टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.
आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया.. मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. 
आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.
पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,
इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.
केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.
शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.
खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.
हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.
मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.
धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.
अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.
घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.
मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.
याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.
अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.
be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)
समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.
एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.
चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.
दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.
यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.
अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.
अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.
अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.
बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


फिल्मी चक्कर
एकदम फिल्मी चक्कर है यार तुम!! अपना आदमी लगता है.
"वन लायनर" वरून आठवले C.S.I. Miami मालीकेत हिरो होरेशियो केन (David Caruso)असेच एकदम स्टाइल मधे पोझ घेऊन डायलॉग टाकतो. त्याचे जिम कॅरीने मस्त विडंबन केले आहे.
फिल्मी चक्करच
अहो, मी आहेच तसा फिल्मी चक्कर....
तरी सध्या कमी झाले आहे. वेळ नाही मिळत हो तेवढा
मस्त! :)
देवदत्तराव,
मस्त! पुढील वाक्यांची वाट पाहात आहे...
शोले चित्रपटातील जवळजवळ सर्वच वाक्यं लोकांच्या लक्षात आहेत हेच त्या सिनेमाचं मोठेपण!
"तेरा क्या होगा कालिया?", "कितने आदमी थे?" वगैरे वगैरे!
दिवार चित्रपटातील निरुपा रॉय आजारी असताना शंकराच्या देवळात आयुष्यात प्रथमच जाऊन म्हटलेला "आज खुश तो बहोत होगे तुम...!", हा बच्चन साहेबांचा धीरगंभीर संवाद आजही लक्षात आहे!
मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. त्याच्या खरखरीत आवाजातले, "हमसे मिटा सके वो जमानेमे दम नही....." यासारखे संवाद ऐकायला खूप मजा येते!
तात्या.
आहेत थोडी अजून
तात्या,
आहेत थोडीफार वाक्ये अजून.. सध्या तरी जी लगेच लक्षात आहेत/किंवा पटकन मनात येतात ती लिहिलीत. आणि ती वाक्ये जी सर्वांना तोंडपाठ नसतील अशी निवडली.
बाकी वाक्ये जशी आठवतील तसे लिहित जाईन.
बाकी तुम्ही ही येऊ द्यात हो.
आम्हाला एकच वाक्य सतत आठवते.
काबाडकष्ट करणारी 'मा' किंवा श्रिमंत कुटुंबातील 'मा' आपल्या लाडक्या किंवा बिघडलेल्या मुलाला " देखो, मैने मेरे प्यारे हाथोसे तुम्हे गाजर का हलवा बनाया है. हे वाक्य नसले तर चित्रपटात काही तरी राहिले आहे, असे वाटायचे
बच्चा
बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! इती. नाना पाटेकर
मस्त
"गोगोजी, आपका घागरा" किंवा "हजारो मुर्गियां, उनके करोडो अंडे... xxx का राजा, xxx का बादशाह... हमारा बजाज" सारखी अंदाज अपना अपना मधली काही वाक्यंही अशीच.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
माझी फिल्लमबाजी
आपल्या लेखावरून शिरिष कणेकरांच्या 'माझी फिलमबाजी'ची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे खालील वाक्येही प्रसिद्ध आहेत.
"आज मै तुम्हारे सामने एक बाप कि हैसियत से नहीं बल्कि एक पुलीस अफिसर की हैसियत से खडा हूँ ।"
"बेटा जल्दीसे हाथ मुँह धो लो, मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है" (असं कधी म्हणत नाहीत की आज माँ ने तुम्हारे लिये दडपे पोहे किए हैं !)
"मै माँ बननेवाली हूँ/तुम बाप बननेवाले हो/हम दोनों के घर में एक नन्हासा मेहमान आनेवाला है" (ही वाक्ये 'ती' 'त्या'च्या शर्टाच्या बटणांशी चाळा करत बोलते)
"बेटा सेहत के लिये तुम स्विट्झरलँड चले जाओ" (बाप मुलाला म्हणतो) (एकदम स्वित्झरलँड!)
"ये तुम्हारे पिता की आखरी निशानी है"
जिज्ञासूंनी ही वाक्ये कशातली आहेत हे आठवून पहावे.
पुष्कराक्ष
लोकहो !!
लोकहो !!
हिंदी चित्रपट आम्ही पहात नाही, त्यामुळे या विषयावर काही बोलणे शक्य नाही.
आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो.
पण तो "शब्देविण संवादु" असल्यामुळे, शब्दातीत असतो. त्याची केवळ अनुभूती घ्यायची असते.
आपला,
(आंबटशौकीन) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
आम्ही फक्त
आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो.
धोंडोपंत,
काय फक्त बिपाशा आणि मल्लिका? तुमचे अनुभवविश्व असे मर्यादीत ठेवू नका!!!!!!
(अमर्यादीत) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
धर्मेंद्र...
धर्मेंद्रच्या जवळपास सर्वच चित्रपटात असलेले वाक्य - कुत्ते कमिने...मैं तेरा खून पी जाऊंगा...
मेला
हे वाक्य मेला ह्या बटबटीत सिनेमात वस्ताद आमिर खान यांच्या तोंडीसुद्धा आहे.
अभिजित
आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.
ते तर आहे....
ते तर आहेच हो.
त्यामुळेच बहुधा तहलका सिनेमात धर्मेंद्रला रागाने साले बोलताना पाहून काहीतरी वेगळेच (की विचित्र?) वाटले होते.
जाने भी दो यारो !
या सिनेमातील "थोडा खावो, थोडा फेको" पण मस्तच आहे !
देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ?
धन्य !
- सर्किट
:)
जाने भी दो यारो.. आधीच म्हणाल्याप्रमाणे मस्त वाटतो हा चित्रपट. त्या बंगल्यातील हा केकचा सीन व नंतरचा त्यांचा फोनचे दॄष्य , फोनची अदलाबदल पाहून खूप मजा येते.
देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ?
अहो, काही वाक्ये सिनेमा बघताना धुंदीतच लक्षात राहतात.
आणि भरपूर चित्रपटांची (उदा. दिलवाले दुल्हनिया..., कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना वगैरे वगैरेंची) तर पारायणेच केली होती. आता काही काही संवाद नीट आठवत नसले, तरी चित्रपट पाहताना एकूण एक संवाद बोलल्या जाईल अजूनही.