बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?

हाडक्या's picture
हाडक्या in काथ्याकूट
13 Aug 2015 - 4:07 am
गाभा: 

साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्‍हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?

या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.

प्रतिक्रिया

"1,000 people, mostly Muslims, were killed in clashes after 60 Hindu pilgrims died in a fire on a train."
पाहिलंत? मुस्लिमांसाठी "killed" शब्द वापरला. हिंदूंसाठी मात्र "died". जणू काही हिंदू आपोआप मेले.

माहितगार's picture

13 Aug 2015 - 11:16 am | माहितगार

ह्यांचे बोलविते धनी नक्कीच कोणीतरी असले पाहिजेत

बीबीसीने लेखिकेकडून लेख आधीच काही महिन्यांपुर्वीच बनवून घेतला असेल, आणि बीबीसी संपादकात बसलेल्या एखाद्या भारत द्वेष्ट्याने किंवा करप्ट संपादकाने १५ ऑगस्ट जवळ येते आहे तसे भारतात अशांतता पसरावी म्हणून वेळ पाहून लेख छापला असेल का अशी शंका वाटते आहे.

मंदार कात्रे's picture

13 Aug 2015 - 8:31 am | मंदार कात्रे

भारतीय पत्रकार आणि मीडिया हरामखोर XXXXX XXX XXXXXXXXXXXX XXXXX आहे .यांना सर्वांना एका बोटीत बसवून बोट बुडवा खोल समुद्रात ...... देश जरा शांत होईल

मीडिया म्हणजे उपयोग शून्य आणि उपद्रव जास्त असे झालेय आजकाल

अत्रुप्त आत्मा's picture

13 Aug 2015 - 8:55 am | अत्रुप्त आत्मा

सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात. त्यांना मुद्देसुद प्रतिवाद करुनच उघड पाडावं लागतं. यानी देखिल ते बंद होत नाहित,लोकांचा बुद्धिभ्रम थांबतो.

माहितगार's picture

13 Aug 2015 - 10:04 am | माहितगार

+१

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 1:38 pm | प्रसाद गोडबोले

सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात.

>>>

हे भारी आहे . काहीही झाले तरी मुळ कारण सनातनी हिंदुच !
बीसीसी मधील लोकांनी टीका केली तर सनातनी हिंदुंच्या वर्तणुकी मुळे ! चुकला घाव ऐरणीच्या माथां !
हे सारे मनुस्मृती मुळे होत असेल नै !!

साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता.

बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे.

मिपाकरांनी माझा एक धागा फाट्यावर मारला होता परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा. फाट्यावर मारलेल्या आपल्याच धाग्यातील परिच्छेद उधृत करणे वाचकांना किती पटेल माहित नाही. पण तरीही ते उधृत करण्याचा मोह होतोच आहे.

"आपण वर्तमानातील घरगूती वातावरणाकडून आपण जेव्हा वर्तमानातील आंतरराष्ट्रीय संबंधांकडे येतो तेव्हा त्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले असू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले परकीय पाहुणे लोक जेव्हा कौतुक अथवा टिका करतात तेव्हा खरेतर लगेच खरी न मानून हुरळून न जाता अथवा नाराज न होता; त्या गोष्टी चिमूटभर मीठा सोबत घेऊन तपासून पहावयास हव्यात. पण प्रत्यक्षात वर्तमान भारतात याच भान सर्वसामान्य भारतीयांनाच नव्हे तर भारतीय विश्लेषकांना आणि नेत्यांनाही असतं का याचा प्रश्न मनात उपस्थित होतो."

देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का

खरेतर सध्या कोणतीही विशेष परिस्थीती नसताना एकांगी भडकाऊ लेखन करणे/ आणि छापणे हा पिवळ्या पत्रकारीतेचाच भाग म्हणावयास हवा. अर्थात दुसर्‍या बाजूस आपल्या वाचाळ वीरतेचे आणि वागण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात अथवा दहशतवादी तयार करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने उपयोग आपली शत्रुराष्ट्रे करू शकतात याचे भान बर्‍याच वाचाळ वीरांना नसते. त्या संबंधीही मागे मी एक धागा काढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाते. या संबंधाने मी मिपावर भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा या विषयावर धागा ऑक्टोबर २०१४ ला धागा काढला एक उदाहरण म्हणून पहावयाचे झाल्यास ऑक्टोबर २०१४ पासून रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात जवळपास ७०-७५ संपादने झाली असतील त्याच कालावधीत रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात २-३ संपादने झाली. आपल्या देशाची चुकीची प्रतीमा रंगवली जाते आहे याचे भान बहुसंख्य भारतीयांना नसते. ते सुद्धा रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात पडीक राहतील पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात लेखन करणे आम्हा भारतीयांना जड जाते.

मिपावरील अशा धाग्यातून आम्ही त्रागा करू पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया लेखात जाऊन देशाची सकारात्मक असलेली बाजू बद्दल संदर्भासहीत दोन शब्द लिहिण्यास वेळ काढणार नाही तर अशावेळी जेवढा दोष चुकीच्या पत्रकारीतेकडे जातो तेव्ह्ढाच प्रतिमा सकारात्म्क कशी राहील या साठी तसूभरही काही न करणार्‍या तुम्हा आम्हा कडे येत नाही का ? असा एक प्रश्न पडतो.

लास्ट बट नॉट लीस्ट समुहा दरम्यान मनोमीलनास संधी आणि परस्पर विश्वासा निर्मितीवर भर या बद्दल आपल्या देशातील सिस्टीम मजबूत असेल तर पिवळी पत्रकारीता असो किंवा शत्रुराष्ट्रांचे आराखडे ढासळून पडण्यास वेळ लागणार नाही, पण या साठी जरूरी इच्छाशक्ती आणि समज आम्हा भारतीयात आहे का ?

माझ्या स्वतःच्याच धाग्यांची अधीकच जाहीरात झाली आहे त्यासाठी क्षमस्व

आनन्दा's picture

13 Aug 2015 - 12:38 pm | आनन्दा

बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे.

म्हणजे "सकाळ"/ मटा पत्रकारिता असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते.. आपल्याकडे सकाळ/ मटा देखील बहुतांश वेळा असेच वागताना दिसतात.

माहितगार's picture

13 Aug 2015 - 2:36 pm | माहितगार

सॉरी इथे परदेशी वृत्तसंस्था म्हणावयाचे होते. गोर्बाचेव्ह येई पर्यंतचा काळ मी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंधीत डिप्लोमसी बाबतची वृत्ते अनेक देशांच्या वृत्तसंस्थांची मुख्यत्वे शॉर्टवेव रेडीओवरून बर्‍यापैकी फॉलोकरत असे.

मिडियावर टिका करण्यात काय अर्थ आहे? आपण असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना. सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.

किसन शिंदे's picture

13 Aug 2015 - 10:23 am | किसन शिंदे

नेमकं बोललात.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 1:41 pm | प्रसाद गोडबोले

अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.

१००% अनुमोदन !

शिवाय अरुंधती रॉय ह्यांचा उल्लेख / संदर्भ असलेले काहीही वाचणे हा वेळेचा अपव्यय आहे !!

हाडक्या's picture

13 Aug 2015 - 2:04 pm | हाडक्या

सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.

गुलाम राव, इथे थोडा सहमत आणि असहमत पण.. म्हणजे असं की अनुल्लेखाने मारणं हे मान्य आणि बहुतांश केसेस मध्ये तेच करतो की. पण इथे बीबीसी ही वृत्तसंस्था आहे तिच्यावर विश्वास ठेवणारे करोडो आहेत जगभर(भारतात देखील खूप सारे आहेतच). अगदी ते म्हणतायत म्हणून "असेल कदाचित" म्हणणारे देखील खूप सारे आहेत. तुम्ही-आम्ही पाठ फिरवली म्हणून हे लपून रहात नाही ना.

असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना.

अजिबात नाही. मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही. शतकी धाग्यापेक्षाही "काय करता येईल? इतर कोणते मुद्दे आहेत आणि चर्चेतून अजून काही मुद्दे समोर आले तर तेही लक्षात घ्यावेत आणि बीबीसीशी पत्रव्यवहार करावा" असा मानस आहे. काही झाले तर ठिकच पण प्रयत्न तर नक्कीच केला जाईल.

(सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि काही करु इच्छित असणारा)

हाडक्याजी, बीबीसीवर विश्वास ठेवणारे करोडो आहेत हे मान्य. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ती एक व्यावसायिक वॄत्तसंस्था आहे आणि त्यांचे कार्यक्रम व लेख हे त्याला कसा प्रतिसाद मिळतो (वाचने/ टिआरपी) यावर अवलंबून असते. इथे या लेखाची लिंक देऊन एकप्रकारे आपण त्याची जाहिरातच करतोय (तसा उद्देश नसला तरीही) आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देतोय.

मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही.

जरी मिसळपावची ताकद मर्यादित असली तरीही एकंदर ब्लॉग्स व सोशल मिडियाची ताकद खुप आहे. भारतात तरी ती बिबीसीपेक्षा जास्तच असावी.

अशा गोष्टींवर चर्चा करुन आपण फक्त द्वेष वाढवतो आणि ध्रुवीकरण करतो. त्यामुळे अशा चर्चा टाळलेल्याच बर्‍या. या लेखावार खाली आलेले विषारी प्रतिसाद पाहिल्यावरतर हे मत जास्तच दृढ झाले आहे.

माहितगार's picture

13 Aug 2015 - 11:12 am | माहितगार

ह्या बीबीसी बातमीची हि अडनीड वेळ का साधली गेली ते लक्षात आले नव्हते. पण या १५ ऑगस्टपर्यंत नरेंद्र मोदी सरकार कडून नागालँडचा प्रश्न धसास लागण्याचे संकेत आहेत त्यास सुरुंग लावण्याच्या दृष्टीने हितसंबंधी वेळ साधत आहेत काय असा प्रश्न पडतो आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 1:59 pm | प्रसाद गोडबोले

भारत हा हिंदुंचाच देश आहे ! फाळणी झाली तेव्हाही मुस्लिम बहुल तो पाकिस्तान आणि उरलेला हिंदुबहुल प्रदेश तो झाली आहे .
राज्यघटनेने बहुसंख्य हिंदुंनी एकमताने स्वतःचे वर्चस्व असुनही देश धर्मनिरपेक्ष ठेवला हे हिंदुंचे मोठ्ठे पण आहे , मुस्लिमबहुल पाकिस्तान किंव्वा बांग्लादेश सेकुलर नाहीत हे लक्षात घ्यावे .
आजही भारतात हिंदु जास्त आहेत म्हणुन धर्मनिरपेक्षता टिकुन आहे हे स्पष्ट आहे , अर्थात ज्या स्पीड ने आयसीस चे वादळ आपल्या कडे सरकत आहे ते पाहुन लवकरच भारत हिंदु बहुल रहाणार नाही हे स्पष्ट आहे तेव्हा पाहु भारत धर्मनिरपेक्ष देश रहातो का ते ! घोडे मैदान लांब नाही मधे एक इराण उभा आहे बस्स , मागल्या वेळी पर्शियाला १०-२० वर्षात झोपवले होते , आता ह्यावेळी किती वर्शे लागतात ते पाहु ! त्या नंतर मग आहेच हा सुर्य आणि हा जयद्रथ !

तेव्हा पाहुयात बीबीसी काय बातमी देते ते !!

भीमराव's picture

13 Aug 2015 - 5:21 pm | भीमराव

?
जैन? बौद्ध? शिख? ह्यांचा देशावर कितपत अधिकार असावा?
ज्या लोकांना मध्ययुगामधल्या धर्म रुढीमुळे नाईलाजास्तव मुस्लीम/ईसाइ बनुन रहावे लागले, त्यांचे आजचे वंशज स्वतःला कट्टर धर्मानुयायी समजतात त्यांना किती % द्यावेत?
एखादा नग हिंदु द्वेष्टा असेल पन स्वतःच्या भारतीयत्वाबद्दल मात्र पराकोटीचा अभिमानी असेल तर या केस ला कोणत्या देशात हाकलायचं? एखादी आदिवासी जमात जर बोलली कि आम्हाला कोणत्याच धर्माच जोखड नको तर त्यांना कुठल्या वाडीच्या टेंपेत बसवायच?

हं युंद्या आता

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 1:05 pm | खटपट्या

भारत हा हींदूंचा देश आहे - असत्य.

क्रुपया पटवून द्या की भारत हा हींदूंचा देश आहे.

नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद वाचून .
क्रुपया पटवून द्या की भारत हा हींदूंचा देश आहे.>>>
अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव . भारत तर आहेच . पण पाकिस्तान सुधा हिंदूंचाच देश आहे . मुसलमानांना दिलेला .

..संपादित..

नाव आडनाव's picture

13 Aug 2015 - 3:05 pm | नाव आडनाव

कीव वाटली म्हणता ? बरं बरं धन्यवाद :)
रक्षणासाठी "तुम्ही" काय करता ते नाही सांगितलं?

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 4:20 pm | खटपट्या

अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव

असेल भारताचं दुर्दैव. ते आमचा भारत आणि आम्ही बघून घेउ. आधी तुम्ही भारत हा हींदूचा देश आहे हे कोणत्या पुस्तकात लीहीले आहे ते सांगा. लिंक दीलीत तरी चालेल. नाही देउ शकलात तर ओवेसी आणि तुमच्यात काय फरक ते सांगा.

डँबिस००७'s picture

13 Aug 2015 - 3:06 pm | डँबिस००७

हाडक्या,

तुमचा हा धागा योग्य वेळीच आलेला आहे,

बर्याच लोकांना बीबीसी म्हणजे एक निपक्ष निरिक्षक आहे अस वाटत पण ह्या बीबीसीने भारता विरुद्ध बरेच उपद्वाप केलेले आहेत,

गेल्या महीन्याच्या मागे पाकिस्तानातील बलुचीस्तानला पाकिस्तानातुन वेगळे पाडण्यासाठी भारत सरकार आपल्या गुत्पचर विभागाच्या माध्यमातुम्न बराच पैसा खर्च करत आहे असा एक लेख बीबीसीने प्रसिद्ध केला, कोणताही पुरावा नसताना अश्या प्रकारचे लेख लिहीणे व आतर-राष्ट्रीय जनमत तयार करणे हे ह्या बीबीसीच काम आहे.

ह्या बीबीसीच्या लेखिका "दिव्या आर्या" ला ईमेल पाठवुन तिच्या कडून देशातील शांतता भंग होईल ह्या द्रृष्टीने लिहीले ल्या हा लेखाच कारण विचारायलाच पाहीजे आहे.

राही's picture

13 Aug 2015 - 4:31 pm | राही

बलुचिस्तानात भारतीय हितसंबम्ध गुंतलेले आहेत हे उघडे गुपित आहे. मात्र ते प्रसिद्ध करावे की नाही आणि कोणी करावे हा वेगळा प्रश्न.

ह्या लेखासाठी बीबीसी विरुद्ध कुठे तक्रार करता येईल ?

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 5:15 pm | तुडतुडी

खटपट्या .
पुस्तकात कशाला लिहायला पाहिजे ?ज्यांना भारताचा इतिहास , वर्तमान माहित आहे त्या प्रत्येक हिंदूला हे पण चांगलंच माहित आहे .तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं . ओवेसी भिकारडा
हिंदूंचा खात्मा करायची भाषा करतो . तरीही तो अजून जिवंत आहे . बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात . तसं करण्यात त्यांना मजा वाटते . तरीही इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं . हा सगळा हिंदूंचा मोठेपणा आहे (कि लेचेपेचेपणा ?). इतर मुस्लिम राष्ट्रांत इतर धर्मियांच्या बाबतीत ह्यातली १ तरी गोष्ट घडते का ?
प्रगो १ नंबर प्रतिसाद .
(संपादित)
आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इथले ७०% मुस्लिम हे मुळचे धर्मांतर घडवून आणलेले हिंदूच आहेत . पण त्यांना हे समजत नाही किवा ते विसरून गेलेत हे बघून वाईट वाटतं .

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 5:37 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्या प्रतिसादातील बहुतांश भाग वादग्रस्त असल्याने संपादित होणार ह्यात शंका नाही .

मात्र

आयसिस च्या बाबतीत हे बी बी सी वाले किंव्वा आमच्या देशातील पुरोगामी लोक किंव्वा धर्मसुधारक ज्याप्रकारे मातीर डोके खुपसुन बसले आहेत ते पाहुन आश्चर्य वाटते . कालच बंगळुरामध्ये काही हिंदुंन्नी तणाव पसरावा म्हणुन पाकिस्तानचा झेंडा फड्कवला त्याची बातमी फेसबुकवर फिरत होती , मात्र जेव्हा काश्मीरात जाहीरपणे आयसिस चे झेंडे फडकवले जातात त्याबाबत मात्र कोणी काहीच शेयर करत नाही , आमच्या मुंबै कल्याण हईद्राबादेतील युवक जाहीरपणे आयसिस ला जाऊन मिळतात त्यावर कोणी काही बोलत नाही , आमच्या इथे झेंडे फडकवले की तो झेंडा पाकिस्तानचा नाही म्हणणारे कित्येक युक्तीवाद समोर येतात ,

आणि हो सरते शेवटी हे सारे हिंदुंमुळेच , त्यातही विशेषकरुन मनुस्मृतीमुळेच होते अशी बोंब ठोकतात ते पाहुन आश्चर्य वाटते !

असो ही शहामृगी वृत्ती किती टिकेल ते पाहुयात ! घोडे मैदान लांब नाही ... द स्टॉर्म इज कमिंग :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2015 - 5:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुड़तुड़ी ह्यांचा प्रतिसाद अन विचार ऐकून शिसारी आली आहे.

(एमएमजी प्रार्थना स्थल चा कट्टर भक्त) बाप्या

नाव आडनाव's picture

13 Aug 2015 - 6:32 pm | नाव आडनाव

+१
मी त्यांची तक्रार संपादकांकडे ~२ तास आधी केली आहे. अजून कोणाला तक्रार असेल त्यांनी पण संपादकांना सांगा. बास झाला मूर्खपणा आता.

नाव आडनाव's picture

13 Aug 2015 - 5:53 pm | नाव आडनाव

बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात

यावर उपाय म्हणून "तुम्ही" रक्षणासाठी काय करणार आहात? वर लिहिलेल्या ऑप्शन पैकी की अजून काही?

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 8:08 pm | खटपट्या

अहो तुडतुडी ताई/भाउ,

मला भारताचा इतिहास नाही माहीत. आणि इतिहास गेला तेल लावत. आता वर्तमानाचं काय ते सांगा. अहो ते सोन्याबापू सारखे लोक जीवाचं पाणी काय सांगतात ते तरी ऐका. भारत हा हिंदूचा देश आहे हे जर तुम्ही इथे सिध्द करु शकलात तर मी तुमच्या घरी येउन तुमचे पाय धरीन.

तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं

तुमचे वय काय आहे? का तुम्हाला इथे भयाण विनोद करायचे आहेत?

आणि तुम्ही एवढी विखारी भाषा का बरे वापरताय? तुमच्या सारखे भडक माथ्याच्या लोकांना भडकावणे हेच बीबीसीवरील कार्यक्रम सादर करणार्‍या लोकांचे ध्येय आहे. (अख्खा बीबीसी चॅनेल खराब नक्कीच नाही.)

मिपावर मुस्लीम वाचकही आहेत.

तुम्ही अशी विखारी भाषा वापरल्याबद्द्ल तुमच्या विरुध्द संपादकांनी कारवाई का करु नये.

मास्टरमाईन्ड's picture

13 Aug 2015 - 9:24 pm | मास्टरमाईन्ड

सहमत

इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं

कारण आपण आपलं "हिंदुत्व" जरा जरी जाणवून द्यायचा प्रयत्न केला तर यापूर्वीची सर्व सरकारं सरळ "जातीयवादी" ठरवायचीत. तशी भीतीच घालून ठेवली होती (अघोषित भीती). बघू यावेळचं सरकार काय करतंय?
मला स्वतःला सार्वजनिक गणेशोत्सवातला (किंवा इतर सणांमधला) धांगडधिंगा पसंत नाही.
पण म्हणून गणेशोत्सव मंडळं आणि कार्यकर्त्यांवर केसेस घालून त्यांचं आयुष्य बरबाद करणं हे नक्की कशाचं द्योतक आहे?
मशिदींवरच्या अवेळी भोंग्यांमुळं ध्वनी प्रदूषण झाल्याच्या किती केसेस आहेत?
सगळ्या तथाकथित फेक्युलर लोकांपैकी किती लोकांच्या XXX त दम आहे एकातरी मशीदीवरच्या भोंग्याबद्दल तक्रार करून तो बंद करण्याची?
ह्यानंच तर आपला देश आज या अवस्थेत आहे.

चुकून भलत्याच प्रतिसादाला पोस्ट झाली.
क्षमा असावी
तो प्रतिसाद काढून इतरत्र पोस्ट करण्यासाठी काय करावं?
मा. संपादक मदत करतील काय?

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 5:16 pm | तुडतुडी

बीबीसी विरुद्ध कोणाकोणाला तक्रार करायचीये ? सगळे मिळून करू चला

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2015 - 5:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

ते कोणचे दादा होते ज्यांना फार अपमानस्पद वाटत होते ब्लडी सिविलियन्स वगैरे म्हणालेले, ह्या तुड़तुडिंचा रिप्लाई दाखवा त्यांना अन काय मत आहे अजुन विचारा!!

कोपरापासुन नमस्कार असल्या विषारी विचारसरणी ला मग तो दाढ़ीवाला ओवैसी असो का अजुन कोणी

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 6:26 pm | संदीप डांगे

+१

हाडक्या's picture

13 Aug 2015 - 6:59 pm | हाडक्या

+१ बापू.. धाग्यावर असलं अवांतर होईल असं वाटलं होतं पण इतकं विखारी रुप समोर येईल असं नव्हतं. :(
आता त्या बीबीसीच्या पत्रकाराला फक्त काय दोष द्यायचा असं वाटायला लागलंय.. दुर्दैव हेच की असा विचार करणार्‍यांना त्यात काही गैर आहे हेच पटत नाही. मग ह्या असल्या पत्रकारांचं फावतं.

देशपांडे अमोल's picture

13 Aug 2015 - 6:41 pm | देशपांडे अमोल

गेली निदान 10 वर्षे तरी bbc.co.uk/hindi ही वेबसाइट फॉलो करीत आहे. टोटली हिंदू विरोधी मानसिकता दिसून आलेली आहे. आणि उत्तम प्रतिचा मुस्लिम कैवार सुद्धा.. 2/3 महिन्यांखाली त्यांच्या एडिटर ला मेल लिहिला होता. काही मुद्दे त्यांच्या नजरेश आणून देण्यासाठी....नो रेस्पॉन्स.

मला तर अशी दाट शंका आहे की त्यांचा इंडियातला संपादक नक्कीच कोणी हिंदू द्वेषी असावा. जेव्हा पासून मोदी सरकार आलेले आहे तेंव्हा पासून तर कळसच झालाय....NDTV.com देखील अजिबात वेगळे नाही....माझ्या दृष्टीने त्यांचा संध्यानंद व्हायला फार वेळ नाही लागणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे.

हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे !

सद्या इतकेच पुरे. :)

हाडक्या's picture

13 Aug 2015 - 7:08 pm | हाडक्या

हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे !

असं वाटतं नै हो काका.. बीबीसी स्वतःच्या देशाच्या धोरणास पूरक अशीच भुमिका घेते हे पाहिलय पण इथे त्यांचा अशा प्रकारची दुही पेरणारी भुमिका ते ही एक वस्तुस्थिती म्हणून, एक खरी प्रतिमा म्हणून रंगवत असतील तर आपल्या देशासाठी धोकेदायक वाटतय.
कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे.

after all , बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे आणि ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे

ही फारच अतिशयोक्त आणि अयोग्य तुलना झाली.

संध्यानंद वगैरे अतिशयोक्ती सोडून, बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे. मात्र, खास ब्रिटीश परंपरेप्रमाणे "आपला अजेंडा त्या अजेंड्यामुळे पिडीत झालेल्यांच्याच कसा फायद्याचा आहे" हे पटवून देण्याचे तंत्र बीबीसी इतके इतर कोणत्याच माध्यमाने क्वचितच विकसित केलेले आहे !

======

ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.

याने तसा काहीच फरक पडत नाही. प्रत्येक सरकारी / गैरसरकारी माध्यमाचा काही ना काही उघड / छुपा उद्येश (अजेंडा) असतोच... आणि त्यापैकी प्रत्येकजण सगळेच उद्येश उघडपणे राबवतात असे नाही... किंबहुना "गोडगोजिरे बाह्यदर्शन (good / politically correct appearance)" ठेवण्यासाठी त्यांना तसे करणे सोईचे नसते.

तसेही, बीबीसी अप्रत्यक्ष सरकारी माध्यम नसून "स्वायत्त संस्था" असल्याचा बीबीसी आणि ब्रिटिश सरकार दोघांचाही "अधिकृत" दावा आहेच ;)

======

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे.

यावरून काहीच स्पष्ट होत नाही का ? आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :)

...फक्त असे करताना ते पोलिटिकली करेक्ट दिसावे इतका इंग्रजांचा आग्रह असतो आणि भारतीयांना त्याची फिकीर नसते, इतकाच काय तो फरक आहे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक राहीलंच की...

इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात

हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2015 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे

बीबीसी च्या खर्‍या रूपाबद्दल अधिक माहिती खालील "स्कॉलर्ली रिसर्च आर्टीकल" मध्ये मिळेल...

A NEW KIND OF IMPERIALISM? THE BBC,COLD WAR BROADCASTING AND THECONTESTED GEOPOLITICS OF SOUTH ASIA : Alasdair Pinkerton *

हा त्याचा अतीत्रोटक गोशवारा. पण संपूर्ण लेख मूळातून वाचण्याने बर्‍या गोष्टी पुराव्यांसकट समजतील...

The relationship between the BBC and Indian listeners has been one of love and hate. Love for the professional competence and hate as it represented the voice of a colonial empire. Even during the post-freedom period, more often than not a bias against India was discernible in BBC broadcasts in our conflicts with Pakistan, particularly on the Kashmir issue. The BBC also did not miss an opportunity to project the seamy side of our people and polity.

The fact that so many foreign governments complain about BBC broadcasts show they have an impact, there would be little point complaining if nobody took any notice of them.

=======

* : Alasdair Pinkerton, Department of Geography, Royal Holloway, University of London, Egham, Surrey TW20 0EX, UK. E-mail: a.d.pinkerton@rhul.ac.uk

लेख : ISSN 0143-9685 (print)/ISSN 1465-3451 (online)/08/040537–20 (c)2008 IAMHIST & Taylor & FrancisDOI: 10.1080/01439680802310324

=======

अस्वस्थामा's picture

1 Sep 2015 - 2:21 pm | अस्वस्थामा

धन्यवाद काका.. माहितीपूर्ण अर्टिकल.. :)
खरं तर बर्‍याचशा गोष्टी आपल्याला आता इतर माहिती स्त्रोत उपलब्ध असल्याने दिसू लागल्या आहेत आणि बीबीसी सारखे "अजेंडा" घेऊन काम करणारे जर बदलले नाहीत तर त्यांची विश्वासार्हता राखू शकणार नाहीत असं वाटतं.

(तसेही त्यांनी अजून तरी इ-पत्राचं उत्तर दिलेलं नाही. आता जास्त आशा पण नाहीय.)

[अवांतर : कालच भारताचा विकासदर ७% च्या खाली आला याची ठळक बातमी होती आणि फोटो म्हणून "तीन फाटक्या-मळक्या साडीतल्या गवत आणि बोचकी घेऊन चाललेल्या बायका". तसं तर या बातमीचा आणि फोटोचा काहीही संबंध नसताना पण एक प्रतिमा निर्मिती म्हणून केलेली गोष्ट वाटली पण आता काही वैताग वगैरे झाला नाही. असो.]

हाडक्या's picture

14 Aug 2015 - 3:59 pm | हाडक्या

एक्का काका, तुमच्या सगळ्या प्रतिसादांबद्दल एकत्रच लिहितोय.

बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे.

याबद्दल दुमत नाहीच. "संध्यानंद" ही अतिशयोक्तीच होती पण ती मुद्दा समजावण्यासाठी होती की बीबीसी अगदीच हलक्याने घ्यायचं माध्यम कोणीही समजत नाही. अनेक अभ्यास पूर्ण लेख, मालिका या येत असतात आणि त्यामुळेच परकिय देशाबद्दलची बातमी अथवा लेख हा बायस्ड आहे की नाही हे सामान्य वाचकाला कळायची शक्यता खूपच कमी असते हे म्हणायचे होते. आणि त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच चांगले नव्हेत.

"बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" मान्य. पण हे सामान्यपणे प्रत्येक बाबतीत (खासकरुन देशाबाहेरच्या बाबतीत) बहुसंख्यांना याबद्दल तितकी कल्पना असतेच असे नाही. मग अशी बातमी वाचून जे जनमत तयार होते ते चुकीचेच आणि कलुषित असेच होते.
मला हे समजत नाही की भारतात हिंदू-इतर धर्मीय तेढ वाढवणे हे बीबीसीच्या अजेंडाचा भाग आहे का ? असेल तर का? आणि मग आपल्या देशातील माध्यमे व सरकारद्वारे त्यास विरोध/ निषेध होणे अपेक्षित नाही का ?

आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :)

मान्य पण भारतात अंतर्गत तेढ वाढवणे (आणि त्याची झळ इथे युकेत असलेल्यांनाही बसण्याची शक्यता असणे) हे सामान्य इंग्रजाच्या कसे फायद्याचे अथवा त्याच्या बाजूचे?

हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.

हे शक्य आहे कारण मी बहुतेक युरोपिय लोकांना भेटलोय ते एकतर इंग्रजांच्या देशात खूप वर्षे वास्तव्य करत असलेले असेच आहे त्यामुळे मी तितका ठामपणे दावा करु शकत नाही. फक्त एक निरिक्षण.

जडभरत's picture

14 Aug 2015 - 11:13 am | जडभरत

बी.बी.सी. = Barking Bulldogs Congregation

देशपांडे अमोल's picture

13 Aug 2015 - 6:47 pm | देशपांडे अमोल

ह्या सगळ्यात गोची अशी झालीय की चांगले वृत्तांकन करणार्‍या वेबसाइट्स नाहीच राहिल्या....newsonair सारखी क्वचितच एखादी आहे. अनॅलिसिस तर दूरचीच गोष्ट

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2015 - 7:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

बीबीसी ला बॅन करू नयेत म्हणजे मिळवले नाही तर ह्या चिंधीचोर लोकांचे अजुन दुप्पट उदात्तीकरण व्हायला अजुन एक कारण!!

मी तुमचं मिपा वरचं बरंचसं लिखाण वाचलंय.
अ‍ॅकॅडमी ची लेखमाला मस्तच होती.

वरचे तुमचे प्रतिसाद पण पाहिलेत.
फक्त एक समजत नाही तुम्ही तथाकथित "चिंधीचोरांवर" वार करताना कळत नकळत बीबीसी ची पाठराखण करताय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2015 - 9:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ मी पाठराखण करतोय का त्यांना अकारण मोठे न होऊ देण्यासंबंधी बोलतोय ते एकदा नीट वाचाल का प्लीज?? ;)

अवांतर :-

आपण दिलेल्या मानासाठी शतशः ऋणी आहेच मी!

गामा पैलवान's picture

13 Aug 2015 - 8:32 pm | गामा पैलवान

हाडक्या,

बीबीसीने असाच खोडसाळपणा याअगोदरही केलाय. तेव्हा लक्ष्य मोदी होते. त्यावेळची माझी प्रतिक्रिया : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=312915468879916&id=172...

आ.न.,
-गा.पै.

डँबिस००७'s picture

13 Aug 2015 - 10:07 pm | डँबिस००७

धाग्याचा विषय आहे " हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ? "

हे तुम्हाला पटतय का ?

जर पटत नसेल तर मग असा लेख लिहुन हे सर्व बीबीसीच्या वाचकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तुम च्या लक्षात येत आहे का ?

तुडतुडी's picture

14 Aug 2015 - 12:08 pm | तुडतुडी

@खटपट्या
तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही (माहित करून घ्यायचा असेल तर तो हि सांगते ) म्हणून तुमच्यासाठी तो तेल लावत गेला . आमच्यासाठी नाही . मागच्या अनुभवावरून पुढे शहाणं व्हायचं असतं . पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत .किवा सगळं माहित असूनही डोळेझाक करताय असं दिसतंय . चला तुमच्या माहितीसाठी काही वर्तमानातल्या गोष्टी सांगते . फार लांबच्या नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या .
१. याकुब ला फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा मुसलमानांनी त्याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला .
२. उस्मान खान उर्फ मोहम्मद नवीद हसत हसत सांगतोय मी इथं हिंदूंना मारायला आलो होतो . आणि तसं करण्यात मला मजा वाटते
३. ओवेसी(हा इथल्या मुसलमानांचा प्रतिनिधी ) ने हैद्राबाद मध्ये केलेल्या भाषणात 'मुस्लिमांना फक्त १५ मिनटे द्या . १०० करोड हिंदूंना ते दाखवून देतील आम्ही कोण आहोत ते . फक्त काही तासांचा अवधी द्या इथल्या हिंदूंचा खात्मा करायला .' विखार उधळला होता
४. यासीन भटकळ (जर्मन बेकरी बॉम्बस्फोट) ने पोलिसांना सांगितलं , बेंगलोर मधल्या मदरशा मध्ये त्याला धार्मिक अतिरेकाचं शिक्षण देण्यात आलं . तिथे अश्या किती मुलांचं ब्रेन वॉंशिंग करण्याचं काम चालू आहे .
५. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पर्वती भागात दंगल झाली . कारण काय तर मशिदीत चाललेल्या मुस्लिम टोळक्याच्या चेहऱ्यावर गाडी पार्क करताना प्रकाश पडला म्हणून
६. रमजान ची ४००० ची खरेदी केल्यावर पैसे मागितले म्हणून दुकानदाराला मारहाण .
७. २-३ वर्षांपूर्वी दंगल झाली होती . कारण काय तर देवीच्या मिरवणुकी वेळी ह्यांच्या मशीदीवर गुलाल पडला म्हणून

हा सगळा विखर तुम्हाला दिसत नाही का ?मुस्लिमांकडून कुठली वाईट गोष्ट झाली तर इतर मुसलमान त्याचा विरोध करताना आजपर्यंत तुम्ही कधी बघितलेत का ? मुस्लिम लोकांच्या पुढे आमचा भडकपणा काहीच नाही . विनाकारण हिंदू कसे वाईट आणि मुस्लिम कसे चांगले हा चुकीचा प्रचार करत असण्याबद्दल तुमच्यावर का कारवाई करू नये ? मिपावर मुस्लीम वाचकही आहेत आम्हालाही माहित आहे . म्हणून आम्ही घाबरून जावं , हाताची घडी तोंडावर बोट धरून बसावं अशी अपेक्षा करू नका .

तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही (माहित करून घ्यायचा असेल तर तो हि सांगते ) म्हणून तुमच्यासाठी तो तेल लावत गेला . आमच्यासाठी नाही . मागच्या अनुभवावरून पुढे शहाणं व्हायचं असतं . पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत .किवा सगळं माहित असूनही डोळेझाक करताय असं दिसतंय . चला तुमच्या माहितीसाठी काही वर्तमानातल्या गोष्टी सांगते . फार लांबच्या नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या .
१. याकुब ला फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा मुसलमानांनी त्याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला .
२. उस्मान खान उर्फ मोहम्मद नवीद हसत हसत सांगतोय मी इथं हिंदूंना मारायला आलो होतो . आणि तसं करण्यात मला मजा वाटते
३. ओवेसी(हा इथल्या मुसलमानांचा प्रतिनिधी ) ने हैद्राबाद मध्ये केलेल्या भाषणात 'मुस्लिमांना फक्त १५ मिनटे द्या . १०० करोड हिंदूंना ते दाखवून देतील आम्ही कोण आहोत ते . फक्त काही तासांचा अवधी द्या इथल्या हिंदूंचा खात्मा करायला .' विखार उधळला होता
४. यासीन भटकळ (जर्मन बेकरी बॉम्बस्फोट) ने पोलिसांना सांगितलं , बेंगलोर मधल्या मदरशा मध्ये त्याला धार्मिक अतिरेकाचं शिक्षण देण्यात आलं . तिथे अश्या किती मुलांचं ब्रेन वॉंशिंग करण्याचं काम चालू आहे .
५. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पर्वती भागात दंगल झाली . कारण काय तर मशिदीत चाललेल्या मुस्लिम टोळक्याच्या चेहऱ्यावर गाडी पार्क करताना प्रकाश पडला म्हणून
६. रमजान ची ४००० ची खरेदी केल्यावर पैसे मागितले म्हणून दुकानदाराला मारहाण .
७. २-३ वर्षांपूर्वी दंगल झाली होती . कारण काय तर देवीच्या मिरवणुकी वेळी ह्यांच्या मशीदीवर गुलाल पडला म्हणून

या सगळ्याचा आणि "भारत हा हींदूचा देश आहे" या वाक्याचा काय संबंध? वरील सर्व गोष्टींमुळे भारत हा हींदूंचा देश आहे हे कुठे सिध्द होतंय?

पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत

तुम्ही हे सर्व करतना ना, मग मला पामराला पटवून द्या ना की "भारत हा हींदूंचा देश आहे"

विनाकारण हिंदू कसे वाईट आणि मुस्लिम कसे चांगले हा चुकीचा प्रचार करत असण्याबद्दल तुमच्यावर का कारवाई करू नये ?

कुठे केला प्रचार दाखवा. का उगीच माझी नसलेली वाक्य माझ्या तोंडी कोंबताय? मी वरील वाक्ये कुठेही टंकलेली दाखवा, कारवाई करायच्या आधी मी मिपा सोडून जाईन.

मिपावर मुस्लीम वाचकही आहेत आम्हालाही माहित आहे . म्हणून आम्ही घाबरून जावं , हाताची घडी तोंडावर बोट धरून बसावं अशी अपेक्षा करू नका .

कधी केली अपेक्षा ?

माझा आक्षेप तुम्ही टंकलेल्या "भारत हा हींदूंचा देश आहे" या निखालस खोट्या वाक्याला आहे.

काळा पहाड's picture

15 Aug 2015 - 3:38 pm | काळा पहाड

या सगळ्याचा आणि "भारत हा हींदूचा देश आहे" या वाक्याचा काय संबंध? वरील सर्व गोष्टींमुळे भारत हा हींदूंचा देश आहे हे कुठे सिध्द होतंय?

सारखं काय सिद्ध करून दाखवा, सिद्ध करून दाखवा लावलंय? तुम्हाला जर पटत नसेल तर राहू दे.

भारत हा हिंदू, बौद्ध, जैन, शिख, आदिवासी आणि ज्या संस्कृती इथे जन्मल्या त्यांचा देश आहेच. तो ज्याची भारतीयत्वावर श्रद्धा आहे त्यांचासुद्धा देश आहे. तो कलामांचा देश आहे आणि सॅम माणेकशाँचासुद्धा देश आहे. सिद्ध करून वगैरे दाखवणार नाही. फुटा.

खटपट्या's picture

15 Aug 2015 - 11:44 pm | खटपट्या

तुम्हाला कोणी विचारलंय का? कशाला मधे पचकताय?

का तुडतुडी हा तुमचा डू आयडी आहे?

परत एकदा - भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे.

बाकी तुमचे जहाल प्रतिसाद चालूदेत...

काळा पहाड's picture

23 Aug 2015 - 6:41 pm | काळा पहाड

तुम्हाला कोणी विचारलंय का? कशाला मधे पचकताय?

उगीच पुरावा द्या, पुरावा द्या केलं की लोकं डोक्यात जातात. हा देश हिंदूंचा आहे म्हणायला पुरावा कशाला हवाय? हा हिंदूंचा नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? कारण 'हिंदूंचा नाही' म्हणजेच 'हिंदूंचा आहे' चं नकारात्मक वाक्य आहे. मग तसा पुरावा शोधून बघा फारच वाटत असेल तर.

का तुडतुडी हा तुमचा डू आयडी आहे?

इथं एका आयडी नं लिहायला टाईम मिळत नाही. दोन दोन केव्हा बनवू? आणि माझा आयडी 'तुडतुडी' वगैरे असण्याची शक्यताच नाही.

परत एकदा - भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे.

बाकी तुमचे जहाल प्रतिसाद चालूदेत...

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.

तुडतुडी's picture

14 Aug 2015 - 12:13 pm | तुडतुडी

नाव आडनाव

मी काय करेन हे मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नहि. वेळ आल्यावर करून दाखवेन . सध्या काय करत आहे हे लिहिलं आहे . पण ते संपादित केलं गेलं आहे . आम्ही नुसते बोललो तर काही लोकांना शिसारी येतेय . मग हे लोक तर प्रत्यक्षात करतात . आम्हाला किती शिसारी येत असेल विचार करा .

नाव आडनाव's picture

14 Aug 2015 - 1:05 pm | नाव आडनाव

मित्रांनो,
मी काल लिहिलेल्या प्रतिक्रियेसाठी माफ करा. दुसर्‍याची चूक दाखवून देण्यासाठी सारकॅस्टिकली लिहिलेली माझी प्रतिक्रिया नंतर मलाच चूक वाटली, कारण त्याचा वेगळा अर्थ निघत होता.ईतक्या चांगल्या चाललेल्या चर्चेत माझी प्रतिक्रिया अजिबात नको होती. माझी ती प्रतिक्रिया काढून टाकण्यासाठी संपादकांना व्यनी करण्यासाठी आलो होतो तर ती प्रतिक्रिया संपादकांनी आधीच काढून टाकली आहे.

मदनबाण's picture

14 Aug 2015 - 1:25 pm | मदनबाण

एक्का काकांशी सहमत !
बाकी बीबीसीवाल्यांशीच संबंधीत एक प्रतिसाद हल्लीच मी इथे दिला होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vande Mataram feat Ustad Amjad Ali Khan :- The Song Of Freedom

नवशिक्या's picture

14 Aug 2015 - 6:11 pm | नवशिक्या

सर्वच "ते" "ते" नसतात पण जवळपास सगळेच "ते" "ते" असतात ......च्या मायला " जवळपास " शब्दाने घात केला ... ह्या "जवळपास" च्या इंधनावर सगळे आपापल्या रोट्या भाजत आहेत ...आणि जे "ते" नाही आहेत ..त्यांचा तूप म्हणून वापर करत आहेत ......

आबा's picture

15 Aug 2015 - 3:18 am | आबा

हिंदू-राष्ट्रवादी हे हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत

वरील लेखाला प्रतिवाद करण्यासाठी are islamists becoming a threat to all other muslims असा लेख कुणीतरी लिहिण्याची गरज आहे असे वाटते आहे. :)
ब्रिटीश मुस्लिम समाजाचे ब्रिटनच्या राजकारणातले/समाजकारणातले वाढते वर्चस्व हे ही ह्या लेखाचे कारण असू शकते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Aug 2015 - 9:48 am | कैलासवासी सोन्याबापु

उदाहरण म्हणुन जेहादी जॉन का कोण तो आहेच!!!

मुस्लिम परदेशातून आले होते . इंग्रजांसारखेच . अफगाणिस्तानच्या पलीकडून. ते इथले नाहीत . मुस्लिमांनी इथल्या सगळ्या सुंदर गोष्टी उध्वस्त केल्या . त्यांच्या सडक्या विचारसरणीने इथे घाण पसरवून ठेवलीये . फाळणी झाली तेव्हा त्यांनी स्वतःसाठी वेगळा देश मागून घेतला . तेव्हा त्यांचं इथं भारतात काही काम नाही . तेव्हा भारत हा हिंदूंचाच देश आहे . ज्या पाकिस्तानात , बांगलादेश मध्ये ते राहतात तो सुधा हिन्दुस्थानच होता . तेव्हा ती जमीन सुधा त्यांची नाही.

बौद्ध , जैन मूळ हिंदू धर्मापासूनच निर्माण झाले आहेत . त्यांनी देशाच्या विकासात योगदान दिलंय . हिंदूंचा द्वेष करून ते हिंदूंना मारत सुटत नाहीत .केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमापोटी बौद्ध धर्म स्वीकारणारे पण बौद्ध धर्माचं नॉलेज नसणारे , पूर्ण हिंदू असणारे , हिंदू संस्कृती जपणारे , हिंदू देवांचीच पूजा करणारे बौद्ध स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत .जैन सुधा हिंदू परंपरा पाळतात . किवा हिंदू देवांची उपासना करतात . शीख सुधा कट्टर देशप्रेमी असतात . आज भारतीय लष्करात सगळ्यात जास्त संख्या शिखांची आहे .उठ सुठ हिंदूंचा द्वेष नाही करत ते .मुस्लिम मात्र हिंदू , जैन , बौद्ध , शीख सगळ्यांशी भांडण करतात . मुस्लिमांनी ह्या देशात मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यापलीकडे , मागासलेपणा वाढवण्यापलीकडे दुसरं काहीही केलं नाहीये . अब्दुल कलाम सारखा क्वचित अपवाद

गेल्याच आठवड्यातली बातमी .धर्मनिरपेक्ष ब्लॉग लिहिणारा निलोय चौधरीचा बांगलादेश मध्ये खून . ह्या आधी कित्येक धर्मनिरपेक्ष ब्लोग्गर ची इस्लामी देशांमध्ये हत्या झालीये .धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या तस्लिमा नसरीनला जीवाच्या भीतीनं देश सोडून पळून जाव लागतं . कालचीच बातमी . पाकिस्तानी समाजाच्या छळाला कंटाळून ४०० हिंदू कुटुंबाचं भारतात स्थलांतर . धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे फार लाड झालेत ह्या देशात.
पण ह्यापुढे होतील असं वाटत नाही .

राही's picture

24 Aug 2015 - 12:48 pm | राही

तुडतुडीताई/दादा.
पूर्वीचे जे प्रकार 'लाड' म्हणून गणले जात आहेत, तेच 'लाड' आताही होतीलच. कारण लोकशाहीमार्गाने आलेल्या कोणत्याही सरकारला लोकसंख्येच्या एका मोठ्या हिश्श्याला समोरासमोर दुखवता येत नसते. 'हज'ची सब्सिडी तर मुस्लिमांनीही नाकारली आहे कारण ती सब्सिडी सरकारकडून 'एअर-इंडिया'ला मिळते आणि त्यासाठी एअर-इंडियानेच प्रवास करणे भाग असते. शिवाय मुस्लिमांनी हज यात्रेसाठी इतरांचा पैसा घेणे हे त्यांच्या धर्माविरुद्ध आहे त्यामुळे तसेही सब्सिडाइज़्ड तिकिटावर यात्रा करण्याचे प्रमाण कमी होत आहे. भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील.
पाकिस्तानवर हल्ला करणे आणि पाकिस्तानची भूमी त्यावरच्या मुसलमानांसकट ताब्यात घेणे वगैरे गोष्टी कोणतेही शहाणे सरकार करणार नाही. हे सरकारही शहाणे असल्यास तसे करणार नाही. बाकी 'पाकड्यां'ना धडा शिकवणे वगैरे या आधीच्या युद्धात करून झालेले आहे, निर्णायक रीत्या. फक्त १९६५ युद्धाचा अपवाद. पण तो इतिहासही नव्याने लिहिला जात असून त्यानुसार भारतच निर्विवादपणे ते युद्ध जिंकला असे स्थापित होत आहे. मग काय नवे घडणार आहे?
कश्मीर प्रश्न सरळ सुटणार्‍यातला नाही. सध्याची ताबा रेषा मान्य करणे हाच व्यवहारी पर्याय आहे. आणि त्यामुळे वाटाघाटींचे गुर्‍हाळ चालूच ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानला(त्यांच्या लष्कराला) वाटाघाटी नकोच असतात. त्यांना युक्तीप्रयुक्तीने वाटाघाटीच्या टेबलावर आणणे ह्यात मुत्सद्दीपणा असतो. पण ते फेटाळणे यात कोणा बापड्याला असमंजस पोरकटपणाऐवजी वीरश्री दिसल्यास तो त्याचा प्रश्न.
हे सरकार मागील सरकारसारखीच बहुतांशी धोरणे ठेवेल कारण तोच बेस्ट अ‍ॅवेलेबल ऑप्शन होता.
त्यामुळे काही किरकोळ बदल सोडता (जे कदाचित काही जणांना फार मोठे वाटू शकतील) फारसे वेगळे काही घडण्याची शक्यता आताही नाही. फक्त स्वच्छ प्रशासनाबाबत आशा आहेत, त्या कितपत खर्‍या ठरतात ते पाहायचे.

प्यारे१'s picture

24 Aug 2015 - 1:23 pm | प्यारे१

गळा काढून रडणाऱ्या पोराला (कसं ते swapsच्या पहिलं प्रेम धाग्यावर) समजावणाऱ्या शाळेतल्या बाई डोळ्यासमोर आल्या आणि ड्वाले पानावले.
बाई, केस ऐकनारातली न्हाइ. प्रेत्न करून उपेग न्हाइ.

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

राही's picture

24 Aug 2015 - 1:40 pm | राही

खरेच. पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याने पाणीच वाया जाते.
म्हणूनच धागा सुरू होऊन इतके दिवस झाले तरी प्रतिसाद लिहिला नव्हता.
पण शेवटी तुडतुडीताई/दादा मला उकसवण्यात यशस्वी झाले खरे.
आता पुसा पाहू ड्वाले ! (हलक्याने घेणे)

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद खालील वाक्यांचा)

>>> भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील.

असहमत.

वीज, पाणी इ. सुविधा देणे आणि थेट कमी किंमतीत प्रवास करून देणे यात खूप फरक आहे. यात्रेसाठी ज्या गाड्या सोडल्या जातात त्या फक्त अधिकाधिक यात्रेकरूंना यात्रा करता यावी यासाठी. त्या गाड्यांच्या तिकिटात भरपूर सवलत दिलेली नसते. तसेच यात्रेला न जाणार्‍यांना सुद्धा त्या गाड्यांचा लाभ घेता येतो. उत्सवाच्या वेळी केलेला वीजपुरवठा किंवा पाणीपुरवठा फुकटात किंवा स्वस्तात केलेला नसतो. त्याची किंमत भरावीच लागते. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या निमित्ताने घाट दुरूस्त करणे, रस्ते दुरूस्त करणे इ. गोष्टींचा यात्रेकरूंना फायदा होतोच, परंतु शहरातील नागरिकांना देखील फायदा होतो.

या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार). पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे. त्या तुलनेत हाजचे सौदी अरेबियाचे तिकीट अत्यंत कमी किंमतीत दिले जाते. भारतातील इतर उत्सवाच्या यात्रेकरूंना अशी घसघशीत रोख सवलत मिळत नाही. दुसरे म्हणजे या सवलतीचा उपयोग फक्त हाजला जाणार्‍यांनाच आहे. इतर प्रवाशांना याचा उपयोग नाही. याऊलट भारतातील इतर उत्सवांना दिल्या जाणार्‍या सोयीसुविधा इतरांना सुद्धा वापरता येतात.

त्यामुळे हाजला मिळणारी सवलत आणि भारतातील इतर उत्सवांना दिलेल्या सोयीसुविधा यांंची तुलना होऊ शकत नाही.

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 3:32 pm | संदीप डांगे

गुरुजी,

जरा ग्राऊंडवर उतरूया काय?

इथे दरदिवशी लाखो रुपये साधूंच्या खानपानावर सरकारतर्फे खर्च होत आहेत. धान्य, दूध, फळे प्रचंड प्रमाणात पुरवठा सुरू आहे. ६०० एकरच्या वर जमीन साधूग्रामासाठी भाड्याने घेतली आहे. याचे जमिन मालकांना सरकार भाडे भरत आहे, मोफत वीज, पाणी पुरवले जात आहे. आणि या सगळ्यात शहरवासीयांच्या उपयोगाचं काहीच नाहीये. उलट येणार्‍या गर्दीचा ताप आहे तो वेगळा. शहरवासीयांना रस्ते सोडले तर प्रत्यक्ष फायदयाचे काहीच नाही. वरून ह्या रस्त्यांची पुढील वर्षभर टीकतील याची काहीच हमी नाही. रस्त्यांचा खर्च एकूण खर्चाच्या काही टक्के आहे. बाकीचा खर्च फक्त कुंभमेळ्याच्या आयोजनावर आहे. आणि आयोजन म्हणजे फक्त पोलिसदल आणि बॅरीकेड्स नाही.

नाशिक रेल्वेस्टेशनचा कायापालट केलाय. लाखो उतारुंना एकाच वेळी उतरता येईल इतके स्थानकात बदल केलेत. निवाराशेड्स, रूग्णवाहिका, फिरते दवाखाने, फिरते शौचालय, पाण्याच्या सुविधा, आपत्कालिन व्यवस्था, इत्यादी. शहरवासियांना एवढ्या बदलाची वा सोयींची काहीच आवश्यकता नाही. विशेष म्हणजे नेहमीचे प्रवाशी तर या काळात गरजेच्या सुविधांचाही वापर करू शकणार नाहीत.

अधिक माहीती इथे: दुवा १, दुवा २

खर्चाचे आकडे: मंजूर आराखडा

खास गाड्या सोडल्यात म्हणून प्रवाशांची संख्या वाढते की प्रवाशांची संख्या वाढते म्हणून त्यांच्या सोयीसाठी खास गाड्या सोडल्या जातात? यात सामान्य प्रवाशांचा कुठे विशेष फायदा आहे? विशेष फायदा हा फक्त यात्रेकरूंना आहे ज्यासाठी सरकार पैसा मोजते. या यात्रेकरूंपैकी विनातिकीटही भरपूर असतात. लोक तिकिटही काढतात पण त्यातून सरकारला नफा मिळत नाही.

त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो.

हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच.

कालच कुठेतरी वाचले की नाशिकचा कुंभमेळा फिफा वर्ल्डकपपेक्षा चांगला आयोजीत केला आहे.

लींक मिळाली तर देतो.

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 4:40 pm | संदीप डांगे

ते तर आहेच. जगातल्या सगळ्या मी मी म्हणणार्‍या विकसित देशांसाठी कुंभआयोजन एक आश्चर्यजनक प्रकार आहे. अनेक देशांतून लोक/अधिकारी याचा अभ्यास करायला येतात.

पर्वण्यांच्या एकूण काळात सुमारे १० कोटी लोकांचे दळणवळण, आरोग्य, निवास, अन्नपाणी इत्यादींची कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देता घडवून आणणे जगाने दखल घ्यावी अशीच बाब आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मुंबईची लोकसंख्या अदमासे दिड कोटी आहे. व भारताची सव्वाशे कोटी. त्या तुलनेत यंत्रणांवरचा दबाव व कौशल्याची मागणीही त्याप्रमाणात असते.

राही's picture

24 Aug 2015 - 5:41 pm | राही

प्रतिसाद अतिशय आवडला.
सोयी ह्या यात्रेकरूंसाठी असतात. आणि कित्येक सोयी ह्या तात्पुरत्या, यात्राकाळापुरत्या असतात.
यात्रेच्या अतिशय गर्दीच्या काळात नेहमीचे प्रवासी शक्यतो तिथे जाणे टाळतात.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 8:45 pm | श्रीगुरुजी

संदीप डांगे,

कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना सरकार फुकट खाणेपिणे, फुकट प्रवास करण्याची सोय पुरवित आहे का?

आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी शेकडो जादा गाड्या सोडल्या जातात किंवा गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी जादाच्या अनेक गाड्या सोडतात. या गाड्यातून फुकट प्रवास करायला मिळतो का?

जादा गाड्या सोडल्यामुळे एसटी महामंडळ व रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते ना?

या जादा गाड्यांचा लाभ उत्सवासाठी न जाणार्‍यांना पण मिळतो ना?

आता या सुविधांची तुलना हाज अनुदानाशी केली तर काय दिसते? हाजसाठी प्रतिमाणशी रोख फायदा आहे. त्यातून सरकारला कोणतेही अधिक उत्पन्न मिळत नसून निव्वळ तोटाच आहे. हाजसाठी न जाणार्‍यांना या सवलतीचा काहीही फायदा नाही.

हिंदू-मुस्लिम तुलनाच करायची तर हिदूंच्या उत्सवाला दिलेल्या सोयीसुविधांंमुळे यात्रकरू व यात्रेकरू नसलेल्यांची सुद्धा सोय होते आणि सरकारला सुद्धा वाढीव उत्पन्न मिळते. याउलट मुस्लिमांच्या उत्सवासाठी दिलेल्या रोख सवलतीमुळे फक्त यात्रेकरूंचा फायदा होत असून सरकारचा तोटा होत आहे.

आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण घर नीट आवरून व्यवस्थित ठेवतो. आलेल्या पाहुण्यांना स्वच्छ, नीटनेटक्या घरात राहता येतेच. त्याचबरोबर घरात राहणार्‍यांनाही त्याचा फायदा होतो.

>>> त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो.

यात्रेकरूंसाठी निर्माण केलेल्या सुविधांचा फायदा यात्रेकरूंप्रमाणे स्थानिकांनाही होतो.

>>> हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच.

हा खर्च सरकार हिंदूंसाठी करते असे तुम्ही म्हणत आहात ते चुकीचे आहे. त्या खर्चाचा फायदा हिंदूंप्रमाणे अहिंदूंनाही होतो. याउलट हाज सबसिडीचे लाभार्थी फक्त मुस्लिम आहेत. अमुस्लिमांना त्याचा फायदा नाही. किंबहुना त्यांना अप्रत्यक्षरित्या तोटाच आहे.

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 9:46 pm | संदीप डांगे

माझा मुद्दा तरी सरकार सर्व धर्माच्या सोहळ्यांसाठी करत असलेल्या खर्चाबद्दल आहे आणि राहीन.

१० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे?

कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा.

सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?.

तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता.

राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात.

हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2015 - 7:22 pm | श्रीगुरुजी

>>> १० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे?

यातून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते. येणारे प्रवासी ज्या सार्वजनिक वाहनांचा वापर करतात (आगगाड्या, बसेस इ.) त्याच्या तिकिटविक्रीतून सरकारला उत्पन्न मिळते. कुंभमेळ्याच्या गावी असलेल्या स्थानिक व्यावसियाकांचा व्यवसाय वाढतो (उदा. लॉजेस, दुकाने, रस्त्यावरील विक्रेते, सलून्स इ.). कुंभमेळा बघण्यासाठी परदेशातील अनेक वाहिन्या येऊन चित्रीकरण करतात व त्यांच्याबरोबर काही परदेशी पर्यटकसुद्धा येतात. त्यांच्यामुळेही सरकारला उत्पन्न मिळते. यातून हिंदू आणि अहिंदूंचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या फायदा होतो.

हाजला जाणार्‍यांमुळे सरकारला नुकसान सोसावे लागते हे लक्षात घ्या.

>>> कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा.

अहिंदू हे यात्रेकरू म्हणून येतात असे मी म्हटलेच नाही. परंतु कुंभमेळ्यामुळे हिंदू आणि अहिंदू अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिकांचा त्या काळात व्यवसाय वाढतो. हाज यात्रा देशाबाहेर असल्याने सरकारला कोणत्याही प्रकारचा फायदा न होता सरकारचा तोटाच होतो.

>>> सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?.

वर लिहिलेच आहे. सरकारने खर्च केला तरी सरकारला व स्थानिक जनतेला उत्पन्न मिळून त्याची परतफेड होते.

>>> तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता.

तसे नाही. सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार सोयीसुविधा निर्माण करीत नाही. कुंभमेळा ही हजारो वर्षे चालत असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. हा मेळा व्यवस्थित पार पडावा यासाठी सरकार सुविधा निर्माण करते. त्यानिमित्ताने सर्वांचाच फायदा होतो.

उदा. आपल्याला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणार्‍या यात्रेसाठी सुविधा निर्माण करीत नाही. धार्मिक परंपरा कमीतकमी त्रासात सुरू रहावी हा त्यामागे उद्देश असतो आणि त्यासाठी केला जाणारा खर्च हा एकतर्फी आणि अनाठायी नसतो.

>>> राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात.

या उत्सवासाठी सरकार करीत असलेल्या खर्चाचा ताळेबंद मांडल्यास त्यात सरकारला भुर्दंड पडला का व किती भुर्दंड पडला ते लक्षात येईल. परंतु वर लिहिल्याप्रमाणे सरकारने सोयीसुविधांसाठी खर्च केला तरी अनेक अप्रत्यक्ष मार्गाने सरकारला खर्च परत मिळतो. जनतेलाही त्याचा फायदा होतो.

>>> हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे.

हजसाठी दिले जाणारे थेट रोख अनुदान आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक यात्रांच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या सोयीसुविधा यांना मूळ प्रतिसादात एकाच तागडीत तोलल्याने मी प्रतिवाद केला. हे तुमच्या लक्षात असेल की हाजसाठी अल्पदरात विमानप्रवासाची सुविधा दिल्याने सरकारला फक्त आणि फक्त तोटाच होता. हा खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघत नाही. याउलट धार्मिक यात्रांच्या निमित्ताने रोख सवलत न देता सोयीसुविधा दिल्याने सरकारने केलेला खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघू शकतो.

एक साधे उदाहरण देतो. एखाद्या गावातील काही शेतकर्‍यांना थेट रोख रक्कमेची मदत दिली तर फक्त तेवढ्याच शेतकर्‍यांचा फायदा होईल आणि सरकारला त्यातून काहीही मिळणार नाही. याउलट सरकारने जर अखंडित वीजपुरवठा, पाणीपुरवठा इ. सोय केली तर त्या भागातील सर्व शेतकरी व शेतकरी नसलेल्यांना सुद्धा फायदा होईल. त्यातून नवीन व्यवसाय निर्माण होऊ शकतील, शेती उत्पन्न वाढू शकेल आणि सरकारला करांच्या रूपाने उत्पन्न मिळून केलेला खर्च भरून येऊ शकेल. हाजला देण्यात येणारी रोख सवलत आणि धार्मिक यात्रांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा यात हाच नेमका फरक आहे.

अर्धवटराव's picture

24 Aug 2015 - 10:36 pm | अर्धवटराव

हाज सबसिडीचे लाभार्थी फक्त मुस्लिम आहेत.

एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2015 - 7:28 pm | श्रीगुरुजी

>>> एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी.

सरकार हे सर्वधर्मियांचे आहे. त्यामुळे फक्त एकाच विशिष्ट धर्माला लाभार्थी करणे हे योग्य नाही. सरकारने इतर सर्वधर्मियांना अशी रोख सवलत दिल्यास हाजबद्दल आक्षेप येणार नाहीत (उदा. सरकार ख्रिश्चनांना व्हॅटिकनला विमानाने केवळ १२००० रूपयात जाऊन देईल का?).

हाज सवलतीमुळे सर्वांचेच अप्रत्यक्ष नुकसान होते कारण सरकार जी सवलत देते ते उत्पन्न जनतेचे दिलेल्या करांच्या पैशातून आलेले असते. म्हणूनच त्याबद्दल आक्षेप आहेत.

दुसर्‍यांचा हक्क डालवुन असं होत असेल तर ते अयोग्यच आहे. पण हजयात्रा जर मुस्लीमांचा परमोच्च आस्थेचा विषय असेल, व त्यासाठी आर्थीक अनुदान देणं एव्हढी एकच मदत जर सरकार करु शकत असेल तर तसं करायला काहि हरकत नसावी.

उदा. सरकार ख्रिश्चनांना व्हॅटिकनला विमानाने केवळ १२००० रूपयात जाऊन देईल का?

घरात फक्त आजीबाई उपास करते म्हणुन तिच्याकरता साबुदाणा खिचडी बनते. इतरांनी पण उपास केला तर त्यांनाही मिळेल. शक्य तेव्हढं आस्थेने केलं तर बिघडलं कुठे ?

जनतेने दिलेल्या करांच्या पैशातुन सरकार मदत करते हे खरं आहे. पण त्याच कर भरणार्‍या जनतेत मुस्लीम टक्का देखील आहे. आणि या खर्चाचं फार काहि ओझं होत असेल असं वाटत नाहि. जनतेच्या मनःशांती करता अल्प किंमत मोजायला काहि प्रॉब्लेम नसावा.

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 1:59 am | प्यारे१

vatican ला 12000 मध्ये?
यात इटली वगैरे पैकेज देत असले तर हम रेडी हूँ.
एकदा कन्वर्ट व्हा आणि पुन्हा reconvert व्हा.
हाय काय नि नाय काय!

मोरोक्को मध्ये फ्लेश बिज़नेस जोरात असतो. आणि विशिष्ट धर्मीय लोकांना तर हे हराम आहे. करायचं काय मग? प्रश्न आला की उत्तर तयार होतं. चार लग्न करायला काही अडचण नाही.

मग एक लग्न करा, कार्यक्रम करा, दुसऱ्या दिवशी तलाक तलाक तलाक.
दुसऱ्या दिवशी दुसरं करा, कार्यक्रम करा पुन्हा तलाक.
have fun हबीबी!

अर्धवटराव's picture

26 Aug 2015 - 8:30 pm | अर्धवटराव

:)
सवीस्तर बोलु ;)

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 6:59 am | dadadarekar

भारतातील हजची 'मदत ' ही ' मदत ' नाही.

लोकशाही असल्याने सर्कारी पैशावर जनतेचा हक्क अहेच.

...

हिंदूनी नर्मदा परिक्रमा करावी. भरपूर पुण्य मिळते म्हणे.

....

सुबोध खरे's picture

25 Aug 2015 - 10:12 am | सुबोध खरे

कोणतीही यात्रा हा एक पर्यटनाचा प्रकार आहे ज्यामुळे स्थानीक लोकांना उत्पन्न मिळते. कुंभ मेळा आयोजित केला कि स्थानिक रिक्षावाले, दुकानदार, हॉटेल मालक, कलाकार फुलवाले नारळवाले इ यांना उत्पन्न मिळते. हाज ला जाणार्या लोकांचा हा पैसा सौदी अरेबिया ला मिळतो भारतातील लोकांना त्याचा दोन दमड्यान्चाही फायदा होत नाही. हज ला सबसिडी देण्यापेक्षा( जी केवळ मुस्लिम मतांसाठी दिली गेली होती/ आहे) तोच पैसा अजमेरच्या उरुसावर किंवा फतेहपुर सिक्री वर खर्च केला तरी चालेल निदान स्थानिक लोकांना ( वर म्हटल्याप्रमाणे यात हिंदू मुसलमान सर्वच आले) म्हणजे पर्यायाने भारतालाच फायदा होईल.त्यातून ज्याला हज ला जायचेच आहे त्याने स्वतःच्या पैश्याने जावे म्हणजे पुण्यही मिळेल. मनाला आल्हाददायक का काय तेही वाटेल

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 10:46 am | dadadarekar

धार्मिक यात्रा ही स्वतःच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करायची असते. त्यातून पैसा कुणाला मिळतो वगैरे बघायची गरज नसते.

माझा पैसा , परदेशातील लोक हा आप पर भाव असेल तर तुम्ही खुशाल नर्मदायात्रा करावी.

हजला जाताना हा आपपरभव सोडायचा असल्याने मुसलमान खुशाल हजला जातील मg ते कोणत्ञा का देशात असेना !

तुम्ही भारतीय दमड्या व त्यांचे भारतातील वाटप या सगळ्याच्या चिंतनात रमून जावे व त्यानुसार यात्रा कराव्यात.

आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा आम्ही आमच्या पैश्याची चिंता करतो. तुम्हाला हज ला जायचा तर जा की.
आणी जाताना असा आप पार भाव सोडून तुमच्या भारतीय दमड्या आम्हाला देऊन गेलात तर तुमची अधिक अध्यात्मिक उन्नती होईल आणी आमच्या मनालाही आल्हाददायक वाटेल.
हा प्रतिसाद मात्र हलके न घेता सिरीयसली घ्या अशी नम्र विनंती.

पैसा's picture

25 Aug 2015 - 1:16 pm | पैसा

=))

अजया's picture

26 Aug 2015 - 3:14 pm | अजया

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Aug 2015 - 7:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अचुक हाणलय डॉक =))

@दरेकर

"तिर्थक्षेत्री" जौन तिकडेच कायमचं रहाणार्‍यांना जास्तं पुण्य मिळतं म्हणे. पुण्यवान व्हा आणि मोठेही व्हा. तेवढे पैसे दानाचे पुण्य मिळवायचं बघा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाय द वे, हजची यात्रा स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून करावी असा नियम आहे असे ऐकतो... त्याचे काय ?

नाखु's picture

26 Aug 2015 - 3:18 pm | नाखु

तूर्तास स्वकष्टाची कमाई या शब्द्याची व्याखा+अर्थ लवचिक+सोयीस्कर केला आहे.

अभामिपाधुराळीधागेनियमीत्वचक्चावक्स्वादक संघ

थॉर माणूस's picture

26 Aug 2015 - 3:34 pm | थॉर माणूस

तीच तर गंमत आहे. म्हणूनच सरकार एअर इंडीयाला सबसिडी देतं. मग एअर इंडीया यात्रेसाठी खास सवलत असल्याचं जाहिर करतं. आणि यात्रेकरी "आपल्या" कमाईचा पैसा खर्च करून यात्रेला जातात. सगळं कसं नियमात. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2015 - 10:14 am | कैलासवासी सोन्याबापु

दंडवत घ्या दादा गरीबाचा _/\_

मृत्युन्जय's picture

26 Aug 2015 - 3:07 pm | मृत्युन्जय

या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार).

(वेळेत बुक केल्यास) मुंबैइ - जेद्दाह या मार्गावर एरवी तिकिटाचा दर २०० डॉलरच्य आसपास अहे म्हणजे साधारण १३००० रुपये. रिटर्न तिकिट साधारण साव्वातीनशे डॉलर म्हणजे २१००० रुपयात मिळते. हे बघता फार काही सवलत मिळते असे दिसत नाही. शिवाय त्यात एयर इंडियानेच प्रवस करावा अशी अट असेल तर ते एयर इंडिया साठी आणि पर्यायाने सरकारसाठी बरेच आहे की. एरवी एयर इंडियाने जायला लोक कुठे उत्सुक असतात?

पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे.

परवाच दुबईहुन परत आलो. तिकिट ७००० रुपयात मिळाले. काही दिवसांपुर्वी मुंबई चेन्नई प्रवास देखील केला. तिकीट २२००० रुपते होते. सांगण्याचा उद्देश हा की देशांतर्गेत तिकीट दर काही अनाकलनीय कारणांमुळे खुप जास्त आहेतचे त्यामुळे ही तुलना होउ शकत नाही.

मुंबई चेन्नई या प्रवासासाठी (रिटर्न नाही) जिथे २२००० रुपये तिकीट होते (ऐनवेळेस बुक केलेले) त्यापेक्षा कमी खर्चात (रु १७५००) नोव्हेंबर महिन्यात बेंगलोर सिंगापूर चे रिटर्न तिकीट मिळते आहे.

dadadarekar's picture

24 Aug 2015 - 2:31 pm | dadadarekar

उत्तर ध्रुवावरुन आलेले लोक पर्शियातुन आलेल्या लोकाना परदेशी म्हणतात तेंव्हा मला तर बै फार हसू येते!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Aug 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण कुठल्या सुर्यमालेमधुन आला आहात?

तुडतुडी's picture

24 Aug 2015 - 4:31 pm | तुडतुडी

पर्शिया , इराण , इराक मुळचे पारशांचे देश . अत्यंत क्रूर पद्धतीनं ते त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले . जे पारशी हिंदुस्थानात आश्रयाला आले त्यांनी त्यावेळी दिलेला शब्द ते आजही पळत आहेत . तेव्हा ते परदेशी असले तरी आम्ही त्यांना तसं मनात नै

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 9:54 am | dadadarekar

उत्तर ध्रुवावरुन आलेले म्हणजे हिंदू.

पर्शियातून आलेले म्हणजे मुसलमान.

हिंदू लोक मुस्लिमाना परकीय म्हणतात.

पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?

पैसा's picture

25 Aug 2015 - 10:37 am | पैसा

=))

विनोद१८'s picture

25 Aug 2015 - 2:00 pm | विनोद१८

तुझा इतिहसाचा इल्म वाढव, उगीचच वेड्यावाकड्या प्रतिक्रिया देउ नकोस.

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 2:10 pm | dadadarekar

मी माई नाही.

एकदा कानफाट्या नाव पडलं ना की कीतीही बोंबला...

नाखु's picture

1 Sep 2015 - 12:55 pm | नाखु

प्रश्न माईंना उत्तर यांचे

बाकी चालू द्या

एबीसीतेबीबीसीधग्यांचानित्वाचकास्वादक नाखुस

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Aug 2015 - 7:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुन काटछाट ठणकत असावी =))

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2015 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा

@पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?>> होय ना.. म्हणूनच तर ते या देशासाठी "जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।" अशी गीत रचत राहिले.. रहातील.. आणि देशासाठी लढले लढतील... तेच पारश्यांचेही.
पण तुझी बाकिची बाहेरनं आलेली प्रजा आनि त्यांचे इथेच जन्मुन तरिही स्वतःला इथे बांधील न करुन घेणारे टनाटनी इस्लामी / ख्रिश्चन लोक काय करतात या देशासाठी? सांग बरं?

dadadarekar's picture

26 Aug 2015 - 8:38 am | dadadarekar

बाबुल मोरा नैहर छूटोही जाए.

हे गोडसे गुर्जीनी लिवलय की काय !

प्रदीप साळुंखे's picture

24 Aug 2015 - 4:41 pm | प्रदीप साळुंखे

पुरे आता हे सगळं! सगळ्यांच्या भावना पोहचलेल्या आहेत.तरी नारळ-सुपारी घ्या आणि इतर धाग्यांवर जा.

माहितगार's picture

25 Aug 2015 - 11:32 am | माहितगार

=))

हाडक्या's picture

26 Aug 2015 - 2:54 am | हाडक्या

काका .. थांबा ना.. मले पयला शतकी धागा हवाय.. फकस्त दोन प्रतिसाद आजून.. ;)

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 3:02 am | प्यारे१

ह्याट लेका.... असा सोस नाही करायचा प्रतिसादांचा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2015 - 10:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

श्रीगुरूजी,

आपण निश्चित कुंभमेळ्यात जाऊन आले आहत न किमान एकदा? कारण माफ़ करा पण आपल्या प्रतिसादावरुन आपण फ़क्त रेटून कुठलेतरी कागदी गणित दिल्या सारखे बोलताय, तरीही जर आपण ते सत्य मानत असालच तर असो!!

dadadarekar's picture

26 Aug 2015 - 5:52 am | dadadarekar

श्रीमास्तुरे हे साक्षात्कारी महापुरुष आहेत. ते प्रत्यक्ष काहीही न बघता व न वाचताही त्या विषयावर सखोल लिहू शकतात.

dadadarekar's picture

26 Aug 2015 - 5:58 am | dadadarekar

कुंभमेळ्यातून अनेकाना रोजगार मिळतो म्हणून त्यावरचा खर्च जस्टिफाइड आहे , हे तर अजबच लॉजिक आहे.

आता या लॉजिकात या प्रकारात इनपुट किती व आउअटपुट किती हे विचारायचे नाही बरे का !

आपल्याला हवे ते लॉजिक रेटुन लावण्यात हे लोक पटाइत असतात.

अमित शहाच्या कुंभमेळ्याच्या खास स्नानाला धरणातून लाखो लिटर पाणीसोडले गेले. पण ही उधळपट्टी नाही बरं का ! पाणी सोडले की त्याचीच वाफ होऊन पुन्हा गोरगरिबांच्या शेतावर पाउस प्डावा या उदात्त हेतूने ते पाणी सोडले होते, असे दिव्य लॉजिक ही मंडळी लावतीलच.

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 8:43 am | मांत्रिक

आपले प्रतिसाद फार मोठे स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासपूर्ण अहवालांवर आधारित असतात बरे?

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 8:45 am | मांत्रिक

हा प्रतिसाद दादा दरेकर यांना आहे. हे ठिगळ त्यांच्या लुंगीलाच चिकटवावे.

राही's picture

26 Aug 2015 - 6:41 am | राही

अभिनंदन. हा १०१वा प्रतिसाद.
पण शंभरी गाठण्यात आमचाही हातभार आहे बरं का हाडक्याशेठ.

हाडक्या's picture

26 Aug 2015 - 2:24 pm | हाडक्या

धन्यवाद राही तै.. दोन दीस आस लौन बसलू होतू बगा.. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Aug 2015 - 7:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना भग्वदगीतेची हार्डबाईंड कॉपी (रंगीत छायाचित्रांसहित), कर्मण्येवाधिकारस्ते वाले कृष्णार्जुनाचे वॉलसाईज पोस्टर आणि कृष्णमुमुक्षुचा एक अंक देउन सत्कार करणेत येत आहे.

सुंतकरावांना बर्फाची पिशवी, हितेशोपनिषेध आणि कै.नेफळेचरित्र देउन श्रद्धांजली देण्यात येत आहे.

नाखु's picture

26 Aug 2015 - 9:58 am | नाखु

सूचना:
एक्दा दिलेला माल बदलून मिळणार नाही, सबब इथेच तपासून घेणे.
तोडफोड/ दर्जाबाब्त अजीबात हमी नाही.
बर्फाची पिशवी गळकी आहे का नाही ह्याबाब्त प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
चरित्राची एकच प्रत शिल्लक आहे जास्तीची मागू नये (झेरॉक्स वर काम भागवावे)
हितेशोपनिषेध चे पारायण वर्षातूब दोनदा करणे अनिवार्य ( बैलपोळा आणि शिमगा).

चिट(क्)वणीस

सत्कार समीती

आमी बी सत्कार समितीचे मेंब्र हावो ना चिमणराव. मंग असा आपल्यातच नसतोय वाटायचा पुर्स्कार !

बाकी ते बीबीसी आणि सगळ्या मिडियाला लोक्स विसरले इथंवर येईपर्यंत.. इ-मेलला काय त्यांनीतरी रिप्लाय दिल्ला नै. आणि पब्लिक आपसातच भांडत बसतंय हे त्यांना चांगलंच म्हैतेय हा..

दादा दरेकर भौ अथवा इतर कोणीही आहेत का की त्यांना असं वाटतंय की जे त्या बीबीसीच्या लेखातल्या बाबी सत्य आहेत अथवा किमान दिशाभूल करणार्‍या नाहीत ?
एक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र अस्ले काही छापत असेल तर सर्वांनीच निषेध करणं आपलं प्रथम कर्तव्य नाही का ? कारण तशी परिस्थिती असती तर तुम्ही इथे ज्या पद्धतीने लिहिताय त्यानंतर तुम्हाला तुमच्यावर हल्ल्याची भिती वाटली असती. नव्हे असे हल्ले होताना दिसले असते.
याऊलट तुम्ही तर तिसर्‍या मुंबईत घर घेताय, आपले उद्योग करताय, गीता आणि इतर धर्मातल्या गोष्टी अभ्यासताय (असा तुमचा दावा), त्यावर टिकाही करताय, इथे दंगा ही करताय त्याचबरोबर वरुन तुमचा फोटो ही टाकताय.
म्हणजे परिस्थिती इतकी वाईट नाही हे तुम्हाला दिसंतय तरीही तुम्ही त्या लेखाबद्दल एक अवाक्षर ही काढायला तयार नाही आहात ? हा तुमचा अथवा तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांचा दांभिकपणाच नव्हे काय ?

मी कोणाचाही समर्थक अथवा द्वेषी नाही परंतु असली स्वार्थी आणि स्वकेंद्रीत दांभिकता चीड आणते हे मात्र खरं.

dadadarekar's picture

26 Aug 2015 - 9:14 pm | dadadarekar

गावात हगवणीची साथ आली याचा अर्थ प्रत्येक नागरिक हगवणीने त्रस्त असतो असा नसतो ना ?

दादा दरेकर सुखात रहातो याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो , त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?

हाडक्या's picture

27 Aug 2015 - 3:45 pm | हाडक्या

गावात हगवणीची साथ आली याचा अर्थ प्रत्येक नागरिक हगवणीने त्रस्त असतो असा नसतो ना ?

तुमचा वास सोडलाच का हो. (ह.घ्या.)

बादवे, उदाहरण गंडलंय असे नमूद करतो. जे मुद्दे आहेत त्याच्याशी विसंगत आणि कोणत्याही प्रकारे लागू न होणारी उपमा वापरली आहे.

दादा दरेकर सुखात रहातो याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो , त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?

याचा अर्थ भारतात तुम्हाला कसलीही भिती न बाळगता आंजावर वावरता येतेय आणि स्वतःची प्रगती साधता येतेय हे तुम्हाला मान्य आहे. सध्या तेवढे तरी पुरेसे आहेच सुरुवात करायला.

याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो, त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?

अर्थ तुम्ही घ्याल तसा आहे. म्हणजे असं की एक सामान्य अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती (तुम्ही सामान्य नागरीक आहात हे गृहीत आहे. जर एखाद्या गँगशी संबंधित असाल, खरंच दादा वगैरे असाल, कोणी मोठे नेते असाल, मंत्री असाल तर अलाहिदा. ) जर आरामात आंजावर बहुसंख्य धर्माच्या लोकांना शिव्या घालू शकते, स्वतःची प्रगती साधण्याचे मार्ग इतर सामान्य नागरीकांप्रमाणेच चोखाळू शकते तर मग असे म्हणता येईल ना की अल्पसंख्यांक समाजातल्या बहुसंख्य लोकांना त्या संधी उपलब्ध आहेत (तुमच्यासारख्या आणि तुमच्या वरच्या सामाजिक स्तरातल्या).
हे तुम्ही मान्य केलेल्या फॅ़क्ट्सवर असल्याने तूर्तास इतकी मान्यता गृहित धरू.

विषमता : आता ही कोणाला फेस करायला लागत नाही हो ? तुम्ही तुमच्या कोषातून, गल्लीतून, मोहल्ल्यातून बाहेर पडला की सर्वांनाच वेगवेगळी विषमता फेस करावी लागते.
अगदी मी डावखुरा आहे म्हणून मला खूप सार्‍या विषमतेस तोंड द्यावे लागले.
उ.दा. गिटार क्लासवाल्याने न घेणे, शाळेच्या हॉकी टीममध्ये संधी न मिळणे, कात्रीने नीट कापू शकत नाही म्हणून शाळेतल्या बाईंचा ओरडा खाणे, देवळात प्रसाद न मिळणे (कारण मी उजव्या हातात घ्यायला नकार दिला होता) अशा क्षुल्लक कारणापासून ते इतर मोठ्या अशा भेदभावास सामोरे जावे लागलेय.
देशात ज्या त्या ठिकाणच्या तर विदेशात तिथल्या तिथल्या विषमता पाहिल्यात.

मुद्दा असा आहे की नेहमी व्हिक्टीम म्हणवून घेऊन भारतात तरी सदैव सहानुभुती मागत बसणं मला तरी अस्थायी वाटतं.
आणि ते ही एक परदेशी वृत्तपत्र तसं म्हणत असताना निषेधदेखील करावासा न वाटण देखील गैर आहे असं माझं मत आहे.

बाकी तुमच्याकडून किमान संयत विचाराची अपेक्षा करतोय. असो.

dadadarekar's picture

27 Aug 2015 - 7:11 pm | dadadarekar

डायरिया गॅस्ट्रोएंटेरायटिस ऐवजी हगवण टाइपायला सोपे म्हणुन वापरले...

तुम्हाला बीबीसीचा निषेध करायला कुणी अडवले आहे का ? मग तुम्ही बिनधास्त निशीध करा. पण तुमच्या मागोमाग आम्हीही आलेच पाहिजे हा तुमचा अट्टाहास आम्हावर लादु नका.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Aug 2015 - 9:03 am | अनिरुद्ध.वैद्य

बी बी शी हून कुंभात गाडी कधी आली?

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 12:42 pm | प्यारे१

त्यात काय?
ये मिपा है मेरे भाई.... एक कृष्णविवर ते दुसरं कृष्णविवर व्हाया दोन आकाशगंगा प्रवास होऊ शकतो एका धाग्यात.
टेंशन नै लेने का!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही गाडी पेशल हाय. जेला पायजे तशी लई ठेसनं घेत (व्हाया) येडीवाकडी जातीय बगा ! =))

याच धाग्यावर भारत-पाकीस्तान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हमेरीका-भारत, मराठी-परप्रांतीय, आयटी-नॉनाअयटी हे विषयही चर्चीले जातील. खात्री बाळगा.

आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन आयटीवाल्यांना मिपावर येण्यासाठी जास्त पयशे खर्च करावे लागतात त्यामुळे नॉन आयटीवाल्यांना नेटपॅक साठी सबसिडी द्यावी.

खटपट्या's picture

26 Aug 2015 - 4:51 pm | खटपट्या

नेटपॅकसाठी लोन देते का बँक ? म्हणजे नंतर कर्जमाफीपण येइल...

नाखु's picture

27 Aug 2015 - 3:57 pm | नाखु

जुनं लोन बुडवल्याचा पुराव द्या मग आणि मगच नवीन लोन देवून ते माफ करण्याचा विचार केला जाईल.

माझेतेमाझेतुझेतेहीमाझेस्वाहाकारीपतसंस्था.
टगेवाडी-आदर्शपूर शाखा

खटपट्या's picture

27 Aug 2015 - 5:46 pm | खटपट्या

ख्खिक !!

अगम्य's picture

27 Aug 2015 - 11:58 am | अगम्य

जर भारतात कुठल्याही कारणासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होत असतील तर त्यासाठी सुविधा देणे हे भारत सरकार आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रोज मुंबैबाहेरून लाखो लोक येतात. तरीही मुंबईचे प्रशासन त्यांच्यासाठी सुविधा देते. त्याचप्रमाणे जर भारतात कोठे राष्ट्रीय किंवा आंतर राष्ट्रीय स्पर्धा असतील तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुविधा दिल्या जातात. तसेच जर हिंदू उत्सव किंवा मुसलमानांच्या कुठल्या पिराचा उरूस भारतातील कुठल्या ठिकाणी असेल तर त्यासाठी एक host म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ह्या सुविधा म्हणजे infrastructure प्रकारच्या असणे अपेक्षित आहे. हिंदू अथवा मुस्लिमांच्या उत्सवांसाठी सरकारने फुकट जेवण देणे अपेक्षित नाही. हज यात्रेसाठी भारत हा host नसल्यामुळे अशा सुविधा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु जर बरेच मुस्लिम एखाद्या विमानतळावरून किंवा बंदरावरून मक्केला जात असतील तर त्यांना विमान किंवा बोट पकडण्यासाठी infrastructure देणे ठीक आहे. विमान भाड्यात सवलत देणे अप्रस्तुत आहे.

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 4:10 pm | तुडतुडी

'नॉट विदाउट माय डॉटर' वाचतेय सध्या . गेल्या महिन्यात कारमेन बिन लादेन चं the veiled kingdon (बुर्ख्यामागचे साम्राज्य) वाचलं. शिसारी आली वाचताना . याबद्दल BBC, dadadarekar आणि तत्सम लोकांचं काय म्हणणं आहे ?

हजला जाताना हा आपपरभव सोडायचा असल्याने

हसून हसून डोळयात पाणी आलं . मक्का , मदिनेच्या वेशीवरच ते लोक कर्ने घेवून जोरजोरात ओरडत असतात . गैर मुस्लिमांनी माघारी फिरावं म्हणून . मुस्लिम सोडून इतर कोणालाही मक्का , मदिनेत प्रवेश नाही . भारतीय सरकारचा काय संबंध ह्या सगळ्याशी ? आम्हाला आपपरभव सोडायला शिकवणारे स्वतः काय करतात ?

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 4:53 pm | dadadarekar

इंदिरा गांधी परधर्मीय आहेत म्हणून त्याना जगन्नथ पुरीच्या मंदिरात घेतलं नव्हतं म्हणे !

lakhu risbud's picture

31 Aug 2015 - 7:19 pm | lakhu risbud

हे dadadaekar आणि यांचे असेच काही आयडीज यांचा कर्ता करविता Multiple personality syndrome चे शिकार आहेत का याची एकदा शहानिशा झाली पाहिजे

घ्या की प्रोजेक्ट हाती. बरेच लोक मदत करतील...

तुडतुडी's picture

1 Sep 2015 - 1:07 pm | तुडतुडी

dadadarekar असं कोण म्हणे हो ? आणि तसं झालं जरी असेल तरी आम्ही एक बोलावं आणि दुसरंच करावं असं नै कै करत. राहुल गांधीने एका भवानी मंदिराला भेट दिली गेल्या आठवड्यात . तो फोटो बघा जरा . शनिवारी मी मारुतीच्या मंदिरात गेले होते . तिथे १ बुरखाधारी स्त्री रुइचि माळ , तेल वगेरे घेवून पूजा करायला आली होती . मी तिथल्या कर्मचार्यांशी बोलले . (तिथली व्यवस्था बघणाऱ्या लोकांशी ). मग त्यांनी तिला तंबी दिली . बुरखा घालून मंदिरात यायचं नाही म्हणून.
आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा

इरसाल's picture

1 Sep 2015 - 3:17 pm | इरसाल

आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा

एक सांगा लुंगीत असं काय झाकुन ठेवतील ? तुमी पण णां ?