मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.

वाचने 47844 वाचनखूण प्रतिक्रिया 167

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 19/03/2021 - 11:31
कसलं लेखी आश्वासनाचं भंपक गारुड उभं करताय. १९४७ साली घटनेच्या ४४ व्या कलमात the State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code (UCC) throughout the territory of India.” The desirability of a uniform civil code is consistent with human rights and the principles of equality, fairness and justice. असं स्पष्ट लिहिलंय. तुमचं लाडकं काँग्रेसचं सरकार ७० वर्षांपासून त्याबद्दल काय करतंय? का तेवढं तुम्हाला सोयीस्कर विस्मरण होतं?

In reply to by आग्या१९९०

मागच्याच वर्षी, कोकणातील शेतकरी वर्गाने, दलाल न घेता, आंबे योग्य भावांत विकले... दलालांचे उच्चाटन होत असल्याने, काही लोकं ह्या कायद्यांना विरोध करत आहेत.... दलाल कसे लुटतात, हे बघायचे असेल तर, घाऊक मार्केट मध्ये चक्कर टाका...

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 19/03/2021 - 11:25
हमीभाव देण्याचे लेखी आश्वासन देता येत नसेल कोण सरकारवर विश्वास ठेवेल? कसलं लेखी आश्वासनाचं भंपक गारुड उभं करताय. १९४७ साली घटनेच्या ४४ व्या कलमात the State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code (UCC) throughout the territory of India.” The desirability of a uniform civil code is consistent with human rights and the principles of equality, fairness and justice. असं स्पष्ट लिहिलंय. तुमचं लाडकं काँग्रेसचं सरकार ७० वर्षांपासून त्याबद्दल काय करतंय? का तेवढं तुम्हाला सोयीस्कर विस्मरण होतं?

मराठी_माणूस 18/03/2021 - 16:37
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-high-court-mumbai-pune-expressway-toll-naka-cag-sgy-87-2423555/ ही सखोल चौकशी होइल का ? त्यातुन सामान्यांचा त्रास कमी होइल का ?

डॅनी ओशन 18/03/2021 - 16:55
मिपासरकारला न्हीवेदण आहे की शिरिगुरुजी, बाप्पू इ. खास आयड्यांना "मुवि कमेंट" चे add in द्यावे. मुवींच्या टंकण्याचा तरास वाचंल. खालील प्रमाने असू शकतात- -शेतकरी असे करणार नाही -हे शेतकरी असूच शकत नाहीत - हि साधीच गोष्ट आहे - घराणेशाही - खलिस्तान समर्थन आणि काय स्पेसिफिक किवर्ड हिट होत नसल्यास -राहुल गांधींचे समर्थक असाच... अशेच साधेसुधे वन लायनर ज्यांना add in सुविधा आहे त्यांच्या प्रतिसादखाली आपोआप चिकटायला पायजेत. १८८ प्रभूंना सुद्धा हि सुविधा द्यायाला पायजे, पण तिथे मुविकमेण्ट म्हणून डायनॅमिक लिखान लागणार, ते काय खुद्द मुविंशिवाय कोणाला जमायचं नाय.

गामा पैलवान 18/03/2021 - 21:30
श्रीगुरुजी, हे आणि ते दुसरे कोविड तज्ज्ञ या दोघांचे प्रतिसाद वाचणे बंद केले तर वैताग येणार नाही. हे ते दुसरे कोविड तत्ज्ञ म्हणजे मी का? तसं असल्यास मी तुमच्याशी सहमत आहे. माझे प्रतिसाद फारसे वाचनीय नसतात हे मलाही मान्य आहे. करोनाची दुसरी बाजू समजावून देणारा कोणी जाणकार सापडतोय का, ते मी ही शोधतोय. जोवर असा कोणी सापडंत नाही तोवर माझ्यासकट सर्वांनाच माझी टकळी चालवून घ्यावी लागणार. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Rajesh188 18/03/2021 - 22:31
असणारे वेगळा विचार करू शकत नाहीत. ते मळलेल्या वाटेने च जाणार. माणसाला चौफेर विचार करता आला पाहिजे पण प्रवाह विरूद्ध कोणी जाण्याची हिम्मत करत नाहीत.. वेगळा विचार असला त्तरी त्याला न नाकारता त्या वर विचार व्यक्त झालेच पाहिजेत.मग ते चूक आहेत की बरोबर ते नंतर माहीत पडेलच. आणि गा. मा जी ती हिम्मत तुमच्यात आहे.. तुम्हाला माझा पाठिंबा आहे.
मोदीजी लॉर्ड अँड सेव्हियर आहेत हे दोहो पंथांना मान्य. फडणवीस संत नाहीत म्हणणारे प्रोटेस्टंट. प्रोटेस्टंट व्यक्तीला ताबडतोब इतर हिथन्स (अंध विरोधक.) मध्ये गणले. - (हिथन) डॅन.

In reply to by डॅनी ओशन

बिटाकाका 19/03/2021 - 22:48
फरक एवढाच आहे की अंधविरोधक हे काही फक्त मोदी फडणवीसांच्याच संदर्भात नाहीयेत, ते अगदी राहुल गांधी, ठाकरे, पवार सगळीकडेच आहेत. त्याशिवाय 'आलू टू सोना' चे लोढणे इतके दिवस रागांच्या गळ्यात नसते टाकले गेले. अर्थात, अंध शब्द आला की तो भाजप आणि मोदींशी जोडणारे 'खूपच' डोळस असतात ही एक गंमतच आहे.

मुक्त विहारि 19/03/2021 - 07:06
विव्वळवेढेत पाण्यासाठी डबक्याचा आधार... https://www.loksatta.com/maharashtra-news/water-problem-pits-in-the-field-for-water-akp-94-2424054/

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 19/03/2021 - 13:29
फडणवीस होते तेव्हा हा प्रश्न होताच.मुंबई ची तहान भागवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या त्यांची अवस्था बिकट आहे पण कोणतेच राजकीय पक्ष त्यांच्या वरचा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. सर्व एका माळेचे मणी आहेत.