Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 25/06/2022 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले. पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का? दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का? उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.

वाचने 20360
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

सेनेने महाराष्ट्रात भाजपला वाढवून किती मोठी चूक केलीय हे सेना नेत्यांना आता लक्षात आले असेल. जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी नव्हता अश्या पक्षासोबत सेनेने युती केली. आज अशी वेळ आलीय की हा पक्ष सेना संपवायला आटोकाट प्रयत्न करतोय. असंगाशी संग प्राणांशी गाठ ही म्हण येथे लागू पडते. जो पक्ष ४० वर्ष भाजप वाढवायला राबनार्या खडसेंना झाला नाही तो सेनेला होईल का?? सेनेने आता यापुढे कधीही भाजपशी युती करू नये. महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांसारखे नेते आज सेनेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभेत. हे पाहून तारारणींचा काळ महाराष्ट्र पुन्हा अनूभवतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी करूच नये. काम झाले की फेकतात.

In reply to by कंजूस

+१ तेच पाहत होते. तेलंगणा राज्य(TRS) फारच सुखी आणि प्रगतीशील वाटतंय याबाबत.एकला चलो रे!

In reply to by Bhakti

+१ सेनेने भाजपला वाढवलं नसतं तर आज एकला राजा असता राज्यात. हिंदूत्वाच्या नावाने यावं नी युती करून आपल्यालाच संपवावं. मराठी माणूस युध्दात जिंकतो तहात हरतो हा नायम मराठी माणसाच्या पक्षाला लागू पडलाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी नव्हता अश्या पक्षासोबत सेनेने युती केली. बर भाजपचं घर उन्हात बंधू हा .... पण हे सांगा मग नास्तिक असेललाय शरद पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबर हे हिंदुत्व कसे काय हो राहणार ?

In reply to by चौकस२१२

पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबर असं फक्त भाजप समर्थकाना वाटतं. बाकी पहाटेचा फियास्को झाला नसता तर फडणवास राहनार होतेच ना? :)

महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांसारखे नेते आज सेनेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभेत हित, शरद पवार, पाठीशी खंबीरपणे ऊभे रहाणे. ह्या तीन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

In reply to by डँबिस००७

तसेच शरद पवार नाव ऐकून जळफळाट न होणे ह्यांचाही काहीही संबंधं नाही. :)

तुमने मेरा घर तोडा था, पर तुम्हारा तो घमंड टुटेगा ! कंगना रनौत २०२१ उध्धवजीके पतन के दो कारण, राउत प्रेम और रनाऊत का अभिशाप.

In reply to by डँबिस००७

उध्धवजीके पतन के दो कारण, कधी झालं पतन ? :) बाकी अतिक्रमनात घर बांधनार्या कंगनाच्या शापाने ठाकरेंचं काहीही वाकडं झालं नाही. पण तिचा १०० कोटीचा सिनेमा अडाच कोटी कमावून संपला. तिलाच महाराष्ट्राची शाप लागला, जाहीरातू, स्टारडम , सिनेमे सगळं गेलं. धाकडचं यश पाहून आता तिला कोणता प्रोड्युसर दारातही ऊभा करनार नाही. :) भाजपच्या नादी लागून पायावर धोंडा पाडून घेतलेले- सचिन पायलट ज्योतीरादित्य शिंदे कंगना अर्नब परमवीर वानखेडे नितीश कूमार राणा दांपत्य नि आता बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉन्ग्रेसला मत देणार. कॉन्ग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यासाठी गप्प आहे. अचानक सर्व जागा लढवणार. सगळीकडे आनंदीआनंद होणार राहूल पंतप्रधान होणार. CRZ काढणार. ३७० आणणार. तलाक आणणार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राहुल गांधी अजून भाजपच्या नादी लागले नाहीत आणि म्हणूनच त्यांची प्रगती चालू आहे. उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली.

In reply to by रात्रीचे चांदणे

उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली. बरोबर. सेना भाजपच्या नादी लागावी म्हणून भाजप नेते मातोश्रीवर युती करा म्हणून विनवन्या करायला यायचे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कधी झालं पतन ? :) पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही?

In reply to by चौकस२१२

तेच की. आता तर ठाकरेंच्या मंत्रीमम्डळात एकटेच आदित्य ठाकरे हेच काय ते शिवसेनेचे मंत्री उरले आहेत. या पेक्षा आणखी पतन काय असणार. असो...... राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की. राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते. राऊतसाहेबांचे सगळे प्रयत्न आमदारांनी सेनेपासून दूर जावे असेच आहेत. लोकांना वाय झेड म्हणणे ,रेडे म्हणणे या मुळे लोकांची नाराजी दूर होत नाही ती वाढतेच. अर्थात राऊत हे ठरवीऊन करत आहेत हेच दिसते. ठाकरेंना कितीही वाटले की बंडखोर आमदारांनी सेनेकडे पुन्हा यावे तरीही राऊत ते होऊ देणार नाहीत.

In reply to by विजुभाऊ

राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की. राऊत ह्यांनी एकट्याने भाजपला अंगावर घेतलं तेही कुठल्याही चौकशी ला न घाबरता. बाकी सेना संपायची काळजी भाजपचे लोक फार करतात. :) सरळ सांगा की राऊत रोज भाजपची अब्रू वेशीवर टांगतात. त्यांनी २.५ वर्षात खंड पडू दिला नाहीये. राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते. खरं तेच बोलले. ह्या आमदारांना शिवसेनेनेच मोठं केलंय.

In reply to by चौकस२१२

पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही? अजून सिनेमा संपलेला नाही. वाट पहा. मागच्या वेळेस ही “मोटा भाई ने गेम किया” म्हणून पहाटे पहाटे संदेश फाॅरवर्ड करायला सुरूवात केली होती. नंतर कळालं की मोटाभाईचाच गेम झालाय. :)

संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस शिवसेनेत गदारोळ माजवायला लागलेला आहे. गोहत्ती मध्ये असरलेल्या शिवसेनेच्या विधायकांच्या परिवाराला सरळ सरळ धमकी देत आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या पुण्यातील ऑफिस मध्ये घुसुन शिवसेनेच्या गुंडांनी मोडतोड केलेली आहे. ह्याचा परीणाम वाईट होणार असे ईशारे यायला लागले आहेत. शिवसेनेच्या बागी विधायकांनी मविआ सरकारच्या कारभारावर नाराजी जाहीर करताना बरेच प्रश्न उभे केलेले आहेत. जसे की योजनेसाठी पैश्याची वाटणी / विभागणी होत असताना शिवसेनेच्या विधायकांना ५० कोटी तर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या विधायकांना ७०० - ८०० कोटी दिले जात होते. ह्या वर मविआ सरकार मधिल कोणीही बोलायला तयार नाही. शिवसेनेच्या बागी विधायकांनी सुरत व पुढे गोहात्तीला जाण्यामागे त्यांच्यामधल्या दाबलेल्या भावनांचा उद्रेक होऊनच त्याम्नी अशी पावले उचलली असतील. शिवसेनेच्या बागी विधायकांनी उचललेल्या अश्या पावला बद्दल ईथल्या शिवसेनेच्या सापोर्ट्सना काय म्हणायच आहे. शिवसेनेच्या बागी विधायक पुर्णपणे चुक पण त्यांच्यावर अन्याय करणार्या मविआ सरकार मधिल काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या विधायकांना मात्र मोकळीक ? शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ह्या नात्याने सुद्धा त्यांनी वेळीच शिवसेनेच्या नेत्यांनी उभे केलेल्या सवालांची उत्तरे दिली पाहीजे होती.

In reply to by डँबिस००७

संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे आणि सुसंकृत म्हणवणाऱ्या उद्धवजींना तसू भर हि फरक नाही ! याला उत्तम उत्तर येथे बघा ... https://www.youtube.com/watch?v=7jHjZ7ZnbVw

In reply to by चौकस२१२

संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे ३५ वर्षे ठाकरी शौली म्हणून फुले ऊधळनारे भाजपा समर्थक आता सेनेने गाडीतून ऊतरवल्यावर नीच वगैरे भाषा वैपरू लागलेत. ऊद्या युती झाली की ह्याच राऊतांची परत स्तुती सुरू होईल.

इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.? दोन्हीही केसमध्ये नुकसान शिवसेनेचेच आहे. भाजपाचे भले काही नुकसान होईल. पण शिवसेनेने स्वतःच शरद पवारांचे महत्व अतोनात वाढवुन ठेवले आहे. ( आठवा शरद पवार को समझने के लिये मोदी शहा को सौ जनम लेने पडेंगे. इति संजयजी राऊत.) तसे असताना जर शिवसेनेने मविआ अंतर्गत निवडणुक लढवली तर हे दोन्ही पक्ष शिवसेनेला लिंबुटिंबु सारखेच वागवणार. मविआ बाहेरुन लढवली तर फक्त भाजप द्वेष जो ह्या बाकीच्या दोन्ही पक्षांचा अगोदरचाच अजेंडा आहे त्यावर कितपत मते मिळवु शकतील? आणि शरद पवारांवर कुठल्या तोंडाने टिका करणार? शरद पवारांनी फडणवीस व आता उद्धव ठाकरे ह्या दोघांना नक्कीच धोबीपछाड टाकला आहे. काहीही म्हणा पण काका रॉक्स.

In reply to by कानडाऊ योगेशु

इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.? मविआ तुटली किंवा टिकली तरी पुढील विधानसभा निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती असेल. त्यात ते सेनेला घेणार नाहीत. सेनेला एकटे लढावे लागेल व जास्तीत जास्त १० जागा मिळतील. अगदी सेनेला युतीत घेतले तरी ते फार थोड्या जागा सेनेला देतील.

In reply to by श्रीगुरुजी

तर शिवसेनेला आताहून जास्त जागा मिळतील. फुटलेले बहुतांशी आमदार भाजपकढून लढण्याची शक्यता आहे किंवा एकतर त्यांना स्वतंत्र लढावे लागेल. दोन्हीकडून त्यांचा पराभव अटळ आहे. २०१४ प्रमाणे चारही पक्ष स्वतंत्र लढतील असं वाटतंय कारण सतेज पाटलांसारखे लोक कदाचित एकत्र लढायला राजी होणार नाहीत. ( सतेज पाटलांनी सगळा कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसमय करून टाकला आहे ). भाजप सरसकट विजयी होऊ नये असं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्यांना वाटतंय त्यामुळे त्यांनी निवडणूकपूर्व युती करतील का? शिवसैनिक राजी होणार नाहीत त्यामुळे असं शक्य नाही. कॉंग्रेस + राष्ट्रवादी अंतिम हित लक्षात घेऊन आणि लोकल मतभेद मिटवून युती करतील असं वाटतंय. म्हणजे शिवसेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असं दिसतंय. भाजप निवडणुकीमध्ये फायद्यात राहणार आहे त्यामुळे येनकेन प्रकारे भाजप संपूर्ण बहुमतासाठी आटोकाट प्रयत्न करेल. कदाचित (शिंदेसेना + मनसे + एनडीए) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध ( काँग्रेस + राष्ट्रवादी + वंचित बहुजन आघाडी + स्वाभिमानी शेतकरी + शेकाप ) अशी लढाई होऊ शकते.

जगाला पुरेसा गहू निर्यात करू अशी घोषणा करून आठवड्याभरात गहू निर्यात बंद करण्याची नामुष्की पंतप्रधानांवर आली. कुठल्याच गोष्टीची सखोल माहिती न घेता घोषणा करायची आणि त्यातील चुका दुरुस्त करत बसायची पंतप्रधानपदाची खोड काही केल्या जात नाही. व्यापारी हे हुशार असतात हे नोटबंदीच्यावेळी दिसून आले. आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली. अचानक १० पट गव्हाच्या पिठाची निर्यात झाल्यावर सरकारचे डोळे उघडले. गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी करायचा विचार करतेय सरकार. असल्या डळमळीत विचारांमुळेच सरकारच्या योजनांवर लोकं विश्वास ठेवत नाही. आठ वर्षात इतक्या ठेचा खाऊनही हे सरकार सुधारायचे नाव घेत नाही.

In reply to by आग्या१९९०

आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली. खिक्क. ईतकी साधी गोष्ट ह्या सरकारला कळू नये. ह्यांचे समर्थक सोमावर ईतराना न्यान शिकवण्यात आघाडीवर असतात.

In reply to by आग्या१९९०

गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी करायचा विचार करतेय सरकार.
बहुतेक व्यापारी त्यानंतर चपात्या / पोळ्या निर्यात करतील.

In reply to by Trump

आता केंद्र सरकाराला स्वतःच्या योजना बासनात बांधून काँग्रेसच्या मनरेगा सारख्या योजनांच्या आयत्या पिठावर रेघोट्या माराव्या लागणार.

रिझर्व बँकेने रेपो दर वाढवल्यावर सरकारला देशात महागाई झाल्याचे समजले. धन्य ते सरकार आणि अर्थमंत्री. नाक्यावरचा पक्याच ह्या सरकारचे समर्थन करू शकेल.

हा रोज एक पायरी खाली उतरतोय. उद्धव ठाकरेंना संयमी वगैरे समजणाऱ्यांनी हा विचार करावा की इतकी गलिच्छ भाषा ते वर्षानुवर्षे कसे चालवून घेतात.. का त्यांच्या मनातलेच हा बोलतो. https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/sanjay-raut-on-eknath-shi…

In reply to by श्रीगुरुजी

उद्धव ठाकरेंना संयमी वगैरे समजणाऱ्यांनी हा विचार करावा की इतकी गलिच्छ भाषा ते वर्षानुवर्षे कसे चालवून घेतात.
खरेच आहे.. नेहमीप्रमाणे बॉलिवूडची/लिब्रांडूची टूलकिट गँग सोमि वर सक्रिय झालिये( पेड प्रमोशन) त्यात सगळ्यांचा एकच सुर आहे की उ ठा सारखा संयमी,उत्तम संवाद करणारा(टोमणे भाषणं ऐकले नसतील) व प्रशासनावर उत्तम पकड(?) असलेला मुख्यमंत्री कोणीच नाही . या सर्व भांड लोकांना खरंच जनतेच्या मनातली खदखद समजत नसेल का?

In reply to by यश राज

फक्त शिवसैनिकांचा विचार केला तर कोल्हापुरात हा मोठा मोर्चा निघाला - यांना कुणी पैसे देऊन आणलेले नाही. शिवसैनिक आता सुट्टी देत नसतात. हे राजेश क्ष्रीरसागर वगैरे शिंदेसेनेच्या सुशिक्षित गुंडांना सोडाच, चंद्रकांत पाटलांनासुद्धा कोल्हापुरात पायसुद्धा ठेऊ देणार नाहीत. मध्यावधी निवडणुका लागल्या पाहिजेत. भाजप किती पाण्यात आहे हे तरी कळेल. आणि आता भगव्या सुशिक्षित गुंडांना पांढर्‍या अशिक्षित गुंडांचा डायरेक्ट सपोर्ट आहे म्हणजे बघा. शिवसेनेने ही लढाई महाराष्ट्र विरूद्ध दिल्ली अशी केली पाहिजे. तशी सुरुवातही झाली आहे. राऊतांनी शिंदेसमर्थकांचा आणि भाजपवाल्यांचा आणि काहीप्रमाणात शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला असला तरी शिवसैनिक राऊतांना माफ करेल. कारण गद्दारीला क्षमा नाही, वाचाळपणा ठीक आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-politi… पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी शिंदे गटासमोर आता कोणत्यातरी पक्षात विलीन होणे हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मी कालच म्हणालो की राज साहेब लवकर बरे व्हावेत. खळ्याळखट हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच. फक्त त्यात उठा नकोत.

In reply to by शाम भागवत

हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच. का भाजप नको?? : )

In reply to by शाम भागवत

खळ्याळखट आणि हिंदुत्व यांचा दुरूनही संबंध नाही. जाळपोळ, दगडफेक, हाणामाऱ्या करणारे कोणत्याही जातीधर्माचे नसून ते फक्त झ दर्जाचे गुंड असतात. त्यांचा आणि हिंदुत्वाचा अजिबात संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही. लोक एकवेळ बूडनार्या जहाजेत बसतील पण समुद्रात डूबकी मारून बूडालेल्या जहाजेत बसायला जानार नाही. बाकी शिंदे गटाचे खरे/खोटे बंड काही दिवसातंच थंड होईल. बोलणी करायला आमदार पाठवले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

या बंडाचे पुढे काय होईल माहित नाही. पण काहीही झाले तरी शिवसेना अडचणीत आली आहे हे नक्की. सरकार पडले तर चांगले आणि नाही पडले तर अजून चांगले अशी परिस्थिती आता आली आहे. समजा हे आमदार स्वगृही परत जरी गेले तरी आलेली कटुता कायमच राहणार आहे. एकदा मने दुभंगली की ती दरी साधणे अशक्य होते. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी बंड केल्यावर ते काही दिवसातच भाजपत परत गेले होते. पण कटुता कायमच राहिली. आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे त्यावेळी भाजपच्या कोणीही वाघेलांना डुक्कर, कचरा, वि* वगैरे जाहीरपणे बोलले नव्हते. ते सगळे एकनाथ शिंदे गटाविषयी शिवसेनेकडून जाहीरपणे बोलले जात आहे. त्यामुळे हे आमदार स्वगृही परतले तरी ती दरी भरणे अशक्य आहे. आताच महाराष्ट्रात सरकार आणि प्रशासनाच्या नावाने अगदी पूर्णच सावळागोंधळ उडालेला आहे. ती परिस्थिती अजून वाईट व्हायची शक्यता आहे. महाभकास आघाडी सरकारने जो सत्तेचा माज दाखवला आहे तो क्वचितच कोणत्या सरकारने कधी दाखवला असेल- अगदी लालूंच्या सरकारनेही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा आमदार परतले तरी विधानसभेत मतदानाचे अनेक प्रसंग येत असतात आणि त्यापैकी कोणत्याही वेळेस सरकार पडू शकते. त्यावेळी हे लोक कोणत्या बाजूने मत देणार ही टांगती तलवार सतत उधोजींच्या डोक्यावर राहणार. त्यातून भाजप समर्थकांसाठी आणखी एक चांगली गोष्ट होऊ शकेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण देशातील मतदार मत द्यायला जातील तेव्हा मोदीविरोध या एका अजेंड्यावर तयार झालेल्या संधीसाधू आघाड्यांना मत दिलेत तर महाराष्ट्रात चालू आहे तो सावळागोंधळ पूर्ण देशात होईल हे चित्र जितक्या जास्त प्रमाणात उभे राहिल तितके भाजपसाठी चांगले असेल. तेव्हा सरकार पडले तर जनतेच्या माथी मारलेल्या या अनैसर्गिक सरकारने घातलेल्या धुडगुसापासून मुक्तता ही चांगली गोष्ट होईल आणि पडले नाही तर आणखी दीड-पावणेदोन वर्षे धुडगूस चालू राहिल पण २०२४ मध्ये पूर्ण देशात त्यामुळे चांगले परिणाम होतील.

ह्या बंडामागे भाजप नाही असं चंद्रकांत पाटलांनी सांगीतलंय. आमदार भाजपशासीत गुजरातेत जातात तिथे मोहीत कंबोज हा भाजपचा विधानसभा निवडणूकीत हरलेला ऊमेदवार ऊपस्थीत असतो. ३५० पोलिसांचा गराडा असतो. तिथून आसाम ह्या भाजप शासीत राज्यात जातात. भाजपचे नेते महाराष्ट्राला नी मराठी माणसाला मुर्ख समजतात का? ह्यांचे नेते काहीही सांगतील नी लोकांना मुर्ख बनवतील. महाराष्ट्र हे सगळं पाहतोय पुढील निवडणूकीत महाराष्ट्र नक्कीच भाजपला धडा शिकवनार. “कपटी मित्रापेक्षा दिलदात शत्रू बरा“ हे शिवसेनेचे मविआ स्थापन्यामागे धोरण होते. हे किती खरं आहे हे आज महाराष्ट्रच नव्हे तर देश पाहतोय. नितीश कूमारांनी भाजप पासून सावध रहावे. ममतांना युती करून गळाला लावायचा प्रयत्न भाजपनो अनेक वेळा केला पण ममता बधल्या नाहीत. आज बंगालात ममतांचं एकछत्री अंमल आहे. सेना, नितीश कुमारांनी ह्या पासून धडा घेऊन रणनिती आखावी.

मोदी मिडीया म्हणुन हिणवणार्या मिडीयाने ह्या प्रकरणात भाजपाला गोवायचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीही लागल नाही. त्यानंतर ह्याच मिडीयाने बंडखोर कसे ऊकटे पडले आहेत, मविआ, ऊद्धव ठाकरेंनी बंडखोरांना कसे कोंडीत पकडले आहे. आता शिवसेना जिंकल्यातच जमा आहे असा गाजावाजा करत आहे. गेल्या काही दिवसापासुन काही ठरावीक मिडीयांनी बंडखोर शिवसैनिका विरुद्ध मोर्चाच उघडलेला आहे. बंडखोर शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणे हाच ह्यांचा डाव आहे. त्यात भाजपा अलित्प राहील्याने बंडखोर शिवसैनिकांना एकजुटी शिवाय पर्याय नाही. जो जाहीराती देतो मिडीया त्याची गुलाम असते हे सत्य समोर असताना सुद्धा लोक मिडीयाला गोदी मिडीया म्हणत असतात. खेळ कोणाचा होणार हे काळच ठरवेल पण त्यात मिडीयाला हाताशी धरुन जनमत बनवण्याचा प्रकार सुरु आहे त्यावरुन आघाडीच्या तर्फे बुद्धीजीवींनी ह्यात उडी घेतली आहे हे स्पष्टच आहे.

उद्धव ठाकरे हे या अडीच वर्षात एक दुबळे नेता म्हणुन उघडे पडले ! नेता कसा नसावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपणहुन दिले.मुख्यमंत्री आहोत का पक्षप्रमुख याचे भान देखील त्यांना या काळात आहे असे एकदाही दिसले नाही.त्यांच्या भाषणाला भाषण देखील का म्हणावे अशी स्थिती... कारण आपण काय बोलतोय आणि कोणत्या पदावर बसुन याचे गांभिर्य देखील त्यांना कधी असल्याचे दिसले नाही. या मुख्यमंत्र्यांची ख्याती ते फोन उचलत नाहीत अशी झाली... युती करुन जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ आली तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार आलेला फोन घेतला नाही, अगदी हल्लीच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही असे सांगितले होते आणि नंतर जेव्हा ड्राफ्ट वगरै तयार झाला तेव्हा मुखमंत्र्यांना फोन केला तेव्हा त्यांनी फोन घेतला नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आता जे खरे मावळे फुटुन बाहेर पडले त्यांनी देखील हेच सांगितले की मुख्यमंत्री हे आम्हाला भेटत नव्हते, फोनवर उपलब्ध नव्हते. स्वतःच्याच आमदारांना अशी वर्तणुक देणार असतील तर ते तुमच्या बरोबर कसे राहतील ? लोकांना या संपूर्ण काळात आणि आताही त्यांचे केवळ टोमणे आणि रडगाणं हेच पहायला मिळाले. आता सातत्याने गद्दार /गद्दारी हा शब्दप्रयोग वारंवार दिसतोय... पण याच महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपा आणि सेना यांच्या युतीला मतदान केले त्यांच्याशी आपण उघड गद्दारी केली यांची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे का ? इथे मला सत्तेचा लोभ नव्हता असे म्हणायचे आणि त्याच सत्तेच्या लोभा पायीच आपण युती मोडुन इतर पक्षांसी सोयरीक करुन महाभ्रष्ट भकास आघाडी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारांची आणि स्वपक्ष नेत्यांची उघड फसवणुक केली वर मखलाशी काय केली की मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की शिवसैनीक मुख्यमंत्री होणार ! संजय राऊत यांना वेसण घालण्याची गरज होती, त्यांना मोकाट रान दिले. खरं तर संजय राऊत यांचे आता अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी वाचाळपणा करुन [ खरं तर वाचाळपणा हा देखील सौम्य शब्द भासावा. ] सेना फोडण्याची परिस्थीती निर्माण करुन विरोधकांना फार मोठी रसद पुरवली. पण हे देखील ज्या नेत्याला समजत नसेल किंवा समजुन घ्यायचे नसेल त्या नेत्याची दुसरी कोणती वेगळी अवस्था होणार ? वाझे प्रकरणात सरकारची अब्रुच वेशीला टांगली गेली, त्याच वाझेच समर्थन करुन त्याला परत सेवेत घेणारे कोण ? त्या बद्धल सोयिस्कर मौन का पाळले गेले ? मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सत्तेत किती भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले याची यादीच मा.माजी मुख्यमंत्री यांनी वाचुन दाखवली होती, त्यांनी सभागृहात केलेले भाषण ऐकण्या सारखेच आहे. जाता जाता :- पैलवान तेल लावुन बसलेला होता, पण खेळ बुद्धीबळाचा होता ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- SURESH WADKAR I VITTHAL AAWADI I LIVE PERFORMANCE I BIG CANVAS ENTERTAINMENT

हे बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदेंनी स्वत:चं प्रचंड मोठॅ राजकीस नूकसान करून घेतलंय. जो माणूस सेनेत ऊध्दव ठाकरेंनंतर दोन नंबरला होता तो आता काहीच राहनार नाही. कोरोनात केलेल्या ऊत्तम कामामूळे ठाकरे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. सेनाप्रमूख नी मुख्यमंत्री ह्या दोन्हीही जबाबदार्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. मविआतील तीन पक्षात ऊत्तम समन्वय साधून राज्यकारभार हाकला. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यात ठाकेरेंचे नाव आघाडीवर असेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य ठाकरे असणार ना? आदित्यला लहान का मोठा भाऊही आहे तो पण कधीही येऊ शकतो.

In reply to by रात्रीचे चांदणे

एकनाथ शिंदेंनी स्वत:चं प्रचंड मोठॅ राजकीस नूकसान करून घेतलंय. जो माणूस सेनेत ऊध्दव ठाकरेंनंतर दोन नंबरला होता तो आता काहीच राहनार नाही.>>>> शिवसेनेचा ईतिहास तपासला तर कुटुंबा बाहेर उत्तराधिकारी असु शकत नाही हे स्पष्टच आहे. सख्या कुटुंबातील राज ठाकरेची वर्णी लागली नाही तिथे आदित्य ठाकरे सारखे कुटुंबातील दावेदार असताना एकनाथ शिंदेँंचा चांस लागेल अशी अपेक्षा ठेवण मूर्खपणाच होईल.

गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे. संजय राऊत खरोखरच असे बोलले असतील तर ते वाचून अगदी किळस आली. महाभकास आघाडी सरकार ताबडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणायला हवी. काय चालू आहे? इथले शिवसेना समर्थक आणि 'उद्धव ठाकरे कित्ती कित्ती संयत बोलतात ब्रिगेड' चे लोक यावर काय म्हणतात हे बघायचे. https://www.lokmat.com/maharashtra/eknath-shinde-revolt-in-shiv-sena-th…

In reply to by क्लिंटन

हा रोज एक पायरी खाली उतरतोय. या भाषणात हा अत्यंत माजलेल्या अवस्थेत इतकं घाण बोललाय, की ते वाचून किळस आली. ही घाण आणि याचे पोशिंदे हे महाराष्ट्राला लागलेली विषारी कीड आहे. ही कीड लवकरात लवकर नष्ट व्हायला हवी.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी ते महाराष्ट्र वाचवत आहेत पवारांना सोबत घेऊन.

In reply to by श्रीगुरुजी

नबाब मलीकांचे मंत्रीपद राष्ट्रवादीमुळॅ काढून घेता आले नाही ही एक मजबुरी होती पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे. नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार.

In reply to by विजुभाऊ

पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे. नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार. राऊत रोज भाजपची पिसे काढतात म्हणून. :)

In reply to by क्लिंटन

राऊत जे बरळले आहेत तसे समाजवादी पार्टी किंवा राष्ट्रीय जनता दलाचे लोकही जाहीरपणे म्हणणार नाहीत. महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांची पत्नी परदेश दौर्‍यावर गेली असताना परत येताना त्यावेळी कडक असलेल्या कस्टम नियमांचे उल्लंघन करून तिने काही वस्तू चोरीने देशात आणल्या अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्याची चर्चा जाहीरपणे व्हायला लागली तर आपली किती बदनामी होईल या भयाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले असे वाचल्याचे/ऐकल्याचे आठवते. त्या मुख्यमंत्र्यांचे नाव होते मारोतराव कन्नमवार. आणि सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते उघडपणे हिंसेचे समर्थन करत आहेत ते निमूटपणे बघत आहेत. या प्रवक्त्यांनी वापरलेली भाषा आपण जाहीरपणे सोडाच खाजगी संभाषणातही वापरू शकणार नाही किंवा मिपासारख्या व्यासपीठावर लिहू शकणार नाही. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते चालू देतात याचा अर्थ त्यांचीही या सगळ्याला संमती असली पाहिजे. म्हणे उद्धव ठाकरे एकदम संयत बोलतात. माय फुट. असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे. तथाकथित सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाने एकदम खालची पातळी गाठली आहे. यापेक्षा खाली जाऊ शकणार नाही असे वाटावे तोच नवीन काहीतरी होते आणि जुने विक्रम मोडले जात आहेत.

In reply to by क्लिंटन

.या प्रवक्त्यांनी वापरलेली भाषा आपण जाहीरपणे सोडाच खाजगी संभाषणातही वापरू शकणार नाही किंवा मिपासारख्या व्यासपीठावर लिहू शकणार नाही. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते चालू देतात याचा अर्थ त्यांचीही या सगळ्याला संमती असली पाहिजे. म्हणे उद्धव ठाकरे एकदम संयत बोलतात. माय फुट. असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.
हेच म्हणतो.

In reply to by क्लिंटन

असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे. अगदी लहानपणी समजायला लागल्यापासून मला शिवसेना हा पक्ष, शिवसेना नेते आणि शिवसेना समर्थक यांची कायमच शिसारी वाटत आली आहे.

In reply to by क्लिंटन

गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे. पूर्वी कृष्णा देसाई, श्रीधर खोपकर यांचे खून सेनेला पचविता आले. आता तसे करता येईल असे वाटत नाही. मनसुख हिरेनच्या खुनानंतर वाझेला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न उठांनी केला होता. पण तो अयशस्वी ठरला.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत या अद्वितीय वाचाळवीरांना असे कसे बोलू शकता ..... त्यांचे म्हणे असे होते कि या ४० आमदारांचे आत्मे मेले आहेत आणि उरलेत ते मुडदे ... मग तेच (मुडदे) तर परत येणार ना मुंबई ला ! अतिशय स्वछ मनाच्या राऊतांवर असा आरोप करू नये

In reply to by चौकस२१२

४० आमदारांचे आत्मे मेले आहेत आणि उरलेत ते मुडदे दुर्दैवाने येणाऱ्या पार्थिवाना सरळ पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवू असे राऊत म्हणाले होते म्हणून त्यांचे आत्मे मृत झाले आहेत हि मल्लिनाथी सर्वोच्च न्यायालयात टिकली नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने केवळ उच्च न्यायालयात का गेला नाहीत याचे कारण त्यांच्या मालमत्तेला आणि जीवाला धोका आहे हे स्वीकृत केले असेच नव्हे तर महाराष्ट्र सरकारवर त्यांच्या आणि कुटुंबियांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्या बद्दल स्पष्ट आदेश दिले. तेंव्हा श्री राऊत यांचे बेफाट आणि बेताल वक्तव्य सतत शिवसेनेस भोवताना दिसते आहे. पण लक्ष्यात कोण घेतो

मा.उध्वजी जरी एकटे पडले तरी शिवसेना संपणार नाही.कारण जनकल्याणासाठी सत्तेचा वापर कुणीच करत नाही. स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच सत्ताकारण व राजकार णाचा वापर होतो . जर एकजात सगळे शिवसेनेचे आमदार सेना सोडुन जरी गेले तरी अश्या स्वार्थी जनप्रतिनिधींची नवी फळी पुढे येईल ज्यांना सेने मधुन सत्तेकडे जाण्याची संधी आयतीच उपलब्ध होईल.

म रा सरकारने शिवसेनेच्या बंडखोर विधायकांच्या कुटूंबाची सुरक्षा व्यवस्था कालच काढुन घेतली होती. आज केंद्र सरकारने शिवसेनेच्या बंडखोर विधायकांनां व त्यांच्या कुटूंबाला वाय सूरक्षा व्यवस्था लागु केलेली आहे. शिवसेनेच्या बंडखोर विधायकांनां व त्यांच्या कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी देणार्या शिवसेनेतील सं रा सारख्या नेत्यांची अवस्था वाईट होणार आहे.

In reply to by डँबिस००७

विधायक नाही हो “आमदार”. ईतकीही काय घाई झालीय मराठी शब्द डावलून हिंदी शब्द वापरायची?

आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत आहोत हे याला समजत नाही. संजय राऊत हा बहुतेक वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. बाकी शिवसेनेच्या बाबतीत विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण सार्थ होण्याची चिन्हे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. -- ते वेड लागण्याचे कारण कदाचीत हे असावे.

In reply to by श्रीगुरुजी

मला असा संशय यायला लागला आहे की, संजय राऊत हे उठा यांचे अत्यंत विश्वासू व इमानदार सेवक आहेत व ते उठा व कुटुंबीय यांच्या मनातले विचार प्रगटपणे मांडत असतात. आपल्याकडे कितीही वाईटपणा आला तरी ते त्यांचे काम करत राहतात. त्यामुळे संजय राऊत यांना दूर करणे उठा यांना जरूरीच वाटत नाही. ध्यन्यासाठी इतका वाईटपणा घेणे, लोकांचे शिव्याशाप खाणे सोपे नाही.

😉


In reply to by शाम भागवत

बरोबर आहे. आपल्याला जे बोलायचे आहे ते उठा राऊतच्या तोंडातून बोलतात.

उत्तर प्रदेश मधील रामपुर व आझमगड या मुस्लिमबहुल जागेंवर झालेल्या पोट निवडणुकीत भाजपाचा दणणीत विजय झाला आहे.