चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .
यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण, तरीही, खुट्ट झाले की
भले शाब्बास
संमतीने विवाहबाह्य संबंध
अलीकडे
पोपच्या बैलाचा ....
China installing QR codes on
म्हात्रे सर ,
भारतातील मुस्लिम पक्षांनी ,
भारतातील मुस्लिम पक्षांनी , संस्थांनी चीन मधील मुस्लिम लोकांच्या गळचेपी बद्दल अवाक्षर न काढण्याचे कारण चीन आणि पाकिस्तान चे मित्र संबंध असू शकतात .हे होते याचे कारण मित्रत्वाचे संबंध वगैरे अजिबात नाही. सर्वात पहिले म्हणजे, "धर्माला अफूची गोळी म्हणणारा कम्युनिस्ट चीन" आणि "आपल्या धर्माविरोधी चकार शब्दही काढणार्याचा शिरच्छेद करावा असे कर्मठ मत असणारे इस्लामिस्ट" यांची मैत्री हीच फार मोठी विनोदी भोंदूगिरी (हायपोक्रिसी) आहे ! कारण, या दोघांची ही आपापली तत्वे मूलभूत आणि तडजोड (compromise) करण्यास अश्यक्य असलेली आहेत, हे जगजाहीर आहे. आणि अर्थातच, हे सर्व जगापुढचे उघड गुपित आहे (सूड भावनेच्या (रिप्रेजल) भितीने ते उघडपणे म्हणायचे नसते, हे पण उघड गुपित आहेच) ! त्या भोंदूगिरीची खरी कारणे अशी आहेत... १. कितीही आवाज केला तरी ते देश/संस्था/व्यक्ती चीनचा केसही वाकडा करू शकत नाहीत याची त्यांना आणि इतर जगाला पक्की खात्री आहे आणि त्याचबरोबर... २. (अ) चीन त्यांच्या विरोधाला अजिबात भीक घालत नाही/घालणार नाही व (आ) विरोध केलाच तर केवळ चपराक नव्हे तर सज्जड मार देण्याची धमक चीनमध्ये आहे हे ते ओळखून आहेत, आणि (इ) (भारत व अमेरिकाविरोधी कारवाया चालू ठेवण्याच्या व इतर बहाण्यांनी मिळणारी) चीनी पैशांची भीकही बंद होईल ही भिती आहेच ! ३. चीनने लाथ मारली तर उरलेल्या जगात पाठीशी घालू शकेल असा दुसरा देश नाही, हे सुद्धा ते ओळखून आहेत... तेव्हा, इतर वेळेस कितीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी याबाबतीत, धर्म/वैचारिकता/उदारमतवाद/इ सर्व बासनात गुंडाळून (बॅकबर्नरवर ठेवून) चीनची मिंधेगिरी करणे, त्यांना अपरिहार्य आहे. गंदा है, पर आखिर ये धंदा है, भाय ! तर मग दातखीळ बसेल नाही तर अजून काय होईल.+१०००००००००....
21 lakh company directors
हे मात्र खरं आहे .
आज मला CA फर्म कडून आलेल्या
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
जे एन यू मध्ये चीनविचारसरणी च्या लालतोंडी माकडांची दहशत
https://indianexpress.com
आता "टाईम्स नाऊ" वर चाललेली
VVIP chopper case: Dubai
अरे काय चाललंय काय!!!
नक्की काय अगतिकता आहे या
अरे बापरे !!!! सर्वात
युरोमेरीकन प्रभाववादाचे उत्तम उदाहरण
https://maharashtratimes
https://maharashtratimes
डेपोपासूनचं अंतर
Oh!
मोदींच्या ‘आयुष्मान भारत’चा २४ तासांत एक हजारहून अधिक जणांनी
राफेल बद्दल फक्त रागा ची
मोदी गप्प आहेत कारण की ....
चंगेज खान ची हजारो मुले !!!!
UAE to hike fuel prices for
काल व्यभिचारासंबंधी जो कायदा
मला वाटते वेगळा धागा लेख
वेगळा चर्चा धागा विवाहबाह्य
एक लेख
ओह!!! आलं लक्षात!! धन्यवाद
बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली?
:)
वेगळ्या पानाची चिंता कशाला ? आम्हाला तर भोवत नाही !!
राहूल गांधींना मित्रपक्षाचा
पण किंमत जाहीर करायला काही
अपवादात्मक म्हणून कौतुकास्पद ;)
राजकारणा मध्ये कायम तोलून
पंतप्रधान मोदींची राफेल वादात
या राजीनाम्याला उगाच
पुरोगामी हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ओकत बसतात .
तात्या..!!
दोन नाही चार दिवस घ्या पण
आम्हाला उसनं अवसान आणायची
अजून एक नाही समजले !!!
त्यावेळेस लोकांना पंतप्रधान