अकरावीत असताना "रिमझिम गिरे सावन" हे गाणे सारखे सारखे मनात येऊन अगदी रडवेले होईस्तोवर काही हरवल्याची कडूगोड भावना (नोस्टॅल्जिया) मनात येई.
वास्तविक हा चित्रपट मी पाहिलेला नाही, फक्त पहिल्या दोन ओळींचे शब्द मला येतात, आणि नेमके काय हरवले होते त्याबद्दल काहीच कळत नव्हते. अजूनही ते स्वप्नाळू गोडसर दुखणे कसचे होते ते कोडेच आहे.
(छोटेखानी स्फुट आवडले.)
आहा! माझं प्रचंड आवडतं गाणं हे !! धन्यवाद धनंजय, इथे व्हीडीओ दिल्याबद्दल...
विनायक,
हाही लेख चांगला जमलाय.. मुद्दाम लिहायचं म्हणून लिहीण्यापेक्षा मनापासून वाटेल तेव्हा, मोकळं होऊन लिहीलेलं जास्त छान उतरते हे तुलाही आता पटले असेल, राईट? :)
पण प्लीज! शुद्धलेखनाकडे लक्ष दे.. इथे शुद्धलेखन म्हणजे र्ह्स्व,दीर्घ नव्हे (तेही महत्वाचे असतेच..डोळ्यांना खटकते इकडचे तिकडे झाले की!).. निदान तो शब्द जसा उच्चारला जातो तसातरी लिहीण्याचा प्रयत्न कर..
ते प्रचंड खटकतं! प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर कंटेंट कडे काही दिवसांनी दुर्लक्ष नक्कीच होईल.. खूप त्रासदायक असतं असं वाचणं इतकंच सांगते..
पु.ले.शु..
आज एकेक लेख वाचताना आठवणींचा पाऊस पडतोय! सुन्दर लिहिलाय.
http://www.youtube.com/watch?v=zuS4k378hKY
हा माझा नोस्टेल्जिया १०वी-११वीमधला{तेव्हाचा आणि आताचा पण!}
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
माझी दहावी २७ मार्च १९९१ ला संपली...
शेवटचा भूगोलाचा पेपर होता आणि उद्या आपली परीक्षा संपणार या सुखद विचारात गढून त्या शेवटच्या दिवशी अजिबात नीट अभ्यास झाला नाही, असे आठवते.
...
परीक्षा संपल्यावर तो दिवस तेव्हाच्या प्रथेप्रमाणे फाईव्ह मॅन आर्मी नामक चित्रपट व्हिडिओवर पाहून , त्यावर रग्गड चर्चा केली होती...
आता हसू येते पण ( परीक्षा होईपर्यंत कादंबर्या वगैरे वाचनावर आपणहून स्थगिती दिलेली होती म्हणून) त्याच दिवशी दुपारी सुहास शिरवळकरांची "बरसात चांदण्यांची" नामक कादंबरीसुद्धा वाचून संपवली होती..... तेव्हा फार आवडली होती.
नंतर मित्राच्या घराच्या गच्चीवर तीन चार जण झोपायला जाऊन पहाटेपर्यंत जागून सरत्या वर्षाचा आढावा घेत ( इतर गॉसिप वगैरे वगैरे ) चर्चा केल्याचे स्मरते....
अवांतर : या लेखात टंकनचुका (तुलनेने) कमी असल्याने प्रतिसाद दिला आहे....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हा लेख आवडला. भाग्यश्री यांनी म्हणल्याप्रमाणे .. मुद्दाम लिहायचं म्हणून लिहीण्यापेक्षा मनापासून वाटेल तेव्हा, मोकळं होऊन लिहीलेलं जास्त छान उतरते. म्हणूनच प्रतिक्रिया देतोय.
बा़की शुद्धलेखनाबद्दल सांगण्याचा कंटाळा आला आहे. दिवस आणि दिन (दिवस या अर्थी) कायमच दीवस आणि दीन असे का टंकतोस? 'शिफ्ट' बटण जास्त वापरू नकोस. तश्या माझ्याही काही र्ह्स्व,दीर्घच्या चुका होतात. पण नेहमि वापरातले शबद मि बरोबरच लीहितो. (बघ कसे वाटते वाचायला हे वाक्य).
बाकी आठवणीविषयी...बर्याच वेळा काही गाणी ऐकली की काही आठवणी येतात. १० वी १२ वीचे दिवस, सांगलीच्या वालचंद मधले वसतीग्रुहातले दिवस..अश्या बर्याच आठवणी या लेखामुळे एकदम जाग्या झाल्या. गंमत म्हणजे कोल्हापुरला १२ वी च्या परीक्षेच्या २ दिवस आधी 'हम' चित्रपट अयोध्या टॉकिजला बघितला होता हे जास्त आठवते. बरेचसे नातेवाईक (आई, वडिल सुद्धा) एकत्र बरोबर गेलो होतो. तिकिटे काढेपर्यंत कोणी काही बोलले नाही, पण आत चित्रपट सुरू होण्याआधी २/३ नातेवाईकांनी चेष्टेत आणि बाबांनी खरोखरच झापले होते.
खादाडमाऊ
आपणा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार
शुद्धलेखनाच्या चुका जसा वेळ मिळेल आणि समजेल तशा दुरुस्त केलेल्या आहेत
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIESविनायक पाचलग
कुठेही शब्दांचा महाभयंकर डोंगर किंवा अलंकारांनी न मढवता वाक्ये साधी आणि सोपी वाटली. लेख त्यामुळे वाचनीय झाला आहे.
वाचताना मलाही दहावीचा शेवटचा पेपर आठवला. नाही म्हंटलं तरी थोडाफार नॉस्टॅल्जिया झालाच.
असो..
विनायक,
खूप साधेपणाने लिहिलेले भावले. किप इट अप. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
अकरावीत असताना
आहा! माझं
विनायक,छोट
आठवणींचा पाऊस
दहावीचा शेवट...
मस्तच..
छान...
आभार
नॉस्टेल्ज
मनमोकळेपणाने आलेला लेख.