कशाला हवी ही दुकानं?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय.
अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ?
सामान्यांन नंतर सो ..सोफास्तीकेटेड यांचे दुकाने म्हणजे अगदीच जगमान्य प्रकारातील.आधी काहीतरी नवे म्हणून पाहायला अनुभवायला आपण जातो पण एक नंतर पुढची पायरी अधिक छान असे म्हणत म्हणत पुढे जातो..पण हे सर्व ज्ञान फुकट नाही..त्यासाठी पैसा मोजावा लागतो.मग तुम्हीपण कोणाला तरी फुकट तुमच्या दुकानातल ज्ञान वाटायला लागता वा या साखळी व्यापाराचे भाग होता.दुसऱ्याची शकले वाटत राहणे म्हणजे हिप्नोटीझिम सारखाच प्रकार वाटतो.
कठीण काळ असतो तेव्हा ह्या दुकानातले सांगतात ,तो वरचा पाहून घेईल.तेव्हा अदृश्य शक्तीच साथ देणार असते तर ..कशाला ही दुकाने..ह ...मूर्त्यांचे अवडंबर झाले तर या शक्तीचा अवमान होऊ शकतो.संतानी कधी अट्टहास एला नाही,ते मार्गक्रमण करत होते.लोक त्यांना जोडले गेले. आपले शक्तिस्थान मनातच पूजावे..
..काही अवघड काळात सेल्फ हिलिंग करावे .ते नाही जमल्यास जवळचे असतातच ना..आणि तेही नाही जमले तर मानसोपचार तज्ञाकडे जाणे हाही उपाय आहेच ना..अमका तमका दुकानवाला असे म्हणतो म्हणून अस स्वत:ला फसवण्याच पाप आहे.
प्रतिक्रिया
तुम्ही पण टाका एक दुकान..
भारी आयडिया आहे.
जगाची चिंता सोडा
मानसोपचार तज्ञाकडे जाणे हा उपाय ?
काल टीव्हीवर कोकरे महाराज आणि
दुर्दैवाने दुकानातल्या
वाचतेय तुमची मतं.
काही जण दुकान कधी बंद होणार