कशाला नादाला लागता यांच्या त्यांच्या बेसिक मध्येच लोचा आहे. ऑफिस मध्ये काही मंडळी असतात ना त्यांना येत काही नसत पण पुढे पुढे करून मला सगळ येत अस दाखवतात, त्यांना आपण काय म्हणून गप्प बसतो ते म्हणायचं आणि सोडून द्यायचे, यांना भाव दिला तर त्यांना आपण फार मोठे विद्वान असल्यासारखं वाटायला लागत.
मुंबई ड्रग केसमध्ये एकूण "८ ते १०" लोकांना पकडले आहे असे मोघम उत्तर एन सी बी ने दिले. ८ की ९ की १० ? नबाब मलिकानी पत्रकार परिषद घेतली व धक्कादायक खुलासा केला आहे. एकूण ११ जणाना पकडले होते पण तिघाना भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरुन सोडून देण्यात आले.
रिशब सचदेवा/प्रतिक गाबा आणि आमीर फर्निचरवाला. रिशभ सचदेवा हा भा.ज.यु.मो.चे नेते मोहित भारतींचा मेहुणा.
गोदी मिडिया कदाचित आता दुसरीकडे लक्ष वळवतील. ह्यावर राजकारणही होईल पण हे जर खरे असले तर एन सी बी चे 'दबंग' अधिकारी समीर वानखेडे ह्यांच्या करीयरवर हा कायमचा डाग राहील.
कसला डाग? याच समीर वानखेडेंनी नब्याच्या जावयाला अंमली पदार्थांच्या मुद्देमालानिशी पकडून ८ महिने आत टाकले होते. आपण सत्तेत असूनही समीर वानखेडे आपल्याला भीक घालत नाहीत यामुळेच हा बिथरून वाटेल ते निराधार आरोप करतोय. पण याच्या आरोपांना वानखेडे काडीचीही किंमत देत नाहीत.
त्या 3 पैकी एकाचे नाव आर्यन खाननेपण घेतले होते.
नबाब मलिक ह्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे
https://www.hindustantimes.com/india-news/cruise-rave-party-who-are-pratik-gaba-rishabh-sachdeva-amir-furniturewala-101633784893325.html
तज्ञ ,विचारवंत लोकांना काडी ची ही किंमत दिली जात नाही.
शेतकऱ्यांना काडी ची किंमत दिली जात नाही.
सामान्य जनता महागाई मध्ये होरपळत आहे त्यांना काडी ची किंमत देण्याची गरज नाही.
विरोधी पक्षांच्या सरकार ना काडी ची किंमत देण्याची गरज नाही.
सर्वोच्च न्यायालय सांगत आहे खुनाचा आरोप असलेल्या व्यक्ती नोटीस देवू नका अटक करा.
तरी सर्वोच्य न्यायालय ला काडी ची किंमत द्यायची गरज नाही.
अमक्या धर्मातील लोकांना काडी ची किंमत द्यायची गरज नाही.
शेजारी देशांना काडी ची किंमत द्यायची गरज नाही
मग नक्की किंमत द्यायची कोणाला.
कोणालाच किंमत दिली नाही तर ह्यांना मत कोण देणार
१. ह्यांना मत कोण देणार याची चिंता तुमच्यासारख्या विरोधकांना कशाला? आपल्याला कोण मत देणार हे ते बघून घेतील की.
२. समजा त्यांना राजकीय हाराकिरी करायची हौस आली असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असायचे कारण नसावे. उलट तुम्ही पॉपकॉर्न खात मजा बघायला हवी.
३. ह्यांना मत कोण देणार याचा निवाडा आजपासून बरोबर अडीच वर्षांनी होणार आहे. तेव्हा लोकांनी मते नाही दिली तर ते बॅगा भरून घरी जातील नाहीतर सत्तेत राहतील. निदान तोपर्यंत तरी तुमचे भरपूर कुंथणे चालूच ठेवा.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अध्यक्षांकडून शिफारसपत्र
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट, राजकीय प्रवास आणि पाच वर्षातील कामांची माहिती देणारे ‘कॉफीटेबल’ पुस्तक राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना पाठविले जात असून त्याची किंमत दहा हजार रुपये आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक घेण्याची शिफारस केल्याचे पत्रही सोबत जोडत पुस्तकाचे देयकही पाठविले जात असल्यामुळे ही महागडी पुस्तक खरेदी महाविद्यालयांच्या माथी मारली जात असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे.
https://www.loksatta.com/aurangabad/letter-of-recommendation-from-the-president-of-the-all-india-council-of-technical-education-akp-94-2621449/
पुस्तकाचे 10000 रु पाठवणे बंधनकारक नाही म्हणे
10000 हजारांची पुस्तके मग फुकट कोण वाटत आहे ?
शेवटी केंद्रीय राज्य गृह मंत्र्याच्या खुनी मुलाला अटक केली आहे.
आता कोर्टाने त्याची रवानगी केरळ,बंगाल ,काश्मीर मधील तुरुंगात रवानगी करावी .
आणि त्याच केरळ,बंगाल,काश्मीर मधील पोलिस ना तपास करण्याचा अधिकार द्यावा.
यूपी मध्ये आधीच जंगल राज आहे येथील पोलिस ह्या केस चा तपास करण्यात बिलकुल सक्षम नाहीत आणि cbi तर बोलका पोपट आहे विश्व पुरुष जे सांगतील तेच हा पोपट करणार
पुण्यात गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा
के. पी. अथवा किरण गोसावी याच्याविरोधात सन २०१८ मध्ये पुण्यातील एका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका तरुणाने के. पी. गोसावी याच्या विरोधात सन २०१८ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गोसावी याने एका तरुणाला मलेशियात नोकरी लावतो असे आमिष दाखवून ३ लाख रुपये उकळले होते.
याचा अर्थ सन २०१८ पासून पुणे पोलिसांना के. पी. गोसावी हवा आहे. मात्र तो सापडत नव्हता. ड्रग पार्टीवरील छापेमारीनंतर तो अचानक दिसला. एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला आणि आपल्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरणारा गोसावी आतापर्यंत पुणे पोलिसांना गुंगारा देऊन राजरोस फिरत होता का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबरोबरच एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेला गोसावी पुणे पोलिसांना कसा सापडला नाही, असाही सवाल विचारला जात आहे.
गोसावी हा स्वत:च्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरत असतो. शिवाय त्याचे पिस्तूल घेऊन फोटोही प्रसिद्ध असल्याचे नवाब मलिक यांनी आरोप करताना सांगितले आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-police-wanted-kp-gosavi-in-a-cheating-case-who-took-selfie-with-aryan-khan-a-son-of-bollywood-superstar-shah-rukh-khan/amp_articleshow/86836820.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1
सर्वात जास्त कसे महाराष्ट्र मधून गोळा करून योगी च्या राज्यात पैसा वाटलं जातो.महाराष्ट्र ल जादा कर गोळा करून देण्याचा काडी चा फायदा नाही .
राज्याचे च पैसे पण राज्याला असे देतात जसे भीक देत आहेत
राज्य च ह्यांना भीक म्हणून प्रचंड कर देते.
राज्याचे कायदेशीर हक्काचे पण पैसे केंद्र सरकार वेळ वर देत नाही.
आणि उलट राज्य पेट्रोल वर gst लावायला विरोध करत आहेत असला प्रचार करतात.
असे सध्या 'त्या' दोन भाऊ- बहिणीत सुरू आहे, असे दिसते. म्हणजे अत्यंत मूर्ख विधाने करून स्वतःचे हंसू करून घेणे, जनतेला मूर्ख समजणे, व पर्यायाने मोदी- भाजपला मदत करणे, ह्यांत ह्या दोघांत शर्यत सुरू आहे. शेवटी, 'मोदी है, तो (ये भी) मुमकिन है', असे म्हणायचे काय?
बातमी इथे आहे.
पूर्वी, कम्युनिस्टांत ह्याला 'धनदांडगे' असा शब्द असायचा. व सुमारे ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, रोख मुख्यत्वे टाटा- बिर्लांवर असायचा. तेव्हा आता, टाटा पुन्हा 'त्या लीग'मधे आले असे समजायचे!
पूर्वी, कम्युनिस्टांत ह्याला 'धनदांडगे' असा शब्द असायचा. व सुमारे ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, रोख मुख्यत्वे टाटा- बिर्लांवर असायचा. तेव्हा आता, टाटा पुन्हा 'त्या लीग'मधे आले असे समजायचे!
समाजवादी-कम्युनिस्ट विचारवंतांच्या काही सवयी:
१. समाजवाद्यांना सतत कोणाला तरी शिव्या घातल्याशिवाय अन्न गोड लागत नाही. हे लोक ३०-४० वर्षांपूर्वी टाटा बिरलांना शिव्या घालायचे आता अंबानी-अडानीला शिव्या घालत आहेत.
२. आधी ज्याला शिव्या घालायच्या तो माणूस कित्ती कित्ती चांगला होता हे दुसरा कोणी शिव्या घालायला मिळायला की जाणवते. एकेकाळी नेहरू पुरेसे समाजवादी नाहीत असे म्हणत त्यांना शिव्या घालणारे आता स्वतःला नेहरूव्हीअन म्हणवून घेतात. आपण प्राणपणाने आणीबाणीला कसा विरोध केला, आपल्यामुळे भारतातील लोकशाही कशी टिकली याचे श्रेय आपल्याकडे घेणारे लोक आता आणीबाणीत सामान्य लोकांना कसा त्रास नव्हता आणि ते कसे अनुशासन पर्व होते याचे गोडवे आता गात आहेत. पूर्वी टाटांना पण शिव्या घालणारे लोक आता टाटा सन्स आपला सगळा फायदा समाजासाठी कसा खर्च करते याचे गोडवे गातात. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना शिव्या घालणारे लोक आता ते कित्ती कित्ती चांगले होते अशा पंचारत्या ओवाळत आहेत.
एकूणच काय जग कितीही पुढे गेले तरी हे त्यांच्या भूमिकेतून बाहेर पडताना दिसत नाहीत आणि ती भूमिका म्हणजे सतत कोणालातरी शिव्या घालत राहायचे आणि शिव्या घालायला नवा माणूस मिळाला की पूर्वी ज्याला शिव्या घालायचो तो माणूस कित्ती कित्ती चांगला होता म्हणून नॉस्टॅलजीयाचे अश्रू ढाळायचे.
असल्या लोकांना खूष करायला जो जातो त्याचा घात होतो.
आता एकच गोष्ट बघायची आहे की अमित शहा पंतप्रधान झाल्यावर मोदी कित्ती कित्ती चांगले होते आणि त्यानंतर योगी पंतप्रधान झाल्यावर मोदी आणि शहा कित्ती कित्ती चांगले होते अशी हळहळ व्यक्त करताना दिसावेत. आणि अंबानींपेक्षा मोठा कोणी उद्योगपती आला की अंबानी कित्ती कित्ती चांगले होते म्हणून अंबानींचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करू देत. अन्यथा असल्या लोकांना दिसेल तिथे आणि दिसेल त्या क्षणी दुर्लक्षित करावे.
असल्या लोकांना दिसेल तिथे आणि दिसेल त्या क्षणी दुर्लक्षित करावे.
मी यात अशी सुधारणा करेन
असल्या लोकांना दिसेल तिथे आणि दिसेल त्या क्षणी जोड्याने मारावे.
कोल इंडिया चे दिवस भरलेत असे वाटत.पहिल्या सरकार नी राष्ट्रीय करणं केलेला कोळशा उत्पादन उद्योग मित्रांच्या घश्यात घालण्याचा हेतू सरकार चा नक्की असणार.
काही च कार्य न करता भारत सरकार chya मालकीचे सर्व उद्योग विकून देश चालवण्याचे काम हे नालायक सरकार करत आहे.
(नालायक पोर कधी बापाची जमीन jumlay,भांडी कुंडी विकून संसार चालवत असतात तशी वृत्ती)
पण bjp चे सरकार देशांत पुढील पाच वर्ष जरी राहिले तरी ह्या देशातील हिंदू आर्थिक बाबतीत लाचार होतील..
व्यापारी समाजातील लोक देशाच्या सत्ता स्थानी असणे देशासाठी धोक्याची घंटा असेल.
आज bjp चे गुणगान गाणारे पुढे पश्चातप करतील .
एक पण सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय ह्या सरकार नी घेतला नाही
धर्म,पाकिस्तान,चीन भोवतीच लोकांना अडकून ठेवून व्यापारी सत्ता धारी स्व हित साधत आहेत हे अजुन पण पाठीराखांन करणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही.
ह्यांनी सामान्य लोकांचे हित बघितले असते तर ह्यांना हिंदू नी विरोध केलाच नसता.
पण सामान्य हिंदू ह्यांच्या विरूद्ध जात आहेत
आणि अजुन पण हे झोपेत आहेत.
प्रतिक्रिया
कशाला नादाला लागता यांच्या
राजेश २१ मोगा १५ चालू द्या
हम्म
तसं असेल तर , "दाग अच्छे हैं
कसला डाग? याच समीर वानखेडेंनी
...
.
पुलवामा आरडीएक्स ३५० किलो. हे
हे कोणी आणि केव्हा सांगितले?
आणि याचा जहाजावरील धाडीशी काय
हे कोणी आणि केव्हा सांगितले?
त्या काळातील बातम्या वाचा.
दोन वेळा विचारून सुद्धा
कोणाला पुरावे द्यायचे कोणाला
पुरावे असले तर देणार ना?
.
राजेश २१ मोगा १६ चालू द्या
~
हे भारी आहे
तीन मुद्दे
राजेश २२ मोगा १६ चालू द्या
हं
शेवटी त्या खुन्याला
काश्मीर केंद्र शासित असले तरी
.
अरेरे
हम्म, म्हणून आमच्या पूरात
राज्याच्या हक्काचे पण केंद्र सरकार पैसे वेळेवर देत नाही
राजेश २३ मोगा १६ चालू द्या
पळा, पळा, कोण पुढे पळतो तो...
राजेशाही सुरू आहे
लई मस्त, कोरडेबा॑ई...
आता
राजेश २३ मोगा १७ चालू द्या
धनाढ्य मित्र
समाजवादी-कम्युनिस्ट विचारवंतांच्या काही सवयी
असल्या लोकांना दिसेल तिथे आणि
कोल इंडिया
अतोशोक्ती वाटेल
राजेश २५ मोगा १६ चालू द्या
रामो