कदाचित शब्द निरर्थक ठरले नसतील
पण ते पोचले नाहीत त्या अंतापर्यंत
काही ओळी ओसाड पडल्या खऱ्या
पण त्यांना तर वाटाच नाही सापडल्या
म्हणूनच तर मनातल्या पर्णरेखांना
डायरी जवळची वाटली
कारण त्यांना माहित आहे
मनातून उमटलेल्या सुरांचा प्रवास
चालू असतो निरंतर .....
प्रतिक्रिया
25 Nov 2020 - 11:21 am | Jayagandha Bhat...
मस्तच...