मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

निनाद · · राजकारण
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

वाचने 48677 वाचनखूण प्रतिक्रिया 354

मुक्त विहारि गुरुवार, 04/28/2022 - 13:39
उत्तर प्रदेशात ११ हजार भोंग्यांचा आवाज बंद तर ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर घातली बंधनं; योगींच्या ‘त्या’ तीन वाक्यांचा परिणाम https://www.loksatta.com/desh-videsh/after-yogi-adityanath-directives-11000-loudspeakers-removed-from-up-religious-places-35000-lower-volume-says-up-police-scsg-91-2906582/ ध्वनी प्रदूषणा बाबतीत, योगी सरकार अतिशय उत्तम निर्णय घेत आहे....

In reply to by मुक्त विहारि

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 13:42
उत्तर प्रदेश मधील करोडो लोक फक्त दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून हजारो km प्रवास करून दुसऱ्या राज्यात जात आहेत. हा प्रश्न भोंग्या सारख्या फालतू प्रश्न पेक्षा खूप महत्वाचा आहे.

मुक्त विहारि गुरुवार, 04/28/2022 - 13:51
करोना बैठकीत मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं; म्हणाले “देशहितासाठी…” https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-petrol-diesel-vat-maharashtra-west-bengal-sgy-87-2905576/?utm_source=ls&utm_medium=article3&utm_campaign=relatedstories हे राज्य सरकार, "कर" काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता, मला तरी वाटत नाही..... हे राज्य सरकार, साधा मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकले नाही.....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/28/2022 - 16:22
इतर काही राज्यांनी कर कमी केले, पण महाराष्ट्र राज्यात मात्र, कर कमी केले नाहीत.... त्यामुळे, हे राज्य सरकार म्हणजे, "लोका सांगे ब्रह्मज्ञान", ह्या तुमच्या मताशी मी नक्कीच सहमत आहे ...

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 14:00
हा हा हा . विराट हास्य. काय तो स्वतःचा बचाव. पाकिस्तान चीन मध्ये पण pm ची स्टेटमेंट दिसेल ह्याची व्यवस्था करा.त्यांना पण जरा हसू ध्या.

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 14:10
केंद्रातील bjp सरकार खूपच कार्यक्षम आहे हा विश्वास bjp कार्यकर्त्यांना आहे. केंद्र सरकार कोळसा पुरवठा करू शकले नाही म्हणून वीज निर्मिती देशात खंडित होणार आहे. फक्त bjp कार्यकर्त्यांची वीज जोडणी तोडली तर. विजेची टंचाई कमी होईल. देश हितासाठी ते इतका त्रास तर सहन kartil च.

मुक्त विहारि गुरुवार, 04/28/2022 - 15:11
करोना बैठकीत मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं; म्हणाले “देशहितासाठी…” https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-petrol-diesel-vat-maharashtra-west-bengal-sgy-87-2905576/?utm_source=ls&utm_medium=article3&utm_campaign=relatedstories हे राज्य सरकार, "कर" काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता, मला तरी वाटत नाही..... हे राज्य सरकार, साधा मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकले नाही.....

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/28/2022 - 19:42
ईतकीच काळजी असेल देशाची तर मोदींनी स्वत दर कमी करावेत केंद्रात. ऊगाच देश हिताचा आव आणक्यात मोदींचा हात कोणीच धरू शकत नाही.

In reply to by मुक्त विहारि

सुक्या गुरुवार, 04/28/2022 - 22:01
गंम्मत अशी आहे की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघे दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. मुख्यमंत्री टोला मारण्याच्या नादात काय पण बोलतात. तसे बोलणे दसरा मेळाव्यात खपुन जाते, एक मुख्यमंत्री म्हणुन जबाब्दार विधान करायचे असते याची अजुन त्यांना अक्कल आलेली नाही. उपमुख्यमंत्री पेट्रोल टॅक्स व जीएस्टी बद्दल काय बोलले ते पहा . . https://www.lokmat.com/maharashtra/uddhav-thackeray-vs-pm-narendra-modi-video-conference-ajit-pawar-honestly-confesses-that-taxes-imposed-by-maharashtra-government-on-exported-petrol-is-more-than-central-a747/ "केंद्रापेक्षा राज्याचा पेट्रोलवरील कर जास्त" मुख्यमंत्र्यांनी नाकारले पण अजित दादांनी स्वीकारले . .

In reply to by सुक्या

sunil kachure गुरुवार, 04/28/2022 - 22:20
पेट्रोल आणि डिझेल दर वाढीला फक्त आणि फक्त केंद्रातील bjp सरकार जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये तेलाच्या किंमती उतरल्या होत्या तेव्हा पण केंद्र सरकार नी देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होवू दिले नाही. हा लाखो करोड रुपये पैसा कोणाला वाटला हा एक मोठा प्रश्न आहेच. राज्यातील विक्री वर केंद्रीय टॅक्स मधून जितका पैसा केंद्र सरकार ल मिळतो. त्या प्रतेक राज्यातील विक्री नुसार राज्यांना ९०% परत करावा. राज्यांना एक रुपया पण टॅक्स लावण्याची गरज नाही. फडणवीस आणि अगदी मोदी साहेबांच्या पेक्षा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुद्धिमान,आणि प्रगल्भ आहेत जुमले बाजी तरी करत नाहीत.

In reply to by सुक्या

मुक्त विहारि Fri, 04/29/2022 - 03:26
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, योगी आणि ज्याअर्थी, योगीला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विरोध करत आहेत, त्याअर्थी, योगी नक्कीच उत्तम काम करत आहेत सध्या काही कारणांमुळे, माझा उत्तर प्रदेश मधील हिंदू लोकां बरोबर जास्त संपर्क होत आहे त्यांच्या मते, योगी सारखा मुख्यमंत्री जर 1950 च्या सुमारास मिळाला असता तर, उत्तर प्रदेश मधील लोकांना, इतर राज्यांत जायची काहीच गरज न्हवती. बाकी, ज्यांना शिवसेना का स्थापन झाली? हा इतिहासच माहिती नसेल, अशा लोकांना, समजवण्यात काही अर्थ नाही.... "का रे भुललासी, वरलीया रंगा?" ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, शिवसेना आणि अजान स्पर्धा आयोजित करून, शिवसेनेचे बेगडी हिंदूत्व, चांगलेच उघडे पडले आहे...अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे ...

In reply to by मुक्त विहारि

सुक्या Fri, 04/29/2022 - 07:45
हिंदुत्ववादी असले तरी योगि बर्‍यापैकी संतुलीत आहेत. म्हणजे त्यांच्या योजना किंवा उपाय योजना ह्या एका बाजुला झुकलेल्या नसतात. गुन्हेगार कुठलाही असो त्याला जात / धर्म न बघता कारवाई किंवा आताचे भोंगे प्रकरण. यात आदेश जो काढला तो सगळ्या प्रार्थना स्थळांसाठी आहे. त्यांनी हिंदु मंदीरांवर पण तीच कारवाई केली जी मस्जित वर केली. त्यामुळे विरोधकांना आरोप करायला फट सापडत नाही. हे सारे करताना ते मात्र स्वतः चे हिदुत्व प्रखर पणे पाळतात. कुठल्याही इफ्तार पार्टीला जात नाहीत किंवा तसा देखावा ही करत नाहीत. माझ्या श्रध्दा माझ्यापाशी तुमच्या श्रध्दा तुमच्यपाशी ... उगाच त्यांना मी खरा हिंदुत्ववादी आहे हे ओरडुन सांगावे लागत नाही.

In reply to by सुक्या

पण मजूरी करायला योगीच्या युपीतील लोकांना पवारांच्या महाराष्ट्रातच यावं लागतं. योगींनी पाच वर्षात काय दिवे लावले हे बंगाल च्या पुलाचा फोटो स्वतच्या राज्यातला दाखवले ह्यावरूच दिसलं. रात्री अपरात्री बलात्कार पिडीतेला जाळणे, ऊन्नाव कांड, हातरस कांड, नदीत वाहनारी प्रेते पाहीली की कळते महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत ते किती फायद्याच् ते. पवारांनी २०१९ साली महाराष्ट्र वाचवला नसता तर महाराषट्रात ही भाजपचे राज्य येऊन हिच वेळ आली असती. भाजप सत्तेत यावी ती युपी नी बिहार मध्येच. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमीळनाडू ही राज्ये भाजपला स्विकारत नाहीत म्हणून प्रगत आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Fri, 04/29/2022 - 12:23
माझे काही नातेवाईक गुजरात आणि कर्नाटक मध्ये स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच असच म्हणणे आहे कि महाराष्ट्र पेक्षा तिकडे व्यवसाय करणे खूपच सोपे आहे आणि महाराष्ट्रात जे आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार आहे, मागच्या काही वर्षात बाकीच्या राज्यांनी सुद्धा बरीच प्रगती केली आहे, येणाऱ्या १० वर्षात चित्र वेगळे असणार.

In reply to by धनावडे

धनावडे Fri, 04/29/2022 - 12:24
आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार आहे* याच्याऐवजी आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

sunil kachure Fri, 04/29/2022 - 13:32
किती तरी अभ्यास दौरे करून पण कोणता प्रदेश उद्योग साठी योग्य आहे हे तज्ञ लोकांना समजत नाही.त्यांच्यात पण मतभेद होतात. आणि दोन तीन लोकांनी एका कुठल्या तरी शहरात राहून पूर्ण राज्य कसे उत्तम आहे. असा निष्कर्ष काढणे च चुकीचे वाटते. ज्या राज्यात बाकी उर्वरित राज्यातून ट्रेन भरभरून लोक जातात तेच राज्य नंबर १. जे राज्य सर्वात जास्त टॅक्स देते तेच राज्य नंबर १. ज्या राज्यातील कमीत कमी एक शहरात तरी २४ तास अखंड वीज पुरवठा होतो . ते राज्य नंबर १. गुजरात आणि कर्नाटक पण ह्या मध्ये बसत नाही. ते अजून मागच्या नंबर वर च आहेत. कर्नाटक प्रगती करू शकते.तिथे बिगर bjp पक्षाची सरकार आज पर्यंत होती. बिगर bjp पक्षाची सरकार दीर्घ काळ असल्या मुळे कर्नाटक च पाया मजबूत आहे. गुजरात बाबत चे दावे. म्हणजे फक्त जूमले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Fri, 04/29/2022 - 13:56
ते नातेवाईक मुंबई वरूनच गुजरात ला शिफ्ट झालेत, महाराष्ट्रद्रोही आहेत ते तुमच्या भाषेत.

In reply to by धनावडे

sunil kachure Fri, 04/29/2022 - 13:01
नेहमीच एक नंबर वर कोणी राहतं नाही. मानवनिर्मित कारण तर आपल्या थोडी gsr हातात असतात. पण नैसर्गिक आपत्ती कधी येईल आणि किती नुकसान करेल ह्याची खात्री नाही. Covid नी किती तरी देशांना भिकेला लावलं. पण ह्या राज्यावर प्रचंड प्रेम असल्या मुळे महाराष्ट्र चा एक नंबर चे राज्य हा दर्जा जावून त्याची अधोगती व्हावी असा स्वप्नात पण विचार येणार नाही

In reply to by sunil kachure

शाहु फुले आंबेडकर ह्यांचे पुरोगामी विचार जपनारे पक्ष जोपर्यंत राज्यात आहेत तो पर्यंत हे राज्य १ नंबरलाच असेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इरसाल Fri, 04/29/2022 - 13:54
पण मजूरी करायला योगीच्या युपीतील लोकांना पवारांच्या महाराष्ट्रातच यावं लागतं. खरच की काय? मजाक की भी हद होती है यार ! (असुही शकेल जिकडे तिकडे ७/१२ नावावर करुन घेत आहेत त्यामुळे टेक्निकली वाक्यरचना बरोबर आहे)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

sunil kachure Fri, 04/29/2022 - 14:29
देशातील विविध भागातून येणाऱ्या रेल्वे खाली येतील ,कोणी प्रवासी नसतील तो दिवस महारष्ट्र साठी सोन्याचा दिवस असेल. त्या साठी गॅस सोडून चुलीवर जेवण बनवावे लागले तरी चालेल. गाड्या न ऐवजी महारष्ट्र बैल गाडीवर आला तरी चालेल. सर्व राज्यांनी खूप प्रगती करावी .आणि सर्व बेकार लोकांचे तांडे त्या राज्यात जावेत.

In reply to by sunil kachure

इरसाल Fri, 04/29/2022 - 14:44
पवारांना सांगुन बघा...मावळ सारखा गोळीबार केला तरी रेल्वे खाली येतील म्हणा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इरसाल Fri, 04/29/2022 - 15:06
कोण गुरु? स्वयंघोषीत "चाणक्य " आणी आजीवन "भावी पंतप्रधानां " विषयी बोलताय का आपण ? (ज्यांच्याविषयी मी वर म्हणालो की ते काहीच करु शकणार नाहीत असं तेच कां ते)

In reply to by इरसाल

हो. काहीत करू शकनार नाहीत ह्या भ्रमात राहील्यानेच १०६ घरी बसवलेत. :) फूकट मोदी त्यांना गुरू मानतात का? ही घ्या बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवली.' अशी बोलकी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. https://marathi.abplive.com/news/india/sharad-pawar-has-taught-me-in-politics-says-pm-modi-314135/amp

In reply to by इरसाल

sunil kachure Fri, 04/29/2022 - 15:01
म्हणजे सर्व राज्य प्रगती करतील आणि सर्व राज्य एक नंबर वर असतील आणि महाराष्ट्र फक्त 100 नंबर वर असेल.असा पण खूप लोकांच्या डोक्यात खुपत आहे. आपले काय किंवा दुसरे काय.. काही हरकत नाही. फक्त तो दिवस लवकर यावा.गोळीबार करून लोकांना येण्यासाठी थांबण्याची वेळ येवू नये.

In reply to by sunil kachure

इरसाल Fri, 04/29/2022 - 15:08
महाराष्ट्र फक्त भारतातच काय पण सगळ्याच बाबतीत जागतिक स्तरावर प्रसिद्ध व्हावा हीच सतत प्रार्थना. पण हे होवु द्यायला हवं नां? ओरबाडुन पोट भरल्याचं समाधान कधीच मिळत नसतं. वर घेवुन जाणार काय?

In reply to by इरसाल

sunil kachure Fri, 04/29/2022 - 15:22
काही ही झाले तरी आम्ही इथेच मरू.दुसरीकडे कुठे मेलो तरी ह्याच भूमीत आमुची राख मिसळावी ही इच्छा मराठी लोकांची असते..महाराष्ट्र असेल बकवास,भंगार,मागास ,पण आम्ही कोणावर बोजा तरी झालो नाही ना? काही एक दोन टक्के लोक असतील बाहेर पण जिथे असतील तेथील परंपरा,भाषा ह्यांचे ते कधीच अनादर करत नाहीत.अमेरिकेत असतील तर त्या देशाचे खावून त्यांची निंदा नालस्ती करत नाहीत.देशातील बाकी राज्यात असतील पण ज्या राज्यात राहतात त्या राज्याची निंदा करत नाहीत.धनावडे ह्यांनी लीहलेच आहे त्यांचे नातेवाईक गुजरात,कर्नाटक मध्ये आहेत आणि तिथे वातावरण छान आहे. त्यांनी त्या राज्यांची निंदा नालस्ती केली नाही. हा मराठी लोकात खास गुण आहे. मुंबई पुण्यात राहून,तिथेच प्रगती करून महाराष्ट्र लाच शिव्या देणारी aualadi आहेत. पण मराठी लोक असे वागत नाहीत.

In reply to by sunil kachure

शिवसेनेका विरोध म्हणून काही मराठीच असलेले लोक महाराष्ट्र, मुंबई आणी मावळे ह्यांचाही द्वेष करतात हे मिपावर दिसलंय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 18:55
काय सांगताय भुजबळ साहेब? हे जरा श्री उद्धव ठाकरे याना सांगा कि त्यांना ठोकून काढून सरळ करतील कि ते मग हा का ना का

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 19:20
मग पटापट मिपावरील महाराष्ट्र द्रोही माणसांची नावे मातोश्रीवर पाठवून द्या बरं. आणि त्यांचे पत्ते श्री मुटे यांच्याकडे मिळतीलच सगळ्यांना लंबे करू या माजलेत लेकाचे होऊन जाऊद्या हा का ना का

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 19:00
महाराष्ट्राच्या मुळावर उठलेल्या महाराष्ट्रविरोधी माफिया टोळीला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र किंवा मराठी माणसांचा द्वेष नसतो.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 19:16
असं कसं असं कसं? महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अस्मितेचा मक्ता कुणाकडे आहे? आई भवानीच्या आशीर्वादाने आणि शिवरायांच्या वरद हस्ताने स्थापन झालेल्या विकासाचे अध्वर्यू असलेल्या सरकारवर टीका करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही लोकांचा कोथळा वेशीवर टांगला गेलाच पाहिजे किंबहुना असे झाले नाही तर महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता हि न सुधारण्याइतकी दुखावली जाईल आणि हे उभा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.

In reply to by सुबोध खरे

सरकारवर टिका करणे ना मराठी माणूस, भाषा, महाराष्ट्र, मुंबई, मावळे ह्यांचा दोष करणे ह्यात फरक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्राच्या मुळावर कोण ऊठलंय हे कार्यालये मुंबईतून अहमदाबादला हलवनार्यांनी दाखवून दिलंय. माफिया टोळी कोण हे देखील मराठी माणूस जाणतो दरेकर ते अजितदादा क्लिनचिट वाटनारी माफीया टोळी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 19:24
दरेकर ते अजितदादा क्लिनचिट वाटनारी माफीया टोळी. कोण कोण चोर आणि गद्दार आहेत हो या टोळीत ? या सर्वाना सुद्धा टाडा लावा आणि पाठवून द्या येरवड्याला नाही तर आर्थर रोड जेल मध्ये पण मध्ये ते न्यायाधीश वगैरे लोकांना कसं पटवायचं ते पाहून घ्या. नाही तर आपले कंपाउंडर संपादक म्हणतात तसं न्यायालयाकडून एकांगी निर्णय मिळाला तर जामीनावर सुटतील लेकाचे. नाही तर असं करा त्यांचे पण पत्ते पाठवून द्या मातोश्रीवर हून जौ द्या हा का ना का