वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती

लेखनप्रकार
वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

लेखनविषय:
लेखनप्रकार
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत.

पर्यावरणवादी व शास्त्रज्ञांना सुचना

लेखनविषय:
लेखनप्रकार
कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले. पृथ्वीवासियांना ग्लोबल वार्मिंगमुळे पडणाऱ्या कडाकाच्या थंडीत थोडीशी वैचारीक ऊब कशी देता येईल ह्याचा मी खूप विचार करता मला पुढील पर्याय दिसले; तेच मी आपणासमोर मांडत आहे. १. समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील २. वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील. ३.

तुमच्या गावाचे नाव काय?

तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.

भिगवणचे परदेशी पाहुणे

मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.
Subscribe to भूगोल