विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि परीक्षेचा निकाल यांचा संपूर्ण संबंध असतोच असे नाही.
बरेच विद्यार्थी लेखनाची हातोटी नसल्याने लेखी परीक्षेत चांगले लिहू शकत नाहीत परंतु तोंडी परीक्षेत मात्र व्यवस्थित विचार मांडू शकतात
आणि याच्या उलट सुद्धा होते.
मी ए एफ एम सी मध्ये एम डी चा परीक्षक असताना आलेले काही अनुभव आहेत. काही परीक्षक विद्यार्थ्याला "किती येत नाही" याची शेखी मिरवताना दिसले. यातील एका अतिशहाण्या बाह्य परीक्षकाला "आपण येथे विद्यार्थ्याला किती येते आहे हे तपासायला आलो आहोत, किती येत नाही ते नव्हे." असे मी सभ्य शब्दात सुनावले होते.
एखाद्या विद्यार्थ्याला एम डी परीक्षेत पास करताना त्याला विषयाचे बर्यापैकी ज्ञान आहे कि नाही आणि विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासणे आवश्यक असते. निदान किमान पातळीचे ज्ञान त्याने तीन वर्षात मिळवले आहे हे तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते.
आज त्याला सखोल ज्ञान नाही हे गृहीत धरणे आवश्यकअसते. तीन वर्षात एका विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होणे हि केवळ अशक्य गोष्ट आहे.
डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्याविषयीचे संपूर्ण ज्ञान आले असे नव्हे तर इतर लोकांपेक्षा त्याला त्या विषयाचे जास्त ज्ञान आहे एवढाच अर्थ असतो.
पदवी मिळाल्यावर तर खरा अभ्यास चालू होतो.
उमेदवार परिक्षार्थी आहे कि ज्ञानार्थी आहे हे समजून घेणे आवश्यक असते.
मस्त लेखनशैली !
माझ्या लेकरान्च (विद्यार्थी )यान्च असाच नात होत.पहिले तीन वर्ष मला असेच घाबरायचे,कारण मी योग्य्,मेहनतीच विद्यार्थ्याना शोधत असायचे.आणि त्यातले अन्तिम वर्षातले योग्य विद्यार्थी माझे सुह्रद मित्रच व्हायचे.
आपल्या कडील सध्याचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे शिक्षक कुठे आणि हे जॉर्ज कुठे ? बाकी आपल्याकडे सुद्धा एकेकाळी अतिशय ज्ञान वृद्ध शिक्षक होते. अजूनही असतील पण त्यांची संख्या कमी झाली आहे. अती सुरेख अनुभव कथन. असेच लिहित रहा.
प्रतिक्रिया
काय माणूस आहे..ग्रेटच..
भारी...!!!
असा गुरु लाभायला भाग्य लागते
व्वा, भारी !
विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि
परत वाचताना परत एकदा पिडां
कथा आवडली.
शेवटची मुलाखत वाचताना डोळे
अती उत्तम
लेखन खूप भावले.