Skip to main content

चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 01/09/2019 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ! आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत. सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये. राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे. चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल. मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया. धन्यवाद ! गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !

वाचने 42694
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

मा मोदीजींच्या शुभ हस्ते UN च्या अमेरिका स्थित ईमारतीच्या टेरेसवर भारताने बनवलेले "म गांधी सोलार पार्क" २३ सप्टेंबर रोजी जगाला सर्मपित होणार आहे !! 50 kWH ची ही सिस्टीम असुन त्यात १९३ सोलार पॅनेल आहेत. ते १९३ सोलार पॅनेल्स १९३ देशांच प्रतिनीधीत्व करतात. २३ सप्टेंबर ला म गांधीजींच्या १५० व्या जयंतीच निमीत्त्य साधुन मा मोदीजींनी हा सोहळा करणार आहेत !

म्हापसा अर्बन बँकेचे १)पंजाब महाराष्ट्र / २) ठाणे जनता सहकारी ,/ ३) डोंबिवली नागरी या तिनांपैकी एकात विलीनीकरण करण्याचे ठरले आहे . यासाठी फंडिंग तर नाही ना पंजाब महाराष्ट्रचे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात स्वच्छता अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकिपर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कसं कसं जमतं या माणसाला हे देवजाणे. शेठचं अभिनंदन. :) -दिलीप बिरुटे

हे ट्वेन्टिनन सेवन्टिन म्हणजे नक्की किती भक्त लोक सांगतील काय????

In reply to by गोंधळी

कोणताही पाढा म्हणतात ते.. त्याचं इतिहास, भूगोलही असाच आहे. आपण ब्वॉ फॅन आहोत, हे नम्रपणे नमूद करतो. -दिलीप बिरुटे ( नायंटीन सेवन्टी टू तला) :)

अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरुन ५.८ वर आला आहे. निवडनुकांनंतर परकिय त्याची गुंतवणुक काढुण घेत आहेत. वाहन उद्योग संकटात आहे. कित्येकांच्या नोकरया गेल्या आहेत. IL&FS,JET AIRWAYS,DHFL,...... PMC BANK या सारखे अनेक उद्योग्,संस्था आर्थिक संकटात आहेत्, कर्म्चारी बेकार झाले आहेत्, सामान्य गुंतवणुक धार्यांचे पैसे बुडाले आहेत. GST मधुन अपेक्शित महसुल मिळत नाही आहे. अशा अनेक समस्या आहेत. पण तरीही भारतात सगळ ठिक आहे.......... कारण भारतीय जनतेला कोणिही मुर्ख बनवु शकत नाही.

In reply to by गोंधळी

नमस्कार साहेब, अहो..हे किरकोळ प्रश्न आहेत. तिनशे सत्तर हटवल्याचा आनंद साजरा करा. आदरणीय साहेब, अमेरिकेत साठ हजार भारतीय लोकांसमोर जाऊन ट्रम्प यांनाही वाटावे की अध्यक्ष मी आहे की शेठ आहे, अशी ती परिस्थिती पाहा. अहाहा. काय स्टेडीयम, काय भाषण. सुप्पर. आदरणीय साहेबांनी जेव्हा ट्रम्प अंकलचा हात पकडून स्टेडीयमला चक्कर मारली तेव्हा तर माझे डोळे भरुन आले. केवळ अप्रतिम शीन होता. कसं जमतं त्यांना त्याचा विचार करा. परराष्ट्रीय प्रभावाचा तो एक उत्तम प्रयोग होता. पाकिस्तानला एकाकी पाडलं ते बघा. जीएष्टी, महागाई, बेकारी, खाजगी कंपन्यात रोजगाराची होणारी कपात, अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरतोय, वाताहात होताहेत, मंदी हे असले क्षुद्र प्रश्न विचारता. आपण जवळ जवळ देशद्रोहीच आहात. चांद्रयान बघा, विक्रम लँडरशी संपर्क जरी तुटला तरी ऑर्बीटर फिरतय त्यात सुख माना. के. शिवनची पाठ थोपटवा, बळजबरी गळ्यात पडतांनाचे फोटो पाहा. आणि मुख्य म्हणजे सत्तर वर्षातला विकास बघा. इथे कालपर्यंत वीज तरी होती का ? रस्ते होते का? पं.नेहरुंनी देशाची वाट लावली ते बघा. बोलो भारत माता की जय. हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा. बोलो बोलो भारत मात्ता की जय. -दिलीप बिरुटे

सध्या फक्त पुराणातील वानगी आणि भविष्यातील गाजरे ह्यावरच बोलण्यास परवानगी आहे. पेरलेले का उगवले नाही हे विचारायचे नाही.

बाकी काही नाही पण सध्या विठ्ठलाच्या देवळातील बडवे माजलेत एवढे निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो. आपला उपेक्षीत (छोटा माणूस) :))))

Blot on Muslims for being beaten up, get the pistol, I will take care of rest: Haryana judge Fakhruddin incites Muslims to shoot Hindu adversaries हरयाणातल्या कोर्टाच्या न्यायमुर्तींचे हे विधान आहे. ऐकुन धन्य झालो. हिंदु लोकांनो सावधान !!! कोर्टाने सांगितलय हिंदुंना गोळ्या घालायला !!

१) Bosch | बॉश कंपनीला मंदीची झळ, पुढील आठ दिवस उत्पादन बंद | नाशिक - सौजन्य ABP Majha >>>>>>>>>अवघड आहे सगळ, २ प्रकारचे व्यवसाय करत असल्याने मंदीचे परिणाम जवळून आणि वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत जाणवत आहेत आणि सत्ताधारी मात्र इतक्या उंचीवर पोहोचले आहेत आणि मोठ्ठे झाले आहेत कि खाली जळत असलेल्याची धग सध्या त्यांना जाणवत नाहीये. २) गेले २ दिवस पुण्यात झालेल्या पावसाने बर्याच जणांची वाताहत झाली आहे, सिंहगड रोड ला मी राहत असलेल्या परिसरातील प्रत्येक सोसायटीत पाणी शिरून बरेच नुकसान झाले आहे तसेच २ जणांची घरे देखील पडली आहे, पण निवडून दिलेल्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही प्रतिनिधी (साधा नगरसेवक सुद्धा ) फिरकला देखील नाही. काल शिवसेनेचे आमदार श्री बापू शिवतारे मात्र स्वतः येऊन सगळीकडे पाहणी करीत होते लोकांशी बोलून धीर देत होते. (निवडणुका आहेत माहिती आहे मात्र सत्ताधारी आमदार फाजील आत्मविश्वासा पायी फिरकले देखील नाहीयेत)

In reply to by उपेक्षित

काय आहे, पूर आल्यानंतर, किंवा अशाच कुठल्याही दुर्घटनेनंतर, संबंधित नगरसेवक/ आमदार/ अन्य कुणी, येतो, पाहणी करतो, धीर देतो, इ.इ. सगळं ठीक आहे. पण अशा घटना मुळातच घडू नयेत ह्यासाठी हे लोक काय करतात हा प्रश्न विचारला पाहिजे. अर्थात, त्याचे उत्तर 'काहीही नाही' हेच येईल. अज्ञान, स्वार्थ, बेपर्वाई, इत्यादि कारणांमुळे हेच जे सर्व नामदार लोकांच्या मृत्यूला कारण ठरतात, त्यांच्यावर खरे तर खटले चालविले पाहिजेत पण दुर्दैवाने, आपले काम न करण्याला आपल्या देशात शिक्षा नाही. आणि हो, बिल्डर्स, PMC चे अभियंते, इत्यादींना ह्यास जबाबदार धरू नका. राजकीय नेतृत्वाकडून काही किमान अपेक्षा असतात (त्यात ह्या सर्व लोकांवर नियंत्रण ठेवणे ही एक मुख्य) त्या पूर्ण करायला सगळे पक्ष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, सत्ता कोणाचीही येवो, सामान्य लोकांचे हेच भागधेय आहे.

In reply to by रविकिरण फडके

याचे कारण आपली अफाट वाढणारी लोकसंख्या आहे. ओढे नाले नदी यांच्या काठावर आणि प्रवाहातसुद्धा भारतभर अनधिकृत वस्त्या आहेत त्यामुळे निसर्गाचा कोप झाला तर सर्वात अगोदर याच लोकांचे नुकसान होते. परंतु याना तेथे घरे बांधू नका हे सांगणारे कुणीच नाही कारण जितकी लोकसंख्या जास्त तितके मतदार जास्त. महापालिकेचे अभियंते काय लोकांना अनधिकृत वस्ती बांधा म्हणून सांगायला जातात का? अनधिकृत वस्तीवर कार्यवाही करायला जाणाऱ्या माणसाला मारच खावा लागतो कारण पोलीस सुद्धा अशावेळेस पाय मागे घेतात. कोणतिहि सरकारी यंत्रणा तुमच्या वाढत्या लोकसंख्येला पुरी पडणार नाही हि वस्तुस्थिती. प्लास्टिक टाकून ओढे, नाले नद्याचे प्रवाह काय सरकार बंद करतंय का? घाटकोपर येथे एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या भिंतीच्या पलीकडील जमीन खणून झोपड्या बांधल्या. पावसाळ्यात अशी कमकुवत झालेली भिंत पडून दोन माणसे दगावली त्यासाठी कंत्राटदाराला अटक झाली. भिंतीच्या मजबुतीचा लेखा जोखा आय आय टीच्या अभियंत्याद्वारे केला गेला तेंव्हा भिंत व्यवस्थित बांधली होती असा निष्कर्ष निघाला.ती पोखरली गेल्यामुळे पडली. आता त्या व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची. दर डोई सुविधा या सुविधा भागिले लोकसंख्या अशीच मिळणार आहे. आपल्या जनतेची लायकी हीच आहे.

DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की, आपण टी ७२ व टी ९० रणगाड्यांना इमेज इन्टेसीव्ह ट्यूब वापरून रात्रीच्या वेळेस १०० ते १५० मिटरपर्यंत दृक्षमानता मिळवून देऊ शकलो होतो. २०११-१२ पासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळून आपण आता थर्मल इमेजिंग तंत्र आत्मसात केलं आहे. हे तंत्र अंमलात आणून प्रत्यक्ष उत्पादन व वापर आता सुरू होतोय. टी७२ साठी १००० यंत्रणांची जरूरी असून त्यापैकी ३०० यंत्रणा बसवून झाल्या आहेत. हे तंत्रज्ञान खूप अद्ययावत असून ३ किमी पर्यंत याचा आवाका आहे. जास्त अचूकते बरोबर मिट्ट काळोखातही हे वापरता येते. अगोदरच्या यंत्रणातून वेध घेताना बाहेर अंधूकसा का होईना पण थोडाफार तरी उजेड लागायचा. टी९०ला मात्र काही अडचणींमुळे ही यंत्रणा जरा सुधारित करून बसवायला लागणार आहे. पण त्यामुळे हीचा पल्ला ३ वरून ४ किमी होणार आहे. नविन यंत्रणेमुळे शत्रू शोधून काढणे. त्यावर नेम धरून मारा करणे शक्य होणार आहे. स्नायपर्स हेच करत असतात. ते जर रणगाडा करू लागला तर काय होईल हा अंदाजच आश्चर्यकारक असणार आहे. स्नायपरच्च्या गोळीच्या ऐवजी जर तोफगोळाच शत्रूच्या अंगावर जायला लागला तर . . . :)

आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा केली. निकाल काहिही लागो पण निवडणूक लढविणारा ठाकरे कुटूंबातील पहिला नेता म्हणून त्यांचे नाव घेतले जाईल. निवडणूकीच्या उतरण्याची हिंमत दाखविल्याबद्द्ल अभिनंदन !

छत्तीसगडाचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणतात की : भाजप आणि संघ यांचे लोक ‘गोडसे मुर्दाबाद’ म्हणतील, तेव्हा मी त्यांना खरे गांधीवादी समजेन ! बातमी : १. https://sanatanprabhat.org/marathi/276869.html २. https://hindi.timesnownews.com/india/article/chhattisgarh-cm-bhupesh-ba… आयला म्हंजे हैदराबादचा तुकडा पडू न देणाऱ्या प्रखर देशभक्त नथुराम गोडसे यांचा निषेध केला तर भूपेश बघेल हा काँग्रेसवासी त्याचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो संघवाल्यांना वापरायला देणार. कर्णानंतर इतका दानशूर राजा हाच की हो. राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. -गा.पै.