मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

निनाद · · राजकारण
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

वाचने 48677 वाचनखूण प्रतिक्रिया 354

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 19:43
अजितदादा किंवा दरेकर या मराठी माणसांना तथाकथित क्लीन चिट देणारे माफिया आणि नबाब मलिक या परप्रांतीय दाऊदच्या माणसाला क्लीन चिट देणारे, असंख्य परप्रांतीयांना राज्यसभेची खासदारकी देणारे, पाकिस्तान्याचा घरी बोलावून पाहुणचार करणारे महाराष्ट्र हितैषी असतात.

In reply to by श्रीगुरुजी

इरसाल Sat, 04/30/2022 - 10:51
श्रीगुरुजी, तुम्ही कोणाला समजवताय? काल मी प्रयत्न केला पण शेवटी असं जाणवलं की राष्ट्र्वादी कॉग्रेसचे कार्यकर्ते/पाठिंबे आणी आत्मघाती हल्ले करणारे पुर्ण पणे ब्रेनवॉश झालेले "फिदायीन" यांच्यात काहीच फरक नसतो. आता बघालच तुम्ही माझ्या ह्या प्रतिसादानंतर

In reply to by सुबोध खरे

दरेकरांचा घोटाळा वाचनारे कोण? नी नंतर तयांनाच विधानपरिषदेचे पक्षनेते बनवनारे कोण? अजितदादांचे पुरावे (बैलगाडी भर) घेऊन फिरनारे कोण? ना पहाटे त्यांच्याच सोबत शपथा घेनारे कोण? मतदारांना ही फसवता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 19:59
परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री बनविणारे कोण? तुरुंगात जाऊन सुद्धा त्याला पाठिंबा देऊन मंत्रीपदावर कायम ठेवणारे कोण? मराठी मराठी म्हणून मते मिळवून परप्रांतीयांना राज्यसभेची खासदारकी विकणारे कोण? स्वत:चा एकही खासदार निवडून आणता येत नसल्याने मोदींचे फोटो लावून मोदींच्या नावे मते मागून नंतर विश्वासघात करणारे कोण? याकूब मेमन, अफझल गुरू अशा दहशतवाद्यांच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मंत्रीपदाचे बक्षीस देणारे कोण? टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देणारे कोण?

In reply to by श्रीगुरुजी

परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री बनविणारे कोण? तुरुंगात जाऊन सुद्धा त्याला पाठिंबा देऊन मंत्रीपदावर कायम ठेवणारे कोण? मलिकांवर आरोप भाजपने लावलेत, कोर्टात सिध्द झालं तर त्यांचंही मंत्रापद दाईल. भाजपने आरोप लावले म्हणजे न्याय झाला असं नसतं. मराठी मराठी म्हणून मते मिळवून परप्रांतीयांना राज्यसभेची खासदारकी विकणारे कोण? कोणाला विकली कितीला विकली?? काही पुरावा? कि ऊगाच काहीतरी ठोकायचं? स्वत:चा एकही खासदार निवडून आणता येत नसल्याने मोदींचे फोटो लावून मोदींच्या नावे मते मागून नंतर विश्वासघात करणारे कोण? मोदीं नव्हते तेव्हाही सेनेचे खासदार निवडूण येत होते. मोदींच् फोटो लावून खासदार निवडून आणायचे ईतकी वाईट वेळ सेनेवर कधीही आलई नाही, ऊलट सेनेच्या साथीने भाजपने आपले खासदार निवडूण आणले ऊगाच का मातेश्रीच्या पायरीवर युती करा म्हणून डोकं टेकवायला भाजपचे नेते यायचे. :) टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देणारे कोण? टिपू चे नाव आधीपासूनच ऊद्यानाला होते. निट माहीती घ्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 21:53
इतक्या ठार अज्ञानावर हसावं का कीव करावी ते समजत नाही. तस्मात हसता हसता कीव करतो आणि कीव करता करता हसतो. अर्थात माहिती सांगूनही उपयोग नाही कारण ती समजणारच नाही. तस्मात अज्ञानी विश्वात विहार करणाऱ्यांचा स्वप्नभंग करण्याचा प्रमाद मी करणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कोणतं अज्ञान? मातेश्रीवर युती करायाला भाजप नेते यायचे नाहीत?? की टिपू सुलातानाचे नाव आधीच देण्यात आले होते होते? झाकली मूठ ठेवण्याची तुमचा हातोटी वाखाणण्या जोगी आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 22:29
कोणतं अज्ञान हे सांगून समजणार आहे का? ४ थ्या प्रकारातील माणसांना अज्ञानाचे अज्ञान असते.

In reply to by श्रीगुरुजी

बरं कुमच्या समाधानासाठी आपण मातोश्रावर भाजपनेते डोके टेकवायचे नाहीत असं मानू.

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 15:26
मेट्रो सहित कार शेड आणि patari सहित बुलेट ट्रेन यूपी मध्ये घेवून जा. काही गरज नाही उगाच भोंग्य वर पोट भरेल असे समजणाऱ्या राज्यातील लोकांची पोट पाण्याची सोय करायची.

मुक्त विहारि गुरुवार, 04/28/2022 - 17:15
https://www.dainikprabhat.com/sanjay-raut-said-on-kirit-somaiyas-wound/ https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bhabha-hospital-mumbai-medical-report-reveals-important-information-kirit-somaiya-attack/amp_articleshow/91117941.cms ------ मुळांत प्रश्र्न हा आहे की, एखाद्या खासदारावर हल्ला करणे, हे योग्य आहे का? कारण, ह्या राजवटीत आधी नौसैनिकाला मारहाण केली, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली आणि आता तर एका खासदारावर हल्ला केला गेला .... ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

श्रीगुरुजी गुरुवार, 04/28/2022 - 19:05
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या वाक्प्रचाराचा अर्थ भाजपला थोडासा समजला असावा. कोणतीही गरज नसताना पूर्वी १९८९ आणि पुन्हा २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून मुंबई महापालेकेतील काही प्रभागांपलिकडे अस्तित्व नसलेल्या या पक्षाला आपण कमीपणा पत्करून का मोठे केले याचा भाजपने गांभीर्याने विचार केला पाहिजे. अत्यंत विश्वासघातकी, अत्यंत खालच्या थराच्या, जनतेत नगण्य स्थान असलेल्या नेत्यांना आपण सर्व अपमान सहन करून का महत्त्व देत होतो आणि अजूनही का महत्त्व देत आहोत हे भाजप नेत्यांना आजतागायत समजलेले नाही. शिवसेना मात्र कोणत्याही भाजप नेत्याला कणभरही महत्त्व न देता त्यांच्यै अत्यंत अर्वाच्य टीका करीत होती व आहे. शून्य असलेल्या पक्षाला भाजपने मोठे केले, परंतु हा पक्ष भस्मासुरासारखा वारंवार भाजपच्याच मानगुटीवर बसला. जी गंभीर घोडचूक पूर्वी १९८९ मध्ये अडवाणी-महाजन-मुंडे यांनी केली तीच गंभीर घोडचूक २०१९ मध्ये मोदी-शहा-फडणवीसांनी केली. परंतु यातून ते काहीच शिकल्याचे दिसत नाही. परंतु यामुळे शिवसेना हा पक्ष जास्तीत जास्त उन्मत्त, उन्मादी व उर्मट होत गेला व उपकारकर्त्या भाजपवरच दुगाण्या झाडायला लागला. अर्थात भाजप भविष्यात हीच गंभीर घोडचूक पुन्हा एकदा करण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/28/2022 - 19:38
असहमत. शिवयेना ग्रीऊंड लेवल काम आणी प्रखर हि्दूत्व हियावर वाढलेला पक्ष आहे. ह्या ऊलट फक्त राजकारणासाठी हिंदूत्व वापरनारा भाजप पक्ष जास्त विश्वासघातकी आहे. सेनेने २०१४ ला ज्यावेळी सुनामी लारखी मोदी लाच होती त्यावेळी तब्बल ६३ आमदार भाजपविरूध्द लढून जिंकवून दाखवले होते.

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 19:32
१९४७ भारतीय पासून भारतीय राजकीय पक्षांना सत्तेवर येण्याचा हक्क मिळाला .७५ वर्ष झाली. Bjp ल किती वर्ष लोकांनी स्वतःचे राज्य करते म्हणून निवडले. सरळ दहा वर्ष सोडा विस्कळीत दहा वर्ष पण नाही आणि जी सत्ता मिळाली आहे ती bjp खूप चांगला , प्रजा हीत समजणार पक्ष म्हणून नाही..बाबरी मशीद पाडणे,हिंदू मुस्लिम दंगल.त्या मधून धर्मीक विभाजन. अशा रीती नी मिळाली आहे. Bjp काही चांगला राजकीय पक्ष नाही. त्या पेक्षा सेना, ममता ची tirumal आणि असे अनेक स्थानिक पक्ष bjp पेक्षा उत्तम दर्जा चे आहेत.

sunil kachure Fri, 04/29/2022 - 16:53
छ्त्रपती संभाजी राजे गादी वर आले.त्यांच्या मार्गात काटे पसरवण्याचे काम महारष्ट्र मधील च गद्दार लोकांनी केला ती प्रवृत्ती आज पण जिवंत आहे .मुंबई ,पुणे सारख्या शहरांचा पूर्ण उपभोग घेवून.मराठी असल्याचा फायदा घेवून प्रशासनात असणारी काही लोक पण महारष्ट्र कसा वाईट आहे असे सांगत असतात .मुंबई ,पुण्यात राहून उच्च शिक्षण ,सर्व सुविधा मिळवून महाराष्ट्र कसा वाईट आहे असे सांगत फिरत असतात . महाराष्ट्रात सत्ता उपभोग घेवून .सर्व सुविधा घेवून ,आरामदायी आयुष्य चा उपभोग घेवून महाराष्ट्र कसा वाईट आहे असा प्रचार करत असतात . ग्रामीण भागात २४ तास वीज,पाणी ह्याचा उपभोग घेवून,सर्व सुविधा भोगून महाराष्ट्र कसा वाईट आहे असे बोंबलत असतात. सहकारी कारखाने,बँक,दूध डेअरी,ह्यांचा पूर्ण फायदा घेवून महाराष्ट्र कसा बकवास आहे हे सांगत फिरत असतात जाती भेद नष्ट होवून जाती जातीत असणारे प्रेम आणि असणारी शांतता .अशा सुंदर वातावरणात राहून पण महाराष्ट्र कसा वाईट आहे असे बोलत असतात . विविध राज्यातून येथे येवून सर्व सुख सोयी चा उपभोग घेणारे महारष्ट्र कसा third class आहे असे बोलत असतात. छत्रपती संभाजी राजांचा काळात जो गद्दार लोकांचा सुळसुळाट झाला होता तो आता झाला आहे

In reply to by sunil kachure

sunil kachure Fri, 04/29/2022 - 17:29
Maharashtra सरकार बरोबर महाराष्ट्र लं बदनाम कोण करत आहे. १) अर्णव गोस्वामी सहित तमाम हिंदी न्यूज चॅनेल . २)कंगना राणावत. ३) मोहित कोंबोज. ४) किरीट सोमय्या . आणि ह्यांना साथ देणारे फडणवीस विदर्भ वादी महाराष्ट्र चे तुकडे झाले पाहिजेत असे स्वप्न बघणारे. ह्या सर्वांचा पाठीराखा bjp.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 19:31
Maharashtra सरकार बरोबर महाराष्ट्र लं बदनाम कोण करत आहे. १) अर्णव गोस्वामी सहित तमाम हिंदी न्यूज चॅनेल . २)कंगना राणावत. ३) मोहित कोंबोज. ४) किरीट सोमय्या . या सर्व देशद्रोह्यांना (सॉरी महाराष्ट्र द्रोह्याना) त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवून द्या पाहू कचरे बुवा तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है कोण म्हणतोय रे तो कि डॉ. आंबेडकरांच्या घटनेत कोणत्या राज्यात राहायचं हे ठरवण्याचं स्वात्नत्र्य आहे ते गद्दार कुठचे हायला पण किरीट सोमय्या तर मुंबईतच जन्माला आले आणि वाढले. Kirit Somaiya (born 12 February 1954)was born and brought up in Mumbai in a middle-class family. He graduated as Chartered accountant from the Institute of Chartered Accountants of India] (ICAI) in 1979 and also secured a rank in the All India Merit List. He was conferred with a Doctorate from the University of Mumbai in 2005, with thesis of "Capital Market: Small Investors Protection" आणि बायको तर मराठी आहे (मेधा ओक) पण मूळ गुजराती आहेत ना मग द्या हाकलून महाराष्ट्र द्रोही कुठचे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 19:46
मुंबई इंडियन्स हा गुजराती मालक असलेला संघ आयपीएलमध्ये तळाला आहे तर गुजरात टायटन्स प्रथम क्रमांकावर आहे. आता बोला. महाराष्ट्रावर गुजरात अन्याय करतोय.

इरसाल Fri, 04/29/2022 - 17:34
पटियाला (पंजाब) मधे शिवसेनेने काढलेल्या "खलिस्तान विरोधी मोर्चा" चे नेतृत्व करणार्‍या हरीश सिंगला यांना पंजाब शिवसेनेतुन काढुन टाकलेय. याचा अर्थ शिवसेनेला खलिस्तान मान्य आहे तर.

In reply to by इरसाल

सुक्या Fri, 04/29/2022 - 21:58
आम आदमी पार्टी ची खलिस्तान वाद्यांविषयी असलेली सहानुभुती काही लपुन राहीलेली नाही. खरे तर आम आदमी पार्टी ही वाहत्या गंगेत हात धुवुन घेते. ऑपर्टुनिस्ट हे विशेषण त्यांना चपखल बसते. त्यामुळे निद्रीस्त असलेली ही चळवळ येत्या काही दिवसात डोके वर काढेल हे नक्की. खापर फोडायला बीजेपी / केंद्र आहेच. खरे तर ही खलिस्तान चळवळ मुख्यतः विदेशी लोकांच्या जीवावर चालते. आमच्या गावा शेजारी असलेले वॅंकुवर याचे केंद्र आहे. बहुसंख्य शिख लोकसंख्या असलेले हे शहर व त्या उपनगरात राहणारी लोक (जन्माने कॅनेडीयन) पण स्वतःला "भारतीय मुळाचे" म्हणन्याऐवजी "पंजाबी" असे संबोधतात. हेच लोक ह्या चळवळीला खतपाणी घालत असतात. मागे दिल्लीत झालेल्या दलालांच्या आंदोलनाच्या वेळेस तर यांना अगदी उत आला होता.

In reply to by सुक्या

sunil kachure Fri, 04/29/2022 - 22:33
फुटीर वादी चळवळी अशाच तयार होतात आणि वाढतात. मुल जन्माला येण्यास शारीरिक संबंध येणे,गर्भवती होणे ,9 महिने गर्भ पोटात वाढणे ही जशी procedure आहे. तशीच फुटीरवादी वृत्ती , चळवळी पण आहे 1)विशिष्ट भाषिक,धार्मिक,जातीय समुदायावर नेहमीच अन्याय होणे त्यांना सापत्न वागणूक देणे. २)त्या मधून सत्तेविरूद्ध असंतोष निर्माण होणे. ३) त्या मधून संघटित स्वरूपात विरोध होणे. इथ पर्यंत फुटीर वृत्ती नसते. पण पुढें ४)त्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करणे,त्यांचा सतत अपमान करणे. ५) आणि मग सत्तेविरूद्ध सशस्त्र संघर्ष केला जातो आणि सर्वात शेवटी ह्या स्थिती चा फायदा उचलण्यासाठी परकीय शक्ती सक्रिय होतात. पण मूळ दोषी स्वदेशी सत्ता केंद्र च असते. विदेशी हस्तक्षेप हा कळस असतो.

In reply to by sunil kachure

sunil kachure Fri, 04/29/2022 - 22:54
वरची पोस्ट समजली असेल तर पुढे. एका वाक्यात हा समाज फुटीरवादी आहे अशी कॉमेंट करत जावू नका. स्वदेश विरुद्ध कोणी मजबूर झाल्या शिवाय संघर्ष करत नाही. जसे आपले आई वडील, भावंडं ह्यांच्या विरुद्ध कोणी सहज जात नाही. अन्याय चा कडेलोट झाल्यावर च आपल्याच लोकांशी संघर्ष करतो.

In reply to by sunil kachure

सुक्या Fri, 04/29/2022 - 23:21
वरची पोस्ट समजली असेल तर पुढे.
नाही समजली ... खुश? खरं तर मी तुमच्या पोस्ट वाचतच नाही. क्रुपा करुन माझ्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या बरळीला प्रतीवाद करण्याची माझी ईच्छा नाही .. वेळ तर मुळीच नाही . .

In reply to by सुक्या

sunil kachure Fri, 04/29/2022 - 23:39
Agenda राबवायचा असेल तर असा हेकेखोर स्वभाव होतो.त्या मुळे अशा हेकेखोर लोकांकडे बाकी पण जास्त गंभीर पने बघत नाहीत.. तुम्ही agenda चालवा.आणि लोकांवर बिन बुडाचे आरोप करत रहा.

sunil kachure Fri, 04/29/2022 - 21:08
मुळात तिथे खलिस्तान विरोधी मोर्चा काढणेच चूक होते. महाराष्ट्रात bjp जो आगावू पण करत आहे तो शिवसेनेने नी तिथे केला आहे. खलिस्तान चळवळ आता तरी तिथे active नाही.उगाच खाजवून खरूज काढण्याचे काही कारण नव्हते. पंजाब सेना नेतृत्व नी सेना प्रमुख ना अंधारात ठेवले असेल.कोणाच्या तरी अमिषा ला बळी पडून पंजाब शिवसेनेने ते काम केले असावे

In reply to by sunil kachure

सुबोध खरे Sat, 04/30/2022 - 09:41
खलिस्तान चळवळ आता तरी तिथे active नाही. कचरेबुवा हा शहामृगी अविर्भाव सोडून द्या आणि वाचन वाढवा. शीख फॉर जस्टीस हि संघटना काय आहे हे गुगलून पहा आणि अशी बेफाट वक्तव्ये करणे सोडून द्या.

कॉमी Sat, 04/30/2022 - 11:03
हिंदुस्तान म्हणजे हिंदीभाषिकांचा देश होय. ज्यांना हिंदी बद्दल प्रेम नाही त्यांनी देशातून निघावे. ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ते परकीय देशांचे हस्तक आहेत. (स्लीपर सेल टाईप) -- इति उत्तर प्रदेशमधले भाजपा मिनिस्टर. Exclusionary politics तुम्हाला पण एक ना एक दिवस धरणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे उदाहरण मस्त आहे !

In reply to by कॉमी

Exclusionary politics तुम्हाला पण एक ना एक दिवस धरणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे उदाहरण मस्त आहे ! ह्या बाबतीत सहमत, हे असले विचार असतील किंवा राजकीय हिंसा असेल मग ती विरुद्ध पक्षाच्या नेत्याच्या किंवा सामान्य कार्यकर्त्यांच्या विरोधात का असेना एक सामान्य माणूस म्हणून आपण कमीतकमी विरोध तरी केला पाहिजे. कधी आपला नंबर लागेल हे सांगता येत नाही.

In reply to by कॉमी

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 13:13
माझा हिंदीला विरोध आहे. मग कोणी मला देशद्रोही, परकीय देशांचा हस्तक वगैरे समजले तरी हरकत नाही. हिंदीत बोला, हिंदी वापरा असे उद्या मोदींनी किंवा मोहन भागवतांनी सांगितले तरी मी हिंदीला विरोधच करेन.

In reply to by श्रीगुरुजी

+१ हिंदी लादण्यात भाजपेयी आघाडीवर आहेत. युपीचा मुर्ख भाजपमंत्र्याने ते दाखवून दिलंय. महाराष्ट्रात भाजप नावाची घाण का नको हेया मागे हे देखील एक कारण आहे. फडणवीस सुध्दा हिंदीत बाईट देत असतात ह्या ऊलट अजितदादा मराठीसाठी आग्रही असतात. दाक्षीणात्य राज्यानी प्रादेशीक पक्षांना साथ दिली त्यामुळे त्यांचा दरीद्री हिंदीभाषकांपासून बचाव झाला, महाराष्ट्रानेही प्रादेशीक पक सेना-राष्ट्रवादीला साथ द्यायला हवी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 13:56
वारंवार अज्ञानप्रदर्शन नको. हिंदी लादण्याचे काम नेहरूंनी व कॉंग्रेसने केले. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लादण्याचे काम कॉंग्रेसचेच आहे. सेना-राष्ट्रवादी घाणीपेक्षा भाजप सहस्त्र पटीने चांगला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

वरील मुर्ख भाजपमंत्री नी अमीतशहा ह्यांच्या वक्तव्यानंतरही खापर नेहरूंवरच फोडाल का? आणखी किती दिवस नेहरूंचे नाव घेऊन दिवस ढकलनार? भाजप नावाची घाण का नको हे अमितशहांत्या वक्तव्याने कळलेच आहे. मराठी नी हिंदूत्वासाठी सेना आहेच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 14:39
बोलणे आणि कृती यातील अंतर समजते का? समजावे अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मुळात अमित शहांनी फक्त सूचना केलीये. सक्ती, बळजबरी वगैरे नाही. नेहरू आणि कॉंग्रेसींनी तर महाराष्ट्रावर सक्तीचे हिंदी लादली. बाकी महाराष्ट्रात मागील अडीच वर्षांत जे घाणीचे साम्राज्य माजलंय आणि मोगलाई आलीये, ते पाहता भाजप दशसहस्त्र पटीने चांगला.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात अमित शहांनी फक्त सूचना केलीये. सक्ती, बळजबरी वगैरे नाही. नेहरू आणि कॉंग्रेसींनी तर महाराष्ट्रावर सक्तीचे हिंदी लादली. सहमत.जबैबदैर पदावरील व्यक्तिने सुचनाही करायला नको. नेहरूंनी लादली हिंदी पण जशी तमीळनाडूने फेकली तशी महाराषट््राने का फेकली नाही?? मध्यंतरी भाजप सरकारही येऊन गेले त्यांनी काय दिवे लावले? नेहरू नेहरू माळ किती दिवस जपनार?
बाकी महाराष्ट्रात मागील अडीच वर्षांत जे घाणीचे साम्राज्य माजलंय आणि मोगलाई आलीये, ते पाहता भाजप दशसहस्त्र पटीने चांगला.
ह्या अडीच वर्षाआधीही पाच वर्षे सेना सत्तेत होती तेव्हा मात्र घाण नव्हती. आता दगाबाजी केल्याची शिक्षा दिली सेनेने तर घाणीचं साम्राज्य नी मोगलाई झाली? ऊद्या मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेऊन युती करा सत्तेची भिक द्या म्हणून भाजप नेते येतील तेव्हा ही मोगलाई देखील गोड वाटू लागेल. १९९५ साली ह्याच मोगलाई बरोबर सत्तेत होतात ना? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 16:58
१२०-३२ किंवा १२०-३०० माहिती आहे का? माहिती असेल तर १२०-३२-३०० झाल्यावर काय होतं ते समजेल अशी अपेक्षा आहे.

In reply to by धनावडे

विनोबा भावेनी आणीबानीला अणूशासन पर्व म्हटले होते. त्यानाही समजवायला हवे होते धनावडे तुम्ही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 04/30/2022 - 20:16
मोठे विनोबा भावेंचे चाहते दिसता. विनोबांचे गुरु गांधी होते हे माहित असेलच. गांधीजींचे हिंदी बाबत विचार तुम्हाला मान्य असतील असे मानू काय हो ? हिंदी भारताची कार्यालयीन भाषा असावी अशी त्यांची इच्छा होती. हिंदी काँग्रेसची अधिकृत भाषा त्यांनी ऍनी बेझंट यांचा विरोध पत्करून केली. हिंदी हि भारतीयांची भाषा आहे, हिंदीला हिंदी-हिंदुस्थानी असे म्हणावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदुस्थानी (हिंदी) भाषा ही राष्ट्रभाषा आहे असे ते वारंवार म्हणत. https://www.epw.in/engage/article/hindi-imposition-examining-gandhis-views-on-common-language#:~:text=His%20explanation%20about%20what%20he,languages%2C%20but%20the%20same%20language. आणीबाणी बाबत विनोबांचे मत अंतिम सत्य म्हणून घेणारे कट्टर गांधीवादी विरळेच. :)

In reply to by कॉमी

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 20:27
सरकारी संत विनोबांच्या आणिबाणीविषयी केलेल्या मतप्रदर्शनाला दादा धर्माधिकारींसारख्या विनोबांच्या कट्टर शिष्याने सुद्धा विरोध केला होता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Sat, 04/30/2022 - 20:47
बाहुबली नामक व्यक्तीने लिहिलेलं ब्रह्मदेवाला सुद्धा समजणार नाही. मग मी तर एक सामान्य मर्त्य मानव.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला १२०, ३२ किंवा ३०० हे समजलं पण १२२, १४ किंवा ३२७ पण हे समजलं नाही?? असं कसं चालेल गुर्जी?

sunil kachure Sat, 04/30/2022 - 17:03
महा आघाडी सरकार च्या काळात मोगलाई आली. म्हणजे नक्की काय? की उगाचच पितृ पक्षाला साजेसा वाचळपणा. Covid परिस्थिती व्यवस्थित हाताळली म्हणून मुख्यमंत्र्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. मुंबई पुण्या सारखी महानगर,करोडो परप्रांतीय लोकांची ये जा,लाखो विदेशी लोकांची ये जा महारष्ट्र मध्ये आहे. अशा ह्या राज्यात covid वर नियंत्रण आणने सोपे नव्हते. मुख्यमंत्र्यांनी कधी नीच शब्दात विरोधकांवर टीका केली नाही. संयमी आणि सभ्य पणाच दाखवला. Bjp ची काही लोक सोडून बाकी सर्वांना महा आघाडी सरकार उत्तम काम करत आहे असा विश्वास आहे. १०५ स्वतच्या अती विश्वास घातकी वृत्ती मुळे घरी बसले. हे दुःख अजून त्यांना विसरता येत नाही.