Skip to main content

महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...

लेखक मनिष यांनी रविवार, 01/05/2022 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम. Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत. Maharashtra काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्‍यांचा द्वेष नको. :-)

वाचने 17188
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

अविकसीत, पवारांनी ४० वर्षापासून खड्डयात घातलेला महाराष्ट्र ३८ रूपये देतो. तर अतिविकसीत मोदींचा गुजरात ४ रूपये तर त्याहुनही जास्त विकसीत योगींचा युपी ३ रूपये देतो. महाराष्ट्र, मुंबई, शिवसेना, मावळे ह्यांचा द्वेष करानर्यांनी जरा डोळे ऊघडून पहावं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हाच विचार करत होतो.पण महाराष्ट्रावरचा केंद्राकडुन होत असणारा अन्याय हा आदिम काळापासुन चालत आलेला आहे.केंद्रात कोणाचेही सरकार असो महाराष्ट्राला नेहेमीच सापत्न वागणुक मिळाली आहे.(काका केंद्रात मंत्री असताना सुध्दा.)

In reply to by कानडाऊ योगेशु

लोकसंख्येचे गुणोत्तर पाहिले तर २ कोटी लोकसंख्या असलेले दिल्ली राज्य १३.७% प्रत्यक्ष कर जमा करते, तर दिल्लीच्या ७ पट लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातून ३८% प्रत्यक्ष कर जमा होतो.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे शिलादिक्षीत तसेच केजरीवालांची दिल्ली मोदींच्या अतिवकसीत गुजरात तसेच योगांच्या युपी पेक्षा जास्त टॅक्स देते. અરે મારા ગુજરાતને ક્યાં લઈ ગયા? (अरे कुठे नेऊन ठेवला गुजरात माझा??) :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रत्यक्ष कर उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा ३८/१०० आहे यात पवारांचे काय कर्तृत्व आणि गुजरातचा हिस्सा ०४/१०० इतका आहे यात मोदींची काय चूक हे उलगडून सांगाल का? कावीळ झालेल्या सर्व जग पिवळे दिसते अशी म्हण आहे तसा तुम्हाला मोदीफोबिया झाला आहे का?

In reply to by Nitin Palkar

पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे मागे अमितशहा बोलून गेले होते. पवारांनी महाराषट्रासाठी काय केले हे ३८ रूपये दाखवत आहेत तर मोदींनी गुजरात ला किती विकसीत केले हे ४ रूपये दाखवत आहेत. खरा कर्तृत्ववान कोण हे मोदीभक्तांना समजावे हा ऊद्देश. राष्ट्रहीत वगैरे हे मोठमोठ्या गप्पा मारून नाहीतर प्रत्यक्ष कामे करून सिध्द करावे लागते. ०४/१०० इतका आहे यात मोदींची काय चूक हे उलगडून सांगाल का? मोदी गुजरातचा निच विकास करू शकले नाहीत ह्यासाठीही आता नेहरूंना जबाबदार धरायचे का?

छान माहिती. अशीच माहिती महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नात मुंबई चा वाटा किती किंवा पुणे किंवा इतर शहरांचा वाटा किती अशा प्रकारे मिळेल काय ?

नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे जाहीर वक्तव्य आहे(पुरावा नाही नका सर्व मीडिया नी ते प्रसिद्ध केले होते आणि आज पण उपलब्ध आहे) गुजरात नी केंद्र सरकार लं टॅक्स का द्यावा. गुजरात नी स्वतच्या कष्टावर राज्य प्रगत केले आहे. केंद्राला टॅक्स आम्ही का द्यावा नालायक राज्यांना वाटण्यासाठी . असा त्या वक्तव्याचा आशय होता. आता ते प्रधान मंत्री आहेतं पण कोठून निवडणूक लढवली आहे. यूपी मधून .. ज्या राज्याला ते नालायक राज्य समजत होतें अती प्रचंड लोकसंख्या आणि अक्कल कमी असे यूपी चे वर्णन करता येईल. तिथे काही ही न करता फक्त भावनिक थापा मारून . कोणताही गया गुजरा फालतू माणूस निवडून येवू शकतो. सोनिया .मतदार संघ यूपी. इंदिरा मतदार संघ यूपी. नरेंद्र मतदार संघ यूपी स्मृती इराणी .. मतदार संघ यूपी जया बहादुरी. मतदार संघ यूपी अजून खूप आहेत. पण जर देश म्हणून आपण भारत मान्य केला असेल तर कोणता भाग किती टॅक्स देतो हा वाद अयोग्य आहे देश म्हणजे एकत्रित कुटुंब च असते. चार भावांचे कुटुंब असेल तर एक नालायक असतो एक रुपया पण कमवत नाही. ऐश करत असतो तीन भावांच्या जिवावर. स्वतःची लायकी झीरो. तरी हा नालायक ब्रदर स्वतःला च ग्रेट समजत असतो. यूपी,बिहार,राजस्थान,झारखंड, chhatisgadh,mp , ह्या राज्या न सारखा. पण एकत्रित कुटुंब टिकावे वाटत असेल तर संयम ठेवावा लागतो पण नालायक भावाला . तू काही कामाचा नाहीस तुला ज्या सुविधा मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त तीन मोठ्या भावांमुळे . नाही तर तू जगण्याच्या अन लायकीचा राहणार नाहीस .. ह्या सत्य स्थिती ची जाणीव त्याला करून देणे गरजेचे असतें इथे उलट आहे. नालायक,देशावर बोजा असणारी, देशाला dubavnari ,देशामध्ये नसती तर भीक मागून पण पोट भरले नसते. असे हे नालायक देशाचे मालक असल्या सारखे वागत आहेत. आणि त्याचा तीव्र संताप बिगर हिंदी राज्यात आहे.

In reply to by sunil kachure

मला वाटले की हिंदी भाषिक राज्यांवरचा राग फक्त तिकडच्या हिंदी च्या धाग्यावर काढायचा असतो. सगळीकडेच तेच ते लिहायचे असते काय ? लेखकाने एवढी मेहनत घेतली आहे तर त्यांचा काहितरी सन्मान ठेवा ना.

In reply to by धर्मराजमुटके

(टॅक्स देत नसले/आयतखाऊ असले तरी) हिंदी भाषीक नी त्यांच्य् राज्यांचे प्रतयेक धाग्यावर समर्थन करणे गरजेचेचे आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वर तुम्हाला जसं ते हिंदी भाषकांचा राग करताय ते दिसलं तसंच.
अच्छा ! मला तर मी असं काही इथे लिहिल्याचं दिसत नाही. असो ! भावना पोहोचल्या.

In reply to by धर्मराजमुटके

http://misalpav.com/comment/1139643#comment-1139643 ही प्रतीक्रीया कुणीतरी दुसरेज धर्मराज देऊन गेले असावेत. मिपावर एकाच नावाचे दोन आयडी कसेकाय?? खिक्क.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या प्रतिक्रियेत मला तरी मी हिदी भाषिकांचे समर्थन केले आहे असे दिसत नाही. कोणा तरी त्रयस्थाचे मत घेतले पाहिजे. असो ! चांगल्या धाग्यावर निष्फळ प्रतिसाद काही कामाचे नाहीत म्हणून थांबतो.

चुकीचे चित्र वरील चित्र मिस लीडींग आहे कारण जसे दिल्ली एन.सी.आर. ला स्वतंत्र राज्य पकडुन त्यांचे टॅक्स मधील योगदान दाखवले आहे तसेच मुंबई अन बृहन्मुंबै ला स्वतंत्र राज्य पकडुन , त्यांचे योगदान स्वतंत्र रित्या दाखवल्यास उर्वरीत महाराष्ट्र फार काही दिवे लावत असेल असे वाटत नाही. एकट्या मुंबईचा अर्थ्संकल्प अख्ख्या केरळ राज्या पेक्षा मोठ्ठा असतो म्हणे. मुंबई ही भारतातील बहुतांश मोठ्ठ्या कंपन्या ंचे हेडक्वार्टर असल्याने त्यांचे प्रॉफिट्स तिथे दाखवले जातात आणि तेथुन टॅक्स कलेक्ट होतो , त्यात मुंबई चे काही विशेष कौतुक नाही. तसेच सेम फॉरेन इन्वेस्ट्मेंट बाबत आहे . एखाद्याला फॉरेन इन्टिटीला समजा टाटा मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ते काय जमशेदपुरला जाऊन पैसे गुंतवणार आहेत काय ? किंव्वा रिलायन्स मध्ये गुंतवायचे असतील तर ते काय जाम नगर मध्ये जाऊन गुंतवणार आहेत काय ? जिथं मुंबंईत हेड ऑफिस आहेत तिथेच पैसे गुंतवले जाणार ना , त्यात महाराष्ट्राचे काय कौतुक ? आणि ही मुंबई महाराष्ट्राचा फायदा कमी अन नुकसानच जास्त करते , ह्या मुंबईला पाणी देण्यासाठी तानसा भातसा वगैरे ठाण्यातील तलावांवर डल्ला मारलेला आहे, ह्या मुंबईला वीज देण्यासाठी आमच्या कोयना प्रकल्पावर डल्ला मारलेला आहे. हे म्हणजे महाराष्ट्राला ओरबाडा , मुंबईला गोंजारा अन त्यातुन आलेला टॅक्स केंद्राला पाठवुन त्यांची चाटत बसा असे काहीसे आहे. मुंबई जर स्वतंत्र राज्य / केंद्रशासित प्रदेश असेल , तर हीच हीच वीज , हे पाणी महाराष्ट्रातील अन्य विभागात देता येईल , तिथे विकास घ्डवता येईल . आपण वरील चित्र महाराष्ट्र वजा मुंबई असे दाखवल्यास चर्चा करता येईल . माझ्या अंदाजे , महाराष्ट्र वजा मुंबई केल्यास उर्वरीत महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडु च्या लेव्हलला जाऊ शकणार नाही . पण असो , पॉलिटिक्स इज ऑल अबाऊट इकोनॉमिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्स इज ऑल अबाऊट पॉलिटिक्स. मुंबईतील मलिदा कोण खातो आपल्याला माहित आहे, त्यांच्या दहशतीपुढे बोलायची काही सोय नाही. त्यामुळे - तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरं मग ? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ह्याने काय फरक पडतो? ही संमृद्धीची बेटं सामान्य मराठी लोकांच्या काय उपयोगाची ? प्रश्न इतकाच आहे की मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र चे टॅक्स कलेक्शन किती ? जी.डी.पी किती ? पर कॅपिटा इनकम किती ? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती ? एक्ट्या मुंबईमुळे (अन त्यातही परराज्यात चालणार्‍या त्यांच्या ऑफिसेस मुळे ) वाढीव टॅक्स कॉन्ट्रिब्युशन दिसत असेल तर त्याचा काय उपयोग ? ३६ विद्यार्थ्यांच्या वर्गात ३५ विद्यार्थी ३४ मार्क मिळवुन नापास होत आहेत अन एक विद्यार्थी १०० मार्क मिळवत आहे तर अ‍ॅव्हरेज काढल्यास प्रत्येकाला ३५.८३ मार्क्स पडत आहेत म्हणुन सगळेच विद्यार्थी पास करता येतील का ? मुंबईने महाराष्ट्राचे जेवढे भले केले आहे त्यापेक्षा जास्त नुकसानच केलेले आहे असा माझा विश्वास आहे . मुंबई केंद्रशाशित प्रदेश असता अन महाराष्ट्राची राजधानी अहमदनगर किंव्वा औरंगाबाद असती तर जास्त भलं झालं असतं महाराष्ट्राचे असे माझे ठाम मत आहे . आणि हो मला ह्याबाबतीत राजकारणाशी घेणेदेणे नाही. दिल्लीत मनमोहन सिंग ह्यांच्या नेट्रुत्वाखाली सोनिया गांधींचे सरकार होते तेव्हाही मी हेच म्हणत होतो अन उद्या भविष्यात संपुर्ण मुंबई भाजपाच्या हातात आली तरीही मीच हेच म्हणत असेन. मुंबईला सोडा , उर्वरीत महाराष्ट्राचा विचार करा . त्यातल्या त्यात आमच्या पश्चिम महाराष्ट्रात "साहेबां"च्या कृपेने जरातरी प्रगती आहे. कसे का असेना पण सहकारी संस्थांचे जाळे आहे, उसकारखाने आहेत , दुध महासंघ आहेत, एम.आय.डी.सी आहेत. तिकडे मराठवाड्यात , अमरावती मध्ये , विदर्भात , उत्तर महाराष्ट्रात काय अवस्था आहे पहा . एकट्या मुंबईच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्राची लाल असे म्हणण्यात काही एक अर्थ नाही .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भारतातील प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे. राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास झाल्याचे कोणत्याच राज्यात दिसणार नाही. प्रतेक राज्यात अत्यंत मागास असे जिल्हे असतात. काही तर पूर्ण राज्य च मागास असतात. पुणे,नाशिक,औरंगाबाद,कोल्हापूर,नवी मुंबई,मुंबई,ठाणे, अशी अनेक शहर महारष्ट्र मध्ये आहेत. त्या पेक्षा कमी प्रगत. असा सातारा,रत्नागिरी,सिंधू दुर्ग,कराड, कोल्हापूर चा ग्रामीण भाग .शिर्डी, नागपूर,असे अनेक भाग पण विकसित आहेत अनेक राज्यातील सर्वात जास्त विकसित भागा पेक्षा पने भाग जास्त विकसित आहेत. गडचिरोली, रायगड मधील आदिवासी भाग,विदर्भातील काही भाग अविकसित आहे. पण इतका पण नाही की त्यांची तुलना यूपी,बिहार ,राजस्थान मधील ग्रामीण भागाशी करता येईल.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुंबई ही भारतातील बहुतांश मोठ्ठ्या कंपन्या ंचे हेडक्वार्टर असल्याने त्यांचे प्रॉफिट्स तिथे दाखवले जातात आणि तेथुन टॅक्स कलेक्ट होतो , त्यात मुंबई चे काही विशेष कौतुक नाही.
वरील चित्रांत जीएसटी सुद्धा घेतले आहे. जीएसटी मध्ये तसे होत नाही. इतर राज्यात प्लेस ऑफ बिझनेस असल्यास जीएसटी नंबर काढावा लागतो. जीएसटी कलेक्शन सुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे.

सर्व चित्रावरून एकच स्पष्ट होते.देशाचा पूर्ण भार. गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक,तमिळ nadu, केरळ ,आंध्र ह्याच राज्यांवर आहे. देशाची अर्थ व्यवस्था च ह्या राज्यांवर अवलंबून आहे. मुंबई वेगळी काठून बोला असे टोमणे मारले जातात. पण मुंबई ही मुंबई आहे त्याला महाराष्ट्र चा त्याग च कारणीभूत आहे. मुंबई हा पांढरा हत्ती आहे त्याचा राज्याला खूप मोठा फायदा नाही. खूप मोठा टॅक्स भारत सरकार वसूल करते आणि .हा गुजरात,दक्षिण भारत,महाराष्ट्र ह्यांचा पैसा उर्वरित राज्यांना वाटला जातो. काही ही contribution नाही तरी त्यांना खूप मोठा पैसं मिळतो. ही पद्धत बदलली आणि राज्यातील वसूल होणारा टॅक्स त्याच राज्यांना 60 ते 70 टक्के परत केला तर हा दक्षिण ,पश्चिम भाग .जगातील श्रीमंत देशांची बरोबरी करेल. पण बाकी भागाचे लोढणे गळ्यात असल्या मुळे काही फायदा होत नाही. आज पर्यंत मुंबई मुळे महाराष्ट्र जात्यात होता पण आता.गुजरात,कर्नाटक,केरळ,तमिळ nadu supat आहेत. त्यांना त्याची जाणीव होवू लागली आहे. बंगलोर साठी कर्नाटक लं पण खूप मोठी नैसर्गिक साधन संपत्ती खर्च करावी लागत आहे. आणि फायदा दुरेच घेत आहेत. बंगलोर आणि मुंबई ह्यांच्या समस्या same आहेत. स्थानिक लोकांचे शोषण.

मुंबई जे आज देशातील सर्वात प्रगत शहर आहे त्याचे श्रेय भारतातील कोणत्याच प्रदेशातील लोक महाराष्ट्र ल देत नाहीत.त्यांच्या मनात खूप प्रचंड तिरस्कार आहे महाराष्ट्र विषयी. कारण मुंबई च्या दर्जा चे शहर उभे करण्याची कुवत देशातील कोणत्याच राज्यात नाही. मुंबई जे आज सर्वात प्रगत शहर आहे त्याचे पूर्ण श्रेय मी तरी ब्रिटिश लोकांनाच देईन. त्यांच्या मुळे मुंबई प्रचंड विकास करू शकली. आणि दुसरे श्रेय महाराष्ट्र ल. महारष्ट्र नी वीज,पाणी,कचरा नियोजन, हे सर्व खूप उत्तम रित्या केले. आणि कायदा सुव्यवस्था महारष्ट्र नी . उत्तम रित्या राखली उद्योगपती,दुकानदार ,व्यापारी तर जगातून पण इथे आले असते. नवी मुंबई तर पूर्ण पने. महारष्ट्र नीच वसवली आहे. भारतातील बाकी राज्यांचा काही संबंध नाही. मुंबई चे वेगळे करून महाराष्ट्र चे भारत सरकार लं देत असलेल्या contribution च हिशोब करा हा युक्तिवाद च अत्यंत चुकीचा आहे. मग अहमदाबाद,गांधी नगर वगळून गुजरात चे टॅक्स collection pan बघा.बंगलोर,वगळून कर्नाटक चे बघा,चेन्नई वगळून तमिळ nadu चे बघा. तरी माझी पूर्ण खात्री आहे मुंबई वगळून बाकी महारष्ट्र चे gst collection he. उत्तरेतील सर्व राज्य. यूपी,बिहार आणि इतर पेक्षा नक्कीच जास्त असेल. उर्वरित महारष्ट्र चे टॅक्स कलेक्शन. पण यूपी,बिहार,mp, rajsthan,ह्यांच्या एकत्रित collection पेक्षा पण जास्त असेल.

In reply to by sunil kachure

मराठमोळे लोक उ.प्र. व बिहारच्या लोकांपेक्षा प्रामाणिक आहेत असे म्हणायचे आहे? महाराष्ट्रातून मुंबई बाजुला केली तर ईतर जिल्हे काय दिवे लावतात ते पाहणे उचित ठरेल. फारतर पुणे. पण ही दोन्ही शहरांच्या विकासामागे राज्यातील तकालिन नेत्रुत्व होतेच पण केंद्रातील तत्कालिन सरकारांचाही वाटा आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महाराष्ट्र मधून मुंबई वेगळी केली तर खंडर बनेल मुंबई.सर्वांना माहीत आहे म्हणून करत नाहीत .नाही तर कधीच केली असती मुंबई मुलुंड,तुकडे जास्तीत जास्त बोरिवली.मानखुर्द संपली मुंबई. ह्या भागाला पाणी पुरवठा कोण करणार. हे वेगळे राज्य असेल . महारष्ट्र करणार नाही गुजरात करणार नाही .जसा हरियाणा दिल्ली la पाण्यासाठी नाचवत असतो.तसा महाराष्ट्र मुम्बई ला नाचवेल. महाराष्ट्र मध्ये होणारी वीज महारष्ट्र वेगळे राज्य असल्या मुळे मुंबई ल देणार नाही. मुंबई च्या सीमेवर महारष्ट्र च्या चेक पोस्ट असतील . कोणाला काय सवलत द्यायची .ते महारष्ट्र ठरवेल.. २०० करोड चा फ्लॅट ची किंमत २ लाखावर येईल. पुणे दिसले. महाराष्ट्र द्रोही लोकांना. नाशिक दिसत नाही. Maharashtra द्रोही लोकांना. नवी मुंबई दिसत नाही. महाराष्ट्र द्रोही लोकांना. महाराष्ट्र चे सम हवामान दिसत नाही. महाराष्ट्र द्रोही लोकांना. येथील कायदा सुव्यवस्था,महाराष्ट्र चे पुरोगामी पण दिसत नाही. यूपी,बिहार पेक्षा महाराष्ट्र खूप उच्च दर्जा चा आहेच.

In reply to by sunil kachure

तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा.. मुंबई वरून जे देश पातळीवर राजकारण चालू असते. आणि मुंबई महारष्ट्र मुळे आणि ब्रिटिश लोकांमुळेच प्रगत आहे हे सत्य मान्य केले जात नाही.. तेच same. दक्षिण भारतातील सर्व राज्य जी देशात पण खूप प्रगत आहे..त्यांच्या बाबत पण घडतं आहे. दक्षिण भारतील लोकांच्या सुप्त भावना मराठी लोकांच्या भवणांसारख्याच आहेत.. आम्ही कायदे पाळायचे,आमची शहर,राज्य प्रगत करायची. आणि त्याचा फायदा हक्कानी नको तेच उचलत आहेत. प्रश्न फक्त मुंबई आणि महाराष्ट्र पुरता नाही. तो समुच्य दक्षिण भारताचा पण प्रश्न झाला आहे. देशाचा एक भाग फक्त लोकसंख्या वाढवत आहे..बेरोजगार लोकांची फौज तयार करत आहे. आणि देशाचा दुसरा भाग लोकसंख्या नियंत्रण करत आहे.रोजगार निर्मिती करत आहे. हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं.

In reply to by sunil kachure

सुनिल, तुला नक्की काय म्हणायचे आहे? मला तुझे प्रतिसाद गिरीश कुबेरांच्या लेखांसारखे दिसत आहेत. त्यांचे लेख कितीहीवेळा वाचले तरी त्यांना काय म्हणायचे असते हे कळत नाही. "देशाचा एक भाग फक्त लोकसंख्या वाढवत आहे." महाराष्ट्राची लोकसंख्या उत्तर प्रदेश खालोखाल आहे. अगदी गेल्या ६० वर्षापासून. मुंबई वरून जे देश पातळीवर राजकारण चालू असते. कोण करते हे ? १०५ हुताम्यांचा विषय नेहमी कोण काढते? असो. मुंबई महारष्ट्र मुळे आणि ब्रिटिश लोकांमुळेच प्रगत आहे हे सत्य मान्य केले जात नाही.. हे कोणी अमान्य केले ? काँग्रेस्/भाजपाच्या कोणत्या नेत्यानी? सुनिल, भारतात आधुनिक शि़क्षण्/रेल्वे/तंत्रज्ञान आले ते ब्रिटिशांमुळेच्, हे जगजाहीर आहे. त्यात अमान्य करण्यासारखे काय ?मुंबई बंदर असल्याने त्यांनी मुंबई/परिसराचा विकास जास्त विकास केला. पुर्वी मुंबईला कोणी नावे ठेवली की मुंबईच्या समर्थनार्थ "बाँबे ईज बाँबे' म्हणायची मुंबईकरांना सवय होती. त्याची आठवण झाली.

मुंबई बाजूला केली तर महारष्ट्र काहीच नाही खूप मागास राज्य आहे. असे महाराष्ट्र च तिरस्कार करणारे स्वतच्या आत्म्याला थोडी शांती मिळावी म्हणून बोलत असतात.मग त्या साठी gdp,टॅक्स collection . मुंबई मधूनच जसे राज्यात आहे असे आकडे फेकत असतात जो भारताचा नागरिक नाही अशा व्यक्ती नी भारतावर ह्याच भावनेने कॉमेंट केली तर ती पण . ह्या लोकांना मान्य असावी असे गृहीत धरायला काही हरकत नाही. भारतातील दहा वीस शहर सोडली तर भारतात काही नाही ही शहर वेगळी केली तर भारत हा अतिशय मागास देश आहे. त्या साठी शहरांचे gdp,tax collection ह्याचे पुरावे देतील च. मग ही त्यांची कॉमेंट कशी चुकीची आहे हे दाखवायला हेच मुंबई महाराष्ट्र विषयी बोलणारे काय उत्तर देतील. तेच उत्तर महारष्ट्र चे मुंबई विषयातील कॉमेंट वर असेल.

कराची,इस्लामाबाद पाकिस्तान पासून वेगळे केले तर पाकिस्तान मध्ये काय आहे. शांघाय चीन पासून वेगळे केले तर चीन मध्ये काहीच दम नाही Newyork, Washington, न्यूजर्सी अमेरिके पासून वेगळे केले तर अमेरिकेत आहेच काय. आणि ह्या साठी. टॅक्स कलेक्शन,त्या शहराचा gdp हे आकडे वापरले जातील आणि सिध्द पण होईल. पण हे सर्व दावे साफ खोटे आहेत. उर्वरित पाकिस्तान नसेल तर कराची, Islamabad पण प्रगत शहर नसेल. उर्वरित चीन नसेल तर शांघाय पण प्रगत शहर राहू शकणार नाही तेच अमेरिका,चीन ,भारत .ह्यांना लागू आहे. आणि तेच राज्यांना पण लागू आहे.कर्नाटक शिवाय बंगलोर काहीच नसेल.महाराष्ट्र शिवाय मुंबई काहीच नसेल.गुजरात शिवाय अहमदाबाद,गांधी नगर काहीच नसेल.तामिळनाडू शिवाय चेन्नई काहीच नसेल.

In reply to by sunil kachure

मुंबई साहेबाने डेव्हलप केली आणि महाराष्ट्राला मिळाली. इतर मोठी शहरं राजधानी म्हणुनच तयार करण्यात आलि. असो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साहेब मुंबईला त्याच दृष्टीने तयार करत होता. शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटली आणि साहेबांनी अगदी तेव्हापासुन त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं. मुंबईत पोलिस आणि न्यायालय यंत्रणा निर्माण करुन व्यापारी प्रतिष्ठानांना आकर्षीत करणं वगैरे सुधारणा सुरु झाल्या होत्या. मुंबई कुठल्याही स्थानीक राज्याचा भाग नव्हती, त्यामुळे राजकीय उठाव आणि बंडाळींपासुन हे आर्थीक केंद्र सुरक्षीत राखण्याचा उद्देशही होता. उत्तर आणि दक्षीणेपासुन जवळपास समान अंतर असणारं बंदर हि देखील मोठी जमेची बाजु होती. हि साहेबांचं भारतातलं आर्थीक दृष्ट्या सुरक्षीत शहर आपोआपच स्वतंत्र भारताची आर्थीक राजधानी बनलं. पुढे ति महाराष्ट्राने झगडा करुन मिळवली. भारत सरकारला दुसरी एखादी आर्थीक राजधानी वसवण्याची गरज नव्हती आणि ते सहाजीकच होतं. म्हणुन मुंबई साहेब गेल्यानंतर ७५ वर्षानंतरही नंबर १ राहिली.

मुम्बै जी ब्रिटीशानी विकसीत केली तिथे स्वातन्त्र्यानन्तर फक्त लोन्ढे आले बाहेरुन. असे होउ नये म्हणुन प्रयत्न झाले नाहीत आणि फक्त मत पेट्यान्वर नजर ठेउन मुम्बै मध्ये झोपड्पट्या मात्र वाढवल्या गेल्या.

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.c3sind… चीन नी जेव्हा अंदमान आणि निकोबार बेटांवर मालकी हक्काचा दावा केला तेव्हा.फक्त स्वार्थ साधण्यासाठी सत्य मान्य केले. मराठी साम्राज्य नी अंदमान निकोबार बेट स्वतःच्या अधिकारात लढून घेतली होती. कान्होजी आंग्रे हे भारतीय नाविक दलाचे आद्य निर्माते आहेत त्यांनी ती बेट पोर्तुगीज आणि dutch ह्यांना हाकलून ताब्यात घेतली होती. म्हणून ही दोन बेट भारतात आहेत. सर्व जग मराठी साम्राज्याचा मोठेपणा मान्य करेल.अगदी पाकिस्तान पण करेल. पण उर्वरित भारत कधीच मान्य करणार नाही. इतका तिरस्कार आहे त्यांना महारष्ट्र च.

In reply to by sunil kachure

+१ तसेच काही महाराष्ट्रद्रोही मराठी सुध्दा.

हा हा हा मजा येतेय =)))) मला तुमच्या राजकारणात अजिबात रस नाही . उगाच भावनिक मुद्दे वापरुन काहीयेक उपयोग होणार नाहीये . म्हणे महाराष्ट्र द्रोही =)))) मुद्दा इतका सरळ सोप्पा आहे की -
मुंबई ह्या एका शहरामुळे जी.डी.पी. , टॅक्स कलेक्शन , इन्टरस्तेट मायग्रेशन वगैरे वर जे जे काही स्टॅटिस्टिकल मॅप्स दिलेले आहेत त्यात महाराष्ट्र आघाडीवर दिसत आहे. महाराष्ट्र वजा मुंबई असे पाहिल्यास चित्र वेगळे असेल . महाराष्ट्र कदाचित कर्नाटक तमिळनाडु सारखे असेल किंव्वा युपी, बिहार सारखे असेल. हु नोज ?
आता ह्यावर व्हॉटअबाऊटरी करणारे तुम्ही शेकडो प्रतिसाद द्या , त्यातुन काहीही साध्य होणार नाहीये . मी वकील नाहीये , मी स्टॅटिस्टिशियन / इकॉनॉमिस्ट आहे, मी माझी हायपॉथेसिस विधाने नंबर्स , इम्पिरिकल डेटा आणि थरो मॅथेमॅटिकल थेअरी च्या सहाय्याने सिध्द करतो , किंव्वा कंजक्चर्स मांडतो. नुसती वादावादी करुन शब्दांच्या वाफा झाडुन विधाने सिध्द करायला आपण काय कोर्टात उभे नाही. =)))) महाराष्ट्र वजा मुंबई ह्याची तुलना अन्य भारतीय राज्यांशी करणारा डेटा मिळाला तर दाखवा. त्यावरुन माझे हायपॉथेसीस खरे ठरले म्हणुन मला आनंद होणार नाहीये की खोटे ठरले म्हणुन मला दु:ख होणार नाही. न्युयॉर्क वि टेक्स्सास वि कॅलिफोर्निया ही तुलना जितक्या अलिप्तपणाने मी करतो तितक्याच अलिप्तपणाने महाराष्ट्र वि युपी/ बिहार ही तुलना करतो. आता ह्या प्रतिसादावर अजुन प्रत्युत्तर म्हणुन तुम्ही खंडीभर प्रतिसाद देऊन मनोरंजन करु शकता किंव्वा सरळ डेटा आणि नंबर देऊन हा सुर्य हा जयद्रथ म्हणत एकदाचे काय ते विधान सिध्द असिध्द करु शकता .

In reply to by प्रसाद गोडबोले

कंपन्या जेव्हा आपला विक्रीचे आकडे राज्याप्रमाणे मांडतात त्यात मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे वेगळे दाखवतात. मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे हे पंजाब हरियाणा च्या आसपास असतात, कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा कमीच असतात.

In reply to by धनावडे

मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे हे पंजाब हरियाणा च्या आसपास असतात, कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा कमीच असतात. तमीळनाडू कर्नाटक बेंगळूरू चेन्नई वगळता पकडताय का?? असं वगळून वगळून पकडलं तर अमेरीका देश महाराष्ट्रापेक्षा गरीबलदाखवता येईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या सारख्या महान माणसाला नव्हता हा प्रतिसाद आम्ही महाराष्ट्र द्रोही माफ करा.

In reply to by धनावडे

प्रतिसाद कुणालाही द्या. पण येनकेन प्रकारे महाराष्ट्र वाईट असं जे दाखवताय ते थोडं थांबवा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राऊत साहेब कोण दाखवतय उगाच मनाचे श्लोक नका बोलू, त्यांनी सांगितल मुंबई सोडून आकडे बघावे लागतील तर मी माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून जे माहित आहे ते सांगितल.

Mumbai वेगळी झाली तर तर मुंबई पुढे काय अडचणी येतील.महाराष्ट्र तरी मुंबई का पाकिस्तान पेक्षा मोठे शत्रू राष्ट्र असेच समजेल.काहीच सहकार्य करणार नाही.दबाव टाकला तर उद्रेक होईल.

काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर आहे.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का.

काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर आहे.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का.

काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर केरळ नी कधीच राम मंदिर आणि काश्मीर मध्ये इंटरेस्ट दाखवला नाही.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का. देश प्रेमी पंजाब खलिस्तान वादी झाला फक्त फालतू राजकारणी लोकांमुळे.महारष्ट्र नी पण त्याच मार्गाने जाणे अपेक्षित आहे का?

मुंबई महाराष्ट्र लं देण्यास काँग्रेस सरकार बिलकुल तयार नव्हते. खूप आंदोलन झाली .उजव्या विचारसरणी चे पक्ष आणि काँग्रेस दोन्ही महाराष्ट्र विरोधी होते. Communist पक्ष,शेतकरी पक्ष,कामगार संघटना आणि बाकी लोक मागणीवर ठाम होते .किती तरी लोकांचे बळी गेले.१०५ पेक्षा खूप जास्त इतके महारष्ट्र विरोधी वागून पण काँग्रेस त्या नंतर झालेल्या निवडणुकीत जिंकून आली. फक्त पश्चिम महाराष्ट्रात दणकून मार खाल्ला. विदर्भ मध्ये राहणाऱ्या लोकांना मुंबई विषयी कधीच प्रेम नव्हत. पण पश्चिम महाराष्ट्र नेहमी च मुंबई साठी बलिदान देण्यास तयार राहिला. आज पण तीच अवस्था आहे. मुंबई नसेल तर महारष्ट्र काहीच नाही हे वाक्य पश्चिम महाराष्ट्र मधील कोणीच बोलणार नाही.

In reply to by sunil kachure

"इतके महारष्ट्र विरोधी वागून पण काँग्रेस त्या नंतर झालेल्या निवडणुकीत जिंकून आली." (७८-८० च्या अपवद वगळला) तर १९९५ पर्यंत कोंग्रेस सतत सत्तेवर होती. ह्याचा अर्थ मतदारांनी "महाराष्ट्र विरोधी" वगैरे मुद्द्यांना केव्हाच फाट्यावर मारले होते. देशात काँग्रेस सत्तेवर होती त्यामागे महत्वाचे कारण 'महाराष्ट्राने सलग निवडुन दिलेले काँग्रेसचे खासदार हे होय. आता केंद्रात भाजपा आहे. ते महाराष्ट्रविरोधी आहेत असे वाटत असेल तर लोक आंदोलन करू शकतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Maharashtra च्या जिवावर कोणी उठले तर आंदोलन मूर्ख लोक करतील. दीर्घ काळाचा विचार करून प्रतिकार कसा करायचा ह्याचे प्लॅन करून त्या नुसार विरोध केला जाईल बिनडोक पने पोलिस लोकांचा लाठीमार सहन करण्यास महाराष्ट्र इतका बिनडोक नक्कीच नाही पण या देशावर जीवापाड प्रेम करणारी दोन च राज्य देशात आहेत. एक महाराष्ट्र आणि दुसरा पंजाब.. बाकी कोणी नाही

In reply to by sunil kachure

राज्ये प्रेम करतात म्हणजे काय हो?तामिळनाडू राज्य भारतावर कमी प्रेम करते? पश्चिम बंगाल कमी प्रेम करते? २०२० मध्ये भ्रष्ट राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचात होता. 'सदा अग्रेसर'. हे नोकरशाहीतले वरिष्ठ अय एस एस/आय पी एस अधिकारी जे राज्याची आर्थिक धोरणे ठरवतात.. खुळे नसतात की प्रेमापोटी काहीतरी करतील. सर्वात जास्त शहरीकरण व बकालीकरण झालेले महाराष्ट्र राज्य आहे. धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये हालाखीत राहणार्या लोकांची स्थिती पाहिली आहे का ?(ह्यात अनेक महाराष्ट्राच्याच विविध जिल्ह्यांतून आलेले आहेत). "Uttar Pradesh, Maharashtra, Bihar, West Bengal and Rajasthan account for over 50 per cent deaths attributed to air pollution in India" https://www.downtoearth.org.in/news/air/air-pollution-half-of-india-s-d… हे जीवापाड प्रेम ?

In reply to by sunil kachure

पण या देशावर जीवापाड प्रेम करणारी दोन च राज्य देशात आहेत. एक महाराष्ट्र : सहमत आणि दुसरा पंजाब..?!?! शंका.. विशेष करून " पंजाब च्या शिखांनी जेवहा शेतकरी आंदोलनाला धर्म युद्धाचे रुप दिले " तेवहा विश्वास डळमळाला ( पर्देषत दिवलि कर्य्क्रमत अन्दोलन वैगरे )

In reply to by चौकस२१२

देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे

In reply to by चौकस२१२

देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे

In reply to by चौकस२१२

देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एकच मुद्दा संपुर्ण महाराष्ट्रभर चालत नाही. स्थानीक बाहुबली नेते आमदार,खासदार निवडूण आणतात. काॅंग्रेसने असेच नेते पाळले होते. भाजपने अनेकांना “क्लिनचीट” देऊन किंवा ईडी दाखवून भरती केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग काँग्रेसी/शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. ई,डी किंवा आय्कर खाते भाव देत नसल्यास सरळ टी.व्हि वर येउन सांगावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्याने काय होनार माई? परत तो कमळग्रस्त नेता पंजाग्रस्त होनार नी “क्लिनचीट” मिळवनार. ज्याच्या हातात सत्ता तो हवी तशी वापरनार. ईतके दिवस काॅग्रेसची सत्ता असल्याने त्याना बोल लावता येत होते. पण कमळाचे फूल देखील ”राष्ट्रहीत” घेऊन “क्लिनचीट” देऊन वर पक्षात मोठमोठे पदं देते हे पाहून सामान्य माणसाचा मतदान करन्यावरील विश्वास ऊडालाय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

टीव्ही९, रिपब्लिक भारत,आज तक,बाकी मीडिया ची नाव माहीत असतीलच. तुम्हाला माहित नसेल तरी लोकांस माहीत आहेत हे फक्त bjp चीच सेवा करतात.केंद्रीय सरकार ची अती प्रचंड शक्ती,केंद्रीय सरकार चे अमर्याद अधिकार कधी पण कोणत्या ही मीडिया हाऊस ल टाळा लावू शकते. उदारता आणि लोकांचे स्वतंत्र ता ह्यावर विश्वास नसेल तर.

In reply to by sunil kachure

काहीही? तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकचे स्व्तःचे टी.व्ही चॅनेल्स आहेत. द्रमुकच्या चॅनेलवरुन दररोज केंद्रसरकारच्या धोरणांवर टीका होत असते.(सध्या हिंदी व भाजपाला वाढु न देण्यासाठी काय करायचे ह्यावर चर्चा होती(तामिळ व्यक्तीनेच हे मला सांगितले). आंध्रमध्ये जगन मोहन रेड्डी ह्यांचा 'साक्षी' चॅनेल आहे. ह्या चेनेलवरुन रेड्डी ह्यांचा उदोउदो चालु असतो व मोदी/केंद्राचर टीका चालु असते. "माझ्यावर टीका केलीत तर तुमची जीभ बाहेर काढेन" अशी सरळ धमकी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ह्यांनी भाजपा कार्यकर्त्याना दिली होती(नोव्हेंबर-२०२१) https://www.youtube.com/watch?v=AkLeD9PqQbs ह्यातील कोणत्याही चॅनलला टाळे लागल्याची माहिती नाही. ई.डी.ची नोटीस आल्याचीही माहिती नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वाईट वाटून घेवू नका पण तुम्ही ठराविक राजकीय हेतू नी प्रेरीत आहात.ठराविक राजकीय पक्षाचे साथीदार आहात. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती दक्षिण भारतीय राज्य आहेत. आमची भाषा आणि आमची संस्कृती हीच श्रेष्ठ अशी मानणारी राज्य आहेत. देश दुय्यम आहे. दक्षिण भारतातील राज्यात तेथील प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या भाषेतील न्यूज चॅनेल आहेत त्या वर कारवाई करणे ह्याचा अर्थ ती राज्य भारताने गमावणे हा आहे. महाराष्ट्र मध्ये मराठी लोक च राज्य द्रोही आहेत.राज्य बुडाले तरी चालेल पण ह्यांचे देश देश हे गुऱ्हाळ चालू असते. मराठी लोकांच्या हिताला मराठी लोक च नख लावतात . ते दक्षिण भारतात घडतं नाही. महारष्ट्र नी स्वतःचे चॅनेल चालू करून केंद्रावर टीका करायला सुरुवात केली तर मराठी देशप्रेमी पाहिले आंदोलन,मोर्चा हिंसा करतील. ही लोक मागास आहेत देशात कोणी काडी ची किंमत देत नाही,देशात ह्यांना कोणी विचारात नाही. ह्याचे हेच कारण आहे मराठी लोकांना राज्याचा अभिमान नाही पण देशाचा आहे.

In reply to by sunil kachure

केरळ पूर्ण bjp विरोधी राज्य आहे.आरएसएस ,bjp कार्यकर्ते ह्यांच्या वर तिथे हलके होत्तात. केरळ मध्ये कोणत्याच केंद्रीय एजन्सी नी कारवाई केली आहे का? Cbi,ed तिकड जाणार पण नाही. Maharshtra मध्ये राज्यातील मंत्र्यांवर ed ,cbi कारवाई करते केरळ मध्ये करू शकत नाही .ना तिकडचे राज्य सरकार सहकार्य करेल ना तेथील जनता ह्याची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र मध्ये राज्य द्रोही लोकांची संख्या प्रचंड आहे म्हणून ह्या केंद्रीय एजन्सी इथे बिन्धास्त धुमाकूळ घालत असतात.

In reply to by sunil kachure

मराठी लोकांना राज्याचा अभिमान नाही पण देशाचा आहे. असहमत मराठी लोकांना राज्याचा अभिमान आहेच पण ते पूर्ण पने जाणून आहेत कि देश हा मह्त्वा त्वचा आहे आपली एकूण प्रतिक्रिया केंद्रातील सरकार आवडत नाही म्हणून दिलेय असेच वाटते ( १८८ पठडीतील !) आपण देश या कल्पनेलाच सुरुंग लावणार असाल तर मग देशच आधी ...

In reply to by चौकस२१२

देश प्रेमावर जेव्हा भारतील लोक बोलतात तेव्हा त्या मधील बहुसंख्य नटक्या लोकांना चोपून काढायची इच्छा होते. प्रशासन. देशाचे नुकसान करून ,देशाचे उत्पादन बुडवून स्वतःचा फायदा घेणारी ह्या मध्ये बहु संख्य लोक आहेत . ह्या नालायक लोकांनी देश प्रेमावर न बोलणेच उत्तम.. भारत झालेली प्रतेक अतिरेकी हल्ला. विस्फोटक मुंबई पर्यंत पोचली. किती तरी देशद्रोही लोक सहभागी असल्या शिवाय असे घडू च शकत नाही. ही पण प्रशासनात असणारी लोक. भारतातील नद्या नाले प्रदूषित केले कोणी? भारतील लोकांनीच ना?. हे स्वतःला देश प्रेमी म्हणत असतील तर किती फटके दिले पाहिजेत. देशद्रोही ,देशाचे नुकसान करणारे च स्वतःला देश प्रेमी म्हणून घेत आहेत.