स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :(
>पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !
वेदश्री,
मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
>आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता..
>ऊन्हात भटकणे वर्ज.
हे केले आहे.
> फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :(
>किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा..
>रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय..
>जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही..
>दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही.
>हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे!
त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!!
कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
-(निमहक़ीम) ध मा ल.
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!!
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :(
>कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी.
हे एक बरं झालं.
> त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
>का बरे?
कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :(
>>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
>म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
चांगली दिसत नाही ना पण..
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !
एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा!
धर्मराजमुटकेजी,
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST
पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!
पराशेठ,
अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.
बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
पोहणे हाही एक मस्त उपाय
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! )
>उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले !
>पोहणे हाही एक मस्त उपाय
येत नाही त्यामुळे शक्य नाही.
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे.
पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे.
तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
:,(
>ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X(
आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
(सहमत)केशवसुमार
स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?
दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव.
सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे.
२-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील).
तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही...
फारच त्रास होत असेल तर...
थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या.
आता कोपर्यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात....
डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
आपला,
(धन्वंतरी) धोंडोपंत :D
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते.
>दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.
>तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते.
>गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे.
हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची.
>शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/
वेदश्रीधर्म?
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
दशावतरी पहनारा इजुभौ आगरी
:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच...
मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :<
प्रतिक्रिया
गुलकंद
टक्क्ल
स्पाईक कट
आपल्या सारख्या आयडीचे
सम्पादक
धन्यवाद मनस्वी
वेदश्री, मल
धन्यवाद आर्य
वैद्यराज
धन्यवाद ध.मु.
तळपायाला
चांगली दिसत नाही..
आयला...
बुटाचा निराळा मामला आहे..
हा काय प्रकार आहे?
मी येतो रे
चल धम्या मी आलोच
धम्या प्रश्न सुटला का रे?
उत्तर पण सुटलं,
अगं बाई
रात्री तळपायाला तेल लाव,
काय ताई तुमी बी ?
काय हरकत आहे?
..
गुजरातेत 'बसायची' व्यवस्था
आ?
एका बादलीत
धन्यवाद विजुभाऊ
रे देवा....
>रे देवा...!
अगं वर
सहमत..
द्या घालून...
रोज..
छ्या:....
हाहाहाहाहाहा
एक उपाय आणखी...
दोन्ही थंड केलेले.....
हे हे हे
नो कॉमेंट्स
अरेरे...!
च्यामारी...
पोहणे हे सबल मात्र, तरण तारणाचा मंत्र !!
तुळशीच्या बिया
धन्यवाद धोंडोपंत
वेदश्रीधर्म
वेदश्रीधर्म?
अर्जुन्या नाय जी..
म्या कुटं
गरमी .....