वामनसुत खरच मस्त लिहित आहात तुम्ही आजपासुन आपण तुमचे फ्यान
खरच मस्त
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
मला वाटते आतापर्यंतच्या लिखाणाचा काळ हा सुमारे १९३०-४० च्या दरम्यानचा असावा. तसे पाहिले तर ह्या जीवनचित्रणात अद्यापतरी काहीही नाट्यमय अथवा डोळे दिपवणारे झालेले नाही. पण तरीही ह्या लेखमालिकेचे महत्व लक्षणीय ह्यासाठी आहे, की एक भूतकाळात गेलेला कालखंड तिच्यात शब्दचित्रीत होत आहे. कोंकणातील तत्कालिन मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एका सर्वसामान्य पण सुजाण व्यक्तिची ही जीवनकहाणी रोचक आहे. जे काही घडले ते तसेच्या तसे सांगितले जात आहे. त्यात कसलाही अभिनिवेष नाही. तसेच हे अचूक व मोजक्या शब्दात बंदिस्त करून आमच्यासमोर आणल्याबद्दल लेखनिका(के)चेही ॠण मान्य केले पाहिजे.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.
हेच म्हणतो. लेखन अतिशय दर्जेदार वाटले. काळ तीसच्या दशकातला अंदाजसुद्धा मला बरोबर वाटतो आहे.
शब्दयोजना , शैली याबाबत प्रदीप यांच्याशी सहमत आहे. मात्र या व्यतिरिक्त मला जाणवलेली एक गोष्ट : त्यात दिसणारी एक प्रकारची स्टॉईक वृत्ती. (मराठीतल्या "निर्विकारपणा" या शब्दाला काहीशा उद्धटपणाची छटा आहे ; जी मला इथे अभिप्रेत नाही. ) लेखनातले अनेक संदर्भ जिव्हाळ्याच्या व्यक्तींबद्दलचे आहेत. (उदा. दिवंगत वडील.) , वर्णिलेले प्रसंग एकूण आयुष्याला नवनवी वळणे देणारे (वाकेडला यावे लागणे , घरच्या आठवणीपाई वर्ष वाया जाणे) . आणि हा काळ लेखकाच्या बालपणीचा अगदी धामधुमीचा आहे - अनपेक्षित घटनांमुळे अचानक आयुष्याचा सांधा बदलणे.
मात्र हे सगळे वर्णिताना लेखन कुठेही भावनाविवश झालेले दिसत नाही. पोरकेपणापायी झालेल्या दु:खाबरोबर आणि एकूण आर्थिक संकटाबरोबर सामाजिक कलंकही आलेला असणे , त्यापायी महिना-महिना बाहेर पडायला लाज वाटणे हा भाग मला फार वेदनादायक वाटला. मात्र लेखात एकही उद्गारचिन्हही या पायी (किंवा कुठल्याही गोष्टीपायी) येत नाही.
माझ्यामते या शैलीचा परिणाम जास्त खोलवर होतो. "हा काळ असा होता; जगताना माणसे असे जगत असत; अनपेक्षितपणे घरातली वडिलधारी माणसे देवाघरी निघून जात; नंतर आयुष्य बदलत असे" अशी ही त्या काळची बखर वाटते.
तर हा निर्विकारपणा काळाचे पाणी वर्षानुवर्षे वाहिल्यामुळे येत असेल काय ? की हे सगळे व्यक्तीसापेक्ष आहे ? आज या काळाबद्दल इतके वस्तुनिष्ठपणे कसे पहाता येत असेल ?असे प्रश्न हे सगळे वाचताना पडत राहिले.
काका!!!
लिखाण सुंदरच आहे. तुम्ही पुढचे भाग पटापट टाकत आहात. त्यामुळे संगति नीट लागून वाचायला अजून मजा येत आहे. मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या लिखाणात जुने शब्द वस्तुवाचक म्हणून तर येतातच (बोरू, पुस्ती वगैरे) पण तुमची वाक्यरचना वगैरे पण जुन्या भाषेची आठवण करून देते. (जात असू, करत असू वगैरे). एका वेगळ्याच दुनियेत नेता.
अजून एक जाणवलेले असे - तुमचा हा प्रवास पूर्णपणे सुखकर तर नक्कीच झाला नसणार. घरची काही फार श्रीमंती नसावी, खाऊन पिऊन सुखी असाल, त्यातच वडिल गेले. त्या काळात घरातले पुरुष माणूस गेले तर काय काय परिणाम होत असत त्याची कल्पना आहे. शिवाय तुम्हाला त्या लहान वयात वडिल गेले त्याचे जे काही वाटले असेल ते निराळेच. पण आत्ता तुम्ही इथे हे सगळे मांडताना कुठेही थोडाही कडवटपणा अथवा तत्सम भावनेची छटा पण येऊ दिली नाहीत.
मजा येत आहे वाचायला. वरती प्रदीप म्हणतात तसे, कुठलेही नाट्यमय प्रसंग अथवा भव्य दिव्य असे न मांडता सुद्धा, वाचकाला खिळवून ठेवत आहात. ताकद आहे ही. असेच लिहित रहा. तुमचे वेगवेगळे अनुभव मांडत रहा, आमचे अनुभव विश्व (आम्ही ते अनुभव न घेताही) समृद्ध करत रहा.
बिपिन कार्यकर्ते
मला जे म्हणायचं होतं त्यासाठी योग्य शब्द सुचत नव्हते. बिपिनने ते काम केलंय. तुम्ही छानच लिहित आहात, वाचताना डोळ्यांसमोर चित्रं उभं रहातं.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लिखाण सुंदरच आहे. तुम्ही पुढचे भाग पटापट टाकत आहात. त्यामुळे संगति नीट लागून वाचायला अजून मजा येत आहे. मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या लिखाणात जुने शब्द वस्तुवाचक म्हणून तर येतातच (बोरू, पुस्ती वगैरे) पण तुमची वाक्यरचना वगैरे पण जुन्या भाषेची आठवण करून देते. (जात असू, करत असू वगैरे). एका वेगळ्याच दुनियेत नेता.
हेच म्हणतो. प्रामुख्याने दुसरे वाक्य महत्त्वाचे.
नारायणराव, आपण इथल्या सगळ्यांची मनं अल्पावधीत जिंकलीत.
आपले लेखन अगदी सहजसुंदर आहे.
आपल्या आठवणींचा काल पाहता आपण माझ्या आधीच्या पिढीतले असाल असे वाटतेय.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
बालपण देगा देवा म्हणतात ते खरेच आहे.... ओघवते लेखन. विलक्षण आवडले. गावात घालविलेले बालपण आठवले. गावाकडची माती, माणसे किती निर्भेळ आणि प्रेमळ असता ना! आताच्या सिमेंटच्या जंगलात गावाकडचा अस्सलपणा हरवत चाललाय, याचे वाईट वाटते.
वामनसुत. . . खुप छान. कधी कधी काही वाचले की काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडतो. वाचल्यानंतर एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखे वाटते.
खुप छान. अजुन येउद्या. .
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
आपणा सर्वांना प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
व्यंकोबा, खरडवही पाहिली परंतु आपणास व इतरांसही प्रतिसाद देण्यास गेलो असता You are not allowed to post in this guestbook. असे दिसते. इंटरनेटचे माझे ज्ञान स्वल्प आहे. याबाबत कोणी मदत करु शकेल तर बरे होईल.
असो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
ह्म्म.. वामराव वाचतोय बरं .... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
प्रतिक्रिया
छान
वाचत आहे
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहि लेख छान
सुंदर लिखाण
+१
जोरात चालु आहे लिखान
सुरेख
काका!!!
मला जे
हेच म्हणतो
मस्त.
वा!
छान
मी हेच लिहीणार होते
सहमत
विलक्षण आवडले
फारच सुंदर
मस्त.
सुंदर . .
लेख वाचुन
स्मृतींचा
फार
धन्यवाद.
ह्म्म..
४