Skip to main content

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 01/10/2019 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९ च्या नव्या पानावर आपणा सर्वांचे स्वागत ! या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण आपण साजरे करणार आहोत त्यामुळे एकंदरीत महिना आनंदाचा असेल अशी आशा बाळगतो. वैयक्तीक रित्या मला स्वतःला हा महिना नेहमीच त्रासाचा जातो. व्यवसाय करणार्‍याला अनेक जणांना खुश ठेवावे लागते. दिवाळी हा महिना ग्राहकांना भेट देण्याचा महिना असतो. त्यामुळे घरातील खरेदी, ग्राहकांना द्यायच्या भेटींची खरेदी ह्यात आर्थिक नियोजनाचा कस लागतो. बरेचसे ग्राहक कॉर्पोरेट क्षेत्रातील असल्यामुळे देण्यात येणार्‍या भेटवस्तू देखील त्या दर्जाच्या असाव्या लागतात. बर्‍याच उद्योगांच्या पॉलीसीनुसार कर्मचार्‍यांना आपल्या विक्रेत्यांकडून एका ठराविक प्रकारच्या / किमतीच्या वरच्या भेटवस्तू घेता येत नाहीत. बर्‍याचशा उद्योगांनी आपल्या कर्मचार्‍यांना अशा भेटी स्वीकारू नयेत असे धोरण बनविलेले असते मात्र हे सगळे असले तरी भेटवस्तू न देण्याच्या पर्याय अजूनतरी भारतीय विक्रेत्यांना १००% उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. भेटवस्तू स्वीकारणारे देखील उघड अपेक्षा ठेवत नाहीत मात्र दिवाळी आली की मनातून अपेक्षा ही असतेच. हितसबंध जपणे हा भेटवस्तू देण्यामागचा मुळ उद्देश्य असला तरी काही ग्राहक खरोखरीच इतके चांगले असतात की त्यांना भेटवस्तू देता यावी असे व्यावसायिकांना मनापासून वाटते. भेटवस्तू विकत घेताना डोक्याला खुपच ताण द्यावा लागतो. ती वस्तू अगदी हलकी वाटली नाही पाहिजे, अगदी महाग नको, आपल्या खिशालाही परवडली पाहिजे, एकंदरीतच उभयतांना आनंद झाला पाहिजे ह्यासाठी खुपच कसरत करावी लागते. अगदी वर्षभर नियोजन केले तरी शेवटच्या क्षणी मन म्हणेल आणि खिसा होकार देईल अशीच वस्तू खरेदी केली जाते. पुर्वी मिठाई वाटण्याचा प्रघात होता मात्र विषबाधेच्या वाढत्या बातम्या, भेसळ इत्यादींमुळे मिठाईचे मार्केट सध्या कमी झाले आहे.त्याची जागा विविध आकर्षक चॉकलेटसने घेतली आहे. सुंदर सुंदर वेष्टनांत पॅक केलेली चॉकलेटस मनाला भुरळ पाडतात. वेष्टन मोठे आणी आतमधे कमी प्रमाणात माल असलेली चॉकलेटस भेट देणे हाच मला सध्या योग्य पर्याय वाटतो. ग्राहकाला भेट देताना कर्मचार्‍यांना विसरुन चालत नाही. मी प्रथमपासूनच कर्मचार्‍यांना नियुक्त करतांना माझ्याकडे बोनस मिळत नाही हे सांगूनच कामाला ठेवतो त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होत नाही मात्र दिवाळीत भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो. मागील काही वर्षांपासून मी स्वतःच १०-१२ वस्तू निवडून एक "गिफ्ट हँपर" बनवतो. त्यातील वस्तू रोजच्या उपयोगातील पण थोड्याश्या 'लक्झरी' वर्गातील असतील अशा असतात. आधी ग्राहक, मग कर्मचारी यांच्यानंतर आई-वडील, बहीण,भाचा, मुलगा आणि बायको आणि यांचा अनुक्रम येतो. त्यांची खरेदी झाल्यावर मग पैसे उरलेच तर स्वतःची दिवाळी असा क्रम असतो. कधीतरी (केवळ) दुसर्‍यांच्या आनंदातच आपला आनंद सामावलेला असतो या उक्तीचा आनंद घेता येतो. मी स्वतःबद्द्ल लिहिले असले तरी थोड्याफार फरकाने प्रत्येक कुटूंबप्रमुखाची हीच कथा असते यात शंका नसावी. धागा चालू घडामोडींचा असला तरी दिवाळी निमित्ते भावनावेगाने फारच अवांतर झाले. आता मुद्यांकडे येऊया.... १. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आजपासून त्यांच्या सुनावणी सुरु होतील. २. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल बहुधा आज लागेल. ऐन निवडणूकीच्या वेळेत निकाल लागला तर कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे बघणे रोचक ठरेल. ३. सरकारने कांदा महाग झाल्यामुळे त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांनी हे सरकार शेतकरीविरोधी आहे असा आरोप केला आहे. एकंदरीत कधी कधी सरकार चालविणार्‍या पक्षापेक्षा विरोधी पक्षात बसणे मजेचे असते असे वाटते. ४. देशभरात मंदीची ओरड चालू असताना मारुती रोज नवेनवे मॉडेल बाजारात उतरवत आहेत, मॉरीस गॅराज, किया सेल्टोज सारख्या नवीन कंपन्या भारतात येत आहेत. मॉरीस गॅराज ने तर मंदीच्या काळात देखील आपल्या हेक्टर या गाडीची किंमत २०,००० रुपयांपासून वाढविली आहे असे वाचनात आले. ५. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण असून वस्तूंच्या मागणीतही घट झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र आपल्या फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं समोर आलं आहे. शनिवारपासून ॲमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची सुरूवात झाली. यादरम्यान केवळ 36 तासांमध्ये ॲमेझॉनकडून 750 कोटी रूपयांचे मोबाईल विकल्याचा दावा करण्यात आला आहे. तर फ्लिपकार्टनंही सुरू केलेल्या ‘बिग बिलियन डे’ च्या पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षाही अधिक नफा मिळवल्याचा दावा केला आहे. हे ७५० कोटी रुपयाचे मोबाईल खरेदी करणारे कोण आहेत ? मी सरकारच्या पक्षाचा किंवा विरोधक नाहीये पण मला खरोखरीच प्रश्न पडतो की खरोखर मंदी आहे काय ? एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ? माझ्याकडे देखील स्वतःची गाडी आहे पण आजकाल गाडी रस्त्यावर काढायची हिंमत होत नाही, खड्डे, ट्राफिक जाम मुळे मुंबईच्या कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जायचे तर कमीत कमी २-२.३० तास सहज निघून जातात. खिशात पैसे असले तर ओला उबेरचा वापर केला जायचा मात्र सध्या शहरात सिटीप्लो, गोक्रुझ, शटल सारख्या वातानुकुलीत बसेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. १००-१२५ रुपयात घरापासून बर्‍याच ठिकाणी प्रवास करता येतो त्यामुळे हा पर्याय जास्त आकर्षक वाटतो आहे. मेट्रोचा प्रवास हा देखील एक आरामदायक पर्याय आहे. सध्या त्याचा आवाका कमी असला तरी ४-५ वर्षात बर्‍याच ठिकाणी मेट्रोचे जाळे पसरले असेल तेव्हा गाडीची गरज कितपत भासेल ही शंका आहे. असो. तर नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ता. क. दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहे. दिवाळी विशेषांक आला रे आला की मी नेहमी एक प्रश्न विचारतो की आता याची पीडीएफ आवृत्ती कधी ? सं.मं. यावर्षी सुरुवातीलाच पीडीएफ अंक प्रकाशित करुन आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देईल काय ? पीडीएफ अंक जपून ठेवणे, ऑफलाईन वाचता येणे, मित्रमंडळींना पाठवून मिपाचा प्रसार करणे या कामी उपयुक्त ठरतो.

वाचने 59831
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

अर्रे व्वा !! मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो ? आता पर्यंत अगदी ठाम पणे म्हणत होते तुम्ही !! ओ भक्त डँबिस००७ साहेब मी असे कुठे म्हणालो होतो दाखवाल का??? ओ आपल्या भारताची अर्थ्व्यवस्था export oriented नाही आहे तर Domestic consumption वर जास्त करुन चालणारी आहे. आपल्या देशात खुप सण साजरे केले जातात जे खरेदीला प्रोस्ताहन देतात. त्यामुळे भारतात सध्या स्लो-डाउन असले तरी मंदी येण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या स्लो-डाउन मध्ये सरकाचा वाटा ५० टक्के आहे कारण की नोटबंदीचा चुकलेला निर्णय व घाईत केलेली सदोष GST ची अंमलबजावणी. ह्या दोन निर्णयाने आपल्या अर्थ व्यवस्थेला फटका बसलेला आहे.

UP DGP, OP Singh said, "A joint team of UP and Gujarat Police has detained 3 persons & interrogating them. Their names are Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. Two other accused were also detained but released later, they are being monitored." The gruesome murder of the president of a little-known Hindu Samaj Party at his home in Khurshed Bagh in Lucknow has created outrage with demands for swift justice and allegations of police inaction. Kamlesh Tiwari was brutally murdered at his home at Khursheda Bagh in Lucknow on Friday

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले ! पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले ! पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले !Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. ह्यांना सुरत मधुन पकडल आहे. NDTV : ह्या निष्पाप मुसलमान लोकांना निष्कारण अडकवले जात आहे.

कमलेश तिवारी विरूद्ध सुरतच्या मौलवीने फतवा जारी केलेला होता की ईस्लाम बद्दल अल्ला बद्दल अपशब्द काढलेले असल्याने कमलेश तिवारी मृृृृृत्युदंड दिला पाहीजे. लगेच कार्यवाही करण्या साठी काही लोक पुढे येतात. हेच हिंदु देव देवतां बद्दल बोलल तर मात्र स्वःता हिंदु सकट कोणालाच फरक पडत नाही.

In reply to by डँबिस००७

डँबिस००७, प्रश्न : आपण काय करू शकतो या बाबतीत? उत्तर : मत कोणाला द्यायचं ते कळतं यातनं. २१ तारखेपासनं मतदान आहे ना. जे पक्ष मुस्लिमांचं नेहमी लांगूलचालन करतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष भ्रष्टाचारास प्रोत्साहन देतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष हिंदूंमध्ये दुही माजवतात त्यांना उखडून टाका. शिवाजीमहाराज दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आदरपूर्वक करतात. पण ते केवळ ब्राह्मण असल्याने त्यांच्याविरुद्ध नाहक चिखलफेक करणारी दंभाजी ब्रिगेड ही संघटना कोणाच्या पाठींब्यावर चालते? हे पापी अपत्य कोणाचं? त्यांना उखडून टाका. भेकडकसब,अफजल गुरु यांच्या अवलादी ज्यांच्यामुळे पुष्ट होतील त्यांना उखडून टाका. इक्बाल मिरची या कुप्रसिद्ध दहशतवादी गुंडाला मालमत्ता देणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना आणि त्यांच्या पक्षाला फुल्लपणे उखडून टाका. बाकी सुज्ञांस अधिक सांगणे नलगे. आ.न., -गा.पै.

२ प्रकारचे व्यवसाय करत असल्यामुळे मंदी आहे हे (हि तर सुरवात आहे असे आमच्यातले मोठे मासे म्हणत आहेत) १००% खरे आहे आणि त्याचा स्वतः अनुभव घेत आहे. साधारण ५/६ दिवसांपूर्वी business whats up ग्रुप वर (सर्व भाषिक/धार्मिक ग्रुप आहे हा) मी सहज मला येत असलेल्या अडचणींबद्दल विषय काढला आणि अहो काय आश्चर्य धडा धड सगळे सेम बोलायला लागले, आमच्या व्यवसायातील प्रस्थापित लोक सुद्धा अन्य करत आहे कि सध्या कठीण कल चालू आहे आणि तो लवकरच सरेल म्हणून. नंतर ४/५ जणांनी माझे अभिनंदन केल कारण मी उघडपणे हि गोष्ट ग्रुप वर कबुल केली कि हो धंदा मंदा है. सो मंदी आहे पण त्यावर उपाय सुद्धा लवकरच होतील अशी आपण सगळे आशा करू.

In reply to by उपेक्षित

आंतरराष्ट्रीय मंदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल पुरवणे ईतकाच स्कोप भारतातले निर्यातक करत असतात. फार तर कृृृृृृषी माल भारतातुन निर्यात होतो ज्याला मंदीची झळ कधीही बसत नाही. भारतातला तयार मालाला जागतिक बाजारात उचल नाही कारण त्याची खालच्या दर्ज्याची गुणवत्ता. अर्थात बर्याच युरोपीयन अमेरीकन कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरु केलेल आहे त्याचा अपवाद !! काही भारतीय उत्पादक चीनी कंपन्यांना आपला माल हा त्या कंपन्यांसाठी कच्चा माल म्हणुन द्यायचे. चीनी मालाला अमेरीकेच्या आयात प्रतिबंधामुळे मोठा फटका बसलेला आहे. भारतीय हीरा उद्योगाला अचानक मार बसलेला आहे. देशांतर्गत मंदी : भारतीय मालाला फार तर चीनच्या आयात केलेल्या मालाची प्रतिस्पर्धा आहे. भारतीय कृृृृृृषी मालाला मंदीची झळ कधीही बसत नाही. भारतात देशांतर्गत दळणवळणाच्या सुविधा चांगल्या व स्वस्त नसल्याने माल देशाच्या दुरवरच्या प्रदेशात पोहोचु शकत नाही. नेसले, युनिलीव्हरचा माल पोहोचु शकतो कारण ह्या मोठ्या कंपन्यांची ताकद ! पार्ले बिस्किटचे उदा सर्वांनी बघितलेले असेलच. काही महिन्यां पुर्वी ह्याच कंपनीला १०,००० कामगार कमी करावे लागणार अशी अफवा होती. दोन महीन्यां नंतर त्याच पार्ले बिस्किट कंपनीला ४५० कोटी चा फायदा झाला. वार्षिक उलाढाल ९०५० कोटीची झाली. गेल्या वर्षी वार्षीक फायदा ३७० कोटींचा होता.

In reply to by डँबिस००७

दादानू जागतिक पातळीवरचे मला खरच माहीतही नाही आणि रसही नाही त्यात आपल्या इथे आजूबाजूला काय परिस्थिती आहे ते मी सांगत आहे, कारण आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही. तसेच यात फ़क़्त आणि फ़क़्त सरकारचा दोष आहे हेही मी म्हणत नाहीये. आपण समजून घ्याल अशी आशा आहे.

In reply to by उपेक्षित

इतकेच
आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही.
हे विधान सत्य आहे.

जागतीक पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा देणार्या तुर्की व मलेशीयाला भारताने चांगलाच ईंगा दाखवलेला आहे. तुर्कीची जागतीक पातळीवर चांगलीच नाचक्की भारत करत आहे. तुर्की सायप्रस ग्रीस सारख्या देशांवर हूकुमत गाजवायचा प्रयत्न करत आहे. भारताने त्याला जोरदार आक्षेप घेतलेला आहे. त्या शिवाय तुर्की कंपनी बरोबर होऊ घातलेला २.३ बिलीयन $ चा सौदाही रद्द केलेला आहे. मलेशीयाला तर पुर्णच नागवल आहे. पाम तेल निर्यातीत ईंडोनेशियाच्या खालोखाल मलेशियाचा नंबर लागतो. भारत हा जगातला एक नंबरचा जगात पाम तेल खरेदी करणारा देश आहे. भारत पाम तेल मलेशीयाकडुन तसेच ईंडोनेशीया कडुन खरेदी करतो. मलेशियाने युएन मध्ये कश्मिर संबंधात पाकिस्तानच्या बाजुने वक्तव्य केल्यानंतर परराष्र्टीय मंत्रालयाने जलद गतीने मलेशिया विरुद्ध मोर्चे बांधणी सुरु केली. मलेशियावरुन येणार्या पाम तेलावर ५% आयात कर वाढवला. भारतीय व्यापांर्यांनी लगेच मलेशिया पाम तेल उत्पादक / विक्रेत्या कडुन पाम तेल विकत घेणे तातडीने थांबवले. आता भारतीय व्यापांर्यांनी पाम तेल ईंडोनेशिया कडुन विकत घेण्याचे सुरु केलेले आहे. ईंडोनेशियाने सुद्धा ह्याच संधीचा फायदा घेत पाम तेलाच्या बदल्यात भारता कडुन साखर व म्हशीचे मांस विकत घेऊ अशी काँऊटर ऑफर भारताला केलेली आहे.

राम मंदिर बाबरी मस्जिद विवादावर सु को केस चालु आहे. केस वरील पक्ष प्रती पक्षाच्या बाजु मांडण्यासाठी दिलेला वेळ संपलेला आहे. केसचा निकाल हा हिंदु समाजाच्या बाजुने लागण्याची शक्यता लक्षात घेऊन ह्या केस मधिल मुस्लिम पक्षाने नविन डाव आज खेळलेला आहे. ह्या मुस्लिम समाजाच्या दोन्ही बाजुने ईंग्लिश मिडीया, डावे पक्ष तसेच अर्बन नक्षलींचा भक्कम आधार आहे. आज मुस्लिम पक्षकारांकडुन सीलबंद पाकीटात Moulding of Relief पेटीशन सु कोर्टाच्या सरन्यायाधीशां कडे दिल. Moulding of Relief चा अर्थ यदा कदाचीत मुस्लिम पक्षकार ही केस हरले तरी कोर्टाने उदारता पुर्वक विचार करुन दुसर्या पक्षासाठी सुद्धा काही तरी तजविज करावी. बंद पाकिटाकडे बघत सर न्यायाधिशांनी मुस्लिम पक्षकारांकडे पहात विचारल की हे अती गोपनिय पत्र तुम्ही मला दिल आहेत पण हेच पत्र आजच्या ईंडीया टाईंम्सच्या पहील्या पानावर छापलेल आहे. आजच्या ईंडीया टाईंम्स सकट ईतर English Mediaच्या पहील्या पानावर अस काय छापलेल होत ? सु को भारतीय संविधानाच्या मुल्यांचा विचार करुन योग्य तोच निर्णय घेईल. भारतात अनेक धर्मांचे लोक रहातात त्यामुळे एका धर्मांच्या लोकांवर अत्याचार होउ नये. सर न्यायाधिशां कडे बंद पाकिटात पत्र, तेच पत्र खुल्या मिडीयात पहील्या पानावर !! कश्या प्रकारे न्याय व्यवस्थेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक !! हिंदु समाज नेहमी प्रमाणे गाफील, बेदरकार, बेपर्वा आहे. https://youtu.be/2l4Nq__si2w

देशात ४०,००० पेक्षा जास्त अत्युत्तम हिंदु मंदिरे तोडुन तिथेच मशीदी बनवल्या गेल्या । अहमदाबादेत एक मोठी मशीद आहे, "जामा मशीद " नावाची. श्रद्धा कपुरच्या एका सिनेमात ही मशीद दाखवली होती. अर्ध्या मिनीटाच्या त्या मशीदीच्या पिक्चरायझेशन मध्ये मला हे लक्षात आल की ही मुळात मशीद नव्हतीच तर तिथे एक भव्य दिव्य मंदीर होत. ईंटरनेट वर सर्च केल्यावर समजल की तिथे प्राचीन भद्रकाली मंदिर होत. माझ्यासाठी ही माहीती नविन होती. खुद्द मक्का मदिना मध्ये रस्ता रुंदीकरण किंवा अश्या कोणत्याही कारणाने मशीदी तोडतात. जिथे ईस्लाम आला तिथे मशीदी तोडु शकतात पण भारतात मशीदी तोडु नये अस चलन आहे ? मायबोलीवर सुद्धा बरेच पुरातत्व भागाचे विद्वान आहेत पण कोणालाही ह्या विषयावर बोलायची हिंम्मत नाही. रहाता राहीला प्रश्न हिंदुंच्या सांस्क्रुतीक समस्यांवर ईंग्लिश मिडीया, डावे, लिबरल , अर्बन नक्षली एकत्र का येतात ? नेहमी हिंदुंनीच का नमते घ्यावे ? राम मंदीरा साठी कोर्टाकडुन आदेश मिळाल्याने पुरातत्व विभागाने संशोधन करुन अहवाल सादर केला की तिथे राम मंदीर होते जे तोडुन बाबरी मशीद बांधली गेली. त्या वेळी ह्या वरच्या सगळ्यांनी पुरातत्व विभागावर दबाव आणला होता की मंदीर नाही असा अहवाल द्या !! समाजीक सलोखा वैगेरे साठी सत्यमेव जयतेचा खुन करायचा ? मग कश्याला अशी मोठी मोठी वाक्य वापरायची ? हिंदु समाजाने गेली १००० वर्षे हाल अपेष्ठा सोसली . पण आता नाही. हिंदु समाजाने जाग्रुत व्हायलाच पाहीजे. आपल्या धर्माबद्दल, समाजाच्या रक्षणा बद्दल जागरुक व्हायलाच हव !! जो काळा ईतिहास डाव्या लोकांनी आपल्या गळी उतरवला तो पुसुन नवा ईतिहास लिहायला पाहीजे !! हिंदु समाजाचा कोणीही मित्र नाही ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by डँबिस००७

40000 मंदिराचे काय घेऊन बसला आहेत? इथे तुमच्या आमच्यासमोर मशिदि उभ्या रहात आहेत. आणि हिंदू धर्माला पाठिंबा देणारे सरकार डोळे झाकुन बघत आहे. भाजपाचा हिंदू एजेंडा फक्त आणि फक्त निवडणुका पाहुनच रेटला जातो .

मॉटो सेक्टर मधल्या मंदीचे कारण वेगळे आहे. लोक हायब्रीड मॉडेल चा विचार करत आहेत. इलेक्ट्रीक कार्स चा विचार करत आहेत. पेट्रोल डिझेल वरच्या गाड्या या येत्या तीन चार वर्षात ऑट डेटेड होणार आहेत असा एक प्रवाद लोकाम्मधे आहे. तीन चार वर्षात गाडी फुंकून टाकणारी जनता भारतात तरी अजून फार मोठ्या प्रमाणात नाहिय्ये

In reply to by विजुभाऊ

काही अंशी खरे असले तरी हा तर्क पुर्ण ऑटो सेक्टरला लागू होत नाही. पॅसेंजर कार्स सेक्टर गेल्या सहामाहीमधे गेल्या वर्षीच्या सहामाहीपेक्षा ३५% ने खाली आहे. तिथे हे लॉजिक लागू पडले तरी मग त्याच कालावधीसाठी दुचाकी १६%, व्हॅन्स ३५%, जड ते मध्यम वाहतूकीची वाहने ३५% तर हलक्या वाहतूकीची वाहन विक्री १४% खाली आलेली आहे. तिथे हे लॉजिक लागू होत नसताना इतकी मोठी उतरण कशामुळे असेल? फक्त इथेच नाही तर मालवाहतूकीच्या व्यावसायिकांना सुद्धा गाड्यांच्या खेपांची मागणी १५% हून जास्तने कमी झालेली दिसत आहे. (ज्याचा परीणाम कदाचित जड माल वाहतूक वाहनांच्या मागणीवर दिसतोय?)

नोटबंदी कशी यशस्वी झालेली आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर खालिल लेख वाचलाच पाहिजे. https://www.loksatta.com/vishesh-news/demonetization-note-ban-pm-narend… यातुन आपल्याला कळेल की आपल्या देशात सर्वात जास्त बकरी,गाढव, मेंढ्या राहतात ते. आता जीथे मेंढ्या,बकरी तिथे लांडगे असणारच. (अंध)भक्तांनी वाचु नये.

In reply to by जॉनविक्क

नोव्हेंबर मधे ज्या घडामोडी घडल्या त्यावर अगोदरच बरेच धागे निघाले आहेत. डिसेंबर मधे नवीन धागा नक्की काढतो.