त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?
मराठी ही भाषाकुळानुसार 'इंडो-आर्यन' भाषाकुलात येते.म्हणजेच मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेला तेलंगण आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागाला जोडून असणारा प्रदेश कर्नाटक आहे.तेलंगणात तेलुगू तर कर्नाटकात कन्नड या भाषा बोलल्या जातात.कन्नड आणि तेलुगू या दोन्ही भाषा द्रविड या भाषाकुलात येतात.
उत्तरेकडून आर्यांच्या टोळ्या महाराष्ट्रात आल्या आणि येताना त्यांनी सोबत स्वत:ची संस्कृत भाषा सुद्धा आणली.ती महाराष्ट्रात पसरवली किंवा लादली किंवा देवाणघेवाणीतून पसरली असे समजू. या टोळ्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी सध्याच्या महाराष्ट्रात कोणतीतरी भाषा अस्तित्वात होतीच.ती जी कोणती असेल ती एखादी द्रविड कुलोत्पन्न भाषाच असणार हे तर उघड आहे.
आता प्रश्न असा आहे की आर्यांच्या टोळ्यांना द्रविड कुलोत्पन्न भाषा बोलणार्या प्राचीन महाराष्ट्रात संस्कृत भाषा पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? सोपं अशाकरता म्हणतो आहे कारण जे आर्य महाराष्ट्रात आले आणि संस्कृत भाषा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवू शकले की सध्याच्या महाराष्ट्रात प्राचीन काळी बोलली जाणारी द्रविड कुळातली भाषा पुसली जाऊन किंवा विरली जाऊन(नक्की काय तांत्रिक शब्द वापरावा?)तिथे इंडो-आर्यन गटातली संस्कृतोद्भव मराठी विराजमान झाली.पण हाच प्रकार महाराष्ट्राला चिकटून असणार्या सध्याच्या तेलंगण किंवा कर्नाटकात का शक्य झाला नसावा? आर्यांना संस्कृत भाषा महाराष्ट्रात पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? प्राचीन काळच्या कन्नड आणि तेलुगू भाषिक प्रदेशात संस्कृतचा मारा हा महाराष्ट्रात केला तितका करणे आर्यांच्या टोळ्यांना शक्य का झाले नसावे? त्यांना नक्की कशामुळे संस्कृत कन्नड आणि तेलुगूभाषिक प्रदेशात संस्कृत पसरवणे अवघड गेले? भौगोलिक कारणे होती की अन्य कारणे होती?
याला जोडूनच एक उपप्रश्न असा की एखादी भाषा इंडो-आर्यन गटात टाकायची की द्रविड गटात हे भाषातज्ज्ञ कसे ठरवतात? किंवा त्यांनी कसे ठरविले? काय निकष असतात याबाबत?
(मी इतिहासतज्ञ नाही किंवा भाषातज्ज्ञही नाही.या दोन विषयांची आवड असणारा साधा वाचक आहे.निवेदनात लिहिताना काही तांत्रिक किंवा माहितीतल्या चुका झाल्या असल्यास सुधाराव्यात.त्याबद्दल संबंधितांचा आभारी राहीन. _/\_)
प्रतिक्रिया
छान
छान
हो ना.. आम्ही सहिष्णू
१५० % आरक्षण मिळाले असते.
हे कुठं वाचलं?
गडबड ....
गा.पै. यांच्या प्रतिसादाखाली
गा.पै.तथ्य आहे.
हे सुद्धा
खरे काय कोण जाणे ?
चौकस २१२
छान
फारसी, अरबी, इत्यादि
ब्राह्मीपासून
ब्राह्मीचा पश्चिमेकडचा प्रवास
पोकळ बडेजाव
प्रिन्सेपची ब्राह्मी
शब्दच्छल सोडा
नवी लिपी आहे ना?
धागाविषयासंबंधी
कल्लोळ मराठी सुरचित कशी
सुरुवातीची फेज आहे ती
Pagination