टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
या गरमीला काय करावे बॉ?
प्रेषक वेदश्री ( सोम, ०४/२८/२००८ - १२:४१) .
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


गुलकंद
गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
टक्क्ल
टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो
--
असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!
धन्यवाद मनस्वी
>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे..
>पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !
वेदश्री, मल
वेदश्री,
मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
धन्यवाद आर्य
>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
>आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.
बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता..
>ऊन्हात भटकणे वर्ज.
हे केले आहे.
> फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे.
>किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा..
>रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय..
>जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही..
>दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही.
>हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !
वैद्यराज
वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे!
त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!!
कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
-(निमहक़ीम) ध मा ल.
धन्यवाद ध.मु.
>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!!
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
>कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी.
हे एक बरं झालं.
> त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.
तळपायाला
का बरे?
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
चांगली दिसत नाही..
>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
>का बरे?
कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला?
>>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
>म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
चांगली दिसत नाही ना पण..
आयला...
पण प्रॉब्लेम काय आहे?
एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!
करुन बघच...कस्सलं गारगार वाटतं
बुटाचा निराळा मामला आहे..
>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे.
पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !
हा काय प्रकार आहे?
बुट पायात घालतात ना?
मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात?
आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी....
मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला....
ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं....
ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला...
बोला कोणकोण येतंय?
मी येतो रे
चल जाउयात !
अगं बाई
तळपायाला. कोणी तुला पायावर नक्षीदार मेंदी काढायला नाही सांगते.
एका बादलीत
एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.
बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
पोहणे हाही एक मस्त उपाय
धन्यवाद विजुभाऊ
>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! )
>उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले !
>पोहणे हाही एक मस्त उपाय
येत नाही त्यामुळे शक्य नाही.
रे देवा....
कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे.
पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे.
तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
>रे देवा...!
>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
:,(
>ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.
अगं वर
अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ?
आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
सहमत..
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
(सहमत)केशवसुमार
स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?
द्या घालून...
गाठ या दोघींची. ती वरदा. (वरदा वैद्य नव्हे, फक्त वरदा. नाही तर तुम्ही भलताच घोळ करायचे.)
रोज..
दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव.
सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे.
२-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील).
तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.
छ्या:....
अनुष्पोटी
मी अनुष्कापोटी वाचले. सॉरी.....
हाहाहाहाहाहा
अगदी हेच म्हणतो...
एक उपाय आणखी...
हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही...
फारच त्रास होत असेल तर...
थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या.
आता कोपर्यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात....
डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.
दोन्ही थंड केलेले.....
>>बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आणी स्वतः फ्रिजमध्ये बसून प्यावे.. म्हणजे त्रिवेणी संगम!
हे हे हे
भारीच. पण धम्याचा उपायपण भारी
नो कॉमेंट्स
नो कॉमेंट्स
अरेरे...!
रे धमाल मुला,
तू रामदासस्वामींना विवाह सोहळ्याचे वर्णन करून सांगतो आहेस.
च्यामारी...
च्यामारी...
पोहणे हे सबल मात्र, तरण तारणाचा मंत्र !!
पोहणे हाही एक मस्त उपाय
आहा हा......!!!....काय उपाय सांगीतलात विजूभाऊ, कृष्णा काठ अठवला.
तुळशीच्या बिया
एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
आपला,
(धन्वंतरी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
धन्यवाद धोंडोपंत
>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते.
>दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.
>तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते.
>गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे.
हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची.
>शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते?
वेदश्रीधर्म
अरे बापरे!
वेदश्रीधर्म?
वेदश्रीधर्म?
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
दशावतरी पहनारा इजुभौ आगरी
अर्जुन्या नाय जी..
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा !
म्या कुटं
गरमी .....
मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :<
मास्तर,
मास्तर, अहो काय हे? आयला !!!!
खो खो खो..
काय मास्तर
सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच...
हा हा हा हा..
(संशयी)केशवसुमार
स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!
मलाही तेच
मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड)
मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो..
त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे??
किंगफिशर
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल...
बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही
बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल
वेदश्री,
महत्वाची सूचना:
वरील सर्व उपाय एकाचवेळी करू नयेत. नाहीतर?????????
कायमची..
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
केशवसुमार
स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?
या थंडी (शीत प्रकृती)ला काय करावे
असे विचारत बसावे लागेल!
कोकम सरबत
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली,
१. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित,
२. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल.
मुकुल
अनुभव...
सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल.
माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)
बरोबर, पण...
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं....
एक उपाय आणखी...
भरपुर गरम चहा प्या कारण शेवटी जहर ही जहर को काटता हे
पाटणकर काढा
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी
दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे.
ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे.
आयुर्वेद प्रेमी,
अण्णा हजारे