Skip to main content

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात. बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात. १५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो. रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे. आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे. करोना विषाणू पासून आपला बचाव-- १) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे २) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे ३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती . स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती तर करोना मध्ये हि १-२ % आहे मग आज इतकी भीती का पसरली आहे ? सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते. वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे. हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे. त्यात माझे कर्तृत्व काही नाही. पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल. लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 148341
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

त्यांची गल्लत झाली असेल. असेही नागिनिवरील लस ही ५० वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी असून तिचा प्रभावही मर्यादित काळासाठी आहे. पूर्णपणे संरक्षण नाहीच.

लस निर्माण करण्यात माणसं नी यश मिळवलं आहे. अनेक विषाणू जन्य रोगांवर लस शोधण्यात यश प्राप्त केले आहे. लसी चे विविध प्रकार असतात(ह्या विषयी डॉक्टर च सांगतील) पण मला माहित असलेली माहिती अशी आहे. अर्ध मेले रोग कारक जिवाणू ,विषाणू शरीरात सोडले जातात आणि आपल्या प्रतिकार शक्ती ला त्याची ओळख करून दिली जाते. मग प्रतिकार शक्ती स्वतचं रोग नष्ट करण्यास सक्षम होते. लस निर्माणच होणार नाही ह्याची सविस्तर कारण कुबेर ह्यांनी जगभरातील लेख वाचून दिली पाहिजे होती. पण तशी त्यांनी दिली नाही. अर्धवट आपल्याला हवी तीच माहिती देण्याची आणि दुसरी बाजू झाकून ठेवण्याची त्यांची जुनी खोड आहे.

In reply to by Rajesh188

लस निर्माणच होणार नाही ह्याची सविस्तर कारण कुबेर ह्यांनी जगभरातील लेख वाचून दिली पाहिजे होती
लस निर्माणच होणार नाही असा त्या लेखाचा अर्थ काढणार्‍या व्यक्तीची भाषेची समज संशयास्पद आहे. "लस निर्माण होईलच असे नाही" = "लस निर्माणच होणार नाही" असा समज करुन घेतला जात असेल तर कठीण आहे.. !!

करोनाचा प्रसार वाढल्यानंतर केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अ‍ॅप विकसित केलं. हे अ‍ॅप लोकांनी वापरावं, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील लॉकडाउन वाढवण्याविषयी जारी केलेल्या सूचनांमध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदारांनी हे अ‍ॅप वापरावं, असे सक्ती आदेश दिले होते. काही ठिकाणी हे लोक अ‍ॅप वापरत नसल्याबद्दल पोलिस कारवाई देखील सुरु केलीय. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी सवाल केला आहे. आता या वरूनही वादंग सुरु होण्याची शक्यता आहे आरोग्य सेतू अ‍ॅप’ची सक्ती का करत आहात?

In reply to by चौथा कोनाडा

आरोग्य सेतू अ‍ॅप किती उपयोगाचं आहे त्याबद्दलही शंका आहेच. आता माझ्या गावात एक किलोमिटर अंतरावरील असलेल्या उपजिल्हारुग्णालयात पाच रुग्न कन्फर्म बाधीत आहेत आणि अ‍ॅपवर फक्त एकच दिसत आहे. आता युजर म्हणून आपण आपली निरोगी माणसांची माहिती अपडेट करतो पण रुग्णाची माहिती कोण अपडेट करेल. सर्व रुग्णांची माहिती अपडेट डाटा डिपार्टमेंट ऑफ हेल्थ करणार. आता माझ्या तालुक्याच्या गावी असलेल्या रुग्णालयातल्या रुग्णांचा डाटा तिकडे जाईल आणि मग माहिती अ‍ॅपवर येईल. खरं तर रुग्णाच्या मोबाइलवरुन जर ती माहिती भरल्या गेली असती तर त्या इफेक्टेडची रुग्णाची माहिती अपडेट झाली असती आणि लोकेशन द्वारे रुग्ण कुठे आहे, त्याची माहिती मिळत गेली असती. पण तसे काही त्यावर दिसत नाही. असो. चालायचंच. सर्वांनी काळजी घ्या. घरीच राहा. विनाकारण बाहेरु पडू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरीच गोर गरीब जनता अद्याप स्मार्ट फोन वापरत नाही. मग हे अ‍ॅप त्यांच्यापर्यंत कसे काय पोहोचणार ?

In reply to by मराठी_माणूस

विचार करायला चालना मिळत राहते. लिंक बद्दल आभार. आपल्याकडे आहेच आज रात्री ठीक आठवाजता आहेच भाईयो और बहनो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by मराठी_माणूस

लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर डोक्यावर पडला आहे . चीन,अमेरिका इटली ह्या देशांची काय अवस्था झाली आहे हे त्याच्या बत्थड मेंदूत खुसत नाही. अशी जर प्रतिकार शक्ती विकसित होत असती. सर्व संशोधन बंध करून फक्त रोगाचा प्रसार केला की जग रोग मुक्त झाले असते. त्या कुबेर ला इंजेक्शन मधून व्हायरस टोचून त्याची प्रतिकार शक्ती वाढत आहे हे बघायचे आहे. आणि हीच माझी मागणी आहे.

In reply to by मराठी_माणूस

"संपादकाने " जरा अजून जगभर बघून मग लिहिले असते तर बरं झाले असते .. -त्या देशातल्या करोनाबाधितांची संख्या आहे २६,३२२ आणि त्यातले ३,२२५ इतके जण प्राणास मुकले. त्या देशाची लोकसंख्या आहे जेमतेम सव्वा कोटी म्हणजे धोरण बोंबललेच किहो .. उदाह्रणसकट दाखवतो ऑस्ट्रेलाई ची लोकसंख्या २.७ कोटी एकूण बळी ११० च्या आसपास.. तेवहा येथील धोरण स्वीडन पेक्षा यशस्वी आणि ते कोणते तर पूर्ण नाही तरी बरेच निर्बंध , म्हातार्यांन फक्त घरी आणि "सुदृढांना " मोकळे सोडा असला मूर्खपणा येथे नाही.... - ‘‘घरी बसा, देश वाचवा’’ अशा प्रकारच्या कोणत्याही हास्यास्पद .." हास्यास्पद? कुबेरांना मुसक्या बांधून न्यू यॉर्क मध्ये हिंडवले पाहिजे मग कळले असते -"याचा अर्थ सरळ आहे. जितकी टाळेबंदी कठोर तितके बळींचे प्रमाणही अधिक." अरे काय याड लागलाय का याला...

In reply to by मराठी_माणूस

''एकाही देशाने टाळेबंदी जाहीर करण्याआधी आपण त्यातून बाहेर कसे पडू याचा क्षणभर तरी विचार केला नसेल' हे वाक्य आवडलं. आपल्याकडे तर आता ४.० ची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या काळजीचा विषय आहेच. पुढे जीवनमान सुरक्षित कसे होतील त्यासाठी भविष्यातील उपाययोजना ? यातून बाहेर कसे पड़ायचे त्यावर अजुन काहीच हालचाली दिसत नाहीत, ते आवश्यक आहे. लिंकबद्दल आभार...! -दिलीप बिरुटे

हर्ड ईम्युनीटी चा प्रयोग कुबेरांनी नव्हे तर स्वीडन ने केला आहे. त्याचे रिझल्ट काय मिळतात हे लवकरच कळेल. सध्यातरी त्या देशात कोरोना बराच नियंत्रणात आला आहे .

In reply to by ऋतुराज चित्रे

हर्ड ईम्युनीटीचा प्रयोग कुबेरांनी केला आहे असं कोण म्हणत आहे ? असे प्रयोग कुबेरांनी कधी पासून सुरु केलेत ?

In reply to by ऋतुराज चित्रे

आपला मुद्दा सिद्ध करायला काहीच्या काही लिहिणे हा आता कुबेरांचा आता स्थायीभाव झाला आहे लोकसंख्येची घनता भारतात एक १ चौरस किलो मीटर ला ला ४६४ आहे तर स्वीडन मध्ये १ चौरस किलो मीटर ला २५ आहे आणि मुंबईचीलोकसंख्येची घनता २२ हजार ५०० आहे आणि धारावीत १ चौरस किलो मीटर ला २ लक्ष ७७ हजार. साधा हिशेब करा एक मीटर अंतरावर माणसे उभी करायची तर एक चौरस किमी म्हणजे ३३ x ३३ मीटर अशा हिशेबाने उभी केली तर १००० माणसे उभी राहतील. स्वीडन मध्ये २५ च माणसे आहेत. मुंबईत २२हजार ५०० आणि धारावीत २ लाख ७० हजार. With a population density of over 277,136/km2 (717,780/sq mi), Dharavi is one of the most densely populated areas in the world. (विकी) अशी स्थिती असताना सामाजिक अंतर ठेवणे किती शक्य आहे याचा लोकानीच विचार करावा. मानवी विकास निर्देशांकात स्वीडन ८ वा आहे आणि भारत १२९ स्वीडनचे दरडोई उत्पन्न ४८ हजार डॉलर्स आहे तर भारताचे ६ हजार ८०० आहे. तुलना करण्यासाठी कोणताही देश निवडायचा आणि टीका करायची. अर्थात त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वाना माहिती आहे. एके काळी अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे कुबेर आता मात्र असले भंपक लेख /असली भंपक तुलना करून आपली विश्वासार्हता मात्र घालवून बसले आहेत.

माधव गडकरी आणि भरत राऊत सोडले तर लोकसत्ता चे सर्व संपादक अती हुशार च होते. नेहमी जगाच्या पुढचा विचार करायचे. त्यांचे विचार वर्तमान काळाला. कधीच लागू होत नाहीत.. सर्व हजार वर्ष जगाच्या पुढे.

मी योगा योगाने गोदरेजच्या ईझी लिक्वीड डीटर्जंट बद्दलच्या वेबसाईटला भेट दिली. https://www.godrejezee.com/en त्यात इतर डिटर्जंटप्रमाणे सोडा नसल्याचे म्हटले आहे. सोड्याचा आणि वीषाणू मरण्याचा संबंध मला कल्पना नाही. viruses ani bacteria var itar regular detergent evedhech effective asel kaa ? jankarankadun mahiti Havi

हात धुवायच्या साबणात पण सोडा नसतो. स्वच्छतेसाठी साबण महत्त्वाचा. सोड्याचा उपयोग पाणी मृदू करण्यासाठी आणि पाणी अल्कालाईन बनवण्यासाठी होतो. इझी साबण कोव्हिडं साठी चालेलंच पण महाग पडेल. साधा लाईफबॉय वापरा स्वस्त आणि मस्त

या होमिओपथिक डोसबद्दल काही चर्चा होवू शकेल का ? मुंबई महापालिका या औषधाचे काही ठिकाणी वितरण करणार आहे. (संदर्भ)

जिज्ञासू/जाणकारांनी जरूर करावी कुणाच्याही कोंबड्याने का होईना पण उजाडल्याशी मतलब मला होमिओपॅथीतील काहीही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगण्यात असमर्थ आहे. क्षमस्व

ह्या लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे. जिथे जगातल्या मोठमोठ्या वैद्यकीय संस्था पण कोरोना बद्दल काहीही मत मांडायला धजावत नव्हत्या तिथे ह्या महाशयांनी लेख लिहायची घाई करून चुकीची विधान केली आहेत. आत्ता भारतातली कोरोना परिस्थिती पाहता ह्या लेखातला फोलपणा लक्षात येईल. माझी प्रशासकांना विनंती आहे की हा लेख अप्रकशाती करावा. लेखात तोडलेले तारे खाली देत आहे. 1. आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. 2. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. 3. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by झम्प्या दामले

जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी आपल्या भूमिका बदललेल्या त्यामुळे अनेकदा त्यावरुन अनेकांनी आपली मतं बदलली किंवा बदल करावे लागले ही सर्व सुरुवातीची मतं आहेत त्यामुळे थोडं उन्नीस बीस चालायचच पण त्यांची धाग्यातील इतर माहिती उपयुक्तच आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने लस विकसित केली आहे. या लसीच्या चाचण्या सध्या सुरु आहेत... एक बातमी https://www.loksatta.com/desh-videsh-news/experts-see-progress-as-oxfor… -दिलीप बिरुटे

आपल्या भावाला ज्या खस्ता खाव्या लागल्या त्याबद्दल सहानुभूती, आणि आपणं म्हणता कि "भारताची महाप्रचंड लोकसंख्या ह्याला कारणीभूत आहे." हे हि अगदी बरोबर. तसेच सरकारचं धरसोड नियमावली मुले अश्या छोट्या उद्योजकाचे नुकसान होते हे हि दुर्दैवी ( रस्त्याकडेच्या बारवर बंदी आली एकदम असे धोरण बदलणे ) परंतु काही कठोर सत्य आहेत ती टाळू नाही शकत -"धंदा करायचा तर बँका अजिबात कर्ज देत नसतात.": बँक हे वयसाय आहेत त्यांना त्यांच्या भागधारकांना तोंड द्यावयाचे असते त्यामुळे ते असे सहसासहजी कर्ज देत नाहीत आणि देणार नाही फक्त सरकार हे करू शकते पण त्याला पण मर्यादा आहेत - सरकार नि खूप काही द्व्यावे हि अपेक्षा जर असेल तर एकदा आपल्याला हा हि विचार करावं लागेल कि सरकार पैसे आणणार कोठून ? ज्यांना आयकर भरणे जरुरीचे आहे आणि शक्य आहे ते टाळतात ..भारताला काही खनिज संपत्ती सारखी लॉटरी लागली नाहीये आणि जिथे गरीब देशात अशी लागली आहे ( इंडोनेशिया) तिथे सुद्धा ते धन गरिबांपर्यंत पोचत नाही .. -आयटी आयला अद्मिशन मिळाले नाही ओपण मध्ये असल्याने. " ओपन नॉन ओपन हा विषय तर ना काढ्लेलाच बरा! नाही का! - "आयटीआयला १०वी नापास झालेल्या तरुणाला सुद्धा अद्मिशन मिळायला हवे"...जरी तांत्रिक शिक्षणाचा प्रसार झालं पाहिजे हे मान्य असले तरी असा प्रवेश देणं हे काही योग्य नाही .. मग कशालाच काही धरबंध राहणार नाही .. सरकारने आपलं पैसे हे शिक्षण स्वस्त करण्यात घालावा हे बरोअबर पण याचा अर्थ असा होत नाही कि शिक्षणाचा दर्जा घसरवावा ...मग त्या आयटीआय ल काही अर्थ उरणार नाही - गेली २०-३० वर्षात हे मात्र म्हणता येईल कि अनेक क्षेत्रात भारतात संध्या उपलब्ध झाल्या आहेत/ अनेक उद्योग धंदे नवीन उघडले आहेत याची लांब यादी होईल त्यात इंटिरियर डिजाईन , माल साठवणी आणि वाहतूक ( सप्लाय चेन ) इत्यादी त्याआधी परिस्थती अजून अवघड होती ( पूर्वी फक्त २ गाडी निर्माते आणि २ ट्रक निर्माते होते , महाराष्ट्रात फक्त ९ ठिकाणी इंजिनीरिंग ची पदवी घेता यायची इत्यादी )

In reply to by चौकस२१२

बँक हे वयसाय आहेत त्यांना त्यांच्या भागधारकांना तोंड द्यावयाचे असते त्यामुळे ते असे सहसासहजी कर्ज देत नाहीत
https://www.loksatta.com/desh-videsh-news/banks-technically-write-off-o… ह्या केसेस मधे काय झाले होते ?

In reply to by मराठी_माणूस

अगदी खाजगी बँक सुद्धा चुकीची कर्जे देतात .. तो त्यांचा जोखीम पत्करण्याची व्यसनाचा भाग असतो त्याचा फटका त्यांना असं अबसूं शकतो .. आणि त्यात जर बँक निम सरकारी असेल तर अधिकारी वर्गावर तेवढा टॅन नसतो जेवढा स्पूर्ण खाजगी बँकेवर असतो.. माझा मुद्दा हा आहे कि बँक कर्ज देतं तपासून घेतात तेवहा ते नैसर्गिक आहे त्याबद्दल टँकर कशी . तो धंदा आहे .. हा त्यात कुशीत जास्त व्याज दार किती असावा यावर सरकार नियम करू शकते किंवा आमूलाग्र बदल करायचा तर देशाचे बँकेचे कायदे बदला आणि "समाजहिताची कर्जे" खाजगी बँकांनी दवयवीत असे फर्मान काढा... मग बघा काय होते ते . परवडत असेल तर बँक देशात वयसाय करतील नाही तर बंद होतील पण खाजगी व्यसायाकडून ( खाजगी बँक) तुम्ही कर्ज का देत नाही या प्रश्नाला काय अर्थ ..

वटवाघूळ कडून corona virus Manvi शरीरात आला असे मानले जाते. त्या पहिल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर त्यांनी स्वतःची उत्पत्ती केली म्हणजे ती त्या व्हायरस ची मानवी पेशीत निर्माण होणारी पहिली पिढी असेल ना? असं प्रतेक शरीरात प्रवेश करून जी चैन निर्माण झाली ती त्या व्हायरस ची पुढची पुढची पिढी च ना? मग चक्रातून जाताना मूळ व्हायरस च्या रचनेत फरक पडत असेल ना. . उत्क्रांती वादाचा सिद्धांत प्रमाणे. मग हळू हळू तो निष्क्रिय तरी होईल किंवा जास्त आक्रमक तरी होईल हा विचार योग्य आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा- कोरोनाची दुसरी लाट येत आहे, रुग्णांची संख्या कमी होतीये असे गृहित धरू नका https://divyamarathi.bhaskar.com/news/who-coronavirus-news-world-health… -दिलीप बिरुटे

कोरोनाशी कसं लढायचं ते आता पाकिस्तान उत्तरप्रदेशचे मु.म. योगी आदित्यनाथांपासून शिकणार. कोरोनाशी कसं नाही लढायचं ते आता पाकिस्तान महाराष्ट्राचे मु.मं. उद्धव ठाकरे यांचेपासून शिकणार. इति सकाळ ०९/०६/२०२० :) https://www.esakal.com/global/yogi-adityanathna-appreciation-newspaper-… सकाळने बातमी काढून टाकायच्या अगोदर वाचून घ्या. ;)

In reply to by शाम भागवत

https://twitter.com/Fahdhusain/status/1269650837967691777 इथे महाराष्ट्र व पाकिस्तानचा ग्राफ पहायला मिळेल. पाकिस्तानची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. पण जिडीपी वगैरे बाबतीत पाकिस्तान महाराष्ट्राच्या मागे आहे. मुंबई व कराची दोन्हींना आर्थिक राजधानी समजली जाते. त्यामुळे दोन्हीकडे झोपडपट्या आहेत. :) आणखी बरीच माहीती चार्टमधे आहे.

करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. तत्संबंधी लेख शोधंत होतो. अमेरिकेवरील लेख सापडला एकदाचा (इंग्रजी दुवा) : https://www.anti-empire.com/mind-virus-19-and-the-government-killed-350… Enjoy! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

लोकहो, करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात वगैरेचा झटका येऊ शकतो. हा निष्कर्ष मुंबईच्या केईएम रुग्णालयात झालेल्या अभ्यासावरून काढला आहे. संबंधित बातम्या : १. https://www.esakal.com/mumbai/these-type-covid-patients-has-more-risk-h… २. https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-news-corona-patients-risk-blo… करोना हा फ्लू सारखा आजार आहे. फ्लू मुळेही असंच रक्त दाट बनतं. मला स्वत:ला फ्लू मुळे किमान एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) बसवण्यात आली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी ( म्हणजे २०१९ साली ) ऐन फ्ल्यूच्या मौसमात म्हणजे जानेवारीत घडला. डिसेंबर ते मार्च हा युरोपात फ्ल्यूचा मौसम मानला जातो. हेच जर या वर्षी घडलं असतं तर इथे इंग्लंडमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा असूनही करोनाच्या थोतांडापायी मी गचकलो असतो ना? मुंबईत असे अनेक रुग्ण योग्य उपचारांच्या अभावी दगावले आहेत. भारत/महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? तर सांगायचा मुद्दा असा की विकारप्रवण लोकांना करोनामुळे अतीव काळजी घ्यायची गरज आहे. धडधाकट माणसाला विलगीकरणाची अजिबात गरज नाही. करोना अंगात सापडलेल्या सरसकट सर्वांना विलगीकरण केल्याने आरोग्यसेवेवर अपरिमित ताण पडतो. त्यामुळे गंभीर रोग्यांना वेळेवर उपचार मिळंत नाहीत. ही परिस्थिती विकारप्रवण व्यक्तींसाठी प्राणघातक आहे. हा मुद्दा बऱ्याच आधी मांडलेला होता. हळूहळू त्यास स्वीकृती मिळते आहे. ज्यांना त्रास होतो आहे केवळ अशांनाच रुग्णालयात हलवून अतिदक्ष पातळीचे उपचार केले पाहिजेत. साहजिकंच टाळेबंदी हे महाथोतांड आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by माहितगार

हा विषय एका प्रतिसादाचा नसून एका लेखमालेचा आहे. त्यातून आज जी माहिती उपलब्ध आहे त्यातील २० टक्के सुद्धा तीन महिन्यांपूर्वी उपलब्ध नव्हती. त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने असे करायला हवे होते तसे करायला हवे होते हे आता सांगणे हि पश्चातबुद्धी आहे. महाराष्ट्रात सरकारच्या काय चुका झाल्या आणि काय करायला हवे होते हे सांगणे फार सोपे आहे. तशीच स्थिती केंद्र सरकारबद्दलही म्हणता येईल. अर्थात त्याला राजकीय रंगही दिला जाईल. जो इतर काही धाग्यांवर स्पष्टपणे दिसतो आहे. पण आता असे करायला हवे होते तसे करायला हवे होते हे सांगणे म्हणजे दीड शहाणपणा होईल. यासाठी मी यावर टिप्पणी करण्यास नम्र पणे नकार देत आहे. क्षमस्व

In reply to by सुबोध खरे

हा श्वसनमार्गे संसर्ग करणार्‍या वीषाणूंचा शेवटचा पँडेमीक असणार असल्याची खात्री आपण आत्ताच देऊ शकतो ? किंवा ही शेवटची आपत्ती व्यवस्थापन परिस्थिती आहे ? जर नसेल तर , आले वारे गेले वारे करून, शिकण्याची संधी का घालवायची की जे झाले यातून काही शिकायचे ?

In reply to by गामा पैलवान

धडधाकट माणसाला विलगीकरणाची अजिबात गरज नाही. करोना अंगात सापडलेल्या सरसकट सर्वांना विलगीकरण केल्याने आरोग्यसेवेवर अपरिमित ताण पडतो. हि वस्तुस्थिती नाही. 43% of Covid patients in India who died had no comorbidities: Govt analysis while over half of the deaths are occurring among senior citizens — a group that has been repeatedly asked to stay at home even after the unlocking process began — there is a significant proportion of mortality in the 45-59 age group. https://theprint.in/health/43-of-covid-patients-in-india-who-died-had-n…

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर,
43% of Covid patients in India who died had no comorbidities: Govt analysis
ज्याअर्थी ४३ % मृतांना पूर्वव्याधी नव्हत्या, त्याअर्थी करोनाने त्यांच्यात असे काही बदल घडवले की ते प्राणघातक ठरले. हे बदल नेमके कोणते? तर करोनामुळे रक्त दाटून अधिक गुंतागुंत उत्पन्न होणे, हृत्कोषास (पेरीकार्डीयम) सूज येणे, मधुमेह नव्याने उत्पन्न होणे असे विविधांगी आहेत. करोनामुळे हृत्शूल होऊन मृत झालेले अनेक रोगी योग्य उपचार मिळाले असते तर वाचले असते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या मते सर्वांना सरसकट विलग करून ठेवण्यापेक्षा ज्यांना त्रास होतो आहे अशा आणि केवळ अशाच रुग्णांवर अतिदक्ष रीतीने उपचार व्हावेत. अशा अर्थाचा एक लेख इथे सापडला : https://milindwatve.home.blog/2020/07/13/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b5%e0… . या लेखाचा लेखक जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे. आ.न., -गा.पै.

है दोन्ही संक्रमित एकाच पद्धती नी होतात. एकाच प्रकारच्या पेशी वर हल्ला चढवतात. श्वसन यंत्रणा ह्यांची टार्गेट असते. लक्षण सामान असतात. प्रोटीन्स सुद्धा सामान असतात ह्या मुळे मानवी पेशींना चिकटत . वटवाघूळ हाच मुल स्तोत्र आहे. ह्या दोन्ही व्हायरस मध्ये एवढी समानता आहे तर. Covid 19 हा व्हायरस अपरिचित आहे ह्या वाक्याचा अर्थ काय?