Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Fri, 11/20/2020 - 20:03
बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्‍याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्‍या होत असतात. पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल. काळ्या दिनाची बातमी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188 हा एक वेगळाच इश्यु http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202 बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296 सीमाभागात कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334 बँक कर्मचार्‍यांना कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417 कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण. कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468 कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490 सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508 अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514 मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515 बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525 बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550
  • Log in or register to post comments
  • 34299 views

प्रतिक्रिया

Submitted by Rajesh188 on Fri, 11/20/2020 - 21:28

Permalink

जीवनमान उंचावेल

जीवनमान उंचावेल अशी बेळगाव ची स्थिती असेल आणि मराठी भाषिक लोकांना कोणत्याच दूजा भावला सामना करावा लागत नसेल. तर बेळगाव मधील मराठी लोकांनी कर्नाटकात मध्ये मिसळून जावं. तो पण भारताचाच हिस्सा आहे. असे पण industrialization मुळे अनेक शहरातील भाषिक गणित बिघडत आहेत. मुंबई त्याचे उदाहरण आहेच,बंगलोर पण त्याच मार्गावर आहे. मुंबई मध्ये मराठी लोक कमी आहेत म्हणून ती महाराष्ट्रात नसावी. ह्या प्रकारचा विचार बळावला तर देशभर च गोंधळ निर्माण होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 11/20/2020 - 22:53

Permalink

हम्म

बेळगावात किर्लोस्कर रोड आहे, टिळकवाडी आहे, पंचवटी सोन्या मारूती देवालय आहे, साठे कॉलोनी,रानडे कॉलोनी आहे. वडापाव, मिसळपावाची दुकाने आहेत, दुकानावरील अनेक फलक मराठित आहेत. असे वातावरण मुंबईतल्या कोणत्या उपनगरातही नाही. तेव्हा बेळगावची ओळख पुसुन टाकली वगैरे शुद्ध कांगावा आहे. कर्नाटकात भाजपा सत्तेवर आहे त्यामुळे तेथील स्थानिकाना डिवचायचे व पोळी भाजून घ्यायची हा बारामतीकरांचा जुना डाव. अगदी १९८६ साली छगन भुजबळ/शरद पवारानी स्व्तःला अटक करुन घेतली तेव्हापासुन. जून १९८६ मध्ये पवारानी आंदोलन केले व डिसेंबर १९८६ मध्ये पवार कॉन्ग्रेस्मध्ये प्रवेश करते झाले. https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19860630-belgaum-border-dispute-turns-violent-leaves-seven-people-dead-801016-1986-06-30 https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19861231-sharad-pawars-congresss-merged-with-congressi-801561-1986-12-31
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 11/21/2020 - 05:03

Permalink

काहीतरी हाक द्यायच आणि

करायचे काहीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sat, 11/21/2020 - 07:27

In reply to काहीतरी हाक द्यायच आणि by कंजूस

Permalink

खरे तर

खरे तर हा बेळगाव ही समस्या नाहीच. तेथील बिगर-राजकीय मराठी स्थानिक ह्या कथित समस्येला हसण्यावारी नेतात. १९८०च्य दशकात जन्मलेल्या तेथील मराठी पिढीने मराठी बरोबर कन्नडही सहज आत्मसात केले. तेथील मराठी/कन्नडिगा स्थानिक मराठी/कन्नड्/हिंदी लिलया बोलतात. मुंबई-पुण्यात स्थायिक झालेल्या बेळगावच्या मराठी लोकाना विचारा.. दक्षिण महारास्।ट्रातल्या मराठी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या पोटासाठी निर्माण केलेली ही समस्या आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 11/21/2020 - 11:04

Permalink

कानडी जितके भाषाभिमानी आहेत

कानडी जितके भाषाभिमानी आहेत तितके मराठी अन मराठी पुढारी नाहीत. अगदी ऑनलाईन मध्ये तज्ञ असलेले मराठी, "आम्हाला त्रास होत नाही ना! मग सीमाभाग कुठे का असेना काय फरक पडतो", असली मानसीकता घेऊन असतात. भाषिक संघर्ष ज्या साहित्यिकांच्या माध्यमातून सुरू झाला त्या साहित्यिकांची नवी पिढी संमेलनात केवळ ठराव करते झाले आहे. गेल्या चार पिढ्या भाषेची अस्मिता घेऊन लढते आहे ते काहीच नाही. कानडी टक्का तेथे वाढला की मग लोकशाही पद्धतीने मतदान घेतले तर दान कोणाच्या पदरात पडेल ते सांगायला नको. आपल्याकडे हा प्रश्न सोडवायची राजकीय इच्छा नाही. केवळ सत्तेचे राजकारण चालते आहे. हा प्रश्न सामाजिक पातळीवर सोडवला जावा.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sat, 11/21/2020 - 23:55

In reply to कानडी जितके भाषाभिमानी आहेत by पाषाणभेद

Permalink

हम्म

"अगदी ऑनलाईन मध्ये तज्ञ असलेले मराठी, "आम्हाला त्रास होत नाही ना! मग सीमाभाग कुठे का असेना काय फरक पडतो", असली मानसीकता घेऊन असतात." असे काही नाही रे पाषाणा. आम्ही तेथे १०/१२ वेळा गेलो आहोत. स्थानिक मराठी लोकांशी बोलणेही झाले आहे. शहरातील अनेकांचे मत "आम्हाला काहीच फरक पडत नाही. " असे होते. अनेक मराठी स्थानिक लोक कन्नड शिकतात(त्याचप्रमाणे तेथेल अनेक कन्न्ड लोक मराठीही बोलतात). अन्याय वगैरे असता तर लोक ईतकी वर्शे राहिले असते का तेथे? कन्नड म्हणजे काही चीनी/जपानी नाही. अनेक वर्षे राहुन तेथील लोक अस्खलीत मराठी बोलतात. सुधा मूर्तींची ही मराठीतील मुलाखत पहा- https://www.youtube.com/watch?v=GdWKzUVY0Rs ह्यांचा जन्म कोल्हापूरचा. फक्त ५/६ वर्शे त्या तेथे होत्या पण जेवढे मराठी कानावर पडले त्या शिकल्या. नंतर हुबळीत शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात. पुण्यात असताना त्यानी मराठी नाटके पाहिली,पु.लंची/अनेकांची व्याख्याने ऐकली.नंतर बेंगळूरमध्ये आल्यावर कन्नडमध्ये लिखाण चालु केले. "कन्नडमध्ये लिखाण करत असले तरी तरूणपणी कानावर पडत असलेल्या पुणेरी मराठीचा प्रभाव अधुन मधुन पडतो.. हे ही त्या सांगतात. सांगायचा मुद्दा- कुरकुर न करता आजुबाजुच्या परिस्थितीशी जुळवुन घ्यायचे व पुढे जायचे हे आपण मराठी लोकानी त्यांच्याकडुन शिकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Sun, 11/22/2020 - 09:58

Permalink

आमचाही एक जुना धागा

या निमित्ताने पुन्हा वर काढत आहोत ----- शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी? https://misalpav.com/node/30120
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sun, 11/22/2020 - 20:27

Permalink

F

F
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sun, 11/22/2020 - 23:47

In reply to F by यसवायजी

Permalink

F

म्हणजे फॉलोईंग? F लिहिल्यावर नोटीफिकेशन येतं? कुठे येतं? मेलवर?
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 11/23/2020 - 00:07

In reply to F by उपयोजक

Permalink

होय, फोलॉइंग.

होय, फोलॉइंग. notification येत नाही. 1-2 महिन्यांनी कधीतरी एखादी चक्कर मारल्यावर आपण प्रतिसाद दिलेला धागा शोधता येतो त्यासाठी कमेंट केली आहे. (नवे लेखन - माझ्या प्रतिक्रिया)
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 11/23/2020 - 09:47

In reply to होय, फोलॉइंग. by यसवायजी

Permalink

त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!!

त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!!
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 11/23/2020 - 13:18

In reply to त्यापेक्षा वाचनखूण साठवा की!! by आनन्दा

Permalink

एका F साठी किती प्रतिसाद

एका F साठी किती प्रतिसाद टायपायचे :D असो. वाचनखूण साठवली तर आपल्या प्रतिक्रिया (आणि त्यावरच्या प्रतिक्रिया) परत शोधाव्या लागतात. मी वर सांगितलेला ऑप्शन वापरल्यास थेट आपल्या प्रतिक्रियेला जाता येते. हुश्श.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 11/24/2020 - 21:09

Permalink

बेळगाव

वाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळेना! ईंदुर भोपाळ रायपुर बडोदा सगळीकडे मराठी लोक व्यवस्थीत राहताय. इकडे काय इश्यु आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 18:35

In reply to बेळगाव by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

अनिरुद्ध.वैद्य

आपल्या महाराष्ट्राचा जवळपास ३ हजार चौरस मैलाचा भूभाग महाजन आयोगाने अन्यायीपणाने कर्नाटकला दिलाय.हा भाग महाराष्ट्रात असेल तर या भागातून मिळणारा महसूल महाराष्ट्राच्या खात्यात जमा होईल.महाराष्ट्राचे उत्पन्न वाढेल.हा फायदा आहे महाराष्ट्राचा.म्हणून मराठीवादी नेते लढतायत सीमाभागासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 11/24/2020 - 22:52

Permalink

दक्षणेकडील सर्व राज्याशी

महाराष्ट्र चे प्रेमाचे संबंध हे सर्व साऊथ भारतीय राज्याशी असणे भवितव्य साठी खूप गरजेचे आहे. बेळगाव मध्ये मराठी लोक सुखात आहे त्याचा इश्यू करायची गरज नाही. आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यांना पुढे उत्तरेतील राज्याच्या दादागिरी चा सामना करायचंय .. राज ठाकरे नी तसे प्रयत्न केले होत जय ललिता आणि बाकी नेत्या शी संबंध वाढवायचा प्रयत्न करून . तेच शहाणपण बाकी मराठी नेत्या मध्ये यावे .
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 11/24/2020 - 23:38

In reply to दक्षणेकडील सर्व राज्याशी by Rajesh188

Permalink

द्क्षिणेतले

दक्षिणेतले अनेक लोक मराठी लोकाना "उत्तर भारतीयांमध्येच' धरतात रे राजेशा. दादागिरीचा सामना वगैरे फक्त बोलायच्या गोष्टी. महाराष्ट्रातुन ४८ व तामिळनाडूतुन ३९ खासदार संसदेत जातात. ब्रिटिशानी उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा आपल्या राज्याच्या नावावर ख्पवायची सवय प्रगत राज्याना आहे. उ,दा. मुंबई. शहराची कल्पना, बंदराचा विकास वगैरे हे सगळे ब्रिटिशांचे पण "मुंबईवर पहिला हक्क आमचा" असे शिवसेनावाले/मनसे म्हणणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 11/25/2020 - 10:40

In reply to द्क्षिणेतले by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

हो. हिंदी चित्रपटात मुंबई

हो. हिंदी चित्रपटात मुंबई दाखवण्यासाठी हमखास सीएसटी स्टेशन दाखवातात.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 11/25/2020 - 10:54

Permalink

सध्या च्या स्थिती मध्ये

प्रगत राज्यांचा दबाव गट निर्माण होणे आवशक्याच आहे. उत्तरेची सर्व राज्य एक होवून migration बाबंत दबाव आणतात. केंद्रीय फंडा बाबत दबाव आणतात,हिंदी बाबत दबाव आणतात. तेव्हा महाराष्ट्र नी दक्षिण मधील राज्य शी शक्य होईल तेवढे मतभेद टाळून त्यांच्या मध्ये सामील होणे गरजेचे आहे. मी तर ह्याच्या पुढे जावून असे म्हणेन तमिळ,कन्नड,तेलगू,आणि मराठी ह्या भाषा ह्या राज्यात 2 वर्ष तरी शिकवल्या जाव्यात. जुजबी माहिती तरी भाषेची असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 11/25/2020 - 20:01

In reply to सध्या च्या स्थिती मध्ये by Rajesh188

Permalink

हम्म

कोणी दबाव आणला रे राजेशा हिंदीबाबत? काही पुरावे? हिंदीला कितीही नाके मुरडली तरी देवाण-घेवाणीसाठी काही भाषा हवी की नको? आणी बाकीच्या राज्यांना दबाव आणण्यासाठी कोणी अड्वलय?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 11/25/2020 - 20:38

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

बरोबर. पण प्रत्येक राज्यात

बरोबर. पण प्रत्येक राज्यात भाषा आहे ना?? आणी ईंग्रजी देखील आहे. मग हिंदीच का लादावी?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 11/25/2020 - 21:36

In reply to बरोबर. पण प्रत्येक राज्यात by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अरे

मग कोणती भाषा असावी? इंग्रजी किती जण बोलतात? एकूण लोकसंख्येच्या ५/१०%? महाराश्ट्रातले बिल्डर्स जेव्हा बंगाली/बिहारी तरूणाना कामाला येथे बोलावतात, तेव्हा त्याना मराठीचे/इंग्रजीचे प्रशिक्षण द्यावे काय? मराठी व्यावसायिकाचा माल मदुराईत कोणाला हवा असेल, आणी इंग्रजी तेथील ग्राहकाना येत नसेल तर त्या मराठी व्यवसायिकाने तामिळ शिकावे काय? भाषा लादता येत नाही हे सीमा प्रश्नावरून सिद्ध झालेच ना? बेळगावात शाळात कन्नड शिकवली जाते पण अनेक पिढ्या तेथे राहुन मराठे बोलतातच्/लिहितातच.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 11/25/2020 - 22:12

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

@माईसाहेब

महाराश्ट्रातले बिल्डर्स जेव्हा बंगाली/बिहारी तरूणाना कामाला येथे बोलावतात, तेव्हा त्याना मराठीचे/इंग्रजीचे प्रशिक्षण द्यावे काय? द्यावे की.कामचलाऊ मराठी शिकवायला काय हरकत आहे? तमिळनाडूतले बिल्डर्स जेव्हा युपि/बिहारी तरूणाना कामाला तमिळनाडूत बोलावतात तेव्हा काय करतात? मराठी व्यावसायिकाचा माल मदुराईत कोणाला हवा असेल, आणी इंग्रजी तेथील ग्राहकाना येत नसेल तर त्या मराठी व्यवसायिकाने तामिळ शिकावे काय? विकणार्‍याने थोडे तमिळ आणि डिस्ट्रिब्युटरशिप हवी असणार्‍याने थोडी मराठी शिकायला काय हरकत आहे? धंदा वाढवायचा तर ज‍ादा भाषा येणं फायद्याचं आहे ना? अन्यथा कामचलाऊ इंग्रजी चालेल की!
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 11/25/2020 - 21:08

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

@माईसाहेब

देवाण-घेवाणीसाठी काही भाषा हवी की नको? कसली देवाणघेवाण? १) व्यापारविषयक संवाद करायचा असेल तर इंग्रजी चालेल की.किंवा पैशाला जगात अनन्यसाधारण महत्व असल्याने दोन्ही पार्ट्या कामचलाऊ का असेना पण एकमेकांच्या भाषा शिकतील की! संपर्कासाठी फक्त हिंदीच चालणार असं कुठंय? २) एकदा विविधतेत एकता मान्य केल्यावर हिंदीची जबरदस्ती केंद्राकडून का बरं होते?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 11/25/2020 - 21:11

In reply to सध्या च्या स्थिती मध्ये by Rajesh188

Permalink

@राजेश १८८

माझे तमिळ मित्र तर या हिंदीच्या जबरदस्तीला कडाडून विरोध करतात.(हिंदीला नव्हे.तिच्या जबरदस्तीला!) मी तर त्यांना उपाय सुचवलाय की महाराष्ट्रासहित पाचही दक्षिण भारतीयांनी एकत्र येऊन एक सामाईक भाषा बनवावी आणि हिंदीला आव्हान द्यावे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 11/25/2020 - 21:29

In reply to @राजेश १८८ by उपयोजक

Permalink

अरे

भाषा बनवावी? अशी ठरवुन भाषा बनवता येते का? मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्राबाहेर कामाला जातो, समजा बंगालला किंवा दिल्लिला, हिंदी येते म्हणूनच नोकरी/व्यवसाय करू शकतो ना? की मराठी माणूस बंगाली/गुजराती शिकुन बंगाल्/गुजरातला जातो?
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास२९ on Wed, 11/25/2020 - 22:28

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा

संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा कमीत कमी व्यवहारात वापरायची भाषा) असावी का? कुठलाही राजकिय विचार बाजूला ठेऊन विचार करा.. तस झाल तर दक्षिणेतल्या राज्यान्चा पण टोकाचा विरोध( राजकिय सोडून) होणार नाही..प्रत्येक मुख्य भाषा संस्कृत प्रचूर असल्याने व्यवहारात एकदम शिकायला, वापरायला वेळ लागला तरी भाषिक भिन्ति कमी होतील...
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 11/25/2020 - 23:03

In reply to संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा by रामदास२९

Permalink

ईतकी

ईतकी वर्शे हिंदी आहे. मुंबईत ती तर व्यवहाराची भाषा झाली आहे. पण असे असले तरी मुंबईचे लोक मराठी विसरले का? नागपूरचे मराठी लोक मराठीत लिखाण करतातच ना? सर्वात जास्त भाषिक पुस्तके/कादंबर्या ह्यात देशात मराठी पहिल्या तीन्/चार भाषात येते. साहित्य जत्रा/सम्मेलने ह्यात मराठीचा हात कोण धरणार? मग हिंदीबद्दल एवढी भीती का? हिंग्लिशला मात्र आमचा विरोध आहे. ह्यात धड हिंदीही नाही आणी इंग्रजीही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 00:15

In reply to ईतकी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईसाहेब

मुंबईच्या व्यवहाराची भाषा हिंदी आहे यात कौतुकानं सांगण्यासारखं काय आहे? मुंबई उत्तरभारतात आहे का? मुंबई ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राची राज्यभाषा हीच मुंबईची व्यवहाराची भाषा व्हायला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम आहे मुंबईतल्या परप्रांतीयांना मराठी शिकायला? मराठी ही इतकी अवघड आहे शिकायला? गोंदिया हा जिल्हा जवळपास हिंदीभाषिच झाला आहे. उत्तरभारतातल्या काही राज्यांची भाषा ही सगळ्या देशाची भाषा कशी काय म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 00:27

In reply to माईसाहेब by उपयोजक

Permalink

हम्म

"मुंबई ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राची राज्यभाषा हीच मुंबईची व्यवहाराची भाषा व्हायला काय हरकत आहे? मराठी ही इतकी अवघड आहे शिकायला?" मुंबईत मराठी माणूस मराठीच बोलतो. गुजराती/मारवाडी दुकान्दार अनेक्वेळा मराठिच बोलताना दिसतात. "काय प्रॉब्लेम आहे मुंबईतल्या परप्रांतीयांना मराठी शिकायला?" एखाद्याने आपली भाषा शिकावी असे वाटत असेल तर त्याला शिकवायचा प्रयत्न का करू नये? बाकी अमिताभ बच्चन,गुलजार्,जावेद अख्तर धर्मेण्द्र,रतन टाटा,आदी गोदरेज्,कुमारमंगलम बिर्ला,आनंद महिंद्रा,ऐश्वर्या राय,शहारूख हे ४०-५० वर्षे महाराष्ट्रात राहुन किती मराठी शिकले? कोपर्यावरच्या भेळपुरीवाल्याला किंवा रिक्षावाल्याला मराठी शिकवण्याआधी ह्या मंडळींपासुन सुरुवात करूया. काय बोलता?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 00:32

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईसाहेब

चालतंय की. मुंबईतल्या सगळ्या अमराठी लोकांना मराठी शिकवावं.त्यांनीही ती मनापासून शिकावी.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 00:03

In reply to संस्कृत राष्ट्रीय भाषा(किन्वा by रामदास२९

Permalink

@रामदास २९

प्रत्येक मुख्य भाषा संस्कृत प्रचूर असल्याने १) दक्षिणेच्या चारही भाषा संस्कृतोद्भव नाहीत.तमिळांनी ठरवलं तर ते एकही संस्कृतोद्भव शब्द न वापरता देखील रोजचे संभाषण करु शकतील इतकी बेसिक शब्दसंपदा तमिळमधे नक्कीच आहे.शिवाय कितीतरी तमिळांचा संस्कृतला विरोध आहे.तमिळमधे वापरले जाणारे संस्कृतोद्भव शब्द हाकलायचे त्यांचे प्रयत्न सुरु असतात. २) सर्वांना सहज जमेल इतकी संस्कृत सोपी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 11/25/2020 - 22:18

Permalink

@माईसाहेब

भाषा बनवावी? अशी ठरवुन भाषा बनवता येते का? का येऊ नये? पाचही राज्यभाषांमधले सामाईक शब्द निवडून आणि काही नवीन शब्द घालून बनवता यायला काय हरकत आहे? मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्राबाहेर कामाला जातो, समजा बंगालला किंवा दिल्लिला, हिंदी येते म्हणूनच नोकरी/व्यवसाय करू शकतो ना? की मराठी माणूस बंगाली/गुजराती शिकुन बंगाल्/गुजरातला जातो? म्हणजे दक्षिण भारतातले लोक बागाल/गुजरातमधे नोकरीला जातात ते हिंदी शिकून मगच बंगालमधे/गुजरातमधे नोकरीला जातात?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 11/25/2020 - 22:55

In reply to @माईसाहेब by उपयोजक

Permalink

हिंदी

"म्हणजे दक्षिण भारतातले लोक बागाल/गुजरातमधे नोकरीला जातात ते हिंदी शिकून मगच बंगालमधे/गुजरातमधे नोकरीला जातात?" तशी अडचण होउ नये म्हणून तर हिंदी आहे. शिवाय जबरदस्ती कोणीच करत नाही. गुजरात्मधिल गुजराती व्यापारी जर तामिळ शिकायला तयार असतील तर हरकत नाही. तसेच गुजरातला जाणारे तामिळ लोक गुजराती शिकायला तयार असतील तरीही हरकत नाही. तामिळ लोकांचा हिंदी विरोध हा "तामिळ भाषा सर्वात जुनी. तुम्ही कोण आम्हाला शिकवणार?"ह्या भावनेतून आलेला आहे. शिवाय आर्य-द्रविड थियरीही आहे. अनेक मराठी लोकांचा हिंदी विरोध हा उ.प्र.बिहारी लोक राज्यात येउन स्थानिक नोकर्या करतात म्हणून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 00:26

In reply to हिंदी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

@माईसाहेब

१) शिवकाशीतल्या फटाका व्यापार्‍यांना आणि छपाई उद्योग चालवणार्‍या बर्‍याच उद्योजकांना हिंदी बोलता येतं.देशभर बिझनेस करतात ते.धंदा वाढवायचा असेल तर कामचलाऊ का होईना हिंदी आलीच पाहिजे हे व्यावसायिक गणित त्यांनाही चुकलेलं नाही. २)आर्य - द्रविड थेअरीतून विरोध होत असला तरी तो पूर्ण तमिळनाडूचा विचार नाही.आता हळूहळू परिस्थिती बदलतेय.हिंदी बोलता आली तर आपल्याला करिअरमधे फायदा होऊ शकतो हे आता बर्‍याच तमिळांना उमजू लागलंय.राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकण्याचं प्रमाण आताशा तमिळनाडूत वाढू लागलंय.तमिळांचा विरोध हिंदीला नाहीये तर शाळेतून त्रिभाषासूत्रीमार्फत जबरदस्तीने हिंदी शिकवण्याला आहे. आर्य - द्रविड थेअरीचा वापर हा द्रमुकसारखा हिंदूद्वेष्टा पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात. प.बंगालमधेही शाळेत हिंदी शिकवत नाहीत.तिथेही हिंदीच्या सक्तीला पूर्वीपासूनच विरोध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 11/25/2020 - 23:12

Permalink

महाराष्ट्र सहित दक्षिण भारतीय सर्व राज्यांनी

महाराष्ट्र सहित दक्षिण भारतीय राज्यांनी आपसात असणारे सर्व प्रश्न शांतेत सोडवावेत. मग तो बेळगाव प्रश्न असेल, खोऱ्या मधील पाण्याचा प्रश्न असेल. भाषा सर्व राज्यांची वेगळी आहे त्या वर मात करावी. आता महाराष्ट्र उत्तरेच्या राज्यातील राजकारणात स्वतः ला व्यस्त करून घेत आहे ते राज्याच्या हिताचे नाही. हेच मला सांगायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on गुरुवार, 11/26/2020 - 10:40

Permalink

काळाबरोबर बदलले पाहिजे

हिन्दी चा दुस्वास करणार्यानी आणि दक्षिणेला जवळ करा म्हणणार्यानी विचार केला आहे का? हिन्दी भाषा देवनागरी लिपी वापरते आणि मराठी पण. उर्दुभाषिक पण हिन्दी समजु शकतात कारण बरेच शब्द सारखे आहेत. दक्षिणेकडची बन्गलोर व हैदराबाद ही शहरे बहुभाषिक झाली आहेत. शाळेत मुलाना इन्ग्लिश, हिन्दी व त्या राज्याची बोलली जाणारी प्रमाणित भाषा अवश्य शिकवली पाहिजे.लहान वयात भाषा शिकणे सोपे असते त्यामुळे शालेय स्तरावर पुर्ण भारतभर हिन्दी शिकवणे योग्य राहील.त्यामुळे निदान दक्षिणेतली पुढची पिढी तरी हिन्दी द्वेश करणार नाही. मुळात हिन्दी शिकायला लागणे ही सक्ती न समजता सन्धी समजली तर विरोध कमी होइल. दिल्ली काबीज करायची तर तिथली भाषा आली पहिजे. दक्षिणेचे लान्गुलचालन करण्यापेक्शा हिन्दी भाषा व तिथली लोक यान्च्यावर प्रभाव पाडणे हा राष्ट्रावर सत्ता स्थापित करण्याचा जास्त सोपा मार्ग आहे. (उगीच का बिहार मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवार उभी करुन आली) शासकीय मराठी समजायला अवघड असते. भाषा दर मैलावर बदलते असे म्हणतात. प्रमाणित मराठीचा आग्रह धरला तर ग्रामीण जनता बाजुला पडते आणि अशुध्द मराठी कामकाजासाठी वापरणे योग्य नाही. भाषा सम्पते आहे म्हणुन काळजी करणे आणि एकदा बेळगाव मध्ये कानडी वस्ती वाढते आहे मराठी टक्का कमी होतो आहे असे म्हणुन नन्तर साउथ बरोबर नवीन भाषा तयार करुन मराठी पुर्णपणे सम्पवण्याचा विचार मान्डणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 11:18

In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस

Permalink

हम्म

अतिशय योग्य लिहिलेस रे सुखी माणसा. खरे तर ह्या मंडळीचा भाषेला विरोध नाहीच आहे. ईतर राज्यातील लोक आपल्या राज्यात येतात व नोकरी धंदे करतात हे खरे दुखणे आहे. भाषेला विरोध हे केवळ दाखवायचे कारण आहे. आनंद महिंद्रा/रतन टाटा ह्यांना मराठी/तामिळ शिकण्याचा आग्रह मनसे/द्रमुक वगैरे करतील? नाही करणार. पुण्यात/चेन्नईत ह्यांना टाटा/महिंद्राने केलेली गुण्तवणूक पाहिजे आहे पण तिकडे चाकरी करायला मात्र आमचे स्थानिक लोक हवेत. हा दुटप्पीपणा आहे. भाषेवर खरे प्रेम असेल तर "आमच्या राज्यात येणार्या गुण्तवणुक्दारानादेखिल आमची भाषा आली पाहिजे" अशी मागणी केली पाहिजे ह्यानी.
  • Log in or register to post comments

Submitted by शा वि कु on गुरुवार, 11/26/2020 - 11:26

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

+१

.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 11/26/2020 - 13:46

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

हे राजकीय मत झाले

गुंतवणूक ही फक्त भारतीय उद्योग पती करत नाहीत. आणि गुंतवणूक ही समाजसेवा नक्कीच नाही ज्या राज्यात उद्योग स्थापित करून त्यांना रिटर्न मिळण्याची शक्यता असते त्याच राज्यात गुंतवणूक केली जाते. उद्योग पती चा लोकांशी संबंध येत नाही त्या मुळे त्यांची भाषा कोणती ह्याला अर्थ नाही . South ची राज्य,आणि महाराष्ट्र मध्ये उद्योग आहेत तर त्याचा अर्थ हा आहे ही राज्य गुंतवणूक करण्यास योग्य आहेत. मग अशा गुंतवणूक करण्यास योग्य,राज्यांनी स्वतः च्या लोकांच्या कल्याणासाठी काही अटी ठेवल्या (भाषा हीच असावी अशा,किंवा ह्याच भाषेची लोक कामगार असावीत) तर त्या मध्ये काही वावग नाही. महाराष्ट्र सहित दक्षिण भारत ह्यांची युती होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्या बेळगाव मुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यांनी जास्त ताणता कामाचा नाहीं
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 15:05

In reply to हे राजकीय मत झाले by Rajesh188

Permalink

हम्म

"उद्योग पती चा लोकांशी संबंध येत नाही त्या मुळे त्यांची भाषा कोणती ह्याला अर्थ नाही ." ह्या वाक्यावर हे एवढे जोरजोरात हसले की ठ्सका लागला. असो. "South ची राज्य,आणि महाराष्ट्र मध्ये उद्योग आहेत तर त्याचा अर्थ हा आहे ही राज्य गुंतवणूक करण्यास योग्य आहेत." ह्याच तालावर, मुंबईत गुजराती लोक व्यापारात आहेत ह्याचा अर्थ हे लोक व्यापार करण्यास योग्य आहेत. फेरीवाले,किरकोळ विक्रेते उत्तर भारतिय आहेत ह्याचा अर्थ हे लोक ते काम करण्यास योग्य आहेत. मग प्रॉब्लेम कुठे आहे? गुंतवणूक समाजसेवा नाही तर मग उद्योगपतीना "अमूक भाषेचेच कामगार कामावर घ्या" हे सांगणे म्हणजे समाजसेवा करा/स्थानिक लोकांवर उपकार करा सांगण्यासारखे झाले ना? घटनेने प्रत्येक नागरिकाला कोठेही नोकरी-व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 11/26/2020 - 15:13

In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस

Permalink

हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य

हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य भाषा असताना हिंदी शिका चा धोशा का?? ऊत्तर भारतीयांची बेसुमार मानवी पैदास ईतर राज्यांवर लादावी म्हणूनच ना??आणी हिंदी मुळे विकास होतो तर ऊत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू, कर्नाटक पेक्शा मागास का?? ऊद्या नागालॅंड चा माणूस तमीळनाडूत गेला तर हिंदी येत नाही म्हणून त्याचं काम अडनार आहे का?? लोक कसंही करून व्यवहार करतातच. त्यासाठी हिंदी लादायची गरज नाही. हिंदी ही भाषा ईतर राज्यांवर लादन्याचं कारन फक्त बेसुमार मानवी पैदासाची सोय करणे एवढंच आहे. त्यात देश, संवादमाध्यम असं काहीही नाहीये. महाराष्ट्रातील मराठी लोकानी शंभर टक्के मराठीचा वापर करावा. त्याने मराठी माणसाच्या मुलांचीच नोकरीची सोय होणार आहे. मुंबईत ही सक्तीने मराठी बोलावे. ज्याला मुंबईत पोट भरायचेय तो मराठी शिकेल. नाहीतर आपल्या राज्यात जाऊन कलमडेल. देशबांधव म्हणून न सुधारनार्या आणी बेसुमार माणसे पैदा करानार्या ऊत्तर भारतीयांची सोय म्हणून आपली भाषा न बोलनार्या काही मराठी माणसांसारखी मुर्ख जमात ह्या जगात दुसरी नसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 15:50

In reply to हिंदी ईतर भाषांसारखीच सामान्य by अमरेंद्र बाहुबली

Permalink

बेसुमार

बेसुमार लोकसण्ख्येस जबाबदार राज्ये कोणती ह्यावर माहिती काढली तर उत्तर-प्रदेश्,बिहार्,महाराष्ट्र,बंगाल आघाडीवर आहेत!! अगदी १९५१ पासून. https://en.wikipedia.org/wiki/List_of_states_in_India_by_past_population मध्य प्रदेश्/राजस्थान ह्या आकाराने मोठी राज्ये असलेल्यांची लोकसंख्या महाराष्ट्रापे़षा कमी आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 18:30

In reply to काळाबरोबर बदलले पाहिजे by सुखीमाणूस

Permalink

@सुखीमाणूस

हिन्दी चा दुस्वास करणार्यानी आणि दक्षिणेला जवळ करा म्हणणार्यानी हिंदीचा कोणी दुस्वास करत नाहीये.तिच्या जबरदस्तीने लादण्याला विरोध आहे.ज्यांना स्वत:हून हिंदी शिकायचं असेल त्यांच्या शिकण्याला विरोध नाही.पण त्रिभाषासूत्राची जबरदस्ती करुन सगळ्यांच्या गळ्यात जबरदस्तीने हिंदी का मारायची? उत्तरप्रदेशात तमिळ का शिकवत नाहीत त्रिभाषासूत्राचा वापर करुन? भारताव्यतिरिक्त चार देशांची तमिळ ही अधिकृत तर कितीतरी देशांची अनधिकृत भाषा आहे.शिकवतील का आता भय्यांच्या राज्यात तमिळ? तेलुगू ही देशातली दुसरी मोठी भाषा आहे.बिहारमधे त्रिभाषासूत्राचा वापर करुन तेलुगू शिकवतील का? भारतभर हिन्दी शिकवणे योग्य राहील एकदा विविधतेत एकता असे संविधानात मान्य केल्यावर ८ राज्यांची (उत्तराखंड/युपि/बिहार/छत्तीसगड/म.प्र/दिल्ली/हिमाचल प्रदेश/झारखंड) भाषा सगळ्या देशावर जबरदस्तीने शिकवण्याचं कारण काय? दिल्ली काबीज करायची तर तिथली भाषा आली पहिजे. परत तेच! अहो ज्यांना धंदा वाढवायचाय ते स्वत:हूनच या ना त्या मार्गाने हिंदी शिकतातच.ते लोक शाळेत हिंदी शिकवायची वाट बघत बसत नाहीत.विरोध हिंदीच्या सक्तीला आहे हिंदीला नव्हे. साउथ बरोबर नवीन भाषा तयार करुन मराठी पुर्णपणे सम्पवण्याचा विचार मान्डणे योग्य नाही. मग ज्यांना गरज नाही त्यांना जबरदस्तीने हिंदी शिकवणे,त्यांच्या माथी मारणे हे सुद्धा योग्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 11/26/2020 - 16:10

Permalink

कोणतेच कायदे पाळायचे नाहीत

आणि फायदा मात्र पूर्ण हवा. लोकसंख्या नियंत्रण करायचे नाही पण ह्यांची ही बेसुमार वाढलेली लोकसंख्या दुसऱ्या राज्यांनी पोसायची एकतर स्वतःच्या राज्याच्या प्रगतीती ह्यांना सामावून घेवून किंवा देशाचा जो टॅक्स जमा होतो त्या मधील सर्वात मोठा हिस्सा ह्या नाकाम राज्यांना देवून . टॅक्स जमा करणार 1 रुपया आणि केंद्रीय सरकार कडून ह्यांना दिले जातात 10 रुपये. जी राज्यात अनागोंदी माजलेली आहे,कोणी व्यावसायिक तिथे गुंतवणूक करायला तयार नाही. त्यांच्या च राज्यातील आयएएस,आयपीएस ह्यांना त्यांच्याच राज्यात पोस्टिंग नको आहे तर मुंबई,पुणे ,बंगलोर,चेन्नई हवं आहे. त्यांच्याच राज्यातील डॉक्टर्स तिथेच व्यवसाय करू इच्छित नाहीत. अशा राज्यांची भाषा हिंदी रोजगार ची भाषा केवढा मोठा जोक. आणि अशा मागास राज्यांची भाषा प्रगत राज्यांनी k
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 17:10

In reply to कोणतेच कायदे पाळायचे नाहीत by Rajesh188

Permalink

सामना

सामना,नवाकाळ वाचायचे बंद कर रे राजेशा. आळस झटकून मराठी तरूणानी कामाला लागले पाहिजे. आमच्या बारामतीकरांनीही हे अनेकवेळा अधोरेखीत केले आहे की मराठी तरूण कष्टाची कामे करायला नाक मुरडतो. असो. आपला व अनेकांचा हिंदीला विरोध नसून तेथील लोक येथे येण्यास विरोध आहे हे स्पष्ट झाले. भाषा विरोध फक्त दाखवण्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 11/26/2020 - 19:25

In reply to सामना by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती

माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती आहेत तर आपल्या राज्यात कलमडावे ना?? आळशी महाराष्ट्रात गरज काय त्यांची?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 11/26/2020 - 20:43

In reply to माईसाहेब, ऊत्तर भारतीय मेहनती by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हम्म

ब्रिटिशांनी जी काही थोडी शहरे विकसीत केली त्यात मुंबई होते. खालोखाल पुणे. रेल्वे/बंदर्/मुख्य अर्थसंस्था/शेयर बाजार ह्यात हातभार लागला तो ब्रिटिशांबरोबर पारशी व गुजराती धनिकांचा. नंतर आले बॉलिवूड. ह्यात सुरुवातीला मराठी होते नंतर प्रामुख्याने पंजाबी हिंदू व मुस्लिम. तेव्हा मुंबईच्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीत का काय म्हणतात त्यात मराठी लोकांबरोबर हे 'ईतर बाकीच्यांचाही वाटा आहे. प्रत्येक राज्यात आळशी आहेत व कामसू आहेत. "ऊत्तर भारतीय मेहनती आहेत तर आपल्या राज्यात कलमडावे ना?? आळशी महाराष्ट्रात गरज काय त्यांची?" गरज नसेल तर आपसूक जातीलच. पण त्याना करोनाच्या काळात चार्टड फ्लाईटने पुन्हा बोलवावे लागले ह्यातच आळशी लोक कोण हे अधोरेखीत झाले. https://indianexpress.com/article/business/economy/economy-re-opening-firms-charter-aircraft-to-fly-back-workers-6480863/ Skilled labourers like carpenters and benders are mostly fro West Bengal https://timesofindia.indiatimes.com/city/mangaluru/builders-in-mangaluru-may-charter-flight-to-get-staff-back/articleshow/76827084.cms some real-estate firms have approached them to operate chartered trains to Bihar to fetch these workers https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/bengaluru-unlocked-top-builders-trying-to-bring-back-workers/articleshow/76293545.cms एक काम करा- कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स कोणत्या राज्यांतून आणाल ? हा प्रश्न देशातल्या मोठ्या बिल्डर्सना/फर्निचर,ईतर सामुग्री बनवणार्या व्यावसायिकाना विचारा.. मग उत्तर मिळेल.आळशी कोण व कामसू कोण ते..
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 11/26/2020 - 22:06

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स

कुशल सुतार/गवंडी/प्लंबर्स कोणत्या राज्यांतून आणाल ? >>> का महाराष्ट्रातील मराठी सुतार/गवंडी मेलेत का?? पाहीजे तितके दाखवतो. ऊत्तर भारतीय कमी पैशात राबतात म्हणून त्याना बिल्डर्स प्राधान्य देतात. कमी पैशात का राबतात तर बेसुमार मानवी पैदाशी मुळे त्यांच्या राज्यात कामे मिळत नाही. त्यांच्या राज्यात प्रशासन आणी कायद्याचे अतिशय व्यवस्थीत पालन होत असल्याने बायका किती सुरक्शीत असतात हे माहीतीय. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमी पैशात राबायचे. आता त्यांच्या राज्यात बेसुमार पैदास आहे म्हणून मराठी माणसाने कमी पैशात काम करावे असं म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Fri, 11/27/2020 - 19:24

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

@माईसाहेब

उगाच प्रतिसादाला उपप्रतिसाद रेटून दम नसलेली विधाने नकोत. मराठी माणसाने भले इतिहासात असेना का पण पाऊण भारत आपल्या अधिपत्याखाली आणला होता.पार अफगाणिस्तानपर्यंत.भय्यांनी लढाया करुन कधी असा पराक्रम केलाय का? हमाली टाईपची कामं करायला देशभरातून बोलावलं जाणं हा काही पराक्रम नव्हे.स्वस्त मजूर इतकीच यांची लायकी. मजूर भय्ये जे काम करतात ते काही रॉकेट सायन्स नव्हे फक्त त्यांनाच जमायला.पण स्वत:च वाढवून ठेवलेली लोकसंख्या पोसायला हवी.ती जबाबदारी टाळता येणार नाही म्हणून हे लोक १५-१६ तास काम करतात.हे सगळं करताना यांचा विकास काय झाला? गेली अनेक वर्षे हे भय्ये ही मजूर कामे करतात.पण लॉकडाऊनदरम्यान चालत चालत उत्तरप्रदेशात जावं लागलं.१५-१६ तास काम करुन आत्तापर्यंत मिळालेल्या पैशांचं काय केलं म्हणे? पण अजूनही यांना पैशाचं नियोजन जमत नाहीये.यांना स्वत:ला काय उपयोग झाला यांच्या 'कष्टाळूपणाचा?' मराठी माणसाने भाषा, साहित्य, कला अशा विविध विषयांमधे स्वकर्तृत्वाने प्रगती केलीय बरं का! (तुमचे ब्रिटीश आले नव्हते बरं का यासाठी.) भय्यांनी अशी काय प्रगती केलीय सांगा बघू? यांचे सिनेमे म्हणजे चावटपणाचे नमुने असलेले कंबरेखालची करमणूक असलेले भोजपुरी सिनेमे.ज्याला कलात्मक दर्जा अभावानेच असतो. जिकडेतिकडे हिंदी पसरवत असतात.ज्या राज्यात जातील तिथली स्थानिक भाषा शिकणे तर सोडाच पण स्वत:च्याच भोजपुरी,ब्रज,मैथिली,अवधि अशा बोलींसाठी लढण्याऐवजी दिल्लीतली खड़ी बोली उर्फ हिंदी डोक्यावर घेऊन फिरु लागले. मुसलमान आक्रमकांनी इतक्या अरबी,फार्सी,तुर्की शब्दांचा मारा केला,जबरदस्ती केली.महाराष्ट्रात शिवरायांनी या विरोधात राज्यव्यवहारकोश आणला,सावरकरांनी भाषाशुद्धी केली.भय्यांच्या राज्यात असं काही शुद्धीकरण घडलंय का? काही भाषाभिमानी आंदोलनं झालीयत का? हा यांचा मातृभाषेबद्दलचा अभिमान. बहुतांश भय्ये आर्थिक दर्जा चांगला असणार्‍यांसाठी इमारती बांधणे, नंतर त्याच इमारतीसाठी वॉचमन , माळी ,लिफ्टमन , सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणे हेच करु शकतात.यापुढे जायला जी अक्कल लागते ती यांच्याकडे नसते.तस्मात हमालीचे कौतुक ते कितीसे? यांच्यातलेच 'काही हुशार' नग (सगळे नव्हे) स्पर्धा परीक्षा वगैरे पास होतात.पण त्यातल्या कितीजणांनी स्वत:च्याच राज्याला सुधारण्यासाठी प्रयत्न केले? यांना शिक्षण,नोकर्‍या यांसाठी पंजाब ,गुजरात किंवा महाराष्ट्रासहित दक्षिण भारतच का लागतो म्हणे? तुम्ही म्हणता ब्रिटीशांनी केलेल्या सुधारणांच्या जीवावर मराठी माणूस बोलतो.मग युपि/बिहारमधे इंग्रज विकास करत नव्हते का? काहीच केलं नाही का इंग्रजांनी युपी/बिहारमधे? इंग्रजांचंच चुकलं.इंग्रजांनी कुटूंबनियोजनाचं महत्व जरी या भय्यांना पटवून सांगितलं असतं तरी भरपूर फायदा झाला असता देशाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 11/26/2020 - 18:31

In reply to कोणतेच कायदे पाळायचे नाहीत by Rajesh188

Permalink

राजेश १८८

नेमका प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com