Skip to main content

कंगना रानौत फेमिनीसम कि स्व प्रसिद्धी ?

लेखक हस्तर यांनी बुधवार, 02/09/2020 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लेख एकांगी वाटेल पण आहे ते आहे मॅडम पहिल्यांदा मध्ये दिसल्या गँगस्टर मध्ये ,तेव्हाच वाटले कि पुढे आयटम गर्ल होणार रासकल मध्ये अंतर्वस्त्रे दाखवली , लाईफ इन मेट्रो मध्ये उठवळ मुलीची भूमिका ,फॅशन मध्ये पण फॅशन चे प्रदर्शन तनु वेड्स मनू चालला ,पण त्यावेळी जवळपास दुसरा कोणताही हिट चित्रपट नव्हता क्रिश ३ मध्ये नंतर मॅडम चमकल्या ,ताणू वेड्स मनू return मध्ये एकट्याने क्रेडिट खाल्ला पण सुनील डोब्रियाल ,स्वर भास्कर आणि गाणे पण चांगले होते क्वीन वूमन लिब्रेशन खाली चालला रिव्हॉल्वर राणी ,सिमरन ,खुला सांड कोणी बघितला पण नसेल मणिकर्णिका ,फेमिनीसम .,अस्मिता ,देश भक्ती ह्यामुळे चालला मॅडम एवढी भांडणे का करत आहेत? चित्रपट सोडून राजकारणात उतरायचे आहे ? बरा नेपोटिसम ला विरोध एवढे दिवस नव्हता ,ह्रितिक शी भांडण झालयावरच का ? आणि मग स्वतःची बहीण का मॅनेजर ? लोकांना का एवढा पाठिंबा देवास वाटाटॊय ?

वाचने 6823
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

नट नट्या ना पहिली लोक नाच्या समजायची आणि समाजात त्यांना काडीची किंमत देत नसत. असे पण ठराविक 2 ते 3 लोक सोडली तर ह्यांचा समाजाला,देशाला काही उपयोग नाही. समाजानी ह्यांना डोक्यावर घेणे बंद करावे.

विष्णुपंत पाग्निस , तुकाराम झाले , ते तुकारामच राहिले शरद गोडसे नथुराम पोंक्षे झाला , मग तो नथुरामच राहिला आता ही झाशीची राणी आली

सुरुवातीला तिला कटु अनुभव आले असावेत असे आमचे मत. आता बर्यापैकी पैसा व स्थिरस्थावर झाल्याने दाबलेला राग बाहेर पडत असावा. हिंदी चित्रपटांत नव्याने येणार्या सर्वच मुलीना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. येथे तुम्ही आवाज उठवलात तर हकालपट्टि होते, पार्ट्याना हजेरी लावली नाही तरीही दिग्दर्शक. सहअभिनेता खट्टू होउ शकतो. कंगना ह्या सर्व दिव्यांमधून गेली व तिने यशस्वि होउन दाखवले. "मी चित्रपटांत काम करणार, येथेच राहणार व जे अयोग्य वाटते त्यावर आवाज उठवणार.. " ही तिची भूमिका असणार. महानायक्/अभिनयसम्राट वगैरे मिठाची गुळणी धरून असतात अनेक मुद्द्यांवर त्यापेक्षा ही खूप बरी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>> असे आमचे मत माई तुमचे हे कुठायत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>> असे आमचे मत माई तुमचे हे कुठायत?

राजकीय नेते शिक्षित नसतात म्हणून त्यांच्या वर टीका करणारे हे विसरतात राजकीय नेते हे mature असतात,त्यांना सर्व विषयाचे अनुभवाने ज्ञान असते. त्यांची भूमिका संयमित असते. ही बघा कंगना काय तिचे विचार बुध्दी नावाची वस्तू च तिच्या कडे नाही. कोणत्याच विषयात ज्ञान नाही. अर्धवट आहे.. आणि तिचे प्रतेक ट्विट वाचून विचार करणारे सू शिक्षित,शिकलेले तिला का पाठिंबा देतात हेच समजत नाही. हे शिक्षित अडाणी आहेत.