वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वाचने
55608
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
In reply to हे उत्तर गंड्याक्स आहे संक्षी by यशोधरा
तुमची क्षण म्हणजे वेळ अशी गल्लत होते आहे
आत्ताचआहे! आणि या आत्तामधेच मी तुम्हाला समजावू शकतो. माझ्या समजावण्याचाएकूण कालावधीमोजला तर तो काही मिनीटांचा असेल.In reply to तुमची क्षण म्हणजे वेळ अशी गल्लत होते आहे by संजय क्षीरसागर
नाही. तुमचं उत्तर तरीही चुकत
In reply to नाही. तुमचं उत्तर तरीही चुकत by यशोधरा
`आता' पेक्षा वेगळ्या काळात काही घडणंच असंभव आहे
क्षणम्हणजे काय ?आतापेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?In reply to `आता' पेक्षा वेगळ्या काळात काही घडणंच असंभव आहे by संजय क्षीरसागर
माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ
In reply to माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ by यशोधरा
एकच चूक कायम आहे !
माझ्या लेखी क्षण म्हणजे केवळ क्षणअर्थात, मग एकच क्षण कायम आहे. तो म्हणजे हा आताचा, चालू क्षण. तुमचे माझ्या प्रतिसादाकडे डोळे लागलेत तो क्षण. आता सुरुवातीपासून इथपर्यंत तुम्ही वाचलंत. याला कालावधी लागला की नाही ? हा कालावधी १० सेकंद असू शकेल आणि प्रतिसाद मोठा असेल तर पाच मिनीटं असू शकेल. २)तुम्ही जो समजावण्याच्या ५ मिनिटांचा रेफ देत आहात - त्या समजावण्याची सुरुवात तर तुम्ही करु शकता पण त्या समजावण्याचा शेवट तुम्ही करु शकाल ह्याची खात्री तुम्ही सुरुवात केल्या क्षणी देऊ शकता काय?पुढचा क्षण ? आहो, एकच क्षण आहे. प्रतिसाद देतांना मी किंवा वाचतांना तुम्ही कालवश झालात तरी ते याच क्षणात होईल ! म्हणून तर मी वर म्हटलंय :आता पेक्षा वेगळ्या काळात तुम्ही कोणतीही घटना घडवून दाखवू शकाल का ?तुमच्याकडे याचं उत्तर असणं असंभव आहे. ३)मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही होमग तुम्ही हा प्रतिसाद कोणत्या शरीरानं देतायं ? मूळात तुम्हाला हा क्षणच कळलेला नाही ! तुम्ही उगीच काल्पनिक गोष्टींवर इकडून तिकडून फट शोधयची व्यर्थ खटपट करतायं. ज्याला हा क्षण कळला त्याला इतर काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तो क्षणस्थ झाला. तो बुद्ध झाला. तिथे सगळे वाद संपले, सगळे प्रश्न संपले !In reply to एकच चूक कायम आहे ! by संजय क्षीरसागर
LOL! तुम्ही परस्परविरोधी
In reply to LOL! तुम्ही परस्परविरोधी by यशोधरा
तुम्हाला समजत नाही याचं कारण
In reply to तुम्हाला समजत नाही याचं कारण by संजय क्षीरसागर
मी काय म्हणते, इतरांच्या
In reply to मी काय म्हणते, इतरांच्या by यशोधरा
आधी*
In reply to आधी* by यशोधरा
जाऊं द्या
मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.जिथे इतका बेसिक गोंधळ आहे तिथे पुढे काय बोलणार ? तरीही तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी प्रयत्न केला. चालूं द्या तुमचं जे चालललंय ते.In reply to जाऊं द्या by संजय क्षीरसागर
लोल! असं म्हणताय? बरं, बरं.
In reply to लोल! असं म्हणताय? बरं, बरं. by यशोधरा
अनाकलनाचं कारणच चुकीच्या अध्यात्मिक धारणा आहे !
In reply to अनाकलनाचं कारणच चुकीच्या अध्यात्मिक धारणा आहे ! by संजय क्षीरसागर
मी लाख सांगेन संक्षी पण
In reply to मी लाख सांगेन संक्षी पण by यशोधरा
मी वर म्हटलं होतंच
साईट प्लस कंटेंटअसा होतो. नुसत्या कंटेंटला, जोपर्यंत तो संकेतस्थळ किंवा वेब-साईटवर अभिव्यक्त होत नाही, अर्थ नाही. आता सर्वांना समजेल असं उदाहरण देतो. मिसळपावला अर्थ आहे कारण सदस्य लिहीतात आणि सदस्यांच्या लेखनाला अर्थ आहे कारण मिसळपावद्वारे ते अभिव्यक्त होतं. सो, मिसळपाव प्लस सदस्यांचं लेखन दोन्ही आहे म्हणून एकमेकांना अर्थ आहे. थोडक्यात, सगळ्या अध्यात्मिकांचा जो फंडामेंटल झोल होतो तोच तुमचा झालायं. तुम्ही काही तरी फँटास्टिक द्वैता-अद्वैताच्या धारणा धरुन बसला आहात, हे पाहा :मी तर "शरीर" जिवंत असतं हे वाक्यही मान्य करत नाही हो.माझ्या लेखनात विरोधाभास असंभव आहे. तुमचं अनाकलन तुम्हाला विरोधाभास दर्शवतं आणि अश्या चुकीच्या धारणांमुळेच बहुतांश अध्यात्मिकांची गोची होते. त्यांना जिकडेतिकडे विरोधाभास दिसतो कारण त्यांच्या चुकीच्या धारणा आणि वास्तविकता यांचा मेळच बसत नाही. मग यथावकाश असे लोक फ्रस्ट्रेट होतात आणि ते फ्रस्ट्रेशन माझ्या लेखांवर काढतात ! तुम्ही समजाल अशी आशा करतो. आय हॅव नथींग अगेंस्ट यू. माझा आक्षेप अध्यात्म न कळलेल्या आणि चुकीच्या धारणा पसरवून साधकांची दिशाभूल करणार्यांवर आहे.In reply to मी वर म्हटलं होतंच by संजय क्षीरसागर
आय हॅव नथींग अगेंस्ट यू. >>
In reply to आय हॅव नथींग अगेंस्ट यू. >> by यशोधरा
तुम्हाला इतका उघड प्रतिसाद वाचून
In reply to तुम्हाला इतका उघड प्रतिसाद वाचून by संजय क्षीरसागर
मला सगळं समजलं आहे, असं
In reply to मला सगळं समजलं आहे, असं by यशोधरा
सगळं समजण्याचा प्रश्नच नाही !
In reply to सगळं समजण्याचा प्रश्नच नाही ! by संजय क्षीरसागर
असोच. :)
In reply to असोच. :) by यशोधरा
शेवटचा प्रतिसाद माझा. मी डां.
In reply to शेवटचा प्रतिसाद माझा. मी डां. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी, अगदी =))
क्षण कर्र मन ....?
In reply to क्षण कर्र मन ....? by गामा पैलवान
?
In reply to ? by संजय क्षीरसागर
क्षणाबाहेर ....
In reply to क्षणाबाहेर .... by गामा पैलवान
असल्यास कोण आहे, असं विचारायचं होतं.
In reply to असल्यास कोण आहे, असं विचारायचं होतं. by गामा पैलवान
आपण !
In reply to आपण ! by संजय क्षीरसागर
क्षण = मन
In reply to क्षण = मन by गामा पैलवान
?
In reply to ? by संजय क्षीरसागर
क्षण = मन अशा अर्थी की ....
In reply to क्षण = मन अशा अर्थी की .... by गामा पैलवान
नाही !
क्षणावरचर्चा नाही.In reply to नाही ! by संजय क्षीरसागर
तेच तर मी नवलाईचं म्हणतोय ....
In reply to तेच तर मी नवलाईचं म्हणतोय .... by गामा पैलवान
गामाश्री !
त्या सर्व पोष्टींत मनाच्या जागी क्षण असंही टाकता येईल की. जरी मनावर चर्चा असली तरी ती क्षणालाही तितकीच लागू पडते (किंवा पडावी). हे नवल नव्हे काय!नाही !फक्त फरक इतकाच की तुम्ही 'आपण' बाहेर म्हणताय तर अर्धवटराव यांना 'आपण' नामे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही.हाच सगळ्यात मोठा झोल आहे ! आपण किंवा स्व हा सार्वभौम आहे. तो मनाच्या पूर्वीपासून आणि मनानंतर (म्हणजे मन शांत झाल्यावर) सुद्धा आहे. अरांना त्याचा पत्ताच नाही ! या उप्पर अरा कडी करतात, ती अशी की `स्व' (किंवा `मी') ही मनाचीच निर्मिती आहे . मनोनिर्मित स्व हेव्यक्तिमत्त्वआहे आणि सार्वभौम स्व हीस्थितीआहे. थोडक्यात, अरांचा पुरता झोल झाला आहे आणि त्यांना वाटतंय की मला उत्तरं देऊन ते माझ्यासाठीच सत्कार्य करतायंत !In reply to गामाश्री ! by संजय क्षीरसागर
असूद्या की झोल
In reply to असूद्या की झोल by गामा पैलवान
नाही हो !
जरी मनाला सर्वस्व मानलं तरी आत्म्याचं काहीही बिघडत नाही. जोवर आपापलं मन कह्यात आहे तोवर कोणाचंही काहीही बिघडणार नाही.त्यांना मनावेगळं कुणी आहे हेच मंजूर नाही ना ! मग मन कुणाच्या काह्यात राहाणार ? २)मन आणि क्षण वेगळे का नाहीत? क्षण पकडायला मन हवंच. नाहीतर सर्व क्षण सारखेच. तसंच मन पकडायला क्षण हवाच. अन्यथा मन माकडाप्रमाणे उड्या मारीत बसेल.चला तुमचा हा पण डाऊट काढून टाकू ! हा क्षण म्हणजेच आपण, शुद्ध वर्तमान ! कृष्ण त्याला सनातन वर्तमान म्हणतो. हा क्षण कायम मनाच्या कक्षेबाहेर आहे. हे एकदा समजलं की मन कायम आपल्या काह्यात आहे. थोडक्यात, क्षण पकडायला मनाची गरज नाही. खरं तर अंदाधुंद मनामुळेच हा क्षण गवसत नाही. पण एकदा हा क्षण कळला की आपण स्वतःशी कनेक्ट होतो आणि मग मन बायोकंप्युटर होतं !In reply to नाही हो ! by संजय क्षीरसागर
मन आणि क्षण
In reply to मन आणि क्षण by गामा पैलवान
गामाश्री,
मग आपण आत्मा आहोत हे कशावरून?मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो ! तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही ! हा `मी' तुमचा, माझा, कृष्णाचा, कुत्र्याचा, दगडाचा (त्यांना म्हणता येत नसला तरी) एकच आहे. कारण मी ही व्यक्ती नसून कालातीत स्थिती आहे. आणि तीच आत्म्याची सिद्धता आहे ! २)एकाग्र मनाच्या सहाय्यानेच क्षण पकडता येतो.क्षण पकडण्याचा प्रश्नच नाही, तो उमजण्याचा प्रश्न आहे कारण हा क्षण म्हणजे खुद्द आपणच आहोत ! एकदा आपण स्वतःशी कनेक्ट झालो की काल अशी वस्तू या जगात नाही याची प्रचिती येते. एकदा आपण क्षणस्थ झालो की मग मन ही केवळ मेंदूत चाललेली अॅ क्टिविटी आहे हा पण प्रत्यय येतो. ज्या क्षणी तो प्रत्यय येतो त्या क्षणी मन काह्यात येतं. मन आपल्याला पकडू शकत नाही. आपण मन बायोकंप्युटर सारखं वापरायला लागतो.In reply to गामाश्री, by संजय क्षीरसागर
मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो !
In reply to गामाश्री ! by संजय क्षीरसागर
अरांचा काहिही झोल वगैरे
आवो सर
In reply to आवो सर by पैसा
>>आवो सर
In reply to आवो सर by पैसा
Any publicity is good
काल आणि कालांतर
In reply to काल आणि कालांतर by गामा पैलवान
गामाश्री, मिक्स-अप होतोयं !
आत्मा जरी मनावेगळा असला, तरी अचिंत्य असल्याने तसा पुरावा सादर करता येत नाही.आपण आहोत याला पुराव्याची गरज नाही. चिंतनाची तर त्याहून नाही कारण ती मानसिक प्रक्रिया आहे. २)संजय क्षीरसागर नामे कोणतरी व्यक्ती काळाचं अस्तित्व नाकारून सिद्धास्तित्व जगू शकते. फाईन इनफ, फेअर इनफ. पण तरीही ती काळाचे नियम पाळतच असते.एखादी कल्पना सर्वोपयोगी असू शकते. उदा. पैसा हा रंगीत कागदच आहे पण ती कल्पना व्यावाहारिक सुलभता आणते. तद्वत, वेळ अस्तित्त्वात नसली तरी कल्पना म्हणून उपयोगी आहे. सो, सर्वांच्या सोयीसाठी आपण वेळ पाळतो. थोडक्यात, कल्पना उपयोगी आहे पण वास्तविकात काल असं काहीही नाही. तो फक्त पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं होणारा भास आहे. ३)म्हणजेच क्षण ही आत्म्याची उपाधी आहे. अगदी तशीच कालांतर (म्हणजे दोन क्षणांमधील अवधी) ही देखील आत्म्याची उपाधी आहे. किंबहुना काळ दर्शवायची दोन मापं आहेत. पाहिलं काळ (= क्षण या अर्थी) आणि दुसरं वेळ (= क्षणांतर या अर्थी).हा क्षणएकच आहे आणि तोच कायम चालू आहे. हा क्षण हीस्थितीआहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो आत्म्याकडे निर्देश करणारा शब्द (उपाधी) आहे किंवा तो आत्म्याचाच पर्यायवाची शब्द आहे. तो वेळ किंवा कालाचा भाग नाही. दोन क्षण असं अस्तित्त्वात काही नाही. मानव निर्मित कालाच्या सुरुवातीपासून, त्याच्या मध्यांतरात (ज्याला तुम्ही दोन क्षणातलं अंतर म्हणतायं) आणि त्याच्या अंतानंतरही,हा क्षणतसाच राहील कारण तो कालज्जयी आहे.In reply to गामाश्री, मिक्स-अप होतोयं ! by संजय क्षीरसागर
बिंदू आणि रेखा
In reply to बिंदू आणि रेखा by गामा पैलवान
गामाश्री !
क्षण सतत असतो म्हणजे बिंदू सर्वत्र आहे. मान्य. मात्र याच्या सर्वत्रपणामुळेच असंख्य्र रेखा उत्पन्न होताहेत. तुम्ही क्षणाला कालज्जयी म्हणता ते मान्य. मात्र हे करतांना क्षणाच्या सृजनशक्तीची उपेक्षा तर होत नाहीये ना? या सतत चालू असलेल्या क्षणामुळेच काळ उत्पन्न झालाय, नाहीका?क्षण सर्व-सर्जक आहे त्याला सृजनासाठी काल उत्पन्न करायची गरज काय ? तो डायरेक्ट प्रक्रियाच उत्पन्न करतो ! या क्षणात स्वर उमटू शकतो तो कितीही वर, खाली, सरळ, किंवा सर्वत्र एकसारखा पसरु शकतो. जर स्वराच्या सुरुवातीपासून ते लयाच्या `कालावधीच्या मापनाचा' आग्रह धरला तरच कालाची आवश्यकता आहे. अन्यथा स्वराचा `गोडवा' जगणं आनंदी करायला पुरेसा आहे.काळाचं अस्तित्व
In reply to काळाचं अस्तित्व by गामा पैलवान
गामाश्री !
तुम्ही जसं क्षण म्हणजे आपण म्हणता त्याच धर्तीवर काळ म्हणजे आपण असंही म्हणता येतं.आपण कालातीत आहोत ! हाच तर अध्यात्माचा सिद्धांत आहे. २)क्षणाने सृजनार्थ काळ उत्पन्न केलाय. म्हणूनंच प्रक्रिया प्रत्ययास येते. अन्यथा सद्वस्तु एकंच आहे.प्रक्रियेचा प्रत्यय यायला जाणीव पुरेशी आहे. कालाची गरज नाही. सद्वस्तू एकच आहे पण काल भासमान आहे. बाय द वे, तुम्ही कितीही आणि कोणत्याही प्रकारे काल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पार शरीरशास्त्र, गणित, भूमिती, फिजिक्स, थिअरी ऑफ रिलेटिविटी, संगीत, नृत्य, चित्रकला, सायकॉलॉजी, खगोल, भूगोल, ..... काहीही. त्या शास्त्रांच्या दृष्टीकोनांचा ऑलरेडी आभ्यास झालायं आणि काल नाही हा माझा अनुभव आहे.In reply to गामाश्री ! by संजय क्षीरसागर
प्रक्रिया, प्रत्यय आणि काळ
In reply to प्रक्रिया, प्रत्यय आणि काळ by गामा पैलवान
सेम मिस्टेक अगेन गामाश्री !
माझ्या मते प्रक्रिया घडायला काळ हवाच. अन्यथा प्रक्रिया घडतेय हे कळणार नाही.प्रक्रियाकळायलाकाळ लागतो म्हणणं म्हणजे भूक लागली हे समजायला घड्याळ वापरावं लागतं म्हणण्यासारखं आहे. २)माझ्या मते शास्त्रांचा दृष्टीकोन असं काही नसतं. दृष्टीकोन असतो तो माणसाचा असतो.`प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? ३)काळ नाही असा तुमचा अनुभव आहे तो मान्य. मात्र काळ अस्तित्वात असून त्याच्याशी सुसंगतपणे वागायचं असतं असा माझा अनुभव आहे.काल ही उपयोगी कल्पना आहे. मी सुद्धा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. ठराविक वेळी खेळायला जातो आणि सगळी कामं वेळेवर करतो पण ती सोय आहे, त्यानं कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही. ३)सांगायचा मुद्दा असा की, जे तुम्हाला गौण वाटतं (उदा. मन) नेमकं त्याच्या सहाय्याने इतर कोणी (उदा. अर्धवटराव) आत्म्यापर्यंत वाटचाल करू शकतात.मेंदू ही मनाची एकूण मर्यादा आहे. आपण मनाबाहेर आहोत. अन्यथा देहांतानंतर, शरीराबरोबर मन आणि त्या बरोबर आपण असा सगळाच खेळ संपला ! कृष्ण व्यर्थ झाला, बुद्ध निरर्थक झाला आणि सांख्य निरुपयोगी झाला ! तस्मात, मनाच्या साह्यानं स्वतःप्रत पोहोचणं म्हणजे रोलर-कोस्टर राईडमधे बसून अचलतेच्या अनुभवाची अपेक्षा करणं आहे. ४)बरं आता एक सांगा की स्मृती म्हणजे नक्की काय?मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल. धन्यवाद !In reply to सेम मिस्टेक अगेन गामाश्री ! by संजय क्षीरसागर
काळ अस्तित्वात आहे