आठवणी..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
उगवत्या आणी मावळत्या सुर्याच्या वेळा वेगवेगळ्या भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतात हे समजायचं ते वय नव्हतं.
सकाळी उत्साहात उठून शाळेच्या गडबडीत असलेला मी जेंव्हा घरासमोरच्या अंगणात आजोबांच्या देवपुजेसाठी फुलं तोडायला जायचो ,झाडांच्या गर्दितुन पुर्वेकडे उगवलेल्या सुर्याची किरणं पाणी तापवायच्या बंबातुन निघालेला धुर कापत अंगणात यायची.त्या किरणांच्या फांद्यांमधुन डोकावणार्या सरळ रेषा अस्ताव्यस्त पसरलेल्या धुराला एका मर्यादेत आखताहेत असं वाटायचं.
तो धुराचा आणी किरणांचा खेळ बघत घाईघाईने फुलं गोळा करुन देउन मी घरामागच्या भिंतीवरुन उडी मारत शाळेत जात असे. बारा वाजता शाळा सुटली की जेवण करुन शिकवणी आणी नंतर हुंदडणे हाच एक दिनक्रम असायचा.
खेळण्या भटकण्यात दिवस छान जात असे.पण संध्याकाळी मावळतीच्या वेळेस का कुणास ठाउक उगाचच उदास वाटु लागे.वर्हंड्यातुन डोंगरा आड जाताना दिसणारा तांबडा भडक सुर्यगोल , गदगदुन येणारी कातर वेळ, अस्वस्थता सगळंच विचीत्र.
आजी ,काका विचारत असंत 'काय होतय ? ' .पण काही सांगायला गेलो तर ओठ थरथरु लागत ,रडु येइल या भितीने मी आवंढा गिळत गप्प रहात असे.तसं कारण त्यांनाही माहित होतं .त्या वयात आईची आठवण येणे हे खुप नॕचरल फिलींग होतं.दिवसभराच्या गडबडीत लक्षात न येणारी ती भावना नेमकी मावळत्या सुर्याची साक्षच का गृहित धरते हे कोडं अजुनही सुटलेलं नाही.बहुतेक म्हणुनच त्यावेळेला कातरवेळ असं नाव असावं .
लिहितानाही कातर झालोय
प्रतिक्रिया
:(
छान आहे
व्वा, मस्त लिहिलंय !
भावनिक करणारं लिखाण आहे पण
कोल्ड्रींक टाकून व्हिस्कीची