संभाव्याच्या अब्ज छटांतून
संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
सुंदर कवीता.
गाज
छान आहे कविता.
हो, समुद्राची गाज म्हणतात.
सुरेख
विचार करायला लावणारी कविता.
प्रतिसाद देणार्या
सुरेख.