Skip to main content

चालु घडामोडी- सप्टेबर आॅक्टोबर. २०२१

लेखक शुर यांनी रविवार, 26/09/2021 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
चालु घडामोडी प्रशासनास ऊडवावे लागताहेत. सभ्य भाषेत मुद्देसुद चर्चा होईल असं पाहून चर्चा करावी.

वाचने 14732
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

+1 इंदिरा गांधींनी देशासाठी जीव दिला. एकही भाजप च्या व्यक्तीने देशासाठी जीव दिला असेल तर दाखवून द्यावे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी अटल बिहारी संसदेवर हल्ला झाला तरी शांत बसले. कारगिल वेळी सैन्याला सीमा पार करू दिली नाही. असे हे देशभक्त. ह्यांना देशभक्ती कशाशी खातात ते काय कळणार?? फक्त खुर्ची साठी काहीही करणारी जमात म्हणजे भारतीय जनता पार्टी. खुर्ची साठी ज्यांच्यावर आरोप लावले त्यांच्याच सोबत पहाटे शपथा घेताना कुठे जाते ह्यांची देशभक्ती नि नैतिकता? बिहारात सत्ते साठी नितीशकुमारांचे पाय धरले, काश्मिरात मेहबुबा चे. तेव्हा ह्यांचे हिंदुत्व कुठे जाते? मनोहर परिकर देखील चालता येत नसूनही खर्ची सोडायला तयार नव्हते. त्यांना तर अगदी सलाईन लावून सभागृहात आणले गेले होते.

सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. न्यूयॉर्क टाइम्सने या व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटवर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्रासह व्हायरल करण्यात येणारा वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट हा पूर्णपणे खोटा आहे. फोटोशॉप करण्यात आलेला फोटो शेअर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करणे म्हणजे खोटी माहिती आणि भ्रम निर्माण करण्यासारखा आहे. सत्यावर आधारित पत्रकारितेची आवश्यकता असताना अशावेळी ही महत्त्वाची गोष्ट आहे. या ट्विटमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित असलेल्या बातमीची लिंक ही दिली आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/new-york-…

In reply to by hrkorde

मला नाही वाटत बिजेपि समर्थकांनी हा स्क्रीनशॉट व्हायरल केला असेल. गेल्या ७ वर्षात असले चाळे करुन ते थकले आहेत, महागाईने त्यांचेही कंबरडे मोडले आहे. उसने अवसान आणण्याचंही बळ उरले नाही त्यांना.

वेलिंग्टन: न्यूझीलँडमधील प्रा. मोहन दत्ता या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. अति उजव्या हिंदुत्वावादावर केलेल्या टीकेनंतर त्यांना सोशल मीडियावर धमकी मिळू लागली होती. त्यानंतर न्यूझीलँडमधील पोलिसांनी त्यांच्या सुरक्षितेत वाढ केली असल्याचे वृत्त न्यूझीलँड हेराल्ड या वृत्तपत्राने दिले आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/hindutva-…

n m

In reply to by hrkorde

न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वाममार्गी भारतविरोधी वृत्तपत्राकडून अपेक्षा काय असणार? मुळात हे मोदींचे मॉर्फ केलेले चित्र हे मोदी द्वेष्ट्यानीच आपला अजेंडा राबवण्यासाठी प्रसारित केलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलायची गरजच नाही

In reply to by hrkorde

तुम्ही शोधा. नाही तर परत म्हणाल महागाई भत्त्यासारखं

In reply to by सुबोध खरे

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता जास्त मिळणारा मनुष्य मला तरी कुणी माहीत नाही.

In reply to by hrkorde

आपल्या दैदिप्यमान बुद्धिमत्तेस साष्टांग प्रणिपात.

Increase in Dearness Allowance, effective July 1 from 17% to 28% The cabinet had approved of a 11% point increase in Dearness Allowance (DA) and Dearness Relief (DR) for employees of the central government and pensioners from 1 July. The DA rate is 28%, up from 17%.

When is Dearness Allowance (DA) revised for employees? DA is reviewed biannually, once in every 6 months on the basis of the cost-of-living index.

https://www.bankbazaar.com/tax/dearness-allowance.html

In reply to by सुबोध खरे

तुम्ही पेन्शनर लोक नोकरिवाल्यात ऍड करून डेटा फुगवत आहात, पेन्शनरचे नियम व फ़ंड नोकरिवाल्याबरोबर कंपरेबल नाही, तुमच्या उरलेल्या माहितीत तुम्हीच दिले आहे की 2 की अडीच कोटी लोक सरकारी नोकरी करतात , मी एकूण लोकसंख्येच्या 1 % बोललो होतो , म्हणजे आलमोस्ट आपण दोघांनी एकसमानच आकडा प्रेडीक्त केला आहे. हे सर्व सरकारी कायमस्वरूपी नोकर आहेत उरलेले 98 % लोक हे कायमस्वरूपी नसलेले , हंगामी नोकरीत , खाजगी नोकरिवाले , फिक्स सॅलरी असलेले किंवा सेल्फ एम्प्लॉयी असतील , ह्यांचे कुणाचेही सॅलरी दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता मिळून वाढत नसतील.

In reply to by hrkorde

एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करण्यात आपला हात कोणी धरणार नाही. आपल्या दैदिप्यमान बुद्धिमत्तेस साष्टांग प्रणिपात.

In reply to by सुबोध खरे

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता जास्त मिळणारा मनुष्य मला तरी कुणी माहीत नाही.

हे आपलेच वाक्य आहे ना? इतक्या आयुष्यात तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी नोकरीतील माणसाला भेटलाच नाही का? मग डॉक्टरी कुठे हकिमांकडे केली काय? सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यपकांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ होत असते. त्या तल्या एकालाही कधीही न भेटता डॉक्टरकी कशी पास केली? नीम हकीम जान को खतरा

आजपासून भारतभर असलेल्या संरक्षणसामग्री निर्माण (ordinance factory) फॅक्टरी ह्या PSU मध्ये बदलण्यात येणार आहेत. सध्या तरी संपूर्ण मालकी की सरकारकडेच राहणार असली तरी भविष्यात काही वाटा खासगी क्षेत्राला मिळण्याची शक्यता आहे. ह्यामुळे येत्या काही वर्षात ordinance factory ची उत्पादकता कमालीची वाढण्याची शक्यता आहे.

चला मोदींचा अमेरिका दौरा आटोपला ५ दिवसांचा दौरा ३ दिवसात संपला ? मेडीआमधे कोणतीही विषेश बातमी नाही, युनो मधे नेत्यांची उपस्थिती नाही… कोणतेही विशेष सख्यत्वाचे दर्शन नाही… नेमकं झाले तरी काय ? ह्या दौर्‍या दरम्यान भारतीय मेडीआ देखिल तोंडघशी पडल्या प्रमाणे वाटला काहीच अंदाज येत नाहीये नेमकं झाले तरी काय ?

भक्त लोक तासकंद डायरी म्हणून पडेल पिक्चरबद्दल मेसेज करून देश फक्त गांधींचा नाही , शास्त्रीजींचापण आहे , असे मेसेज फिरवत आहेत. ह्यांच्या शाळेत शास्त्री , जय जवान जय किसान शिकवत नव्हते की हे शालेलाच जात नव्हते ?

In reply to by hrkorde

विषयी bjp ला काडी चे प्रेम नाही.फक्त गांधी ना कमी लेखण्याची ह्यांची वृत्ती असल्या मुळे bjp सारख्या चावट,निक्कमा असलेल्या राजकीय पक्षाने शास्त्री विषयी msg social माध्यमावर पसरवले आहेत. Bjp ला ना शेतकऱ्या विषयी आस्था आहे,ना सैनिक विषयी आस्था आहे मग शास्त्री विषयी कशी असेल?

गांधी जयंती व शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अजुन भाजपाच्या कुणाच्या अशा विश्वव्यापी जयंत्या साजर्‍या होत नाहीत. १९२५ पासून अजून कुणी नररत्न जन्माला येईना ??

In reply to by hrkorde

स्वतंत्र भारतीय इतिहासातील भारतीय कोर्टाने दिलेली पहिली फाशी म्हणजे खुनी नथुराम गोडसे इतिहासात शेअर मार्केट F&O सुरू होण्यापूर्वीच नेहरूंनी लावलेले इतिहासातील पहिले Strangle

In reply to by श्रीगुरुजी

आताच ही दु:खद बातमी वाचली. मला वाचनाची आवड लावण्यामधे श्री द. मा. मिरासदार यांच्या साहित्याचे खुप मोठे योगदान आहे. भावपुर्ण श्रध्दांजली !!

In reply to by श्रीगुरुजी

दत्ताराम मारुती मिरासदार,विवीध विषयावरील लेख व विनोदी लेखन यातुन त्यांनी वाचकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले. यांना माझा ऋणपूर्वक निरोप _/\_.

मैने नदी मे सु साईड करने का नही बोला था मै बोला था नदी के साईड जाके सु करुंगा

In reply to by वामन देशमुख

देशप्रेमी,प्रामाणिक उद्योगपती पण सरकार ल आवडत नाहीत.पटेल नावाचा कोणी तरी मंत्री आहे तो बोलला अजुन निर्णय झाला नाही . मित्रमंडळी मध्येच एअर इंडिया जाणार.

ह्या कथे सारखी अवस्था bjp ची महाराष्ट्रात तरी झाली आहे. सुशांत पासून आज पर्यंत जो तमाशा bjp नी मांडला आहे त्या मुळे ना त्यांच्या आरोपाला कोणी गंभीर घेत नाही. केंद्रात ह्यांचे सरकार आहे म्हणून सर्व नाटक चालू आहेत. एक वेळ अशी येईल की bjp चे नेते खरे जरी बोलत असतील तरी लोक ते खोटे बोलत आहेत असेच समजतील. विधायक विरोध अपेक्षित होता महाराष्ट्र मधील विरोधी पक्षा कडून. यूपी,बिहार पद्धत येथे वापरली तर महाराष्ट्र कायम स्वरुपी हातातून गेला असेच समजा.

ममता बॅनर्जी प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आहेत.bjp उमेदवाराचा त्यांनी 58832 मता नी पराभव केला. त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केले. ममता बॅनर्जी ह्यांची अभिनंदन.

In reply to by Rajesh188

५८००० म्हणजे भरपूरच लीड आहे. मोदी शहाना आता अजुन एक केअर फण्ड उघडावा लागेल

In reply to by hrkorde

आजकाल मोदीविरोधात कोणीहि बारीकसं हि काही केलं कि याना कौतुक वाटतं. एका मतदार संघात ५८ हजार म्हणजे काहीही विशष नाही लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे महाराष्ट्रातच कितीतरी आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-assembly-polls-10… एका विनोदाची आठवण झाली. एखादं कुत्रं जरी मोदींकडे तोंड करून भुंकत असलं तरी विरोधक त्याला आपला नेता समजू लागले आहेत.

In reply to by hrkorde

मोदी शहाना आता अजुन एक केअर फण्ड उघडावा लागेल याबद्दल ते विधान होतं. बाकी तुमचं मोदीद्वेषपुराण चालू द्या

१)) हरियाणा चे मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना लाढी ची भाषा कळते पोलिस नी झोडपून kadhave. भारतीय राज्य घटनेची शपथ घेवून त्याच्या विपरित विधान. २) केंद्र सरकार मध्ये मंत्री असलेल्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून ठार मारले. ३) शीख लोकांची बदनामी करत आहेत त्यांना खलिस्तानी संबोधून . ४) मुस्लिम सर्व देशद्रोही आहेत असा प्रचार. ५), केरळ,महाराष्ट्र ,बंगाल ह्या सज्जन राज्यांची बदनामी चालू आहे. ह्यालाच म्हणतात विनाश काळी विपरीत बुद्धी.

लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी अचानक उफाळून आलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसहीत आठ जणांचा मृत्यू झालाय. यात तीन भाजप कार्यकर्ते आणि मंत्र्यांच्या वाहन चालकाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू आणि त्याच्या समर्थकांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेनंतर तीव्र संतापलेल्या गर्दीनं केलेल्या मारहाणीत तीन भाजप कार्यकर्त्यांसहीत टेनी यांच्या ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागलेत.

शेतकऱ्यांना गाडी खाली मारून चिरडून bjp च्या मंत्री महोदय सहभागी. तरी निर्लज्ज सारखे स्वतः ला निर्दोष ठरवण्यात व्यस्त आहेत. भारतीय मीडिया दबाव मुळे इतक्या गंभीर प्रकरणाची दखल घेत नाही. बीबीसी सारख्या न्यूज नेटवर्क नी सत्याला पाठिंबा दिला ममता बॅनर्जी प्रचंड बहु मताने निवडून आल्या तरी राज्यपाल जे bjp चे नेते आहेत त्यांच्या शपथ विधी मध्ये अडचण आणत आहेत. हे देशात पहिल्यांदाच घडतं आहे.आणीबाणी मध्ये सुद्धा इंदिराजी नी राज्य घटनेचा इतका अपमान केला नव्हता. महाराष्ट्रात काय तमाशा bjp नी चालवला आहे तो सर्वांस माहीत च आहे.

गुजरातमध्ये गांधीनगर महापालिका आणि द्वारका जिल्ह्यातील ओखा आणि भानवड तसेच बनासकाठा जिल्ह्यातील थारड नगरपालिकांसाठी मतमोजणी झाली. गांधीनगरमध्ये ४४ पैकी ४० जागांवर भाजपने, ३ जागांवर काँग्रेसने तर एका जागेवर आपने विजय मिळवला आहे. इतर तीन नगरपालिकांमध्ये भाजप पुढे आहे हे कळले पण जागा किती मिळाल्या हे समजले नाही. गांधीनगर महापालिकेत यापूर्वी भाजप सर्वात मोठा पक्ष झाला होता पण स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. ते यावेळेस मिळाले आहे. तसेच द्वारका जिल्हा सौराष्ट्रमध्ये आहे. त्याच भागात २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता. तसेच बनासकाठा जिल्हा गुजरातच्या मध्य प्रदेशला लागून असलेल्या पूर्व भागात आहे. तिथेही भाजप त्यामानाने पूर्वी कमजोर होता. या पार्श्वभूमीवर हा विजय भाजपसाठी उत्साहवर्धक असतील हे नक्की.