सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
लेखनप्रकार
आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.
आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया.. मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)
आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.
पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,
इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.
केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.
शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.
खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.
हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.
मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.
धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.
अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.
घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.
मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.
याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.
अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.
be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)
समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.
एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.
चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.
दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.
यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.
अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.
अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.
अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.
बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.
वाचने
49571
वाचनखूण
प्रतिक्रिया
93
फिल्मी चक्कर
In reply to फिल्मी चक्कर by सहज
फिल्मी चक्करच
मस्त! :)
In reply to मस्त! :) by विसोबा खेचर
आहेत थोडी अजून
In reply to मस्त! :) by विसोबा खेचर
>>मला
आम्हाला एकच वाक्य सतत आठवते.
बच्चा
मस्त
In reply to मस्त by नंदन
+१
माझी फिल्लमबाजी
लोकहो !!
In reply to लोकहो !! by धोंडोपंत
आम्ही फक्त
धर्मेंद्र...
In reply to धर्मेंद्र... by सुनील
मेला
In reply to धर्मेंद्र... by सुनील
ते तर आहे....
जाने भी दो यारो !
In reply to जाने भी दो यारो ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
:)
In reply to :) by देवदत्त
जाने भी दो यारो..
गाइड
अपने सर के
बनवाबनवी
In reply to बनवाबनवी by सातारकर
सचिन नाही,
मराठीतही.......
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये:
नाहि
जन्नत.......
सरकारनामा मधे
तुम्हारा
१. खुदा के लिए बंद करो ये सब..
गाइड
श्री १००८ रजनीअण्णा
देवदासचा एक
मै
दिल चाहता है
गुंडा
अग्निपथ
.
In reply to . by सँडी
हा संवाद
अजुन ३-४
सोल्जर
कभी हा कभी
.
:)
In reply to :) by राघव
आणखी दोन..
ब्लॅक हॉक
आनन्द
मनोजकुमार
पडोसन...
.
तुम्हारी
तुम्हारी
तुम्हारी
ये क्या हो
करन-अर्जुन :)
सत्या...
पेग थ्री
रजेश
आनन्द मधील
१९४२ अ
हंगामा
इन आसुओंको अब कोई दीवार रोक नही सकती
मै वोह आदमी हूं जो शिशेसे
ये शादी नही होगी....
In reply to ये शादी नही होगी.... by चित्रगुप्त
ये शादी नही होगी....
१.मैं तेजा हूं क्योंकी मेरा
इश्क विश्क चित्रपटात (शाहीद
कुछ भी करनेका लेकीन जयकांत
In reply to कुछ भी करनेका लेकीन जयकांत by आशु जोग
इगो नै हर्ट करनेका :)
उचलायचं स्वत:ला
या मारुति कांबळेचं काय झालं
अजून काही
अरे कमीने से याद आया तेरा बाप
भगवान मुझे उठा ले. कहा मुह
In reply to भगवान मुझे उठा ले. कहा मुह by अविनाशकुलकर्णी
लै भारी.
अजून काही जनरल
In reply to अजून काही जनरल by यकु
...जो सवाल आपसे पूछा जाय,
In reply to ...जो सवाल आपसे पूछा जाय, by गवि
सगळेच भारी!! पण ..जज्जसाब वो
आणखी
हेराफेरी
गुझारीश
नहीSSSSSSSSSSSSSSSSSSS (दोन्ह
In reply to नहीSSSSSSSSSSSSSSSSSSS (दोन्ह by प्यारे१
वक्राकार जिन्यावरुन
मै आपके पास बडी आस लेके आई
डॅम इट, आता दाखवतोच बघ तुला
In reply to डॅम इट, आता दाखवतोच बघ तुला by आशु जोग
आयडीयाची कल्पना..
यांचे तर ताडनच केले पाहिजे -
अरे शाम, पायाला माती लागू
जो चौका उडते हूए जाए उसे
In reply to जो चौका उडते हूए जाए उसे by आत्मशून्य
देल्ली बेलीजमधे स्वतः अमीरखान
In reply to देल्ली बेलीजमधे स्वतः अमीरखान by गवि
:)