मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनंदन

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली? वा-यालाही क्षितिजकडांचं बंधन असतं जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं तप्त उन्हातहि माथ्यावरती अविरत त्याची शीतल छाया आयुष्याची स्फूर्ती, शक्ती, निर्गुण ती घनगंभिर माया भासही त्याचे अमोल ठेवा, दर्शन सौख्य चिरंतन असतं

वाचने 3051 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मराठमोळा 20/04/2009 - 20:08
छान कविता लिहिल्याबद्दल... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु 20/04/2009 - 20:31
इतकी तरल आणि सहज ओघवती कविता खूप दिवसांनी वाचली. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सागर 20/04/2009 - 22:48
अप्रतिम क्रान्तिजी... प्राजुशी सहमत...तरलता आणि सहजपणा अगदी नेमकी जाणवते कवितेत खास करुन कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं या ओळी खास जवळच्या वाटल्या... माझे नाव असल्यामुळे नाही ;) खरेच हृदयस्पर्शी ओळी आहेत (कविताप्रेमी) सागर

उमेश कोठीकर 21/04/2009 - 17:55
क्रान्ति,इतके तरल आणि सहज कसे काय लिहू शकता तुम्ही?

जयवी 21/04/2009 - 19:56
क्रान्ति.......फार फार सुरेख !! तुझं काव्य मनपासून भावतं! अशीच लिहिती रहा :)

मानस 21/04/2009 - 20:00
अप्रतिम .... फारच छान. जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं क्या बात है!!

चंद्रशेखर महामुनी 21/04/2009 - 22:12
क्रांति... प्रत्येक कडवे खुपच सुंदर आहे ग.......

चन्द्रशेखर गोखले 21/04/2009 - 22:28
खुप सुंदर कविता लिहिल्या बद्दल अभिनंदन ! बाकी प्रजुताईंच्या मताशी सहमत..