Skip to main content

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/01/2022 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचने 55462
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

>>>असल्या माणसाला पक्षात का घेतले हे तेव्हाही समजले नव्हते आणि अजूनही समजलेले नाही. सत्तेच्या फायदा आणि संरक्षण मिळत असल्यामुळे भाजपा सध्या आयाराम गयारामाचा पक्ष बनलेला आहे, गच्छंतीं होईल, भविष्यात केवळ सतरंज्या उचलाव्या लागतील म्हणून कोणी विरोध करीत नाही. पण एकदा की धाक उरणार नाही तेव्हा कोणा-कोणाला आवरायचे असा प्रश्न भाजपला पडल्याशिवाय राहणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुब्रमण्यम स्वामी हे एखाद्या भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत. अगदी अगदि बरोबर ... ते सडेतोड बोलतात पण भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत.

सत्तरहजार खुर्च्या आणि आले सातशे लोक सध्या सोशियल मिडियावर पंतप्रधा़न यांच्या प्रचार दौ-याचा जो फज्ज़ा उडाला त्या बद्दल लोक जी टिंगल करीत आहेत ती बघुन वाईट वाटते. बाकी,पंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमली नाही त्याला पंजाब सरकारही काय करणार, दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले. फार वाईट वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे...! बिरुटे सर तुमच्यासारखा अति उच्च शिक्षित माणूस सुद्धा असल्या टिनपाट प्रचाराला बळी पडतो हे पाहून वाईट वाटलं. द्वेषाने माणूस किती अंध होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. बाकी पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल तुमचे काहीच मत नाही हे ओघानेच आलं. सातशे लोक तर भोरास बुद्रुक सारख्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही पक्षाला जमवता येतील. अनेक ठिकाणी आलंय कि सभास्थानाच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बसेस ना अडवून ठेवले आणि लोकांना सभेला जाऊ दिले नाही.

In reply to by सुबोध खरे

पंतप्रधान आणि पक्षीय समर्थकांना झालेल्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं हे मी समजू शकतो. पण... पंजाबमधे जाऊन आत्ताच अग्निपरीक्षा घ्यायची गरज नव्हती असे मला तुमचा जालमित्र म्हणून म्हणावे वाटते . उगाच आपल्या पाठीमागे खुप लोक आहेत. आपण कृषि कायदे परत घेतले, आता लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील असं नसतं डॉक्टर साहेब. पंजाबी लोकांच्या एखादी गोष्ट डोक्यात बसली ना, मग ते लोक ऐकत नाही, त्यांनी कृषिकायद्या संदर्भात सरकार ज्या पद्धतीने वागले, जी जी मतं तेव्हा व्यक्त होती त्याचे पडसाद असे उमटणारच होते असे मला वाटते. तुम्हाला हे पटणार नाही. पण सत्य फार कडवट असतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंजाबमधे जाऊन आत्ताच अग्निपरीक्षा घ्यायची गरज नव्हती. अग्निपरीक्षा द्यायला हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला जायची मोदींना गरज पडणार नाही हे तुम्हाला समजणारच नाही. https://www.google.com/maps/place/The+National+Martyrs+Memorial/@30.958… आपल्या भेटायला आपला पंतप्रधान सीमेपासून केवळ १ किमी च्या अंतरात येतो याचे महत्त्व तेथील सैनिकांना काय आहे हे वातानुकूलित खोलीत आराम खुर्चीत बसून टंकणाऱ्या विचारवंतांना समजणारच नाही. PM Modi was slated to go to the National Martyrs Memorial at Hussainiwala by helicopter. But due to rain and poor visibility, it was decided that he would travel by road, which would take more than 2 hours. "He proceeded to travel by road after necessary confirmation of security arrangements were made by the DGP Punjab Police," the MHA said. https://www.indiatoday.in/elections/punjab-assembly-polls-2022/story/pu… बाकी सातशे लोक सुद्धा नव्हते वगैरे तुमचं चालू द्या. वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नसतो.

In reply to by सुबोध खरे

वैचारिक बद्धकोष्ठावर इलाज नसतो
एनिमा देता येतो. देईलच तो आता केंद्र सरकार. मग दुसऱ्या बाजूने बोलायला वैचारिक बद्धकोष्ठ वाले तयार!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाईट वाटते तुम्हाला! या बाबत ! आनंदाच्या उकळ्या उकळ्या पाहिजेत नाही का

पंतप्रधानासारख्या महत्वाच्या पदावरील माणसाच्या सुरक्षेत कमतरता नाही राहिली पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. जवळच्या व्यक्तीला करोना झाला म्हणून पंतप्रधानांना receive करायला गेलो नाही असे म्हणणारे पंजाबचे मुख्यमंत्री दुसऱ्याचं दिवशी आंदोलकांना भेटायला स्वतः गेले होते, तेही मास्क न घालता. बर एकदा मोदींचा दौरा रद्द झाला तर आंदोलक तरी तिथे कोनाविरुद्ध आंदोलन करत आहेत. अचानक झालेल्या बदलांमुळे पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती नव्हती अशी थाप ही मुखमंत्र्यानी मारली.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारने डिसेंबरच्या मध्यावर सोयाबीनच्या वायदे व्यवहारांवर बंदी आणली हे "शहरी अर्थरेक्यांना" दिसले नसेलच. केंद्र सरकार कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे दिसत आहे. सोयाबीन वायदे व्यवहारामुळे सरकारच्या तिजोरीतून काय जाणार होते? वायदे व्यवहारांमुळे चार पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळून भविष्यातील दर नुकसान टाळता येत होते म्हणून शेतकरी तिथे वळला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही हे सिद्धच झाले. शेतकरी एकवेळ आत्महत्या करेल पण कोणाचा जीव घेणार नाही.

In reply to by आग्या१९९०

वायदे बाजार? छे! खाजगी विक्रीलाच तर विरोध होता ना शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांनी धान्य फक्त आणि फक्त APMC मध्येच विकायचं! बाकी वायदेबाजारात धान्य विकून फक्त फायदाच होतो हे ऐकून गंमत वाटली. शेअर मार्केट मध्ये शेअर्स फक्त वरच जातात असं म्हटल्यासारखं आहे ते.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

बाकी वायदेबाजारात धान्य विकून फक्त फायदाच होतो हे ऐकून गंमत वाटली. बाजारातील सोयाबीन दरातील चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वायदे व्यवहारामुळे टाळता येते. शेतकरी पुट ऑप्शन घेतात त्यामुळे नुकसान शून्य. ह्यात सरकारचे काय नुकसान होणार होते? नसेल कळत तर सोडून द्या आणि "शहरी अर्थरेक्यांत" सामील व्हा. तेच तुमच्या हिताचे आहे.

In reply to by आग्या१९९०

डियरेस्ट नॉटि औगी, पुट ऑपशन घ्यायचा तर त्यासाठी प्रीमियम द्यावा लागतो. तो भरपूर गोष्टींवर अवलंबून असतो. Volatility, रिस्क, maturity date वगैरे वगैरे. तो भरपूर मोठा असावा हे ओघानेच आले (कारण जेव्हा दुष्ट अंबानी पुट ऑपशन विकेल तेव्हा पेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन चे दर कोसळले तर फुकटच तो मोठ्या किमतीला विकत घ्यावा लागेल). आणि दर वर गेले तर प्रीमियम गेलाच. तेव्हा पुट ऑप्शन विकणारा (अनुभवी ट्रेडर्स मुळे) कायम फायद्यात असतो. शेतकर्यांचे फार फार तर नुष्कान होणार नाही. तो ऑपशन किती ला घ्यावा कुणाकडून घ्यावा (दुष्ट अदानी की दुष्ट अंबानी इत्यादी) याबाबत फेट्या खालचं डोकं चालेल असं वाटत नाही. ज्यांना फार्म laws आपल्या फायद्याचे आहेत हे कळलं नाही त्यांना ऑपशन्स थोडेच कळणार आहेत? पण प्रश्न तोही नाही. प्रश्न असा आहे, की वायदेबाजार प्रायव्हेट बाजार आहे. आणि शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की कुणीच APMC सोडून कुठेच विकायचंच नाहींच. तेव्हा आता वायदेबाजारात कशासाठी जायचंय?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

तेव्हा पुट ऑप्शन विकणारा (अनुभवी ट्रेडर्स मुळे) कायम फायद्यात असतो अस कस? दर जर खलि गेले तर ? अस कस? दर जर खाली गेले तर ? पुट ऑप्शन विकनाऱ्याचा जास्तीत जास्त तोटा = (स्ट्राईक - शून्य) + मिळालेला प्रीमियम एस आणि पी इंडेक्स वरील फुचुर वरील ऑप्शन चे उदाहरण समजा हे फुचर सध्या ४००० ला आहेत आणि एखाद्याने ४००० स्ट्राईक पुट विकला आणि त्यास समजा आठवड्याचे २० पॉईंट मिळाले आणि समजा हे फुचर १० टक्के घसरले = ३६०० तर ज्याने पुट विकत घेतलं आहे तो पुट अमलात आणेल ( एक्सरसाईझ) तर विकनाऱ्याचा तोटा = ४०० -२० = ३८० गुणिले यु एस $ ५० = ३८०-१९,००० $

In reply to by चौकस२१२

ऑप्शन मार्केटमध्ये अगदी १००% वेळा नाही तरी ९५% वेळा ऑप्शन विकणाराच फायदा करतो. त्याचे कारण म्हणजे ऑप्शन विकणारे बहुसंख्य कसलेले खेळाडू असतात. ऑप्शन विकणे हे त्या प्रकारातील माहिती असलेल्यालाच जमणार्‍यातला खेळ आहे. आणि किंमत वर जाईल असा व्ह्यू असेल तर हे कसलेले खेळाडू पुट विकतात आणि तो सुध्दा आऊट ऑफ द मनी. त्याप्रमाणेच किंमत खाली जाईल असा व्ह्यू असेल तर ते आऊट ऑफ द मनी कॉल विकतात. जर किंमतीत तितक्या प्रमाणावर चढ/उतार होतील असा व्ह्यू असेल तर ते इन द मनी पुट/कॉल सुध्दा विकू शकतात. इन द मनी ऑप्शन विकायला जबरदस्त गट्स लागतात. ते येरागबाळ्याचे काम नाही. तेव्हा ऑप्शन विकत घेणारे आपला जास्तीतजास्त तोटा फक्त प्रिमिअम भरला तेवढा असे म्हणत ऑप्शन विकत घेतात आणि त्यात सगळा प्रिमिअम गमावून अडकतात. तेव्हा ऑप्शन विकत घेतला की झाले असे म्हणणारे अनेक ट्रेडर्स असतात. त्याच मायाजालात शेतकरी फसले आणि त्यांचे नुकसान झाले तर त्यात नवल काय? असो. पण काही लोकांना हे समजत नाही. गर्व से कहो हम शहरी अर्थरेकी है.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे हेजींगचे साधन आहे हे एक तर माहीत नसते किंवा ते वापरायची कुवत नसते, कारण ते येऱ्यागबळ्याचे काम नाही. शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदार ऑप्शन व्यवहार करतो ते निव्वळ ट्रेडिंग असते त्यात हेजींग फार कमी जण करतात कारण त्यांचा portfolio तितका मोठा नसतो,त्यामुळे नुकसान होऊ शकते. ह्याउलट शेतकऱ्याकडे त्याचे उत्पादन असते.त्या उत्पादनाला बाजारातील दरातील चढउतारापासून रक्षण करण्यासाठी तो agri commodity बाजारात पुट ऑप्शन वापरून नुकसान कमी करू शकतो. शेअर मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदार आणि agri commodity मध्ये व्यवहार करणारे शेतकरी (उत्पादक) ह्यामध्ये हा मूलभूत फरक आहे हे "शहरी अर्थरेक्यांना" समजणे कठीण आहे. परंतु ह्या निमित्ताने "शहरी अर्थरेकी" बिळातून बाहेर आले. हमें फक्र हैं l

In reply to by आग्या१९९०

"शहरी अर्थरेक्यांना" वायदे हे हेजींगचे साधन आहे हे एक तर माहीत नसते किंवा ते वापरायची कुवत नसते, " वायदे हे हेजींगचे साधन आहे" हो बरोबर पण ""शहरी अर्थरेक्यांना"" याचा नककी अर्थ सांगाल का?

In reply to by आग्या१९९०

"ज्यांना कळाले " सरल उत्तर द्या ना असो मझ अजेन्द ओप्शन किव त्यसम्बन्धि चि महिति देवन घेवन येव्धच आहे तुम्चह वेगळा दिस्तोय

In reply to by आग्या१९९०

ते वापरायची कुवत नसते, हे सरसकट बरोबर नई "कारण त्यांचा portfolio तितका मोठा नसतो" हे तितकेसे तितकेसे खरे नाही १ ऑप्शन ( अमेरिकेतील ) १०० शेअर वर असतो म्हणजे जर एखाद्यकडे १०० शेअर असतील तर १ पुटऑप्शन घेऊन तो हेजिंग करू शकतो आणि त्यासाठी करोडो लागत नाहीत काही शेअर ( त्यावर ऑप्शन असलेलं ) कमी किमतीचे असतात . "शेअर मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदार आणि agri commodity मध्ये व्यवहार करणारे शेतकरी (उत्पादक) ह्यामध्ये हा मूलभूत फरक आहे " हे मान्य कमोडिटी वायदे हे मुळात उत्पादकांचा मागणी मुळे निर्माण झाले हे खरे आहे , ट्रेडर / स्पेक्युलेटर आले

In reply to by आग्या१९९०

"... लॉट साइज वेगळा असतो." हो असले पण कमी किमतीचे शेर पण असतील कि आणि इकडे तिकडे मी सर्वसाधारण जिथे ऑप्शन मार्केट आहे त्या बाजारबद्दल बोलतोय हेज करणे फक्त उत्पादकाला जमते हे काही खरे नाही ( कमोडिटी म्हणून उत्पादक )

In reply to by आग्या१९९०

बर मह्न्जे ७ लाख एकेचलिस हजार बरोबर अनि त्य्वरिल प्रोटेक्टिव्ह पूट ची किंमत ? ७ लाख एकेचलिस हजार येवधा पोर्टफफोलियो भारतात अनेक जणांचा सहज असेल मग फारसे अशक्य वाटत नाही

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपण लिहिलेली स्ट्रॅटेजी बरोबर आहे मान्य पण त्यात शेतकरी राजकारण कशाला? "ऑप्शन मार्केटमध्ये अगदी १००% वेळा नाही तरी ९५% वेळा ऑप्शन विकणाराच फायदा करतो." मी ८०% असे ऐकले आहे .. काहीका असेना , ऑप्शन विकणे ते सुद्धा नेकेड हे अर्हताःतच जोखमीचे आहे कॉल विकलं नेकेड तर अमर्याद तोटा होव शकतो. त्यामुळे काही जण " कव्हर्ड कॉल विकतात , आणि चांगलं फायदा होऊ शकतो परंतु त्यात सुद्धा एक महान प्रिसद्ध आहे coverd call writings ( sellars) may eat like a king everytime the soled opshan expires wortless but ONE day they may shit like an Emperor " https://www.investopedia.com/trading/cut-down-option-risk-with-covered-…

In reply to by चौकस२१२

ऑप्शन विकणे ते सुद्धा नेकेड हे अर्हताःतच जोखमीचे आहे कॉल विकलं नेकेड तर अमर्याद तोटा होव शकतो.
नक्कीच. म्हणून ऑप्शन विकणे हे कसलेल्या खेळाडूंचेच काम आहे कोणा येरागबाळ्याचे नाही. तरीही ऑप्शन विकणे हे फ्युचर्समध्ये पोझिशन घेण्यापेक्षा कमी धोक्याचे असते. अनेकांना हे माहितच नसते. तसेच ऑप्शन विकण्यात अमर्याद तोट्याचा धोका आणि ऑप्शन विकत घेतला तर गेला तर जास्तीत जास्त प्रिमिअम जाणार त्यापेक्षा जास्त नुकसान होणार नाही यामुळे अनेक लोक ऑप्शन विकत घेण्यात फसतात. जर डीप आऊट ऑफ द मनी ऑप्शन घेतला तर सगळाच प्रिमिअम जायची म्हणजे १००% तोटा व्हायची शक्यता जास्त असते. साधी गोष्ट आहे- जर ऑप्शन विकण्यात अमर्याद तोटा आणि विकत घेण्यात मर्यादित तोटा असेल तर मग जिंकायची शक्यता खूप जास्त असेल तरच ऑप्शन विकणारे ऑप्शन विकतील अन्यथा नाही. तरी पुट ऑप्शनचा विषय सगळ्यात पहिल्यांदा काढणार्‍या महाभागांच्या मते ऑप्शन विकत घेणार्‍या शेतकर्‍यांना दरवेळेस फायदाच व्हायला हवा अशी अपेक्षा दिसते. असे कसे होणार? चित भी मेरी पट भी मेरा असे चालणार नाही ना? पण शेतकरी म्हटले की त्यांच्याविरोधात काहीही बोलणे हे महापातकच असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असं कसं? असं कसं? बळीराजा अन्नदाता इ इ म्हणलं कि त्यांना सर्व गोष्टी कशा ताटात वाढूनच मिळायला हव्यात कि नाही? त्यांच्या जीवावर तुम्ही जगताय ना?

In reply to by सुबोध खरे

येथील "शहरी अर्थरेक्यांचा" अभ्यास किती कच्चा आहे ते दिसतेच आहे. शेतकरी (उत्पादक) आपले नुकसान कमीत कमी कसे होईल ह्यासाठी सोयाबीन "पुट" ऑप्शनचा हेजिंग, हो हेजिंग, हेजिंग आणि फक्त हेजिंगसाठी वापर करत आहे. कुठेही फायदा होण्यासाठी speculation treding करून धोका पत्करत नाही. तो कोणतेही ऑप्शन राईट करत नाही. ऑप्शन तो सोयाबीन दरासाठी "विमाकवच" सारखा वापरत आहे. सरकारला ह्यात काय अडचण वाटली आणि त्याने सोयाबीन वायद्यावर बंदी आणली? ह्या बंदीमुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होणार हे कोणी सांगू शकेल काय?

In reply to by आग्या१९९०

पण मला एक गोष्ट सांगा, जर वायदेबाजारात माल विकायचा नसेल, आणि मलाच दार जर सरकारं MSP करून, किंवा दलाल रुमलाखाली ठरवणार असतील, तर हेजिंग चा काय उपयोग? याबद्दल पण माझ्यासारख्या अर्थरेक्यांना थोडं मार्गदर्शन करावे.

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९० शेतकरी कुठेही फायदा होण्यासाठी speculation trअding करून धोका पत्करत नाही. आणि पिकाच्या / उत्पनाचाय रक्षणासाठी विमा म्हणून ऑप्शन किंवा फ्युचर वापरतो हे माहिती आहे ( मिपावर ज्यांना ऑप्शन बद्दल माहिती आहे त्यांना ) पण तुम्ही हे सारख "शहरी अर्थरेक्यांचा" काय लावलाय - मान्य आहे कि यात तुम्हाला माहिती आहे पण दुसऱ्यानला कशाला मुरख ठरवताय ? - बर तुम्ही म्हणालात कि अश्या "विम्याची" किंमत नगण्य असते.... पण किती ते नाही सांगितलंत ! एक तरी उदाहरण द्या विक्रीची किंमत - मालाची उत्पादन किंमत = कच्चा फायदा पक्का फायदा = कच्चा फायद - ऑप्शन ची किंमत खर सांगायचं तर हेजिंग ऑप्शन ने करणे किंवा शॉर्ट फ्युचर ने करणे यात फरक आहे ,, तुम्ही फ्युचर चे पण उद्धरण द्या - एकूण तुमचा राग स्पेक्युलेटर वर दिसतोय मी आधी स्पेक्युलेट असण्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होतो ते सांगतले आहे पण त्यावर तुम्ही गप्प - एक मुद्याशी सहमत कि एकदम असे काय झाले कि फक्त हाच वायदा बंद करण्यात आला ! त्यावरील ऑप्शन पण बंद केले आहेत का ? आता त्याचाच अर्थ सरकार शेतकऱ्याचं विरुद्ध आहे असा निष्कर्ष असेल तर फक्त सोया का गहू, साखर यासारखे वायदे का नाही बंद केले ? त्यामुळे सरसकट आरोप करण्याआधी जरा माहिती काढा नाहीतर हे "शहरी अर्थरेक्यांचा आणि केंद्र शेतकरी हा नुसता वाटतो ! प्रूव्ह मी रॉंग प्लीज !

In reply to by चौकस२१२

केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. १) कांदा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळायचा आणि महिन्याभरात कांद्याचे भाव वाढले की कांदा निर्यात बंद करून भाव पाडायचे असले उद्योग ह्या सरकारने केले आहे. म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे हित जपत असतो. २) कृषी कायदे करून APMC मधील व्यापारी आणि खाजगी व्यापारी असमान स्पर्धा ठेवून खाजगी व्यापाऱ्यांना झुकते माप दिले ( मार्केट व्यापाऱ्यांना मार्केट फी ,खाजगी व्यापाऱ्यांना कोणतीही फी आणि लायसेन्सची गरज नाही.) त्यामुळे काही दिवसांनी मार्केट बंद पडले की खाजगी व्यापाऱ्यांची मोनोपोली सुरू होणार. दुसरे म्हणजे APMC बंद झाल्यावर ज्याच्या आधारे कृषि मालाची आधारभूत किंमत ठरवली जायची ती आपोआप बंद होणार आणि सरकारच्या गळ्यातील MSP चे लोढणे गळून पडणार. शुद्ध फसवणूक आहे शेतकऱ्यांची. ३) सरकारकडून झीरो बजेट शेतीचा प्रचार . मुळात झीरो बजेट शेती असा प्रकार अस्तित्वात नाही. ह्यात शेतकऱ्याच्या श्रमाचे मोल धरले जात नाही. सरकारच्या मते झीरो बजेट म्हणजे उत्पादन खर्च शून्य! कृषी मालाला जो भाव मिळेल तो त्याचा पूर्ण नफा. मग त्याचे उत्पन्न दुप्पटच काय कितीही पट केल्याचा दावा हेच सरकार करणार. कावेबाज केंद्र सरकार. ४) एकीकडे तेलबिया लावायला सांगायचे आणि तेलबियांचे दर वाढून खाद्यतेलाचे भाव वाढले की पाम तेलावरील आयात शुल्क कमी करायचे. लगेच पाम तेल निर्यातदार देश निर्यात शुल्क वाढवून नफा कमावतात. कुठून अर्थशास्त्र शिकले आपले अर्थमंत्री कोणास ठावूक? आपले परकीय चलन बाहेर गेलेले चालेल परंतु इथल्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळून देणार नाही. ५) सोयाबीन वायदे व्यवहार बंद करून त्याचे दर नियंत्रीत करायचे काम केंद्र सरकारने केले. वाढीव दराचा फायदा शेतकऱ्याला मिळूच नये हाच एकमेव अजेंडा आहे केंद्र सरकारचा.

In reply to by आग्या१९९०

कांदा निर्यात बंद करून भाव पाडायचे असले उद्योग ह्या सरकारने केले आहे. म्हणे आम्ही शेतकऱ्यांचे हित जपत असतो. उत्पादनाची कमतरता झाली कि अनेक सरकारे निर्याती वर बंदी आणतात ! मागे बासमती तांदुळावर आ ली होती , भारतात असावं म्हणून निर्यात तात्पुरती बंद सरकारकडून झीरो बजेट शेतीचा प्रचार सविस्तर सांगा आधी हे झिरो बजेट म्हणजे काय ते ? एकीकडे तेलबिया लावायला सांगायचे आणि तेलबियांचे दर वाढून जास्त लागवडी मुळे उत्पादन वाढलं तर तेलाचे भाव खाली येतात वर कसे जातील ? मुबलक पुरवठा असेल तर भाव खाली जातील पाम तेलावरील आयात कमी केली याच "टाईमिंग चुकलं असले कदाचित " पुरेशी माहिति नसल्या मुळे सांगता येत नाही ५) सोयाबीन वायदे व्यवहार बंद करून त्याचे दर नियंत्रीत करायचे काम केंद्र सरकारने केले. वाढीव दराचा फायदा शेतकऱ्याला मिळूच नये हाच एकमेव अजेंडा आहे केंद्र सरकारचा. बर हे कारण आहे का वायदे बंद करण्यामागे ! पण मग हे सांगा कि "नियंत्रित" म्हणजे कमीत कमी हमी दर ना ? दराची खात्री मिळणार ना शेतकऱ्याला का नाही? म्हणजे सरकारने उलट समाजवादी पद्धतीकडे वाट चाल केली कि हो, सोया चे वायदे बंद करून भांडवलशाही स्पेक्युलेट करणाऱ्याना मुक्त बाजार बंद केला ! मग हेच तर शेतकऱ्यांना पाहिजे होते ना ? मग का आरडाओरड ? दुसरे ते हेजिंग बद्दल ,,, त्यावर काय ?

In reply to by चौकस२१२

ऑक्टोबरपासून पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशन सोयाबीनच्या वाढत्या दरावरून कुरकुर करत होते. लॉबीच्या दबावाखाली येऊन सरकारने बंदी आणली असेल. माझ्या शंकेला पुष्टी देणारा कालच्या लोकसत्तातील लेख. https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/arthvrutant/commodity-mar…

In reply to by आग्या१९९०

पुट ऑप्शन चा प्रीमियम हि "कॉस्ट" त्याला दव्यावीच लागणार , ती विसरू नका त्यामुळे "नुकसान शून्य" असे नाही म्हणू शकत , अर्थात पुट घेणारा कोण त्यावर त्याचा फायदा तोटा ठरेल १) उत्पादक ( शेतकरी ) घेत असेल तर ही तर सरतेशेवटी गणित असे कि पीक विकून होणारा फायदा = पूट ऑप्शन चा प्रीमियम २) नुसता ट्रेडर / बाजार खेळणारा असले तर सरतेशेवटी गणित असे = जास्तीत जास्त तोटा = पूट ऑप्शन चा प्रीमियम

In reply to by चौकस२१२

अर्थात पुट घेणारा कोण त्यावर त्याचा फायदा तोटा ठरेल मी शेतकऱ्याबद्दल बोलत आहे. Absolute zero नसले तरी नगण्य नुकसान होते.

In reply to by आग्या१९९०

हा मग ठीक आहे कारण शेतकऱ्याचा नफा जर २०% असले आणि पुट ची किंमत जर ०.५% सेल तर मला भारतीय माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर एखाद्य इन्स्ट्रुमेंट (लॉन्ग फ्यु च र + लॉन्ग पूट ) याची किंमत दाखवा पण "नगण्य " कसे? कारण ऑप्शन प्रीमियम कधी कधी खूप असतो ! वेळ आणि वोलॅटिलिटी यावर अवलंबून

In reply to by आग्या१९९०

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारने
ते उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच फार्म कायदे आणले होते ज्याला शेतकऱ्यांनी प्राणपणाने विरोध केला. आता बोंबलायच नाही. चित भी मेरी, पट भी मेरा असं कसं चालेल? आता चुपचाप पूर्वीप्रमाणे APMC मध्ये माल ओता आणि तिथले दलाल देतील तेवढे पैसे घेऊन फुटा.

In reply to by चौकस२१२

शेतकरी आपले कृषि उत्पादन व्यवहार कुठेही करो केंद्र सरकारने त्यात खोडा घालण्याचा उद्योग करू नये. कोण कोणाचे दलाल आहे हे शेतकरी जाणून आहे.

In reply to by आग्या१९९०

शेतकरी आपले कृषि उत्पादन व्यवहार कुठेही करो हो ना मग ह्या कायद्यामुळे "कुठेहि" विकण्याची मुभा मिळणार होती ना ?

In reply to by आग्या१९९०

त्याचा आणि सोयाबीन वायदे व्यवहार बंदीचा काय संबंध?" नाही, पण आपण "केंद्र सरकारने त्यात खोडा घालण्याचा उद्योग करू नये" हे लिहिलेत म्हणून माझ्य प्रतिसादात ते आले

In reply to by आग्या१९९०

वरकरणी तरी हि बंदी का हे कोडे आहे ? कारण सांगितले आहे का ? कदाचित कारण हे असले कि उत्पादक पेक्षा यात "खेळणारे" जास्त असतील ! लिव्हरेज जास्त असेल ? वेळोवेळी सरकार असे निर्णय घेते उदाहरण देतो ऑस्ट्रेलयं सरकार ने बायनरी ऑप्शन वर बंदी आणली त्यामुळे सारखया अमेरिकेतील www.nadex.com नावाजलेलया मार्केट ला येथून हाकलले

In reply to by चौकस२१२

वरकरणी तरी हि बंदी का हे कोडे आहे ? कारण सांगितले आहे का ? केंद्र सरकार कारण सांगत बसत नाही, डायरेक्ट बंदी लादते. ऑक्टोबरपासून पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशन सोयाबीनच्या वाढत्या दरावरून कुरकुर करत होते. लॉबीच्या दबावाखाली येऊन सरकारने बंदी आणली असेल. दुसरे काही कारण दिसत नाही. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे.

In reply to by आग्या१९९०

मोदी यांनी, शेतकरी वर्गासाठी, योग्य तेच कायदे आणले होते... दलाल कसे लुबाडतात, हे कोकणी शेतकरी वर्गाला चांगलेच ठाऊक आहे. सध्या तरी, कोकणातील काही शेतकरी, स्वतः बाजारपेठ निर्माण करत आहेत.... म्हणून तर, ह्या आंदोलनात, कोकणातील शेतकरी वर्गाने, भरपूर संख्येने भाग घेतला नाही...

In reply to by मुक्त विहारि

म्हणून तर, ह्या आंदोलनात, कोकणातील शेतकरी वर्गाने, भरपूर संख्येने भाग घेतला नाही... आहों आहात कुठे ? - भरततिल "सपूर्ण बळीराजा" यात सहभगि , अगदि सर्व राज्यात सगळी शहरे बंद नाही का झाली? फक्त दिली आणि हरियाणा नाही - त्यात शिवाय अनिवासी शिखांनी तर धर्मयुद्ध पुकारले कमाल केली , शीख शेतकरी विरुद्ध हिंदू हुकूम शहा मोदी! - आणि हो त्याशिवाय मिया खलिफा सारखया त्यात होत्याच कि आणि चिमुकली ती थुम्बर्ग कि कोण - अहो जग प्रसिद्ध आहे हा " देशव्यापी शेतकरी आंदोलन इथे तर शिखांनी " भारतीय शेतकरी आणि ऑस्ट्रेल्या शेतकरी " यांचाच बादरायण संबंध जोडला , सर्व ऑस्ट्रेल्या पण बंद होते हो आहात कुठे ?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आता त्याचाच अर्थ सरकार शेतकऱ्याचं विरुद्ध आहे असा निष्कर्ष असेल तर फक्त सोया का गहू, साखर यासारखे वायदे का नाही बंद केले ? फक्त सोयाबीनच नव्हे तर तुम्ही म्हणता त्या गहू ,भात (बासमती सोडून),चना,मोहरी,यांचेही वायदे बंद केले सरकारने. आता सांगा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की नाही?

In reply to by आग्या१९९०

मोठा निर्णय आहे , काहीतरी कारण असणारच कि आणि ते कारण काय आणि ते कसे चुकीचे आहे ते सांगा ना? नुसते सरकार शेती विरोधी विरोधी काय कळणार कोणाला हा हे मान्य करतो कि जर फ्युचर नसतील तर हेजिंग कसे करणार याशिवाय हेजिंग वर जे काहीही बोललात त्याबद्दल पुढे विचारला तर गप्पं ? आणि हे खालील शेतीचे वायदे चालू आहेत कि / सोया आणि ते ३-४च का बंद केले केले https://www.mcxindia.com/products/agro-commodities https://ncdex.com/

शेतकर्यांचे फार फार तर नुष्कान होणार नाही. नशीब हे मान्य केले. तो ऑपशन किती ला घ्यावा कुणाकडून घ्यावा (दुष्ट अदानी की दुष्ट अंबानी इत्यादी) याबाबत फेट्या खालचं डोकं चालेल असं वाटत नाही. गैरसमज आहे तुमचा. व्यापारी आणि शेतकरी खुबीने वापर करतात ऑप्शनचा. कृषि कायदे हे अवघड जागेचे दुखणे झाले आहे भक्तांसाठी आणि केंद्र सरकारसाठी, त्यामुळे सोयाबीन वायद्यांवर बंदी आणून सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवत आहे. शेतकरी अर्थसाक्षर झालेले बघवत नाही केंद्र सरकारला आणि "शहरी अर्थरेक्यांना".

In reply to by आग्या१९९०

व्यापारी आणि शेतकरी खुबीने वापर करतात ऑप्शनचा
"व्यापारी आणि"? व्यापारी तर दुष्ट लोकांमध्ये धरायचे होते ना बडे भाई? बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का? आमच्यावेळी असं नव्हतं !!

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

बाकी शेतकरी ऑपशन्स चा खुबीने वापर करतात हे ऐकून डोळे भरून आले. रुमाल आहे का?
कोणी शेतकरी ऑप्शन्सवर क्लास घेतात का? आमच्या साठेसाहेबांपेक्षा चांगले शिकवत असतील तर त्यांच्याकडून ट्रेनिंग घेईन म्हणतो :) :) बाकी पुट ऑप्शन विकत घेतले म्हणजे तोटा होत नाही हे वाचून अतीव मौज वाटली. म्हणजे ऑप्शन विकणार्‍यांनी अमर्याद तोटा होणार ही शक्यता असूनही दुसर्‍या पार्टीचा फायदा होईल अशाप्रकारच्या स्ट्राईक प्राईसला आणि ते पण स्वस्तात ऑप्शन विकावेत अशी अपेक्षा वाटते. अपेक्षा कोणी कसल्याही ठेऊ शकतो. त्याला कसलीच ना नाही. पण त्या पूर्ण होतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणाच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Agri commodity शिकवायला ब्रम्हदेव जरी आला तरी शिकवू शकणार नाही. एक तर हेजिंग कशाशी खातात ते माहीत नाही, त्यात स्वतः agri producer किंवा व्यापारीही नाहीत. Speculation treding करायची आहे तर equity , commodity , currency derivatives ई. आहेत त्यात हात मारा.

In reply to by आग्या१९९०

स्वतः agri producer किंवा व्यापारीही नाहीत आपण स्त्री नसला तर स्त्रीरोग तज्ज्ञ होताच येणार नाही म्हणताय का? बाकी चालू द्या तुमचं

In reply to by आग्या१९९०

करूनच दाखवा without agri stock हेजिंग. तुमच्या वरील विधानाचा अर्थ काय? सविस्तर सांगा नाही तर सोडून द्या स्टॊक म्हणजे ज्यावर वायदा आहे ते पीक ? कि शेअर ? हेजिंग दोन्हीचे करता येते . वायदा द्वारे किंवा ऑप्शन असतील तर .. त्यात एवढे गूढ काय आहे ? ज्याला यात रस आणि जरुरी आहे तो अभ्यास करून हे वपरतो १) उत्पाद ( तेल ) = नैसर्गिक रित्या "तेजी " वॉल त्यामुळे भाव पडल्यास हेजिंग - २) विकत घेणारा ( विमान कंपनी ) पुढे दर वाढले तर ? म्हणून हेजिंग ३) फक्त व वायदा "उलाढाल" करणारा

In reply to by आग्या१९९०

एक तर हेजिंग कशाशी खातात ते माहीत नाही? येथे एक दोघांनी जे सविस्तर प्रतिसाद दिले आहेत तुम्हाला त्यावरून कोणी असे म्हणले असे वाटतं नाही तुम्ही "फक्त शेतकरी हे करू शकतो आणि समजतो" हा धोशा उगाच लावलाय ज्याला त्यात भाग घ्याचा तो अभयास करतो दुसरे: आपण शेतकरी किंवा व्यापारी असाल तर हेजिंग चे एक उद्धरण देऊन सांगा ना म्हणजे आमचं सारखया अडाण्यांना कळेल तरी Speculation treding करायची आहे तर equity , commodity , currency derivatives ई. आहेत त्यात हात मारा. आता खरा हेतू स्पष्ट झाला अग्याभाऊ म्हणजे तुम्हाला म्हणायचं कि स्पेक्युलेटर नि शेती वायदे किंवा ऑप्शन मध्ये भाग घेऊ नये? का? हे दोन बाजार सगळ्यानं खुले आहेत आणि अतिशय महत्वाचाच मुद्दा - जर शेती माल वायदे फक्त उत्पादकाला उघडे ठेवले तर ते एकमेकात खेळत बसतील कारण फ्युचर मध्ये "झिरो सम गेम "असते ! त्यामुळे एका तरी शेतकऱ्याचे नुकसान होईल त्यापेक्सह स्पेक्युलेटर चे नुकसान शक्यता असेल तर शेतकऱ्यांना बरेच नाही का? शेत्करि विन विन ! काय समजला का हा तर्क? - याउलट स्पेक्युलेटर मुले -लीक्विडिटी वाढते हे विसरू नका असो कळात नाहुये तुम्ही नक्की काय वाद घालताय ते ! का केवळ " मोदी शेतकरी विरुद्ध " या एका समजुती मुले हा विचित्र अजेंडा राबवताय !

In reply to by चौकस२१२

माझा अजेंडा मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी लपवलेले नाही. पहा माझी पोस्ट. https://www.misalpav.com/comment/1130170#comment-1130170 ह्याला उत्तर देण्याची एकाचीही कुवत नाही. जे मी लिहिले नाही त्यावर चर्चा करत बसले. ( शेतकऱ्यांना वायदे व्यवहारात फक्त फायदाच होईल असे मी कुठेच दावा केला नसताना) तुम्हीही तांत्रिक बाबी विचारल्या ज्यात तुम्हाला रस आहे असे म्हणाला म्हणून मी मला जमेल तसे उत्तर दिले. अचानक तुम्ही राजकीय प्रश्न तुम्ही विचारला ( सोयाबीन वायदे बंदी मागे काही कारण?) त्यालाही मी उत्तर दिले. त्यावर तुम्ही काहीही भाष्य केले नाही. सिलेक्टिव वाचन सोडा माझ्या सगळ्या पोस्ट नीट वाचा उत्तर मिळेल. उगाच वकीली करायच्या फंदात पडू नका.

In reply to by आग्या१९९०

माझा अजेंडा मोदी हे शेतकरी विरोधी आहे हे मी लपवलेले नाही.
कोणतेही सरकार किंवा व्यक्ती शेतकरीविरोधी आहे हे कसे ठरवता ?

In reply to by आग्या१९९०

कोणाची वकिली करीत नाहीये , प्रश्न समजवून घेतोय आणि वायदे आणि ऑप्शन बद्दल माहिती असल्यम्मुले पुढे प्रश्न विचारत होतो आत्ताच आदींचं पोस्ट ला उत्तर दिली आहे ५ मुद्दे अचानक तुम्ही राजकीय प्रश्न तुम्ही विचारला ( सोयाबीन वायदे बंदी मागे काही कारण?) तो प्रश्न राजकीय नवहता कारण अशी एखाद्याच वायद्यवर बंदी हे आस्चर्य आहे , म्हणून विचारले एकतर स्पेक्युलेशन वाढल्याने असावी , म्हणजे स्पेक्युलेटर कि शेतकरी तर स्पेक्युलेट नाही तुमचहय मते मग का विरोध? तुम्ही सरळ सरकार विरोधी अजेंडा आहे हे मेनी करता दुसऱ्यांना ""शहरी अर्थरेक्यांना"" असली बिरुदे लावता मग ते राजकीय नाही का ? शेतकऱ्यांना वायदे व्यवहारात फक्त फायदाच होईल असे मी कुठेच दावा केला नसताना) तो दावा दुसर्याने केला त्याला उत्तर देत होतो पण तुमचे हे जे कि "हेजिंग कशाशी खातात हे माहित नाही" त्यावर बोला ? त्याची उदाहर्ने मी दिली आहेत त्याला १-२ जणांनी उत्तर दिले आहे ... ( सर्वसामान्यांना माहिती नसेल पण जो यात खेळतो ( शेतकरी पण किंवा त्याचा सल्लागार ) त्यांना असते ! " शहरि अर्थरेकी " असे तुच्चतेने म्हणून काय होतंय? एकदा तुम्ही हेजिंग चा खर्च नगण्य म्हणून म्हणालात तर उदाहरण द्या % काय ते ? तेवहा गप्प

In reply to by चौकस२१२

एक मूलभूत प्रश्न- सोयाबीनचे ऑप्शन्स नक्की कोणत्या एक्स्चेंजवर ट्रेड व्हायचे? भारतात कोमोडिटी ट्रेडिंगसाठीचे मुख्य एक्स्चेंज आहे एम.सी.एक्स. तिकडच्या मार्च २०२१ च्या (म्हणजे सोयाबीनच्या वायदे व्यवहारांवर बंदी घातली जायच्या आधीची गोष्ट) भावकॉपीमध्ये थोडीफार लिक्विडिटी केवळ क्रूड ऑईलच्या ऑप्शन्समध्ये दिसली. दुसरे एक्स्चेंज आहे National Commodity and Derivatives Index. तिथे नावाला सोयाबीनचे ऑप्शन दिसले पण सगळ्या स्ट्राईक्सना ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्युम दोन्ही शून्य दिसले. याचा अर्थ कोणी इंट्राडेमध्येही ते ऑप्शन ट्रेड करत नाही. तेव्हा सोयाबीन ऑप्शन ट्रेड व्हायचे त्याकाळातील ऑप्शन चेन कोणी पोस्ट करू शकेल का? म्हणजे नक्की किती शेतकरी हे पुट ऑप्शन घ्यायचे हे तरी बघता येईल. त्यातून सगळी उत्तरे मिळतील. आणि हे ऑप्शन एक्स्चेंज सोडून इतर ठिकाणी ट्रेड होत असतील तर मग परत 'शेतकर्‍यांना फसवलं' हे रडगाणं असेल तर त्याला सरळ फाट्यावर मारावे. बाकी शहरी अर्थरेकी, हेजिंग कशाशी खातात हे माहित नाही वगैरे असे उद्दाम आणि निरर्थक प्रतिसाद पाहता हे महाशय एकतर संक्षींचे किंवा अभ्याचे शिष्य असावेत असा दाट संशय येतो. असले काही लिहिले की मग त्या आय.डीशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे समजतेच. हे मी इतरांच्या माहितीसाठी लिहित आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सले काही लिहिले की मग त्या आय.डीशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे समजतेच. हे मी इतरांच्या माहितीसाठी लिहित आहे. धन्यवाद चं सु का अगदी मुद्य्यांचा बोललात धन्यवाद चं सु का अगदी मुद्य्यांचा बोललात त्यांचा जाऊदे त्यांचा अजेंडा एकखांबी तंबू प्रकारचा विरोध दिसतोय, राग दितोय सरकार आणी स्पेकुलेटर ( जे जरुरि असतात लि॑क्विडिटि साठि) वर! आपण बोलू (त्यन्चि फक्त एकच गोष्ट तर्कशुद्ध वाटली ती म्हणजे = हे ऑप्शन आणि फ्युचर बंद केल्यावर शेतकरी हेज करणार कसे ! ) असो माझे तांत्रिक मत असे आहे ( चुकीचे असू शकते ) कि - शेतकरी म्हजे उत्पादक तेव्हा त्याला जर तो लॉन्ग असतो हेज करायांचे असेल तर तो ऑप्शन पेक्षा फ्युचर मध्ये शॉर्ट करेल ! ऑप्शन प्रिनियम देण्यापेक्षा ! बरोबर आहे का ?

In reply to by चौकस२१२

शेतकरी म्हजे उत्पादक तेव्हा त्याला जर तो लॉन्ग असतो हेज करायांचे असेल तर तो ऑप्शन पेक्षा फ्युचर मध्ये शॉर्ट करेल ! ऑप्शन प्रिनियम देण्यापेक्षा !
पण त्यासाठी तेवढे मार्जिनही द्यावे लागेल. फ्युचर्समधील व्यवहारांसाठीचे मार्जिन ऑप्शन प्रिमिअमपेक्षा बरेच जास्त असते. शेतकरी 'नॅचरली लाँग' असल्याने त्याला फ्युचर्समध्ये शॉर्ट करायला मार्जिन द्यावे लागणार नाही असे निदान माझ्या माहितीतल्या कोणत्याही एक्सचेंजमध्ये करत नाहीत. या महाशयांना दुसरे कोणते एक्सचेंज माहित असले तर कल्पना नाही. दुसरे म्हणजे अ‍ॅग्रीकल्चरल कमोडिटींच्या कॉन्ट्रॅक्ट्सची किंमत कशी चालते हे शेतकरी नसलेल्याला जन्मात कळणार नाही वगैरे शुध्द भूलथापा आहेत. मोठ्या वित्तीय संस्थांमध्ये अ‍ॅग्रीकमोडिटींचेही ट्रेडिंग डेस्क असतात. तिथे ट्रेड करणारे लोक शेतकरी असतात का? बाकी खाली अमेरिकेतील सोयाबीन फ्युचर्सचा चार्ट पेस्ट करत आहे. soybean futures यापेक्षा तर भारतातील बँकनिफ्टी समजणे आणि ट्रेड करणे अधिक कठिण जाईल. त्यात जास्त रॅन्डम मूव्हमेंट्स असतात.
हे ऑप्शन आणि फ्युचर बंद केल्यावर शेतकरी हेज करणार कसे !
हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. पण त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होईल का हा दावा योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला ओपन इंटरेस्टचा विदा मला पाहिजे आहे. ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्यावर हेजिंग करता येणार नाही हे मान्य. पण आता नक्की किती शेतकरी असे हेजिंग करत होते? तो आकडा खूप मोठा असेल तर मग हे कॉन्ट्रॅक्ट्स बंद केल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होईल यावर विश्वास ठेवता येईल. पण मुळात ओपन इंटरेस्टच जास्त नसेल तर त्याचा अर्थ जास्त शेतकरी ते वापरतच नव्हते असा होईल. मग ते ऑप्शन-फ्युचर्स बंद केल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होईल असे कसे म्हणता येईल? बाकी मुद्द्यावर आधारीत चर्चेत रस नसला, तशी चर्चा करता येत नसली की मग शहरी अर्थरेकी आणि हेजिंग कशाशी खातात, अमुक कशाशी खातात, तमुक कशाशी खातात हे माहित नाही अशी भाषा पुढे येते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होईल का हा दावा योग्य आहे की अयोग्य हे ठरवायला ओपन इंटरेस्टचा विदा मला पाहिजे आहे बरोबर अणि बन्दि येन्य्पुर्वि ऑप्शन प्रिमिअम किति % होत कोणाला महिति आहे ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण त्यासाठी तेवढे मार्जिनही द्यावे लागेल. फ्युचर्समधील व्यवहारांसाठीचे मार्जिन ऑप्शन प्रिमिअमपेक्षा बरेच जास्त असते. बरोबर पण मार्जिन वयवहार सेटल झाल्यावर परत मिळते पण प्रीमियम गेला कि गेला असो , तो सविस्तर अभ्यासाचा विषय असणार

In reply to by चौकस२१२

पण मार्जिन वयवहार सेटल झाल्यावर परत मिळते पण प्रीमियम गेला कि गेला
हो. पण मुळात तेवढे पैसेच नसतील तर फ्युचर्समध्ये पोझिशन घेणार कशी? समजा एखाद्याकडे लाख-सव्वा लाख यासाठी नसतील तर ते नंतर परत जरी मिळणार असले तरी पोझिशन घेणार कशी? त्यापेक्षा सहासात हजार भरून ऑप्शन विकत घेणे सोपे होईल ना? आणि फ्युचर्समध्ये जर आपल्याला अपेक्षित असलेल्या दिशेविरोधात किंमत गेली तर मग मार्जिन कॉलही येतो तो ऑप्शन विकत घेतल्यास येत नाही. अर्थात असे अंदाधुंदपणे ऑप्शन नक्की घेऊ नयेत पण फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये हा फरक आहे.

In reply to by चौकस२१२

समजा आज सोयाबीन 2700 ला आहे, आणि मी सोयाबीन लावतोय, तर मग माझे गृहीतक असेल की सोयाबीन ला किमान 2700चा भाव मिळाला पाहिजे. 100रु इकडे तिकडे. अश्या स्थितीत मी 4 महिन्यांतरचा 2700 किंवा 2800 चा पुट विकत घेईन. जर भाव वाढले, तर मला 100रु चा तोटा आहे. पण वाढलेल्या भावाचा सगळा फायदा मलाच होणार आहे. जर भाव पडले, तर मला किमान 2700 ने दर नक्कीच मिळेल. हे लॉजिक आहे ऑप्शन विकत घेऊन हेजिंग चे. जर मला दराच्या वाढीचा फायदा नको असेल, तर मी फ्युचर विकून मोकळा होईन, मग उद्या सोयाबीन 4000 ला जरी गेले तरी मला ते 2700 नेच द्यावे लागेल. त्यामुळे सामान्यपणे मोठे शेतकरी काही भाग फ्युचर आणि काही भाग ऑप्शन असे करत असावेत. छोटे लोक नुसते ऑप्शनवरच करत असावेत. आणि ट्रेडर्स मोस्टली स्प्रेड्स वरती खेळत असावेत, फ्युचर घेऊन ऑप्शन विकणे वगैरे.

In reply to by आनन्दा

उत्पादकाकडे तीन उपाय आहेत असे वाटते १) पूर्ण फ्युचर मध्ये शॉर्ट करणे > फायदा = प्रीमियम नाही/ तोटा = पण मार्जिन उभे करावे लागणार + मार्जिन कॉल आला तर तशी रक्कम हाती पाहिजे २) पुट विकत घेऊन > फायदा = जास्तीत जास्त तोटा = प्रीमियम (प्रीमियम गेला तर गेलं , तो एकूण उत्पादनातून होणाऱ्या नफ्याच्या % मध्ये किती आहे यावर हा उपाय अवलंबून असणार , तो किती असतो साधारण महिन्याची मुदत असेल तर ? काही कल्पना ? आग्या यांनी तो नगण्य म्हणले होते ! तोटा = प्रीमियम गेला कि गेला ३) अर्धे अर्धे !