केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील.
याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा.
५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६
या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही.
२०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे.
आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे.
पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे.
एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल.
हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज -
https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-ben…
तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते.
दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे.
आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे.
केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते.
आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.
तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.
आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार
आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.
वाचने
53086
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे, लिंक चुकली.
जिथे जिथे
तामिनाडूमधील bjp ची अवस्था
बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती
फारच थोडी शक्यता
In reply to बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती by आनन्दा
समजा बंगाल आणि केरळ दोन्ही
In reply to फारच थोडी शक्यता by चंद्रसूर्यकुमार
केरळमध्ये द्विआघाडीय लढत
In reply to समजा बंगाल आणि केरळ दोन्ही by आनन्दा
नाही
In reply to समजा बंगाल आणि केरळ दोन्ही by आनन्दा
माहितीपूर्ण धागा.
मोदींच्या मिळणार्या सभांना
In reply to माहितीपूर्ण धागा. by बापूसाहेब
महाराष्ट्रातही मोदींच्या
In reply to मोदींच्या मिळणार्या सभांना by रात्रीचे चांदणे
महाराष्ट्र आणि बंगाल ह्यांची
In reply to महाराष्ट्रातही मोदींच्या by श्रीगुरुजी
भाजपला जनतेने नाकारल्यामुळे
In reply to महाराष्ट्रातही मोदींच्या by श्रीगुरुजी
Bjp चे
२०११ मध्ये अत्यंत चुरशीची लढत
बंगालमध्ये सुद्धा त्रिशंकू
अरे देवा..
In reply to बंगालमध्ये सुद्धा त्रिशंकू by चौथा कोनाडा
सरबानंद सोनोवालांना शुभेच्छा
सोनोवालांचा पुढचा मार्ग
In reply to सरबानंद सोनोवालांना शुभेच्छा by चंद्रसूर्यकुमार
नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी.
काही बंगाली हिंदू मंडळींना विचारले ....
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
केवढी ती महान बुध्दी मत्ता
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
ममतादीदीच त्या..
In reply to नंदीग्राम - ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी. by जॅक द रिपर
दोन वेगळ्या गोष्टी
In reply to ममतादीदीच त्या.. by अनन्त अवधुत
नंदीग्राम मतदारसंघ भाजपचा नव्हताच.
In reply to दोन वेगळ्या गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
नवीन पटनायक
In reply to दोन वेगळ्या गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
आता दुसरा सक्षम पर्याय
तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे....
In reply to आता दुसरा सक्षम पर्याय by जॅक द रिपर
हिंदू नी BJP ल मत का द्यावीत
In reply to तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे.... by मुक्त विहारि
हिंदूनी भाजपला का मतं देऊ
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
डोळ्यावरची झांपड काढा
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
प्रधानमंत्री आवास योजनेत
In reply to हिंदू नी BJP ल मत का द्यावीत by Rajesh188
+१
In reply to प्रधानमंत्री आवास योजनेत by अनिरुद्ध.वैद्य
मुवि..
In reply to तेच तिथल्या हिंदूंना हवे आहे.... by मुक्त विहारि
गणेशा, थोडा विचार करा
In reply to मुवि.. by गणेशा
आनंदा,
In reply to गणेशा, थोडा विचार करा by आनन्दा
एका हिंदू व्यक्ती नी जरी कबूल केले
प्रतिसाद संपादित.
In reply to एका हिंदू व्यक्ती नी जरी कबूल केले by Rajesh188
प्रतिसाद संपादित.
In reply to प्रतिसाद संपादित. by सुक्या
गुरुजी,
काही आयाराम तृणमूल सोडून
In reply to गुरुजी, by गणेशा
Ok, म्हणजे यावेळेस bjp मध्ये
In reply to काही आयाराम तृणमूल सोडून by श्रीगुरुजी
आयारामांची व्याख्या काय तुमची
In reply to काही आयाराम तृणमूल सोडून by श्रीगुरुजी
भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९
In reply to आयारामांची व्याख्या काय तुमची by बिटाकाका
याव्यतिरिक्त राहुल कुल (रासप)
In reply to भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९ by श्रीगुरुजी
पैकी, मंदा म्हात्रे, समीर
In reply to भाजपमध्ये साधारणपणे २०१८-१९ by श्रीगुरुजी
अपेक्षित जागा न मिळाल्याने
काँग्रेसचं मिशन प. बंगाल! स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर
भाजपला जोरदार हादरा
ते मुळचे बंगाली नाहीत, पण...
In reply to भाजपला जोरदार हादरा by श्रीगुरुजी
यशवंत सिन्हा
In reply to भाजपला जोरदार हादरा by श्रीगुरुजी
मला एक समजत नाही की,
In reply to यशवंत सिन्हा by चंद्रसूर्यकुमार
काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे
In reply to मला एक समजत नाही की, by मुक्त विहारि
माझ्या माहितीत साधारण पणे 500-600 माणसे आहेत
In reply to काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे by Vichar Manus
यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा
In reply to यशवंत सिन्हा by चंद्रसूर्यकुमार
तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १
तामिळनाडू बद्दल छान माहिती मिळाली...
In reply to तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १ by चंद्रसूर्यकुमार
अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय
In reply to तामिळनाडूचा राजकीय इतिहास- भाग १ by चंद्रसूर्यकुमार
फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली
In reply to अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय by श्रीगुरुजी
त्यांनासुद्धा दुर्बुद्धी
In reply to फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली by बिटाकाका
माझ्या मते कारण
In reply to फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली by बिटाकाका
पुण्यातही २ जागा गेल्या.
In reply to माझ्या मते कारण by चंद्रसूर्यकुमार
तुमच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे.
In reply to माझ्या मते कारण by चंद्रसूर्यकुमार
पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून
In reply to तुमच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे. by बिटाकाका
पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून फडणवीसांनी ५ वर्षे ज्या कुशलतेने कुठल्याही वादात न सापडता, विरोधकांनी केलेले अनेक प्रयत्न हाणून पाडले हे वाखाणण्याजोगे होते.भ्रष्ट विरोधकांशी तडजोड करणे, स्वपद टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंना खुश ठेवून त्यांची प्रत्येक मागणी मान्य करणे व ते करताना राज्यहिताचा व पक्षहिताचा बळी देणे, मताधार वाढविण्यासाठी लांड्यालबाड्या करून पारंपरिक समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांचे नुकसान करणे, पक्षस्थापनेपासून पक्षाबरोबर असलेल्या व पक्ष वाढविलेल्या सहकाऱ्यांना खोट्या प्रकरणात गु़ंंतवून त्यांचा काटा काढणे अशा मार्गांनी त्यांनी सत्ता टिकविली होती. परंतु शेरास सव्वाशेर भेटतोच. तसा त्यांनाही भेटला. म्हणूनच चिडचिड सुरू आहे.आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ज्या प्रमाणे, सरकार ऐवजी विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडणारा त्यांचा आवेश पाहिल्यानंतर मला तरी नक्की वाटते की महाराष्ट्र भाजप ला फडणवीसांशीवाय पर्याय नाही.यांचा आवेव पाहून हसू आवरत नव्हते. "नाही, नाही, नाही. भाजप कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही. एकदा नाही, त्रिवार नाही." असे त्यांनीच २०१४ मध्ये आवेशात सांगितले होते. "आम्ही सत्तेत आलो की अजितदादा तुरुंगात चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग" हे सुध्दा सांगताना जोरदार आवेश होता. पण मग २०१९ मध्ये ती आश्वासने, तो आवेश कोठे गेला होता? ____________________ हे कायप्पावर आलेले ढकलपत्र . . . फडणवीसांनी काल विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं? - गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं? - स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. त्यानंतर काय झालं? - हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी करायचे. त्यानंतर काय झालं ? - २०१४ मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतले, विधानपरीषदेतून आमदार केले आणि आता ते विधानपरीषदेत भाजपचे विरोधी पक्षनेता आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना मामुनीं शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली. नंतर आधी हाय कोर्ट मग सुप्रीम कोर्ट ने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. - याच सभागृहात कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं ? - विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर च्या घोटाळ्याची कागद नाचवली. पण स्वता मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये अस प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण(?) भाषण केलं, त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २०१४ पूर्वी ठीक होतं. पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी मी करत आकांडतांडव करत आहेत. ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.तुम्ही चक्क तुमचा विरोध
In reply to पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून by श्रीगुरुजी
तुम्ही चक्क तुमचा विरोध
In reply to तुम्ही चक्क तुमचा विरोध by बिटाकाका
तुम्ही चक्क तुमचा विरोध दर्शवण्यासाठी (किंबहुना त्याला कुरवाळण्यासाठी) कायप्पावरील बिनबुडाचे मेसेजेस पुढे ढकलत आहात यातच बोलणे खुंटले.वरील कायप्पा संदेशातील कोणते आरोप बिनबुडाचे आहेत ते सांगा.कसलाही आधार नसलेली ही वाक्ये, तुमचा फडणवीस विरोध हा साधारणपणे, मोदींविरोधकांच्या अंधविरोधाच्या लेवल ला पोहोचला आहे असे प्रामाणिक मत नोंदवतो आणि खाली बसतो. तुमच्यासारखा अभ्यासू व्यक्तित्व याचा शांतपणाने विचार करेल अशी अपेक्षा करतो.ही सर्व वाक्ये वस्तुस्थिती आधारीत आहेत. यातील कोणत्या वाक्याला आधार नाही ते सांगा. मी कायमच भाजपसमर्थक होतो व आहे. मी फडणवीसांचा २०१६ पर्यंत कट्टर समर्थक होतो. परंतु त्यांनी २०१७ पासून घेतलेल्या निर्णयांमुळे चीड येत गेली व व पर्यवसान विरोधात झाले. मी कोणाचाही अंधभक्त नाही किंवा अंधविरोधक नाही.उलटी गंगा नही बहेगी. तुम्ही
In reply to तुम्ही चक्क तुमचा विरोध by श्रीगुरुजी
पहाटेचा तो अगत्म्य सोहळा
In reply to पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून by श्रीगुरुजी
त्या दीड दिवसांत काय झाले?
In reply to पहाटेचा तो अगत्म्य सोहळा by चौकस२१२
नक्की समजेल.
In reply to त्या दीड दिवसांत काय झाले? by मुक्त विहारि