परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
हम्म! थोडक्यात म्हणजे मांडीवर डोके ठेऊन झोपण्याच्या वेळांची नोंद करून ठेवायला हवी..! ;)
आपला,
(वक्तशीर!) तात्या.
म. फुल्यांचे नाव आधीही "गुरूस्थानी" होतेच, आता असं करण्याला "शास्त्राधार" मिळाला.
म. फुल्यांची पुस्तकं कुठे दुकानात मिळतात का अजून?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
फुले आंबेडकरी साहित्य हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे
प्रा विलास वाघ, उषा वाघ, सुगावा प्रकाशन ५६२ सदाशिव पेठ,चित्रशाळा बिल्डिंग भानुविलास चौक पुणे
दुरध्वनी ०२० २४४७८२६३
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक द्रष्टे समाजसुधारक होऊन गेले. सनातन मतांच्या दबावाला न जुमानता प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस त्यांनी केले.
त्यांच्या पाऊलखुणांवर हमरस्ता बांधायचे सोडून आजचे गावगन्ना पुढारी त्यांवर देवळे बांधत आहेत, अज्ञानी भाविकांची गर्दी त्या पादुकांची पूजा बांधण्यात मग्न आहे आणि धूर्त पुढारी त्या थोर समाज सुधारकांचे लबाड पुजारी बनलेले आहेत -समाजातले नवे बडवे.
विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे.
नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो.
कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. नवजीवजन्म अशा एकाच बीजारोपणयत्नातून होईल, असे आहे का? मग अशा एक वा अनेक प्रयत्नांपैकी कोणत्या प्रयत्नाची वेळ ग्राह्य मानावी (नवजीवजन्म नक्की कोणत्या यत्नाचे फलित आहे, हे व त्यानुसारची वेळ हे कसे ठरवायचे)?
(जिज्ञासू)बेसनलाडू
अर्थात, ज्या काळात फुल्यांनी हे मत मांडले तो काळ, व त्या काळातील वैज्ञानिक प्रगती वगैरे मुद्दे विचारात घेता जास्तीत जास्त अचूक उत्तर मिळणे शक्य झाले नसेल, हेही खरेच! तरी गर्भधारणेची वेळ विरुद्ध प्रचलित, लौकिकार्थाने सर्वमान्य जन्मवेळ हा वाद रंजक आहे. त्याबाबतीत तरी गर्भधारणेची वेळ जन्मवेळ मानणे ही तर्कसंगती समजून घेता येईल. मात्र तेथे गर्भधारणानिश्चिती व त्यामागील प्रयत्नांची संगती यांबाबतचा वर मांडलेला मुद्दा बाकी उरतोच.
(समजूतदार)बेसनलाडू
फुले यांनी अर्थापत्तीने सांगितले आहे, की पत्रिका उपयोगी असणार नाही.
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे.
"अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. [=विधान म्हणते तसे नसावे]" ही फुल्यांनी सांगितलेली अर्थापत्ती आहे. फुले यांची तार्किक चूक मुळीच नव्हे!
(येथे "रेडुक्टियो आड आब्सुर्डुम" या तर्कपद्धतीला मी ढोबळमानाने "अर्थापत्ती अलंकार" म्हटले आहे.)
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे.
बरोबर! मलाही हेच वाटले सुरुवातीला की मी जे समजलो आहे, ते फुल्यांना म्हणायचे नसावे/त्यांचे मत अगर विधान नसावे. पण मी मूळ मजकुरातल्या स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते या विधानाने सर्वाधिक गोंधळलो आणि समजण्यात चूक होऊन माझे मत मांडले, असे वाटते. असो.
(समजूतदार)बेसनलाडू
खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! ;) बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.
या जन्मवेळेवरुन तयार केलेली पत्रिका ही ९ महिने ९ दिवस मागे सरकवायची आणि जी जन्मकुंडली बनेल त्याला आधान लग्न कुंडली म्हणायचे असा विचार ज्योतिषशास्त्रात काहींनी मांडला होता. परंतु तो वापरात नाही.
आमच्या माहिती नुसार स्त्री-पुरुष फलबीजनाची वेळ ही वैद्यक शास्रालाही अचुक काढता येत नसावी. धनंजय यावर अधिक विचार मांडु शकेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आय. व्ही. एफ. करताना शतांश सेकंदापर्यंत अचूक वेळ (आण्विकीय घड्याळाशी ताडून) नोंदवता येईल.
अरे वा! प्रकाशराव, हा प्रयोग तुम्ही करून बघायला हरकत नाही.
वीस बालकांच्या आयव्हीएफ जन्मवेळ आणि ठिकाणानुसार पत्रिका बनवून त्यांचे भविष्य कितपत अचूक वर्तवता येते?
प्रतिक्रिया
परंतु
म.
होय
समाज सुधारकांची देवळे
अगदी मनातल
म. फुले
सुरेख लेख.
उत्तम लेख...
तितकेसे पटले नाही/मोघम वाटले
अर्थालंकारापसून प्रामादिक अर्थग्रहण
मला वाटलेच काहीतरी गोंधळ होतोय
आधान लग्न
येईल! येईल!
आय व्ही एफ?
लवकर लिहा,