Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 06/02/2021 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल. ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni… आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.

वाचने 50586
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

जिथे राजकारण तिथे पवार , त्यात नवीन ते काय? ते तर अंगाला तेल लावून बसले आहेत. देशाचे सार्वभौमत्व रिहानाने कसे धोक्यात आणले हे सचिन कसे पटवून देणार ?

शहाचा मुलगा किती क्रिकेट खेळलाय ?

In reply to by काळे मांजर

त्याने कधी कोणाला (फालतू) सल्ला दिलाय? (ते ही न मागता)

In reply to by सॅगी

शहांच्या भेटीची, काही याचक वाट बघत असतात... शहांनी, हिंग लावून विचारले नाही की, त्यांच्याच नावाने, गळे काढतात...

In reply to by सॅगी

पवारांनी सचिनसारख्या महान खेळाडूला शहाजोगपणे, त्याने न मागितलेला, "लोका सांगे ब्रह्मज्ञान" टाईप सल्ला देऊन स्वत:चं हसं करून घेतलंय.

In reply to by सॅगी

आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. असे लिवले आहे वर म्हणून मी शहाच्या मुलाबद्दल विचारले

In reply to by मुक्त विहारि

ब्लॅक कॅट, कागलकर, gk, तर्राट जोकर, मोगा इ सर्व रूपे यांचीच. बाकी काही नाही. पण यांच्याकडे पाहून पुनर्जन्मावर माझा विश्वास पक्का झाला.

अमेरिकेत जाउन "अब की बार ट्रम्प सरकार" म्हणणार्याना लोकानी अमेरिकेच्या कारभारात ढवळाढवळ केली असे कोणी म्हणाले का ? मग रिहाना का कोणी शेतकर्यांबद्दल काही बोलली तर एवढे चिडायचे कारण नव्हते असे आमचे मत. अनुल्लेखाने मारण्याऐवजी लगेच खलिस्तानी/पाकिस्तानी उपमा देउन हसे करून घेतले. रिहाना पाकिस्तानचा ध्वज घेउन उभी आहे असे एक फोटो-शॉप केलेला एक फोटो आला. मग तिने तसे ट्विट करण्यासाठी कितीतरी कोटी घेतले एका कॅनडियन संस्थेकडुन अशीही बातमी आली. शेंडा बुडखा नसलेल्या ह्या बातम्या कोण प्रसिद्ध करते ? ह्याने आपण स्वतःचेच हसे करुन घेत नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अब की बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वतःच्या प्रचारात वापरले होते. मोदींनी नोव्हेंबर २०२० मधील निवडणुकीच्या १४ महिने आधी आपल्या ७५ मिनिटांच्या भाषणात फक्त एकदा या वाक्याचा संदर्भ दिला होता. परंतु असा प्रपोगंडा केला जातोय की मोदींनी ट्रंपच्या निवडणुकीच्या अनेक प्रचारसभेत भाषणे करून ट्रंपना पाठिंबा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

दारू , सिगारेटसारख्या उत्पादनांची ' सरोगेट जाहिरात 'करतात तसला प्रकार वाटतो" अब की बार ट्रंप सरकार " .

In reply to by आग्या१९९०

सरकारी योजनांच्या जाहिरातींंवर सरकार प्रमुखाचे चित्र असतेच. ही उच्च परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. सध्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींंवर उद्धव, पवार व थोरात या तिघांची चित्रे असतात.

In reply to by श्रीगुरुजी

वाटलंच नको ते बघाल . जाहिरातीत ठळक अक्षर केलेले दिसणार नाहीच तुम्हाला , त्यालाचा सरोगेट जाहिरात म्हणतात . Bagpiper सोड्याच्या जाहिरातीत धम्रेंद्र किंवा शत्रुघ्न सिन्हा असल्याने ती सरोगेट जाहिरात होत नाही , उत्पन्नाचे नावसार्धम्य बघितले जाते.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या पक्षाचे नाव आणि आपली छबी ठळकपणे दिसेल ह्याची काळजी ते घेतात. आम्हाला डोळे आहेत म्हणून ते दिसते. ज्यांनी आपल्या डोळ्यांच्या खाचा करून घेतल्या त्यांना नाही दिसत.

In reply to by आग्या१९९०

एकदा मोदीद्वेषाचा किंवा भाजपद्वेषाचा चष्मा नेत्रांवर चढविला की सर्वत्र जळीस्थळीकाष्ठीपाषाणी तेच दिसायला लागतात. सोनिया गांधी पंतप्रधान असताना एकदा विमानात दिलेल्या चहाच्या कपावर कमळसदृश फुलाचे चित्र दिसल्याने रेणुका चौधरींचा संताप अनावर झाला होता. हे भाजपचे कारस्थान आहे असे त्यांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले होते. त्याच काळात मध्य प्रदेशात एका तलावात फुललेली कमलपुष्पे पाहून प्रियांका वड्रांचा संताप अनावर झाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांच्या मतदारांना दोष काय देणार? बहुदा यांच्या घरात, कमळावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो नसावा ...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अनुल्लेखाने मारण्याऐवजी लगेच खलिस्तानी/पाकिस्तानी उपमा देउन हसे करून घेतले.
म्हणूनच माई तुम्ही, राजेश१८८, काळे मांजर वगैरेंना यापुढे अनुल्लेखाने मारून आमचे हसे करून घ्यायचे नाही असे ठरवले आहे.

चक्का जाम आंदोलनाला देशात इतर राज्यात काय प्रतीसाद मिळाला ते कुणी सवीस्तर सांगेल काय? उत्तरेत २/३ राज्ये सोडली तर फारसे काही झाले नाही असे ऐकण्यात आले. न्युज पेपर मधे पण फारसे काही मिळाले नाही. काल नागपुर मधे काही (१०/२०) लोक रस्त्यात उभे होते. रेपोर्टेर ने विचार्ल्यावर १०-१५ मिनीट रुको सब आ जायेंगे असे बोलत होते. बहुतेक सगळे एका पंथाचे लोक होते. त्यात मला तरी शेतकरी दिसला नाही.

In reply to by सुक्या

काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत जास्त लोक असतात आणि सत्यनारायणाच्या पूजेला पंगतीला जास्त लोक असतात. चक्का जाम फक्त ३ तास चालले ह्यावरून समजते.

In reply to by मुक्त विहारि

संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास दलालच नाही. कोकणातले शेतकरी पेढ वाटताना दिसले नाही , मग ते खूष आहे हे कसे समजायचे ?

In reply to by आग्या१९९०

आमची देवगडमध्ये आंब्याची बाग आहे. एपीएमसी मार्केटला दलालाकडे माल टाकून तो जी देईल ती पट्टी डोक्याला लावून आम्ही दिवस काढतो. पेटीला हजार बाराशे भाव हा फक्त वर्तमानपत्रात वाचायला मिळतो, प्रत्यक्षात हातात कधीच नाही

In reply to by आग्या१९९०

पेढे वाटलेच पाहिजे का? तीन तलाक मोडीत निघून बराच काळ गेला, म्हणून मुस्लिम महिला जोखडातून बाहेर पडल्या काय? एकतर मोदींफोबियाने त्रस्त होऊन काहीही बरळायायचे , आणि कुणी मुद्देसूद चपराक लावल्यावर आयडी बदलून वेळ मारून न्यायची , असे खेळ बंद करून काहीतरी नवीन मांडा.

In reply to by भंकस बाबा

आजच एका मुरबाड मधील शेतकरी मित्रा बरोबर बोललो.... दलालांच्या नादी न लागता, तो एका व्यापारा बरोबर, contract farming करणार आहे... त्याच्या मते, दलालांपेक्षा 20% रक्कम जास्त आणि ती देखील, पीक तोड झाली की जागेवर ... सगळा खर्च व्यापारी करणार ... 3 वर्षे ते 5 वर्षे, ह्या काळापुरतेच... बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत ...

In reply to by मुक्त विहारि

आदिवासींना, गरीब कुणब्यांना आतापर्यंत कुठल्याच सरकारने १००% आर्थिक मदत केली नाही,त्यामुळे हे सिंधी व्यापारी बरे असे म्हणावे लागते.

In reply to by आग्या१९९०

पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच आहे. बिहार उत्तर प्रदेश मधून ही मंडळी ८०० रुपयांत निकृष्ट तांदूळ पंजाब मध्ये आणतात आणि भारत सरकारच्या FCI ला २००० रुपयांच्या हमीभावावर विकतात. ह्या गोरखधंद्याने FCI चे दिवाळे निघाले आहे २५०,००० कोटींचे कर्ज आणि त्यावर ८% व्याज ते भरत आहेत. त्याशिवाय सरकारी गोदामांत गरजेपेक्षा दुप्पट भात सडत आहे. खरे तर फुकटे हा शब्द सुद्धा ह्यांच्यासाठी स्तुती आहे. हे लोकांच्या पैश्यावर चंगळ करणारे नाग आहेत. इतर कुठल्या राज्यांत "राईस स्मगलिंग" हा प्रकार असतो ? (गुगल वर शोधा).

माझा 10 वर्षांचा पोरगा ते पॉर्न स्टार म्हणजे काय असते असे विचारून राहलाय! आता त्याने उद्या ऑनलाइन शाळेत हा प्रश्न नाही विचारला म्हणजे मिळवली. सध्या घरातले वायफाय बंद करून ठेवले आहे, हरामखोराने गुगलले तर आमच्या डोकीवरचे उरलेसुरले केस भस्म व्हायचे

In reply to by काळे मांजर

पॉर्नस्टार उद्या आध्यत्मिक गुरू बनले तर तुम्ही टाळ घेऊन हजर रहाणार? युरोप, अमेरिकेचे ठीक आहे हो, आपल्या देशात संस्कार थोडेफार शिल्लक आहेत काही कुटुंबात!

In reply to by भंकस बाबा

गुगलून झालंही असेल . तो तुमचीच परीक्षा घेत असेल. ह.घ्या. असे अश्मयुगात मुलांना ढकलू नका. उद्या सरकारने नागरीकांच्याबाबतीत असं केलं तर कुठल्या तोंडाने निषेध कराल ?

In reply to by Ujjwal

mk मिया खलीफा किसान परिवार की सदस्य थी, उत्तर प्रदेश के हरदोई में उनका बड़ा खेत था वहा वो गेहूं ,चावल और आम,तरबूज़ की खेती किया करती थी। पर गरीब होने के कारण गांव का मुखिया जॉनी सिंस उनका शोषण किया करता था । आम और तरबूज कौड़ियों के भाव में ले जाता था। लेकिन मिया खलीफा ने हार नहीं मानी। उसने कड़ी मेहनत की और उसने अपनी फसल अमेरिका से लेकर जापान तक बेची। आज सर्वोत्कृष्ट फोर्ब्स की लिस्ट में वो 87 नंबर पर है। मियां खलीफा ने कृषि से इतनी शोहरत औऱ दौलत कमाई है कि उनके गाँव का मुखिया जॉनी सिंस आज उनके घर प्लंबर का काम करता है। आज वो मिया खलीफा संघर्ष समिति की आजीवन अध्यक्ष है। किसानों के लिए किया गया उनका संघर्ष सुनहरी स्याही से लिखा जाएगा।:p

In reply to by Ujjwal

मिया ताईंचे आंदोलनातले भाषण. सामनेवाले लोग अलग अलग रूप मे आते थे.. कभी डॉक्टर, कभी टीचर, कभी प्लंबर, कभी बॉस.. सभी लोगो ने मुझे मुझे हर तरीके से तोडने कि कोशिश कि... मैने कभी भी उनके सामने हार नही मानी. लेकिन मै ठेहरी सच्चे किसान कि बेटी. जब से समझ आयी है तब से मरे हाथ मे सिर्फ हल है.. आज भारत मे किसान कि दुर्दशा देखकर मेरा जी पाणी पाणी हो गया क्योकी मै मै एक सच्ची किसान हूं... मैने कभी भी अपना और खेती का दामन नही छोडा. सिर्फ और सिर्फ मेहनत पर विश्वास रखा. हल चलाना और खेत कि जुताई करना मुझसे बेहतर किसी को आता भी है?? मेरी इसी मेहनत के दम पर मै आज हर युवा के लिये प्रेरणा हूं.. जब भी कोई युवा अंदर से टूट जाता है वो सिर्फ मेरा ही नाम लेके मेहनत करता है. चाहे वो अकेला भी हो लेकिन अपनी कठोर मेहनत से वो आपने आप को संतुष्ट कर पाता है. मुझे ख़ुशी है कि उस समय वो प्रेरणास्रोत के रूप मे मुझे याद करता है..! आंदोलन मे सबसे ज्यादा पंजाबी लोग है. पंजाबी मुझे दो चिजो कि वजह से पसंद है. एक वहा के लोग बोहोत हट्टेकट्टे और मेहनती होते है. और दुसरे वहा पे लोग लस्सी बोहोत पसंद करते है.. मुझ मे और पंजाब मे ये दो समानताये मुझे यहा भारत तक खिंचं लायी. साथ ही मेरी एक और किसान दोस्त सनी लियोन जी इसी भारत के कोख से निकली है.. और वो भी एक पंजाबी / सीख है. इन सब वजहो से मै इस आंदोलन मै आपणा योगदान देना चाहती हूं. आज भलेही खेती ट्रॅक्टर से हो रही हो, लेकिन हमारे जमाने मे हमने बडे बडे हल से खेती कि है. कुछ कुछ हल तो उठाना भी मुमकिन नही था. लेकिन फिर भी मैने उनके सामने हार नही मानी. उनको ना सिर्फ उठाया.. बल्की उनसे खेती कि जुताई कि. मै किसान आंदोलन मे अपना समर्थन देणे आई हूं. ये सारे नौजवान किसान जो इतने महिनो से दिल्ली कि सडको पर बैठे है उनका तहे दिल से साथ देणे आयी हूं. आज वो अपने पारिजनो से दूर है.. भला इतने दिन अपने पारिजनो से जुदाई कौन सेह सकता है.. इसीलिये उनका सहारा बनणे के लिये मै आयी हूं. हर एक किसान के हाथ को इस वक्त मेरी जरुरत है और मेरा ये सौभाग्य होगा अगर मै इस मुश्किल घडी मे उनका हाथ थाम के उनके लिये प्रेरणा का स्रोत बनु. धन्यवाद..

बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने येऊन नंतर महेश भट आदी प्रवृत्तींच्या पाठींब्याए बॉलिवुड मध्ये करिअर करुन स्वतःला थोडेफार शुचिर्भूत करुन घेतले. मिया खलिफा ही म्हणे ह्या बिगबॉस च्या सीझन मध्ये येणार होती पण काही कारणाने तसे झाले नसावे पण पुढच्या सीझनमध्ये येण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.तिच्यकडुन येणारी ही सर्व विधाने त्याच तयारीचा भाग वाटतोय.

In reply to by कानडाऊ योगेशु

एकदा बॉलिवूडमध्ये नाव झाले की जाहिरात , बी ग्रेड फिल्म, आणि काही (इतर) उद्योग करून बक्कळ पैसे कमवता येतात. मंदाकिनी, मोनिका बेदी यांना विचारा पाहीजेतर. पण हो नामांतर होणार नक्की, काही भावना दुखावतील ना!

राणेंनी सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज काढले अभिनंदन

In reply to by काळे मांजर

राणेंनी मालवणात तारकर्ली हे पर्यटन स्थळ विकसित केले आहे. अत्याधुनिक सेवा असलेले एक हॉस्पिटलदेखील चालू झाले आहे. आता रायबरेली, अमेठी मध्ये तुमच्या सो कॉल्ड राजमातेने वा राजपुत्राने काय सुविधा निर्माण केल्या ते सांगा? सत्तर वर्षे होते ना तिकडे?

In reply to by काळे मांजर

परवाच तुमची आठवण काढली .... आता तुम्ही एकटे नाहीत, राजेश भाऊं सारखे, जोडीदार आहेत ... आता मिपावर, प्रतिसाद-प्रतिसाद खेळू या .... तसेही मिपाकर सहनशील आहेत, आपला खेळ, ते पण Enjoy करतील ...

In reply to by मुक्त विहारि

सिंधुदुर्ग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे तर गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडलं असं खोटंनाटं सांगून आम्हाला बदनाम केलं केलं आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा शब्दात शहा यांनी शिवसेनावर हल्लाबोल केला.

In reply to by मुक्त विहारि

या दोन पक्षांनी युती करताना एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली होती याचा भक्कम पुरावा, एखादी चित्रफीत असली तरच विश्वास ठेवता येईल. दोघेही जे सांगतात ते पूर्णपणे परस्परविरोधी आहे. आम्ही सर्व जागा, सर्व पदे व सर्व जबाबदाऱ्यांचे समान वाटप करणार आहोत असे युतीची घोषणा करताना ठाकरे व शहांच्या उपस्थितीत फडणवीसांनी जाहीर सांगितले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोणाचा असणार यावर ते व ठाकरे एकही शब्द बोलले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री असेल हे शहांनी मान्य केले आहे, असे दुसऱ्याच दिवशी ठाकरेंंनी जाहीर सांगितले होते. त्यावर भाजपने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर पुढील ७-८ महिने ठाकरे व सेनेचे इतर नेते याचाच जाहीर पुनरूच्चार करीत होते व भाजप नेते गप्प होते. शेवटी मतदानाच्या जेमतेम एक आठवडा आधी, असे आश्वासन न दिल्याचे शहांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे अमित शहा जे आता जे सांगत आहेत त्यावर पुरावे नसताना विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यावेळी शिवसेनेने युती करण्यासाठी अजिबात उत्सुकता दाखविली नव्हती. आपण युती करणार नाही असे उद्धव ठाकरेंनी अनेकदा जाहीर सांगितले होते. परंतु युती व्हावी फडणवीस अत्यंत कासावीस झाले होते. २०१८ मध्ये व फेब्रुवारी २०१९ पर्यंत ते वारंवार मातोश्रीवर जाऊन युती करावी यासाठी वाटाघाटी करीत होते व शेवटी युतीसाठी त्यांनी ठाकरेंना तयार केले. एकंदरीत युती व्हावी यासाठी सेना अजिबात उत्सुक नव्हती व युतीसाठी भाजपच अत्यंत कासावीस होता ही वस्तुस्थिती पाहता, त्यावेळी, निदान मोघम स्वरूपात का होईना, भाजपने सेनेला काही काळासाठी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन व इतर अनेक आश्वासने दिली असावी, असा माझा अंदाज आहे. परंतु निकालानंतर ते आश्वासन पाळण्यास भाजपने नकार देऊन काखा वर केल्याने भाजपला धडा शिकविण्यासाठी व कार्यकर्त्यांसमोर खालमानेने न जाण्यासाठी ठाकरेंनी वेगळा मार्ग धरला असावा. खरेखोटे काय हे फक्त ठाकरे, शहा व फडणवीसच जाणतात.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजींचा प्रतिसाद वाचोन डोळे पाणावले. स्वतःची सत्ता जाताच तडफडतडफड करणारे भाजपाचे लोक रामाच्या नावाने पावत्या फाडत गावभर फिरायचे सोडून रामकथा वाचतील तर त्यांना आणि जनतेला मनशांती मिळेल

In reply to by श्रीगुरुजी

मोदी सरकार एक वर्ष झाल्यावर तुमि केक कापला होता नंतर 7 वर्षे झाली तरी केक नाय आला , आता एखादा होऊन जाऊदे

प्रेम ब्रेक झाले तरी प्रेमवीर लगेच सावरतात. इथे एकतर्फी च प्रेम आहे प्रियकर ला प्रेयसी विचारात नाही आणि हे येड गुडघ्याला बाशिंग बांधून वेड चाळ करतेय. खूप विदारक चित्र आहे.

In reply to by Rajesh188

ठाकरेंनी झटकन निर्णय घेऊन पद मिळवून दाखवले, ह्यांचे चाणक्य , दुसरे सरकार स्थापन झाल्यावर , पक्ष फोडून , राज्य अस्थिर करून , जनतेचा पैसा बरबाद करून पुन्हा निवडणुका घेऊन ऑपरेशन लोचट करतात , ते ह्यांना चालते. ठाकरेंनी केलेले मात्र चालत नाही.

In reply to by काळे मांजर

चंपाबाई काय म्हणतात? जमल्यास, सचीन उद्दाम पोटे, यांना नमस्कार सांगा

काहीही झाले तरी जनमताचा अपहार करून हे सरकार सत्तेत आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसायचा जनमताचा कौल होता आणि शिवसेनेला भाजपबरोबर सत्तेत जायचा कौल होता. त्यामुळे हे सरकार गद्दारी करून सत्तेत आले आहे. जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो. तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो? समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते. पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला. उध्दव ठाकरे is an illegitimate Chief Minister. He is a usurper.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो?
असहमत. भाजपाने ही रातोरात राष्ट्रवादीशी युती केलीच होती कि? मग ठाकरेंनी त्यांच्याच खेळात त्यांना हरवले (वा ठाकरेंनी आपला तसा वापर करु दिला) तर बिघडले कुठे? इतर बाबतीत महाआघाडीवर कितीही दोषारोप झाले तरी रातोरात सरकार स्थापन करण्याचा उतावीळपणा करुन भाजपाचा पार्श्वभाग उघडा पडलेला आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

याबाबतीत सहमत. असे काहीही करण्याची गरज नव्हती. सत्तेसाठीचा हपापलेपणा यातून दिसून येतो. राज्य तर गेलंच, सोबत पत घालवून लोकांची सहानुभूती देखील घालवली.

जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो. ठाकरेंनी तेच केले होते. परंतु त्यामुळे, ज्यांना चक्की पिसायला फडणवीस तुरुंगात पाठविणार होते, त्यांनाच क्लीन चिट देऊन त्यांच्याचबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केले. फडणवीस सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता विसरून कोणाहीबरोबर जाऊ शकतात हे दिसले व आपल्याला मुख्यमंत्रीपद तर सोडाच, कदाचित ५ वर्षे विरोधात बसावे लागेल, हे सुद्धा ठाकरेंच्या लक्षात आले असावे. अशावेळी काकांनी बरोबर फिल्डिंग लावली, सेनेला पाठिंब्यासाठी कॉंग्रेसला राजी केले व फडणवीस-अजितदादांचे ओटघटकेचे सरकार इतिहासजमा केले. सेना-भाजप एकत्र आले तर आपल्याला अजून ५ वर्षे विरोधात बसावे लागेल. तोपर्यंत आपला पक्ष संपलेला असेल हे दोन्ही कॉंग्रेसच्या लक्षात आले असणार. त्यापेक्षा आपल्या तालावर चालणारे मुख्यमंत्री व सरकार आणून व त्यात महत्त्वाची मंत्रीपदे मिळवून काकांनी सर्व दृष्टीने बाजी मारली. तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो? ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो. समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते. हेच भाजपलाही करता आले असते. पण ते करण्याऐवजी भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती करून मतदारांचा विश्वासघात केला. पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला. भाजपने राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे हा सुद्धा जनमताचा अपहारच होता. भाजप व शिवसेना या दोघांनीही अत्यंत चुकीच्या गोष्टी करू जनमताचा व दिलेल्या आश्वासनांचा अवमान केला आहे. दोघेही समान दोषी आहेत.