सन्मान! एका रानातल्या कवीचा..!
लेखनप्रकार
एक अतिशय आनंदाची बातमी..!
शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते..
महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..!
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
8163
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
मन:पूर्वक अभिनंदन..!
In reply to +१ by रामदास
मनःपूर्वक अभिनंदन!!
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
बातमीबद्दल धन्यवाद तात्या!!
चतुरंग
महानोरांच्या कविता अजरामर आहेत!
चकली
http://chakali.blogspot.com
In reply to असेच म्हणते. by चकली
सहमत. :)
निसर्गाशी एकजीव झालेल्या माणसाची कविता तशीच नसती तरच नवल.
महानोरांचा कल्पनाविष्कार आणि शब्दरचना हे पाहिलं की त्यांच्याबद्दल खूपच आदर वाटतो.
>>> या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
>>> फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
>>> काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
ना धो महानोरांचे अभिनंदन. हाच खरा त्यांचा सन्मान!
नभ उतरू आलं.. चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं.. हिरव्या गव्हरात...
बालकवींच्या नंतर, निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेला हाच एकमेव कवी असेल.. ज्याने निसर्गाला आपला श्वास मानला. :)
खूप खूप आनंद झाला या बातमीने.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to अभिनंदन.. by प्राजु
बालकवींची पताका पुढे चालु ठेवलेला खरा निसर्ग कवी......
वेताळ
महानोरांच्या कवितांच्या सहवासात घालवलेल्या रात्री, दुपारी आठवताहेत. आठवणीत रूतून बसलेले शब्द , ओळी , सगळ्यांना आज अंकुर फुटल्यासारखे झाले आहे. "पक्ष्यांचे लक्ष थवे...गगनाला पंख नवे...." "या नभाने या भुईला दान द्यावे ...कोणती पुण्ये अशी येती फळाला ... जोंधळ्याला चांदणे लखडून यावे... शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे" , "जळाणार्या पानांसाठी , मन ओथंबलं" ....त्यांच्या वह्या , लावण्या ....सगळ्यांकडे आयुष्याचे काही क्षण कायमचे गहाण आहेत.
महानोरांना सलाम. आणि तात्यांचे , मिपाचे आभार :-)
In reply to त्यांच्याच शब्दात .. by मुक्तसुनीत
कविवर्य ना.धो.महानोर यांचे अभिनंदन.
त्याच जोडीला महानोरांची 'फुलात न्हाली पहाट ओली' (माझी फारच आवडती कविता) येथे टंकायचा मोह आवरत नाहीये :) ठळकावलेल्या द्विपदी म्हणजे तर क्या कहने!!!!!
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!
(ओलाचिंब)बेसनलाडू
आणि याच पिढीचा वारसा नलेश पाटलांसारखे कवी पुढे चालवत आहेत, याचा आनंद होतो.
(निसर्गप्रेमी)बेसनलाडू
'ह्या शेताने लळा लाविला असा, असा की
परस्परांशी सुखदु:खाने हसलो, रडलो,
आता तर हा जीवच अवघा असा जखडला,
मी ह्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो'
कवि महानोरांचे अभिनंदन.
निसर्ग कवीन्चे अभिनन्दन
In reply to निसर्ग by अमोल नागपूरकर
या उत्तम कवीचे अभिनंदन
त्यांच्याकडुन आणखी सुंदर कवीता येवोत हीच प्रार्थना
अवांतर्-सांगण्यास आनंड वाटतो की आमच्या दहावीच्या पुस्तकात फक्त दोन कवीता मला मनापासुन आवडल्या होत्या त्यातली एक होती कुसुमाग्रजांची आणि दुसरी ना धो महानोरांची
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
महा'नरां'चे मनःपुर्वक अभिनंदन
महानोरांची वाचलेली पहिली कविता.... "या नभाने या भुईला..." काही तरी विलक्षण वाचल्याची अनुभूती अंगावर काटा आणून गेली होती. त्या नंतर एकाहून एक सुंदर कविता देणार्या या मातीतल्या कविला लाख लाख सलाम.
बिपिन कार्यकर्ते
महानोर हे पु.ल. देशपांडेंना लाडक्या कवींपैकी एक. एकदा पुल म्हणाले होते "मातीशी नातं सांगणारा हा शेतकरी-कवी आहे, ह्याच्या कवितेच्या ओळीसारखी एखादी जरी ओळ मला लिहिता आली असती तर माझं जीणं सार्थकी लागलं असतं"
ह्या श्रेष्ठ कवीचे मनःपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन.
बालकवींचा वारसा सर्वार्थाने पुढे नेलेल्या महानोरांचे अभिनंदन.
नाव मिळवण्यासाठी मुंबई-पुण्यात येण्याची गरज नसते. गुणवत्ता असेल तर, अजिंठ्याच्या परिसरात राहूनदेखिल काही बिघडत नाही, हेच यावरून दिसून येईल.
"फुलात न्हाली" ही संपूर्ण कविता दिल्याबद्दल बेसनलाडू यांचेदेखिल आभार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझ्यासारख्या फाटक्या कवीला आणखी काय हवे ? खूप मिळाले..’ असे भावोद्गार निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी जनस्थान पुरस्काराच्या स्वीकारानंतर सत्काराला उत्तर देताना काढले. -लोकसत्ता.
लोककवीचे अभिनंदन
+१