परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.)
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्यांत विष्णुभट हेही एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
वाचने
142547
प्रतिक्रिया
233
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ! छान आहे लेख. आवडला.
जबरदस्त!
लेख आवडला
५०० झाल्यावर येतो.
मंत्र, त्यांचं सामर्थ्य,
हम्म
ज्योतीषहि ,वास्तुशास्त्रहि
वास्तूशास्त्र
In reply to ज्योतीषहि ,वास्तुशास्त्रहि by दिवाकर कुलकर्णी
इतकच होतं तर ?
In reply to वास्तूशास्त्र by याॅर्कर
सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.बस्स इतकचं मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?दुकानदारी
In reply to इतकच होतं तर ? by मारवा
खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार
खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार
In reply to खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार by जयन्त बा शिम्पि
हॅहॅहॅ !!
लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण
+१
In reply to लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण by प्रचेतस
+१
In reply to लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण by प्रचेतस
समाजसुधारणा ही हळूहळू घडवून आणावी लागते.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
In reply to समाजसुधारणा ही हळूहळू घडवून आणावी लागते. by नितीनचंद्र
वर्गणी जमा करावी
प्रश्न विचारावा
लहान मुलांना घोळात घेउन जर
झकास लेख. हल्ली काही
@भैसत्री मंत्र का जाप करना है
In reply to झकास लेख. हल्ली काही by चित्रगुप्त
भैसत्री???
In reply to झकास लेख. हल्ली काही by चित्रगुप्त
हाहाहा
भैसत्री भारीच
यनावाला लेख पाडणार...
आपली तलवार म्यान. बाटगा
In reply to यनावाला लेख पाडणार... by मांत्रिक
याला म्हणतात खरा मार भी पड
In reply to आपली तलवार म्यान. बाटगा by आनन्दा
समाजसुधारणा हळुहळु घडवुन आणावी लागते
लोकशाही व्यवस्था असल्यामुळे
In reply to समाजसुधारणा हळुहळु घडवुन आणावी लागते by मारवा
हुकुमशाही संदर्भातील विवेचन मार्मिक
In reply to लोकशाही व्यवस्था असल्यामुळे by बोका-ए-आझम
थोडे घाई करणारे लोक बी
In reply to समाजसुधारणा हळुहळु घडवुन आणावी लागते by मारवा
पण घाटपांडे काका,
In reply to थोडे घाई करणारे लोक बी by प्रकाश घाटपांडे
मंत्रा संबधीची कायदेशीर तरतुद
धन्यवाद!
अलेच्चा तुम्ही तेच आहात होय?
In reply to धन्यवाद! by यनावाला
याला म्हणतात...
मार्मिक वाक्य
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.हे मंत्र कोणी ऐकलेत का?
मग असं करा!
In reply to हे मंत्र कोणी ऐकलेत का? by गामा पैलवान
ये हुई ना बात !
In reply to मग असं करा! by साती
+१११
In reply to ये हुई ना बात ! by गामा पैलवान
अनुमोदन
In reply to +१११ by मांत्रिक
?
In reply to अनुमोदन by प्रसाद गोडबोले
व्यक्तिगत होतंय ना हे ?
In reply to अनुमोदन by प्रसाद गोडबोले
धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी
In reply to व्यक्तिगत होतंय ना हे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद उत्तम प्रगोसाहेब.
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
संपूर्ण प्रतिसादात मंत्रात
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
माफ करा
In reply to संपूर्ण प्रतिसादात मंत्रात by बाळ सप्रे
- त्या हयात वरीष्ठांना वाईट वाटेल म्हणून केले नाही.
- ती आमची संस्क्रूती नाही (या धाग्यावरचा अगदी समर्पक प्रतीसाद घाटपांडे सरांनी दिला आहे, धन्य्वाद सर)
- आम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.
असली तथ्यहीन आणि पळवाटीची कारणे देऊ नयेत. तुमच्या घरातील जेष्ठांच्या जितक्या भावना छायाचित्रांमध्ये आहेत नि तितक्याच ईथल्या पापभीरू लोकांच्या आहेत आणि माझ्यासकट कुणीही प्रतीसादक आंधळा नाही(तापात डॉक्टरकडे जायचे सोडून अंगारे धुपारे करीत बसत नाही. झुंडशाही असह्य झाली म्हणून टंकले अन्यथा मी अश्या धाग्यांपासून दूर राहतो.हा आयाडी शंकराचार्यांवर
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
प्रगो नाय पटलं. :)
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
प्रा. डॉ., नाय पटलं :)
In reply to प्रगो नाय पटलं. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा सुंदर उदाहरण..
In reply to मग असं करा! by साती
प्रतिसाद आवडला.
In reply to मग असं करा! by साती
जगाच्या चार कोपर्यांत चौघांना
In reply to मग असं करा! by साती
हा लेख वाचताना ' घनदाट
चांगला लेख!
+१
धन्यवाद!
In reply to +१ by मारवा
गण गण गणात बोते या मंत्रात
घाटपांडे- मग काय केस ठोकायची का ?
गुढी पाडवा २०११ ला अपघात होऊन माझापाय मोडला.
In reply to घाटपांडे- मग काय केस ठोकायची का ? by गॅरी शोमन
व्वा !!
In reply to गुढी पाडवा २०११ ला अपघात होऊन माझापाय मोडला. by मोगा
ॐ चे नक्की माहित नाही. परंतु
हन्त हन्त
In reply to ॐ चे नक्की माहित नाही. परंतु by श्रीगुरुजी
अगदी अग्दी
In reply to ॐ चे नक्की माहित नाही. परंतु by श्रीगुरुजी
+१ श्रीगुरुजी
दादा नाय. मोगा आले.
In reply to +१ श्रीगुरुजी by बाप्पू
विचित्र विश्व आणि आपण