मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

छोटा डॉन ·

दशानन 27/01/2009 - 09:41
:) सेम टू सेम ! * येथे काही माझे हिंदी भाषीक माझे मित्र माझ्याशी बोलताना "जय महाराष्ट्र"म्हणातात व मी त्यांना " जय हरयाना" ह्याचा एक फायदा झाला त्यामायला जेव्हा चुकुन राजसाहेबांच्या सैनिकांनी हरयणावाल्यांना कुठ मुंबई मध्ये मारलं ..... पण मला येथे मार बसला नाही हे नशीब. ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सहज 27/01/2009 - 09:54
खूप रोचक लिहले आहेस. आपण सारेच अर्जुन!!

In reply to by सहज

छोटा डॉन 27/01/2009 - 09:58
>>आपण सारेच अर्जुन!! काय योगायोग आहे पहा, योग्य शिर्षक सापडले नाही म्हणुन २ दिवस मी लिखाण अप्रकाशित ठेवले. शेवटी वैतागुन आज टाकले, आपण दुसर्‍याच प्रतिसादात एकदम करेक्ट "शिर्षक" मिळवुन दिले. आभार ...! आपली परवानगी असेल तर मी हे "शिर्षक" म्हणुन वापरु इच्छितो ... बोला काय म्हणता ? ------ छोटा डॉन

नितिन थत्ते 27/01/2009 - 10:14
~X( प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे पण त्यामुळे उत्तर धूसर झले आहे. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

बहुगुणी 27/01/2009 - 10:50
मी माझं किरकोळ (नेहेमीच स्वान्तसुखाय) लिखाण करतांना अनाहुतपणे मराठी, इंग्लिश तसंच हिंदीतून करतो, तेंव्हा कधी तरी एका मित्राने 'इतक्या सहजपणे भाषा बदलायची का गरज वाटते'? असं विचारलं होतं, तेंव्हा मी खालील उत्तर दिलं होतं: कभी इंग्लिश या मराठी, कभी हिंदी मेरी बोली है भाषा तो केवल माध्यम है दिल चाहे वो कहने की कभी मैं सोचूं सावन की, कभी मन में होली है जरूरत है जो कहो, लोगोंके दिल में रहने की

डानराव, तुमच्याही अगदी सहमत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोयीसाठी आणि संवादासाठी म्हणून दुसरी, दुसर्‍याची भाषा बोलली थोडी तर कुठे काही अडत नाही. अवांतरः कधी कामाच्या निमित्ताने परदेशात फिरताना लक्षात आलं आपण स्थानिक भाषेत तोडकं मोडकं 'नमस्कार' केलं तरीही लोकं मग इंग्लिशमधून शक्य तेवढी मदत करतात. कालच वेरूळच्या लेण्यांच्याखाली एका (तिथल्या दृष्टीने) पॉश रेस्तराँमधे जेवत असताना असं लक्षात आलं की गोरी कातडी पाहिली की छान सर्व्हिस मिळते; पण त्यातल्याच एक बाई जेव्हा अस्खलित हिंदी बोलायला लागल्या तेव्हा त्यांनाही आमच्यासारखंच हाका मारून, बोलावून वेटरचं लक्ष वेधून घेऊन मगच खायला मिळालं. घोडं इथे पेंड खातं! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी 27/01/2009 - 11:12
डान, तू व्यक्त केलेले सगळे विचार अगदी जशाच्या तसे मनात डोकावून गेलेत / जातात. मनातील द्वंद्व छान उतरवलं आहेस.

27/01/2009 - 11:51
सुंदर लेखन. मुक्तक आहे आपण म्हणालात तसं. पण बाष्कळ बडबड निश्चितच नाही. पटलं आणि खूप आवडलं.

डॉन राव सुंदरच लिहिले आहेत. आणी प्रतीसाद बघुन वाटत आहे की तुम्ही तुमच्या प्रमाणेच अजुनही बर्‍याच जणांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहेत. माझ्या सायबर मध्ये येणार्‍या बर्‍याचशा मुली, मुले हे परप्रांतिय आहेत पण ते खुप प्रयत्न करुन मराठीत बोलायचा प्रयत्न करत आहेत हे बघुन खुप बरे वाटते. मग मी पण कधीतरी बळच पंजाबी नाहितर गुजराथी, बिहारी झाडुन घेतो, मग जेव्हड्या खदखदुन मी त्यांचे मराठी ' एंजॉय करतो तेव्हडेच ते माझे बोलणे एंजॉय करतात ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मुद्दा चांगला आहे. थोडक्यात मांडता असता तर जास्त प्रभावी वाटला असता. प्रत्येक लाल परिच्छेदा नंतर येणारा नीळा परिच्छेद काय सांगणार आहे ह्याची आगाऊ कल्पना येते. अती पुनरोक्तीमुळे लेखन किंचित प्रभावहीन झाले आहे. असो. इतके विरुद्ध आचार विचार आपले नसतात. बँगलोर मध्ये जे जे प्रसंग अनुभवास आले त्या त्या प्रसंगांच्या पुणेरी आवृत्तीची आठवण (किंवा उलट) नक्की होत असू शकते. अशी आठवण माणसाला अंतर्मुख करते. आपलं इथे किंवा तिथे काय चुकतय ह्याचं आपण गणित मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो. ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

अवलिया 27/01/2009 - 12:31
ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. पूर्णपणे सहमत. --अवलिया अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन 27/01/2009 - 12:25
सर्वात प्रथम लेख आवडल्याचे आवर्जुन कळवण्यार्‍या सर्व जणांचे आभार ...! पण मला वाटते की काहितरी गल्लत होते आहे, मी जे मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत व्यवस्थीत पोहचत नाहीये, दुसराच व थोडासा "संकुचित अर्थ" कदाचित ह्या लेखातुन निघत आहे. हा लेख "फक्त भाषा" ह्या पुरता मर्यादीत मुळीच नाही, मात्र भाषा ही गोष्ट नक्कीच ह्या लेखात विचारात घेतली आहे. असो. तर मी हा लेख एकंदरच विवीध प्रदेशातील संस्कॄती, राहणीमान, सवयी, मानसीकता, खाणेपिणे, आचारविचार, सण ह्यांच्यातील बदल आणि एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची ह्या बदलाला ऍडज्स्ट करुन घेताना होणारी मानसीक घुसमट यांचा वेध घ्यायचा प्रयत्न म्हणुन लिहला आहे. आपण जेव्हा आपल्या स्वःताच्या प्रदेशात असतो तेव्हा आपला "फ्रेम ऑफ रेफरंस" हा अतिशय मर्यादीत असतो, आपण बाहेरचे काही पाहिलेलेच नसते. त्यामुळे अनावधानाने का होईना आपण आपली बाजु "उच्च / श्रेष्ठ " मानायला सुरवात करतो. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या "कक्षेत" येते तेव्हा आपण नकळत त्याची तुलना आपल्याबरोबर करायला सुरवात करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या "फ्रेमशी" विसंगत दिसते तेव्हा ती गोष्ट आपण त्वरित "हलक्या दर्जा"ची ठरवुन मोकळे होतो. शिवाय महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या बदल घडवुन आपल्याप्रमाणे आचरण करावे हा आपला "अट्टाहास " असतो / आहे. काही तुरळक प्रमाणात हे शक्यही आहे जसे की खाणे-पिणे , भाषा, कपडे वगैरे स्थानीक आवडीशी जुळवुन घेऊ शकतो ... पण जेव्हा प्रश्न हा "संस्कारांचा, विचारांचा व राहणीमानाचा" येतो तेव्हा ह्या गोष्टी जुळवुन घेणे अवघड बनते, मग तेथे सुरवात होते द्वंद्वाला व क्वचितच वादाला सुद्धा ... पण ह्यावेळी प्रदेश आपला असल्याने आपल्याला आपलीच बाजु बरोबर वाटते व दुसर्‍याने बदलावेच असा एक अनाठायी अट्टाहास बहुतेकांच्या वागण्यात दिसतो ... नेमके असेच घडते जेव्हा मी "परक्या प्रदेशात" जातो. पण ह्यावेळी "व्हिक्टीम" मात्र मी असतो. आता मला हे "बदल" माझ्यावर आक्रमण करणारे वाटतात व आतुन कोठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण होते. बदल तर करावेच लागतात पण कुठल्या पातळीपर्यंत करावे ह्यासाठी परिमाण वेगवेगळे आहेत, ह्यात एकदम होणे शक्य नाही. मी वर म्हटल्याप्रमाने मी इथली भाषा शिकेन, खाणेपिणे सवय लाऊन घेईल, सण साजरे करीन पण मुळात जे "मराठी संस्कार" आहेत ते विसरुन "कन्नड संस्कार" अंगिकारणे मला निश्चितच जड जाईल व अर्थात मला ते मान्य नसेल. इथेही मग "द्वंद्व" सुरु होईलच ...! तर थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकजण आपला स्वतःचा असा संस्कॄती, संस्कार, आचारविचार, राहणीमान ह्यांचा आपल्या सोईनुसार "चष्मे " बनवुन घेतो व त्यातुन दिसणार्‍या गोष्टींविषयी आपल्या सोईचे मत बनवतो. मात्र जेव्हा त्याला हा चष्मा उतरवुन कधीच न पाहिलेल्या एखाद्या प्रदेशात नग्न डोळ्यांनी जावे लागते तेव्हा मात्र तो अडखळतो ...! ह्यालाच मी त्या व्यक्तीचा "अर्जुन झाला " अशी समर्पक उपमा देईन ... अजुन बरेच लिहायचे आहे, तुर्तास एवढेच. बाकी सवडीने ... धन्यवाद ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन भाऊ, लेख मुक्तक म्हणून एकवेळ छान जमला आहे असे म्हणता येईल. पण त्यातून आपल्याला अपेक्षित नसलेला संदेश गेला आहे व तो बहुतेक करुन भाषेभोवतीच फिरत राहिलेला आहे. मात्र ही पुरवणी फार छान लिहिलीत. ती आवडली. पेठकर काका म्हणतात ते एकदम बरोब्बर. जिथे जाल तिथली भाषा/संस्कृती यांशी एकरुप होण्यातच शहाणपणा. मी कलकत्त्याच्या वास्तव्यात दोन महिन्यांत चांगला बंगाली बोलू लागलो होतो. आमच्या मिटिंगा बर्‍यापैकी बंगालीतूनच होत. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतींयाकडून माझी हीच अग्रही अपेक्षा आहे. मूळ लेखात एक खटकलेली बाब: महाराष्ट्रात बरेचदा पाट्यांवर मराठी नसतेच. केवळ इंग्रजीत पाट्या असतात. राज साहेबांसह सगळ्या मराठी प्रेमींची इच्छा/अपेक्षा येवढीच आहे की बाबांनो, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, ज्या भाषेत लिहायचे आहे ते लिहा पण पाट्यांवरील नावे मराठीत सुद्धा असू द्या. कर्नाटकात पाट्यांवर केवळ कन्नडच असल्याचे आपणच सांगितलेत, बाकी मी कधी बंगरुळूला गेलेलो नाही.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व. आपला, (परदेशस्थ मराठी) भास्कर

ऍडीजोशी 27/01/2009 - 14:28
डॉन प्रमाणे मी सुद्धा आधी महराष्ट्र आणि आता बँगलोर ला आल्याने हेच अनुभव असेच मलाही आले आहेत (सौम्या वगळून :() पण एक मुद्दा आपण विसरतोय की मराठी लोकं अजूनही मराठीत बोलण्याबाबत इथल्या लोकांइतकी कट्टर नाहीत. अगदीच अंगाशी आल्यावर मराठीबाणा जागॄत झालाय. आत्ता कुठे मराठी लोकं मराठीचा आग्रह धरू लागली आहेत. राज ठाकरे नी बांबू टाकल्यावर पाट्या मराठीत दिसू लागल्यात. आणि बर्‍याच प्रमाणात दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलू लागलीत. त्या आधी आओ जाओ घर तुम्हारा, मराठी येत नाही आम्ही हिंदीत बोलू. मुंबईमधे आयुष्य घालवून मराठीत एक वाक्य न बोलणारे भो%#$@#%#% भि%#$#%#@% भु$#%#$#%#@% चे भैय्ये इथे मात्र व्यवस्थीत कन्नड शिकून घेतात. एका भैयानेच मला हे सांगितलं 'इनकी भासा में नही बोलेंगे तो धंदा नही होगा'. कामत यात्री निवास च्या समोर बसतो हा पानवाला. इथे मात्र हिंदी पण चालत नाही. वाट्टेल ते झालं तरी हिंदी मधे न बोलणारा रिक्षावाला आपण त्याची हिंदीत आई बहीण काढली लगेच म्हणतो 'गाली कायको देता है?' अरे >%#$@#%#% कळतं ना तुला हिंदी मग दोन वाक्य बोलल्याने जीभ झडते का तुझी? त्यामुळे मी महराष्ट्रात उशीरा जागॄत झालेला मराठीचा अभिमान आणि इथल्या लोकांचा अडेलतट्टूपणा ह्यांना एकाचा मापात मोजणार नाही.

आनंदयात्री 27/01/2009 - 14:50
भो पार्था, आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कोणी राजकिय नेता म्हणतो किंवा एखादा मुद्दा मांडतो म्हणुन आपण ती विचारपद्धती (वाद) आपली म्हणतो. खरे पाहिले तर त्या मुद्द्याला याआधीच्या आयुष्यात किंवा भावविश्वात काहीही स्थान नसते, आपण उगाचच आपली मानसिक दमवणुन करुन घेतो. मी माझ्या काही अमेरिकेतल्या हुशार मित्रांकडुन गेंड्याच्या कातडीचे जाकिट आणलेय. ;) श्रद्धा कुठेच ठेवायची नाही हा मुलमंत्र !! - (सुदर्शनधारी) आंद्या गवळी

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री 27/01/2009 - 16:25
>>आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कृपया आपली हा शब्द देखिल त्याच्या बहुवचनाधारित अर्थाने लक्षात घ्यावा. तुमची हा शब्द वापरलेला नाही याची नोंद घ्यावी. no offence meant !

आम्ही पहिल्यापासुनच प्रांतीयवादाच्या विरोधात आहोत! परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! - टिंग्याकृष्ण अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! >>हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. सहमत! कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदीभाषिक संख्या जास्त असल्याने सर्वत्र बोलली जाते. >>तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. असो - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! साधारणपणे माझ्या आजूबाजूला जितके परप्रांतिय आहेत ते आयटी किंवा बँकांमधले आहेत त्यामुळे त्याना विंग्रजी येते असे गृहीत धरता येते.(आयटी किंवा ब्यांकांमधे असणारे झाडूवाले नव्हे. कारण त्याना विंग्रजी येते का नाही ते मला माहीत नाही.) >>तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. हो त्या गृहीतकावरच आधारीत प्रतिसाद आहे. आणि लेखही बराचसा त्या गृहीतकावर आधारीत आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

लिखाळ 27/01/2009 - 21:08
स्फुट छान आहे. स्थानिक रिती-रिवाजांशी जुळवून घेणेच बरोबर आहे. अशी अपेक्षा स्थानिकांची असावीच. भारतभर अथवा जगात इतरत्र शाखा असणार्‍या अस्थापनेत कोणत्या भाषेत व्यवहार चालावा याचे काही संकेत असावेतच आणि पाळलेही जावेत. स्वत:कडे बारकाईने पाहून आपल्या काही चुका तर होत नाहित ना हे तपासणे केव्हाही चांगलेच, लेख आवडला. -- लिखाळ.

प्राजु 27/01/2009 - 21:18
डॉनभाऊ, लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे. मस्तच. प्रांत बदलला की, आपल्यालाही काही प्रमाणात बदलावं लागतंच याचं उत्तम स्पष्टीकरण केलं आहेस तुझ्या प्रतिसादात. यावरून एक किस्सा आठवला, आमचे एक स्नेही पूर्णपणे शाकाहारी. भारतात असताना कधीही अंड्याला स्पर्शही न केलेले. जेव्हा चायनामध्ये गेले, तेव्हा मात्र बाकी काही खाण्यापेक्षा अंडे आणि चिकन बरे असे म्हणून खायला तर लागलेच पण नंतर उत्तम बनवायलाही लागले. स्वतः मध्ये बदल कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाची ती मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा पुरती असते तर कोणाची त्यापेक्षा थोडी वर अथवा खाली असते. सुंदर स्फुट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 27/01/2009 - 21:38
आपण जिथे रहात असतो त्यासापेक्ष सगळ्या गोष्टी दिसायला लागतात/असाव्यात असे वाटायला लागते. परप्रांतात गेल्याने मनाची कवाडे उघडली जाऊन विचारांना मोकळेपणा येतो तो हाच असावा! तुझ्या मनात गोंधळ आहे असे वाटत नाही उलट तू त्रयस्थ राहून दोन्ही गोष्टी पाहू शकतो आहेस म्हणजे गोंधळाची अवस्था मागे पडली आहे असे वाटते. (ह्यापुढे भारताबाहेर गेल्यावर अजून वेगळेच संवाद मनात येतील हे नक्की. शेवटी आपण रहात असतो ते आपले जग असते हेच खरे.) चतुरंग

In reply to by स्वामि

अनामिक 27/01/2009 - 22:11
कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे. तुम्ही नक्की कोणत्या भारतात राहता? सर्वांना व्यवहारिक पातळीवर समजणारी म्हणताना तुम्ही आय टी आणि इतर उच्चस्तरावरिल नोकरी करणार्‍या समाजा बद्दलच विचार केलेला दिसतोय. अनामिक

धनंजय 27/01/2009 - 22:44
निष्कर्ष काढणार्‍यावर सोडला आहे, डॉन यांनी. हे उत्तमच. पण लाल निळे अनुभव समांतर योजण्याची खुबी छान जमली आहे. "केल्याने देशाटन..."

शितल 27/01/2009 - 23:28
डॉन्या, तुझ्या मनातील व्दंद चांगले व्यक्त केले आहेस. जे आपल्या अंगवळणी पडले आहे तेच आपण जास्त पसंत करतो किंवा मनाचा कौल तिकडे झुकतो, हे स्वाभाविक आहे. :) पण स्वतःचे ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्ट अशी एकंदरीत तुझ्या मनाची अवस्था होत नाही आहे ना ह्याचा विचार करायला हवा.

मृदुला 28/01/2009 - 02:51
लेखातल्या परिस्थितीतून जाऊन दहा वर्षे झाली. :-) मध्यंतरात कानडी जिलब्या वाचता येऊ लागल्या, रिक्षावाल्यांशी भांडतादेखील येऊ लागले. जिथे असू तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती आपलीशी करण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे. दाक्षिणात्यांच्या भाषाप्रेमाविषयी बोलले जाते पण उत्तरेतले लोक हिंदीशिवाय दुसरी कोणती भाषा बोलतात? मराठी माणसाने समाईक भाषा म्हणून हिंदीऐवजी ग्लोबल इंग्रजी वापरावी असे मला वाटते.

प्रमोद देव 28/01/2009 - 21:28
डॉन्या मस्तच लिहिलंय. पटलंसुद्धा! म्हणूनच संतश्रेष्ट तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी असे काहीसे लिहून ठेवलंय.....बी रोमन व्हेन इन रोम! ;) म्हणजे मग पंचाईत होत नाही. अर्थात ऐकायला हे कितीही मस्त वाटले तरी आचरणात आणायला मात्र कठीणच आहे बरं का!

डॉन्या, लेख उत्तम, प्रतिक्रियाही उत्तम... ..आणि निष्कर्ष स्वतः काढण्याचा अट्टाहास नाही ते अतिउत्तम.. मजा आली.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन 27/01/2009 - 09:41
:) सेम टू सेम ! * येथे काही माझे हिंदी भाषीक माझे मित्र माझ्याशी बोलताना "जय महाराष्ट्र"म्हणातात व मी त्यांना " जय हरयाना" ह्याचा एक फायदा झाला त्यामायला जेव्हा चुकुन राजसाहेबांच्या सैनिकांनी हरयणावाल्यांना कुठ मुंबई मध्ये मारलं ..... पण मला येथे मार बसला नाही हे नशीब. ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सहज 27/01/2009 - 09:54
खूप रोचक लिहले आहेस. आपण सारेच अर्जुन!!

In reply to by सहज

छोटा डॉन 27/01/2009 - 09:58
>>आपण सारेच अर्जुन!! काय योगायोग आहे पहा, योग्य शिर्षक सापडले नाही म्हणुन २ दिवस मी लिखाण अप्रकाशित ठेवले. शेवटी वैतागुन आज टाकले, आपण दुसर्‍याच प्रतिसादात एकदम करेक्ट "शिर्षक" मिळवुन दिले. आभार ...! आपली परवानगी असेल तर मी हे "शिर्षक" म्हणुन वापरु इच्छितो ... बोला काय म्हणता ? ------ छोटा डॉन

नितिन थत्ते 27/01/2009 - 10:14
~X( प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे पण त्यामुळे उत्तर धूसर झले आहे. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

बहुगुणी 27/01/2009 - 10:50
मी माझं किरकोळ (नेहेमीच स्वान्तसुखाय) लिखाण करतांना अनाहुतपणे मराठी, इंग्लिश तसंच हिंदीतून करतो, तेंव्हा कधी तरी एका मित्राने 'इतक्या सहजपणे भाषा बदलायची का गरज वाटते'? असं विचारलं होतं, तेंव्हा मी खालील उत्तर दिलं होतं: कभी इंग्लिश या मराठी, कभी हिंदी मेरी बोली है भाषा तो केवल माध्यम है दिल चाहे वो कहने की कभी मैं सोचूं सावन की, कभी मन में होली है जरूरत है जो कहो, लोगोंके दिल में रहने की

डानराव, तुमच्याही अगदी सहमत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोयीसाठी आणि संवादासाठी म्हणून दुसरी, दुसर्‍याची भाषा बोलली थोडी तर कुठे काही अडत नाही. अवांतरः कधी कामाच्या निमित्ताने परदेशात फिरताना लक्षात आलं आपण स्थानिक भाषेत तोडकं मोडकं 'नमस्कार' केलं तरीही लोकं मग इंग्लिशमधून शक्य तेवढी मदत करतात. कालच वेरूळच्या लेण्यांच्याखाली एका (तिथल्या दृष्टीने) पॉश रेस्तराँमधे जेवत असताना असं लक्षात आलं की गोरी कातडी पाहिली की छान सर्व्हिस मिळते; पण त्यातल्याच एक बाई जेव्हा अस्खलित हिंदी बोलायला लागल्या तेव्हा त्यांनाही आमच्यासारखंच हाका मारून, बोलावून वेटरचं लक्ष वेधून घेऊन मगच खायला मिळालं. घोडं इथे पेंड खातं! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी 27/01/2009 - 11:12
डान, तू व्यक्त केलेले सगळे विचार अगदी जशाच्या तसे मनात डोकावून गेलेत / जातात. मनातील द्वंद्व छान उतरवलं आहेस.

27/01/2009 - 11:51
सुंदर लेखन. मुक्तक आहे आपण म्हणालात तसं. पण बाष्कळ बडबड निश्चितच नाही. पटलं आणि खूप आवडलं.

डॉन राव सुंदरच लिहिले आहेत. आणी प्रतीसाद बघुन वाटत आहे की तुम्ही तुमच्या प्रमाणेच अजुनही बर्‍याच जणांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहेत. माझ्या सायबर मध्ये येणार्‍या बर्‍याचशा मुली, मुले हे परप्रांतिय आहेत पण ते खुप प्रयत्न करुन मराठीत बोलायचा प्रयत्न करत आहेत हे बघुन खुप बरे वाटते. मग मी पण कधीतरी बळच पंजाबी नाहितर गुजराथी, बिहारी झाडुन घेतो, मग जेव्हड्या खदखदुन मी त्यांचे मराठी ' एंजॉय करतो तेव्हडेच ते माझे बोलणे एंजॉय करतात ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मुद्दा चांगला आहे. थोडक्यात मांडता असता तर जास्त प्रभावी वाटला असता. प्रत्येक लाल परिच्छेदा नंतर येणारा नीळा परिच्छेद काय सांगणार आहे ह्याची आगाऊ कल्पना येते. अती पुनरोक्तीमुळे लेखन किंचित प्रभावहीन झाले आहे. असो. इतके विरुद्ध आचार विचार आपले नसतात. बँगलोर मध्ये जे जे प्रसंग अनुभवास आले त्या त्या प्रसंगांच्या पुणेरी आवृत्तीची आठवण (किंवा उलट) नक्की होत असू शकते. अशी आठवण माणसाला अंतर्मुख करते. आपलं इथे किंवा तिथे काय चुकतय ह्याचं आपण गणित मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो. ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

अवलिया 27/01/2009 - 12:31
ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. पूर्णपणे सहमत. --अवलिया अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन 27/01/2009 - 12:25
सर्वात प्रथम लेख आवडल्याचे आवर्जुन कळवण्यार्‍या सर्व जणांचे आभार ...! पण मला वाटते की काहितरी गल्लत होते आहे, मी जे मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत व्यवस्थीत पोहचत नाहीये, दुसराच व थोडासा "संकुचित अर्थ" कदाचित ह्या लेखातुन निघत आहे. हा लेख "फक्त भाषा" ह्या पुरता मर्यादीत मुळीच नाही, मात्र भाषा ही गोष्ट नक्कीच ह्या लेखात विचारात घेतली आहे. असो. तर मी हा लेख एकंदरच विवीध प्रदेशातील संस्कॄती, राहणीमान, सवयी, मानसीकता, खाणेपिणे, आचारविचार, सण ह्यांच्यातील बदल आणि एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची ह्या बदलाला ऍडज्स्ट करुन घेताना होणारी मानसीक घुसमट यांचा वेध घ्यायचा प्रयत्न म्हणुन लिहला आहे. आपण जेव्हा आपल्या स्वःताच्या प्रदेशात असतो तेव्हा आपला "फ्रेम ऑफ रेफरंस" हा अतिशय मर्यादीत असतो, आपण बाहेरचे काही पाहिलेलेच नसते. त्यामुळे अनावधानाने का होईना आपण आपली बाजु "उच्च / श्रेष्ठ " मानायला सुरवात करतो. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या "कक्षेत" येते तेव्हा आपण नकळत त्याची तुलना आपल्याबरोबर करायला सुरवात करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या "फ्रेमशी" विसंगत दिसते तेव्हा ती गोष्ट आपण त्वरित "हलक्या दर्जा"ची ठरवुन मोकळे होतो. शिवाय महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या बदल घडवुन आपल्याप्रमाणे आचरण करावे हा आपला "अट्टाहास " असतो / आहे. काही तुरळक प्रमाणात हे शक्यही आहे जसे की खाणे-पिणे , भाषा, कपडे वगैरे स्थानीक आवडीशी जुळवुन घेऊ शकतो ... पण जेव्हा प्रश्न हा "संस्कारांचा, विचारांचा व राहणीमानाचा" येतो तेव्हा ह्या गोष्टी जुळवुन घेणे अवघड बनते, मग तेथे सुरवात होते द्वंद्वाला व क्वचितच वादाला सुद्धा ... पण ह्यावेळी प्रदेश आपला असल्याने आपल्याला आपलीच बाजु बरोबर वाटते व दुसर्‍याने बदलावेच असा एक अनाठायी अट्टाहास बहुतेकांच्या वागण्यात दिसतो ... नेमके असेच घडते जेव्हा मी "परक्या प्रदेशात" जातो. पण ह्यावेळी "व्हिक्टीम" मात्र मी असतो. आता मला हे "बदल" माझ्यावर आक्रमण करणारे वाटतात व आतुन कोठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण होते. बदल तर करावेच लागतात पण कुठल्या पातळीपर्यंत करावे ह्यासाठी परिमाण वेगवेगळे आहेत, ह्यात एकदम होणे शक्य नाही. मी वर म्हटल्याप्रमाने मी इथली भाषा शिकेन, खाणेपिणे सवय लाऊन घेईल, सण साजरे करीन पण मुळात जे "मराठी संस्कार" आहेत ते विसरुन "कन्नड संस्कार" अंगिकारणे मला निश्चितच जड जाईल व अर्थात मला ते मान्य नसेल. इथेही मग "द्वंद्व" सुरु होईलच ...! तर थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकजण आपला स्वतःचा असा संस्कॄती, संस्कार, आचारविचार, राहणीमान ह्यांचा आपल्या सोईनुसार "चष्मे " बनवुन घेतो व त्यातुन दिसणार्‍या गोष्टींविषयी आपल्या सोईचे मत बनवतो. मात्र जेव्हा त्याला हा चष्मा उतरवुन कधीच न पाहिलेल्या एखाद्या प्रदेशात नग्न डोळ्यांनी जावे लागते तेव्हा मात्र तो अडखळतो ...! ह्यालाच मी त्या व्यक्तीचा "अर्जुन झाला " अशी समर्पक उपमा देईन ... अजुन बरेच लिहायचे आहे, तुर्तास एवढेच. बाकी सवडीने ... धन्यवाद ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन भाऊ, लेख मुक्तक म्हणून एकवेळ छान जमला आहे असे म्हणता येईल. पण त्यातून आपल्याला अपेक्षित नसलेला संदेश गेला आहे व तो बहुतेक करुन भाषेभोवतीच फिरत राहिलेला आहे. मात्र ही पुरवणी फार छान लिहिलीत. ती आवडली. पेठकर काका म्हणतात ते एकदम बरोब्बर. जिथे जाल तिथली भाषा/संस्कृती यांशी एकरुप होण्यातच शहाणपणा. मी कलकत्त्याच्या वास्तव्यात दोन महिन्यांत चांगला बंगाली बोलू लागलो होतो. आमच्या मिटिंगा बर्‍यापैकी बंगालीतूनच होत. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतींयाकडून माझी हीच अग्रही अपेक्षा आहे. मूळ लेखात एक खटकलेली बाब: महाराष्ट्रात बरेचदा पाट्यांवर मराठी नसतेच. केवळ इंग्रजीत पाट्या असतात. राज साहेबांसह सगळ्या मराठी प्रेमींची इच्छा/अपेक्षा येवढीच आहे की बाबांनो, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, ज्या भाषेत लिहायचे आहे ते लिहा पण पाट्यांवरील नावे मराठीत सुद्धा असू द्या. कर्नाटकात पाट्यांवर केवळ कन्नडच असल्याचे आपणच सांगितलेत, बाकी मी कधी बंगरुळूला गेलेलो नाही.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व. आपला, (परदेशस्थ मराठी) भास्कर

ऍडीजोशी 27/01/2009 - 14:28
डॉन प्रमाणे मी सुद्धा आधी महराष्ट्र आणि आता बँगलोर ला आल्याने हेच अनुभव असेच मलाही आले आहेत (सौम्या वगळून :() पण एक मुद्दा आपण विसरतोय की मराठी लोकं अजूनही मराठीत बोलण्याबाबत इथल्या लोकांइतकी कट्टर नाहीत. अगदीच अंगाशी आल्यावर मराठीबाणा जागॄत झालाय. आत्ता कुठे मराठी लोकं मराठीचा आग्रह धरू लागली आहेत. राज ठाकरे नी बांबू टाकल्यावर पाट्या मराठीत दिसू लागल्यात. आणि बर्‍याच प्रमाणात दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलू लागलीत. त्या आधी आओ जाओ घर तुम्हारा, मराठी येत नाही आम्ही हिंदीत बोलू. मुंबईमधे आयुष्य घालवून मराठीत एक वाक्य न बोलणारे भो%#$@#%#% भि%#$#%#@% भु$#%#$#%#@% चे भैय्ये इथे मात्र व्यवस्थीत कन्नड शिकून घेतात. एका भैयानेच मला हे सांगितलं 'इनकी भासा में नही बोलेंगे तो धंदा नही होगा'. कामत यात्री निवास च्या समोर बसतो हा पानवाला. इथे मात्र हिंदी पण चालत नाही. वाट्टेल ते झालं तरी हिंदी मधे न बोलणारा रिक्षावाला आपण त्याची हिंदीत आई बहीण काढली लगेच म्हणतो 'गाली कायको देता है?' अरे >%#$@#%#% कळतं ना तुला हिंदी मग दोन वाक्य बोलल्याने जीभ झडते का तुझी? त्यामुळे मी महराष्ट्रात उशीरा जागॄत झालेला मराठीचा अभिमान आणि इथल्या लोकांचा अडेलतट्टूपणा ह्यांना एकाचा मापात मोजणार नाही.

आनंदयात्री 27/01/2009 - 14:50
भो पार्था, आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कोणी राजकिय नेता म्हणतो किंवा एखादा मुद्दा मांडतो म्हणुन आपण ती विचारपद्धती (वाद) आपली म्हणतो. खरे पाहिले तर त्या मुद्द्याला याआधीच्या आयुष्यात किंवा भावविश्वात काहीही स्थान नसते, आपण उगाचच आपली मानसिक दमवणुन करुन घेतो. मी माझ्या काही अमेरिकेतल्या हुशार मित्रांकडुन गेंड्याच्या कातडीचे जाकिट आणलेय. ;) श्रद्धा कुठेच ठेवायची नाही हा मुलमंत्र !! - (सुदर्शनधारी) आंद्या गवळी

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री 27/01/2009 - 16:25
>>आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कृपया आपली हा शब्द देखिल त्याच्या बहुवचनाधारित अर्थाने लक्षात घ्यावा. तुमची हा शब्द वापरलेला नाही याची नोंद घ्यावी. no offence meant !

आम्ही पहिल्यापासुनच प्रांतीयवादाच्या विरोधात आहोत! परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! - टिंग्याकृष्ण अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! >>हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. सहमत! कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदीभाषिक संख्या जास्त असल्याने सर्वत्र बोलली जाते. >>तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. असो - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! साधारणपणे माझ्या आजूबाजूला जितके परप्रांतिय आहेत ते आयटी किंवा बँकांमधले आहेत त्यामुळे त्याना विंग्रजी येते असे गृहीत धरता येते.(आयटी किंवा ब्यांकांमधे असणारे झाडूवाले नव्हे. कारण त्याना विंग्रजी येते का नाही ते मला माहीत नाही.) >>तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. हो त्या गृहीतकावरच आधारीत प्रतिसाद आहे. आणि लेखही बराचसा त्या गृहीतकावर आधारीत आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

लिखाळ 27/01/2009 - 21:08
स्फुट छान आहे. स्थानिक रिती-रिवाजांशी जुळवून घेणेच बरोबर आहे. अशी अपेक्षा स्थानिकांची असावीच. भारतभर अथवा जगात इतरत्र शाखा असणार्‍या अस्थापनेत कोणत्या भाषेत व्यवहार चालावा याचे काही संकेत असावेतच आणि पाळलेही जावेत. स्वत:कडे बारकाईने पाहून आपल्या काही चुका तर होत नाहित ना हे तपासणे केव्हाही चांगलेच, लेख आवडला. -- लिखाळ.

प्राजु 27/01/2009 - 21:18
डॉनभाऊ, लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे. मस्तच. प्रांत बदलला की, आपल्यालाही काही प्रमाणात बदलावं लागतंच याचं उत्तम स्पष्टीकरण केलं आहेस तुझ्या प्रतिसादात. यावरून एक किस्सा आठवला, आमचे एक स्नेही पूर्णपणे शाकाहारी. भारतात असताना कधीही अंड्याला स्पर्शही न केलेले. जेव्हा चायनामध्ये गेले, तेव्हा मात्र बाकी काही खाण्यापेक्षा अंडे आणि चिकन बरे असे म्हणून खायला तर लागलेच पण नंतर उत्तम बनवायलाही लागले. स्वतः मध्ये बदल कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाची ती मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा पुरती असते तर कोणाची त्यापेक्षा थोडी वर अथवा खाली असते. सुंदर स्फुट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 27/01/2009 - 21:38
आपण जिथे रहात असतो त्यासापेक्ष सगळ्या गोष्टी दिसायला लागतात/असाव्यात असे वाटायला लागते. परप्रांतात गेल्याने मनाची कवाडे उघडली जाऊन विचारांना मोकळेपणा येतो तो हाच असावा! तुझ्या मनात गोंधळ आहे असे वाटत नाही उलट तू त्रयस्थ राहून दोन्ही गोष्टी पाहू शकतो आहेस म्हणजे गोंधळाची अवस्था मागे पडली आहे असे वाटते. (ह्यापुढे भारताबाहेर गेल्यावर अजून वेगळेच संवाद मनात येतील हे नक्की. शेवटी आपण रहात असतो ते आपले जग असते हेच खरे.) चतुरंग

In reply to by स्वामि

अनामिक 27/01/2009 - 22:11
कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे. तुम्ही नक्की कोणत्या भारतात राहता? सर्वांना व्यवहारिक पातळीवर समजणारी म्हणताना तुम्ही आय टी आणि इतर उच्चस्तरावरिल नोकरी करणार्‍या समाजा बद्दलच विचार केलेला दिसतोय. अनामिक

धनंजय 27/01/2009 - 22:44
निष्कर्ष काढणार्‍यावर सोडला आहे, डॉन यांनी. हे उत्तमच. पण लाल निळे अनुभव समांतर योजण्याची खुबी छान जमली आहे. "केल्याने देशाटन..."

शितल 27/01/2009 - 23:28
डॉन्या, तुझ्या मनातील व्दंद चांगले व्यक्त केले आहेस. जे आपल्या अंगवळणी पडले आहे तेच आपण जास्त पसंत करतो किंवा मनाचा कौल तिकडे झुकतो, हे स्वाभाविक आहे. :) पण स्वतःचे ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्ट अशी एकंदरीत तुझ्या मनाची अवस्था होत नाही आहे ना ह्याचा विचार करायला हवा.

मृदुला 28/01/2009 - 02:51
लेखातल्या परिस्थितीतून जाऊन दहा वर्षे झाली. :-) मध्यंतरात कानडी जिलब्या वाचता येऊ लागल्या, रिक्षावाल्यांशी भांडतादेखील येऊ लागले. जिथे असू तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती आपलीशी करण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे. दाक्षिणात्यांच्या भाषाप्रेमाविषयी बोलले जाते पण उत्तरेतले लोक हिंदीशिवाय दुसरी कोणती भाषा बोलतात? मराठी माणसाने समाईक भाषा म्हणून हिंदीऐवजी ग्लोबल इंग्रजी वापरावी असे मला वाटते.

प्रमोद देव 28/01/2009 - 21:28
डॉन्या मस्तच लिहिलंय. पटलंसुद्धा! म्हणूनच संतश्रेष्ट तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी असे काहीसे लिहून ठेवलंय.....बी रोमन व्हेन इन रोम! ;) म्हणजे मग पंचाईत होत नाही. अर्थात ऐकायला हे कितीही मस्त वाटले तरी आचरणात आणायला मात्र कठीणच आहे बरं का!

डॉन्या, लेख उत्तम, प्रतिक्रियाही उत्तम... ..आणि निष्कर्ष स्वतः काढण्याचा अट्टाहास नाही ते अतिउत्तम.. मजा आली.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल. पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन .... बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन .... आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय.

(विचार)मंथन!

राघव ·

सुहास..सदेव हसनार्.. 23/01/2009 - 20:39
बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही! सही.... सुहास (सध्यातरी मी कशासाठी जगतोयपेक्षा...कुठे जगतोय याचाच जास्त विचार करणारा...) ब॑गळूरात कुठे आहात(मीही सध्या ईथेच्...E-cityमध्ये)

लिखाळ 23/01/2009 - 20:40
चांगले स्फुट ! कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आणि त्यामुळे शाश्वत असे ध्येय सुद्धा नाही. कितीही महापुरुषांची नावे घेतली तरी 'मातीवर चढणे एक नवा थर अंती' हीच वस्तुस्थिती आहे. आपण सुखासाठी जगतो. आज दु:ख असेल तर उद्या सुख मिळेल या आशेने दिवस ढकलतो. जीवन संपवावेसे वाटणे हे स्वाभाविक वाटते आणि तसे करणे गैर वाटत नाही. तरीही पुढे सुख येण्याची शक्यता असल्याने तिकडे डोळे लाउन जगणे हा जुगार फायदासुद्धा मिळवून देतो... -- लिखाळ.

दशानन 23/01/2009 - 20:51
खुपच छान विचार व्यक्त केले आहेस... मनापासून आवडले. मी शेयर बझार मध्ये लुटला म्हणून आत्महत्या करणारे.... प्रेमासाठी जिव देणारे... काहीच करु शकत नाही ह्या निराशेतून जिव देणारे ह्या तीन कॅटेगिरीतील लोकांना ते जिवंत असताना .... त्याच्या मरनाच्या काही काळ आधी भेटलो आहे.... अक्षरशः त्यांची दुख: अंगावर येत होती त्यावेळी पण जसा जसा काळ गेला तसे तसे कळाले / समजले / उमजले की त्यांनी लास्ट पर्याय निवडावयास नको होता.. शक्यतो अजून एक चान्स मिळाला असताच त्यांना.. ! पण काय होतं की आपण त्यांना विचार व्यक्त करुच देत नाही व फक्त हे करु नकोस ते करु नकोस हेच सांगतो..... काही महिन्यापुर्वीच माझा एक जानकार त्याने आत्महत्या केली ! शेयर मार्केट मध्ये नको एवढं नुकसान खालं.. पण त्याच्या चेह-यावरील हसू कधीच संपल नाही मला वाटलं पण नव्हतं की तो आत्महत्या करेल.. पण त्यांने जे पत्र शेवटी लिहले होते ते वाचल्यावर असं वाटलं की तो मेलेचाच बरा.. ! एकच सांगतो... कृष्ण करे तो रास लिला , हम करे तो पाप ! त्याच भाषेत .... संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! प्रत्येकाच्या नजरेतून जग वेगळचं ! हेच खरं !

In reply to by दशानन

लिखाळ 23/01/2009 - 20:56
जीवनात करण्यासारखे काही राहिले नाही असे वाटल्याने जीव देणे, दु:ख सोसत नाही म्हणुन जीव देणे, संकटांना सामोरे जाणे शक्य उरले नाही म्हणून आत्महत्या करणे आणि सुखाचा शोध लागला आहे असे जाणून त्यातच राहण्याचा प्रयत्न करताना प्राण त्यागणे या प्रत्येक कृतीत फर आहे असे मला वाटते. देह त्याग हे समान सूत्र असले तरी प्रत्येक क्रियेत हेतू आणि परिणाम वेगळे आसावेत. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

दशानन 23/01/2009 - 21:52
फरक कोण व्यक्त करनार ? त्यांना सुखाचाच शोध लागला आहे हे कोण ठरवणार.... वर ज्याचा उल्लेख केला आहे त्यांन आपल्या शेवटच्या चिठी मध्ये हेच लिहलं होतं " मी जगताना खुप दुखः सोसलं पण मरताना मला अत्यंत सुख लाभत आहे"

In reply to by दशानन

राघव 24/01/2009 - 21:13
संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! खरं आहे तुमचं म्हणणं. कारण संतांना अगदी लहानपणापासून त्यांचं जीवन प्रयोजन माहित असतं. त्यासाठीच ते जगत असतात. त्यांचं कोणतंही कार्य स्वार्थप्रेरीत नसतं. कारण स्वार्थ त्यागल्याशिवाय संत होऊच शकत नाही. सामान्य माणसांना सुख-दु:खाला तोंड देताना नाकी नऊ येतात. पण संतांच्याच म्हणण्यानुसार, संत "ही सर्व ईश्वरेच्छा" असं जाणून त्यात अलिप्त असतात. ते प्रपंचात दिसतात, पण त्यात नसतात. अगदी जरूरीपुरता प्रपंच करून ते त्यांच्या मूळ जीवनप्रयोजनात गुंतलेले असतात. मूळ मनोभूमिका, चित्तवृत्ती वेगळी असल्यामुळे असं घडतं. जसं आंब्याची कोय कितीही निपटली तरी त्यात थोडा तरी आंब्याचा मूळ रस शिल्लक राहतो, पण चिकूची बी अलिप्त असते.. मूळ फळाची प्रकृती वेगळी असल्यामुळे असं घडतं. मुमुक्षु

अनामिक 23/01/2009 - 20:54
छान आणि विचार करायला लावणारा लेख! आपण जगतोय कारण आपल्या कुणालाच मरण नको असते म्हणून. 'ध्येय' हे तुमच्या लेखात उल्लेख झालेल्या (आणि तशाच) काही असामान्य व्यक्तींकडेच असु शकतं. नाहीतर आपण आणि आपले ध्येय म्हणजे आपल्यापुरतेच मर्यादित असतात. माझं घर, माझे आई-बाबा, माझी बायको-मुलं, भावंड यांच्यापुढे आपले ध्येय जातच नाही. आपल्यातला "मी" जपण्यातच आपलं आयुष्य जातं. खरं तर आपल्यात आणि जनावरात काहीच फरक नाही... पण तुम्ही म्हणता ते अगदी पटतं..."बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच..." आणि खेदाची बाब म्हणजे आपलं ध्येय हे आपणच आहोत... आणि तेवढंच आपल्याला जगण्यासाठी पुरेसं असतं (हे माझं मत). अनामिक

मनीषा 23/01/2009 - 21:53
अगदी खरं आहे .. विचार करायला लावणारा लेख आहे . जगण्यासाठी प्रयोजन असणे फार मोठी गोष्ट आहे ... प्रत्येक सामान्याजवळ ते असतच असं नाही . मला वाटतं आपल्याला जे मिळालं आहे त्याचा स्विकार करणे हेच 'कारण' जगण्यासाठी पुरेसं आहे . आणि जे आपण देउ शकत नाही, निर्माण करु शकत नाही ... ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ...

In reply to by मनीषा

दशानन 23/01/2009 - 22:13
>>ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ... सहमत. पण तो अधिकार आहे का नाही हे ठरवणार कोन ? आपल्या पिनल कोड नुसार आत्महत्या पाप आहे व सजा होऊ शकते... पण केव्हा ? जर तो मेला नाही तर ! मेला तर ? सुखी ! नाही मेला तर ? जेल मध्ये .. दुखी !

सहज 24/01/2009 - 22:51
मुमुक्षु स्फुट आवडले. सारे संत महात्मे तत्वज्ञानवाले तुम्ही उल्लेख केलेल्या जगण्या-मरण्याला शब्दात बांधायचा खेळ करुन गेले, करत आहेत व करतील. म्हणुन आज जगात जगताना फार भव्य दिव्य करायची गरज नाही आहे. तर माणस जितकी जोडता येतील तितकी जोडणे, यथाशक्ति यथामती दुसर्‍याला मदत बस्स. बाकी जे होईल ते होईल. जगात ज्ञान कमी नाही पण तरीही दु:ख, वाईट काम होतेच. तसेच चांगली कामे देखील होतात. जगात होणार्‍या चांगल्या कामात साथ द्यायची. बस झाले!! तसेच आचार, आहार व विचार आपल्या तब्येतीला झेपेल इतकाच करायचा. :-)

(विचार) मंथन, विवेचन, स्फुट जे काही आहे ते छान आहे. प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

राघव 27/01/2009 - 13:38
प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. खरंय! इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. आयुष्य व्यर्थ आहे असे ज्या लोकांना वाटते तेच आत्मघात करतात. प्रत्येकासाठी निश्चित असे ध्येय तर असतेच. फक्त आपले आपण ओळखले म्हणजे झाले. :) पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ज्यांची मनं कमजोर आहेत त्यांना अशा अवस्थेत भगवंताची आठवणसुद्धा तारून नेते. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हे माहीत नसतांना सुद्धा लोकं ईश्वराला तो "आहे" अशा श्रद्धेने भजतात. ज्याचा त्याचा मार्ग वेगळाच. नाही? ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत. याबद्दल मतभेद राहतीलच. कारण परमार्थ समजण्यासाठी आधी तो करावा लागतो. अन् समजण्या अगोदर करण्याची बुद्धी होण्यासाठी भगवंताची कृपा लागते!! आम्हीसुद्धा अजुन त्याच प्रतिक्षेत आहोत. :) मुमुक्षु

प्राजु 24/01/2009 - 23:37
लेख नीट वाचला.. आणि समजला सुद्धा! खूपच छान. आवांतर : जाता जाता मला हा प्रश्न दिलात तुम्ही आता.. मी कशासाठी जगते आहे? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुहास..सदेव हसनार्.. 23/01/2009 - 20:39
बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही! सही.... सुहास (सध्यातरी मी कशासाठी जगतोयपेक्षा...कुठे जगतोय याचाच जास्त विचार करणारा...) ब॑गळूरात कुठे आहात(मीही सध्या ईथेच्...E-cityमध्ये)

लिखाळ 23/01/2009 - 20:40
चांगले स्फुट ! कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आणि त्यामुळे शाश्वत असे ध्येय सुद्धा नाही. कितीही महापुरुषांची नावे घेतली तरी 'मातीवर चढणे एक नवा थर अंती' हीच वस्तुस्थिती आहे. आपण सुखासाठी जगतो. आज दु:ख असेल तर उद्या सुख मिळेल या आशेने दिवस ढकलतो. जीवन संपवावेसे वाटणे हे स्वाभाविक वाटते आणि तसे करणे गैर वाटत नाही. तरीही पुढे सुख येण्याची शक्यता असल्याने तिकडे डोळे लाउन जगणे हा जुगार फायदासुद्धा मिळवून देतो... -- लिखाळ.

दशानन 23/01/2009 - 20:51
खुपच छान विचार व्यक्त केले आहेस... मनापासून आवडले. मी शेयर बझार मध्ये लुटला म्हणून आत्महत्या करणारे.... प्रेमासाठी जिव देणारे... काहीच करु शकत नाही ह्या निराशेतून जिव देणारे ह्या तीन कॅटेगिरीतील लोकांना ते जिवंत असताना .... त्याच्या मरनाच्या काही काळ आधी भेटलो आहे.... अक्षरशः त्यांची दुख: अंगावर येत होती त्यावेळी पण जसा जसा काळ गेला तसे तसे कळाले / समजले / उमजले की त्यांनी लास्ट पर्याय निवडावयास नको होता.. शक्यतो अजून एक चान्स मिळाला असताच त्यांना.. ! पण काय होतं की आपण त्यांना विचार व्यक्त करुच देत नाही व फक्त हे करु नकोस ते करु नकोस हेच सांगतो..... काही महिन्यापुर्वीच माझा एक जानकार त्याने आत्महत्या केली ! शेयर मार्केट मध्ये नको एवढं नुकसान खालं.. पण त्याच्या चेह-यावरील हसू कधीच संपल नाही मला वाटलं पण नव्हतं की तो आत्महत्या करेल.. पण त्यांने जे पत्र शेवटी लिहले होते ते वाचल्यावर असं वाटलं की तो मेलेचाच बरा.. ! एकच सांगतो... कृष्ण करे तो रास लिला , हम करे तो पाप ! त्याच भाषेत .... संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! प्रत्येकाच्या नजरेतून जग वेगळचं ! हेच खरं !

In reply to by दशानन

लिखाळ 23/01/2009 - 20:56
जीवनात करण्यासारखे काही राहिले नाही असे वाटल्याने जीव देणे, दु:ख सोसत नाही म्हणुन जीव देणे, संकटांना सामोरे जाणे शक्य उरले नाही म्हणून आत्महत्या करणे आणि सुखाचा शोध लागला आहे असे जाणून त्यातच राहण्याचा प्रयत्न करताना प्राण त्यागणे या प्रत्येक कृतीत फर आहे असे मला वाटते. देह त्याग हे समान सूत्र असले तरी प्रत्येक क्रियेत हेतू आणि परिणाम वेगळे आसावेत. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

दशानन 23/01/2009 - 21:52
फरक कोण व्यक्त करनार ? त्यांना सुखाचाच शोध लागला आहे हे कोण ठरवणार.... वर ज्याचा उल्लेख केला आहे त्यांन आपल्या शेवटच्या चिठी मध्ये हेच लिहलं होतं " मी जगताना खुप दुखः सोसलं पण मरताना मला अत्यंत सुख लाभत आहे"

In reply to by दशानन

राघव 24/01/2009 - 21:13
संतांनी घेतला जिव तर ती समाधी, आम्ही दिला तर आत्मघात ! खरं आहे तुमचं म्हणणं. कारण संतांना अगदी लहानपणापासून त्यांचं जीवन प्रयोजन माहित असतं. त्यासाठीच ते जगत असतात. त्यांचं कोणतंही कार्य स्वार्थप्रेरीत नसतं. कारण स्वार्थ त्यागल्याशिवाय संत होऊच शकत नाही. सामान्य माणसांना सुख-दु:खाला तोंड देताना नाकी नऊ येतात. पण संतांच्याच म्हणण्यानुसार, संत "ही सर्व ईश्वरेच्छा" असं जाणून त्यात अलिप्त असतात. ते प्रपंचात दिसतात, पण त्यात नसतात. अगदी जरूरीपुरता प्रपंच करून ते त्यांच्या मूळ जीवनप्रयोजनात गुंतलेले असतात. मूळ मनोभूमिका, चित्तवृत्ती वेगळी असल्यामुळे असं घडतं. जसं आंब्याची कोय कितीही निपटली तरी त्यात थोडा तरी आंब्याचा मूळ रस शिल्लक राहतो, पण चिकूची बी अलिप्त असते.. मूळ फळाची प्रकृती वेगळी असल्यामुळे असं घडतं. मुमुक्षु

अनामिक 23/01/2009 - 20:54
छान आणि विचार करायला लावणारा लेख! आपण जगतोय कारण आपल्या कुणालाच मरण नको असते म्हणून. 'ध्येय' हे तुमच्या लेखात उल्लेख झालेल्या (आणि तशाच) काही असामान्य व्यक्तींकडेच असु शकतं. नाहीतर आपण आणि आपले ध्येय म्हणजे आपल्यापुरतेच मर्यादित असतात. माझं घर, माझे आई-बाबा, माझी बायको-मुलं, भावंड यांच्यापुढे आपले ध्येय जातच नाही. आपल्यातला "मी" जपण्यातच आपलं आयुष्य जातं. खरं तर आपल्यात आणि जनावरात काहीच फरक नाही... पण तुम्ही म्हणता ते अगदी पटतं..."बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच..." आणि खेदाची बाब म्हणजे आपलं ध्येय हे आपणच आहोत... आणि तेवढंच आपल्याला जगण्यासाठी पुरेसं असतं (हे माझं मत). अनामिक

मनीषा 23/01/2009 - 21:53
अगदी खरं आहे .. विचार करायला लावणारा लेख आहे . जगण्यासाठी प्रयोजन असणे फार मोठी गोष्ट आहे ... प्रत्येक सामान्याजवळ ते असतच असं नाही . मला वाटतं आपल्याला जे मिळालं आहे त्याचा स्विकार करणे हेच 'कारण' जगण्यासाठी पुरेसं आहे . आणि जे आपण देउ शकत नाही, निर्माण करु शकत नाही ... ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ...

In reply to by मनीषा

दशानन 23/01/2009 - 22:13
>>ते संपवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही ... सहमत. पण तो अधिकार आहे का नाही हे ठरवणार कोन ? आपल्या पिनल कोड नुसार आत्महत्या पाप आहे व सजा होऊ शकते... पण केव्हा ? जर तो मेला नाही तर ! मेला तर ? सुखी ! नाही मेला तर ? जेल मध्ये .. दुखी !

सहज 24/01/2009 - 22:51
मुमुक्षु स्फुट आवडले. सारे संत महात्मे तत्वज्ञानवाले तुम्ही उल्लेख केलेल्या जगण्या-मरण्याला शब्दात बांधायचा खेळ करुन गेले, करत आहेत व करतील. म्हणुन आज जगात जगताना फार भव्य दिव्य करायची गरज नाही आहे. तर माणस जितकी जोडता येतील तितकी जोडणे, यथाशक्ति यथामती दुसर्‍याला मदत बस्स. बाकी जे होईल ते होईल. जगात ज्ञान कमी नाही पण तरीही दु:ख, वाईट काम होतेच. तसेच चांगली कामे देखील होतात. जगात होणार्‍या चांगल्या कामात साथ द्यायची. बस झाले!! तसेच आचार, आहार व विचार आपल्या तब्येतीला झेपेल इतकाच करायचा. :-)

(विचार) मंथन, विवेचन, स्फुट जे काही आहे ते छान आहे. प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

राघव 27/01/2009 - 13:38
प्रत्येकाचे जगण्याचे ध्येय वेगळे. 'काही ध्येय नसणे' हा त्यातही अजून वेगळेपणा. खरंय! इहलोकीची यात्रा मस्तीत जगणे, सर्व ऐहिक सुखांचा उपभोग घेणे, आपली कर्तव्ये पार पाडणे हेही एखाद्याचे ध्येय असू शकते. समाज सेवेत, समाज प्रबोधनात, समाजोन्नतीत आयुष्य व्यतित करणे काहींना जमते, सर्वांनाच नाही. पण म्हणून त्यांच्या आयुष्याला उदात्त ध्येयच नाही आणि म्हणून त्यांचे जीणे व्यर्थच आहे असा अर्थ नाही. आयुष्य व्यर्थ आहे असे ज्या लोकांना वाटते तेच आत्मघात करतात. प्रत्येकासाठी निश्चित असे ध्येय तर असतेच. फक्त आपले आपण ओळखले म्हणजे झाले. :) पर दु:ख शीतलम् अशी उक्ती आहे. पण दु:खात, संकटात, आपत्तीत कमजोर मनं ढासळतात. पण कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा, संकटांचा सामना करणं, स्वतःला सावरणं, त्यातून बाहेर पडणं ह्या साठी आवश्यक असे मनोबल मिळवणं हे जास्त महत्त्वाचे. तसे प्रयत्न असावेत. ह्या साठी फक्त 'स्वतः' भोवती फिरणार्‍या विचारांची व्याप्ती वाढवून त्यात इतरांनाही स्थान देवून त्यांचाची विचार करावा. स्वतःची दु:खं कमी होतात निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. ज्यांची मनं कमजोर आहेत त्यांना अशा अवस्थेत भगवंताची आठवणसुद्धा तारून नेते. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हे माहीत नसतांना सुद्धा लोकं ईश्वराला तो "आहे" अशा श्रद्धेने भजतात. ज्याचा त्याचा मार्ग वेगळाच. नाही? ह्यालाच कदाचित परमार्थही म्हणत असावेत. याबद्दल मतभेद राहतीलच. कारण परमार्थ समजण्यासाठी आधी तो करावा लागतो. अन् समजण्या अगोदर करण्याची बुद्धी होण्यासाठी भगवंताची कृपा लागते!! आम्हीसुद्धा अजुन त्याच प्रतिक्षेत आहोत. :) मुमुक्षु

प्राजु 24/01/2009 - 23:37
लेख नीट वाचला.. आणि समजला सुद्धा! खूपच छान. आवांतर : जाता जाता मला हा प्रश्न दिलात तुम्ही आता.. मी कशासाठी जगते आहे? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले.

"नात॑......!!!!"

डोम्बिवली फास्ट ·

सोनम 17/01/2009 - 13:15
नाती जुळ्व्णी फार सोप असत॑, पण ती टिकावण फार कठीण होऊन बसत॑." बरोबर आहे हे नाती टिकवणे फार कठीण असते. कोणतेही नात असो त्या नात्यात जोपर्यत आदर, आणि विश्वास असतो तोपर्यत ते नाते टिकते.

सोनम 17/01/2009 - 13:15
नाती जुळ्व्णी फार सोप असत॑, पण ती टिकावण फार कठीण होऊन बसत॑." बरोबर आहे हे नाती टिकवणे फार कठीण असते. कोणतेही नात असो त्या नात्यात जोपर्यत आदर, आणि विश्वास असतो तोपर्यत ते नाते टिकते.
:D ;;) नात॑......!!! एक नात॑ जन्माच॑, ते फक्त असत॑ आईच॑, अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑, येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !! एक नात॑ रक्ताच॑, जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑, ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !! एक नात॑ कर्माच॑, ज्यात असते कसोटी साठी निष्ठा, जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !! एक नात॑ प्रेमाच॑, जिथे असतो एक विश्वास, दोन शरीर॑ अन् एक श्वास....!! एक नात॑ मैत्रीच॑, महत्त्व यात आहे वेळेच॑, पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

संक्रांत कशासाठी

भास्कर केन्डे ·

सुनील 14/01/2009 - 07:49
संक्रांतीचा सुरेख वेध घेणारा लेख. तीळगुळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या आदिंच्या आठवणी करून दिल्यात! संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो हे बरोबर नाही. उ. गोलार्धात २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो तो २१ जूनपर्यंत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

धन्यवाद सुनीलराव! आपण चूक ध्यानात आणून दिलीत. आमच्या गावाकडे संक्रातीपासून दिवस मोठा होतो असे सर्वजन बोलतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात शिकलेल्या पेक्षा ते जास्त लक्षात राहिले... :) आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

सगळ्यात उशीरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. पण दिवसाची लांबी सगळ्यात कमी २२ डिसेंबरला असते. सध्या वेळ नाही आहे, दोनेक दिवसात विस्तृत विवेचन लिहिते. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

धनंजय 14/01/2009 - 08:38
माझ्या लहानपणी घरी कन्नड मुलुखातली एक रीत मोठी गोड होती. म्हणजे खरेच "गोड" - ती म्हणजे साखरेची खेळणी बनवणे. याच्या लाकडी साचांना अच्चू म्हणतात, आणि बनलेल्या साखरेच्या खेळण्यांनाही अच्चूच म्हणतात. साखरेचा पाक घट्ट होत-होत त्याची साखर होऊ लागली की लाकडाच्या साच्यांमध्ये तो ओतायचा. हे मोठे कौशल्याचे काम आईचे होते. खेळण्यातली नक्षी नाजूक असली तर पाक अगदी घट्ट होण्यापूर्वी साच्यात ओतावा लागे - पण त्या विशिष्ट क्षणापेक्षा थोडासुद्धा आधी ओतला, तर पाक साच्याच्या भेगांतून बाहेर सांडे, थोडादेखील उशीर केला तर साचा भरण्याआधी पाक गोठून जाई. मला मात्र काय - ती खेळणी खाण्याचीच मजा वाटे!

पक्या 14/01/2009 - 13:41
छान लेख. आवडला. त्यात अजून २ गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. माझी आजी देखील लहानपणी आम्हा नातवंडाना साखरेची खेळणी बाजारातून आणून देत असे. आम्हा मुलांना या साखरेच्या खेळण्याचं फार अप्रूप वाटत असे. खेळायला खेळ आणि खेळून झाल्यावर गोड खाऊ असा दुहेरी फायदा. भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे. सर्वात लहान दिवस हे बरोबर आहे. पण संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असेच लहानपणापासून ऐकले आहे. उत्तरायणात सूर्य थोडा थोडा उत्तरेला सरकत असल्याने उ. गोलार्धात दिवस मोठा होत जातो. संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

In reply to by पक्या

नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. अरे हो की... विसरलोच हे मुद्दे. कदाचित जावाई म्हणून मी कोणत्या सणांना सासरवाडीत न गेल्याने झाले असेल. आठवण करुन दिल्याबद्दल आभार! आपण हा मुद्दा जरा विस्ताराने सांगितला असतात तर अजून आनंद झाला असता. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. हेच म्हणतो. आमच्या कडे (मराठवाड्यात) ही प्रथा एवढी रूढ नसल्याने राहून गेली. धनंजयांचे आभार! आपला, (नम्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर 15/01/2009 - 12:49
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, आम्हाला तरी संक्रांत म्हटलं की हे एवढंच आठवतं! :) तात्या.

भास्करराव लेख आवडला !!! संक्रातीनंतर तीळ-तीळ थंडी कमी होत जाते असेही म्हणतात. या वर्षी संक्रातीच्या विशेष अफवा नाही आल्या. जावयाने सासूला साडी घ्यायची, ननंदांनी भावजयांना बांगड्या भरायच्या, ...वगैरे इत्यादी. जागतिक मंदीमूळे अफवांना या वर्षी मंदी आली वाटते :) -दिलीप बिरुटे

सुनील 14/01/2009 - 07:49
संक्रांतीचा सुरेख वेध घेणारा लेख. तीळगुळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या आदिंच्या आठवणी करून दिल्यात! संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो हे बरोबर नाही. उ. गोलार्धात २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो तो २१ जूनपर्यंत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

धन्यवाद सुनीलराव! आपण चूक ध्यानात आणून दिलीत. आमच्या गावाकडे संक्रातीपासून दिवस मोठा होतो असे सर्वजन बोलतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात शिकलेल्या पेक्षा ते जास्त लक्षात राहिले... :) आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

सगळ्यात उशीरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. पण दिवसाची लांबी सगळ्यात कमी २२ डिसेंबरला असते. सध्या वेळ नाही आहे, दोनेक दिवसात विस्तृत विवेचन लिहिते. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

धनंजय 14/01/2009 - 08:38
माझ्या लहानपणी घरी कन्नड मुलुखातली एक रीत मोठी गोड होती. म्हणजे खरेच "गोड" - ती म्हणजे साखरेची खेळणी बनवणे. याच्या लाकडी साचांना अच्चू म्हणतात, आणि बनलेल्या साखरेच्या खेळण्यांनाही अच्चूच म्हणतात. साखरेचा पाक घट्ट होत-होत त्याची साखर होऊ लागली की लाकडाच्या साच्यांमध्ये तो ओतायचा. हे मोठे कौशल्याचे काम आईचे होते. खेळण्यातली नक्षी नाजूक असली तर पाक अगदी घट्ट होण्यापूर्वी साच्यात ओतावा लागे - पण त्या विशिष्ट क्षणापेक्षा थोडासुद्धा आधी ओतला, तर पाक साच्याच्या भेगांतून बाहेर सांडे, थोडादेखील उशीर केला तर साचा भरण्याआधी पाक गोठून जाई. मला मात्र काय - ती खेळणी खाण्याचीच मजा वाटे!

पक्या 14/01/2009 - 13:41
छान लेख. आवडला. त्यात अजून २ गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. माझी आजी देखील लहानपणी आम्हा नातवंडाना साखरेची खेळणी बाजारातून आणून देत असे. आम्हा मुलांना या साखरेच्या खेळण्याचं फार अप्रूप वाटत असे. खेळायला खेळ आणि खेळून झाल्यावर गोड खाऊ असा दुहेरी फायदा. भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे. सर्वात लहान दिवस हे बरोबर आहे. पण संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असेच लहानपणापासून ऐकले आहे. उत्तरायणात सूर्य थोडा थोडा उत्तरेला सरकत असल्याने उ. गोलार्धात दिवस मोठा होत जातो. संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

In reply to by पक्या

नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते. अरे हो की... विसरलोच हे मुद्दे. कदाचित जावाई म्हणून मी कोणत्या सणांना सासरवाडीत न गेल्याने झाले असेल. आठवण करुन दिल्याबद्दल आभार! आपण हा मुद्दा जरा विस्ताराने सांगितला असतात तर अजून आनंद झाला असता. धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. हेच म्हणतो. आमच्या कडे (मराठवाड्यात) ही प्रथा एवढी रूढ नसल्याने राहून गेली. धनंजयांचे आभार! आपला, (नम्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर 15/01/2009 - 12:49
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, आम्हाला तरी संक्रांत म्हटलं की हे एवढंच आठवतं! :) तात्या.

भास्करराव लेख आवडला !!! संक्रातीनंतर तीळ-तीळ थंडी कमी होत जाते असेही म्हणतात. या वर्षी संक्रातीच्या विशेष अफवा नाही आल्या. जावयाने सासूला साडी घ्यायची, ननंदांनी भावजयांना बांगड्या भरायच्या, ...वगैरे इत्यादी. जागतिक मंदीमूळे अफवांना या वर्षी मंदी आली वाटते :) -दिलीप बिरुटे
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

यशदा

स्वाती फडणीस ·

प्राजु 11/01/2009 - 22:29
तीन वेगळी रूपं.. सुंदर. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक 12/01/2009 - 11:21
मीरा, सुखदा, यशदा. वा!!! अदृष्य वेदनांना (अव्यक्त) स्वर देणारी रचना. अभिनंदन.

In reply to by स्वाती फडणीस

श्रावण मोडक 12/01/2009 - 16:25
समर्पण म्हटले की आम्हाला मीराच आठवते. सीतेचे समर्पण आणि मीरेचे समर्पण वेगळ्या जातकुळीतले असावे. मी त्या ओळी वाचताना मला मीरेचे समर्पण वाटले. अर्थात, येथे या प्रतिमेचे योजन हा तुमचाच अधिकार आहे आणि त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य.

वेगळेपण ============================ . . डोळ्यांवर स्वप्नांची किरमीरी झूल पांघरून.. जमिनीपासून वितभरवर तरंगत.. त्याच किरमीरी धुंदीत.. दगड धोंडे ठोकरत जाणं.. तसं सोप्पच..! फक्त वीतभर उचलून धरणारी धुंदी हवी.. कान्हा नावाची जादू काहीशी तशीच. मीरा काय.. राधा काय.. किंवा.. अगदी तुझ्या माझ्या पर्यंतच्या गोपी.. अशाच तरंगत गेल्या.. पण असली नसली धुंदी उतरवून टाकणारं.. दुय्यमतेच पोखरणं.. डावेपणाच्या डावानं डावललं जाणं.. जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात.. आणि पर्यायच नसतो चालण्यास तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल धैर्याची परिसीमा गाठतं.. हेच ते वेगळेपण..!!! मीरा आणि सीता असण्यात... . . ============================ स्वाती फडणीस.......................... १२-०१-२०९

In reply to by स्वाती फडणीस

यशोधरा 21/07/2010 - 17:12
दुय्यमतेच पोखरणं.. डावेपणाच्या डावानं डावललं जाणं.. जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात.. आणि पर्यायच नसतो चालण्यास तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल धैर्याची परिसीमा गाठतं.. हेच ते वेगळेपण..!!! मीरा आणि सीता असण्यात... क्या बात है! निव्वळ सु रे ख!

प्राजु 11/01/2009 - 22:29
तीन वेगळी रूपं.. सुंदर. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक 12/01/2009 - 11:21
मीरा, सुखदा, यशदा. वा!!! अदृष्य वेदनांना (अव्यक्त) स्वर देणारी रचना. अभिनंदन.

In reply to by स्वाती फडणीस

श्रावण मोडक 12/01/2009 - 16:25
समर्पण म्हटले की आम्हाला मीराच आठवते. सीतेचे समर्पण आणि मीरेचे समर्पण वेगळ्या जातकुळीतले असावे. मी त्या ओळी वाचताना मला मीरेचे समर्पण वाटले. अर्थात, येथे या प्रतिमेचे योजन हा तुमचाच अधिकार आहे आणि त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य.

वेगळेपण ============================ . . डोळ्यांवर स्वप्नांची किरमीरी झूल पांघरून.. जमिनीपासून वितभरवर तरंगत.. त्याच किरमीरी धुंदीत.. दगड धोंडे ठोकरत जाणं.. तसं सोप्पच..! फक्त वीतभर उचलून धरणारी धुंदी हवी.. कान्हा नावाची जादू काहीशी तशीच. मीरा काय.. राधा काय.. किंवा.. अगदी तुझ्या माझ्या पर्यंतच्या गोपी.. अशाच तरंगत गेल्या.. पण असली नसली धुंदी उतरवून टाकणारं.. दुय्यमतेच पोखरणं.. डावेपणाच्या डावानं डावललं जाणं.. जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात.. आणि पर्यायच नसतो चालण्यास तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल धैर्याची परिसीमा गाठतं.. हेच ते वेगळेपण..!!! मीरा आणि सीता असण्यात... . . ============================ स्वाती फडणीस.......................... १२-०१-२०९

In reply to by स्वाती फडणीस

यशोधरा 21/07/2010 - 17:12
दुय्यमतेच पोखरणं.. डावेपणाच्या डावानं डावललं जाणं.. जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात.. आणि पर्यायच नसतो चालण्यास तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल धैर्याची परिसीमा गाठतं.. हेच ते वेगळेपण..!!! मीरा आणि सीता असण्यात... क्या बात है! निव्वळ सु रे ख!
यशदा ============================ . . ती म्हणाली.. मी समर्पित आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट. इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही. . ती म्हणाली.. मी सुखात आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय. इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही. . ती म्हणाली.. मी यशदा आहे.. माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची. इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही. . . ============================ स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९

मनाच्या कुपीतले-समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?

विनायक पाचलग ·

इश्वर वाद जो आपण म्हणता आहात..त्या सारखा तर खतर नाक वाद जगात नाहि...मुळात प्रत्येक धर्माचे ईश्वर निराळे आहेत..इश्वर एक हा फक्त कागदि सिध्धांत...व तो कोणीच मानायला तयार नाहि...इश्वर आराधने साठि अनेक उपासना पध्धति निर्माण झाल्या..कालांतराने त्या एका जातिची मक्तेदारी होऊन बसली..त्या आधारे मानवाने इतर जातिंना पशुतुल्य वागणुक देवुन सा~या मानव जातिचे अकल्याण केले...ईश्वराचे नाव घेत एका हातात धर्मग्रंथ व दुस~या हातात तलवार घेवुन मानवाने या पृथ्विवर धुमाकुळ घातला आहे..इश्वर वाद हि भावना आहे कल्पना आहे...कल्पनेवर व भावनेच्या आधरे राज्य व्यवस्था चालत नाहि..ते एक शाश्त्र आहे..नियम आहे...ति व्यवस्था साम्यवास/समाजवाद/भांडवल्शाहि/लोकशाहि/डायनास्टी च्या माध्यमातुन मिळु शकते...अर्थात प्रत्येक व्यवस्थेत हे गुण दोष असणारच..म्हणुन कार्ल मार्क्स ने लिहुन ठेवले आहे कि.."जेंव्हा भांडवल शाहिचा अतिरेक होतो तेंव्हा परत साम्यवादाचा जन्म होतो" त्या मुळे इश्वरवाद हा पर्याय होइल असे समजणे हे भाबडेपणाचे होइल....त्या मुळे अश्या कल्पना मांडून समाजात बुध्धिभेदाचे वातावरण निर्माण होईल असे वाटते...व त्या आधारे परत जातिव्यवस्थेचे भुत समाजाच्या मुंडक्यावर बसेल अशि स्थिति निरमाण होइल कि काय असे वाटते. अविनाश.....एक बेधुंद..मुक्त जिवन

In reply to by अविनाशकुलकर्णी

हे सर्व होते अवडंबर मात्र मुळ गोष्ट अशी नाही .मी मुळ भारतीय जीवनपद्धतीला इश्वरवाद असे संबोधतो ते दोश आपणच काढायला हवेत . असो आणि हो समाजात दुही माजणार नाही. इतर वादानी फर चांगले घडवल्याचे माझ्या वाच्नात नाही तेव्हा हे ट्राय करायला काय हरकत आहे बाकी उत्तर नंतर देइन अजुन तेवढे वाचन नाही. असो मला अपेक्षित वाद खाली खरडीत देला गेलेला आहे विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

टारझन 11/01/2009 - 21:46
आई शप्पथ ... १ पॅराग्राफ वाचला भो ....... पुढे वाचायची आमची डेरिंग णाही झाली !! लिहीत रहा भौ ! मनातल्या कुपीतले भाववाद , भांडवलवादाचा इश्वरवाद असं वाचलं त्यात :( - लगोलग(लेखटाकू) टारझण

आपण इश्वर वादाला निसर्ग वाद म्हणा कि आणखि काहि म्हणा..ते सारे शाव्दिक खेळ आहेत..आपल्या लेखातुन नेमके काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळाले आहे..इश्वर हि मुल्ला मौलवि/पाद्री/ब्राह्मण समाजाचि मक्तेदारी आहे...जर इश्वर वादाच्या नावखालि राज्य करायला लागले तर ह्या वर्गाचि मक्तेदारी होइल..व सर्व समाजाचे वाट्टोळे होइल.....

ऍडीजोशी 08/01/2009 - 14:14
म्हणजे हे का? हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल. उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो. अर्थ - अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

लिखाळ 09/01/2009 - 19:43
नमस्कार, निबंध वाचला. चांगला आहे. वाचकांसमोर मांडण्यासाठी तो अजून आटीव आणि घोटीव करायला हवा असे वाटले. निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे असे वाटले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

होय मला तोच अपेक्षित आहे गोटीव व्ह्याल हवा होता पण काय झाले असे लेख कसे लिह्यायचे याची आम्हाला गंधवार्ताही नाही हो आम्ही आपले आले डोक्यात की निबंध खरडणारे बाकी जसे जसे वय आणी अनुभव वाढत जाइल तसे इतर लिखाणही जमावे हीच अपेक्षा आहे गजानन चरणी आपला विनायक्(निबंध स्पेशालिस्ट) विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

लिखाळ 09/01/2009 - 23:15
मी आपल्या लेखाला निबंध म्हणालो याचा आपल्याला राग आलेला दिसतो. पण साधारणतः मोठ्या वैचारिक लेखाला निबंध असे सुद्धा म्हणतात असे मी पाहिले आहे म्हणुन मी ते सहजच म्हणालो. या निबंध शब्दाची निवड मी तुम्हाला कमीपणा द्यायला केली नव्हती. राग आला असेल तर क्षमा करा. आपण लेख प्रकाशित केला की अनुकूल-प्रतिकूल प्रतिसाद येणारच. माझे प्रमाणिक मत मी नोंदवले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

धनंजय 09/01/2009 - 23:37
हा लेख मी अनेक वेळेला वाचला, पण तो समजला नाही, म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. वरील "निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे" वरून काही दिशा मिळाली. पण तरी समजले नाही. जगातले सर्वच लोक "स्वार्थ आणि समाजकल्याण यांच्यात समतोल साधावा" असेच काही म्हणतात. समाजवाद आणि भांडवलवादाचे प्रणेते स्वतःच्या वादांबद्दल असेच काही म्हणतात. भारतभूमीवरील जीवनपद्धत म्हणजे नेमके काय - भारतातले लोक वेगवेगळ्या प्रकारे जगताना दिसतात. इतकेच काय २००० वर्षांपूर्वी आणि १००० वर्षांपूर्वी बघितले, तर जीवनपद्धती खूपच वेगळी असेल. त्यामुळे आज वाचकांनी वेगळे कसे वागावे, याबद्दल मला तुमच्या लेखतून काय ते नीट समजून येत नाही. मिसळपावावरच्या कोण्याही लेखकाचे लेख-प्रतिसाद वाचल्यास असेच दिसते की त्यांना एकमेकांविषयी/मराठी-माणसाविषयी/देशाविषयी, म्हणजे कुठल्यातरी प्रकारे समाजाविषयी कळकळ आहे. शिवाय स्वतःबद्दलही आस्था आहे. कुठल्याही पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रातले संपादकीय वाचले, तर लोक/देश वगैरेंविषयी कळकळ दिसून येते. आणि त्यापुढे पाककृती/स्वास्थ्य/गुंतवणूक पुरवण्या वाचल्या तर स्वार्थ कसा सांभाळावा त्याबद्दल रुची दिसते. लोक आपापल्या परीने सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करतच आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता त्या तात्त्विक व्याख्येने
"तर याची तत्वे आहेत मी आणि समाज माणसाला स्वत:चं कल्याण करायचं आहे हे त्रिवार सत्य आहे आणि, ती समाजप्रिय आहे."
आपण सर्वच जण आहोत तिथे ठीक आहोत. (यात काही वाईट नाही म्हणा - पण मग लेखप्रपंच कळला नाही.)
समाजवाद फक्त समाजहीत जाणत होता. तर, भांडवलवाद स्वहीत.
याबद्दल साशंक आहे. "फक्त" म्हणणारे कोणीच नाही. प्रत्येक आपापल्या परीने सुवर्णमध्य सांगत आहेत. "व्यक्तिहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक समाजवादी तुम्हाला भेटला आहे काय? "समाजहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक भांडवलवादी तुम्हाला भेटला आहे काय? असो. तुम्ही कळकळीने लिहिले आहे, पण मला मात्र नेमकी कळकळ कशाबद्दल आहे, ते खरेच समजलेले नाही. तरी लिहीतच राहा, आम्हाला तुमच्या विचारांचा ओघ सांगतच राहा, अशी विनंती.

In reply to by धनंजय

मलाही नक्की काही समजलं नाही. खरंतर गाडी पहिल्याच काही परिच्छेदात अडली. घडलंय तरी काय असं जगात ? अजुनही लोक छानचौकीत जगतायत. कोणती युध्दे गेल्या 3 वर्षात झालेली नाहीत. जग प्रगतीपथावर आहे. मग असं काय बिघडलंय ? लोकं छानछोकीत जगत आहेत (गेल्या+येत्या काही महिन्यात तेही बदलू शकतं, नाही का?) पण त्याचबरोबर मान्सूनचा लहरीपणा वाढतोय, मेक्सिकोच्या आखातामधून जाणारी वादळं फारच जास्त विध्वंसक ठरत आहेत, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींबद्दल जास्तीतजास्त चिंता प्रकट होत आहे. गेल्या तीन वर्षात इस्रायलने एक युद्ध केलं आहे, लेबेनॉनशी; गाझा पट्टीत बाँब्ज टाकणंतर वेगळंच आहे. इराक, अफगाणिस्तान, इस्रायल-पॅलेस्ताईन, इत्यादी ठिकाणी सैन्य मारामार्‍या करत आहे याला युद्धच म्हणायचं ना? प्रगती होत नाही आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही पण म्हणून काहीच बिघडलं नाही आहे किंवा वरवर काही दिसत नाही आहे हे मला पटत नाही. पहिला समाजवाद आणि दुसरा भांडवलवाद. समाजाचा गाडा या दोन तत्वांवर नीटपणे चालू होता. असहमत. तसं असतं तर शीतयुद्धतरी का झालं असतं? बाकी धनंजय म्हणतात त्याप्रमाणे तुमचे विचार नीटसे कळले नाहीत. अवांतरः थर्ड वर्ल्ड या शब्दाचा अर्थ नीटसा कळलेला नाही आहे. ना साम्यवाद ना भांडवलशाही, म्हणजे पहिले दोन पर्याय सोडून तिसरा अनुसरणारे ते तिसरे का आणखी काही? अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by अवलिया

+१ सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रथमतःआपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल आभार . आता काही मुद्दे १.मला निबंध म्हणल्याचा अजीबात राग आलेला नाही. साधारण सर्व ललित लेख हे निबंध टाइपच असतात. आणि हो मी आमच्या इथल्य्७आ व्रुत्तपत्रातुन यापेक्षा वाइट लेख वाचत असतो त्यामुळे मला राग नाही. आणि हो सुनीलजी असेच प्रतिसाद येवु देत मी जे काही लिहितो ते लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी त्यामुळे प्रतिक्रिया हेच माझे टॉनिक आहे. २.धनंजय प्रथम आपण माझा लेख इतक्यांदा वाचायची तसदी घेतलीत त्याबद्दल आभार. मला अपेक्षित वागणुक ही साहजीकच दोन्ही वादांचा संमन्वय साध्णारीच आहे. आपापल्या परीने प्रत्येक्जण समन्वय साधायचा प्रयत्न करतोय .बरोबर आहे मात्र आज अनेक लोक आपली समाजवादी किंवा भांडवलवादी विचारसरणी सोडायला तयार नाहीत . आणि काही लोक या दोन्हीचे समन्वय सधाताना चुकतात. यासाठी मी हा लेखनप्रपंच साधला आणि हो आज माझे अनेक मित्र वा माझे समवयस्क पाशिमात्यांचे आंधानुकरण करताना व्यसानांच्या आधीन झाली आहेत आइ वडीलांचे पैसे बुडवत आहेत ही संस्क्रुती आज कोल्हापुरसारख्या गावातही रुजते आहे पण या गोश्टी प्रमाणात असव्यात हे सांगणारे आज कोणी नाही. काहिना तर त्यांचे आइ वडील्च प्रोत्साहन देतात .यालाच मी भांड्वलवादाचे अंधानुकरण समजतो. याउलत माझे महाविद्यालय ज्या भागात आहे त्या भागात अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत तेथे मी अनेक मोर्चे पाहतो पण त्यातले अनेक्ज विषय असे असतात की समाजाच्या प्रगतीसाठी अनुपयुक्त असतात मी अशी अनेक भाशणे ऐकली आहेत ज्यात वक्ते या दोन्ही वादांचे गाठा गातात मात्र या दोघातले प्रमाणात वागणे सांगत नाहीत. ३.वरील उद्देशाने हा लेख मी १५ नोव्हेंबर रोजी लिहिला होता.त्यमुळे त्यावेळी बाँबस्फोट घडला नव्हता. मात्र टाइपिंगला वेळ मिळत नसल्याने व ते नीट होत नसल्याने मी ते एकांकडुन टाइप म्करुन घेतले व परिवर्तन ही प्रणाली वापरुन ते उनिकोडात केले त्यामुळे काही विराम्चिन्हे उठलेली नाहीत. साहजीकच मी काही नवे बदल यात सामावु शकलेलो नाही व काही ताईपंग चुकांमुळे एक दोन वाक्याचे अर्थ वेगळे लागलासारखे वाटर्त आहे असो बदल करीन. ४.समाजाचा गाडा या दोन तत्वावर चालु होता म्हणजे युद्ध वगैरे होत होतीच पण प्रत्यक्ष सामान्याना त्याचे फार झळ बसत न्हवती. आणि थर्ड वर्ड चा अर्थ असाच काहीतरी तुम्ही म्हणता तो.(हा श्बद हेडन नामक एका वेड्या पण चांगल्या खेळाडुने म्हटयाने मला समजला आणि मी वापरला इतकेच) बस आणि हो लेख लिहिताना मी एक महत्वाची चुक केली होती ती म्हणजे मी या फक्त अर्थव्यवस्था न मानता त्याना समाज्व्यवस्थेचे स्वरुप दीले होते भांडवलवाद म्हणजे साधारण त्या व्यवस्थेवर जगणारा समाज आणि तसेच समाजवादाचे (त्यामुळे समाज्वाद व साम्यवाद याना मी एकत्रच धरले आहे) आणि आता इश्वर्वादाबरोबर गेली कित्येक वर्शे भारतात देवाची भीती घालुन वा श्रद्धेचा वापर करुन या दोन वादांचा समन्वय साधाला होता म्हणून या पद्धतीला मी इश्वर्वाद हे नाव दीले. तर आता बदल बदल म्हणजे मी असा करायचा म्हणत होतो की आपण हीच संस्क्रुती पुन्हा बाणली पाहिजे सामाजेक नव्हे तर वैयक्तीक पातळीवर आजकाल लोक जेष्ठाना नमस्कार करत नाही त्याना लाज वाटते अशा ठिकठिकाणी इतर संस्क्रुतीनी गारुड केले आहे आणि सध्याचा परिस्थीती सगळे जण आता काय करायचे असे म्हणत आहेत. याला उत्तर म्हणजे आपण नेहमीसारखे वागले तर नाकीच परिस्थीती बदलेल आपल्या संस्क्रुतीत पोट्यापुरतेच खायला सांगीतले होते पण आपण जास्त खाल्ले आणि आता ओकओय इतकेच . तर या विषयावर माझे हे मत *****महत्वाचे म्हणजे हा लेख म्हणावा तसा जमलेला नाही याची मलाही जाणीव आहे मात्र तरीही आपण तो वाचलात आणि प्रतिसाद दीलात याबद्दल आभार आणि हो मी लिहिता लाहणारच आहे कारण त्याशिवाय मी जगु शकत नाही.आणि हो मी जास्त वाचन केलेले नाही त्यामुळे ही मते माझ्या अनुभवावरुन व काही फुटकळ वाचनावरुन केलेली होती त्यामुळेच घोळ झाला होता . पण असो आणि हो आताही दोष लगेच आणि जरुर सांगा वाट पाहतोय.. आपला, (खुप आनंदीत)विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

विसुनाना 10/01/2009 - 17:21
नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही. को.दा. विनायकराव, वयाच्या मानाने प्रयत्न स्तुत्य आहे. पण सावरकर उपनामे एक दुसरे विनायक होते त्यांचा आदर्श समोर ठेवा. त्यांची मते काही लोकांना चुकीची वाटली तरी ती चुकीची मांडली आहेत असे कधीच वाटू शकत नाहीत. लेखात आपल्याला नक्की काय मांडायचे आहे ते ठरवा. आपले म्हणणे कसे बरोबर आहे ते पटवून द्यायचा प्रयत्न करा. सूचनांबद्दल राग नसावा ही विनंती.

In reply to by विसुनाना

राग अजिबात नाही अहो माझ्या फायद्याचेच आहे न ते मग राग कसला बस मला फक्त भारतीय संस्क्रुतीचे श्रेश्ठत्व आणि त्यापरमाणे वागाय्चे गरज सांगायची होती असो पुढच्या वेळी बघु जमतय का आणि हो सावरकरच माझे आदर्श आहेत्(आता गांधी आम्हाला पटले नाहीत त्याला काय करणार बुवा) असो धन्यवाद आणि हो हे काही लेख नकी सुट होतात माझ्या विचाराना http://www.loksatta.com/daily/20090110/ch01.htm http://www.loksatta.com/daily/20090110/ch02.htm विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

वेताळ 10/01/2009 - 23:17
विनायका तुझा लेख दोनदा वाचला. तुझी विचार करण्याची पध्दत आवडली. सदर लेख लिहिताना तुझा खुप गोधंळ उडाला आहे असे मला वाटते. समाजवाद व साम्यवाद हे दोन्ही भिन्न आहेत.रशियाने व चीन ने साम्यवाद स्विकारला.नेहरुनी स्वातंत्र भारतासाठी समाजवाद स्विकारला.अमेरिका व इतर राष्ट्रे भांडवलशाही आहेत. प्रत्येक व्यवस्थेचे काही गुणदोष आहेत.कोणतीही व्यवस्था सर्वगुणसंपन्न नाही. त्यामुळे आपण जी व्यवस्था स्विकारतो ती दोषविरहित बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रशियात साम्यवादाचे तीनतेरा वाजले. परंतु तोच साम्यवाद भांडवलशाहीच्या मुक्तअर्थ व्यवस्थेत चीनमध्ये कसा गुटगुटीत झाला आहे तु बघतोच आहेस.मग साम्यवाद नष्ट कसा झाला?अमेरिकेत भांडवलशाही कोसळली असे म्हणणे पण चुकीचे आहे. कोणत्याही व्यवस्थेत काही चुका ,उणिवा असतात.त्या कधी कधी वर उग्ररुप धारण करतात. म्हणुन ती व्यवस्था चुकीची आहे असे एकदम म्हणता येणार नाही. आता आपण ही समाजवादातुन मुक्त अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आहे.त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य होणार नाही.अजुन काही काळातच आपल्याला कळेल . भारतात निसर्गवाद का ईश्वरवाद होता असे तु काय म्हणत आहेस त्या बद्दल मला काहीच कळाले नाही. पण मला वाटते ब्रिटीशाच्या आक्रमणा आधी भारतात जवळ जवळ सर्व खेडी स्वंयपुर्ण होती. परंतु ब्रिटिश आक्रमणा मुळे व त्याच्या मालाला हव्या असणार्‍या बाजारपेठेसाठी त्यानी आपली ही व्यवस्था मोडीत काढली.परंतु ती ईश्वरवादी होती का निसर्गवादी होती , म्हणजे काय? फक्त तु ईश्वरवाद व निसर्गवाद म्हणजे काय ते एकदा स्पष्ट कर.म्हनजे तुझा लेख समजायला सोपा जाईल.तुझ्या भावी लिखाणास माझ्या कडुन शुभेच्छा. वेताळ

In reply to by वेताळ

वेताळ आपले व माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार मला थोडक्यात फक्त एवडेच सांगायचे होते. की आपण जगातील कोणत्याही वादाचे अंधानुकरण करण्ञापेक्षा आपल्या भारतीय जीवनपद्धतीनुसार जगावे. बस हे सांगताना मी अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचा समन्वय साधायला गेलो होतो मात्र अपुर्‍या अभ्यासामुळे आपटलो असो.... विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

गोगोल 11/01/2009 - 22:03
केलेला आहे, पण जमलेला नाही. मागे पण तू एकदा शाळेविषयी लेख लिहिला होतास, मी त्याला त्यावेळी निबंध असे म्हणालो होतो. आता या दोन्ही लेखांवरून मी काही सजेशन्स देतो आहे 1. अवजड शब्दा सहजरीत्या वापरणे फार थोड्या लेखकांना जमते. ते जर जमले नाही, तर तो लेख सखाराम गटणे या पुलंच्या व्यक्तिरेखेप्रमाणे होऊन बसतो. म्हणजे काय की शब्द तर बरेच माहिती आहेत, पण अर्थ उमगलेला नाही. काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो. 2. काही माहिती सपशेल चुकीची आहे. तीन वर्षात युद्ध नाही? असेल तर सर्वसामान्यांना त्याची झळ नाही? मला माहीत नाही की तू कुठली वर्तमान पत्रे वाचतोस पण गेल्या पन्नास वर्षापेक्षा जग आज अधिक पेटलेले आहे. 3. "मी फक्त 16 वर्षांचा असल्याने माझे अनुभव फार तोडके आहेत. " हा मुद्दा अत्यंत बरोबर आणि खरा आहे. माझा असा सल्ला असेल की थोडे बाहेरच्या जगातले अनुभव मिळाले तर लेखन अधिक समृद्ध होईल. या बाबतीत तू दुसरे लेखक जसे की पिवळा डांबिस, बिपीन कार्यकर्ते, विसोबा खेचर, प्रियाली आणि छोटा डॉन यांचे लेख बघ. साधे सोपे शब्द, सुटसुटीत वाक्ये, ओघवाती शैली यामुळे त्यांचे लेख अगदी खमंग होत असतात. त्यांच्या लेखनात एक प्रकारचा उस्फुर्तपणा आहे. 4. तुझ्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यात वादच नाही. जश्या की तू सुरू केलेली वेबसाइट. ती सुंदर आहे आणि त्याबद्दल अभिनंदन!! 5. आमचे पूर्वज श्रेष्ठ होते. त्यांनी हे शोध लावले, त्या काळात अशी प्रगती केली. हे सर्वा आता सोडून द्यायला पाहिजे आणि इतिहास अब्जेक्टिव्ली अनलाइज़ केला पाहिजे. एक अशीच वेबसाईट जी असा प्रयत्न करते तिची लिंक आहे http://khattamitha.blogspot.com/ . मी सगळ्याच मतानबरोबर सहमत नाही, पण काही मुद्दे विचार करायला जरूर भाग पाडतात. हे परीक्षण थोडेसे परखड झाले आहे, पण मी काही ह. घ. वगैरे म्हणणार नाही. मला जे वाटते ते मी लिहिले. उद्या जर तू खरच मोठा लेखक झालास आणि पुस्तके लिहिलिस, तर तुला याहूनही खडतर परीक्षणांना तोंड द्यावे लागेल.

In reply to by गोगोल

गोगोल आपण अगदी बिनधास्त आणि योग्य प्रतिक्रिया दीलीत त्याबद्दल आपले आभार १.माझे लेखन अतीच अलंकारी होते हे अगदी सत्य आहे बर्‍याचदा मी कारण नसताना उपमा आणि अलंकार वापरतो याची मलाही जाणीव होत आहे याचे कारण असे आहे की मी माझे लिखाण साधारणतः दहावीनंतर सुरु केले दहावीच्या काळात मी अनेक निबंध लिहिले आणि गरज म्हणून त्यात अनेक अलंकारी शब्दांचा वापर केला त्यामुळे त्या काळात वाचनही त्याच प्रकारचे केले आणि तेच शब्द डोक्यात बसले त्यामुळे आता कोणत्याही लेखात माझ्याही नकळत हे शब्द वापरले जातात यावर हळुहळु मात करत आहे . बघु काय होत ते. २.मी ते वाक्य उपहासाने लिहिले होते पण बर्‍याच जणांचा तेथे घोळ झाला असो पुढच्यावेळी पासुन सुधारीन स्वतः ला ३.होय माझे अनुभव तोकडेच आहेत पण तसे असुनही मी लिहित आहे आणी तुम्ही ते वाचत आहात हेच मला समाधान देते .आणि अनुभव वाढतीलच तोपर्यंत आपले ललित लिखाण्च ब्वरे असे वाटत आहे आणि हो मीही उत्स्फुर्त लिहितो आणि लिहिल्यावर त्यात काहीही बदल करत नाही पण हे क्रुत्रीमतेचे बुरुज लवकरच पाडीन मिपावरच्या जेष्ठ लोकांच्या लेखांचे वाचन सुरु आहे ४.माझ्या उअपक्रमाची स्तुती लेल्याबद्दल आभार आणि हो या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपरयंत पोहोचवा ही नम्र विनंती ५.ब्लॉग वाचला चांगला आहे पुन्हा एकदा धन्यवाद आणि हो यापुढे चांगले लिहिण्याचा प्रयत्न करीन आपल्या अशाच प्रतिक्रियांचे स्वागत आहे आणि हो माझा हा वैचारीक लेखाचा पहिलाच प्रयत्न होता असो पण यापुढे चांगला प्रयत्न करीन असो फक्त एकच गोष्ट खटकते मला लेख लिहिल्यावर माझ्या वयाचा उल्लेख करावा लागतो जेव्हा माझे वय विचारात न घेता लोक माझे लेख चांगले म्हणतील तो दीवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल. आपला (एक लेखक्)विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by गोगोल

गोगोल यांच्याशी सहमत... ... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

इश्वर वाद जो आपण म्हणता आहात..त्या सारखा तर खतर नाक वाद जगात नाहि...मुळात प्रत्येक धर्माचे ईश्वर निराळे आहेत..इश्वर एक हा फक्त कागदि सिध्धांत...व तो कोणीच मानायला तयार नाहि...इश्वर आराधने साठि अनेक उपासना पध्धति निर्माण झाल्या..कालांतराने त्या एका जातिची मक्तेदारी होऊन बसली..त्या आधारे मानवाने इतर जातिंना पशुतुल्य वागणुक देवुन सा~या मानव जातिचे अकल्याण केले...ईश्वराचे नाव घेत एका हातात धर्मग्रंथ व दुस~या हातात तलवार घेवुन मानवाने या पृथ्विवर धुमाकुळ घातला आहे..इश्वर वाद हि भावना आहे कल्पना आहे...कल्पनेवर व भावनेच्या आधरे राज्य व्यवस्था चालत नाहि..ते एक शाश्त्र आहे..नियम आहे...ति व्यवस्था साम्यवास/समाजवाद/भांडवल्शाहि/लोकशाहि/डायनास्टी च्या माध्यमातुन मिळु शकते...अर्थात प्रत्येक व्यवस्थेत हे गुण दोष असणारच..म्हणुन कार्ल मार्क्स ने लिहुन ठेवले आहे कि.."जेंव्हा भांडवल शाहिचा अतिरेक होतो तेंव्हा परत साम्यवादाचा जन्म होतो" त्या मुळे इश्वरवाद हा पर्याय होइल असे समजणे हे भाबडेपणाचे होइल....त्या मुळे अश्या कल्पना मांडून समाजात बुध्धिभेदाचे वातावरण निर्माण होईल असे वाटते...व त्या आधारे परत जातिव्यवस्थेचे भुत समाजाच्या मुंडक्यावर बसेल अशि स्थिति निरमाण होइल कि काय असे वाटते. अविनाश.....एक बेधुंद..मुक्त जिवन

In reply to by अविनाशकुलकर्णी

हे सर्व होते अवडंबर मात्र मुळ गोष्ट अशी नाही .मी मुळ भारतीय जीवनपद्धतीला इश्वरवाद असे संबोधतो ते दोश आपणच काढायला हवेत . असो आणि हो समाजात दुही माजणार नाही. इतर वादानी फर चांगले घडवल्याचे माझ्या वाच्नात नाही तेव्हा हे ट्राय करायला काय हरकत आहे बाकी उत्तर नंतर देइन अजुन तेवढे वाचन नाही. असो मला अपेक्षित वाद खाली खरडीत देला गेलेला आहे विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

टारझन 11/01/2009 - 21:46
आई शप्पथ ... १ पॅराग्राफ वाचला भो ....... पुढे वाचायची आमची डेरिंग णाही झाली !! लिहीत रहा भौ ! मनातल्या कुपीतले भाववाद , भांडवलवादाचा इश्वरवाद असं वाचलं त्यात :( - लगोलग(लेखटाकू) टारझण

आपण इश्वर वादाला निसर्ग वाद म्हणा कि आणखि काहि म्हणा..ते सारे शाव्दिक खेळ आहेत..आपल्या लेखातुन नेमके काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळाले आहे..इश्वर हि मुल्ला मौलवि/पाद्री/ब्राह्मण समाजाचि मक्तेदारी आहे...जर इश्वर वादाच्या नावखालि राज्य करायला लागले तर ह्या वर्गाचि मक्तेदारी होइल..व सर्व समाजाचे वाट्टोळे होइल.....

ऍडीजोशी 08/01/2009 - 14:14
म्हणजे हे का? हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल. उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो. अर्थ - अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

लिखाळ 09/01/2009 - 19:43
नमस्कार, निबंध वाचला. चांगला आहे. वाचकांसमोर मांडण्यासाठी तो अजून आटीव आणि घोटीव करायला हवा असे वाटले. निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे असे वाटले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

होय मला तोच अपेक्षित आहे गोटीव व्ह्याल हवा होता पण काय झाले असे लेख कसे लिह्यायचे याची आम्हाला गंधवार्ताही नाही हो आम्ही आपले आले डोक्यात की निबंध खरडणारे बाकी जसे जसे वय आणी अनुभव वाढत जाइल तसे इतर लिखाणही जमावे हीच अपेक्षा आहे गजानन चरणी आपला विनायक्(निबंध स्पेशालिस्ट) विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

लिखाळ 09/01/2009 - 23:15
मी आपल्या लेखाला निबंध म्हणालो याचा आपल्याला राग आलेला दिसतो. पण साधारणतः मोठ्या वैचारिक लेखाला निबंध असे सुद्धा म्हणतात असे मी पाहिले आहे म्हणुन मी ते सहजच म्हणालो. या निबंध शब्दाची निवड मी तुम्हाला कमीपणा द्यायला केली नव्हती. राग आला असेल तर क्षमा करा. आपण लेख प्रकाशित केला की अनुकूल-प्रतिकूल प्रतिसाद येणारच. माझे प्रमाणिक मत मी नोंदवले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

धनंजय 09/01/2009 - 23:37
हा लेख मी अनेक वेळेला वाचला, पण तो समजला नाही, म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. वरील "निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे" वरून काही दिशा मिळाली. पण तरी समजले नाही. जगातले सर्वच लोक "स्वार्थ आणि समाजकल्याण यांच्यात समतोल साधावा" असेच काही म्हणतात. समाजवाद आणि भांडवलवादाचे प्रणेते स्वतःच्या वादांबद्दल असेच काही म्हणतात. भारतभूमीवरील जीवनपद्धत म्हणजे नेमके काय - भारतातले लोक वेगवेगळ्या प्रकारे जगताना दिसतात. इतकेच काय २००० वर्षांपूर्वी आणि १००० वर्षांपूर्वी बघितले, तर जीवनपद्धती खूपच वेगळी असेल. त्यामुळे आज वाचकांनी वेगळे कसे वागावे, याबद्दल मला तुमच्या लेखतून काय ते नीट समजून येत नाही. मिसळपावावरच्या कोण्याही लेखकाचे लेख-प्रतिसाद वाचल्यास असेच दिसते की त्यांना एकमेकांविषयी/मराठी-माणसाविषयी/देशाविषयी, म्हणजे कुठल्यातरी प्रकारे समाजाविषयी कळकळ आहे. शिवाय स्वतःबद्दलही आस्था आहे. कुठल्याही पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रातले संपादकीय वाचले, तर लोक/देश वगैरेंविषयी कळकळ दिसून येते. आणि त्यापुढे पाककृती/स्वास्थ्य/गुंतवणूक पुरवण्या वाचल्या तर स्वार्थ कसा सांभाळावा त्याबद्दल रुची दिसते. लोक आपापल्या परीने सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करतच आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता त्या तात्त्विक व्याख्येने
"तर याची तत्वे आहेत मी आणि समाज माणसाला स्वत:चं कल्याण करायचं आहे हे त्रिवार सत्य आहे आणि, ती समाजप्रिय आहे."
आपण सर्वच जण आहोत तिथे ठीक आहोत. (यात काही वाईट नाही म्हणा - पण मग लेखप्रपंच कळला नाही.)
समाजवाद फक्त समाजहीत जाणत होता. तर, भांडवलवाद स्वहीत.
याबद्दल साशंक आहे. "फक्त" म्हणणारे कोणीच नाही. प्रत्येक आपापल्या परीने सुवर्णमध्य सांगत आहेत. "व्यक्तिहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक समाजवादी तुम्हाला भेटला आहे काय? "समाजहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक भांडवलवादी तुम्हाला भेटला आहे काय? असो. तुम्ही कळकळीने लिहिले आहे, पण मला मात्र नेमकी कळकळ कशाबद्दल आहे, ते खरेच समजलेले नाही. तरी लिहीतच राहा, आम्हाला तुमच्या विचारांचा ओघ सांगतच राहा, अशी विनंती.

In reply to by धनंजय

मलाही नक्की काही समजलं नाही. खरंतर गाडी पहिल्याच काही परिच्छेदात अडली. घडलंय तरी काय असं जगात ? अजुनही लोक छानचौकीत जगतायत. कोणती युध्दे गेल्या 3 वर्षात झालेली नाहीत. जग प्रगतीपथावर आहे. मग असं काय बिघडलंय ? लोकं छानछोकीत जगत आहेत (गेल्या+येत्या काही महिन्यात तेही बदलू शकतं, नाही का?) पण त्याचबरोबर मान्सूनचा लहरीपणा वाढतोय, मेक्सिकोच्या आखातामधून जाणारी वादळं फारच जास्त विध्वंसक ठरत आहेत, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींबद्दल जास्तीतजास्त चिंता प्रकट होत आहे. गेल्या तीन वर्षात इस्रायलने एक युद्ध केलं आहे, लेबेनॉनशी; गाझा पट्टीत बाँब्ज टाकणंतर वेगळंच आहे. इराक, अफगाणिस्तान, इस्रायल-पॅलेस्ताईन, इत्यादी ठिकाणी सैन्य मारामार्‍या करत आहे याला युद्धच म्हणायचं ना? प्रगती होत नाही आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही पण म्हणून काहीच बिघडलं नाही आहे किंवा वरवर काही दिसत नाही आहे हे मला पटत नाही. पहिला समाजवाद आणि दुसरा भांडवलवाद. समाजाचा गाडा या दोन तत्वांवर नीटपणे चालू होता. असहमत. तसं असतं तर शीतयुद्धतरी का झालं असतं? बाकी धनंजय म्हणतात त्याप्रमाणे तुमचे विचार नीटसे कळले नाहीत. अवांतरः थर्ड वर्ल्ड या शब्दाचा अर्थ नीटसा कळलेला नाही आहे. ना साम्यवाद ना भांडवलशाही, म्हणजे पहिले दोन पर्याय सोडून तिसरा अनुसरणारे ते तिसरे का आणखी काही? अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by अवलिया

+१ सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रथमतःआपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल आभार . आता काही मुद्दे १.मला निबंध म्हणल्याचा अजीबात राग आलेला नाही. साधारण सर्व ललित लेख हे निबंध टाइपच असतात. आणि हो मी आमच्या इथल्य्७आ व्रुत्तपत्रातुन यापेक्षा वाइट लेख वाचत असतो त्यामुळे मला राग नाही. आणि हो सुनीलजी असेच प्रतिसाद येवु देत मी जे काही लिहितो ते लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी त्यामुळे प्रतिक्रिया हेच माझे टॉनिक आहे. २.धनंजय प्रथम आपण माझा लेख इतक्यांदा वाचायची तसदी घेतलीत त्याबद्दल आभार. मला अपेक्षित वागणुक ही साहजीकच दोन्ही वादांचा संमन्वय साध्णारीच आहे. आपापल्या परीने प्रत्येक्जण समन्वय साधायचा प्रयत्न करतोय .बरोबर आहे मात्र आज अनेक लोक आपली समाजवादी किंवा भांडवलवादी विचारसरणी सोडायला तयार नाहीत . आणि काही लोक या दोन्हीचे समन्वय सधाताना चुकतात. यासाठी मी हा लेखनप्रपंच साधला आणि हो आज माझे अनेक मित्र वा माझे समवयस्क पाशिमात्यांचे आंधानुकरण करताना व्यसानांच्या आधीन झाली आहेत आइ वडीलांचे पैसे बुडवत आहेत ही संस्क्रुती आज कोल्हापुरसारख्या गावातही रुजते आहे पण या गोश्टी प्रमाणात असव्यात हे सांगणारे आज कोणी नाही. काहिना तर त्यांचे आइ वडील्च प्रोत्साहन देतात .यालाच मी भांड्वलवादाचे अंधानुकरण समजतो. याउलत माझे महाविद्यालय ज्या भागात आहे त्या भागात अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत तेथे मी अनेक मोर्चे पाहतो पण त्यातले अनेक्ज विषय असे असतात की समाजाच्या प्रगतीसाठी अनुपयुक्त असतात मी अशी अनेक भाशणे ऐकली आहेत ज्यात वक्ते या दोन्ही वादांचे गाठा गातात मात्र या दोघातले प्रमाणात वागणे सांगत नाहीत. ३.वरील उद्देशाने हा लेख मी १५ नोव्हेंबर रोजी लिहिला होता.त्यमुळे त्यावेळी बाँबस्फोट घडला नव्हता. मात्र टाइपिंगला वेळ मिळत नसल्याने व ते नीट होत नसल्याने मी ते एकांकडुन टाइप म्करुन घेतले व परिवर्तन ही प्रणाली वापरुन ते उनिकोडात केले त्यामुळे काही विराम्चिन्हे उठलेली नाहीत. साहजीकच मी काही नवे बदल यात सामावु शकलेलो नाही व काही ताईपंग चुकांमुळे एक दोन वाक्याचे अर्थ वेगळे लागलासारखे वाटर्त आहे असो बदल करीन. ४.समाजाचा गाडा या दोन तत्वावर चालु होता म्हणजे युद्ध वगैरे होत होतीच पण प्रत्यक्ष सामान्याना त्याचे फार झळ बसत न्हवती. आणि थर्ड वर्ड चा अर्थ असाच काहीतरी तुम्ही म्हणता तो.(हा श्बद हेडन नामक एका वेड्या पण चांगल्या खेळाडुने म्हटयाने मला समजला आणि मी वापरला इतकेच) बस आणि हो लेख लिहिताना मी एक महत्वाची चुक केली होती ती म्हणजे मी या फक्त अर्थव्यवस्था न मानता त्याना समाज्व्यवस्थेचे स्वरुप दीले होते भांडवलवाद म्हणजे साधारण त्या व्यवस्थेवर जगणारा समाज आणि तसेच समाजवादाचे (त्यामुळे समाज्वाद व साम्यवाद याना मी एकत्रच धरले आहे) आणि आता इश्वर्वादाबरोबर गेली कित्येक वर्शे भारतात देवाची भीती घालुन वा श्रद्धेचा वापर करुन या दोन वादांचा समन्वय साधाला होता म्हणून या पद्धतीला मी इश्वर्वाद हे नाव दीले. तर आता बदल बदल म्हणजे मी असा करायचा म्हणत होतो की आपण हीच संस्क्रुती पुन्हा बाणली पाहिजे सामाजेक नव्हे तर वैयक्तीक पातळीवर आजकाल लोक जेष्ठाना नमस्कार करत नाही त्याना लाज वाटते अशा ठिकठिकाणी इतर संस्क्रुतीनी गारुड केले आहे आणि सध्याचा परिस्थीती सगळे जण आता काय करायचे असे म्हणत आहेत. याला उत्तर म्हणजे आपण नेहमीसारखे वागले तर नाकीच परिस्थीती बदलेल आपल्या संस्क्रुतीत पोट्यापुरतेच खायला सांगीतले होते पण आपण जास्त खाल्ले आणि आता ओकओय इतकेच . तर या विषयावर माझे हे मत *****महत्वाचे म्हणजे हा लेख म्हणावा तसा जमलेला नाही याची मलाही जाणीव आहे मात्र तरीही आपण तो वाचलात आणि प्रतिसाद दीलात याबद्दल आभार आणि हो मी लिहिता लाहणारच आहे कारण त्याशिवाय मी जगु शकत नाही.आणि हो मी जास्त वाचन केलेले नाही त्यामुळे ही मते माझ्या अनुभवावरुन व काही फुटकळ वाचनावरुन केलेली होती त्यामुळेच घोळ झाला होता . पण असो आणि हो आताही दोष लगेच आणि जरुर सांगा वाट पाहतोय.. आपला, (खुप आनंदीत)विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

विसुनाना 10/01/2009 - 17:21
नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही. को.दा. विनायकराव, वयाच्या मानाने प्रयत्न स्तुत्य आहे. पण सावरकर उपनामे एक दुसरे विनायक होते त्यांचा आदर्श समोर ठेवा. त्यांची मते काही लोकांना चुकीची वाटली तरी ती चुकीची मांडली आहेत असे कधीच वाटू शकत नाहीत. लेखात आपल्याला नक्की काय मांडायचे आहे ते ठरवा. आपले म्हणणे कसे बरोबर आहे ते पटवून द्यायचा प्रयत्न करा. सूचनांबद्दल राग नसावा ही विनंती.

In reply to by विसुनाना

राग अजिबात नाही अहो माझ्या फायद्याचेच आहे न ते मग राग कसला बस मला फक्त भारतीय संस्क्रुतीचे श्रेश्ठत्व आणि त्यापरमाणे वागाय्चे गरज सांगायची होती असो पुढच्या वेळी बघु जमतय का आणि हो सावरकरच माझे आदर्श आहेत्(आता गांधी आम्हाला पटले नाहीत त्याला काय करणार बुवा) असो धन्यवाद आणि हो हे काही लेख नकी सुट होतात माझ्या विचाराना http://www.loksatta.com/daily/20090110/ch01.htm http://www.loksatta.com/daily/20090110/ch02.htm विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

वेताळ 10/01/2009 - 23:17
विनायका तुझा लेख दोनदा वाचला. तुझी विचार करण्याची पध्दत आवडली. सदर लेख लिहिताना तुझा खुप गोधंळ उडाला आहे असे मला वाटते. समाजवाद व साम्यवाद हे दोन्ही भिन्न आहेत.रशियाने व चीन ने साम्यवाद स्विकारला.नेहरुनी स्वातंत्र भारतासाठी समाजवाद स्विकारला.अमेरिका व इतर राष्ट्रे भांडवलशाही आहेत. प्रत्येक व्यवस्थेचे काही गुणदोष आहेत.कोणतीही व्यवस्था सर्वगुणसंपन्न नाही. त्यामुळे आपण जी व्यवस्था स्विकारतो ती दोषविरहित बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रशियात साम्यवादाचे तीनतेरा वाजले. परंतु तोच साम्यवाद भांडवलशाहीच्या मुक्तअर्थ व्यवस्थेत चीनमध्ये कसा गुटगुटीत झाला आहे तु बघतोच आहेस.मग साम्यवाद नष्ट कसा झाला?अमेरिकेत भांडवलशाही कोसळली असे म्हणणे पण चुकीचे आहे. कोणत्याही व्यवस्थेत काही चुका ,उणिवा असतात.त्या कधी कधी वर उग्ररुप धारण करतात. म्हणुन ती व्यवस्था चुकीची आहे असे एकदम म्हणता येणार नाही. आता आपण ही समाजवादातुन मुक्त अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आहे.त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य होणार नाही.अजुन काही काळातच आपल्याला कळेल . भारतात निसर्गवाद का ईश्वरवाद होता असे तु काय म्हणत आहेस त्या बद्दल मला काहीच कळाले नाही. पण मला वाटते ब्रिटीशाच्या आक्रमणा आधी भारतात जवळ जवळ सर्व खेडी स्वंयपुर्ण होती. परंतु ब्रिटिश आक्रमणा मुळे व त्याच्या मालाला हव्या असणार्‍या बाजारपेठेसाठी त्यानी आपली ही व्यवस्था मोडीत काढली.परंतु ती ईश्वरवादी होती का निसर्गवादी होती , म्हणजे काय? फक्त तु ईश्वरवाद व निसर्गवाद म्हणजे काय ते एकदा स्पष्ट कर.म्हनजे तुझा लेख समजायला सोपा जाईल.तुझ्या भावी लिखाणास माझ्या कडुन शुभेच्छा. वेताळ

In reply to by वेताळ

वेताळ आपले व माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार मला थोडक्यात फक्त एवडेच सांगायचे होते. की आपण जगातील कोणत्याही वादाचे अंधानुकरण करण्ञापेक्षा आपल्या भारतीय जीवनपद्धतीनुसार जगावे. बस हे सांगताना मी अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचा समन्वय साधायला गेलो होतो मात्र अपुर्‍या अभ्यासामुळे आपटलो असो.... विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

गोगोल 11/01/2009 - 22:03
केलेला आहे, पण जमलेला नाही. मागे पण तू एकदा शाळेविषयी लेख लिहिला होतास, मी त्याला त्यावेळी निबंध असे म्हणालो होतो. आता या दोन्ही लेखांवरून मी काही सजेशन्स देतो आहे 1. अवजड शब्दा सहजरीत्या वापरणे फार थोड्या लेखकांना जमते. ते जर जमले नाही, तर तो लेख सखाराम गटणे या पुलंच्या व्यक्तिरेखेप्रमाणे होऊन बसतो. म्हणजे काय की शब्द तर बरेच माहिती आहेत, पण अर्थ उमगलेला नाही. काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो. 2. काही माहिती सपशेल चुकीची आहे. तीन वर्षात युद्ध नाही? असेल तर सर्वसामान्यांना त्याची झळ नाही? मला माहीत नाही की तू कुठली वर्तमान पत्रे वाचतोस पण गेल्या पन्नास वर्षापेक्षा जग आज अधिक पेटलेले आहे. 3. "मी फक्त 16 वर्षांचा असल्याने माझे अनुभव फार तोडके आहेत. " हा मुद्दा अत्यंत बरोबर आणि खरा आहे. माझा असा सल्ला असेल की थोडे बाहेरच्या जगातले अनुभव मिळाले तर लेखन अधिक समृद्ध होईल. या बाबतीत तू दुसरे लेखक जसे की पिवळा डांबिस, बिपीन कार्यकर्ते, विसोबा खेचर, प्रियाली आणि छोटा डॉन यांचे लेख बघ. साधे सोपे शब्द, सुटसुटीत वाक्ये, ओघवाती शैली यामुळे त्यांचे लेख अगदी खमंग होत असतात. त्यांच्या लेखनात एक प्रकारचा उस्फुर्तपणा आहे. 4. तुझ्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यात वादच नाही. जश्या की तू सुरू केलेली वेबसाइट. ती सुंदर आहे आणि त्याबद्दल अभिनंदन!! 5. आमचे पूर्वज श्रेष्ठ होते. त्यांनी हे शोध लावले, त्या काळात अशी प्रगती केली. हे सर्वा आता सोडून द्यायला पाहिजे आणि इतिहास अब्जेक्टिव्ली अनलाइज़ केला पाहिजे. एक अशीच वेबसाईट जी असा प्रयत्न करते तिची लिंक आहे http://khattamitha.blogspot.com/ . मी सगळ्याच मतानबरोबर सहमत नाही, पण काही मुद्दे विचार करायला जरूर भाग पाडतात. हे परीक्षण थोडेसे परखड झाले आहे, पण मी काही ह. घ. वगैरे म्हणणार नाही. मला जे वाटते ते मी लिहिले. उद्या जर तू खरच मोठा लेखक झालास आणि पुस्तके लिहिलिस, तर तुला याहूनही खडतर परीक्षणांना तोंड द्यावे लागेल.

In reply to by गोगोल

गोगोल आपण अगदी बिनधास्त आणि योग्य प्रतिक्रिया दीलीत त्याबद्दल आपले आभार १.माझे लेखन अतीच अलंकारी होते हे अगदी सत्य आहे बर्‍याचदा मी कारण नसताना उपमा आणि अलंकार वापरतो याची मलाही जाणीव होत आहे याचे कारण असे आहे की मी माझे लिखाण साधारणतः दहावीनंतर सुरु केले दहावीच्या काळात मी अनेक निबंध लिहिले आणि गरज म्हणून त्यात अनेक अलंकारी शब्दांचा वापर केला त्यामुळे त्या काळात वाचनही त्याच प्रकारचे केले आणि तेच शब्द डोक्यात बसले त्यामुळे आता कोणत्याही लेखात माझ्याही नकळत हे शब्द वापरले जातात यावर हळुहळु मात करत आहे . बघु काय होत ते. २.मी ते वाक्य उपहासाने लिहिले होते पण बर्‍याच जणांचा तेथे घोळ झाला असो पुढच्यावेळी पासुन सुधारीन स्वतः ला ३.होय माझे अनुभव तोकडेच आहेत पण तसे असुनही मी लिहित आहे आणी तुम्ही ते वाचत आहात हेच मला समाधान देते .आणि अनुभव वाढतीलच तोपर्यंत आपले ललित लिखाण्च ब्वरे असे वाटत आहे आणि हो मीही उत्स्फुर्त लिहितो आणि लिहिल्यावर त्यात काहीही बदल करत नाही पण हे क्रुत्रीमतेचे बुरुज लवकरच पाडीन मिपावरच्या जेष्ठ लोकांच्या लेखांचे वाचन सुरु आहे ४.माझ्या उअपक्रमाची स्तुती लेल्याबद्दल आभार आणि हो या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपरयंत पोहोचवा ही नम्र विनंती ५.ब्लॉग वाचला चांगला आहे पुन्हा एकदा धन्यवाद आणि हो यापुढे चांगले लिहिण्याचा प्रयत्न करीन आपल्या अशाच प्रतिक्रियांचे स्वागत आहे आणि हो माझा हा वैचारीक लेखाचा पहिलाच प्रयत्न होता असो पण यापुढे चांगला प्रयत्न करीन असो फक्त एकच गोष्ट खटकते मला लेख लिहिल्यावर माझ्या वयाचा उल्लेख करावा लागतो जेव्हा माझे वय विचारात न घेता लोक माझे लेख चांगले म्हणतील तो दीवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल. आपला (एक लेखक्)विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by गोगोल

गोगोल यांच्याशी सहमत... ... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
नमस्कार मित्रानो, मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख..... (सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे.

मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

विनायक पाचलग ·

पक्या 02/01/2009 - 05:22
छान लिहिले आहेस , को.दा. मनाच्या कुपीतले विचार समर्पक शब्दात मांडले आहेस. मराठी च्या प्रश्न पत्रिके मध्ये निबंधाला हा विषय असता तर तुला १० पैकि १० मार्क फॉर शुअर.

प्राजु 02/01/2009 - 08:47
छान लिहिले आहेस.माणसा माणसा कधी होशील माणूस... याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

धन्यवाद काल असेच बसलो होतो म्हटले जरा वेगळ्या प्रकारे लोकाना शुभेच्छा कशा द्यायच्या आणि लगेच सुचले आणि टायपुन काढले धन्यवाद विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

पक्या 02/01/2009 - 05:22
छान लिहिले आहेस , को.दा. मनाच्या कुपीतले विचार समर्पक शब्दात मांडले आहेस. मराठी च्या प्रश्न पत्रिके मध्ये निबंधाला हा विषय असता तर तुला १० पैकि १० मार्क फॉर शुअर.

प्राजु 02/01/2009 - 08:47
छान लिहिले आहेस.माणसा माणसा कधी होशील माणूस... याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

धन्यवाद काल असेच बसलो होतो म्हटले जरा वेगळ्या प्रकारे लोकाना शुभेच्छा कशा द्यायच्या आणि लगेच सुचले आणि टायपुन काढले धन्यवाद विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
नमस्कार मित्रानो नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख . हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.
कोऽहमचा पुकारा
3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे.

भावंडे

शितल ·

व्यंकु 29/12/2008 - 22:12
खरंच भावंडांच महत्व खूप आहे माझा भाऊच मला आमच्या कुटुंबात जास्त आवडतो जरी आम्ही कितीही भांडलो तरी. शितल ताई लेख छान आहे. तुमच्या लहानपणीचा प्रसंगही आवडला

प्राजु 29/12/2008 - 22:25
भावंड असतातच अशी.. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

असण्याचे फायदे सांगताच येत नाहीत. धन्स शितल.. आपण ज्या काही गोष्टी 'गृहित' धरतो त्यातच आपल्या भावंडाचे 'असणं' ही एक आहे... म्हणजे सुख-दु:खात बाकी कोण असेल्/नसेल पण आपलं भावंड नक्की साथ देईल असं !!

अनामिक 30/12/2008 - 00:11
शितल ताई... मस्त लेख.. खुप आवडला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हा तिघात मी सगळ्यात लहान... त्याचे फायदेच जास्तं झाले. लहान असताना दादापेक्षा ताईच जवळची वाटायची. शेंडेफळ असल्याने मी मला बरोबर न्या म्हणून मागे लागायचो आणि दादा कुठेच नेत नसे... तु तुझ्या मित्रांबरोबर खेळ असं म्हणून सटकायचा. त्याउलट ताई मला नेहमी बरोबर न्यायची... (तिचा खुप जीव आहे माझ्यावर). खुप काळजी घ्यायची. सहाजीकच मला ति अधिक जवळची वाटू लागली. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे त्या दोघांचही माझ्यावर किती प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून कळायला लागलं. आज तिघं तिन ठिकाणी आहोत, पण एकमेकांना बोलल्याशिवाय रहावत नाही... खरंच, मेरे भावंडोको मेरी भी उमर लग जाये!! सुंदर लेखासठी शितल तै चं अभिनंदन! अनामिक

रेवती 30/12/2008 - 01:02
वाचताना डोळ्यात पाणी आले. आमच्याकडेही रोज भावंडासाठी हट्ट असतो माझ्या मुलाचा. दुसर्‍यांच्या घरी बाळ येणार असे समजले की आमच्या घरी बरीच वादावादी असते (मुलाची व माझी). माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. रेवती

In reply to by रेवती

माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. मग तुम्ही त्याला भाऊच आणा, कसे? :))))))))))

In reply to by पिवळा डांबिस

रेवती 30/12/2008 - 01:21
निळ्या रंगात रंगून झालेय, आता म्हटलं गुलाबी रंग आणून बघावा. निदान मुलीमुळे नाजूकपणाचा स्पर्श होईल घराला, नाहीतर सदासर्वदा रांगडेपणाच असतो. (अर्थात ही गंमत करतेय मी.) रेवती

In reply to by रेवती

मुली नं १च..... पण मुली नाजूकच असतात हे काय खरं नाय ब्वॉ. आमच्या धाकटीला भेटा एकदा. गैरसमज दूर होतील. विप्रंना डोस दिलाय तिने.... :( बिपिन कार्यकर्ते

धनंजय 30/12/2008 - 01:10
भावा-बहिणीचे असे खासच नाते असते असे मी कितीतरी नातेवाइकांकडून ऐकले आहे. (मला बहीण नाही.) तुमची हृद्य आठवण आवडली.

शितल, छान आठवण, छान लिहिलेली. माझी धाकटी पोट्टी अशीच आलेली आहे आमच्याकडे. :) कालच एका मित्राबरोबर हाच विषय निघाला होता. स्वतःच्याच घरात एकाला दोन असलेले खरंच चांगलं आणि मुलांसाठी खूप हेल्दी असतं. फक्त एकच सुधारणा सांगतो. कधी कधी नकळत्या वयात, वाढत्या वयात भावंडात (विशेषतः भावाबहिणीत) खूप भांडणं होतात, प्रसंगी मारामार्‍या होतात, पण हे सगळं नंतर पाऽऽर विरघळतं. हा माझा स्वानुभव आहे. लहानपणी लग्नांतून वगैरे जेव्हा नवरी मुलगी सासरी जायला निघते तेव्हा होणारी रडारड बघून आम्ही खूप हसायचो. ताईचं लग्न ठरलं तेव्हा मला पूर्ण खात्री होती की मी काही रडणार नाही. पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. पार पचका झाला माझा. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अनामिक 30/12/2008 - 01:44
असा पचका सगळ्याच भावांचा होत असेल नाही? एक किस्सा आठवला. माझ्या मामेबहिणीचं लग्न झालं तेव्हा मामेभाऊ जरा जास्तच रडत होता. तेव्हा ते भाऊजी म्हणाले 'अरे रडतोस कशाला, आपण एकाच गावात तर आहोत. कधीही भेटू शकतो.' मामेभाऊ रडता-रडताच म्हणाला 'म्हणूनच तर रडतोय!' अनामिक

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. माझा सुद्धा माझ्या तायांच्या लग्नांत झालेला पोपट आठवला. :( भावंडं, विषेशतः बहिनी हा प्रकारच फारच स्पेशल आहे. आईचं वात्सल्य, बापाचा आधार, भावाची सोबत अन बहिनींची माया... जीवनाला आकार देणारी रसायनं. आपला, (श्रीमंत) भास्कर

चतुरंग 30/12/2008 - 01:35
डोळ्यात पाणी आले. मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच, भरपूर आठवणी आहेत, आता वरचेवर भेटी होत नाहीत अंतरामुळे पण फोनवर बोलणे व्हायलाच हवे. आमच्या मुलाचा दिवसा-दोनदिवसाआड धोशा असतो 'मला ब्रदर किंवा सिस्टर का नाहीये म्हणून?' त्याच्या इतर सर्व आत्ते, मामे, मावस भावंडांची त्याला आठवण करुन द्यावी लागते पण त्याचे समाधान होत नाही. समजूत काढता नाकी नऊ येतात! एकाला दोघे असलेले कधीही चांगलेच असते पण दरवेळी ते शक्य होतेच असे नाही त्यामुळे ती कमी मग मित्र आणि इतर भावंडांशी संपर्क ठेवून पूर्ण करुन द्यावी लागते. आपल्याला जिवाभावाचे भावंड आहे ही भावना मात्र वेगळीच असते हे नक्की! चतुरंग

आनंदयात्री 30/12/2008 - 09:34
छान लिहलं आहेस शितल. शेवटची मोगलीची आठवण तर मस्तच !! - आंद्या बगीरा

मनस्वी 30/12/2008 - 10:20
आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले, ते पाहुन माझे पपा हसु लागले. :)
:) :)

ऍडीजोशी 30/12/2008 - 16:48
भावंडे खासच असतात. आम्ही दोघे भाऊ भाऊ च आहोत. त्यामुले मारामारी हा आमचा सर्वात आवडता खेळ. अजूनही घरी गेलो की एकदा तरी एकमेकांच्या उरावर बसतोच. सख्खी बहिण नसल्याने चुलत / मामे बहिणींवर जास्तच प्रेम आहे. बहिणी वीक पॉइंट आहे असं म्हटलं तरी चलेल. नी त्या सुद्धा हे जाणून मला यथेच्छ इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. आणि मी पण आनंदाने बळी पडतो :) एकाला एक भावंड हवंच ह्या मताचा मी आहे. लहानपणी कधीच मित्राची उणीव भावामुळे भासली नाही. त्यात माझे सगळे काका आमच्या लहानपणी जवळ जवळच रहात असल्याने अजुनच धमाल. झक्कास विषय काढलात. भावंडांच्या सगळ्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या.

चिरंजीव एकदा शाळेतुन आले. वय वर्ष ५.सिनीयर के.जी. चेहेरा जरा तांबडा झाला होता. काय झाले रे तर काही सांगेना. नंतर थोड्या वेळाने आईला विचारता झाला. " तु हॉस्पिटल मधुन दुसरे बाळ आणणार आहेस का"? महेश ची(मीत्राची) आई आणणार आहे. तु आणु नकोस. मला नको. हम दो हमारा एक चा निर्णय पक्का झाला. आता हल्ली हल्ली एक मानस कन्या मिळाली.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 30/12/2008 - 23:00
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. आम्हीही म्हटले मनात, चला हे एक बरं झालं. आता मात्र अवघड परीस्थिती आहे. रोज एकाच प्रश्नावरून त्याच्याशी चर्चा करावी लागते. रेवती

In reply to by रेवती

रेवती 31/12/2008 - 07:42
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. या वाक्यामधील तो हा माझा मुलगा आहे. माझ्या मुलानेच ठरवले की आपल्याकडे दुसरे बाळ नको. आणि सध्या माझ्या मुलाचा विचार बदलला आहे. बाळही दोन मिनिटात हजर व्हायला हवे आहे. रेवती

लिखाळ 30/12/2008 - 17:06
लेख मस्त. शेवटचा भावा-बहिणीचा प्रसंग सुद्धा एकदम छान. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चित्रा 30/12/2008 - 21:35
शीतल, आठवण छान. मला बहिणच आहे, पण एकत्र कुटुंब असल्याने सख्खा भाऊ नसणे जाणवले नाही. बहिणींचे नातेही खास असतेच.

शितल 31/12/2008 - 01:11
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :) तुम्हा सर्वाच्या स्वतःच्या लहाणपणीच्या भावंडा बरोबरच्या आठवणी जागा झाल्या हे वाचुन खुप छान वाटले. :)

केशवराव 01/01/2009 - 05:03
शितल, लेख फार आवडला. आम्ही तिघे भाऊ. मावस भावंडात ६ भाऊ आणि ३ बहिणी. नाते सख्ख्या भावंडांसारखे.खूप भांडायचो,खोड्या काढायचो. तू पार नॉस्टालजिक करून टाकलेस बघ!

ऋषिकेश 02/01/2009 - 16:36
वा! फर्मास लेख! मला एक भाऊ आहे.. त्यामुळे एकमेकांचय भन्नाट खोड्या काढणे, मारामार्‍या, वस्तु ढापणे/लपवणे हे आवडते प्रकार.. विडीयो गेम्स, कंप्युटरवर कोणी बसायचे, कोणाच्या हातात रिमोट ही दैनंदिन भांडणे. :) आता दोघेहि मोठे झाल्याने खोड्या कमी झाल्या आहेत पण अजूनहि एकमेकांना नावांने हाक क्वचितच मारली जाते. हाका मारायला प्राणीसृष्टी मदतीला धाऊन येते. ;) बाकी एकास एक तरी भावंड हवे ह्यास अनुमोदन! (दादा)ऋषिकेश

लेख छान आहे. मला एक मोठी बहिण जी सध्या अमेरिकेत असते. आम्ही पण खूप भान्डायचो आणि एकत्र यायचो (पुन्हा भाण्डायला) तिच्या लग्नात तर मी खूप रडलो होतो आणि नन्तरचे २-३ दिवस सारखे या खोलीतून त्या खोलीत, मधेच कधीतरी गच्चीत...मधे तिच्याकडे जाण्याचा योग आला. १५-२० दिवस धमाल केली आणि मग इकडे परत येण्याचा दिवस उजाडला. आता पुन्हा एक वर्श तरी भेट नाही या विचारनेच कसे तरी होत होते. विमानात बसल्यावर तर तिची सारखी आठवण येत होती. मग शेवटी तिथले पान्घरूण डोक्यावरून ओढून घेतले आणि पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेतले (हळू आवाजात!!).

समिधा 25/01/2009 - 11:57
शितल ,खरच खुप छान लिहील आहेस, मला ही माझ्या भावाची आठवण आली.आणि माझ्या लग्नाच्या वेळचा प्रसंग आठवला. :( खुप आठवण आली भावाची.

दशानन 25/01/2009 - 12:07
>>खुप छान लिहील आहेस हेच म्हणतो ! सुंदर ! कालच वाचला होता... प्रतिसाद देणे विसरलो होतो ;) ह्यामुळेच माझी तायडी मला बावळट म्हणते... काही ही विसरु शकतो मी ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

शुभान्गी 25/01/2009 - 12:21
शितल.. खूप छान लिहिले आहेस. मी व माझा भाऊ आम्ही आजी कडे रहायचो... भाऊ बॅन्केत लागला होता व मी शिकत होते... एखाद्या दिवशी मन उदास असतान्ना त्याचा जो मायेने डोक्यावरुन मायेचा हात फिरायचा तो हात आता कधीच नाही फिरणार......मन उदास झाले आहे...... तुमच्या लेखाने परत काहि प्रसन्गाना उजाळा मिळाला.......

प्रमोद देव 25/01/2009 - 12:39
मला एकच मुलगी आहे आणि तिला स्वतःला भाऊ-बहीण नाही हे तिला खूपच सुखदायक वाटते. आता ती वयानेही मोठी आहे पण तिचे लहानपणापसूनचे ते मत अजूनही कायम आहे. कारण...सगळ्याच गोष्टींवर तिचा अनिर्बंध अधिकार आहे. तिला कोणाचीही स्पर्धा नाही. इतर भावा-बहिणींची भांडणे-वाद पाहून तर ती नेहमीच आपल्याला भावंडं नाही ह्याबद्दल खूश असते. आता बोला! शीतल लेख मस्त आहे. तुम्हा भावा-बहिणीचे प्रेम पाहून अंमळ हळवा झालो.

मोठी बहिण असणे हे एक वेगळेच सुख. माझी बहिण माझ्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. शाळेतुन तक्रार आली आणि ''पालकांना' घेऊन ये' अशी तंबी मिळाली की मी ताईला (आधीच दम भरुन) घेउन जायचो. शिक्षकांसमोर मला खोटं खोटं रागवायचं आणि घरी प्रकार कळू द्यायचा नाही. हे कर्तव्य ती बंधूप्रेमापोटी करायची . मला तो माझा हक्कच वाटायचा. एकुलती एक बहिण. सासरी निघाली, धो धो रडलो. आजही तिच्याशी तात्विक वादविवाद होतो. पण मी जास्त ताणून धरत नाही. ती मोठी आहे. माघार घेतो. हे सुख माझ्या मुलाला नाही देऊ शकलो. (आता वेळ निघून गेली) असो.

व्यंकु 29/12/2008 - 22:12
खरंच भावंडांच महत्व खूप आहे माझा भाऊच मला आमच्या कुटुंबात जास्त आवडतो जरी आम्ही कितीही भांडलो तरी. शितल ताई लेख छान आहे. तुमच्या लहानपणीचा प्रसंगही आवडला

प्राजु 29/12/2008 - 22:25
भावंड असतातच अशी.. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

असण्याचे फायदे सांगताच येत नाहीत. धन्स शितल.. आपण ज्या काही गोष्टी 'गृहित' धरतो त्यातच आपल्या भावंडाचे 'असणं' ही एक आहे... म्हणजे सुख-दु:खात बाकी कोण असेल्/नसेल पण आपलं भावंड नक्की साथ देईल असं !!

अनामिक 30/12/2008 - 00:11
शितल ताई... मस्त लेख.. खुप आवडला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हा तिघात मी सगळ्यात लहान... त्याचे फायदेच जास्तं झाले. लहान असताना दादापेक्षा ताईच जवळची वाटायची. शेंडेफळ असल्याने मी मला बरोबर न्या म्हणून मागे लागायचो आणि दादा कुठेच नेत नसे... तु तुझ्या मित्रांबरोबर खेळ असं म्हणून सटकायचा. त्याउलट ताई मला नेहमी बरोबर न्यायची... (तिचा खुप जीव आहे माझ्यावर). खुप काळजी घ्यायची. सहाजीकच मला ति अधिक जवळची वाटू लागली. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे त्या दोघांचही माझ्यावर किती प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून कळायला लागलं. आज तिघं तिन ठिकाणी आहोत, पण एकमेकांना बोलल्याशिवाय रहावत नाही... खरंच, मेरे भावंडोको मेरी भी उमर लग जाये!! सुंदर लेखासठी शितल तै चं अभिनंदन! अनामिक

रेवती 30/12/2008 - 01:02
वाचताना डोळ्यात पाणी आले. आमच्याकडेही रोज भावंडासाठी हट्ट असतो माझ्या मुलाचा. दुसर्‍यांच्या घरी बाळ येणार असे समजले की आमच्या घरी बरीच वादावादी असते (मुलाची व माझी). माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. रेवती

In reply to by रेवती

माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. मग तुम्ही त्याला भाऊच आणा, कसे? :))))))))))

In reply to by पिवळा डांबिस

रेवती 30/12/2008 - 01:21
निळ्या रंगात रंगून झालेय, आता म्हटलं गुलाबी रंग आणून बघावा. निदान मुलीमुळे नाजूकपणाचा स्पर्श होईल घराला, नाहीतर सदासर्वदा रांगडेपणाच असतो. (अर्थात ही गंमत करतेय मी.) रेवती

In reply to by रेवती

मुली नं १च..... पण मुली नाजूकच असतात हे काय खरं नाय ब्वॉ. आमच्या धाकटीला भेटा एकदा. गैरसमज दूर होतील. विप्रंना डोस दिलाय तिने.... :( बिपिन कार्यकर्ते

धनंजय 30/12/2008 - 01:10
भावा-बहिणीचे असे खासच नाते असते असे मी कितीतरी नातेवाइकांकडून ऐकले आहे. (मला बहीण नाही.) तुमची हृद्य आठवण आवडली.

शितल, छान आठवण, छान लिहिलेली. माझी धाकटी पोट्टी अशीच आलेली आहे आमच्याकडे. :) कालच एका मित्राबरोबर हाच विषय निघाला होता. स्वतःच्याच घरात एकाला दोन असलेले खरंच चांगलं आणि मुलांसाठी खूप हेल्दी असतं. फक्त एकच सुधारणा सांगतो. कधी कधी नकळत्या वयात, वाढत्या वयात भावंडात (विशेषतः भावाबहिणीत) खूप भांडणं होतात, प्रसंगी मारामार्‍या होतात, पण हे सगळं नंतर पाऽऽर विरघळतं. हा माझा स्वानुभव आहे. लहानपणी लग्नांतून वगैरे जेव्हा नवरी मुलगी सासरी जायला निघते तेव्हा होणारी रडारड बघून आम्ही खूप हसायचो. ताईचं लग्न ठरलं तेव्हा मला पूर्ण खात्री होती की मी काही रडणार नाही. पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. पार पचका झाला माझा. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अनामिक 30/12/2008 - 01:44
असा पचका सगळ्याच भावांचा होत असेल नाही? एक किस्सा आठवला. माझ्या मामेबहिणीचं लग्न झालं तेव्हा मामेभाऊ जरा जास्तच रडत होता. तेव्हा ते भाऊजी म्हणाले 'अरे रडतोस कशाला, आपण एकाच गावात तर आहोत. कधीही भेटू शकतो.' मामेभाऊ रडता-रडताच म्हणाला 'म्हणूनच तर रडतोय!' अनामिक

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. माझा सुद्धा माझ्या तायांच्या लग्नांत झालेला पोपट आठवला. :( भावंडं, विषेशतः बहिनी हा प्रकारच फारच स्पेशल आहे. आईचं वात्सल्य, बापाचा आधार, भावाची सोबत अन बहिनींची माया... जीवनाला आकार देणारी रसायनं. आपला, (श्रीमंत) भास्कर

चतुरंग 30/12/2008 - 01:35
डोळ्यात पाणी आले. मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच, भरपूर आठवणी आहेत, आता वरचेवर भेटी होत नाहीत अंतरामुळे पण फोनवर बोलणे व्हायलाच हवे. आमच्या मुलाचा दिवसा-दोनदिवसाआड धोशा असतो 'मला ब्रदर किंवा सिस्टर का नाहीये म्हणून?' त्याच्या इतर सर्व आत्ते, मामे, मावस भावंडांची त्याला आठवण करुन द्यावी लागते पण त्याचे समाधान होत नाही. समजूत काढता नाकी नऊ येतात! एकाला दोघे असलेले कधीही चांगलेच असते पण दरवेळी ते शक्य होतेच असे नाही त्यामुळे ती कमी मग मित्र आणि इतर भावंडांशी संपर्क ठेवून पूर्ण करुन द्यावी लागते. आपल्याला जिवाभावाचे भावंड आहे ही भावना मात्र वेगळीच असते हे नक्की! चतुरंग

आनंदयात्री 30/12/2008 - 09:34
छान लिहलं आहेस शितल. शेवटची मोगलीची आठवण तर मस्तच !! - आंद्या बगीरा

मनस्वी 30/12/2008 - 10:20
आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले, ते पाहुन माझे पपा हसु लागले. :)
:) :)

ऍडीजोशी 30/12/2008 - 16:48
भावंडे खासच असतात. आम्ही दोघे भाऊ भाऊ च आहोत. त्यामुले मारामारी हा आमचा सर्वात आवडता खेळ. अजूनही घरी गेलो की एकदा तरी एकमेकांच्या उरावर बसतोच. सख्खी बहिण नसल्याने चुलत / मामे बहिणींवर जास्तच प्रेम आहे. बहिणी वीक पॉइंट आहे असं म्हटलं तरी चलेल. नी त्या सुद्धा हे जाणून मला यथेच्छ इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. आणि मी पण आनंदाने बळी पडतो :) एकाला एक भावंड हवंच ह्या मताचा मी आहे. लहानपणी कधीच मित्राची उणीव भावामुळे भासली नाही. त्यात माझे सगळे काका आमच्या लहानपणी जवळ जवळच रहात असल्याने अजुनच धमाल. झक्कास विषय काढलात. भावंडांच्या सगळ्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या.

चिरंजीव एकदा शाळेतुन आले. वय वर्ष ५.सिनीयर के.जी. चेहेरा जरा तांबडा झाला होता. काय झाले रे तर काही सांगेना. नंतर थोड्या वेळाने आईला विचारता झाला. " तु हॉस्पिटल मधुन दुसरे बाळ आणणार आहेस का"? महेश ची(मीत्राची) आई आणणार आहे. तु आणु नकोस. मला नको. हम दो हमारा एक चा निर्णय पक्का झाला. आता हल्ली हल्ली एक मानस कन्या मिळाली.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 30/12/2008 - 23:00
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. आम्हीही म्हटले मनात, चला हे एक बरं झालं. आता मात्र अवघड परीस्थिती आहे. रोज एकाच प्रश्नावरून त्याच्याशी चर्चा करावी लागते. रेवती

In reply to by रेवती

रेवती 31/12/2008 - 07:42
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. या वाक्यामधील तो हा माझा मुलगा आहे. माझ्या मुलानेच ठरवले की आपल्याकडे दुसरे बाळ नको. आणि सध्या माझ्या मुलाचा विचार बदलला आहे. बाळही दोन मिनिटात हजर व्हायला हवे आहे. रेवती

लिखाळ 30/12/2008 - 17:06
लेख मस्त. शेवटचा भावा-बहिणीचा प्रसंग सुद्धा एकदम छान. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चित्रा 30/12/2008 - 21:35
शीतल, आठवण छान. मला बहिणच आहे, पण एकत्र कुटुंब असल्याने सख्खा भाऊ नसणे जाणवले नाही. बहिणींचे नातेही खास असतेच.

शितल 31/12/2008 - 01:11
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :) तुम्हा सर्वाच्या स्वतःच्या लहाणपणीच्या भावंडा बरोबरच्या आठवणी जागा झाल्या हे वाचुन खुप छान वाटले. :)

केशवराव 01/01/2009 - 05:03
शितल, लेख फार आवडला. आम्ही तिघे भाऊ. मावस भावंडात ६ भाऊ आणि ३ बहिणी. नाते सख्ख्या भावंडांसारखे.खूप भांडायचो,खोड्या काढायचो. तू पार नॉस्टालजिक करून टाकलेस बघ!

ऋषिकेश 02/01/2009 - 16:36
वा! फर्मास लेख! मला एक भाऊ आहे.. त्यामुळे एकमेकांचय भन्नाट खोड्या काढणे, मारामार्‍या, वस्तु ढापणे/लपवणे हे आवडते प्रकार.. विडीयो गेम्स, कंप्युटरवर कोणी बसायचे, कोणाच्या हातात रिमोट ही दैनंदिन भांडणे. :) आता दोघेहि मोठे झाल्याने खोड्या कमी झाल्या आहेत पण अजूनहि एकमेकांना नावांने हाक क्वचितच मारली जाते. हाका मारायला प्राणीसृष्टी मदतीला धाऊन येते. ;) बाकी एकास एक तरी भावंड हवे ह्यास अनुमोदन! (दादा)ऋषिकेश

लेख छान आहे. मला एक मोठी बहिण जी सध्या अमेरिकेत असते. आम्ही पण खूप भान्डायचो आणि एकत्र यायचो (पुन्हा भाण्डायला) तिच्या लग्नात तर मी खूप रडलो होतो आणि नन्तरचे २-३ दिवस सारखे या खोलीतून त्या खोलीत, मधेच कधीतरी गच्चीत...मधे तिच्याकडे जाण्याचा योग आला. १५-२० दिवस धमाल केली आणि मग इकडे परत येण्याचा दिवस उजाडला. आता पुन्हा एक वर्श तरी भेट नाही या विचारनेच कसे तरी होत होते. विमानात बसल्यावर तर तिची सारखी आठवण येत होती. मग शेवटी तिथले पान्घरूण डोक्यावरून ओढून घेतले आणि पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेतले (हळू आवाजात!!).

समिधा 25/01/2009 - 11:57
शितल ,खरच खुप छान लिहील आहेस, मला ही माझ्या भावाची आठवण आली.आणि माझ्या लग्नाच्या वेळचा प्रसंग आठवला. :( खुप आठवण आली भावाची.

दशानन 25/01/2009 - 12:07
>>खुप छान लिहील आहेस हेच म्हणतो ! सुंदर ! कालच वाचला होता... प्रतिसाद देणे विसरलो होतो ;) ह्यामुळेच माझी तायडी मला बावळट म्हणते... काही ही विसरु शकतो मी ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

शुभान्गी 25/01/2009 - 12:21
शितल.. खूप छान लिहिले आहेस. मी व माझा भाऊ आम्ही आजी कडे रहायचो... भाऊ बॅन्केत लागला होता व मी शिकत होते... एखाद्या दिवशी मन उदास असतान्ना त्याचा जो मायेने डोक्यावरुन मायेचा हात फिरायचा तो हात आता कधीच नाही फिरणार......मन उदास झाले आहे...... तुमच्या लेखाने परत काहि प्रसन्गाना उजाळा मिळाला.......

प्रमोद देव 25/01/2009 - 12:39
मला एकच मुलगी आहे आणि तिला स्वतःला भाऊ-बहीण नाही हे तिला खूपच सुखदायक वाटते. आता ती वयानेही मोठी आहे पण तिचे लहानपणापसूनचे ते मत अजूनही कायम आहे. कारण...सगळ्याच गोष्टींवर तिचा अनिर्बंध अधिकार आहे. तिला कोणाचीही स्पर्धा नाही. इतर भावा-बहिणींची भांडणे-वाद पाहून तर ती नेहमीच आपल्याला भावंडं नाही ह्याबद्दल खूश असते. आता बोला! शीतल लेख मस्त आहे. तुम्हा भावा-बहिणीचे प्रेम पाहून अंमळ हळवा झालो.

मोठी बहिण असणे हे एक वेगळेच सुख. माझी बहिण माझ्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. शाळेतुन तक्रार आली आणि ''पालकांना' घेऊन ये' अशी तंबी मिळाली की मी ताईला (आधीच दम भरुन) घेउन जायचो. शिक्षकांसमोर मला खोटं खोटं रागवायचं आणि घरी प्रकार कळू द्यायचा नाही. हे कर्तव्य ती बंधूप्रेमापोटी करायची . मला तो माझा हक्कच वाटायचा. एकुलती एक बहिण. सासरी निघाली, धो धो रडलो. आजही तिच्याशी तात्विक वादविवाद होतो. पण मी जास्त ताणून धरत नाही. ती मोठी आहे. माघार घेतो. हे सुख माझ्या मुलाला नाही देऊ शकलो. (आता वेळ निघून गेली) असो.
डॊ. अंजली, आमची फॆमिली फिजिशिअन, अंजली माझी अल्पावधीतचच माझी चांगली मैत्रीण बनली. पुण्यात असताना दरमहिना मी तिच्याकडे खास अर्धातास वेळ काढुन गप्पा मारायला जायचे. बरे असो वा नसो पण दर महिना माझी तिच्या दवाखाण्याची फेरी मात्र मैत्री खातर तरी होत असे. एके दिवशी अशाच गप्पा रंगल्या, ती दुस-यांदा गर्भवती असल्याची गुड न्युज तीने दिली, पण तिने त्यामागचे कारण सांगितल्यावर मला हलकासा मानसिक धक्का बसला.

!! चांडाळ चौकडी !!

अनिल हटेला ·

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

छायाचित्र टीका

गणा मास्तर ·

सूर्य 21/12/2008 - 05:52
छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;) - सूर्य

मदनबाण 21/12/2008 - 08:51
उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सूर्य 21/12/2008 - 05:52
छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;) - सूर्य

मदनबाण 21/12/2008 - 08:51
उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.