पेरणा http://misalpav.com/node/50380
कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून
*दळण नसलेल्या गिरणीवर*
जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं
मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच
कंटाळून नागमोडी होऊन जातात
टोमणे आणि कुचकट बोलणे
जेव्हा नित्याच होतं तेव्हा
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं
बदललेला गिरणी चालक आणि
त्याच्या भूलथापांचा मारा
सततची कुचंबणा, अन अवहेलना
आणि नको नकोसे असमान वाटप
वाटेवर नाराजी पसरवते
भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज
पुन्हा एकदा गर्जना करतो
अन नाराज वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते
अतिरेक झाला की असेच कुणीतरी
खास भेटतेच
त्यावेळेला दळणाऱ्याही भीती वाटते
मग जात्यातले
सुध्दा हसायला लागतात
पैजारबुवा,
२७-६-२०२२
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5081
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा,शालजोडीतला आहेर
झकास पैजारबुवा
वा,
झकास
नाही जमलं
जरा पुढे सरकत जाऊन
हा .... हा .... हा .... !
उत्तम
अगदी बिनधास्त
In reply to उत्तम by Marathi_Mulgi