Skip to main content

चालु घडामोडी- सप्टेबर आॅक्टोबर. २०२१

लेखक शुर यांनी रविवार, 26/09/2021 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
चालु घडामोडी प्रशासनास ऊडवावे लागताहेत. सभ्य भाषेत मुद्देसुद चर्चा होईल असं पाहून चर्चा करावी.

वाचने 14819
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

*सांगलीच्या बाळू लोखंडे याची लोखंडी खुर्ची इंगलंडच्या हॉटेलात गमतीदार व्हिडीओ होतोय व्हायरल* आतापर्यंत आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या खुर्चीच्या खुमासदार अशा चर्चा अनेकदा ऐकल्या. परंतू दोन दिवसांपासून अखंड भारतात आणि खासकरुन महाराष्ट्रात मात्र चर्चा सुरु आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज या गावातील बाळू लोखंडे या मंडप व्यवसायिकाच्या एका लोखंडी खुर्चीची. ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टॉरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं नावं लिहलेलं आहे. *व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट आणि* सुनंदन लेले यांनी ” बाळू लोखंडे सावळज ” असं लिहलेल्या लोखंडी खुर्चीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली. सावळज येथील मंडप व्यवसायिक बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करुन इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हॉटेलात कशी पोहचली? याबाबत नेटकऱ्यांनी अनेक विनोदी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. यानंतर मात्र आम्ही तासगाव तालुक्यातील सावळज गाव गाठले आणि भेट घेतली ती थेट या खुर्चीचे मालक बाळू लोखंडे यांची. त्यांच्याकडून जाणून घेतली लोखंडी खुर्चीच्या सावळजपासून ते मँचेस्टर पर्यंतच्या प्रवासाची कहाणी. एका सामान्य कुटूंबातील मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापुर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरु केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्यही आणले. त्यामध्ये लोखंडी खुर्च्या होत्या. *मजबुत आणि लोखंडी खुर्च्या इंग्लंडमध्ये* सदरच्या खुर्च्या त्यांनी १५ वर्षापूर्वी हुबळी कर्नाटक येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो होते. वजनाने अतिशय जड लोखंडी खुर्च्या नंतर मात्र हाताळण्यास जड वाटू लागल्या. काळाच्या ओघात ग्राहकही फ्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी करु लागले होते. यामुळे काही वर्षापूर्वी त्यानी लोखंडी खुर्च्या भंगारात कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. नंतर एका परदेशी व्यवसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून विकत घेतल्या. पुर्वीच्या काळातील मजबूत लोखंड असल्यामुळे यापैकी कांही खुर्ची मॅंचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. या खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत. *सुनंदन लेलेंचा लंडनमधूनच बाळू लोखंडेना फोन* बाळु लोखंडेची लोखंडी खुर्ची लंडन मध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेना फोन केला. मॅंचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाच नाव पाहून मी भारावून गेलो. म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी मला संपर्क केला असे लेले यांनी फोनवरुन सांगितले. तर लंडनहुन भारतात परत आल्यानंतर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचे सुनंदन लेलेनी सांगितले. ब्रिटीश खुर्च्या चोरुन घेऊन गेले सुनंदन लेले यांनी ट्विट केलेल्या बाळू लोखंडे यांच्या खुर्चीच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. खुर्ची सातासमुद्रापार कशी गेली याच सुरस कथा कमेंटमध्ये पोस्ट झालेल्या आहेत. काही युजर्सनी उपरोधिकपणे भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर परत जाताना ब्रिटिशांनी ही खुर्ची चोरून नेली असावी अशा शंका कमेंटमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर काहींनी ब्रिटिशांनी खुर्चीसुद्धा सोडली नाही, अशा गंमतीदार कमेंट केलेल्या आहेत.

संसदेचे बांधकाम पहायला वेळ आहे व शेतकरी आंदोलन चाललंय तिथे भेट द्यायला वेळ नाही. पत्रकार परिषदेबद्दल तर बोलायलाच नको. https://zeenews.india.com/india/pm-modi-visits-new-parliament-building-…

In reply to by शुर

ते आंदोलन शेतकर्‍यांचे नसुन, खलिस्तानी दहशतवादी व दलालांचे आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

सैन्यात तिन तिन पिध्या पासुन काम करनारे भाजप विरुध आन्दोलन करायला लागले तर खलिस्तानि? उद्या भाजपला मत न देनार्या उर्वरित जनतेस हि तुम्हि दहशतवादि म्हनाल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर्व सिख हे खलिस्तानी नाही. दिल्ली बोर्डर वर तथाकथित शेतकर्यांनी दिलेल्या घोषणा ऐका यु ट्यूब वर पाहू शकता. दिहाडीवर काम करणारे तिथे येतात. शेती बिल म्हणजे काय ते तिथे बसलेल्या ९९ टक्के लोकांना माहित नाही. टिकैतला हि माहित नाही तो विरोध कशाचा करतो आहे. बाकी प्रत्येक राज्य सरकारचा अधिकार आहे, कृषी बिल राज्यात काय लागू करायचे कि नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शुर वीरांची लिस्ट काढली तर शीख लोकांची संख्याच जास्त निघेल . आणि कसलाच,कुठेच त्याग न करणारे शीख लोकांस खलिस्तानी,अतिरेकी म्हणून संबोधण्यात पुढे. ग्रेट जोक.

लंडनस्थित वाचकाचे पत्र. (लिंक मधे असलेले शेवटचे पत्र) https://www.loksatta.com/sampadkiya/lokmanas/loksatta-readers-reaction-… लशीच्या प्रमाणत्रामागील आक्षेपाची ही एक कारणमिंमासा

कोणत्या देशातल्या दिनदर्शिकेवर ऑक्टोबर महिना चालू झाला ? इथे भारतात अजून सप्टेंबर संपायला २ दिवस शिल्लक आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

तुम्ही काहीही म्हणा , 2024 ला मोदीच येणार लोक 2024 चे लिहितात आणि तुम्ही ऑक्टोबरची काळजी करत बसा

In reply to by hrkorde

मला ना ऑक्टोबरची काळजी आहे ना मोदी २०२४ ला येतील की नाही याची. मला फक्त एकोळी चर्चेचा धागा काढणार्‍याचे आश्चर्य वाटते. इथे नेहमीचेच मोदी समर्थक वि. बाकीचे सामने होत असतात. मग दोन दिवस थांबून ऑक्टोबर चा धागा काढला असता तर काय बिघडले असते ? असो. आपण काय लिहितो त्याला साजेसे शिर्षक असावे अशी एक वाचक म्हणून अपेक्षा असते. पण भलत्याच वाजवी अपेक्षा बाळगणे गैरलागू असावे बहुधा. बाकी चालू द्या.

In reply to by hrkorde

हात गुण ही अंधश्रद्धा नसून सत्य आहे .पुरावे हवे असतील donalt ट्रम्प आणि जर्मनी च्या अध्यक्षांना विचारा. जिथे हात लावतील ते काम बिघडले म्हणून समजाच अशी पण लोक असतात.

In reply to by Rajesh188

एकदा अ‍ॅजेला बाईंना प्रश्न विचारला गेला होता की १६ वर्षांत एकाच टाईपचे ड्रेस एकच हेअर स्ताईल का ठेवता? त्यावर त्या म्हणाल्या की "मी मॉडेल नाही.. जनतेची कामे करणारी सामान्य राजकारणी आहे"

In reply to by hrkorde

एंजेला मार्केल बाईने मिरची हवन करायला हवं होतं तीच्या वर्षा बंगल्यावर :)

https://www.businesstoday.in/industry/psu/story/defence-ministry-dissol… Ofb पण बरखास्त करून सात मित्रांना वाटले आहे.पूर्वीच्या सरकार नी मोठ्या कष्टांनी,अनेक अडचणी वर मात करून देशहितासाठी विविध संस्था उभ्या केल्या होत्या शेठ एका मागोमाग एक सर्व मोडीत काढत आहे. उभ्या करण्यात ह्यांचा काडी चा सहभाग नाही मोडीत कोणत्या हक्क नी काढत आहेत.

In reply to by Rajesh188

आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे काम चालू आहे.

जीएसटीवर संशोधन करण्यासाठी मा अजित पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली मा मोदीजीनी एक समिती निर्माण केली आहे. महा आघाडी सरकारचे अभिनंदन.

In reply to by hrkorde

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ajit-pawar-to-lead… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला, आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ, आसामचे अर्थमंत्री अजंटा निओग, छत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेव, ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे. हा मंत्रिगट सध्याची, जीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, करदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणे, करवसुलीतील गैरप्रकार थांबवणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून करप्रणाली सक्षम, दोषविरहीत बनवणे, केंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे.

In reply to by hrkorde

नोटाबंदि पासून लसीकरणापर्यंत सरकारची धरसोड वृत्ती दिसून आली होती.अखेर केंद्र सरकारला स्वतःच्या मर्यादांची जाणीव झाली. चांगली गोष्ट आहे. यापुढे बहुमताच्या जोरावर संसदेत एकतर्फी निर्णय घेणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

In reply to by आग्या१९९०

नोटाबंदि जाउ द्या .. त्यात वाद करायची इच्छा नाही ... परंतु लसीकरणात काय धरसोड वृत्ती केली ते सांगाल काय ? माझ्या मते सरकारचे धोरण क्लियर होते (आधी आरोग्य कर्मचारी / फ्रंटलाईन कर्मचारी / पोलिस नंतर ६५ वर्षे वरील व शेवटी १८+). यात समजण्यासारखे काय नव्हते? आपल्या लोकांना जिथे तिथे गोंधळ घालायची सवय आहे त्याला सरकार काय करणार?

In reply to by सुक्या

सगळंच जाऊद्या. गुंगीची लस घेणाऱ्यांना नाही कळणार. आगाऊ लस खरेदीचे आकडे , केंद्र,राज्य, खाजगी रुग्णालयांसाठी वेगवेगळे दर, राज्यांना वितरित केलेल्या लसींचा पुरवठा ह्याची माहिती न देणे. सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेऊन केंद्र सरकारकडून खुलासा मागितला होता तो उगाच का? सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेऊन केंद्र सरकारकडून खुलासा मागितला होता तो उगाच का? https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/supreme-court-pull…

In reply to by आग्या१९९०

No Country Managed To Do What India Did": Supreme Court On Covid Steps https://www.ndtv.com/india-news/supreme-court-verdict-on-october-4-over… अर्धवटपणा करून स्वतःचं हसं करून घेण्याची काही जणांची सवय आहे त्याला कोणी काही करू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

कोवीड मृतांच्या वारसांना केंद्राने देऊ केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सुप्रीम कोर्टाने प्रशंसा केली आहे. लशिंच्या भोंगळ कारभारावरून आणि राज्यसरकारांना लशींच्या आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यास सांगण्यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले होते तेव्हा गुंगीत असल्याने काहींना कळले नसेल. सुप्रीम कोर्ट फटकरतय आणि केंद्र हालतय अशी परिस्थिती होती तेव्हा.

In reply to by आग्या१९९०

Given the size of our population, vaccine expenses, economic situation and the adverse circumstances that we faced... we took exemplary steps... No other country managed to do what India did," the judges said. अर्धवटपणा करून स्वतःचं हसं करून घेण्याची काही जणांची सवय आहे त्याला कोणी काही करू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

YES !!!! And Modi is managing this only since last 7 years. Congress managed this for 60 years. हाच त्याचा संपूर्ण अर्थ . ह्यापेक्शाही भयाण अवस्था असताना भारत सरकारने १९७७ ला देवी समूळ नश्ट केली आणि मग १९८० ला भाजप उपजली

In reply to by hrkorde

मोदींच्या वाढदिवसानिमित्त करोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; समोर आली धक्कादायक प्रकरणं लस न घेताच सर्टिफिकेट पाठवण्यात आलं, चौकशी करणाऱ्यांना शांत राहा असा सल्ला देत वाटेल तेव्हा येऊन लस घ्या असं सांगण्यात आल्याचा दावा केलाय. https://www.loksatta.com/desh-videsh/on-modis-birthday-many-got-vaccine…

In reply to by hrkorde

थिल्लर पना करणारे आणि थिल्लर वागणारे भारताच्या इतिहासातील पाहिले सरकार आता सत्तेवर आहे. कोणत्याच विषयात काहीच ज्ञान नसणारे पंतप्रधान पासून मंत्रपर्यंत सर्व च आहेत. फक्त खोटे बोलणे,दडपशाही करणे ,गोड बोलून फसवणूक करणे हे गल्ली मधील गुंडाची सर्व लक्षण सरकार मध्ये आहेत.

In reply to by hrkorde

ह्यापेक्शाही भयाण अवस्था असताना भारत सरकारने १९७७ ला देवी समूळ नश्ट केली हायला पाकिस्तानातील देवीचे उच्चाटन सुद्धा काँग्रेसच्या सरकारनेच केलंय का ? तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो

In reply to by सुबोध खरे

>>> तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो >>> अजूनही संशय वाटतोय? प्रत्यक्ष संजय राऊत यांच्याकडून औषध घेतात. आहात कोठे!

In reply to by सुबोध खरे

सुप्रीम कोर्ट फटकरतय आणि केंद्र हालतय अशी परिस्थिती होती तेव्हा. सुप्रीम कोर्टाचं ऐकले नसते तर कौतुक केले असते का?

In reply to by आग्या१९९०

अर्धवटपणा करून स्वतःचं हसं करून घेण्याची काही जणांची सवय आहे त्याला कोणी काही करू शकत नाही. स्वतःच दिलेला दुवा न वाचता उताणं पडलं तरी माझं नाक वरच आहे म्हणून आत्मप्रौढी करणारे पण बरेच आहेत.

हवाई दल,नाविक दल,लष्कर,पोलिस,अग्निशामक दल,निमलष्करी दल,न्याय व्यवस्था पण मोडीत काढून आपसात वाटून घेतील. काही भरवसा नाही.

कॉन्ग्र्सचे ३ पन्तप्रधान ऑन ड्युटी असताना मेले आहेत, तरीपण कॉण्ग्रेस अन देशाचे काही थांबले नाही. पण भाजपे विनाकारण ओरडत असतात, हमारे पास मोदी है, तुमच्याकडे कोण आहे म्हणुन.

In reply to by सुबोध खरे

पप्पूशेठ आहे की. झालंच तर तहहयात भावी पंतप्रधान आहे. २०२४ मध्ये पंतप्रधानाच्या पदावर राज्याभिषेक होणार असल्याने पंतप्रधान निवासाची व दिल्लीची पाहणी करण्यासाठी परवा दिल्लीच्या भेटीवर गेलेला ब्रह्मांडातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहे. असे बरेच पर्याय आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ह्याण्चा अख्खा पक्शच १९२५ ला हेडगेवारनी कॉन्ग्रेस सोडली ,१९८० ला जनता पार्टी फुटला , अशा फुटाफुटीतुन उपजला आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे मतिमंद बालक सोडून कुणी आहे का? तुमच्या कडे सगळेच जामिनावर "बाहेर" आहेत. कोण केंव्हा "आत" जाईल सांगता येत नाही. शिवाय सकृतदर्शनी पुरावा आहे असं न्यायालयच म्हणतंय. म्हणजे पहा.

In reply to by सुबोध खरे

तुमचा जो आहे तो ही मतीमंदच आहे. एक मतीमंद जाऊन दुसरा आला तरी काय फरक पडतो?

In reply to by hrkorde

सध्याची काँग्रेस तरी कुठे मूळ काँग्रेस आहे? श्रीमती इंदिरा गांधी सुद्धा मूळ काँग्रेस मधून बाहेर पडून काँग्रेस (आय) स्थापन केलि. यानंतर त्यांनी मूळ काँग्रेस हायजॅक केली. आणि आता जुन्या काँग्रेसची परंपरा सांगत फिरत आहेत. आपण हसे लोकाला शेम्बूड आपल्या नाकाला अर्धवट माहितीवर जिथे तिथे पच पच करायची सवय सोडून द्या आणि मोठे व्हा.

In reply to by सुबोध खरे

भारत bodka राहिला तरी उत्तम प्रगती करेल पण मोदी आणि bjp भारतात सत्तेत नकोत. भारतात अनेक हुशार लोक आहेत ते देश उत्तम चालवू शकतात. आताच्या सरकार मध्ये कोण बुद्धिमान आहे हे पण सांगा .एक पण मंत्री नाही बुद्धिमान नाही. प्रधानमंत्री स्वतः फेरीवाले आहेत. बाबरी मशीद पाडली त्या मधून जो उन्माद निर्माण झाला त्या मुळे bjp सत्तेवर आली आहे. Bjp मोठी साफ सुधरी पार्टी आहे त्यांच्या एका पेक्षा एक वरचढ नेते आहेत म्हणून सत्ता नाही मिळाली. उगाच कोणत्या तरी भ्रमात राहू नका.की bjp कडे देश चालवायची क्षमता आहे आणि बाकी लोकात नाही.

In reply to by Rajesh188

तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कुठून मिळतो, काय रहस्य आहे??

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी त्याच तहहयात भावी पंतप्रधानाने १०५ घरी बसवलेत हे विसरू नका. गेली ४० वर्षे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवून मनुवाद्याना सत्तेत येऊ न देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र देशात सर्वात विकसीत आहे तो त्यांच्याच मुळे भाजपच्या ताब्यातील युपी, बिहारी फूकट महाराष्ट्रात येऊन पोट भरतात का?? त्यामुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुस्वास करणं सोडा. ते पंतप्रंधान झाले तर आजईतकी वाईट परिस्थाती नसेल देशाची.

In reply to by शुर

राहुल जी ना टार्गेट करण्याचे कारण अल्प बुद्धी bjp वाल्यांना त्यांची भीती वाटते .म्हणून त्यांना पप्पू वैगेरे हे मूर्ख संबोधत असतात.. राहुल जी जितके संवेदनशील,निस्वार्थी आहेत तेवढे निस्वार्थी bjp मध्ये एक पण नाही. सर्व बदमाश देश लुटण्यासाठी bjp मध्ये जमा झाले आहेत.. राहुलजी च जन्म अशा घराण्यात झाला आहे त्यांनी देशावर राज्य केले आहे .देशाच्या सर्व अडचणी ,समस्या त्यांना माहीत आहेत.. गावगुंड बनून फेरीवाले आणि पंतप्रधान,गृह मंत्री असा त्यांचा प्रवास नाही खानदानी रक्त आहे त्यांच्या अंगात

In reply to by Rajesh188

+1 इंदिरा गांधींनी देशासाठी जीव दिला. एकही भाजप च्या व्यक्तीने देशासाठी जीव दिला असेल तर दाखवून द्यावे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी अटल बिहारी संसदेवर हल्ला झाला तरी शांत बसले. कारगिल वेळी सैन्याला सीमा पार करू दिली नाही. असे हे देशभक्त. ह्यांना देशभक्ती कशाशी खातात ते काय कळणार?? फक्त खुर्ची साठी काहीही करणारी जमात म्हणजे भारतीय जनता पार्टी. खुर्ची साठी ज्यांच्यावर आरोप लावले त्यांच्याच सोबत पहाटे शपथा घेताना कुठे जाते ह्यांची देशभक्ती नि नैतिकता? बिहारात सत्ते साठी नितीशकुमारांचे पाय धरले, काश्मिरात मेहबुबा चे. तेव्हा ह्यांचे हिंदुत्व कुठे जाते? मनोहर परिकर देखील चालता येत नसूनही खर्ची सोडायला तयार नव्हते. त्यांना तर अगदी सलाईन लावून सभागृहात आणले गेले होते.

सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. न्यूयॉर्क टाइम्सने या व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटवर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्रासह व्हायरल करण्यात येणारा वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट हा पूर्णपणे खोटा आहे. फोटोशॉप करण्यात आलेला फोटो शेअर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करणे म्हणजे खोटी माहिती आणि भ्रम निर्माण करण्यासारखा आहे. सत्यावर आधारित पत्रकारितेची आवश्यकता असताना अशावेळी ही महत्त्वाची गोष्ट आहे. या ट्विटमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित असलेल्या बातमीची लिंक ही दिली आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/new-york-…

In reply to by hrkorde

मला नाही वाटत बिजेपि समर्थकांनी हा स्क्रीनशॉट व्हायरल केला असेल. गेल्या ७ वर्षात असले चाळे करुन ते थकले आहेत, महागाईने त्यांचेही कंबरडे मोडले आहे. उसने अवसान आणण्याचंही बळ उरले नाही त्यांना.

वेलिंग्टन: न्यूझीलँडमधील प्रा. मोहन दत्ता या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. अति उजव्या हिंदुत्वावादावर केलेल्या टीकेनंतर त्यांना सोशल मीडियावर धमकी मिळू लागली होती. त्यानंतर न्यूझीलँडमधील पोलिसांनी त्यांच्या सुरक्षितेत वाढ केली असल्याचे वृत्त न्यूझीलँड हेराल्ड या वृत्तपत्राने दिले आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/hindutva-…

In reply to by hrkorde

न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वाममार्गी भारतविरोधी वृत्तपत्राकडून अपेक्षा काय असणार? मुळात हे मोदींचे मॉर्फ केलेले चित्र हे मोदी द्वेष्ट्यानीच आपला अजेंडा राबवण्यासाठी प्रसारित केलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलायची गरजच नाही

In reply to by सुबोध खरे

नेहरू काय चीन रशियाचे पंतप्रधान होते का ? मग न्यूयॉर्क टाइम्स भारतविरोधी कसे ?

In reply to by सुबोध खरे

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता जास्त मिळणारा मनुष्य मला तरी कुणी माहीत नाही.

In reply to by hrkorde

आपल्या दैदिप्यमान बुद्धिमत्तेस साष्टांग प्रणिपात.

Increase in Dearness Allowance, effective July 1 from 17% to 28% The cabinet had approved of a 11% point increase in Dearness Allowance (DA) and Dearness Relief (DR) for employees of the central government and pensioners from 1 July. The DA rate is 28%, up from 17%.

When is Dearness Allowance (DA) revised for employees? DA is reviewed biannually, once in every 6 months on the basis of the cost-of-living index.

https://www.bankbazaar.com/tax/dearness-allowance.html

In reply to by सुबोध खरे

तुम्ही पेन्शनर लोक नोकरिवाल्यात ऍड करून डेटा फुगवत आहात, पेन्शनरचे नियम व फ़ंड नोकरिवाल्याबरोबर कंपरेबल नाही, तुमच्या उरलेल्या माहितीत तुम्हीच दिले आहे की 2 की अडीच कोटी लोक सरकारी नोकरी करतात , मी एकूण लोकसंख्येच्या 1 % बोललो होतो , म्हणजे आलमोस्ट आपण दोघांनी एकसमानच आकडा प्रेडीक्त केला आहे. हे सर्व सरकारी कायमस्वरूपी नोकर आहेत उरलेले 98 % लोक हे कायमस्वरूपी नसलेले , हंगामी नोकरीत , खाजगी नोकरिवाले , फिक्स सॅलरी असलेले किंवा सेल्फ एम्प्लॉयी असतील , ह्यांचे कुणाचेही सॅलरी दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता मिळून वाढत नसतील.

In reply to by hrkorde

एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करण्यात आपला हात कोणी धरणार नाही. आपल्या दैदिप्यमान बुद्धिमत्तेस साष्टांग प्रणिपात.

In reply to by सुबोध खरे

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता जास्त मिळणारा मनुष्य मला तरी कुणी माहीत नाही.

हे आपलेच वाक्य आहे ना? इतक्या आयुष्यात तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी नोकरीतील माणसाला भेटलाच नाही का? मग डॉक्टरी कुठे हकिमांकडे केली काय? सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यपकांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ होत असते. त्या तल्या एकालाही कधीही न भेटता डॉक्टरकी कशी पास केली? नीम हकीम जान को खतरा

In reply to by hrkorde

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता जास्त मिळणारा मनुष्य

मला तरी कुणी माहीत नाही.


आजपासून भारतभर असलेल्या संरक्षणसामग्री निर्माण (ordinance factory) फॅक्टरी ह्या PSU मध्ये बदलण्यात येणार आहेत. सध्या तरी संपूर्ण मालकी की सरकारकडेच राहणार असली तरी भविष्यात काही वाटा खासगी क्षेत्राला मिळण्याची शक्यता आहे. ह्यामुळे येत्या काही वर्षात ordinance factory ची उत्पादकता कमालीची वाढण्याची शक्यता आहे.

चला मोदींचा अमेरिका दौरा आटोपला ५ दिवसांचा दौरा ३ दिवसात संपला ? मेडीआमधे कोणतीही विषेश बातमी नाही, युनो मधे नेत्यांची उपस्थिती नाही… कोणतेही विशेष सख्यत्वाचे दर्शन नाही… नेमकं झाले तरी काय ? ह्या दौर्‍या दरम्यान भारतीय मेडीआ देखिल तोंडघशी पडल्या प्रमाणे वाटला काहीच अंदाज येत नाहीये नेमकं झाले तरी काय ?