यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८
विवाह ,पत्रिका आणि वास्तव... [पुढे चालू]
आजचा 'सिलिकॉन व्हॅली` वर्गही पत्रिका न बघण्याची 'रिस्क` सहसा घेत नाहीत. त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बुद्धीवादी ना! बसलाय आता बोंबलत. तो जाडया माहीतीये का? अरे त्याने गोऱ्या कातडीवर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. 'मित्राच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. मित्राने दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. तरी बायको सांगत होती एका जर माझं! आणि काय सांगू! ऐन लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाचा सख्खा भाउ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.`
ज्योतिषानं सांगितलं होतं 'मुलीचं कॅरॅक्टर नीट बघा.` चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं ऑफिसातल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं. 'मुलगा दिसायला, वागायला स्मार्ट, उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सचं निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरण आपल्या कानावर पडत असतात. ती खोटीच असतात असे नाही. अयशस्वी वैवाहिक जीवनाच वाढलेले प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. मग ज्योतिष जे मनाला आधार देतं ते तुमची तर्कबुद्धी वा विज्ञान देत नाही.
'आज एकवीसाव्या शतकातल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात माणूस वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. रोज नवनवीन शोध लागताहेत. या पार्श्वभूमीवर ज्योतिषांकडे लग्न जुळतय का? असे विचारयला येणारा तरूण वर्ग बराच कमी झाला असेल नाही? शिवाय तरूणांमघ्ये आता प्रेमविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे.` असे जेव्हा एका ज्योतिषाला विचारले तेव्हा तो म्हणाला, '' छे! अहो हल्ली घटस्फोट मिळेल का ? असे विचारायला येणारा वर्ग वाढलयं. विदेशात स्थायिक झालेले लोक जेव्हा भारतात लग्न करण्यासाठी येतात तेव्हा पत्रिका जरूर बघतात. तिकडं विवाहसंस्थेचा अगदी बोऱ्या वाजलायं ना! ``
पत्रिका ही काय फक्त उच्चभ्रू ब्राम्हण समाजाची मक्तेदारी राहिलेली नाही. बहुजन समाजातसुद्धा आम्ही काही आता मागासलेले राहिलो नाही हे दाखवण्यासाठी पत्रिका बघितली जाते. किंबहुना त्या विषयी आग्रही भूमिका घेतली जाते. एक वधूपिता त्याबाबत म्हणतो, '' अहो एकवेळ ब्राम्हण समाजात पत्रिका न पहाणे, हुंडा न घेणं, साधेपणाने रजिस्टर विवाह हे प्रमाण वाढत चालले आहे पण आमचे कडे मात्र पत्रिकेचे प्रस्थ वाढत चाललयं. मुलींच शिक्षण आता वाढत चाललयं. त्यामुळे अधिक शिकलेल्या मुलाच स्थळं मिळणं अवघडं. त्यातून पत्रिका जुळण्याचा आग्रह! त्यामुळे लग्न जुळवणं म्हणजे दिव्यचं होउन बसलंय!``
प्रेमविवाहांची संख्या जशी वाढली तशी घटस्फोटांचीही संख्या वाढलीयं. केवळ शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेले प्रेम हे अल्पजीवी ठरतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. त्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम ज्यात मुलगा मुलगीचा थोडयाफार प्रश्नोत्तराचा अंतर्भाव. यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसही 'माणूस` ओळखणे हे अवघड काम. एकमेकाच्या सहवासात राहूनही परस्परांची खऱ्या अर्थान ओळख नसलेली माणसं जगताना दिसतात. तिथं आपल्याला आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपतं योग्य आहे? परिचयोत्तर विवाह ही संकल्पना त्याला चांगला पर्याय होवू शकतो. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा संकल्पनेतून होणारा विवाह हा जुगार होण्याची शक्यता कमी. पण मैत्री व विवाह ही गोष्ट वेगळी. कारण विवाह ही व्यावहारीक गोष्ट आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा या महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या त्याग-त्याग स्पर्धा व्यवहारात कुचकामी ठरतात असे लक्षात आल्यावर ते विवाह साहजिकच अयशस्वी ठरतात. त्यामुळेच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. एका मुलीन सांगितल की आम्ही आपली नॉमिनल पत्रिका बघितली होती. आता लग्नानंतर आठनउ महिन्यांनी नवऱ्याला एका ज्योतिषाने सांगितले की तुमची पत्रिका जुळत नाही. आता तो घटस्फोट मागतोय. घटस्फोटाच्या शेवटच्या टप्प्यात केस होती. ज्योतिषाला आपल सहज विचारायला गेलो तर त्याने सांगितलं की घटस्फोटाचा योग नाही. आणि काय सांगू महाराजा! केस फिरली. दोघे परत एकत्र आले. अजून त्यांच्या कुरबुरी चालू आहे हा भाग वेगळा. पण भविष्य खरं आले. मनाने विभक्त झालेले परंतु केवळ औपचारिकता म्हणून घटस्फोट घेता न एकत्र रहाणारे पतिपत्नी समाजात दिसतात.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कै. वि. म. दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित युगुलांच्या कुंडल्या संगणकाच्या मदतीने अभ्यासल्या. या अभ्यासात त्यांना फलज्योतिषीय नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळले नाही. ज्या समंजस वाटणा या ज्योतिषाच्या मदतीने त्यांनी हा अभ्यास केला त्यालाही ही गोष्ट कबूल करावी लागली. यावरून हे लक्षात येईल की फलज्योतिष म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे अशा त हेच्या नियमांचा व ठोकताळ्यांचा एक संग्रह आहे. त्यांचा अनुभव येणे न येणे ही योगायोगाची बाब आहे.
वाचने
6425
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
उत्तम
आवडला
हे महत्वाचे
In reply to आवडला by सहज
लेख आवडला
परिचयोत्तर विवाह
एक विनंती....
चिंधड्या...
दुर्गुंण जुळवणे
In reply to चिंधड्या... by प्रभाकर पेठकर
मार्गदर्श