मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

राजेंद्र मेहेंदळे · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?

वाचने 43114 वाचनखूण प्रतिक्रिया 142

एस Tue, 01/02/2018 - 18:56
'द हिंदू' मधील खालील बातमी वाचा. नक्की काय झालंय याची फारशी माहिती नाहीये. http://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-tense-a-day-after-clashes-during-bicentenary-celebrations-of-koregaon-bhima-battle/article22352367.ece?homepage=true

In reply to by टवाळ कार्टा

एमी गुरुवार, 01/04/2018 - 08:44
+१ हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(

In reply to by एमी

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 22:34
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?

In reply to by एमी

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 22:35
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?

महाठक Tue, 01/02/2018 - 20:43
हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सणसवाडी दगडफेकीप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

रमेश आठवले Tue, 01/02/2018 - 23:25
भीमराव आंबेडकरांना त्याचे शिक्षक केळुस्कर ( ब्राह्मण ) बडोद्याचे महाराज सयाजीराव ( मराठा ) यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला तुम्ही उच्च शिक्षणासाठी मदत करा. सयाजीराव यांनी दिलेल्या मदतीमुळे आंबेडकर इंग्लडला उच्च शिक्षणासाठी गेले.

खबो जाप Wed, 01/03/2018 - 16:41
काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे चॅनेल १-- भिमा कोरेगाव ला स्मारकाचे दर्शन घेण्यास आलेल्या मागास्वर्गीयांवर हल्ला झाला पृथ्वीराज चव्हाण आणि बारामती च्या साहेबांच्या मते एव्हढी गर्दी होणार माहित असून सरकारने काही उपाय योजना केली नाही आणि सरकार अपयशी ठरले आहे. चॅनेल २ - दोन जमावामध्ये हाणामारी झाली, फडणवीस साहेबांच्या मते दरवर्षी १५ हजार लोक येतात पण ह्यावेळी ३ लाख लोक आले , हे लोक मुद्दामहुन जमा केले गेले जेणेकरून सरकार अडचणीत येयील पण पोलिसांच्या तुकड्या आधीच मागवून ठेवल्या होत्या त्यामुळे ज्यास्त इशू झाला नाही खर खोटं देव आणि दंगल करणारेच जाणोत

कंजूस Wed, 01/03/2018 - 18:23
टिव्ही 9 मराठी चानेलवर जिग्नेश मेवानि सभेमध्ये काय बोलत होता ते काल दाखवत होते.त्यानंतर काही राडा झाला. नंतर प्रतीराडा. हे रेकॉर्डिंग करायला रिमोटचे बटण दाबले तर रेकॉर्डिंग सुरू होईना. परंतू चानेलवाल्यांनी ती क्लिप दाखवणे योग्य नाही समजून बंद केली ते बरे केले. परंतू लोकांनी जरा समजूतदारपणा आणि संयम बाळगायला हवा. एसटी बसेस जाळणाय्रांना गरिबांचे वाली कोण म्हणेल? सरकार कुणाचेही असले तरी जनतेला पोहोचवणारी बस तीच असते ना?

In reply to by कंजूस

ओम शतानन्द Fri, 01/05/2018 - 09:21
दलित आंदोलनामध्ये नेहमी st बस , बेस्ट , ट्रेन यांच्या काचा फोडणे जाळपोळ असे प्रकार होतात व खूप नुकसान होते , यावर एक उपाय सुचला आहे तो असा आहे st, बेस्ट ,रेल्वे यांनी आपल्या ताफ्यातील २५ टक्के गाड्या या फक्त दलित आंदोलकांना तोडफोड करण्यासाठी स्वखुशीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी वेगळ्या बजेट ची योजना करावी , तसेच या गाड्यावर तसी सुचना असलेला बोर्ड लावावा . यामुळे तोडफोड केल्याबद्दल खटला दाखल करून कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही , व कुणाला तक्रार ही करता येणार नाही , तसेच आंदोलकांना निर्भयपणे मनसोक्त तोडफोड करता येईल , त्यांचा मान राखला जाईल

पुंबा Wed, 01/03/2018 - 19:43
आपल्या वरकरणी एकसंध दिसणार्‍या समाजातल्या फॉल्टलाईन्स उघड्या पडल्या. दुसरं काय? असे प्रसंग फार दुखःद आहेत. इतिहास उगाळून नक्की कोणता फायदा आपल्या समाजाचा, देशाचा झालाय, होतोय काय माहित? निव्वळ माथेफिरू, हुल्लडांच्या हातात कोलित मिळते. आजच्या प्रश्नांना भिडण्यापेक्षा शेकडो वर्षापुर्वीच्या घटना चिवडत बसणार्‍या समाजाची प्रगती कशी होणार असा खिन्न प्रश्न समोर येतो.

श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 20:17
आंबेडकरांसंबंधी काही वादग्रस्त घडले की दलित अत्यंत संतप्त होतात असे माझे निरीक्षण आहे. किंबहुना ते संतप्त होतात हे ओळखून त्यांना जास्त भडकावले जाते. १९८७ मध्ये महाराष्ट्र सरकार आंबेडकरांनी लिहिलेल्या "रिडल्स ऑफ हिंदुइझम" हे पुस्तक प्रकाशित करणार होते. त्या पुस्तकातील "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" हे अत्यंत वादग्रस्त प्रकरण सरकारने वगळायचा निर्णय घेतल्यानंतर असेच वातावरण पेटविले गेले. पुस्तकातील प्रकरणांना शिवसेनेचा कट्टर विरोध होता. परंतु प्रकरणे वगळल्याचे जाहीर झाल्यानंतर दलितांना भडकावून मुंबईत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्च्याला प्रत्त्यूत्तर म्हणून त्याच वेळी शिवसेनेने तितकाच मोठा मोर्चा काढला. दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्यानंतर मुंबईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी काहीतरी घडले असे अंधुकसे आठवते. नंतर १९९७ मध्ये घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला रातोरात चपलांचा हार घातल्याचे आढळल्यावर त्या भागातील दलित प्रचंड संतप्त झाले होते. त्यावेळी जमावावर पोलिसांकडून गोळीबार होऊन १० जणांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण त्यावेळी इतके पेटले होते ही तत्कालीन मनोहर जोषी सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार होती. काँग्रेसने हे प्रकरण खूप पेटविले होते. या प्रकरणाची भाजप-शिवसेना युती सरकारला मोठी किंमत चुकवायला लागली होती. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. परंतु १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत युतीला जेमतेम १० जागा मिळाल्या. त्या निवडणुकीत प्रमोद महाजन पराभूत झाले होते. नंतर १९९९ मधील विधानसभा निवडणुकीतही युतीला १२५ जागांवर समाधान मानून सत्ता गमवाव लागली होती. २०१८ मध्ये झालेली घटना त्याच परंपरेतील आहे. आंबेडकरांनी कोरेगाव येथील स्तंभाला अभिवादन करण्याची प्रथा सुरू केली. त्या अभिवादन कार्यक्रमात दगडफेक झाल्याने पुन्हा एकदा मागचीच पुनरावृत्ती झाली. पुन्हा एकदा असंतुष्ट पुढार्‍यांनी हे प्रकरण पेटविले. एक समाज म्हणून आपण आजही खूपच अप्रगल्भ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३०-३१ वर्षानंतर सुद्धा आपण अजूनही प्रतिकांमध्येच अडकून पडलो आहोत. वैयक्तिक प्रगतीपेक्षा इतिहासालाच सर्वस्व मानणे, इतिहासातच अडकून पडणे आणि प्रतिकांच्या मानसन्मालाच अवाजवी महत्त्व देणे यातून अजूनही सुटका नाही. जातीयवाद कमी झाल्यासारखा वाटला, शहरात जातीयवादाची तीव्रता कमी भासली, भारत आधुनिक मार्गावर गेल्यासारखा वाटला तरीसुद्धा अशा घटना घडल्यानंतर असे दिसते की आपण अजूनही प्रतिके आणि इतिहासातच गुंतुन गेलो आहोत ज्याचा व्यावहारिक जीवनात फारसा उपयोग नाही.

shiv कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी आज प्रसिद्घी पत्रकाद्वारे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भिडे गुरूजींवर आरोप केले होते. तसेच याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुत्ववादी शक्ती या दंगलीमागे असल्याचा आरोप केला होता.पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे.

शिवाजी पार्क ला दरवर्षी लाखो दलित बाबासाहेबांना अभिवादन करायला जातात तसेच हे भिमा कोरेगाव. जसे तिथेही स्थनिक लोक समजुन मदत करतात किवा गर्दी टाळतात तसेच इथेही दरवर्षी होते. पण विशिष्ट राजकिय लोकांनी येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन हे प्रकरण घडवले आणि तापवले आहे असे बातम्यांवरुन वाटते. बाकी दगड्फेक करायला काय? पैसे देउन कितीही लोक मिळतात. त्यांचा कुठल्याही विचारसरणीशी काय संबंध नसतो. जाता जाता- या सगळ्यामुळे जे आर्थिक नुकसान झाले आणि व्यवहार ठ्प्प झाले ते कोण भरुन देणार?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नितिन थत्ते गुरुवार, 01/04/2018 - 08:00
>> येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन नजीकच्या भविष्यकाळात (मे २०१९ पूर्वी) कोणत्या निवडणुका येऊ घातल्या आहेत हो?

श्रीगुरुजी Wed, 01/03/2018 - 21:06
३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर, कोळसेपाटील, जिग्नेश मेवाणी, उमर खालिद इ.नी मुद्दाम शनिवारवाड्यावर सभा घेऊन भाषणे ठोकली होती. अर्वाच्य वक्तव्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या मेवाणीने "मोदींच्या डोक्याची सफाई करण्याची आवश्यकता आहे" अशी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. जनेवित "भारतके टुकडे करेंगे"च्या घोषणा देणारा व देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला उमर खालिद, अत्यंत वाचाळ व सातत्याने जातीयवादी वक्तव्ये करणारे कोळसेपाटील, राजकारणातून पूर्णतः हद्दपार झालेले व भविष्यात कोणतेही राजकीय भवितव्य नसलेले आणि सातत्याने संघ-भाजप विरूद्ध गरळ ओकणारे प्रकाश आंबेडकर असे नमुने तिथे मांडीला मांडी लावून बसले होते. शनिवारवाड्यासमोर मुद्दाम सभा घेण्यामागे जातीयवादी उद्देश होता. या सर्वांनी तिथे ३१ डिसेंबरला भाषणे ठोकली व १ जानेवारीला दगडफेक झाली हा योगायोग नव्हे.

In reply to by श्रीगुरुजी

अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 19:23
राजकारणाशी संबंध असणार तर बोला , मी तुम्हाला ओळखत नाही पण . तूम्ही आंबेडकर साहेबांना असे बोलु शकत नाही . तूम्ही तूमची तीथच झ**डा निवडणूक लढा मग पाहू

कपिलमुनी Wed, 01/03/2018 - 22:05
कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीही ७ जणांसह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रमाकांत विठ्ठल शिवले (वय ४०, रा. वढू बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी कोणीतरी संभाजीमहाराज यांच्याविषयी लिहिलेला फ्लेक्स चिकटवला होता. हा फलक गावातील काही व्यक्तींनी वाचल्यानंतर काढून टाकला. या कारणावरून संदीप शंकर गायकवाड, सनी कांबळे, अशोक ऊर्फ पांडा बाळू गायकवाड, बळीराम गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, संदीप शंकर गायकवाड, शैलेश शंकर गायकवाड (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) व इतर १० ते १५ महिलांनी बेकायदा जमाव गोळा करून फिर्यादीसह सरपंच व इतर ग्रामस्थांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करत आहेत. दरम्यान, पोलीस हवालदार पुनाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वढू बुद्रुक येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांची सरकारी गाडी उभी केली होती. या वेळी स्वप्निल गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, सनी कांबळे, शैलेश गायकवाड व इतर १५ ते २० जणांनी जमाव जमा करीत आरडाओरडा केला. तसेच पोलीस पथकाच्या दिशेने स्वप्निल गायकवाड याने दगड फेकला. यामध्ये उपविभागीय अधिकाºयांच्या गाडीची काच फुटली. आरोपींनी घोषणाबाजी करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला व गाडी फोडली, म्हणून पोलिसांनी वरील आरोपींच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंदगोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत व माहितीफलक काढल्याप्रकरणी शुक्रवारी दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ४९ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांनी केले. दरम्यान, वढू बुद्रुक येथे शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलिसांसह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.

साहना Wed, 01/03/2018 - 22:34
अस्पृश्यता ज्या प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळे समाजात फोफावली होती अगदी त्याच प्रकारची अतिअंध श्रद्धा तथाकथित दलित लोक त्याचे तथाकथित दैवत "आंबेडकर" ह्यांच्या बद्दल दाखवत आहेत. आंबेडकर आणि तथाकथित आंबेड्करवादाचा ठाव घेणारे अरुण शौरी ह्यांचे "Worshiping False Gods" हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ह्या पुस्तकाच्या नावानेच काही जणांना फिट्स येतात. महत्वाकांक्षा आणि परिश्रम ह्याचे ज्या समाजात स्थान असते त्यामुळे त्या समाजाची प्रगती होत असते. ज्यू लोकांना काय काय त्रास सहन करावे लागले हे सर्वानाच ठाऊक आहे पण आज सुद्धा ज्यू लोक जगातील अत्याधिक श्रीमंत समाजापैकी एक आहेत. ह्या उलट कृष्णवर्णीय लोक आणि रेड इंडियन लोक ह्यांना आयते फुकट सरकारी लोणी मिळत असल्याने त्यांची वाताहत तर झाली आहेच पण वरून आपल्या अपयशासाठी ते इतरांना आणि निरर्थक ऐतिहासिक घटनांना जबाबदार धरत आहेत. दलित लोकांनी ब्रिटिशांची गुलामी एवढी अभिमानाने सांगावी ह्या इतका मूर्खपणा दुसरा काहीही नाही. ब्रिटिश लोकांनी काय कुणालाही युद्धांत cannon fodder म्हणून वापरले असते. महारांची तलवारबाजीने अतिशय भारावून जाऊन राणीने त्यांना युद्धांत पुढे पाठवायचा निर्णय वगैरे घेतला नव्हता. ब्रिटिशांनी भारतांत सुमारे २० लक्ष ते १ कोटी लोकांना निव्वळ दुष्काळजन्य परिस्थिती करून मारले. अश्या आर्थिंक कोंडीत दलित लोकांचे सर्वाधिक बळी गेले. अश्या ब्रिटिशाना उगाच समता, दलितांचा पुळका इत्यादी शब्द लावून डोक्यावर चढवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही पण एकही भारतीय राजाने दलितांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि शोषण घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. नको ते विषय काढून दलित लोकांना रस्त्यावर आणून काही लोक दलित समाजाला टोटल मूर्ख बनवत आहेत आणि दलित समाज बनत सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे एकूणच दलित समाजाची वाटचाल आहे त्यावरून ते असेच मूर्ख बनत राहणार असे वाटते. मडगांव गोवा मध्ये एका सारस्वत ब्रह्माणाने, सारस्वतांना सुद्धा राखीव जागा मिळाव्या म्हणून भव्य मोर्चा काढायचे ठरवले. गावागावातून बसेस वगैरे ठेवल्या आणि मोर्चाचे स्थान लोहिया मैदान ठरवले. लोक आले सुद्धा पण मडगांवांत उतरताच त्यांनी सरळ मत्स्यमार्केटचा रास्ता धरला आणि इसवण, पापलेट वगैरे घेऊन परतीची बस घेऊन सर्वजण घरी गेले. विनोद असला तरी जो समाज राजकीय दृष्ट्या एक "ग्रुप" म्हणून विशेष मूल्य ठेवत नाही तो समाज अत्यंत वेगाने प्रगती करतो असे दिसून येते कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. अमेरिकेत राजकीय दृष्टया सर्वाधिक प्रभावी आयरिश अमेरिकन सर्वाधिक गरीब गोऱ्या व्यक्ती पैकी आहेत. अमेरिकन भारतीय आणि अमेरिकन जपानीस सर्वाधिक श्रीमंत लोकांपैकी आहेत. तेच नाही तर अगदी नायजेरियन आणि सोमालियन अमेरिकन सुद्धा स्थानिक काळ्या लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. दलितांनी आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारक इत्यादींचा नाद सोडून त्यांच्या प्रमाणे चांगले शिक्षण घेतले आणि उद्योग धंदे केले तरच त्यांना काही भवितव्य आहे नाही तर कोरेगाव मध्ये ब्रिटिशांनी त्यांना cannon fodder म्हणून वापरले तिथे इस्लामिक, कांग्रेसी, भाजपायी इत्यादी वापरतील.

In reply to by साहना

ट्रेड मार्क गुरुवार, 01/04/2018 - 03:59
ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. भारतीय लोक खास करून महाराष्ट्रीयन जरा जास्तच परधार्जिणे होते आणि अजूनही आहेत. आपापसात भांडायला काही कारण लागत नाही त्यामुळे मेवानी, खालिद सारख्या लोकांचं फावतं. मेवानीने तर दलितांचा लढा लोकशाही मार्गाने न लढता रस्त्यावर लढून मिळवा असं एका सभेत जाहीर आवाहन केलं होतं. त्यावर कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. असल्या भाषणांमुळे लोकांच्या भावना भडकून पुढे सगळं घडलं.

In reply to by साहना

एमी गुरुवार, 01/04/2018 - 08:39
पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही >> याबद्दल थोडं अधिक लिहा की म्हणजे "ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे." असले (कदाचीत) गैरसमज होणार नाहीत! === कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. >> 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??

In reply to by एमी

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 22:39
'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.

In reply to by एमी

ट्रेड मार्क Fri, 01/05/2018 - 23:52
अॅमीजी, मराठी सेनेला हरवण्यासाठी महार लोक ब्रिटिशांना जाऊन मिळाले यात भूषण मानण्यासारखं काय आहे? बरं ते एवढेच जर शूर होते की ३०००० मावळ्यांना हरवायला ३०० महार सैनिक पुरेसे होते तर मग ब्रिटिशांची गरज कशाला पडावी? ३००० महारांनी एकत्र येऊन इतर सगळ्या राजवटी उलथून टाकायच्या आणि आपलं राज्य स्थापन करायचं होतं ना. ब्रिटिशांनी कधी कुठल्या भारतीयाला नीट वागवलं होतं का, की या महारांना वाटलं त्यांना नीट वागवतील! २०० वर्षांपूर्वी जे घडलं ते घडलं पण मग आता त्याचा सोहळा करायची गरज आहे का? त्यापेक्षाही काही शे वर्षांपूर्वी जर दलितांना नीट वागवलं गेलं नसेल तर त्याचा बदला आत्ता कशाला घ्यायचा? एकीकडे गांधीजींची आणि गौतम बुद्धांची तत्व पाळतो म्हणायचं आणि दुसरीकडे द्वेष करायचा, हिंसा आणि नासधूस करायची. याला काय म्हणावं? ब्राह्मणांचा एवढा द्वेष करता, सध्याच्या काळात कुठल्या ब्राह्मणांनी दलितांना किंवा अगदी इतर कुठल्याही जातीतील लोकांना त्रास दिलाय ते उदाहरणासहित सांगा. या उलट ब्राह्मणांच्या मुलांना अगदी शाळेत असल्यापासून बामन आणो डाळभात खाणारा म्हणून चिडवलं जातं. त्या शाळकरी मुलांमध्ये कुठून हा द्वेष येतो? कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना, नोकरी मिळवताना आरक्षण असूनही कुठल्या ब्राह्मणांच्या गटाने मोर्चे काढलेत किंवा राजकीय खेळ्या खेळल्यात? माझ्या मते तर लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्या मुख्य जातींमध्ये अल्पसंख्यांक ब्राह्मणच असतील. तरी अल्पसंख्यांक आहोत असा टाहो फोडून फायदे लाटायचा कधी प्रयत्न केलाय का? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं. मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका.

In reply to by एमी

ट्रेड मार्क Mon, 01/08/2018 - 06:23
मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसला की असे प्रतिसाद येणारच. दलितांनी आपली अस्मिता सवर्णांपासून शाबूत राहावी म्हणून इंग्रजांशी हातमिळवणी केली. मग त्यातून त्यांची अस्मिता शाबूत राहिली का? इथे अस्मिता हे मुलीचं नाव नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. इथे म्हणताय "जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय" कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये. इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही. असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग!

आपल्या राजकारण्यांचे उपद्व्याप पाहिले की भारताला खाली खेचायला पाकीस्तान आणि चीनची गरज नाही असेच वाटते. सगळा प्रकार शिसारी आणणारा आहे. :( The less said the better. आपण इतिहासातिल अनुभवावरून काहीच शिकू शकत नाही हे गेल्या २,००० वर्षांच्या घटनांवरून सतत दिसत आहे.

सुखीमाणूस गुरुवार, 01/04/2018 - 09:16
मी कालपासून मला आलेला एक कायप्पा संदेश ईथे डकवण्याचा प्रयत्न करते आहे. ______________________________ भिमा कोरेगांव का घडले ?? प्रत्येक मराठा बांघवांनी त्या ५०० महार वीरांना का वंदन करावं ?? खरा ईतिहास काय आहे ? आपले खरे शत्रू कोन ? खोटा ईतिहास खुप वाचलात आता........ सत्य वाचा अणि विचार करा .. नगर रोड वरील भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर " वढु " गांव आहे....... ____________________________________________________ येथेच "छ.संभाजी महाराज" यांचा कपटनितीने खुन झाला व त्यांच्या देहाचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले गेले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल...... भयानक, थरकाप ऊडवणारी स्मशान शांतता....... आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही """मराठा"""" पुढे आला नाही. पण एका ""पहिलवानाला"" 'ही बातमी समजली आभाळ फाटलं होतं! त्यातही तो धाडस करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंप्याला" हातपाय पडुन ते जोडण्यासाठी तयार करतो, आपला राजा आहे त्यास असं....... नाही सोडू शकत आपण..... तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाचं धाडस पाहुन त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात.... आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्निदान स्वत: तो पहिलवान देतो....." त्या पहिलवानाचे नाव होते "'""' गणपत महार """" """" जय भिमवाला """" '''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली. आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही """ महार वाडयात """ आहे.... ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... तो दिवस होता """१जानेवारी म्हणुन हा "शौर्य दिन म्हणून "" पाळला जातो, साजरा करण्यात येतो.... """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... - यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा. ____________________________________________________ हा इतिहास अत्ता का बाहेर आला याआधी का नाही?

In reply to by सुखीमाणूस

सूड गुरुवार, 01/04/2018 - 12:48
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या
पेशव्यांविरुद्ध लढताना बदला घेणं म्हणायला, राजांचा खून पेशव्यांनी केला होता??

In reply to by सुखीमाणूस

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 14:38
ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली? एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील. दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का? संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय. """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... २५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय. """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.

In reply to by श्रीगुरुजी

साहना Fri, 01/05/2018 - 13:15
काही दिवस थांबा कुणी दलिताने युरोप मध्ये जाऊन वास्को द गामा ला भारतांत समतेची गुढी उभारायला बोलावले होते असे ऐकू येईल. (औरंगझेब चे अत्याचार फक्त ब्राह्मणांविरुद्ध असून जातिव्यवस्थेला नष्ट करणे त्याचा उद्देश होता असे मार्क्सिस्ट लोक आधीपासून शिकवत आहेत)

जयंत कुलकर्णी गुरुवार, 01/04/2018 - 11:30
एवढा मोठा विनोद गेल्या हजार वर्षात झाला नसेल. २५,००० म्हणजे किती हे समजण्या इतकी अक्कल हे लिहिणार्‍याला आहे की नाही ? पण ठीक आहे. त्या ठिकाणी खरेच काय झाले याबद्दल आता एकदा लिहावे लागेल. पण नको. हे काम अगोदरच कोणीतरी केलेले आहे. या त्याच्या लिन्क्स. इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग १ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग २ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ३ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ४ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ५ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ६ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ७ वरील लेखांमधे काही त्रुटी आहेत पण त्या एवढ्या महत्वाच्या नाहीत व त्याने मुळ घटनाक्रमाला कुठेही धक्का पोहोचत नाही. मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. आपले संपत आलेले अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी पळ काढलाच. "इतर संघटनांवर माझा ताबा नाही असे म्हणाले. पण मग मेवाणी आणि उमरला कशाला व्यासपिठावर बोलावलेस बाबा ? बर तुम्ही नव्हते बोलवले तर त्या व्यासपिठावरुन निघून जायचे ना ! पण मिळणार्‍या प्रसिद्धीचा लोभ नडला असावा. कालही एका चर्चेत त्यांना हा प्रश्र्न विचारल्यावर त्यांनी चक्क पळ काढला. असो.... या येथे हे असेच चालणार... यांना तरुण पिढीने घरीच बसवले पाहिजे तरच त्यांना येथे सुखाने नांदता येईल. मला सगळ्यात वाईट वाटले ते याचे की टिव्ही वर दिसत होते की लहान लहान मुलेही या मोर्च्यात सामील होती. यांना वेठीला धरताना यांना शरम कशी वाटत नाही?

In reply to by जयंत कुलकर्णी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/04/2018 - 15:25
या लेखांचे दुवे इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! आजपर्यंत, या संबंधात पुरेशी माहिती नसल्याने बोलायचे टाळले होते. "युद्धाशी" आणि "त्यात मृत अथवा जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्या या स्तंभाशी" अधिकृत संबंध असलेल्या व्यक्तींचे लेखी अहवाल व ब्रिटिश संसदेसह इतर सरकारी कागदपत्रांच्या संदर्भांच्या बळावर लिहिलेले हे लेख नक्कीच विश्वासू आणि माहितीपूर्ण आहेत. या संदर्भांत दिसणारे या युद्धाबाबतचे सत्य, त्याबाबत केल्या जाणार्‍या राजकारणाच्या विपरीत आहे, हेच दिसून येत आहे. आपल्याच देशवासियांमध्ये दुही माजवून आपली पोळी भाजण्याच्या कलेत आजचे भारतिय राजकारणी इतके तरबेज आहेत की ते तेव्हाच्या लबाड इंग्रजांना लाजवतील, यात वाद नाही. स्वार्थाने अंध झालेल्या राजकारण्यांना, आपण जनतेत फूट पाडून देशाचे अपरिमित नुकसान करत आहोत, याचे भान रहात नाही... किंबहुना, आपण जनता आणि देश यांचे अपरिमित नुकसान करत आहोत याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे, पण त्यांना त्याची अजिबात फिकिर कराविशी वाटत नाही. :( :( :( हा सगळा प्रकार इतका किळसवाणा आहे की त्याबद्दल काही बोलायचाही तिरस्कार वाटावा !! The less said the better. :(

In reply to by जयंत कुलकर्णी

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 15:42
मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 18:04
थोरल्या आंबेडकरांनी असं काही केलं असेल असं वाटत नाही. https://www.quora.com/What-was-the-contribution-of-B-R-Ambedkar-in-the-Indian-freedom-struggle इथली उत्तरं वाचली तर कळतं की स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता असं म्हणणं चूक आहे. ते त्यांचं कॉज नव्हतं. त्यांचं प्राधान्य नव्हतं. त्यांचं जे प्राधान्य होतं ते असण्यासाठी तशी परिस्थिती पण होती. तो काळ वेगळा होता. -------------------------- आंबेडकरांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला असं काही उदाहरण नाही. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य हे प्राधान्य नसलेले अनेक सवर्ण नेते पण होते. त्यांची आपापली कॉजेस होती. आणि ते तेव्हाच्या सरकारची बाजू घेत. जेव्हा ही परंपरा चालू झाली तेव्हा ते सत्तेत असलेल्या सरकारच्या बाजूने, आणि त्यांच्या कॉजच्या बाजूने होती. दलितांना सैन्यात घेणे, न घेणे अश्या उलटसुलट पॉलिसिंपासून सुटका मिळावी असा देखिल त्यांचा परंपरेमागे उद्देश असू शकतो. आणि समजा "जातीय स्वरुप" दिलं असं क्षणभर मानायला जावं तरी का दिलं? तेव्हा सर्वणांची सत्ता नव्हती आणि त्यांना स्वतःला आपल्या जातीच्या लोकांच्या बळावर काही सत्ता मिळवायचा स्कोप नव्हता (ते त्यांना स्वातंत्र्यानंतर पण जमलं नाही)! ========================== बाकी आंबेडकरांवर टिका करायला ना नाही, पण आजच्या स्वार्थी नेत्यांशी त्यांची तुलना करणं ही टिका ठरणार नाही, त्यापेक्षा काहीतरी दु:खजन्य ठरेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

सस्नेह Fri, 01/05/2018 - 14:04
दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका ! अतिशय वास्तवदर्शी माहिती ! तिचा विपर्यास करून राजकारण्यांनी केलेला खेळ पाहून वडाची साल पिंपळाला या म्हणीचा प्रत्यय आला.

In reply to by एमी

ट्रेड मार्क Fri, 01/12/2018 - 00:56
या https://rightangles.in मध्ये एक से एक भारी लेख आहेत. मस्त मनोरंजन झालं. मुद्देसूद प्रतिसाद तुम्हाला फालतू बडबड का वाटते ते आता समजलं.

In reply to by ट्रेड मार्क

श्रीगुरुजी Fri, 01/12/2018 - 08:51
सहमत दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एमी Fri, 01/12/2018 - 10:22
दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही. >> हॉ हॉ हॉ तुमच्याकडून असली वाक्य फेकली जावीत हे फारच विनोदी आहे =))

जयंत कुलकर्णी गुरुवार, 01/04/2018 - 12:03
ही अजून एक लिंक. http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/ यात एक मजेशीर उल्लेख आहे तो म्हणजे स्वतः महार, मांगांना व इतर खालच्या जातींना अत्यंत वाईट पद्धतीने वागवीत.... :-) हा लेख जरा उजवा वाटतोय पण माहितीसाठी चांगला आहे..

पंतश्री गुरुवार, 01/04/2018 - 12:34
#भिमाकोरेगाव लेखक :- ग्रांड डफ प्रकाशन :- १८२६ दिनांक ३१ डिसेंबर १८१७ कॅप्टन स्टॉटन ह्या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली एक सैनिकी तुकडी शिरूरच्या सैनिकी तळावरून निघाली, त्यात २४ युरोपिअन्स, सोबत ,मद्रासच्या २५० तोफखान्याच्या सैनिकांची तुकडी व दोन तोफा व ३०० नव्याने उभारलेली घोडदळाची तुकडी …. रात्रभर चालून १ जानेवारी १८१८ ला भीमानदीच्या काठी कोरेगावला पोहचली … पाहतात तर काय ? समोर पेशवांच्या सैन्याचा (२०००० घोडदळ, ८००० पायदळ) प्रचंड तळ पसरला होता … हे सैन्य सरकत होते पुण्याकडे त्याला अटकाव करण्याची जवाबदारी ह्या सैनिकी तुकडी वर होती…. कारण मागून ब्रिगेडियर जनरल स्मिथचे सैन्य त्यांच्या पाठलागावर येणार होते … एवढ्या बलाढ्य सैन्या समोर आपला टिकाव लागणार नाही हे पाहून कोरेगावच्या तटबंदीच्या आत आश्रय घेण्यासाठी हे सैन्य निघाले पण घात झाला पेशव्यांच्या सैन्याने हे पाहिले.… रात्री ८ वाजल्या पासून सकाळी १० वाजे पर्यंत २७ मैल चालून थकल्या होत्या. तोच पेशव्यांच्या लष्करातील अरबांच्या एक-एक हजाराच्या अश्या ३ तुकड्या दोन्ही बाजूने तटबंदीत शिरल्या … तोफा बंदुका निकामी झाल्या… त्या छोट्याश्या जागेत हातघाईची लढाई पेटली … आणि घात झाला तोफखान्याचा प्रमुख लेफ्टनंट चिशोल्म ह्याचे मुंडके कापून पेशव्यांकडे विजयाचे प्रतिक म्हणून पाठवले पण लढाई आजून चालूच होती…. जखमी इंग्रज अधिकाऱ्यांना ज्या धर्मशाळेत ठेवले होते ती पण पेशव्यांच्या सैन्याने ताब्यात घेतली … तेथील असिस्टंट सर्जन मि. वूइंगेट ह्यांना भोसकून ठार केले परंतु सलगीकरून कॅप्टन स्टॉटन ह्याने फिरून ती धर्मशाळा ताब्यात घेतली म्हणून इतर इंग्रज अधिकारी वाचले… अत्यंत अडचणीच्या जागी लढाई असल्याने मराठ्यांच्या सैन्याला इंग्रजांना डांबून ठेवण्या शिवाय बाकी काही करता येणे शक्य नव्हते… शेवटी रात्री ९ वाजता पेशव्यांचे सैन्य माघारी तळावर निघून आले…. व सकाळी ते लोणीकंदच्या दिशेने निघाले… तिथून पुण्याला न जाता वासोट्याच्या किल्ल्यावर इंग्रजांच्या कैदेत असलेल्या सातारच्या छत्रपतींना कैदेतून सोडविले व साताऱ्यात आणले … दिवसभर तहानलेल्या सैनिकी तुकडीने भीमेचे पाणी पिऊन पुन्हा शिरूरच्या मार्गाला लागले … दोन्ही कडची माणसे मारली गेली …. इंग्रजांनी ही लढाई लढली …. पराभव स्पष्ट दिसत असून सुद्धा लढली …. पराभूत झालेल्या इंग्रजांनी त्या लढाईच्या स्मरणार्थ "जयस्तंभ" उभारला …. इंग्रज त्याच्या देशासाठी लढत होते… पेशवे स्वराज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून लढले … पण हे ३०० नवीन भरती केलेले भारतीय वाघ कोणासाठी कोणाच्या बाजूने व कशासाठी लढले …. परंतु, उद्या आपल्यातील अनेक दीड शहाणे त्या "(परा)जयस्तंभाच्या" इथे फुले चढवतील…. आणि समतेची - विद्रोहाची गाणी गातील …. व आनंद मानातल्या मनात "पेशवाई बुडवल्याचा" आनंद मनातील … पण नक्की त्यांनी पेशवाई बुडविली की स्वराज्य ? मला लाज वाटते … स्वराज्यद्रोही स्वकीयांची (वरील सर्व हकीकत स्वत: एका इंग्रजानेच लिहून ठेवले आहे … आता तुम्हीच ठरावा …. जाणार का "भीमा-कोरेगावला") संदर्भ :- "अ हिस्टरी ऑफ मराठाज" - जेम्स ग्रांट डफ खंड ३ (पान क्र. ४३२-४३६) (हा लेखक सातारा येथे छत्रपतींच्या दरबारात रेसिडेन्सी म्हणजेच कंपनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून म्हणून काम पाहत होता.) ह्या लिंक वर पुस्तक वाचावयास मिळेल https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 13:15
कायप्पावरून आलेल्या गोष्टी पुढे न सरकावणेच जास्ती बरे नाहीये का? कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 14:53
मला तर माहिती पुढे न सरकारवणेच अनिश्ट वाटते. किमान उलटसुलट माहिती वाचून लोकांची अतितीव्र मते बोथट होतील. समाजविघातक काम करण्यापूर्वी इतिहास अभ्यासण्याचं क्लिष्ट, बोरिंग, विचित्र काम सामान्य रागीट जातीयवादी जनांना दिलंं तर ते कंफ्यूज होऊन जातील.

In reply to by arunjoshi123

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 17:11
माझा आक्षेप माहिती पुढे सरकावण्यावर नक्कीच नाही. मला असे म्हणायचे आहे कि योग्य रेफेरंस नसलेल्या गोष्टी (जसा वरचा संवादात्मक प्रतिसाद आहे) आधीच कट्टर असलेली मते अजून कट्टर करण्यात हातभारच लावतात. योग्य रेफेरंस असलेल्या गोष्टी जरूर पुढे सरकवाव्यात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पंतश्री गुरुवार, 01/04/2018 - 16:51
कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.
मला वाटते लिन्क टाकलेली आहे https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818

In reply to by पंतश्री

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/04/2018 - 17:05
मी त्याच्या वरच्या प्रतिसादाला उद्देशून म्हणालो, तुमचा रेफेरंस वाचला. आता वर जाऊन पहिले तेव्हा तुमचा प्रतिसाद कायप्पावरचा फॉरवर्ड आहे ते लक्षात आले.

In reply to by श्रीगुरुजी

mayu4u Fri, 01/05/2018 - 10:13
कुणाकडनं आणि कसल्या अपेक्षा करताय? निव्वळ असत्य लिहिणाऱ्या आयडींची पाठराखण करणाऱ्यांना आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना मारा फाट्यावर.

श्रीगुरुजी गुरुवार, 01/04/2018 - 17:33
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. याला म्हणतात खांग्रेस संस्कृती!

गामा पैलवान गुरुवार, 01/04/2018 - 18:40
पूज्य संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे प्रभावी हिंदुसंघटन करतात. या दोघांना अटक व्हायला पाहिजे पुरावा नसला तरी चालेल असा प्रकाश आंबेडकरांचा हट्ट आहे. अधिक माहिती : https://www.loksatta.com/mumbai-news/peace-unabated-without-action-against-bhide-and-ekbote-says-prakash-ambedkar-1611270/ प्रकाश आंबेडकर या दोघांना आपले शत्रू समजतात. प्रकाश आंबेडकरांची वैयक्तिक खाज भागवी म्हणून शासनाने नैसर्गिक न्याय धाब्यावर बसवू नये. हिदुत्ववाद्यांना अटक करण्यासाठी काहीही पुरावा नाही. -गा.पै.

अरविंद कोल्हटकर गुरुवार, 01/04/2018 - 19:34
सदर विषयावर ऐसीमध्ये २-३ वर्षांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. माझ्याच ह्या तेथील धाग्यामध्ये घटनेचा इतिहास आणि तदनुषंगिक अशी बरीच चर्चा घडलेली आहे ती नजरेखालून घालावी असे सुचवितो. मी सुमारे १९९६ च्या पुढेमागे काढलेले स्तंभाचे आणि त्यावरील इंग्रजी-मराठी लेखांचे फोटोहि तेथे दिसतात. (१९९६ सालापर्यंत तरी स्तंभ जवळजवळ दुर्लक्षित होता हे आसपासच्या माजलेल्या गवतावरून आणि चरणार्‍या म्हशींवरून दिसत आहे. स्थानिक लोकांना स्तंभाबद्दल तेव्हातरी काहीहि माहीत नव्हते असे बोलतांना जाणवले..) इंग्रजी लेखाखाली Simpson and Lewelyn SCTs अशी नावे आहेत. हे कोण असा शोध घेतल्यावर ही कलकत्त्यामधील तत्कालीन लेख कोरणार्‍या - Sculptors - कारागिरांची नावे आहेत असे शोधाअंती मिळाले.

In reply to by अरविंद कोल्हटकर

arunjoshi123 गुरुवार, 01/04/2018 - 19:56
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्‍याकोपर्‍यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे.
असं आपण तिथं लिहिलं आहे नि दोनच वर्षांत इतका राडा. प्रणिपात घ्यावा!!!

In reply to by अरविंद कोल्हटकर

एमी Fri, 01/05/2018 - 06:00
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्याकोपर्यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे. >> कोपर्याकोपर्यावर उभ्या केलेल्या मंदिरात जे काही होतं ते चालतं की लोकांना! श्रद्धा वगैरे.....दगडंच असतात ना ती पण जी पुजली जातात! े

In reply to by श्रीगुरुजी

arunjoshi123 Fri, 01/05/2018 - 11:54
अ‍ॅमी ने लावलेला श्रद्धेचा संबंध यनावालांनाही मात देणारा आहे. ---------- कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). कोल्हटकर काका, तुम्ही शेअर कोणते घेतले आहेत?

In reply to by arunjoshi123

एमी Sat, 01/06/2018 - 03:44
कोल्हटकरांना त्या स्तंभाशी निगडीत लोकसमूह प्रथम स्थानिक वंशज, स्थानिक संबंधित लोक, मग आजूबाजूचे गावचे लोक, असा असून पुढे त्या जागेचे पोटेंशियल इतके आहे कि राज्यभर सर्वत्र त्या घटनेची आणि स्थळाची दखल घेणे चालू होईल असे वाटले. एक म्हैस चरत असताना देखील पोटेंशियलचा असा अंदाज यावा हे कमालीचे आहे (मला तरी वाटले). >> नीट वाचा ते वाक्य त्यांनी कशाचा प्रतिसाद म्हणून लिहिले आहे ते....

मदनबाण गुरुवार, 01/04/2018 - 22:45
जे झालं ते वाईट आहे, यात लोकांचे नुकसान / राज्याचे नुकसान / राष्ट्राचे नुकसान झाले असे म्हणावेसे वाटते... :( आपणच जर एकमेकांची टाळकी फोडणार असु तर राष्ट्रास दुसर्‍या शत्रुची गरजच काय ? असो... आज बाळासाहेब ठाकरे असते, तर पूज्य संभाजी भिडे गुरुजी सारख्या व्यक्तिमत्वावर बोट रोखण्याचे देखील धाडस कोणी केले नसते इतके नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- Raaz

In reply to by मदनबाण

विशुमित Fri, 01/05/2018 - 12:54
घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. ... बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!!

In reply to by विशुमित

मदनबाण Fri, 01/05/2018 - 14:36
घेतला नसेल तर यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये सहभाग घ्या आणि नंतर मत व्यक्त करा असे सुचवू इच्छितो. youtube वरील मुलाखतीमध्ये सगळे गॉड गॉड च असते. देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी अजून बाळासाहेबच कशाला हवे आहेत, तुमचे धाडस दाखवा, हिंदुत्ववाद्यांचे (फक्त त्यांच्याच करिता नसेल तर आनंद आहे ) सरकार आहेच मदतीला आणि तोडा रोखली गेलेली बोटे. हाय काय आणि नाय काय...!! या महाराष्ट्रात एकमेव हिंदू ह्रदय सम्राट झाले ते म्हणजे बाळा साहेब ठाकरे त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच... इतर दुसरा त्यांच्या सारखा नेता सध्या महाराष्ट्रात आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले

In reply to by मदनबाण

विशुमित Fri, 01/05/2018 - 15:09
देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.>>> ==>> देशाचे पंतप्रधान बऱ्याच व्यक्तींचे गुणगाण गात असतात. एकदा तर म्हणाले "साहेबांचे बोट पकडून राजकारणात आलो. आता हे पण सगळेच मान्य असणारच तुम्हाला? बाकी पंतप्रधानांनी कोणाकोणाचे आदेश घायचे/पाळायचे याची मार्गदर्शक नियम काय आहेत हे कोणी सांगू शकेल का ? ज्यांना बरेच जण गुरुवर्य समजतात त्यांनी एकदातरी त्यांच्या एखाद्या मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि मग अनुभव सांगावा. मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. ... त्यामुळे त्यांची अश्या प्रसंगी आठवण येणारच...>> ==>> तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे.

In reply to by विशुमित

मदनबाण Fri, 01/05/2018 - 16:00
मी सांगितला असता माझा अनुभव पण आता वातावरण गरम आहे आणि गल्लो गल्ली बोटं छाटणारी बसलेले आहेत म्हणून तूर्तास पास. काय बोलता ! मोगलाईच आहे म्हणजे राज्यात ! तोड फोड म्हंटली की मलापण प्रसंगी साहेबांचीच आठवण येते. तुमचे म्हणणे रास्त आहे. भावना पोहचल्या म्हणायच्या तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले

In reply to by विशुमित

mayu4u Fri, 01/05/2018 - 17:25
सांगाच. वाचायला आवडेल.
देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोणत्याही असांविधानिक पदावरील व्यक्तीकडून आदेश घेणं सम्पूर्णपणे चूक आहे. (सल्ला घेणं अजिबात चुकीचं नाही)

सुज्ञ गुरुवार, 01/04/2018 - 23:39
मला कळत नाही हे मोर्चे असे आरामात कसे होत राहिले ? प्रकाश आंबेडकर ची " लोकशाही" ताकद किती ? किती सीट तो निवडून आणू शकेल आत्ता निवडणूक झाल्या तरी ? तरीही असला कोणी नेता सांगतो आणि दंगेखोर धुडगूस घालतात ? कदाचित सरकार ला मग आपल्या "कविमित्रा " ला दुखवायचे नसेल , किंवा यांचे आंदोलन हे किती मूर्खपणाचे आणि विध्वंसक असते हे लोकांना दाखवून द्यायचे असेल . असो नुकसान सामान्य लोकांचे झाले . आता बंद पुकारणऱ्या लोकांनी भरपाई का करू नये ?

प्रसाद_१९८२ Fri, 01/05/2018 - 13:29

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje-supports-bhide-guruji-498978

अतूल २०१५ Fri, 01/05/2018 - 18:28
टिपू इंग्रजांविरूद्ध लढला म्हणून त्याची जयंती साजरी करायची आणि महार इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणून त्यांना अभिवादन करायचे. आम्ही परत मडक आणी झाडु घ्यायचा का? गुरुजी सांगा

In reply to by अतूल २०१५

गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 19:11
अतुल २०१५, महारांच्या गळ्यात मडकं आणि कंबरेला झाडू लटकावले जायचे ही शुद्ध थापेबाजी आहे. कोण्या सोन्या महारास भटांच्या आज्ञेवरून पुण्यांतील बोळांतून गळ्यात मडकं आणि कंबरेस झाडू बांधून फिरवल्याचं एकतरी अस्सल चिटोरं आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनन्दा Fri, 01/05/2018 - 22:37
जौ द्या हो, ते कुठले तरी भलते स्कोर सेटल करायला आलेत... त्यंच्या डोक्यात किती विखार भरलाय ते त्यंच्या प्रितिक्रयांवरून दिसतेय. आणि वरची सगळी चर्चा वाचून सुद्धा त्यांना सत्य इतिहास अजून कळला नाहीये यातच काय ते समजून जा. अश्या लोकांना टीआरपी मिळू न देणे हाच एकमेव उपाय अहे.

पगला गजोधर Fri, 01/05/2018 - 21:37
गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल स्पॅरो नामक पात्र आहे.... अतिशय साधी राहणी, फाटके वाटावे असे कपडे, पायात पादत्राणे कधीच नाही....धार्मिक गुरुच जणू.... सरसेई कडून राजकीय पाठबळ मिळताच, धार्मिक अतिरेक सुरु करतो.... 'फेथ अँड क्राऊन, डॉकटरिंन द्वारे राज्यांवर सत्ता मिळवतो... जिने स्वार्थासाठी त्याला पाठबळ दिले, तिचीच गावासमोर नागडी धिंड काढतो.... सावधान... एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Fri, 01/05/2018 - 23:46
मला असा एक माणूस माहिती आहे. तो मळलेला, चुरगळलेला पायजमा आणि पांढरा जाड्याभरड्या कापडाचा सदरा परिधान करतो. त्यांच्या गळ्यात कधी जानवे असते, तर कधी मस्तकावर फरटोपी असते. तो कधी मंदिरात जाऊन प्रसाद घेतो, तर कधी इफ्तार पार्टीत मटण चेपतो. राजकीय पाठबळ असल्याने तो पोरकटपणाचा अतिरेक करतो. जो अधिकृत पंतप्रधान आहे त्यालाच तो आदेश देऊन शरमिंदा करतो. एका विशिष्ट आडनावामुळे आपण या देशाचे अनभिषिक्त सम्राट आहेत या भ्रमात वावरतो. स्वार्थासाठी परकीयांशी आणि फितुरांशी हातमिळवणी करतो. सत्तेसाठी जनतेत फूट पाडून जनतेला भडकावतो. तो आणि त्याची टोळीतले मनसोक्त भ्रष्टाचार करतात. एक लिटिल स्पॅरो या धर्तीवर हळू हळू बस्तान बसवतोय.....

In reply to by आनंदयात्री

पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 06:48
हाय स्पॅरो.... बरोब्बर.... ज्या राजघराण्यातील व्यक्ती वैयक्तीक स्वार्थासाठी या हाय स्पॅरोला आज मदत करतील, उद्या त्यांची गाव धिंड निघू शकते....

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Sat, 01/06/2018 - 07:48
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. आता कळल कोणाबद्दल बोलताय ते. भिडे गुरुजी एवढे भितीदायक वाटतात लोकाना!! का ते समजत नाही मला

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Sat, 01/06/2018 - 09:26
एका लोटांगणाची गोष्ट आज दिवसभर आपल्या पेड मि़डीयाने आपली कामगिरी चोख बजावली. भिडेंची मुलाखत लागोपाठ सगळ्या चॅनेलवर दाखविण्यात आली. त्याच्यावर शूरवीर भिडेंनी दिलेली कबुली ही बरेच काही सांगून जाते. उदयभाऊ निरगुडकरांनी त्यांना विचारले... मी असे ऐकले आहे कि, तुम्ही कधी-कधी बीजेपी वर देखील टिका केली आहे. स्वभावाप्रमाणे सडेतोड आणि चोख उत्तर देणारे भिडे म्हणाले कि, माझ्या आयुष्यात मी बीजेपीवर कधीच टिका केलेली नाही. उदयभाऊ निरगु़डकरांनी पुढचा प्रश्न विचारला मोदी तुमच्याशी खुप आत्मियतेने वागतात. त्यावरती भिडे म्हणाले.. कि, मोदी हा देवाने भारताला दिलेला आशीर्वाद आहे... एवढी दैवी शक्ती असलेला माणूस भारताला पंतप्रधान म्हणून मिळणे हे या देशाचे भाग्य आहे. दुपारी बीजेपी माझाने त्यांची मुलाखत घेतली. आणि तिथून जणूकाही लाईनच लागली. पण, मात्र खमक्या भिडेंनी टिव्ही 9 वर दिलेल्या मुलाखतीमध्ये माईक अँकरच्या तोंडावरच फेकून दिला. उदयभाऊ निरगुडकरांनी भिडेंना विचारले कि, जे बहुजन विचारसरणी मानतात त्या शाहू, फुले, आंबेडकरांवर तुमचा विश्वास आहे का ? त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... त्यानंतर टिव्ही 9 ने परमपुज्य भि़डे गुरुजींना धरले. कारण एबीपी माझाने मुलाखत घेतल्यानंतर सगळ्यांनी मुलाखत घेणं आणि या-ना-त्या प्रकाराने उभ्या महाराष्ट्राला ते किती प्रामाणिक आहेत याची जाणीव करुन देणं हे आता टिव्ही चॅनेलवाल्यांचे परम कर्तव्य झाले आहे. नंतर टिव्ही 9 च्या पत्रकाराने विचारले वढू ॥बु॥ येथे गोविंद गायकवाड अर्थात गोविंद महार यांच्या समाधीची नासधूस करणे योग्य होते का ? त्यावरती सर्वज्ञानी भिडे म्हणाले... कोण गोविंद गायकवाड ? कुठली समाधी ? मला फक्त संभाजी महाराज यांचीच समाधी माहिती आहे. मग दुसरा प्रश्न आला... मराठा आरक्षणा विषयी तुमचे काय मत आहे ? आपल्या समंजस व सर्वांना बरोबर घेऊन जाणा-या भिडे गुरुजींनी आपल्या स्वभावाप्रमाणे सांगितले कि, ह्या प्रश्नाचा काय संबंध. विद्यार्थ्यासारखा बसलेला पत्रकार नंतर विचारतो... तुमच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होतोय गुरुजी... त्यावरती संत भिडे म्हणाले असे आरोप तर देव देवतांवर झालेत, कृष्णावरही झालेत... नंतरचा प्रश्न मग ह्या सरकारविषयी तुमचे काय मत आहे ? तर त्यावर भिडे गुरुजी म्हणाले... नरेंद्र मोदींच्या रुपाने देवत्वांचे अंश असलेले सरकार 70 वर्षांनी आले आहे हे आपले भाग्य आहे आणि या देशाची दैववभूमी तेच करतील असा मला विश्वास आहे. पत्रकाराला रहावले नाही. त्याच्यामधला पत्रकार जागा झाला. आणि त्याने त्वरीत विचारले कोरेगाव भिमा येथे जे घडले ते ? त्यावरती संतापलेले कृष्णरुपी भिडे म्हणाले तुम्ही काहीही प्रश्न विचारता. आणि माईक तोडून ते निघून गेले. धन्य ! धन्य !! धन्य !!! त्याच्या आधी सकाळी शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे यांची भल्या पहाटे एबीपी माझाने मुलाखत घेतली. उदयनराजेंनी भलतीच माहिती महाराष्ट्रासमोर आणली. उदयनराजे म्हणाले... माझे गुरुजी भिडे गुरुजी हे पी.एच.डी. इन मॅथेमॅटीक्स आहेत, कालपर्यंत महाराष्ट्राला ते एम.एस.सी. अ‍ॅस्ट्रोफिजीक्स आहेत, असे सांगितले जात होते. त्याच्या अगोदर कुणीतरी त्यांची न्युक्लीअर फिजीक्स मध्ये डीग्री आहे असे सांगितले होते. पण, त्यांनी डिग्री कुठल्या महाविद्यालयातून घेतली याचा थांगपत्ता कुणालाही नाही. जसे ह्या दंगलीची सरकारने न्यायालयीन चौकशी होणार आहे असे सांगितले आहे. त्याप्रमाणे परमपुज्य भिडे गुरुजींच्या डिग्रीबाबत देखील सरकारने असा शोध घ्यावा असे सांगावे लागेल. पण, यामध्ये साम्य एवढेच दिसत आहे कि सगळ्यांशी नाते असलेली ही माणसे म्हणजे नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, भिडे गुरुजी यांच्या डिग्र्या शोधण्यातच भारताची पुढील 2 वर्षे वाया जातील. “चकवा देण्यात यकदम भारी लोक आहेत ही”. प्रश्न विचारणारे जणू काही आपल्यासमोर आपल्याला लहानपणी शिकवणारे शिक्षकच बसले आहेत इतक्या आदबीने प्रश्न विचारत होते. आणि आपण जर चुकलो तर आपल्याला शिक्षक ओरडतील इतके भय त्यांच्या चेह –यावर दिसत होते. ह्या तिनही मुलाखती बघितल्यानंतर एका भित्र्या इसमाला वाचविण्यासाठी सगळ्यांची कशी धावपळ सुरु आहे असेच दिसते. अचानक अख्ख्या दिवसभरात Plan केल्याप्रमाणे सकाळपासून रात्रभर भिडेच दिसत होते. जणूकाही भारतामध्ये दुसरा काही विषयच राहिलेला नाही. भिडे मूळचे कुठले ? त्यांनी केले काय ? याबद्दल आता कुणीच बोलायला तयार नाही. भिडे कुठल्या गावातून आले ? त्यांचा संघाशी काय संबंध होता ? त्यांनी संघात किती वर्ष काम केले ? ते कुठे प्रचारक होते ? याबद्दल कुणी आता अवाक्षरही बोलायला तयार नाही. जणू काही भिडेंचा आणि आपला संबंध दाखवला तर आपण Expose होऊ या भितीने आता सगळेच लांब पळत आहेत. आणि भिडे हे कसे आता या महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद आहे हे पटवून देण्यासाठी संतश्रेष्ठ राजीव खांडेकर, लोकप्रिय उदयभाऊ निरगु़डकर आणि टिव्ही 9 चे केविलवाणे पत्रकार यांच्यात स्पर्धाच लागली होती. हेच जर दुस-या बरोबर झाले असते तर त्याचा पूर्व इतिहास, त्याचे चारीत्र्य ह्याच एबीपी माझा, टिव्ही 9, आयबीएन लोकमत या चॅनेलवाल्यांनी खरडून काढले असते. पण, महाराष्ट्राला संभ्रमात ठेऊन आपले लाडके माननीय संभाजीराव भिडे यांना वाचवता कसे येईल यासाठी काटोकाट प्रयत्न ते दिवसभर करीत होते. अर्थात त्यांना यश मिळेल याबाबत कोणालाही शंक असण्याचे कारण नाही. कारण, जे मोदी बोलतायेत... तेच भिडे बोलत आहेत. 70 वर्षात या देशाला दिले काय ? ते अजाणतेपणाने आपली निष्ठा कोणाच्या चरणी आहे हे ही सांगून टाकतात. मी बीजेपी वर कधीच टिका केलेली नाही. राष्ट्रप्रेमासाठी, हिंदुत्वासाठीच माझे जीवन आहे. आणि मी जे काही करीन ते फक्त बीजेपी साठीच, इथल्या समाजामध्ये दुफळी माजविण्यासाठीच हेच त्यांच्या प्रत्येक वाक्यातून अधोरेखीत होत होते. अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... कारण तुम्ही जो महाराष्ट्र घडवला जो या भिडेंनी बिघडवला... अर्थात, इतकी चर्चा करण्याएवढे ते महानही नाहीत. पण, एका वढू ॥बु.॥ ला कोरेगाव भिमा ला त्यांच्या कटकारस्थानामुळे उभा महाराष्ट्र द्वेषाच्या राजकारणाचे दाह सोसतोय. या त्यांनी केलेल्या पापाची आठवण महाराष्ट्राला अनेक वर्षे असेल. कोणिही किती ही म्हटले तरी झालेल्या जखमा भरुन यायला खुप वेळ लागेल. यात महाराष्ट्राचे झालेले अपरिमित नुकसान कधीच भरुन येणार नाही. त्यांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्यांना ते कधी कळणार नाही. धन्य आहे एबीपी माझा ! धन्य आहे आयबीएन लोकमत ! आणि मात्र टिव्ही 9 ची किव येते. *Received WhatsApp

In reply to by पगला गजोधर

एमी Sat, 01/06/2018 - 11:12
Like! आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> केवळ आणि केवळ येडा बनाके पेडा खाणे चालुय. हिंदू हिंदु करत ५ (कि ३.५) % चे अजेंडे राबवायचे. बाकीचे ९५% सगळी 'विषवल्ली' च आहे! आणि त्यांच्या हातात हे मराठ्याचे अगदी अलगद सापडतायत. मुस्लिम, दलित विरोधात यांना अगदी व्यवस्थित वापरून घेतलं जातं पण त्यांच्याच काही मागण्या आल्या (मराठा मोर्चा किंवा शेतकरी संप) कि यांचा थयथयाट बघण्यासारखा असतो. फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....

In reply to by एमी

सुबोध खरे Sat, 01/06/2018 - 11:54
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. ब्रिलियंट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अख्ख आयुष्य आणि श्री संभाजी महाराजांचं बलिदान फुकटच गेलं म्हणायचं.

In reply to by सुबोध खरे

एमी Sat, 01/06/2018 - 13:32
फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? Whatever.... मला इतिहासात रुची नाही आणि त्याचा वर्तमानकाळात एकमेकांची टाळकी फोडायला वापर होत असेल तर तर अजिब्बातच नाही!

In reply to by एमी

श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 14:21
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 14:28
त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा.... "पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत. "सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्‍या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात." त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".

In reply to by श्रीगुरुजी

नुस्त आंबेडकरांचच नाव घेतल! गम्मत म्हणजे, हे तीनही महात्मे ज्या महाराजांचे पाईक, त्यांच महाराजांन भिडे गुर्जी मानतात! हे मात्र विसरायचं.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 14:36
महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा... महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.

In reply to by पगला गजोधर

अंतरा आनंद Sat, 01/06/2018 - 16:11
अरे बहुजनांनो जागे व्हा... हे जर खोट वाटत असेल तर त्यांनी दिलेल्या तिनही मुलाखती व्यवस्थितपणे बघा. मराठा आरक्षणाविषयी माझा काय संबंध... हेच म्हणणारे भिडे गुरुजी. शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल विचारल्यावर त्या प्रश्नाला बगल देऊन त्यांचे तोंडात नावही न-घेणारे भिडे गुरुजी... मोदी हा भारताने देवाला दिलेला आशीर्वाद आहे असे म्हणणारे भिडे गुरुजी... बीजेपी वर मी कधीही आयुष्यात टिका केली नाही असे म्हणणारे भिडे गुरुजी... गोविंद महाराची समाधी कुठे आहे ? कोण गोविंद महार ? असे विचारणारे भिडे गुरुजी. स्वत:ची तुलना कृष्णाशी करणारे भिडे गुरुजी. आणि कोरेगाव भिमा बद्दल विचारल्यावर चिडणारे भिडे गुरुजी... कारण, सत्य लपविणे आणि असत्य सांगणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि आपल्यातलेच काही आयते त्यांच्या तावडीत सापडत आहेत. >> +१

In reply to by सुखीमाणूस

श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 13:13
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत. मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत.

श्रीगुरुजी Sat, 01/06/2018 - 14:33
हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.

गामा पैलवान Sat, 01/06/2018 - 15:22
अॅमी, १. जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय.... मग नवबौद्धांना आरक्षण कशासाठी पाहिजे? २. फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष उपयोग काय व्हायचा होता तेवढा. आता नसेल उपयोग होत तर द्या सोडून! आमच्या धर्माचा आम्ही पाहिजे तसा उपयोग करू. आणि नसेल होत तर भिका नाही मागणार. धर्म असा सोडता येतो होय! धर्म म्हणजे कुठलासा चवचाल वाळवंटी पंथ नव्हे. तुमच्या तर्कटानुसार आईबाप हे उपयुक्त पशू आहेत. ३. आणि आता जे 'हिंदू'च्या नावाखाली चालुय ते सांगितलेलं का शिवाजी संभाजीनी? शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी जे काही केलं ते (त्यांचे वडील व आजोबा वगळता) त्यांच्या अगोदर ३५० वर्षांत कुणीच केलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी Sun, 01/07/2018 - 22:24
It is unfortunate that in the year 2018, India is witnessing caste clashes which, if unchecked, could blow into a major civil war. We are seeing Media and “Youth” politicians like Jignesh Mevani and Rahul Gandhi adding to the conflagration of caste politics . . . http://www.opindia.com/2018/01/battle-of-koregaon-lessons-in-unity/

पगला गजोधर Mon, 01/08/2018 - 08:03
ढोराचं कातडं कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या दलितांवर अमानुष मारहाण व हिंसेचे अत्याचार करणारे "अनचेक्ड गौरक्षक" , यांच्याविरुद्ध च्या अहिंसक लोकमोहिमेतून कायदापदवीधर-जिग्नेश चे नेतृत्व पुढे आलं.... या अश्या युवामुळे आता देशाचे तुकडे पडणार, असं मनुवादी, काहीही बरळतील.... पण अनौरस "अनचेक्ड गौरक्षक" बाबत शेपूट घालतील .... "पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... .. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष शहा, उ प्र मुख्यमंत्री आदित्यनाथ, देशातील इ अनेक बीजेपी मुख्यमंत्री खासदार प्रचारात खुद्द येऊनही, जिग्नेश निवडून आला... मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... कारण "Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Mon, 01/08/2018 - 11:25
मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच.... उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो.

सुबोध खरे Mon, 01/08/2018 - 09:44
पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत.... आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? निवडणूका अजून जाहीरही झाल्या नाहीत. म्हणजे तीन महिने कुठेच गेले नाहीत. बाकी १ जानेवारीचे रणकंदन आणि जिग्नेशजींची भेट या "योगायोग" असू शकेल. द्वेषाने आपण इतके आंधळे झाले असाल असे वाटले नव्हते. असो

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ Mon, 01/08/2018 - 11:27
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच. जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? मेंढरांना तेवढी अक्कल असती, तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?

गामा पैलवान Mon, 01/08/2018 - 13:36
ट्रेड मार्क,
मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते ....
यालाच नक्षली पद्धत म्हणतात. हे देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. नक्षल्यांना मिळणारा ग्रामीण पाठींबा रोडावत चालल्यामुळे त्यांनी शहरी भागात दंगली माजवायला सुरू केल्या आहेत. प्रकाश आंबेडकर आणि जिग्नेश मेवाणी हे नक्षल्यांचे हस्तक आहेत. आ.न., -गा.पै.

एमी Mon, 01/08/2018 - 16:16
ही एक जुनी बातमी मिळाली. Published on: July 9, 2017 2:05 am https://www.loksatta.com/mumbai-news/the-battle-of-bhima-koregaon-1508050//lite/ === पुण्याजवळ कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर दरवर्षीप्रमाणे अभिवादनासाठी गेलेल्या समुदायावर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे पडसाद सोशल मीडियावर कसे उमटले याची ही झलक http://www.bigul.co.in/bigul/1996/sec/11/koregaon%20bheema%20incident