नारायण राणे पूर्णपणे खवळलेले दिसत आहेत, काल आजतक च्या पत्रकारांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती त्यात राणेंनी [ जे केंद्रीय मंत्री आहेत. ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या बाबतीत गंभीर विधाने केलेली आहेत.
मी मुलाखतीतील शब्द खाली जसे च्या तसे देत आहे, शिवाय ती मुलाखत देखील देत आहे.
इसके हात मे कानुन है, शो करेंगे... अरे मगर उसका बच्चा, मुख्यमंत्री का, सुशांत के केस मे था, दिशा सालियन के, था, उसको क्यो, उसको बचाया ना ?
Uddhav पर सवाल को लेकर बोले Rane- उसका लड़का सुशांत केस में था.
हीच प्रतिक्रिया मी सुशांतच्या धाग्यात देखील देत आहे.
लोक ह्या नेत्यांची बाप आहेत.
सुशांत सिंह केस सीबीआय कडे ते आहे.त्यांनी का मग राणे ज्यांच्या वर आरोप करत आहेत त्यांना का अटक केली नाही.
खोटे आरोप करणे हेच राणे चे काम आहे.
सुशांत सिंग पासून च bjp ची पूर्ण पत महाराष्ट्रात गेली आहे.
खोटे बोलणे हा bjp नेत्यांचा खास गुण आहे.
तिकडे मोदी साहेब फेकत असतात आणि इकडे राणे,फडणवीस, फेकत असतात.
कोणी ह्यांना गंभीर पने घेत नाही.
सुशांत सिंग पासून च bjp ची पूर्ण पत महाराष्ट्रात गेली आहे.>>>>
महाराष्ट्र पोलीसाना बदनाम करता येईल तितकं बदनाम फडणवीसानी केलं आणी भाजपची पत गेली.
काल नाशिकच्या पोलिस आयुक्तांबद्दल बोलताना फडणवीस बोलले की “ते काय छत्रपती आहेत का??“
मागे रेमडेसीवीर वेळी हा ते एका अधिकार्याला दमदाटी करत होते.
आयुक्त दर्जा असायला आय ए एस असावं लागतं तो माणूस निश्चीतच फडणवीसांपेक्षा मोठा आहे, आपले आमदार वडील आणी दाळ फेम मंत्री काकू ह्यांची घराणेशाही वापरून फडणवीस आमदार आणी मुख्यमंत्री झाले तसं आयपीएस व्हायला करता येत नाही.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांबद्दल जे विधान केले ते फार दुर्देवी होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी गृहमंत्री सुध्दा राहिले आहेत.
त्याउपर नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सभ्य भाषेत उत्तर देऊन शिस्त आणि सभ्यता दाखवुन दिली. सुशांत केसमध्ये महाराष्ट्र व बिहार राज्य पोलिस महासंचालकांनासुध्दा अशी सभ्यता दाखवता आली नाही.....
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/nashik-police-commissio…
सरकारी अधिकार्याना दमदाटी करण्याची “युपी संस्कृती“ फडणवीस महाराष्ट्रात रूजवताहेत. पवार/ठाकरे/ काॅग्रेस ह्यानी ४० वर्षात ऊभा केलेला विकसीत महाराष्ट्र ऊत्तर प्रदेश सारखा “सुजलाम सुफलाम” करायचा डाव असावा फडणवीसांचा. महाराष्ट्राचं नशीब बलवत्तर म्हणून भरमसाट भ्रष्ट लोक भरूनही १०५ वर आटोपले आणी आणखी एका काळ्या पर्वाला महाराष्ट्र मुकला.
तैवानच्या विस्ट्रॉन आणि भारताच्या ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (ओईएल) ने मोबाईल डिव्हाइसेस, आयटी हार्डवेअर आणि ऑटोमोटिव्ह-ईव्ही उत्पादनांच्या निर्मितीसाठी करार केला आहे. या धोरणात्मक भागीदारी कराराअंतर्गत, पुढील ३ ते ५ वर्षात १३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणूकीतून विविध उत्पादन विभागात ३८००० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. केवळ या करारावर आधारित ११००० नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यासाठी ' मेक इन इंडिया' मोहिमेचा आधार आहे. भारत मोबाईल उत्पादनात जगात अव्वल आहे. आता इलेक्ट्रोनिकीमध्ये अव्वल होण्यासाठी प्रयत्न चालले आहेत.
शीला दिक्षितांविरूद्ध माझ्याकडे ३७० पानी पुरावे आहेत असे एक सत्यवादी एकवचनी महात्मा बरळला होता, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे विस्मरण झाले होते. त्याच्या अंध भक्तांनाही ते स्मरत नाही.
अजित पवारांविरूध्द माझ्याकडे बैलगाडीभरून पुरावे आहेत असे एक सत्यवादी एकवचनी महात्मा बरळला होता, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे विस्मरण झाले होते. त्याचं पुढे काय झालं?? आता पुसटसा ऊल्लेख ही होत नाही??
+१
सर्व भ्रष्टाना क्लिनचीट, कोर्टात केस चालू पण पुरावे देणार नाहीत, भाजपैत आले का तो भ्रष्ट माणूस पावन होतो. काळेधन तर परत आले नाही पण ह्या वर्षी सर्वात जास्त पैसा स्विस बॅंकेत जमा झाला. पेट्रोल ११० ला आहे, गॅस सिलेंडर चे दर गगणाला भिडलेत, ग्रामीण भागात लोक पुन्हा सरपण वापरू लागलेत. भाजपने खोटं बोलून देशाला फार फसवलंय. खोटं पण रेटून बोला हेच भाजपचं तत्व आहे. बाकी देशप्रेम, राष्ट्रहीत, प्यारे देशवासीयो हे फक्त मतं मिळवण्यासाठी रचलेले जुमले आहेत.
अजून जोरात चालू ठेवा..
अश्याच विचारवंतांनी 2014 ला आणि 2019 ला मोदींचा आणि भाजपचा प्रचार केला होता.
तुम्ही आता धुरा खांद्यावर घेतल्याचे पाहून आनंद वाटला.
निवडूण तर लालू,मुलायम, फडणवीस पण येताहेत. लोकशाहीत कोणीना कोणी जिंकतंच. पण आपणच कसे स्वच्छ हे सांगनारा भाजप पक्ष किती भ्रष्ट, खोटारडा, जुमलेबाज आहे हे लोकाना लक्षात यायला लागलंय.
पेट्रोल ११० ला आहे, गॅस सिलेंडर चे दर गगणाला भिडलेत, ग्रामीण भागात लोक पुन्हा सरपण वापरू लागलेत.
राजकारण थापा वगैरे सरकार सर्व ठीक पण ही भाववाढ आवरा म्हणा, त्या विषयावर सर्व सोडून सगळ्या विषयावर बोलतात मोदीसेठ. सर्व सरकारी मालमत्ता विका पण भाववाढ आवरा म्हणा. लोक महागाईच्या नावाने बोंबा मारत आहेत. काहींना तर बोलताही येईना.
सरकारच्या निब्बरपणाला सलाम आहे, अजिबात लक्ष नै द्यायचं ही कला भारीच जमलीय सरकारला. लगे रहो शेठ.
-दिलीप बिरुटे
मोदी मला आवडतात याचे प्रमुख कारण त्यांची वा त्यांच्या पाठिरख्यांची विचारसरणीपेक्षाही त्यांचा वैयक्तिक करिश्मा हे आहे...
आज देशाबाहेरील कोणत्याही शत्रूने मोठी खोड काढली तर मोदी उलटी कांनफाटात नक्की ठेऊन देणार हा विश्वास कायम आहे...
पण देशांतर्गत पातळीवर त्यांना सुधारणा करायला अजूनही बराच वाव आहे हे खेदाने नमूद करावे लागेल :(
पेट्रोल भरताना मनात प्रचंड फसवणूक होत असल्याची लुटले जात असल्याची भावना निर्माण होते आहे कदाचित पेट्रोल, खाद्यतेल यांचे भाव ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात पगार मात्र वाढत नाहीये...
आज देशाबाहेरील कोणत्याही शत्रूने मोठी खोड काढली तर मोदी उलटी कांनफाटात नक्की ठेऊन देणार हा विश्वास कायम आहे...>>>
कुठल्या जगात आहात?? तीन बद्दलच्या बातम्या वाचल्या नाहीत का?? सुब्रमण्सम स्वामी सत्य बाहेर आणून दाखवताहेत की मोदी वाजपेयींचाच दुसरा अवतार आहे त्यानी अतिरेक्यांपुढए टेकले हेलतिन पुढे टेकताहेत.
सरकारी मालमत्ता विका पण भाववाढ आवरा म्हणा.
अस काही केलं तर "का विकली" म्हणून परत बोंबा ..दोन्ही कडून डमरू..
साहेब सक्रिय करा गावातील पेट्रोल दर कसा आणि किती वाढला आणि जगात वाढला कि नाही हा धागा जरा बघा
मागील सरकारने काढलेल्या ऑईल बाँडमुळे केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करून इंधनाचे भाव कमी करू शकत नाही असे आपल्या अर्थमंत्री म्हणतात. ह्याचा अर्थ केंद्राने लावलेल्या भरमसाठ करांमुळे इंधन महाग झाले आहे असा होतो. ( ऑईल बॉण्ड ३.१ लाख कोटीचे, केंद्राची मागील एक वर्षात इंधन कर महसूल ४ लाख कोटी.)
२०१४ ला डिझेल पेट्रोल स्वस्त करू असे निवडणुकीत आश्वासन देताना ऑईल बॉण्ड ह्या सरकारला माहीत नव्हते का?
1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बॉण्ड हे कर्ज असतं. बँका कर्ज देताना मध्येच तुम्ही रिपेमेंट करावं म्हणून देत नाहीत. त्यामुळे बँकांचा ताळेबंद आणि asset liability चा बॅलन्स बिघडतो. त्यामुळे आले पैसे की देऊन टाक असं करता येत नाही.
2. कर्ज घेताना सुद्धा आपल्याकडच्या कॅश ला दुसऱ्या गोष्टीत इन्व्हेस्ट करण्यासाठी घेतली जाते. समजा 2013 चा ऑइल रेव्हेन्यू क्ष असेल तर तो संपूर्णपणे खर्चासाठी वापरून टाकला तर हातात नवीन प्रोजेक्ट्स साठी फार कमी पैसे उरतात. म्हणून loans घेतली जातात. समजा माझ्याकडे 50 लाख रुपये असतील तर मी सगळे पैसे घर विकत घेण्यात घालणार की होम लोन घेणे हा जास्त चांगला निर्णय असेल? माझ्या मते मी दुसरा पर्याय निवडीन.
3. मागच्या सरकारने घेतलेले ऑइल बॉण्ड्स एका विशिष्ट परिस्थितीत घेतलेले असणार. ते फेडताना जेवढे ठरलेले व्याज असेल तेवढे द्यायलाच हवे.
4. ऑइल बॉण्ड्स साठी परतफेड करताना कोणकोणत्या अटी आणि व्याजदर ठरवला होता यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. सरकारचे उत्पन्न करांमधून येते आणि ते मर्यादित आहे. शिवाय 2014 मध्ये कोरोना येईल असं वाटलं सुद्धा नसेल. बदलत्या परिस्थितीत मंत्र्यांना त्या त्या वेळच्या परस्थितोपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
सरकार दरवर्षी ऑईल बॉण्डचे ९९०० व्याज फेडत आहे. सरकारला इंधनावरील एक्साइज ड्युटी मधून २०१४ ला रू.९९००० कोटी आणि २०२०-२१ मध्ये अंदाजे रू. ३,७०,००० कोटी मिळाले. ह्याचा अर्थ ऑईल बाँडचे कर कमी करण्यासाठी ऑईल बॉण्डचा अडथळा नक्कीच नाही. २०१४ नंतर आणि कोरोना येण्यापूर्वीच अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. कोरोना हे निमित्त आहे.
@ रावसाहेब चिंगभूतकर
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे आवश्यक नाही.
ऑइल बंदचे व्याज काय किंवा लसीकरण केलेल्या ६५ कोटी लसींची होणारी साधारण ५० हजार कोटी रुपये किंमत आणि त्याच्या तिप्पट पैसे म्हणजेच अधिक ६५ कोटी उरलेल्या लोकसंख्येच्या पहिल्या डोसचे आणि १३० कोटी दुसऱ्या डोसचे पैसे) हा पैसा सरकार कुठून आणणार आहे?
सरकार जवळ स्वतःचे असे काहीच नसते. कुठून तरी पैसे जमा करूनच योजनांसाठी खर्च करावे लागतात.
तेंव्हा कोणाचाही कर वाढवला कि ते लोक बोंबा मारणारच. जवाहिऱ्यांना १ टक्का अबकारी कर लावल्यावर त्यांनी संप केला होता.
सरकारने त्यांना भीक घातली नव्हती हा भाग अलाहिदा.
आता पण हॉल मार्किंग विरुद्ध संप केला होताच.
तेंव्हा बोंब मारणारे बोंब मारणारच.
शिवसेनेच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी राणे ह्यांची नियुक्ती झाली आहे. भविष्यात दुसरा 'बाळासाहेब ठाकरे' निर्माण होऊ नये ह्यासाठी हे चालु आहे असे ह्यांचे मत. पुर्वी बाळासाहेब असताना चित्रपट(बाँबे) प्रदर्शित होणे असो,संजय दत्तची सुटका असो वा एन्रॉन प्रकल्प असो आण्खी काही.. बाळासाहेबांशी 'चर्चा' केल्याशिवाय पुढे जाता येत नसे.अगदी वाजपेयी-अड्वाणीही सत्तेवर असताना मातोश्रीवर जाउन 'ठाकरी'विचार ऐकायचे.(किंवा ऐकल्यासारखे करायचे!) त्यामुळे उद्धव ह्यांची छबी 'सम्राट' वगैरे होणार नाही ह्यासाठी भाजपाचे हे प्रयत्न चालु असतील.
अगदी वाजपेयी-अड्वाणीही सत्तेवर असताना मातोश्रीवर जाउन 'ठाकरी'विचार ऐकायचे. >>>
आजही ठाकरी विचार एकायला मातोश्रीवर यावंच लागतं. २०१९ ला नाही का महाराष्ट्रात डाव ऊधळला गेला तरी ज्याना चाणक्य म्हणायचे असते असे अमित शहा युती करा म्हणून मातोश्रावर ठाकरेना विनवण्या करायला आले होते. ऊद्या पुन्हा युती साठी विनवण्या करायला भाजप नेते एका पायावर तयार असताल ;)
प्रत्यक्ष मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरेंनी काय कमावलं हे काळच सांगेल, पण एक महत्वाची गोष्ट झाली. ठाकरेंची प्रॉपर्टी किती ते आता निवडणूकी निमित्ताने जाहीर झालं. आता ही baseline समजली तर त्यांच्या wealth creation वर सेंट्रल agencies ची नजर असेल. आतापर्यंत जसं कमावलं तसं आता कमवायला गेलं तर अडकण्याची शक्यता आहे. रिमोट कंट्रोल असताना ती भीती नव्हती.
सेंट्रल एजन्सीज ना ठाकरे भिक घालतील असं वाटत नाही. रावसाहेब दाणवेंची दहा हजार करोड ची संपत्ती आहे असा दावा त्यांच्या जावयानेत केलाय, आणी एजन्सीज राज्य सरकारकडेहा आहे त्यामुळे सेंट्रल एजन्सी वापरन्याआधी केंद्र राज्याला टरकून असेल. मोदींच्या मंत्र्याला अटक करून दाखनलीय ठाकरेनी त्यामुळे पुन्हा ठाकरे आणी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र जाणार नाही.
जोपर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांपैकी एक पक्ष भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत नाही, तोपर्यंत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर अशी लुटुपुटीची कारवाई होत राहील.
शिवसेनेला आवर घालण्याचे २०१४ पासुनच सुरु झाले आहे.
पडद्यामागुन काळजीपूर्वक हालचाली चालु आहेत.
राणे, पडळ्कर यांना आणने हा त्याचाच एक भाग आहे.
एकदा मुंबै महापालिका हातातुन गेली तर शिवसेनेचे हाल कुत्रा खाणार नाही. उद्धव ठाकरे यांना घरखर्चासाठी कर्ज घ्यावे लागेल.
जर शिवसेना , खांग्रेस, भ्रष्ट्वादी यांच्याशी लढावे लागले तर साधन शुचिता पाळुन चालणार नाही. तुम्ही नागडे होणार तर आम्ही पण नागडे होउन लढणारे लोक आणु. हेच सूत्र आहे. कृपाशंकर सिंह वगैरे मंडली यात आर्थिक, सैनिकी, राजकीय ई. मदत करतील. काही दशके महापालिकेत घट्ट पाळेमुळे रोवुन बसलेल्या शिवसेनेला उखडणे सहज शक्य होणार नाही. आणि शुचिता पाळुन तर कधीच नाही.
आणि शेवट चांगला होणार असेल तर काही हरकत नाही. नाहीतरी पन्नास वर्षे आम्ही लोक्शाही आणी पवित्र मार्गाने लढु असे म्हणुन भाजप ने काय साधले ?
जसे पाक सीमेवर गोळीचे उत्तर मिसाईल ने दिले जाते तसेच या राजकारणात पण करावे लागेल.
मोदी, अमित शाह आगे बढो . १२० कोटी जनता तुमच्या बरोबर आहे.
प्रतिसाद वाचून हसू आले. जर २०१४ पासून सेनेला आवर घालण्याचे काम सुरू झाले आहे, तर २०१९ पर्यंत सेनेसमोर लाचारी का सुरू होती? सेनेला फायदा होईल व आपल्याला तोटा होईल अशा पद्धतीने युती करून संपत आलेल्या सेनेला जीवदान का दिले? वारंवार मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी का करीत होते?
२०१७ मध्येच मुंबई महापालिका हातात येत असताना रणांगणातून पूर्ण माघार घेऊन सेनेला पूर्ण रान मोकळे करून का दिले?
कृपाशंकर, राणे, पडळकर वगैरे जनाधार नसलेल्या नेत्यांच्या मदतीने सेनेला संपविणे हे दिवास्वप्न आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत- अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना थारा मिळणार नाही, याविषयी तालिबान कोणती भूमिका घेणार, यावरच भविष्यातील सरकारच्या वैधतेवर निर्णय घेण्यात येणार आहे.
https://maharashtratimes.com/international/international-news/afghanist…
म्हणजे याचा अर्थ तालिबान खरोखरच आता शांततावादी झाले आहेत याची शक्यता असल्याची शेखमहंमदी स्वप्ने स्वतः अमेरिकेच्या अध्यक्षांनाही पडायला लागलेली दिसतात. एकूणच जो बायडन अलीकडील काळातील अमेरिकेचे सर्वात वाईट अध्यक्ष ठरणार असे दिसते- जिमी कार्टर आणि जॉन केनेडींपेक्षाही जास्त वाईट.
आताच्या परिस्थितीत तालिबान वर्ष-दोन वर्षे कसलीही आगळिक न करता स्वस्थ बसतील, जगाकडून मान्यता मिळवून घेतील आणि एकदा हे सगळे पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो ना' असे बरळायला लागले की मग हळूहळू ते आपले रंग दाखवायला लागतील हे सांगायला आंतरराष्ट्रीय राजकारणात पी.एच.डी करायची गरज नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय राजकारणात पी.एच.डी केलेल्या विचारवंतांनाच हे समजायचे नाही. ते सोडून इतर सगळ्यांना ते सहज समजू शकेल. जे लोक शरीया कायद्यावर आपले राज्य चालवणार आहेत आणि जगाची दार-उल- इस्लाम आणि दार-उल-हरब अशी सरळसरळ विभागणी करतात त्यांच्याकडून शांततेची अपेक्षा करणे हाच मूर्खपणा ठरेल.
जनतेच्या मनातले राष्ट्रपती :)
१९८८ पासून 'भावी'.. घ्या म्हणाव लोकान्ना...
तिकडे १९८८ पासूनचे भावी अध्यक्ष २०२१ मध्ये खरोखरच अध्यक्ष झाले.
आपल्याकडे १९९१ पासूनचे भावी पंतप्रधान २०२४ मध्ये खरोखरच पंतप्रधान नाही झाले म्हणजे मिळवली :)
तालिबान चा नवा वाली कोण? कतार का पाकिस्तान...
ज्या मुल्ला अब्दुल गनी बरादर ला पाकिस्तान्मध्ये २०१८ पर्यन्त तुरुन्गात ठेवले होते तो सध्या कतार मध्ये आहे आणि त्याच्याशी अमेरिका, कतार, रशिया बोलणी करत आहेत.. त्याचा पाकिस्तान ला कडाडून विरोध आहे..
त्याचा पाकिस्तान ला कडाडून विरोध आहे
पाकिस्तान तर तालिबान बरोबर जुळवून घ्यायच्या विचारात आहे, त्यांना दुसरा पर्याय पण नाही. तालिबान एकदा अफगाणिस्तान मध्ये स्थिरावले की त्यांचा सर्वात पहिले टार्गेट हे पाकिस्तानच असेल. सत्तेत आल्या आल्या त्यांनी ttp च्या दाहशक्तवाद्यांना सोडून दिले, आणि ttp चे पाहिले लक्ष पाकिस्तानच असेल.
तालिबान युद्ध करून पाकिस्तान जिंकणार नाहीच पण दहशतवादी कारवाया तरी नक्कीच करणार. पाक अफगाण सीमेवर शरिया कायदा लावायचा प्रयत्न करणार. आणि पाकिस्तान साठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
काही काळापुर्वी मी मा. नितिन गडकरी यांच्या मुलाखतीचा व्हिडियो इथे दिला होता. गडकरी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण व्हावा अशी शंका देखील निर्माण व्हावी असे शक्य नाही. गडकरी त्यांच्या मोकळ्या बिनधास्त विधान करण्याच्या बाबतीत ओळखले जातात. हल्ली काही काळा पासुन नितिन गडकरी चर्चेत आहेत, कारण त्यांना मोदी-शहा ही जोडी साईड लाईन करत आहे असे म्हंटले जात आहे किंवा तसे ते दिसुन येत आहे. आपल्या जवळपास देखील येणारा नेता बीजेपी मध्ये ठेवायचा नाही असा प्रयत्न मोदी-शहा करतात का ? जितक मला आठवत त्यानुसार राजनाथ सिंग यांना देखील असेच साईड लाईन करुन त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला वर आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. [ हे जर चूक असेल तर नक्की सांगा ]
नितिन गडकरी यांचे काम देशपातळीवर उठुन दिसावे असेच आणि कौतुकास पात्र ठरावे असे आहे, मग गडकरी हल्ली जी विधाने करत आहेत ती ते तसे का करत असावेत ? असा प्रश्न पडतो.
हल्लीच त्यांना महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? असा प्रश्न विचारला गेला होता, त्यावर त्यांनी उत्तर दिले होते जे योग्यच होते, पण त्यांच्या उत्तरा वरुन देखील त्यांच्यावर काही जणांनी टिका केली होती. अगदी गेला बाजार गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते यांचा 'मराठी पंतप्रधान नको' - घोषणा गडकरींची, ही 'चाल' फडणवीसांना नडायची ? हा व्हिडियो देखील माझ्या पाहण्यात आला होता [ तो मला व्यक्तीगत रित्या काही पटला नाही. ]
आज नितीन गडकरी यांच्या बाबतीत अजुन एक चर्चा पाहण्यात आली ज्यामुळे मला या विषयावर व्यक्त व्हावे वाटले ती इथे देत आहे.
जाता जाता :- मी राष्ट्रासाठी उत्तम काम करुन दाखवणार्या कोणत्याही नेत्याचा समर्थक आहे, मग ते भाजपातील गडकरी असोत वा कोणत्या इतर पक्षातील मंत्री. योगी आदित्यनाथ यांनाही मोदी-शहा साईड लाईन करण्याच्या प्रयत्नात आहेत अश्या स्वरुपाची माहिती बराच काळा पासुन येत आहे. मुंबईत केवळ उत्तर भारतिय लोकांची मते मिळावीत म्हणुन कृपा शंकर सारख्या व्यक्तिला प्रवेश देणारी भाजपा मला तात्विक दृष्ट्या आवडत नाही. [ सत्तेसाठी काहीही चालत असले तरी ] येत्या काळात मोदी सरकार त्यांनीच घेतलेल्या निर्णयामुळे अडचणीत येइल असे मला का कुणास ठावूक सध्या वाटते.
मदनबाण.....आजची स्वाक्षरी : - Nitin Gadkari Addressing News Nation's Conclave "Shahar Banaras"
मागील ३-४ वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक भाजप घेत असलेले सर्व निर्णय, महाराष्ट्रात भाजपत आणले जात असलेले आयाराम, महाराष्ट्रात भाजपचे निवडणुकीसंबधी निर्णय, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घेतलेली भूमिका, अनिल देशमुखांना दिले गेलेले अभय, आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी बरोबर केलेली युती, महाराष्ट्रातून केले जाणारे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रात केले गेलेले उमेदवारी वाटप इ. सर्व चुकीचे ठरले आहेत असे माझे मत आहे.
@मदनबाण @गुरुजी आपल्या वैयक्तिक मतान्चा मला आदर आहे.. मी ती मत वेगळी असली कि ती चूकीची अस म्हणत नाही.. पण माझ्या मते ..काही दिवसान्पासून भाजपा मध्ये फूट पाडण्यासाठी Agenda पत्रकारिता काही लोक करत आहेत.. त्यात मोदी वि. गडकरी, मोदी वि. योगी, शहा वि. योगी, काही प्रमाणात शहा वि. फडणवीस(जरी फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नसले तरी .... )
..पटल नाही तर क्षमस्व ..
श्री गडकरी उत्तम काम करत असले तरीही त्यांना पूर्ण भारतात श्री मोदींच्या इतकी लोकप्रियता नाही. किंवा एकहाती २७२ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याची त्यांची क्षमता आज तरी नाही.
एका खात्याचा कारभार अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळणे आणि निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणे हे परस्पर संबंध नसलेले गुण आहेत.
तेंव्हा नजीकच्या भविष्य काळात गडकरी श्री मोदी आणि श्री शाह यांच्या वरचढ होतील हि शक्यता सुतराम नाही.
२०१९ मध्ये ३०३ उमेदवार निवडून आणण्यात श्री मोदी यांचा सिंहाचा वाटा होता.
बाकी भाजपच काय, इतर मित्रपक्षात सुद्धा बरेच बुणगे केवळ श्री मोदींच्या नावावर निवडून आले हे हि एक कटू सत्य आहे
सात वर्षे होऊन गेली श्री मोदींच्यावर असंख्य भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्या बद्दल कोणताही पुरावा कोणालाही आजतागायत देता आलेला नाही.
आज श्री मोदींची स्वच्छ नेता म्हणून जशी प्रतिमा आहे तशी श्री योगी आदित्यनाथ सोडले तर दुसऱ्या कोणाचीही नाही.
पुत्रप्रेमाखातर माणुस काय काय करू शकतो हे भारतात महाभारतापासून आजतागायत लोक पाहत आले आहेत.
बाकी विरोधक काय वाटेल ते बोलू द्या.
तुमचे मत मला मान्य आहे.
तेंव्हा नजीकच्या भविष्य काळात गडकरी श्री मोदी आणि श्री शाह यांच्या वरचढ होतील हि शक्यता सुतराम नाही.
प्रश्न वरचढ होण्याचा नसुन त्यांना जाणीव पूर्वक साईड लाईन करण्याचा आहे.
शेवटी मोदी- शहांना कधीतरी निवृत्त व्हायचे आहेच. तेव्हा भाजप व संघाच्या शिस्तीनुसार, नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करणे हे त्यांच्यासाठी हितकारक आहे. आता काही दिवसांपूर्वी योगींविषयीही अशाच्य वावड्या माध्यमांतून उठवल्या गेल्या होत्या-- त्यांच्या पक्षाने आगामी निवडणूकांविषयी काही अंतर्गत पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ उप्रत पाठवले होते, तेव्हापासून ह्या वावड्या उठावयास सुरूवात झाली. नंतर लगोलग, योगी दिल्लीत जाऊन मोदींना भेटले, तेव्हा तिला अजून उधाण आले. ते सर्व कितपत खरे होते?
त्या पक्षाचे अंतर्गत राजकारण जाऊंदेत. पण मला व्यक्तिशः गडकरी आपलेच ढोल पिटणारे नेहमीच वाटत आले आहेत. तसेच आपण काही फारच, मळलेल्या वाटेपासून दूर जाऊन 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार सदैव करत असतो, असे त्यांच्या बोलण्यांतून नेहमी येत असते.
तसेच, ते मला अनेक वर्षांपासून फेन्स- सीटर वाटत आलेले आहेत. बरखा इत्यादी ल्यूटेनर्स बरोबर त्यांचे अतिशय खेळीमेळीचे संबंध आहेत, असे अनेकदा दिसून आलेले आहे. अडवानी- बाजपेयी जसे मुळातले 'दिल्लीवाले'च, तसेच गडकरीही. म्हणजे ते मोदी-शहा- योगी ह्यांच्यासारखे 'आउटसायडर' नव्हेत. शक्य झाल्यास, जर यदाकदाचित मोदींच्या सरकारलाच पर्याय शोधण्याची वेळ आली, तर तसल्या 'आघाडी'त हे पुढे असतील, असे मला, का कोण जाणे, प्रकर्षाने वाटत आलेले आहे.
अलिकडेच जूनच्या महिन्यात गडकरींनी, आपण रस्त्यांवरील अपघात, २०२४ सालापर्यंत, ५०% ने कमी करू अशी घोषणा केली.
आता, ह्यांत भारतांतील सर्वच रस्ते धरले आहेत, की केवळ नॅशनल हायवेज हे समजले नाही. तरीही, आपण त्यांना 'बेनिफिट ऑफ डाऊट' देऊ व असे मानू की ते फक्त त्यांच्या खात्याच्या अखत्यारील रस्त्यांविषयी सांगत आहेत. मग हे असे करण्याची नेमकी कसली योजना आहे? होणारे सर्व रस्त्यावरील अपघात व त्यांचे तपशील नोंदवले तरी जातात का? इत्यादी प्रश्न मनांत उभे राहतात. पण गडकरींची अवास्तव घोषणा आहे. वेळ येईल तेव्हा ते 'क्रून दाखवले' असे म्हणतील, अशी शंका येते.
नेहमीप्रमाणेच तुमची माहिती अर्धवट आहे.
१. २जी घोटाळा: ह्याची सुरूवात २००८ साली, कॅगच्या वार्षिक अहवालावरून झाली, ज्यात तत्कालिन टेलिकॉम मंत्री, राजा व त्यांचे सहकारी ह्यांजवर स्पेक्ट्रमचा प्रथेप्रमाणे लिलाव न करता, काही विशीष्ट कंपन्यांना दिली गेली, ज्यायोगे सरकारचे बरेचसे आर्थिक नुकसान झाले, असे म्हटले होते. त्यावरून ईडी व सीबीआय ह्यांनी २००८ साली, एकंदरीत तीन केसेस दाखल केल्या. राजा ह्यांना (व त्यांच्या काही सहकार्यांना, ज्यांजवर हा आरोप होता) अटक झाली. ह्याविषयी येथे पहा.
ह्या केसेसची एकत्र सुनावणी नेहमीप्रमाणे अनेक वर्षे सुरू राहिली व शेवटी २०१७ साली, सीबीआयच्या विशेष दंडाधिकार्यांनी, त्या सर्वांना, सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. आता त्यावर, सीबीआयने डिसेंबर २०२० मधे अपिल केलेले आहे. तेव्हा ही केस अद्यापि सुरू आहे.
२. सर्वश्री पी. चिदंबरन, राहूल गांधी व श्रीमती सोनिया गांधी सध्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतून सुरु असलेल्या केसेसमधे, जामिनावर बाहेर आहेत. चिदंबरन ह्यांचे 'पलायन' न नंतर अटक, ह्यांत प्रख्यात दिल्लीकर रारा. केजरीवाल ह्यांच्या अनेकविध अॅक्टिव्हीज इतका थरार नसेलही, पण ते अगदी इतक्यात विसरता येणेही कठीणच आहे !
३. बोफोर्सवर चित्रा सुब्रमण्यन ह्या पत्रकाराने अतिशय सविस्तर लिखाण तेव्हा केले होते. आता ती केस भाजपाने उकरून काढावी काय? तसे त्यांनी केले, तर ते मुदामहून सूडभावनेने आहे, असे म्हणायला अनेकजण मोकळेच असतील?
वास्तविक, कुणीही एकतरी असे उदाहरण द्यावे ज्यात भाजपच्या नेत्यांनी बेताल आरोप केले व नंतर ते माफी मागून मागे घेतले? अन्य काही पक्षांच्या/ टोळ्यांच्या नेत्यांची ती प्रथा आहे. त्यांतील दिल्लीकर रारा. केजरीवाल तर ह्यासाठी प्रसिद्धच आहेत. त्यांच्या बेताल आरोपाची दखल गेल्या वर्षी एका आग्नेय आशियाई देशानेही घेतली होती व भारतीय राजदूतास पाचारण करून समज दिलेली होती,
२-जी घोटाळा प्रकरणाचा खटल्याची सुनावणी २०११ मध्ये सुरू झाली. मे २०१४ पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते. या काळात बरेच पुरावे नष्ट केले गेले. काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ केल्या गेल्या. त्यामुळे खटला अत्यंत दुर्बल झाला व परीणामी आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.
https://www.indiatoday.in/2g-scam/latest-updates/story/crucial-2g-spect…
या घोटाळ्यातील एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा साक्ष देण्यापूर्वी रहस्यमय मृत्यु झाला.
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/national/Witness-in-…
एकंदरीत यातील आरोपींना वाचविण्याचा मनमोहन सिंगांनी पुरेपूर प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले.
टामटूममामा,
हे उत्तर खरे तर तुमच्यासाठी नाही. पण खोटे अथवा चुकिचे रेटून पुन्हापुन्हा बोलल्याने काहीतरी बुद्धिभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आहे. इथे हे उत्तर अशासाठी लिहीतोय, की हा मुद्दा इथे व इतरस्त्र वारंवार उल्लेखिलेल्याने, कुणाच्या मनांत असेलच, तर तो संभ्रम दूर व्हावा.
खालील लिखाण श्री. आनंद देवधर ह्या व्यवसायाने सी. ए. असलेल्या एका भाजप समर्थकाने त्याच्या फेसबुक वॉलवर लिहीले होते. ते, त्यांतील आवेशाचा भाग गाळून इथे डकवतो आहे.
******************
पीएम केअर्स
PM Cares फंड २७ मार्च रोजी स्थापन झाला.
हा फंड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. याचे अकौंट्स आर्थिक वर्षानुसार लिहिले जातील.पहिले वर्ष ३१ मार्च २०२० रोजी संपले.हे वर्ष फक्त ५ दिवसांचे होते. म्हणून ऑडिट करण्यासारखे फारसे काही नसेल. २०२०-२१ मध्ये खऱ्या अर्थाने ट्रस्ट कार्यरत असेल. त्याचे ऑडिट करण्याची तारीख सध्याच्या प्रोव्हिजननुसार ३० सप्टेंबर २०२१ असेल.तेंव्हा मला लगेच ऑडिट करून हवे असा बालहट्ट धरून हात पाय आपटू नये.
ट्रस्ट ऍक्ट या कायद्याच्या कक्षेत येणारे सर्व नियम याही ट्रस्टला लागू असतील. फंडचे ऑडिट स्वतंत्र,गैरसरकारी एका किंवा एकाहून अधिक ऑडिटर्स करतील.CAG करणार नाही कारण तसा कायदा नाही. जशी इतर ट्रस्ट्सचे ट्रस्टी ऑडिटर्सची नेमणूक करतात तशीच ही नेमणूक होईल.
PMNRF या अस्तित्वात असलेल्या फंडच्या हिशोबासाठी आर्थिक वर्ष कोणते असावे याची काहीही तरतूद नाही. पण या फंडचे २०१८-१९ पर्यंत ऑडिट झाले आहे. या फंडाचे ऑडिटही CAG करत नाही. "सार्क अँड असोसिएट्स" हे सध्याचे ऑडिटर्स आहेत.
PMNRF च्या घटनेनुसार काँग्रेस अध्यक्ष पदसिद्ध ट्रस्टी असतो. स्वतःच्याच पक्षाच्या ९० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोप असलेल्या आणि त्या केसमध्ये जामिनावर सुटलेल्या श्रीमती सोनिया गांधी या सध्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत.अशा व्यक्तीला सामाजिक कार्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये.
PM Cares हा फंडच रद्द करण्यात यावा अशी एक याचिका सुप्रीम कोर्टाने केराच्या टोपलीत फेकून दिली आहे.
PM Cares बद्दल ज्यांना कोणतेही प्रश्न उपस्थित करायचे असतील त्यांनी पुन्हा एकदा खुशाल सुप्रीम कोर्टात जावे आणि तो एकदा रद्दच करून टाकावा."न रहेगा बांस न बजेगी बांसुरी".काय म्हणता ? कधी जाताय कोर्टात ?
उगाच सोशल मीडियावर गरळ ओकून आपल्या अकलेचे वारंवार जाहीर प्रदर्शन करू नये. त्यामुळे काहीही साध्य होणार नाही, काहीही शाबीत होणार नाही.आमचा टाईमपासही होणार नाही.
आनंद देवधर
१४/०५/२०२०
*************
काही दिवसान्पासून भाजपा मध्ये फूट पाडण्यासाठी Agenda पत्रकारिता काही लोक करत आहेत..
तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण बीजेपी चे राष्ट्रीय नेते हलक्या कानाचे नाहीत. त्यामुळे यामुळे विशेष काही साध्य होऊ शकणार नाही.
आयात केलेले नी सत्ता उपभोगत असलेले उपरे आणि आयुष्य bjp मध्ये काढले पण सत्तेत सहभागी करून न घेतलेले निष्ठावान bjp चे नेते ह्यांच्यात फूट दुसऱ्या कोणाला पाडायची गरज नाही
ती पडणार च आहे.उघड नाही पडली तरी निवडणुकीत पाडा पाडी चे खेळ रंगणार च आहेत.
फडणवीस पुढे जाऊन मोदींनंतर आपल्या पंतप्रधान बनन्यात अडथळा येऊ नये म्हणून अमित शहानीच महाराष्ट्र महाआघाडी कडे दिला असंही असु शकतं. पुढच्या वर्षी ह्याच कारणाने ऊत्तर प्रदेशातही भाजपची सत्ता जाऊ शकते.
जिथे आपल्या वाटेत कुणी येनार नाही, तिथे भाजपने बरोब्बर सत्ता आणलीय. (कर्नाटक, मध्य प्रदेश वगैरे)
महाराष्ट्रा सारखे राज्य हातातून जाऊ देण्याईतके मोशा दुधखुळे नक्कीच नाहीत, जर ते बिहारात नितीश कुमारना पुर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ शकतात तर महाराष्ट्रात विरोधात बसन्यापेक्षा शिवसेनेला एक किंवा दोन वर्ष मुख्यमंत्रीपद त्यानी सहज दिलं असतं. पण अमित शहानी हलकासा प्रयत्न ही केला नाही ऊध्दव ठाकरेंचं मन वळविण्याचा. अगदी कर्नाटक, मध्य प्रदेश जराशीही चूक हऊ नदेता अमित शहानी खेळ करून जिंकला ते पहाटेची फजीती होऊ देतील का?? फडणवीसांची प्रतिमा मलीन करून त्यानी साधायचा तो डाव साधलाय.
फडणवीस राज्यातील काटे बाजूला करत राहीले आणी वरून त्यांचाच काटा काढला गेला. अमीत शहानी देशपातळीवर त्यांची प्रतिमा तयार केलीच आहे, मोदी बाजुला झाले की ते स्वतला पंतप्रधान पदाचा ऊमेदवार घोषीत करतील. फडणवीस आणी योगीना एकतर त्यांच्या त्यांच्या राज्यातच राहू देतील नाहीतर मग कुठल्यातरी राज्यात राज्यपालपद देऊन बाजुला केलं जाईल.
प्रतिक्रिया
*अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच
तमीळनाडूचे संजय जोशी.
In reply to *अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच by अमरेंद्र बाहुबली
????
In reply to तमीळनाडूचे संजय जोशी. by अमरेंद्र बाहुबली
https://youtu.be/9mErjn2yx4k
In reply to ???? by रामदास२९
अश्या क्षुल्लक गोष्टीवरून
In reply to *अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच by अमरेंद्र बाहुबली
संजय राठोड हे नाव ऐकलंय का ?
In reply to *अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच by अमरेंद्र बाहुबली
काय हो, नाही म्हणजे ऑटोमॅटीक
In reply to *अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच by अमरेंद्र बाहुबली
नारायण राणे पूर्णपणे खवळलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Entammede Jimikki Kammal | Official Video Song HDनेते लोकाना का मूर्ख समजत असतील
In reply to नारायण राणे पूर्णपणे खवळलेले by मदनबाण
सुशांत सिंग पासून च bjp ची
In reply to नेते लोकाना का मूर्ख समजत असतील by Rajesh188
गरज होती का ?????
सरकारी अधिकार्याना दमदाटी
In reply to गरज होती का ????? by लिओ
तैवानच्या विस्ट्रॉन ने केली १३५० कोटी रुपयांची गुंतवणूक
राणे
शीला दिक्षितांविरूद्ध
In reply to राणे by कपिलमुनी
अजित पवारांविरूध्द माझ्याकडे
In reply to शीला दिक्षितांविरूद्ध by श्रीगुरुजी
+१
In reply to राणे by कपिलमुनी
अजून जोरात चालू ठेवा..
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
निवडूण तर लालू,मुलायम, फडणवीस
In reply to अजून जोरात चालू ठेवा.. by आनन्दा
+१+१+१ .. खर आहे..
In reply to अजून जोरात चालू ठेवा.. by आनन्दा
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज देशाबाहेरील कोणत्याही
In reply to +१ by गॉडजिला
बिनडोकांचा "माल" नेहमीच कडक
In reply to आजचा 'माल' by प्रसाद_१९८२
तूम्ही अनावश्यक टेन्शन घेत आहात बाहुलीजी
In reply to आज देशाबाहेरील कोणत्याही by अमरेंद्र बाहुबली
सरकारी मालमत्ता विका पण
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मागील सरकारने काढलेल्या ऑईल
In reply to सरकारी मालमत्ता विका पण by चौकस२१२
1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
In reply to मागील सरकारने काढलेल्या ऑईल by आग्या१९९०
सरकार दरवर्षी ऑईल बॉण्डचे
In reply to 1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. by रावसाहेब चिंगभूतकर
@ रावसाहेब चिंगभूतकर
In reply to 1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. by रावसाहेब चिंगभूतकर
हम्म
अगदी वाजपेयी-अड्वाणीही
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रत्यक्ष मुख्यमंत्री होऊन
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सेंट्रल एजन्सीज ना ठाकरे भिक
In reply to प्रत्यक्ष मुख्यमंत्री होऊन by रावसाहेब चिंगभूतकर
बॉर.....
In reply to सेंट्रल एजन्सीज ना ठाकरे भिक by अमरेंद्र बाहुबली
भावना गवळी, अनिल देशमुखचा
In reply to बॉर..... by नावातकायआहे
जोपर्यंत शिवसेना किंवा
In reply to बॉर..... by नावातकायआहे
२०१४ पासून नियोजन चालु आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रतिसाद वाचून हसू आले. जर
In reply to २०१४ पासून नियोजन चालु आहे by सामान्यनागरिक
+१००
In reply to २०१४ पासून नियोजन चालु आहे by सामान्यनागरिक
जो बायडन
+१
In reply to जो बायडन by चंद्रसूर्यकुमार
जनतेच्या मनातले राष्ट्रपती :)
In reply to जो बायडन by चंद्रसूर्यकुमार
भावी
In reply to जनतेच्या मनातले राष्ट्रपती :) by रामदास२९
वय त्यान्च्या बाजूच नाही ना..
In reply to भावी by चंद्रसूर्यकुमार
तालिबान चा नवा वाली कोण? कतार
त्याचा पाकिस्तान ला कडाडून
In reply to तालिबान चा नवा वाली कोण? कतार by रामदास२९
पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज
In reply to त्याचा पाकिस्तान ला कडाडून by रात्रीचे चांदणे
तालिबान युद्ध करून पाकिस्तान
In reply to पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज by अमरेंद्र बाहुबली
पाकिस्तान च्या नागरिकांची झोप
In reply to त्याचा पाकिस्तान ला कडाडून by रात्रीचे चांदणे
तालीबान मध्ये जो कतारच्या
In reply to त्याचा पाकिस्तान ला कडाडून by रात्रीचे चांदणे
पि ओ के मधे तालीबानच्या विजयाचा जल्लोश...
काही काळापुर्वी मी मा. नितिन
मागील ३-४ वर्षांपासून
In reply to काही काळापुर्वी मी मा. नितिन by मदनबाण
@मदनबाण @गुरुजी आपल्या
श्री गडकरी उत्तम काम करत असले
In reply to @मदनबाण @गुरुजी आपल्या by रामदास२९
तुमचे मत मला मान्य आहे.
In reply to श्री गडकरी उत्तम काम करत असले by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Nitin Gadkari Addressing News Nation's Conclave "Shahar Banaras"साईडलाईन
In reply to तुमचे मत मला मान्य आहे. by मदनबाण
रस्त्यावरील अपघात
In reply to साईडलाईन by प्रदीप
भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुरावा
In reply to श्री गडकरी उत्तम काम करत असले by सुबोध खरे
माहिती
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुरावा by कपिलमुनी
२-जी घोटाळा प्रकरणाचा
In reply to माहिती by प्रदीप
कोरोनानिधी चा हिशेब दिला नसला
In reply to श्री गडकरी उत्तम काम करत असले by सुबोध खरे
अहो...
In reply to कोरोनानिधी चा हिशेब दिला नसला by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे.
In reply to अहो... by प्रदीप
काही दिवसान्पासून भाजपा मध्ये
In reply to @मदनबाण @गुरुजी आपल्या by रामदास२९
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Nitin Gadkari Addressing News Nation's Conclave "Shahar Banaras"हो.. बरोबर
In reply to काही दिवसान्पासून भाजपा मध्ये by मदनबाण
BJP मध्ये फूट म्हणजे
In reply to हो.. बरोबर by रामदास२९
फडणवीस पुढे जाऊन मोदींनंतर
wishful thinking.. किन्वा
In reply to फडणवीस पुढे जाऊन मोदींनंतर by अमरेंद्र बाहुबली