Skip to main content

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 01/05/2021 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारमधील अत्यंत क्रूर माफिया डॉन बाहुबली महंमद शहाबुद्दीन कोरोनामुळे गेला. तो पूर्वी अनेकदा लालूच्या राजदच्या तिकिटावर निवडून आला होता. पूर्वी त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार करून ११ पोलीस मारले होते. इतर अनेक खुनांचा त्याच्यावर आरोप होता. शेवटी दोन भावांंचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे लालूपुत्र तेजस्वी यादवने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-updates-former-rjd-mp-m… काल भारतात कोरोनाचे ४,०१,९९३ नवीन रूग्ण सापडले व ३,५२३ जणांचा मृत्यु झाला.

वाचने 39988
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

In reply to by पिनाक

ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची कदाचित आजसुद्धा बदला घेण्याइतकी ताकद नसल्याने बदला घेत नसतील. अमेरिकेवर सत्ता गाजवता आली तर जपान्यांना नको असेल? किंवा ब्रिटन भारताच्या ताब्यात राहिला तर भारताचा फायदाच आहे की.

In reply to by उपयोजक

थोडक्यात, जर एखाद्याला बदला घेता आला तर त्याने तो घ्यायलाच हवा नाही का? अमेरिकेवर ब्रिटनने प्रचंड अन्याय केला पण दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन च्या मदतीला अमेरिकेने धाव घेतली. त्यांना बहुधा हे असं करायचं असतं हे माहीत नसावं. जपान ने दुसऱ्या महायुद्धात केलेल्या अत्याचारांचा परिणाम म्हणून सिंगापूर पासून सगळ्या दक्षिणपूर्व देशांमध्ये आजही जपानी पर्यटकांचे शेकडोंच्या संख्येने खून पडतात हे आपल्याला ज्ञात असणारच. तुमच्या तर्कशास्त्राप्रमाणे अगदी भारतात सुद्धा NT, SC, ST यांच्यामध्ये बदला घेण्याची ताकत जेव्हा येईल तेव्हा ते मराठा लोकांचे खून पाडतील असा अंदाज करायला हरकत नाही. निअंडरथल अगदीच नाहीसे झालेले नाहीयेत तर ! असो !! ता.क.: ब्रिटन भारताच्या ताब्यात राहिला तर भारताचा फायदा कसा ते मला काही कळलं नाही. तेवढं जरा सांगून उपकृत करावे ही नम्र विनंती.

In reply to by पिनाक

१. जर्मन लोकांनी ज्यूंच्या शिरकाणासाठी रिपेरेशन्स दिले आहेत आणि देतही आहेत. होलोकास्ट मधल्या लोकांसाठी जर्मनीने जवळपास ९१.९ बिलीयन डॉलर आजच्या तुलनेत खर्च केले आहेत. हे पैसे विविध देशांना तसेच विविध होलोकास्ट पीडितांना देण्यात आले आहेत. हा आकडा रुपयांमध्ये काढताना माती गुंग होते. (६,३८,४०० करोड रुपये जवळपास.) जर्मनीने पूर्ण मनापासून रिपेरेशन्स देऊन स्वतःची मान उंचावली आहे, आणि बाकी देशांमध्ये जर्मनीचे उदाहरण दिले जाते. https://qz.com/1915185/how-germany-paid-reparations-for-the-holocaust/a… २.ब्रिटनने भारताला रिपेरेशन द्यावेत असे शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड डिबेट मोठ्या चवीने भारतीय बघतात. ३. जपान वर बॉंब टाकणे हि चुकीची गोष्ट होती आणि आहे, पण त्याची तुलना ज्यू शिरकाण, वसाहती इइत्यादींशी करणे हास्यास्पद आहे. जपान त्याच ज्यू लोकांना मारणाऱ्या आक्रमक देशाच्या बाजूने लढत होता आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बर् वर हल्ला केला होता.बाकी सर्व घटनांमध्ये एक क्लिअर अन्यायी आणि क्लिअर अन्यायग्रस्त आहे. जपान बद्दल ही रेषा अत्यंत धुसर आहे. ४. अमेरिकेत नेटिव्ह लोकांवर आणि कृष्णवर्णीय लोकांवर केलेल्या अन्यायासाठी रिपेरेशन्स मागितल्या जातात, आणि काही प्रमाणात दिल्या सुद्धा गेल्या आहेत. किंमत चुकवणे म्हणजे जष्यास तशी हिंसा असा बालिश अर्थ नसतो, तर झालेल्या अन्यायांमुळे मागे पडलेल्या लोकांना लेव्हल फिल्डवर आणणे असते. हे बालिश अर्थ केवळ विषय साईडट्रॅक करायला काढले जातात. तुमचा आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षणास विरोध आहे, मग तिथे पूर्वज्यांच्या चुकांचे निकष का लावत नाही तुम्ही ? एकवेळ गरिबीचे दुष्टचक्र हि संकल्पना खिडकीबाहेर भिरकावून म्हणूया कि सगळ्या गरीब मुलांच्या स्थितीचे कारण त्यांचे आईबाप असतात जे मूर्ख आणि मददड असल्याने त्यांना काही उखाडता आले नाही. मानले. तर इथे त्या मुलांची काय चूक ? त्यांना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. मग सगळ्यांनी मिळून त्यांना संधी देणे हे मला तर चांगलेच वाटते. इथे कुणाच्या चुकांची भरपाई कुणी करायची हा प्रश्न कमी महत्वाचा आहे. व्यवस्थेने अन्याय केल्यामुळे कोण मैलभर मागे राहिले आणि आता व्यवस्थेनेच त्यांना पुढे आणायला काय करायला हवे, हा प्रश्न आहे. Equality of opportunity. किंमत चुकवणे हा गौण मुद्दा आहे.

In reply to by साहना

कॉपी पेस्ट करताना दोन पोस्ट चुकून पेस्ट झाले आहेत. प्रतिसाद खालील प्रकारे वाचावा. (संपादक मंडळींना वरील प्रतिसाद संपादित करावासा वाटला तर डिलीट न करता empty ठेवावा) संपूर्ण सृष्टींत "न्याय्य" (फेअर) असे काहीच नाही. तुम्ही कुठे जन्माला येत ह्यावरच अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही सोमालिया मध्ये जन्माला आला किंवा न्यू यॉर्क मध्ये जन्माला आला ह्यावरूनच तुमच्या भविष्याला मोठा फरक पडतो. तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आला किंवा स्त्री म्हणून जन्माला आला ह्यावरून खूप फरक पडतो. मानवाचे सोडून द्या पृथ्वी वरच न्याय्य असे काहीच नाही. रशिया मधील सर्व नद्या आर्टिक समुद्रांत जाऊन मिळतात त्यामुळे ह्या देशाला जुन्या काळांत जास्त प्रगती करता आली आणि. ह्याच्या उलट फ्रांस आणि लंडन आहे. जगांतील ९८% टोर्नेडो अमेरीकेतील एका छोट्याश्या भागांत निर्माण होतात. आफ्रिकेतील बहुतेक नद्या दळण वळणास योग्य नाहीत त्यामुळे ह्यांना नाविक व्यापार करता येत नाही. जगांतील खनिज तेलाचे साठे काहीच देशांत उपलब्ध आहेत तर जगांतील सिलिकॉन चिप डिसाईन ५-६ देशांतच होतो. जगांतील जवळ जवळ ८०% टेक कंपन्या ह्या सिलिकॉन वेलीतील सुमारे १००० चौरस मैलांच्या आत आहेत. पृथ्वीच न्याय्य नसल्याने निव्वळ भौगोलिक उपस्थिती वरून व्यक्तीला प्रचंड फरक पडतो. अफगाणिस्तान ला प्रत्येक शतकांत मोठ्या आक्रमणाला सामोरे जावे लागते तर जपान ला दररोज भूकंपाचा सामना करावा लागतो. पण भौगोलिक स्थानच नाही तर इतिहास, धर्म, जात, लिंग, पूर्वज, जन्मस्थान, भाषा ह्या अनेक गोष्टी ज्या आमच्या हातांत नाहीत त्यावरून आमच्या भवितव्यावर प्रचंड म्हणजे खूपच प्रचंड फरक पडतो. हि वस्तुस्तिथी आहे. निव्वळ एखादा दुसरा निकष लावून सरकारी दंडुका वापरून आम्ही "समता" आणणार हा निव्वळ मूर्खपणा तर आहेच पण माझ्या मते लबाड माकडा प्रमाणे बोक्याकडून लोणी पळविण्याचा प्रकार आहे. भारतातील सर्वच मंडळी एके काळी गरीब होती. सर्वांचेच पूर्वज साधारण व्यक्ती होते आणि सर्वच लोकांना विविध काळ आणि स्थानात अत्याचारांचा सामना करावा लागला. काहींना जास्त तर काहीना कमी असू शकतो पण हे मोजण्याची काहीही पट्टी आमच्याकडे नाही. समानते साठी लोकांच्या हृदयाला पीळ पडणे स्वाभाविक आहे पण "बदला" देऊन लोकांना काही फरक पडतो ह्याच्यासाठी काहीही पुरावा नाही. उलट ज्या समाजांत जास्त आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य आहे आणि जिथे व्यक्ती अधिकारांना मानाचा स्थान आहे तिथे गरीब आणि मागासलेल्या लोकांना सुद्धा पुढे येण्याची जास्त चांगली संधी मिळते, तिथे इकॉनॉमिक मोबिलिटी जास्त असते, आणि अगदी गरीब व्यक्तीला सुद्धा इतर समाजांच्या तुलनेत जास्त सुख सुविधा उपलब्ध असतात. कुणी गरीब परिवारांत जन्माला आला किंवा तथाकथित मागासलेल्या जमातीत जन्माला आला म्हणून अश्या व्यक्तीला नालायक ठरविणे आणि इतरांच्या हक्कांची पायमल्ली करून निव्वळ सरकी दंडुक्याने अश्या व्यक्तीला पुढे काढणे हे नैतिक दृष्ट्या चुकीचे तर आहेच पण त्या संपूर्ण समाजाच्या आत्मविश्वासाला तडा देणे आहे. एके काली महाशक्तिशाली मुगल साम्राज्याला नष्ट करणाऱ्या महापराक्रमी मराठ्यांचे वंशज स्वतःला मागासलेले म्हणवून आरक्षण मागतात हि माझ्या मते शरमेची गोष्ट आहे. ह्या समाजाने खरे तर आपल्या जातीतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी भली मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे बांधण्याची स्वप्ने पाहायला हवी होती (असे करणे सध्या कायद्याने गुन्हा आहे) आणि पाहिजे तर त्यासाठी कायदे बदलायला सरकारला भाग पडायला पाहिजे होते. पण असो. > ना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. ह्यांत काहीही तथ्य नाही. विविध क्षेत्रांत गरीब मुलांनी भरारी घेतली आहे. रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला प्रकारच्या बातम्या दाररोज येत असतंच पण त्याशिवाय आपल्या आजूबाजूला पहिले तर अनेक व्यक्ती गरिबीतून कायमच्या बाहेर आलेल्या दिसतील त्या सुद्धा विना आरक्षण. त्याशिवाय गरीब मुलांना मदत करणे हि आम्हा सर्वांची वैयक्तिक जबाबदार आहे. आपल्या संपूर्ण परिवारांत कुणीही व्यक्ती निव्वळ पैश्यांचा अभावी शिक्षणासाठी वंचित राहणार नाही हे तुम्ही आणि आम्ही पदरमोड करून बघायला पाहिजे. तिसऱ्याचा पैसे चोरून भलत्याला मदत करावी आणि आपली पाठ "समतावादी" मधून थोपटावी हा मूर्खपणा आहे.

In reply to by साहना

१. समता आणणे म्हणजे फार लांबचे झाले. मी समता आणण्याबद्दल बोलत सुद्धा नाही आहे. Equqlity of outcome नाही equality of opportunity बद्दल बोलत आहे. २. भौगोलिक स्थान, धर्म, जात ईत्यादी गोष्टींनी जो आपल्या जीवनांवर फरक पडतो, त्याचा परिपाक आर्थिक परिस्थितीतून दिसतो असे म्हणण्यास हरकत नसावी. ३.बदला हा उद्देश नाही आहे. आजच्या पिढीतल्या लोकांना कलेक्टिव्हली मदत करणे हा उद्देश आहे. ४.गरीब व्यक्तीला नालायक ठरवले हे वाचून तर हसूच आले. त्यांच्या समोरच्या स्ट्रक्चरल बॅरियर ला अक्नॉलेज करणे म्हणजे त्यांची किंमत किंवा लायकी ठरवणे नव्हे. ५. निव्वळ सरकारी दंडुका ? आर्थिक निकषावर आरक्षण लोकनियुक्त सरकारनेच द्यावे असे मत आहे . दंडुका वैगेरे भावविभोर शब्द असे सिलेक्टिव्हली का वापरायचे मग ? मोनोपॉली थांबवणे हे तुम्हाला गरजेचे वाटते म्हणून तिथे तुम्ही सरकारचा दंडुका इग्नोअर करताच कि. मला त्याप्रमाणे हे सुद्धा गरजेचेच वाटते. आणि अर्थातच, माझ्यासोबत करोडो लोकांना असे वाटत असेल तरच ते असे करणारे सरकार निवडून देतील. दंडुका प्रत्येक सरकारी गोष्टींमध्ये असतोच. ६. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आहे हे मला मान्य आहे. मी आर्थिक निकष वापरून आरक्षणाच्या समर्थनात आहे. ७.
> ना त्यांच्या जीवनात अतिरेकी कष्ट केल्याशिवाय पैसे असलेल्या मुलांशी स्पर्धा करता येणार नाही. ह्यांत काहीही तथ्य नाही. विविध क्षेत्रांत गरीब मुलांनी भरारी घेतली आहे. रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला प्रकारच्या बातम्या दाररोज येत असतंच पण त्याशिवाय आपल्या आजूबाजूला पहिले तर अनेक व्यक्ती गरिबीतून कायमच्या बाहेर आलेल्या दिसतील त्या सुद्धा विना आरक्षण.
रिक्षावाल्याच्या मुलाची बातमी पेपर मध्ये येण्याचे कारण तेच असते साहनाजी. त्या मुलाने अपिरिमित कष्ट केले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात दिली हेच अंडरलायीन्ग स्टेटमेंट असते. त्याचे यश एका IAS ऑफिसरच्या मुलाच्या यशापेक्षा वेगळ्या कक्षेत असते, म्हणूनच रिक्षावाल्यांचा मुलगा CA किंवा IAS झाला तर बातमी येते. अनेक गरीब मुले त्यांच्या कर्तृत्वाने चमकतात यात काहीच वाद नाही आहे. पण हे सुद्धा पूर्ण पॉप्युलेशन बद्दल विचार न करता एक सॅम्पल उचलून पाहणे नाही काय ? ८.
त्याशिवाय गरीब मुलांना मदत करणे हि आम्हा सर्वांची वैयक्तिक जबाबदार आहे. आपल्या संपूर्ण परिवारांत कुणीही व्यक्ती निव्वळ पैश्यांचा अभावी शिक्षणासाठी वंचित राहणार नाही हे तुम्ही आणि आम्ही पदरमोड करून बघायला पाहिजे. तिसऱ्याचा पैसे चोरून भलत्याला मदत करावी आणि आपली पाठ "समतावादी" मधून थोपटावी हा मूर्खपणा आहे.
आजिबात पटण्यासारखा युक्तिवाद नाहीये. एका व्यक्तीने आणि एका कुटुंबाने किती लोकांना मदत होईल यावर मर्यादा असतात. म्हणूनच अश्या मदती सरकार कडे पूल केल्या जातात. व्यक्तिगत किंवा संस्थानकडून मदत याची रीच सरकार करू शकणाऱ्या मदतीपेक्षा कित्येक पटीने कमी असते, ह्या कडे दुर्लक्ष होत आहे. आणि आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होती म्हणून प्रतिसाद दिला. आरक्षणापेक्षा जास्त महत्वाचे माझ्या मते सरकारने निशुल्क आणि उत्तम दर्ज्याचे शिक्षण देणाऱ्या शाळा गावोगावी चालू करणे.

In reply to by उपयोजक

त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो वर्षे अन्यायात सोसला त्याची ही किंमत समजा
अतिशय भंपक प्रतिसाद आणि युक्तिवाद. हजारो वर्षे अन्याय??? कायच्या काय.. !!!

In reply to by बापूसाहेब

मग किती वर्षे झाला ते तरी सांगा! तो मुलगा बुलेट घेऊन यायचा यातून तुम्हाला आरक्षणाचा उपयोग दारिद्र्य निर्मुलनासाठी झाला असंच सुचवायचं आहे की. तो मुलगा लुना सारखी बुलेटच्या तुलनेत बरीचशी स्वस्त अशी गाडी घेऊन आला असता तर तुम्ही असेच लिहिले नसते. BTW मी सुद्धा ओपनमधेच येतो. तुमचे काय नि माझे काय दोघांचेही पूर्वज त्यावेळच्या दलितांपेक्षा बरेच सुसह्य जीवन जगले असतीलच की. चांगले बैलगाडी किंवा घोडागाडीतून फिरले असतील. त्यावेळी याच मुलाचे पूर्वज त्यावेळी वंचितांचं किंवा सवर्णाच्या तुलनेत खूप अपमानास्पद जीवन जगले असतील की. त्यावेळी त्यांनाही वाटलं असेल की आपल्याला उच्चवर्णीयांप्रमाणे चांगलं जीवन जगायला कधी मिळणार? पूर्वी सवर्णांचे सुगीचे दिवस होते आता आरक्षण घेणार्‍यांचे सुगीचे दिवस आले. फिट्टमफाट!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असो, @बापूसाहेब आणि इतर ; मला इतकच सांगायचं होतं की आरक्षण हे योग्य की अयोग्य याबद्दल ओपनवाल्यांच्या मताला तशी फारशी किंमत नाहीये. अगदी आरक्षणाचा अतिरेक झालाय नि सवर्णांनी जितका दलितांवर अन्याय केला असेल त्याहीपेक्षा जास्त अन्याय सध्या सवर्णांवर होतोय असं जरी धरलं तरी उपयोग काय? आपण सगळेच राजकारण्यांच्या हातचे बाहूले आहोत. एकगठ्ठा मते मिळून सत्ता मिळणे, पैसा मिळणे हे त्यांचे स्वार्थ ज्या मार्गाने पुरे होतात त्यामधे ते अडचणी निर्माण होऊ देतील का? तस्मात आरक्षणामुळे सवर्णांचं किती नुकसान होतं यापेक्षा वंचित समाजाकडून मिळणारी हमखास मतं राजकारण्यांसाठी महत्वाची आहेत. आजपर्यंत एका तरी राजकीय पक्षाने आरक्षणाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केलाय का? फडणवीसांसारख्या मुत्सद्दी माणसानेही राजकीय मतांसाठी मराठा आरक्षणाची चलाखी केलीच की नाही? आणि अन्यायग्रस्तांनी बदला घ्यावा हाही तिरकस प्रतिसादच आहे बरं का! :) पण मी जरी तिरकस प्रतिसाद दिला असला तरी दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत. १) फेसबुकवर केरळच्या दलित+कम्युनिस्टांनी चालवलेलं एक हिंदूद्वेष्टं पान आहे. अमेरिकेत त्या कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाल्यानंतर अन्य कृष्णवर्णीयांनी पुतळे पाडणे,जाळपोळ हे केले होते. त्याला या केरळी कम्युनिस्ट पेजचा सपोर्ट होता. तसाच उत्पात भारतातही झाला पाहिजे अशा आशयाचे प्रतिसाद होते. अर्थात झाडून सगळे दलित अशा बदला घेण्याच्या वृत्तीचे असतात असे मला अजिबात म्हणायचे नाहीये. तो गैरसमज नसावा. २) करुणानिधी हे चिन्ना मेलम समाजाचे होते. हा समाज मुळचा तेलुगू भाषिक. तो प्रवास करत करत तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्थिरावला. कालांतराने इथे तेलुगू भाषिक नायक राजांचे राज्य आले. हे नायक राजे कट्टर वैष्णव होते. त्यामुळे ते येताना तेलुगूभाषिक वैष्णव ब्राह्मणांना सोबत घेऊन आले. यामुळे करुणानिधींच्या समाजाला फारसे महत्व मिळेना त्या रागातून हा ब्राह्मणद्वेष सुरु झाला. त्याला जोड मिळाली ती पेरियार यांची. हा ब्राह्मणद्वेष आजही (हो हो आजही) तमिळनाडूत सुरु आहे. अगदी इथल्या संभाजी बिग्रेडचा ब्राह्मणद्वेष फिका पडावा इतका. काहीवेळा द्रमुक कार्यकर्त्यांची टोळकी गटागटाने ब्राह्मणांना पिडतात. जानवे खेचून तोडून टाकतात. आतातर याच माकडांची सत्ता तमिळनाडूत आलीय. तीनशे वर्षांपूर्वी तेलुगूभाषिक नायक राजांवर वैष्णव ब्राह्मणांचा प्रभाव पडला त्याचा राग आजही तमिळ ब्राह्मणांवर द्रमुककडून काढला जातोय.

In reply to by उपयोजक

त्यांच्या पूर्वजांनी हज्जारो वर्षे अन्यायात सोसला त्याची ही किंमत समजा. धन्य झालो ... जास्त काय बोलु /..

In reply to by मुक्त विहारि

केवळ पैसे नाहीत म्हणून माझ्या एका मित्राला बुद्धीमत्ता असूनही इंजिनीयर होता आले नाही, कारण तो सवर्ण होता.
हो, पण यासाठी आरक्षणाची काय गरज? त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी स्वस्त दरात कर्ज देणे, सरकारने फी कमी करणे, फी मध्ये सवलत देणे , समाजातल्या सन्मान्य धनाढ्य लोकांनी आर्थिक मदत करणे इत्यादी उपायांना वाढवायला हवे. केवळ एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून त्याच्या मुलाला प्रवेश न देणे म्हणजे आपण साम्यवादी विचारांचा अवलंब करत आहात. जगात कुठेही असे केले जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मित्राला बुद्धिमत्ता असेल (आणि ती एखाद्या श्रीमंत मुलापेक्षा जास्त असेल) तर त्याने तशीही सरकारी एंजिनिरिंग कॉलेज मध्ये एखादा टक्का जास्त मार्क घेऊन प्रवेश मिळवला असता. तिथे श्रीमंत मुलांसाठी तर आरक्षण नव्हते ना? मग त्याला प्रवेश मिळवण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम नसायला हवा. प्रवेश मिळाल्यानंतर इंजिनियरिंग पूर्ण करणे हे त्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असणार. ती कुवत नसेल तर एखाद्या श्रीमंत मुलाला बाहेर ठेवून तो तसाही इंजिनीअर झाला नुसताच. की आपण डोनेशन वाल्या जागांबद्दल बोलत आहात? बाकी मी वरची तुलना श्रीमंत सवर्ण आणि गरीब सवर्ण यांच्यामध्ये केली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांनी तसे केले नसते तर "तुम्ही ब्राहमण म्हणून तुम्ही अडवून धरलाय" असा मोठा गदारोळ झाला असता... काय करायच त्यांनी ?

In reply to by चौकस२१२

म्हणजे स्वतःची मान वाचविण्यासाठी समर्थक अराखीव वर्गाचा बळी दिला. बरोबर ना? मुळात २०१४ मध्ये मराठ्यांना १६ टक्के राखीव जागा देण्याचा केलेला कायदा उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये रद्द केला होता. मराठे मागास नाहीत असा उच्च न्यायालयाचा निर्णय होता. या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असते तर २-३ वर्षे खटला चालून शेवटी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला असता. त्यामुळे फडणवीस यातून अलगद सुटले असते व अराखीव वर्गावरील अन्यायही टाळता आला असता. परंतु मराठा व्होट बँक तयार करण्यासाठी व पवार/चव्हाण इ. ना जे जमलं नाही ते मी करून दाखविलं हे जनतेला दाखविण्यासाठी फडणवीसांनी अत्यंत फाजील उत्साह दाखविला. बहुसंख्य मराठा सदस्यांचा समावेश असलेला व मराठा अध्यक्ष असलेला एक आयोग तयार करून त्याद्वारे मराठा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत, त्यांच्यावर सामाजिकदृष्ट्या अनेक शतके खूप अन्याय झाला आहे असे कागदोपत्री दाखविणारा फ्रॉड अहवाल तयार करून घेतला. या आयोगाचे काम २ वर्षे सुरू होते. परंतु आम्ही आयोगाचा अहवाल आल्यावर लगेच मराठ्यांना राखीव जागा देणार आहोत, असे सुरूवातीपासून फडणवीस वारंवार सांगत होते कारण आयोगाने काय अहवाल तयार करायचा व काय शिफारशी करायच्या हे आधीपासूनच प्लॅन्ड होते. २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर हा अहवाल आणून त्याआधारे राखीव जागा देऊन निवडणुकीत फायदा मिळवायचा हे ठरलेले होते. त्या योजनेनुसारच नोव्हेंबर २०१८ मध्ये अहवाल सादर केला गेला व अहवाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळात राखीव जागा देण्याचे विधेयक कोणतीही चर्चा न करता १५ सेकंदात मंजूर करून घेतले. ही कॅलक्युलेटेड योजना होती. यामुळे जेमतेम ३-४ टक्के असलेली अराखीव मते कमी होऊ शकतील परंतु याची यापेक्षा जास्त भरपाई मराठा मतांमधून होईल, अशी गणिते होती. या घाणेरड्या फ्रॉड राजकारणात अराखीव वर्गाचा बळी दिला गेला. काही अराखीव मते नक्कीच भाजपविरोधात गेली. परंतु राखीव जागा देऊनही फडणवीसांना वाढीव मराठा मते मिळाली नाहीत (यामागचे कारण उघड आहे). २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याचा थोडा फटका भाजपला बसला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला पटणार नाही आणि ह्याचे पुरावे मला देता येणार नाहीत ... पण, कदाचित तुम्ही खालील पाटी, आंदोलन सुरू झाल्या नंतर बघीतली असेल.... मुस्लिम-मराठा भाईभाई, ब्राह्मण तो कसाई है...

In reply to by मुक्त विहारि

मराठा मोर्चा मध्ये मुस्लिम लोक पाणी, सरबत आणि नाष्टा वगैरे वाटण्यात आघाडीवर होती.. यावरूनच समजते की नेमका या गर्दी जमावण्यामागे कुणाचा हात होता आणि का होता.. मी खात्रीने सांगू शकतो की जोवर हे तिघडी सरकार आहे.. किँवा एनसीपी सत्तेत आहे तोवर पुन्हा असे लोखोंचे मोर्चे निघणार नाहित. फार फार तर एखाद दुसऱ्या ठिकाणी शे दोनेशे माणसे मोर्चा किंवा आंदोलन करतील.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. एक चांगला निर्णय. याच बरोबर हिंदूस्थानात हिंदूंनाच बरबाद करण्यासाठी जे कायदे केले आहेत ते देखील लवकरात लवकर नष्ट केले जावेत अशी इच्छा व्यक्त करतो. हल्ली न्यायालये अनेक बाबतीत लक्ष घालत आहेत, तेव्हा त्यांनी हिंदूंवर अन्यायकारक असणारे आणि अगदी पाकिस्तानात देखील नसणारे पण आपल्या देशात असणारे हे कायदे रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिक इकडे :- Laws of Aurangzeb in Secular India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय योग्य आहे. मुळातच मराठा समाजाला आरक्षण देण्याची काहीही गरज वाटत नाही.. माझ्यावर वयक्तिक आणि जातीवाचक तोंडसुख घेण्याआधी क्लिअर करतो की मी स्वतः मराठा आहे. फडणवीस सरकार च्या काळात निघालेले सर्व मोर्चे हे राजकीय दृष्टीने प्रेरित होते आणि त्याला हवा देण्याचे काम b ग्रेडी संघटना आणि पडद्यामागून काकासाहेब करत होते. सर्वसामान्य मराठा लोकं फक्तं आपल्या जातीचा फुका अभिमान आणि ताकद दाखवण्यासाठी त्या लाखोंच्या गर्दीत उड्या घेत होते.. गाडीला स्टिकर, झेंडे, व्हॉट्सॲप ला जाती वरून स्टेटस ठेवणे या सर्व गोष्टी फक्त आपण मराठा आहोत हे दाखवण्यासाठी होत होत्या. याचा भरपूर फायदा राजकीय पक्षांनी उचलला. उघडपणे कोणी बोलत नसले तरी याला ब्रम्हण vs मराठा असं रूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला ( हे सर्व पडद्यामागून कोण करत होत आणि का करत होते ते सांगण्याची गरज नाही.. ) . इतकं सगळं होऊनही फडणवीस सरकारने हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला. आणि ५ वर्षाचा कालावधी पूर्ण केला. बाकी आज निर्णय रद्द झाला हे चांगलेच झाले. हळूहळू इतर सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करून सर्वांना समान संधी द्यावी. सर्व सरकारी कागदपत्रांतून जात हा रकणा काढून टाकावा. एखादी व्यक्ती ब्राह्माण , मराठा, लोहार, कोळी ई कोणीही असेल त्याला हिंदू च मानावे. अर्थातच त्याने जातीपाती नष्ट होतील असे नाही पण हे सर्व लोकांनी घरी पाळावे. सार्वजनिक जीवनात जातीपातीन्ना ऑफिशेली कुठेही थारा देऊ नये.

In reply to by बापूसाहेब

सहमत आहे.... धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर... हिंदू तितका मेळवावा....

In reply to by नावातकायआहे

विधवा विवाह होत आहेत ... सती जाणे बंद झाले ... स्त्री शिक्षण सुरू आहे ... एका पिढीत ह्या गोष्टी होत नाहीत, अशा गोष्टींना तीन पिढ्या जाव्या लागतात .... मी आणि माझी मुले, कुठल्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांत जात नाही... गणपती आणि नवरात्र, घरांतच साजरे करतो... सुपारीचा गणपती आणि खड्यांच्या देवी...100% प्रदूषणमुक्त...

In reply to by नावातकायआहे

खयाली पुलाव ह्या पलिकडे काही नाही. ह्या जन्मी शक्य नाही हे.
तुमची प्रक्टिकल मते ऐकायला आवडतील.. हे खायली पुलाव असेल तर दुसरा काही पर्याय सुचवा..

In reply to by बापूसाहेब

जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकणे आणि आर्थिक मागासांकरता आरक्षण ठेवणे हा उपाय आहे. दुर्दैवानी सर्व राजकिय पक्ष जात आणि धर्म ह्यावर अवलंबून आहेत. ५,५.६, ५६, ५६६ कितीही इंची छाती किंवा इतर कुठलाही अवयव असला तरी कोणिही जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकण्यास धजावणार नाही कारण त्या बळा(?) वर तर राजकारण आणि सत्ता टिकून आहे. आता मराठा आरक्षणाचा चेंडु अद्रुश्य हातानी व्यवस्थित केंद्राकडे टोलावला आहे! मज्जानु लाइफ!

In reply to by नावातकायआहे

आता मराठा आरक्षणाचा चेंडु अद्रुश्य हातानी व्यवस्थित केंद्राकडे टोलावला आहे! मज्जानु लाइफ! यात नविन ते काय.. आल अंगावर ढकल केंद्रावर.. !!!
दुर्दैवानी सर्व राजकिय पक्ष जात आणि धर्म ह्यावर अवलंबून आहेत. ५,५.६, ५६, ५६६ कितीही इंची छाती किंवा इतर कुठलाही अवयव असला तरी कोणिही जात , धर्माचा उल्लेख सरकारी कागद पत्रावरुन काढुन टाकण्यास धजावणार नाही कारण त्या बळा(?) वर तर राजकारण आणि सत्ता टिकून आहे.
सहमत. सध्याच्या परिस्थितीत हे अशक्यप्राय गोष्ट आहे. पण एक ना एक दिवस हे होईल असा विश्वास आहे. कही दशके किंवा कदाचित शतके गेल्यावर नक्कीच हा मुद्दा सुटेल.. आणि जर तोवर हा प्रश्न नाही सुटला तर येणाऱ्या काळात भारताची अजून काही तुकडे पडणार हे नक्की..!!

In reply to by बापूसाहेब

हे टिकले तर बरे... मुळातच आता फक्त आर्थिक निकषावर मदत हे धोरण राबवले पाहिजे .. पण ते कोणीच करू देणार नाही... मराठा आरक्षणाबद्दल म्हणलं तर.. खर तर मला सुरवातीला हि गोष्ट फार विचित्र वाटली... कारण असं कि हे म्हणजे राजाच्या वंशजाने आरक्षण मागण्यासारखेच दिसले ... क्षत्रिय समाजाने असे हात पसरणे हे कसे काय अभिमानस्पद होते कोण जाणे ! ती सर्व मेहनत दुसऱ्या कशासाठी वापरली असती तर फार बरे झाले असते !

मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा नाहीच तर तो मतांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असंख्य मराठा तरुणांच्या भावनांशी काकासाहेबांनी खेळलेला खेळ आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्यात ३४% मराठा आहेत म्हणजे ४ कोटी. यातील एक ते दीड कोटी तरुण आहेत. ज्यांना नोकरी किंवा शिक्षण याची गरज आहे. संपूर्ण भारतात सर्व सरकारी निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळून सव्वा दोन कोटी नोकऱ्या आहेत. यात १६ टक्के आरक्षण दिले तर ३२ लाख नोकऱ्या येतील. सर्वच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी अक्ख्या भारतभराच्या नोकऱ्या मध्ये सुद्धा हे मराठा तरुण सामावून घेऊ शकणार नाहीत. मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या सरकारी नोकऱ्यांत भरती झाली त्यात ६९ हजार विविध नोकऱ्या होत्या यात हे १६ % आरक्षण दिले तरी केवळ ११ हजार तरुणांना नोकरी मिळाली असती. मग एक मराठा लाख मराठा कुठे जाणार आहे? हि सर्व वस्तुस्थिती श्री फडणवीसांना माहिती होती शिवय ते स्वतः वकील असल्याने मराठा आरक्षण हे न्यायालयात अजिबात टिकणार नाही हेही त्यांना स्पष्टपणे माहिती आहे. कारण मुळात आरक्षणाचा निकष हा सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण नाहीच. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षाच्या आणिराज्याच्या ६० वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता हि संपूर्णपणे मराठा समाजाच्या हातातच राहिलेली आहे आणि सामाजिक उतरंडीत मराठा समाज हा सर्व बाबतीत पुढारलेला आहे त्याला मागासलेला ठरवणे हे संपूर्णपणे स्वार्थी राजकारणाचा खेळ आहे. राहिला मुद्दा आर्थिक निकषावर आरक्षण देणे. एखाद्या सधन बापाने मुलाला प्रवेश मिळण्यासाठी आपल्या बायकोला घरातून विभक्त केल्यास मुलगा आणि आई आर्थिक दृष्ट्या मागास होतात. शिवाय असे आरक्षण दिल्यास शेतीमध्ये दार एकरी ५ कोटी उत्पन्न काढणाऱ्यांची शेती पुढच्याच वर्षी नापीक होऊन जाईल. तेंव्हा आर्थिक मुद्द्यावर आरक्षण देणे हे फार कठीण आहे आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होईल. आजच आलेल्या निकालात स्पष्टपणे हेही म्हटलेले आहे कि ५० % च्या वर आरक्षण देणे हे अधिक मोठ्या ( ९ किंवा अधिक न्यायाधीशांच्या) घटना पीठाकडे वर्ग करण्याची अजिबात गरज नाही कारण याअगोदर दिलेला हा निकाल (इंद्रा साहनी केस) चार पूर्णपीठानी तपासून पाहिलेला आहे आणि तो वैध ठरवला आहे. तेंव्हा आता याबद्दल पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करून घेण्याची शक्यता मावळली आहे. आता अनेक राजकीय नेते घटना दुरुस्ती करा म्हणून मागे लागतील/ लागले आहेत. परंतु केशवानंद भारती केस मध्ये हे सुस्पष्ट झालेले आहे कि घटनेच्या मूळ ढाच्याला घटनादुरुस्तीने सुद्धा हात लावता येणार नाही. तेंव्हा अशी घटना दुरुस्ती न्यायालयात टिकणारच नाही. तेंव्हा मराठा तरुणांना स्वच्छपणे सांगणे आवश्यक आहे कि तुम्ही आरक्षणाच्या भिकेसाठी राजकीय नेत्यांच्या मागे लागणे सोडून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. पण असे सांगणारा एकही नेता महाराष्ट्र्रात नाही हे खेदाने नमूद करावे लागते.

In reply to by सुबोध खरे

पोपट मेला आहे हे सांगण्याचे धैर्य कोणाच्या अंगात असणार? कारण असे धाडस जो करेल त्याच्यावरच पोपटाच्या हत्येचा आरोप येणार हे निश्चित. म्हणून वेगवेगळे वैद्य आणून उपचाराचे सोंग चालू आहे.

In reply to by सुबोध खरे

मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा नाहीच तर तो मतांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी असंख्य मराठा तरुणांच्या भावनांशी काकासाहेबांनी खेळलेला खेळ आहे. अगदी हाच खेळ फडणवीस सुद्धा खेळले. माझ्या मते ते भाजपतील पवार आहेत. दोघांमध्ये अनेक साम्य आढळतील. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्यात ३४% मराठा आहेत म्हणजे ४ कोटी. या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे. आपली संख्या ५२% आहे असा दावा इतर मागासवर्गीय करतात. यासाठी ते १९३१ किंवा त्याआधी केव्हा तरी झालेल्या जनगणनेचा संदर्भ देतात. मराठ्यांची वेगळी जनगणना झालेली नाही. परंतु ते आपली संख्या ३२% सांगतात. यात मागासवर्गीय ७-८%, मुस्लिम १४%, इतरधर्मीय ३-४%, ब्राह्मण ३-४%, आदिवासी, भटक्या जमाती इ. ची संख्या मिळविली तर एकूण बेरीज १२५% हून अधिक होते. हि सर्व वस्तुस्थिती श्री फडणवीसांना माहिती होती शिवय ते स्वतः वकील असल्याने मराठा आरक्षण हे न्यायालयात अजिबात टिकणार नाही हेही त्यांना स्पष्टपणे माहिती आहे. कारण मुळात आरक्षणाचा निकष हा सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण नाहीच. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षाच्या आणिराज्याच्या ६० वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता हि संपूर्णपणे मराठा समाजाच्या हातातच राहिलेली आहे आणि सामाजिक उतरंडीत मराठा समाज हा सर्व बाबतीत पुढारलेला आहे त्याला मागासलेला ठरवणे हे संपूर्णपणे स्वार्थी राजकारणाचा खेळ आहे. हेच मी सांगतोय. हे सर्व माहिती असूनही फडनवीसांनी बनावट अहवाल तयार करून त्याआधारे रा़खीव जागा देऊन मरठ्यांना फसविले आणि प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून भाजपला मत देणार्‍या समर्थक अराखीव वर्गाचेही नुकसान केले. आजच आलेल्या निकालात स्पष्टपणे हेही म्हटलेले आहे कि ५० % च्या वर आरक्षण देणे हे अधिक मोठ्या ( ९ किंवा अधिक न्यायाधीशांच्या) घटना पीठाकडे वर्ग करण्याची अजिबात गरज नाही कारण याअगोदर दिलेला हा निकाल (इंद्रा साहनी केस) चार पूर्णपीठानी तपासून पाहिलेला आहे आणि तो वैध ठरवला आहे. तेंव्हा आता याबद्दल पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करून घेण्याची शक्यता मावळली आहे. ९ न्यायाधीधांच्या घटनापीठाचा निर्णय बदलण्यासाठी किमान ९ न्यायाधीशांचे नवीन घटनापीठ असणे बंधनकारक आहे. ५ न्यायाधीशांचे घटनापीठ तो निर्णय बदलू शकत नाही, त्यामुळेच या खटल्यासाठी किमान ११ न्यायाधीशांचे घटनापीठ असावे ही मागणी सिब्बल सातत्याने करीत होते. जाता जाता . . . सरकारच्या बाजूने खटल्यातील एक वकील सिब्बल होते. तेव्हाच हा खटला सरकार हरणार हे निश्चित झाले होते, कारण मागील काही काळात सिब्बल अनेक खटले हरलेले आहेत (उदाहरणार्थ - श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते, न्यायालयाच्या नावाने राहुल खोटे बोलला त्या खटल्यात ते राहुलचे वकील होते.)

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्याही शासकीय कागदावर मी जात लावत नाही. आम्ही आता कोणत्या प्रवर्गात मोडतो.

In reply to by सुबोध खरे

विश्लेषण मस्त चित्रपट काढायला काय प्रचंड मसाला आहे भारतातात! , आरक्षण, भ्रष्टाचार, धर्म, जात , पाकिस्तान संबंध .. मी तर पण केलाय यापुढे आयुष्य खालील कामासाठी वेचायचेच .... हॉलिवूड मधील उच्च असह्य दिदर्शकांना हे सर्व विस्कटून सांगणे ... जबर्या चित्रपट निघतील ( आणि मुख्य म्हणजे त्यात बॉलिवूड गिरी कमी असेल )

काही लोक आरक्षण आर्थिक निकषावर देण्यात यावे अशी मागणी करताना दिसतात.. वरवर हे छान वाटत असले तरी अस कारण हे अशक्य आहे. कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत हे ठरवणे अत्यंत क्लिष्ट आहे. आज गरीब असणारा व्यक्ती अजून एक महिन्यांनी श्रीमंत होऊ शकतो. and vice versa. आणि असा तकलादू कायदा आणल्यास भारतातील १३० कोटी लोक आम्हीं गरीबच आहोत हे सिद्ध करण्याचा अटापिटा करतील. त्यामूळे एकंदरीत आरक्षण ही कालबाह्य झालेली संकल्पना मोडीत काढून ज्याला त्याला आपल्या लायकी प्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळवू द्या. आरक्षनावर पैसा उधळण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे शिक्षण कमी किमतीत उपलब्ध करून द्या. नोकरी मध्ये ज्याची लायकी त्याला नोकरी असा निकष लावा. त्यामुळेच योग्य टॅलेंट पुढे येईल अन्यथा ६० टक्के वाला डॉकटर, ५० टक्केवाला शिक्षक आणि ४० टक्केवाला इंजिनियर काय देशाचं भविष्य घडवणार..!!! असं होणारं नाही.. किंबहुना ( ठाकरे सरकार कडून शिकलेला नविन शब्द) असे होणे खूपच अवघड आहे कारण आता आपण अश्या ठिकाणी पोहोचलो आहोत जिथून माघारी फिरणं अत्यंत अवघड आहे... !! कदाचित प्रायव्हेट क्षेत्रात पण आरक्षण मागतील हे भिकारी, आयतखाऊ लोक... ( यासंदर्भात बातम्या येत होत्या काही वर्षापूर्वी) यावरून एक जोक आठवला. अमेरिकेचा पंतप्रधान - आम्ही यावर्षी २ जणांना संशोधन करण्यासाठी चंद्रावर पाठवणार आहोत.. भारताचे पंतप्रधान - हे तर काहीच नाही.. आम्ही ३० जणांना पाठवणार आहोत.. . अमेरिकेचा पंतप्रधान - ३०?? एवढे का बरे??? भारताचे पंप्रधान - हो ३० .. कारण १२- ओबीसी २ - एससी २- NT ५ - अल्पसंख्याक १० - ओपन आणि . . . . . . ०१ - अंतराळवीर.

In reply to by नावातकायआहे

आर्थिक मागास दाखवणे निदान नोकरदारांना तर ते सोप्पे असावे दोन तीन वरशाचे आयकर आणि स्थावर मालमत्ता याचा हिशोब मागणे अर्थात या साठी देशंभर हे सगळे सुसूत्रित असले तर .. तिथेच गोची आहे , ती सुधारण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे पण लोक चापलुसी करतात शिक्षणात घ्या ,, विद्यर्थ्याला आर्थिक मागास पानावर प्रवेश पाहिजे तर आई वडिलांची सांपत्तिक परिस्थिती सिद्ध कर ...

आलं अंगावर .. ढकल केंद्रावर ... अगदी अंदाजाप्रमाने बातमी आलीच .. https://www.loksatta.com/maharashtra-news/maratha-reservation-congress-… सगळी कामे केंद्र करु शकते तर मी म्हणतो राज्य सरकारे काय फक्त भाषणबाजी करायला आहेत काय ?

राज्य असो वा केंद्र, एखाद्या जातीला राखीव जागा देण्यासाठी ती जात मागास आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठे अत्यंत मागास आहेत हे सांगणारा गायकवाड आयोगाचा अहवाल अमान्य केलाय व मराठे मागास नाहीत असा निर्णय दिलाय. मग आता मोदी किंवा राष्ट्रपती त्यांना राखीव जागा कशा देणार?

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित ५०% ची मर्यादा रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेत संमत करून घेता येईल (परंतु आजच्या निकालावरून तो कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणे अत्यंत अवघड वाटते), परंतु ती मर्यादा वाढवूनही मराठे मागास आहेत हे कसे सिद्ध करणार?

जर पुढील २-३ दिवसांत जोरदार आंदोलन झाले तर ठाकरे सरकार टिकणे अवघड वाटते. नक्की कोणत्या (कु)मुहुर्तावर ठाकरेंनी शपथ घेतली होती ते समजत नाही, परंतु १७ महिन्यांपैकी पहिले ३-४ महिने सोडले तर उर्वरीत सर्व काळ त्यांना एकापाठोपाठ एक नवनवीन समस्या झेलाव्या लागत आहेत व त्यातच त्यांची पूर्ण दमछाक झालेली दिसत आहे.

In reply to by सुक्या

रडीचा डाव चिडी. हे सरकार आहे. केवळ कागदावर. यांना कसल्या योजना, ना कसली धोरणे. आरोग्य मंत्री सोडले तर इतर कोणालाच आस्तित्व नाहिय्ये असे दिसतय गृह मंत्रालय आणि वसुली मंत्रायलय हे राष्ट्रवादीचे स्वतंत्र अर्निंग खाते आहे. मुख्य मंत्री काय बोलतात हे त्यांचे त्यांना कळत असेल अशी आशा करतो.पण आदित्य ठाकरे हे काय बोलतात आनि काय करतात हे गुलदस्त्यात्च आहे. सध्या मंत्रीमंडळातील सदस्य आणि मंत्रीमंडळाबाहेरचे सुपरमंत्री राउत , प्रत्येकजण वेगवेगळे बोलतोय. प्रत्येकजण वेगळेच सांगतो. मुख्यमंत्री हे फील्डवर जाऊन काम करताहेत असे कधीच दिसले नाही. त्यांचा रीमोट राउतांकडे आहे की काकांकडे आहे ते अजूनपर्यंत समजायचं आहे. तोवर. हरी हरी हरी...... सामान्य माणसाची काय तक्रार आहे ते त्यालाच कळेनासे झालय आता

सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करून सर्वांना समान संधी द्यावी.>>> बापुसाहेबान्च्या या विधानाशी सहमत. भारतात योग्यतेनुसर सन्धी देणे ही शिस्त आणलीच पाहिजे तरच भारत पुढे येईल.

माजी केंद्रीय मंत्री, चरणसिंग यांचे सुपुत्र व राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले.

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे पुत्र अजितसिंग यांचे कोरोनामुळे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. ajit singh अजितसिंगांचे वडील चौधरी चरणसिंग हे देशाच्या राजकारणातील मोठे प्रस्थ होते. ते दोन वेळा काही महिन्यांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होत. बागपत आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात जाट मतदारांमध्ये त्यांचा दबदबा होता. तसेच १९७९ मध्ये २० दिवसांसाठी ते देशाचे पंतप्रधान होते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसची जबरदस्त मोठी लाट आली होती. तत्कालीन अविभाजित उत्तर प्रदेशातील ८५ पैकी तब्बल ८३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. उरलेल्या दोन जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या त्यातील एक जागा होती चौधरी चरणसिंगांची बागपत. तर असा जबरदस्त वारसा अजितसिंगांना मिळाला होता. तरीही ते चौधरी चरणसिंग हयात असेपर्यंत राजकारणात सक्रीय नव्हते. अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस करून अजितसिंग अनेक वर्षे अमेरिकेतच वास्तव्याला होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे ग्रीनकार्डही होते. तपासून बघायला हवे. चौधरी चरणसिंगांचे २९ मे १९८७ रोजी निधन झाले. त्या दरम्यान अजितसिंग भारतात आले आणि लोकदलाच्या चरणसिंग गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. लोकदलाचा दुसरा गट हरियाणातील देवीलाल यांचा होता. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यावर हे सगळे गट जनता दलात विलीन झाले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजितसिंग बागपतमधून लोकसभेवर निवडून गेले. त्या लोकसभा निवडणुकांबरोबरच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यात जनता दलाला बहुमत मिळाले. तेव्हा अजितसिंगांना खरं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे होते. पण नुकतेच पंतप्रधान झालेल्या विश्वनाथ प्रताप सिंगांनी अजितसिंगांऐवजी मुलायमसिंगांच्या मागे आपले वजन टाकले आणि मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. अजितसिंग केंद्रात वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री होते तरीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवल्यामुळे अजितसिंगांचा वि.प्र.सिंगांवर राग होता. नंतरच्या काळात अजितसिंगांनी राजकारणात जितक्या कोलांट्या उड्या मारल्या तितक्या क्वचितच कोणी मारल्या असतील. जानेवारी १९९२ मध्ये ते २० खासदारांसह जनता दलातून बाहेर पडले आणि स्वतःचा जनता दल (अजित) हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांच्या गटाचा नरसिंहराव सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा होता. तरीही नरसिंहराव सरकारविरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी जुलै १९९३ मध्ये आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा त्यांनी निर्णय घेतला आणि राव सरकार धोक्यात आले. तेव्हा रावांनी अजितसिंग गटाच्या ७ खासदारांना फोडले. त्यावेळी राव सरकार तरले त्यात या ७ खासदारांची मते महत्वाची होती. पण डिसेंबर १९९३ मध्ये अजितसिंगांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. या ७ पैकी रामलखनसिंग यादव या बिहारमधील ज्येष्ठ नेत्याला रावांनी फेब्रुवारी १९९४ मध्ये मंत्री केले पण स्वतः अजितसिंगांना मंत्री व्हायला फेब्रुवारी १९९५ पर्यंत वाट बघावी लागली. त्यावेळी त्यांना रावांनी अन्नमंत्री केले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून बागपतमधून निवडून गेले. पण दोनच महिन्यात त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा भारतीय किसान कामगार पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष ह.दो.देवेगौडांच्या संयुक्त मोर्चात सामील झाला. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच त्यांचा भाजपच्या सोमपाल यांनी बागपतमध्ये पराभव केला. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून राष्ट्रीय लोकदल असे ठेवले आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसबरोबर युती केली. ते १९९९ मध्ये बागपतमधून जिंकले. मात्र २००२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला फायदा व्हावा या उद्देशाने जुलै २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयींनी अजितसिंगांना कृषीमंत्री केले. २००४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षाशी युती केली आणि ते बागपतमधून लोकसभेवर निवडून गेले. २००९ मध्येही जिंकले. २०११ मध्ये त्यांनी त्यांचा पक्ष युपीए मध्ये सामील केला आणि ते मनमोहनसिंगांच्या मंत्रीमंडळात नागरी विमानवाहतूक मंत्री झाले. म्हणजे दिसून येईल की सोयीप्रमाणे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला असे संधीसाधू राजकारण त्यांनी केले. केंद्रात कोणीही पंतप्रधान असला तरी अजितसिंगांचे मंत्री अशी काहीशी स्थिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांची विश्वासार्हता कमी झाली. २०१४ पासून मात्र मोदीलाटेत त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा बागपतमधून पराभव झाला. त्याचवेळी त्यांचे पुत्र जयंत चौधरी मथुरेतून हरले. २०१९ मध्ये अजितसिंगांनी लोकसभा निवडणुक लढवली नाही पण जयंत चौधरी बागपतमधून राष्ट्रीय लोकदल या पक्षाचे उमेदवार होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांच्या युतीने त्यांना पाठिंबा देऊनही त्यांचा पराभवच झाला. असो. अजितसिंगांना श्रध्दांजली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस करून अजितसिंग अनेक वर्षे अमेरिकेतच वास्तव्याला होते. ते अमेरिकेत असताना आय बी एम या प्रख्यात संगणक कंपनीत काम करीत होते.

https://indianexpress.com/article/india/supreme-court-quashes-maharasht… Disapproving of the findings of the Justice M G Gaikwad Commission on the basis of which Marathas were classified as a Socially and Educationally Backward Class, the court said “the data collected and tabled by the Commission as noted in the report clearly proves that Marathas are not socially and educationally backward class”. In fact, “the Marathas are dominant forward class and are in the main stream of national life”. हे जर खरे असेल तर गायकवाड आयोगाने कोणत्या आधारावर मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याची शिफारस केली होती? हा अहवाल २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सरकारला दिल्यानंतर फडणवीसांनी तो कोणालाही वाचायला न देता तातडीने दुसऱ्या दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन बोलावून दोन्ही सभागृहात अहवालावर व राखीव जागा विधेयकावर एक सेकंदही चर्चा न करता अक्षरशः १५ सेकंदात एकमताने संमत करून घेऊन पुढच्या मिनिटाला सहीसाठी राज्यपालांकडे पाठविला होता. राज्यपालांनी तातडीने त्यावर सही करून विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले होते. तो अहवाल नंतर अनेक संघटनांनी तो अहवाल संपूर्ण प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. परंतु त्या अहवालात काही स्फोटक माहिती आहे व ती प्रसिद्ध झाल्यास सामाजिक अशांतता पसरू शकते, असे सांगून फडणवीसांनी फक्त आयोगाने केलेल्या शिफारशी सार्वजनिक केल्या. आयोगाने जमा केलेली माहिती, आकडेवारी, सर्वेक्षणात गोळा केलेला डेटा हे सर्व फडणवीसांनी प्रसिद्ध होऊन दिले नव्हते. असे का केले ते सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालावरून लक्षात येतंय. नंतर उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिल्यानंतर उच न्यायालयाने अहवालातील माहिती न तपासता फक्त कायदा करण्याची प्रक्रियाचा कायदेशीरपणा तपासून कायदा मान्य केला होता. परंतु शेवटी सर्वोच्च न्यायालयात भांडं फुटलंच. मराठे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या अजिबात मागास नसून ते सामाजिक वर्चस्व असलेली प्रगत जात आहे हे अहवालातील माहितीतून दिसत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात सांगितलंय. फडणवीसांनी मराठे मागास नाहीत व प्रगत आहेत, हे अहवालात दिसत असूनही तो सार्वजनिक न करता मराठे मागास आहेत असे खोटे सांगून १६% राखीव जागा देऊन अराखीव वर्गावर अन्याय केलाच आणि त्याबरोबरीने मराठ्यांचीही फसवणूक केली हे स्पष्ट आहे. या खटल्यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, मुकुल रोहटगी अशा मातब्बर वकीलांविरूद्ध झुंज देऊन, सामाजिक दडपण व धमक्यांचा सामना करून खटला जिंकणारे वकील गुणरत्न सदावर्ते अभिनंदनास पात्र आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

राजकीय अपरिहार्यता ( political compulsion) हे एकमेव कारण आहे कि श्री फडणवीसांनी घाईघाईने मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याचा घाट घातला. याच कारणा साठी सर्व च्या सर्व राजकीय पक्ष आज सुद्धा घटना दुरुस्ती करा श्री मोदींना साकडे घाला किंवा पुनर्विचार याचिका दाखल करा असे बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. श्री फडणवीस यांनी असे करण्याची कारणे -- एक म्हणजे "राजकीय हेतूने निघालेले मराठा तरुणांचे प्रचंड मोर्चे" याचा फुगा फुटला. दुसरे ३० % मराठा समाजाची व्होट बँक करून एकगठ्ठा मते मिळवण्याचा काकासाहेबांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. (सध्या ते मुस्लिम व्होट बँकेच्या मागे लागले आहेत) व्होट बँक सोडले तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतेही सबळ कारण नाही. जर आर्थिक निकषांवर द्यायचे ठरले तरी ते केवळ मराठा समाजाला कसे देता येईल? गरिबी चा शाप काही फक्त मराठा समाजाला आहे असे नाही तर सर्व जातीजमातींना आहे. महाराष्ट्रात कोणत्याही गावात जरी अगदी दोनच मराठा कुटुंबे असली तरी त्यांना काही दिवाभीतासारखी सर्वाना घाबरुन राहावे लागत नाही कि त्यांच्या वर जातीमुळे अत्याचार झाल्याची उदाहरणे नाहीत. तेंव्हा सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे असे कोणत्याही आधारावर म्हणता येणार नाही. Maratha community comprises 30 per cent of the population in Maharashtra and it cannot be compared to marginalized sections of the society, the Supreme Court has said as it stayed the implementation of 2018 state law granting reservation to them in education and jobs. https://www.financialexpress.com/india-news/30-of-maharashtra-populatio…. मराठा तरुणांना जर हे १६ टक्के आरक्षण मिळाले नाही तर नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा त्यांचे शिक्षण होणारच नाही असे एक वातावरण निर्माण केले जात आहे. त्यापासून मराठा तरुणांनि फारकत घेणे आवश्यक आहे आणि ५० % खुल्या वर्गात स्पर्धा करून आपली लायकी सिद्ध करणे आवश्यक आहे हे स्वतः समजणे आवश्यक आहे. कारण अत्यंत असाधारण स्थिती आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. असे त्यांना कोणताही राजकीय पक्ष सांगणार नाही. जो हे सत्य पक्ष सांगेल त्याच्याविरुद्ध इतर पक्ष रान उठवतील. कोणताही राजकीय पक्ष असलेल्या ५० % आरक्षणात जागा करून मराठा तरुणांना ५ % आरक्षण देण्याची गोष्ट करत नाही. कारण मग मागासवर्गीयांची व्होट बँक जाईल. प्रत्येक जातीचे पुढारी आणि राजकीय नेते हे अत्यंत स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचे आहेत हि वस्तुस्थिती. मेरा भारत महान

In reply to by सुबोध खरे

मुळात किती जणांना आरक्षण खरोखर हवंय हा प्रश्नच आहे. ज्या ज्या मराठा लोकांशी मी बोललो त्यांना मुख्य आक्षेप हा बाकीच्या आरक्षणावर (SC, ST, OBC) आणि त्यामुळे मराठा तरुणांना शिक्षणात/नोकरीत संधी न मिळणे हा आहे. पण हा प्रश्न सर्वच सवर्ण जातींचा आहे. माझ्या अंदाजाने हा प्रश्न ग्रामीण भागात मराठा जातीचे वर्चस्व कमी होणे आणि आरक्षित जातींचे वर्चस्व वाढणे याच्याशी संबंधित आहे. हा प्रश्न मुख्य करून सामाजिक वर्चस्वाचा आहे, आर्थिक नव्हे. फक्त आरक्षणाच्या पासिंगसाठी त्याला आर्थिक जोड दिली जातेय. त्यामुळे सर्वच स्तरावर - आर्थिक आणि सामाजिक स्तरावर याचं कुणीच समर्थन करू शकत नाहीये. मराठ्यांना आरक्षण का दिले जावे याचे उत्तर आर्थिक दृष्टीने दिले जातंय ज्याच्यावर आरक्षण मिळणे निव्वळ अशक्य आहे. फक्त संख्याबळावर ("मी म्हणतो म्हणून") आरक्षण देता येते पण कोर्टात ते टिकणे शक्य नाही.

In reply to by पिनाक

मुळात किती जणांना आरक्षण खरोखर हवंय हा प्रश्नच आहे. ज्या ज्या मराठा लोकांशी मी बोललो त्यांना मुख्य आक्षेप हा बाकीच्या आरक्षणावर विचार कारण्यासारखेच मुद्दे पिनाकजी जर सहज जमल तर त्या मित्रानं हे हि विचारा कि .. असे आरक्षण मागतांना आपण क्षत्रिय वंशाचे आहोत , शिवाजी महाराजांच्या जातीचे आहोत मग असे मागणे शोभते का? कारण सर्व मोर्चात महाराजन्चे चित्र सगळे पुढे केलं जायचे .. बर सामाजिक सामन्ता हि काही ३.% टक्य्यांनीच केली असे कसे म्हणता येईल.. गावातल्या दलितांवर अन्याय काय फक्त "जानव्यान्नी" केला "मिशी पिळणार्या पाटलाने" नसेल केला? मराठा समाजाकडे संख्या, शेती, आणि सहकार आणि शिक्षण वयवसाय हे आहे .. मग आरक्षण का?

In reply to by चौकस२१२

बर सामाजिक सामन्ता हि काही ३.% टक्य्यांनीच केली असे कसे म्हणता येईल.. गावातल्या दलितांवर अन्याय काय फक्त "जानव्यान्नी" केला "मिशी पिळणार्या पाटलाने" नसेल केला?
लहानपणापासून जेव्हा आपण गोष्टी ऐकतो तेव्हा तेव्हा एका गावात एक गरीब ब्राम्हण होता असेच ऐकतो. ब्राम्हणांच्याकडे सैनिकी, राजकीय आणि आर्थिक सत्ता कधी होती हे जाणून घ्यायला आवडेल. कारण माझ्या मते इतिहासात कधीच ब्राम्हण हे प्रबळ ग्रुप नव्हते. हं, ते कदाचित स्वार्थी असतील, कपटी असतील पण संपूर्ण समाजावर अन्याय करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती का? अगदी चाणक्याच्या काळात सुद्धा ब्राम्हण उच्च पदावर होतेच (मंत्रीगण), पण तसे तर बाकीच्या समाजातले लोक पण होतेच (उदा: सेनापती, अश्वशाळाप्रमुख इ.). मुळात ज्यांचा मुख्य व्यवसाय भिक्षुकी आणि अध्ययन, अध्यापन आणि लिखापढी शी संबंधित होता त्यांना बळाद्वारे सगळ्या समाजाला वेठीस धरण्याची क्षमता असणे कसे शक्य होते. माझ्या अंदाजाने सगळ्या जातींची उतरंड ही त्या त्या समाजाने आपल्या क्षमतेनुसार आणि बळानुसार दुसऱ्या समाजाशी व्यवहार करताना ठरवलेली स्वमर्यादा होती. आणि या उतरंडीला फक्त ब्राम्हण जबाबदार नव्हते. बाकीच्या OBC जाती या एकमेकांवर अन्याय करत नव्हत्या का? त्यांचे आणि मराठ्यांचे, मराठ्यांचे आणि SC, ST जातींचे संबंध हे सलोख्याचे होते का? खरं सांगायचं तर मराठा ही निर्विवादपणे राज्यकर्ता जमात होती आणि ब्राह्मणांना ते खपवून घेत असावेत इतकंच. ब्रह्मणांशी त्यांचे संबंध बहुतांशी सलोख्याचे असावेत (for obvious reasons) पण इतर जाती या मराठ्यांच्या वर्चस्वाखाली जगत असाव्यात. आधुनिक काळात मात्र असं भासवलं जातं की ब्राम्हण हे दंडुकीच्या बळावर प्रबळ झाले होते. जर सगळे ब्राम्हण सध्या जमीनजुमला पैसे राखून असते तर यात कदाचित सत्य आहे असं मानलं ही असतं पण सध्या तो कोणाकडे आहे? मराठा आणि काही प्रबळ ओबीसी जातींकडे. बाकी माझा आर्थिक आरक्षणाला विरोध आहे, सामाजिक आरक्षणाला नाही. अर्थात सामाजिक आरक्षण किती वर्षे असावे हे ठरवायलाच हवं. तळागाळातल्या समाजाला उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवं पण ते होताना दिसत नाही. त्याबद्दल वेगळी निती अमलात आणायला हवी कारण आता सरकारी नोकऱ्या संपत आल्या आहेत आणि ही सगळी मारामारी अगदी थोड्या जागांसाठी आहे. याचा यापुढे कुणालाच फारसा फायदा होण्यासारखा नाही. मराठा आरक्षण आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या दोन्ही गोष्टी मूर्खपणाचा कळस आहेत आणि दोन्हीना फारसे भवितव्य नाही.

https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-ats-team-arrest-two-fo…मुंबईमधून सात किलो युरेनियम जप्त जर का काही अनहोनी घटना घडली असती तर मुंबई नागासाकी सारखी क्षणात बेचिराख झाली असती.

In reply to by सुरसंगम

:-) यावर आता एखादा सौदिंडीयन पिक्चर (युरेनियम नं 1) यायची वाट पहायला हवी. तिथे कसं एखादा शेतकरी हिरो हार्ट च operation पण करू शकतो तसं शेतातच अणुबॉम्ब बनवून शेतकरी कायद्यांच्या विरोधात पूर्ण दिल्ली/मुंबई ला वेठीला धरून .... जाऊदे. बाकीचं रामगोपाल वर्मा ठरवेलच.

In reply to by पिनाक

युरेनियम ची चोरी हा बातमी वाचुन मिपावर बोका e आझम यांची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी रहस्यकथा आठवली. http://misalpav.com/node/37865

गांधी-नेहरू परिवाराने जी व्यवस्था निर्माण केली त्यामुळेच देश आज चाललाय - शिवसेना हे वाचून धन्य झालो.

शिवसेनेसारखे काम इतर पक्षांना न जमल्याने इतर राज्यात चिता पेटल्या आहेत - राऊत महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या १० टक्के. भारतात कोरोनामुळे रोज होणाऱ्या ४००० मृत्युंपैकी जवळपास २५ टक्के मृत्यु महाराष्ट्रात होताहेत. भारतात रोज सापडणाऱ्या ४ लाख कोरोना रूग्णांपैकी १६-१७ टक्के महाराष्ट्रात सापडताहेत. लाज, शरम, खंत, मूर्खपणा, बिनडोकपणा हे शब्द सुद्धा आज लाजले असतील. https://m.lokmat.com/mumbai/sanjay-raut-praises-shiv-sena-and-cm-uddhav…

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्र राज्यात करोनाचे बळी, ही केंद्राची जबाबदारी... किंवा महाराष्ट्र राज्यात जे काही वाईट घडतंय, ही केंद्राची जबाबदारी ....