ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे.
एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती.
त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे.
मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म.
खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु
वानखेडे यांचे वडील, त्यांची
नवब
+१
रोज सामनाची पारायणे केल्याने
त्यांची जात धर्म ह्याचा ड्रग
नीट वाचा प्रतिसाद म्हणजे
नहि समजल समजल सान्गा क्रुपया
जाती आणि धर्माचा आर्यन खान
त्याला आरक्षण जिहाद आणि लव्ह
वानखेडे भाजपला कसे उपयोगी
फ्रेसिंग चुकले.
फ्रेसिंग? काय म्हणायचं ते
सॉरी...
देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचा हस्तक्षेपाचा प्रयत्न’;
या बाबतीत न्यायालयाने याचिका
राज्याचे मुख्य सचिव आणि
ल्पवयीन किंवा अपंग किंवा दाद मागण्याच्या स्थितीत नसलेले
आहेत हे महाराष्ट्र शासनाने स्वतःच उच्च न्यायालयात कबुल केलेले आहे हे वाचून प्रथम हसू मग रडू मग हसता हसता रडू आणि नंतर रडता रडता हसू आले. अरे राज्य शासन आहे कि खेळ खंडोबा? असे शपथपत्र सादर करणारे कायदा( विधी) खात्यातील लोक इतके निर्लज्ज, नालायक, निर्ढावलेले आणि बेदरकार असतील असे वाटले नव्हते‘देशमुखांच्या मुलाचा गैरव्यवहारात सहभाग’
हे सगळे वाचुन एक विचार मनात येतो
ती
+१
एकप्रकारे नेहरुनी समाजवादी
+1
एकप्रकारे जातियवाद.
भारत इस्लामिक देश आहे का? बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयावरून ...
बरोबर
मोदी-शहा यांच्याकडून अजून एक निराशा
अवघड आहे.
सहमत
हलाल इकॉनॉमी
कुणी काय खावे हे फक्त हलाल
शंकास्पद आहे? नक्की काय करावं
तुम्हाला माझे म्हणणे समजले
…तर आर्यन खान प्रकरणातील NCB चा प्रत्येक अधिकारी...
चलो मुंबई! मुस्लीम आरक्षणासाठी MIM आक्रमक;
शिवसेना सेक्युलर नसल्याचा
https://youtu.be/ZCRlTYm0WpI
पाया पडून माफी
हेच
तर तर??
नौसैनिकाला
+१
आणि कुरमेसेला घरी उचलून आणून
मारहाण
निलेश साबळे ला धमक्या देऊन
माजी नौसैनिकाला मारहाण झाली
माजी नौसैनिकाला मारहाण झाली होती तेव्हा देशभरच्या मीडियाने खच्चुन शिव्या घातल्या होत्या. आणि ती टीका योग्यच होती.मी टाईम्सची लिंक बघितली आणि एनडीटीव्हीची चित्रफीतही बघितली. या दोन्ही वृत्तसंस्थांनी ही घटना अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने फक्त एक बातमी/ घडलेली घटना या स्वरूपात सांगितली आहे. सांगताना कोठेही कोणावरही टीका केलेली नाही. खच्चून शिव्या तर लांब राहिल्या, टीकेचा एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. ही बातमी अशाच स्वरूपात अजून १०० वृत्तसंस्थांनी सांगितली असेल. "आपल्या" सरकारचे हे कृत्य असल्याने त्यांनी तोंडाला कुलुप लावले असणार. निलेश साबळेची घटना अशीच स्थितप्रज्ञपणे सांगतील का सांगताना भाजपवर कडाडून टीका करतील हे कळेल लवकरच.देश
याच राजदीप सरदेसाईने २६
मविआतील नेते अभिव्यक्ती