मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सूर्यास्त

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
का लागली दृष्ट तेजोनिधीला अवेळी कसा आज सूर्यास्त झाला अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा शरण भास्करा तू कसा या निशेला बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अंधार डोही धरा दीनवाणी कशी भासते आज केविलवाणी कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची आस वेड्या जीवाला नव्याने उषेची जयश्री अंबासकर

वाचने 1764 वाचनखूण प्रतिक्रिया 7

संदीप चित्रे Mon, 02/23/2009 - 20:19
>> बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली या ओळी विशेष आवडल्या, जयश्री.

प्राजु Mon, 02/23/2009 - 21:00
अतिशय सुरेख काव्य आहे. भास्कराने निशेला शरण जाणे... जबरदस्त कल्पना. :) बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली सुरेख! जयूताई, तुझ्या प्रतिभेसमोर मी नतमस्तक आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Tue, 02/24/2009 - 00:11
बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अप्रतीम शब्दयोजना...! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.

अनिल हटेला Tue, 02/24/2009 - 09:30
सुंदर कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..