आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कॅन्सर हा आता ग्रँड रोग झाला
साल मरणाला पण सोन्याचा भाव आला
बळीराजाला दाखवून अमिष
कंपन्या पेरतायत शेतामध्ये विष
औषधे तत्पर सेवेस रुग्णांसाठी
थोडे पुढं ढकलण्यासाठी दिवस
एकास होतो खरा
पण जुंपले जाते सारे कुटुंब
कुणी विकतात शेतीवाडी
तर गिधाडांचे खिसे तुडुंब
आलो इथवर विज्ञान घेऊनि
जुने दिले केव्हाच टाकून
तेच सोने होते, माझ्या बाळा
ताजे खायचा अन शिळे द्यायचा फेकून
सरकार असो कुठलंही
कर मात्र नेमाने घेतात
कायद्याच्या नावाने बोंब सारी
येनकेन प्रकारे फक्त बळी जातात
कुठे दडली मेख सारी
भलतीकडेच सुरु इलाज त्याचा
बळीराजाचा खांदा वापरून
सरकार प्रजेवरच नेम धरी
तर मिपाकरांनो , आज कॅन्सर घराघरात पोहोचलेला आहे .. आणि याचे सर्व श्रेय आपल्यालाच जाते .. विज्ञानाची कास जी धरलीय आपण . कॅन्सर , एक असा रोग ज्यात माझे संपूर्ण कुटुंब होरपळून गेले आहे . माझी आई कॅन्सरनेच गेली .. मी स्वतः ते दिवस पाहिलेले आहेत . कुटुंबाची अक्षरशः दाणादाण उडते . मला वाटत , कॅन्सर या रोगाचे मूळ , आपल्या शेतात दडले आहे . मागे आमिर खानाचा सत्यमेव जयते हा एपिसोड बरेच काही सांगून गेला . तो सिझन मला वाटतं त्याचा शेवटचा सिझन ठरला . त्याला कारण काही अंशी हेच असावे . आज कॅन्सरची निव्वळ उलाढाल मला वाटतं करोडोमध्ये असेल . मी मागे कुमार साहेबांचा लेखही " कर्करोगाचा भस्मासुर " वाचला होता .
माझ्या आईला वाचवण्यासाठी आमचे जवळजवळ २२ लाख खर्ची पडले . यावरूनच या रोगाची आर्थिक ताकद लक्षात येईल . आईला , मी स्वतः एक नामवंत डॉक्टर केलेले होते ..
त्यांच्या मतानुसार कर्करोगग्रस्तांनी फक्त
१ ) ताजे आणि नुकतेच शिजवलेले अन्न खावे .
२) फळे पण उकडून खावीत
३) जरापण ताप आला कि लगेच इस्पितळात दाखल व्हावे
४) महिन्याकाठी सीबीसी आणि इतर चेकिंग करावीत
५ ) त्यांनी सांगितलेले केमोवरती औषध
६) इस्पितळात दाखल झाल्यावर इतर महागडी औषधे
हे सर्व करत होतो , पटत नव्हतं तरीही करत होतो , कारण एकच होते ते म्हणजे आईची जगण्यासाठी असलेली दुर्दम्य इच्छा .. तिच्या इच्छेसाठीच तर हा सारा खटाटोप चालला . आणि ती अचानक निघून गेली. मलादेखील विश्वास बसलेला नव्हता , कारण मी स्वतः तिची प्रगती माझ्या डोळ्यादेखत पाहिलेली होती. ती जाण्यासाठी कारण मात्र क्षुल्लक ठरले . काय तर घरी फ्लोरिंगचे काम चालू होते आणि त्याचे धुळीचे इन्फेक्शन झाले . त्यातच ती गेली .
ती असताना मी तिला खालील प्रमाणे शुश्रूषा करत होतो
१) सकाळी तुळशीच्या बियांचा चहा देणे
२) एक ग्लास दूध , प्रोटीन पावडर टाकून
३) तिची नेहेमीची औषधे
४) फ्रिजमधील वस्तू वापराने फार कमी केले
तिच्या आजारात आणि औषधोपचारात मी काही अनुभव घेतले ते इथे मुद्दाम शब्दबध्ध करत आहेत . अशा आहे कि अजून कुणाला कामाला येतील .
सुरुवातीला पहिल्या केमोनंतर तिला फार त्रास झाला आम्ही नंतर तिला परत इस्पितळात हलवले . तिथे जी काही प्रतिजैविके वापरण्यात आली त्यामुळे तिला इतरत्र फोड आले, ते इतके दुखायचे कि तिची वेदना बघून आमचीच भीतीने पाचावर धारण बसायची . ते असेच काही दिवस चालू होते . मी अक्षरशः देवाचा धावा करत होतो. काहीच सुचत नव्हते . तेव्हा असाच कुठेतरी एक अशेच किरण दिसला . मी आंजावर एक स्वमूत्रप्राशनाचा निबंध वाचला . मी ठरवलं , कि आईला हे सांगून बघूया , ऐकली तर ठीक नाहीतर बघू दुसरे काहीतरी .. आईला मी व्यवस्थित पटवून सांगितले . हे सांगण्यापूर्वी टाटा मेमोरिअलमधील एक शेट्ये म्हणून सद्गृहस्थ आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केली . त्यांना मी माझे या क्षेत्रातील काम , माझे शोधनिबंध आणि त्यावरील सविस्तर माहिती दिली . त्यांना मी माझ्या आईच्या उपचाराची दिशा , तिची सध्याची अवस्था आणि मी घेतलेला स्वमूत्राप्राशनाचा निर्णय त्यांना समजावून सांगितला . त्यांचे मत हे होते कि यावर अजून तरी काही कुणी घातक असे नमूद केलेले नाही आहे . तेव्हा करून बघण्यास हरकत नाही . मी आईला समजावून सांगितले पण तिने त्यास साफ नकार दिला . तो केवळ लाजेखातर होता हे मला नंतर समजले .
आईने हे सर्व मला ना सांगताच स्वतःच चालू केले होते . तिचे ते दुखणे हळूहळू कमी झाल्यावर मी तिला विचारले तेव्हा तिने ते मला सांगितले .
अर्थात ते बरे होण्यामध्ये डॉक्टरांचा पण सहभाग होता . त्यांच्या औषधोपचारामुळेच हे सर्व शक्य झाले . पण सांगण्याची गोष्ट अशी कि तिला दुसर्या केमोनंतर तो त्रास झाला नाही जो पहिल्या केमोच्या झाला होता . यामध्ये मूत्राचा किती सहभाग होता हे माहित नाही पण एक गोष्ट मात्र नमूद करतो कि सीबीसी अहवाल नंतर ऍनिमिया आहे असे नमूद करत होते .. जे खरंच एक पॉसिटीव्ह चिन्ह होते . आईने जर माझे ऐकले असते आणि घराचे कामच काढले नसते किंवा ती माझ्यासोबत आली असती तर आजही ती कदाचित जिवंत असती.
कर्क रोग हा खरंच डॉक्टर कुमार म्हणतात त्याप्रमाणे आता भस्मासुर झाला आहे आणि घराघरात पोहोचला आहे . अर्थात याला आपल्या बदलेल्या जीवनशैलिही कारणीभूत आहेत.
१) हॉटेल मधील वरचेवर खाणे .
२) फ्रिजमधील खाणे
३) शेतकऱ्यांना अमिष दाखवून , पात्रता नसलेली कीटकनाशक विकणे
मागे साताऱ्याला गेलो होतो . तेव्हा एक जाहिरात पहिली . एक टन कीटकनाशक घ्या आणि बुलेट फ्री .. माझा मेव्हणा त्याच दुकानात भागीदार आहे . त्याने सांगितले कि त्याचा वर्षभराचा टर्नओवर जवळजवळ ३ करोड रुपये आहे . आता तुम्हीच सांगा , त्याला सर्व माहित आहे हे काय चाललंय ते, पण पैसे मिळतायत म्हणून तो पण गप्प आणि शेतकरीपण . तो तर हे देखिल सांगत होता कि स्ट्रॉबेरीतर चुक्कून पण खाऊ नका . इथले शेतकरी तर त्या पाण्यातल्या हौदातच कीटकनाशक मिसळतात आणि शेतातमध्ये सोडून देतात . आता मला सांगा बळीराजा जर असा अडाण्यावाणी वागायला लागला तर आपलं हाल कोण कुत्रा बी खाणार नाय.
सेंद्रियशेती फार कमी लोक करतात आणि करतात ते पण स्वतःसाठीच . मार्केटात हा असला रासायनिक खतांचा माल पडतो बघा . तो आपण खायचा आणि आपणच मरायचं . आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
सगळंच भयानक
ठग - पेंढारी यांचा आधुनिक अवतार.
लेखातून मांडलेली भयानकता
प्रत्येका ने आयुष्यात कधी ना
आपल्याकडे भोपाळ दुर्घटना झाली
खरच भयानक आहे.जगण्याचे जसे
साहेब तुम्हाला सांगू कॅन्सर
जरा तुम्हा सर्वाना या मागील
सुन्न!
बापरे!!
लेखाशी सहमत
औषधांच्या बाजारात इतक्या सुरस
फारच भयानक
भयंकर!
हि एक नेहमीचाच (म्हणजेच
अमेरिकेच्या लोकांना स्वतःचा
+111
++१११
वाचुन सुन्न झालो.
काय बोलणार!! :(
मी कामानिमित्त बाहेरगावी
मग मीही त्यांना बोललो कि
खरे साहेब काहीतरी गैरसमज
शक्य आहे.
येरवडा भागात नामांकित एम डी
सुन्न :(
कृपया सर्वांनी हा व्हिडीयो
आपल्या