Skip to main content

नाहि बरे...

लेखक jenie यांनी शुक्रवार, 03/04/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
अप्सारानी श्वापदाना भाळाणे नाही बरे.. माणसानी माणसाना टाळणे नाही बरे.. चुकवली जरी उत्तरे नशिबाने कधी.. वेदनानी वेदनाना जाळणे नाही बरे.. दाखावली 'करुणा' पारध्याने कधी.. हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.. नाकारली जरी कवीता रसीकानी कधी.. अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे.. ग्रिष्र्माच्या झेलुन ज्वाळा सावली झाले कधी.. श्रावणाच्या ऐनवेळीचे वागणे नाही बरे.. अज्ञाताच्या गर्दिला तु वाहतो श्रद्धांजली.. यादीत त्या नाव माझे गाळणे नाही बरे.. मेलो जरि असलो आम्ही कधी काळी .. असे सहज आम्हाला तुम्ही विसरणे नाही बरे.. स्वर्गाच्या ऐवजी नरकत गेलो आम्ही कधी .. नावाच्या अलीकडे 'स्व' लावणे नही बरे..
लेखनविषय:

वाचने 2057
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान.. ! आहे... आवडली...

वा खुप आवडली कविता.

मात्र टंकलेखनाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका टाळता आल्या तर पाहा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by प्रमोद देव

>>मात्र टंकलेखनाच्या चुका टाळता आल्या तर पाहा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. असेच म्हणतो.

jenie , कवीता छान आहे .. टंकलेखनाची सवय लावावी मग हळू हळू तुम्हाला ही जमेलच ~ वाहीदा

मी एक लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत केला होता, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते. आणि या पुढे टंकलेखनाचा सराव करेन.

"दाखावली 'करुणा' पारध्याने कधी.. हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.." :-) कविता आवडली !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नाकारली जरी कवीता रसीकानी कधी.. अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे.. कविता छान आहे...आवडली

मलाही वरच्या दोन ओळी जास्त आवडल्या. कविता तर छानच आहे सगळी. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}