Skip to main content

राजवंशी

लेखक राहत यांनी गुरुवार, 25/11/2021 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजवंशी वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले आसवांच्या गावाला हुल देऊन गेले रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले - राहत
लेखनविषय:

वाचने 2320
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

सर्व वाचकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.