देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. इन्शुअरन्स कंपन्यांनी गावोगावी त्यांचे एजंट नेमले असून ते लोकांच्या गळ्यात युलिप हे महागडे प्रॉडक्ट, विमा प्रॉडक्ट म्हणून न विकता, गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम म्हणूनच विकत असतात. तीन वर्ष पैसे भरा, मग भरावयाची गरज नाही, त्याचे एवढे पैसे होतील, तेवढे पैसे होतील अशा बाता मारतात.