुनी

सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ? अंगाश्शी. या प्रश्नाचे उत्तर शोधा आधी. बाकीचे चीत्कार नंतर काढा.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुपया पडतोय का हो ? ह्या प्रश्नाचे उत्तर खरं तर मोदींनी द्यायला हवे पण त्यांना विचारणार कसे? ते गावत नाय. त्यांच्या समर्थकांना काय बोलावे हे सुचेना.

In reply to by आग्या१९९०

रूपया पडला न पडला तरी मोदींना काय फरक पडतो? ते तर फकीर आहेत, झोला ऊचलून निघून जातील.

खाद्य तेल कंपन्यांना केंद्राने तेलाचे भाव रु. १५ पर्यंत कमी करण्यास सांगितले. केंद्राने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने हा लाभ ग्राहकांपर्यंत कंपन्यांनी तेलाचे भाव कमी द्यावा असे केंद्राने सांगितले. खाद्यतेलाचे भाव मार्केट फोर्स ठरवेल केन्द्र का त्यात लुडबुड करतंय?

In reply to by आग्या१९९०

जर केंद्राने तसं नाही सांगितले तर "हे सरकार फक्त व्यापाऱ्यांचे आहे" असा ठणाणा होतो आणि जर तसं सांगितले तर "केंद्र भावात का लुडबुड करतंय" अशी डबल ढोलकी वाजायला लागते.

आहेच मुळी. सरकारने तरी आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले तेव्हा ग्राहकांना हा लाभ कुठे मिळवून दिला होता? सरकारने मारल्यासारखे करायचे आणि व्यापाऱ्यांनी रडल्यासारखे करायचे. सगळं व्यवस्थित ओरपून झाल्यावर दिखावा करायचा ग्राहक हिताचा. असंही केंद्र कोण काय बोलेल ह्याचा कधीपासून विचार करू लागले?

In reply to by आग्या१९९०

सरकारने तरी आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले तेव्हा ग्राहकांना हा लाभ कुठे मिळवून दिला होता? २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळातील आजपर्यंत पेट्रोलचा प्रतिलीटर दर माहिती आहे का?

In reply to by आग्या१९९०

स्वत:कडे उत्तर नसलं की अशी उत्तरे येतात. मी आधीच्या प्रतिसादात पेट्रोल दराविषयी काहीतरी विचारलंय. त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.

बाकी काही म्हणा फडणवीसला ऊपमुख्यमंत्री बनवून अमीत शहांनी मने जिंकली. फडणवीस बाजूला ठेऊन जर ऊद्या शिवसेना भाजप युती होनार असेल तर तिचे जोरदार सिवागत दोन्ही बाजूने होईल. फडणवीसच्या गलिच्छ राजकारणामुळे आज भाजपात ऊपरे मजा मारताहेत दरेकर विरोधी पक्षनेता, नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. मूळ भाजपेयी मुनगंटीवार, खडसे, मूंडे, तावडे, बावनकूळे ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. शिवसेनेत बंडखोरा माजलीय. एका फडणवीस मूळे ना शिवसेना आनंदी आहे ना भाजपा. सवकरच अमीत शहानी भाजपचा ताबा कुणातरी हुशार नेत्याला देऊन महाराष्ट्र भाजपची स्वच्छता करावी.

श्री फडणवीस वय वर्षे ५२ फक्त श्री मोदी वय ७२ फक्त आपल्या पेक्षा वयाने मोठ्या माणसाला एकेरी नावाने संबोधू नये, मान द्यावा हे भारतीय संस्कृती सांगते. आपल्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, हुद्द्याने मोठ्या माणसाला एकेरी नावाने संबोधू नये, मान द्यावा हे भारतीय संस्कृती सांगते. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

हे ओटो करेक्ट मुळे झालंय नाहीतर माझ्या कुठल्याही प्रतिसादात एकेरी ऊल्लेख नसतो. बाकी आता तुमच्यातला संस्कराी शाम अचानक सा जागला? संजय राऊतांना प्रसाद हा आयडी संज्या म्हणत होता, ऊध्दव ठाकरेंना क्लिंटन हा आयडी तुसड्या म्हणत होता तेव्हा कुठे गेला होतात?