उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
नो फ्लाय मागे घेतला होता का?नो फ्लाय मागे घेतला नसला तरी तो मागे घेतला जाणार अशा बातम्या होत्या.
नसेल घेतला तर तिकीट रद्द केलं म्हणजे काय विशेष केलं, याची बातमी का व्हावी?नो फ्लाय मागे घेतला जाणार अशा बातम्या आल्याच्या पार्श्वभूमीवर परत गायकवाडांनी एअर इंडियाचेच तिकिट काढायचा प्रयत्न केला. त्यांचे तिकिट रद्द केले गेले नसते तर मग "बघा एअर इंडियाला कसे झुकायला लावले" वगैरे बढाया पेंग्विनसेना समर्थकांनी मारल्याच असत्या. तसेच "नो फ्लाय" यादीमध्ये नाव समाविष्ट करूनही परत तिकिट काढायला गेले याचा अर्थ गायकवाडांना स्वाभिमान नाही किंवा आपले तिकिट मान्य केले जाऊन नंतर बढाया मारायला मिळतील हा फाजील आत्मविश्वास या दोन सोडून तिसरा मला तरी काढता येत नाही. जर गायकवाडांना स्वाभिमान नसेल तर असेच लोक पुढे भविष्यात महाराष्ट्राचा ताठ कणा, मराठी बाणा वगैरे गोष्टींविषयी बोलायला लागले तर त्यापेक्षा विजय मल्ल्याने दारूबंदीवर दिलेले प्रवचन अधिक विश्वासार्ह वाटेल. आणि फाजील आत्मविश्वास असेल तर मात्र त्यांना चपराक दिली हे फारच उत्तम झाले. या एका घटनेमुळे आयुष्यभरासाठीचा नो फ्लाय ही शिक्षा पण जास्त होईल हे मान्य. तरीही काही काळापुरता-- ६ महिने/१ वर्ष वगैरे नो फ्लाय त्यांच्यावर टाकायलाच हवा. जर त्यांनी माफी मागून ती बंदी उठवावी अशी मागणी केली तर हे प्रकरण अधिक न ताणता बंद करायला हरकत नसावी. पण काहीही झाले तरी गायकवाडांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. काहीही झाले तरी असल्या मुजोर लोकप्रतिनिधींपुढे कुठली सरकारी संस्था झुकली असे चित्र उभे राहता कामा नये. असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
ते विजय मल्ल्या, फाजील आत्मविश्वास वगैरे शुद्ध आकस आणि द्वेष प्रकारात टाकावं वाटलं.ओक्के.
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
एअर इंडियाचे खमकेपणा दाखविल्याबद्दल अभिनंदन.ज्या सदस्यांना एअर इंडिया ची कृती योग्य वाटत असेल ते खालील वेबसाइट वर जाऊन Appreciation चा फीडबॅक फॉर्म भरू शकतात. http://www.airindia.in/feedback-form.htm जनतेचे समर्थन त्यांना आहे हे त्यांना कळाले म्हणजे इथूनपुढे ही असाच खमके पणा दाखवत राहतील आणि गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना वठणीवर आणतील. एअर इंडियाच्या डायरेक्टर चे अभिनंदन करायचे असल्यास त्यांचा ई-मेल आयडी इथे मिळेल http://www.airindia.in/Images/pdf/RTI-Manual-8-new.pdf
In reply to एअर इंडियाचे खमकेपणा by अत्रे
In reply to तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ by सुबोध खरे
तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ सेवेबद्दल हि लिहिता येईल का?नक्की लिहिता येईल! आणि तसे करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर सोशल मीडिया आहेच आपल्याकडे. झक मारत प्रतिसाद द्यावा लागेल मग त्यांना. एकदा दिल्लीहून येताना यांनी उगाच लेट केला होता एवढा एकच माझा पर्सनल वाईट अनुभव आहे. पण यांचे तिकीट प्रायव्हेट एअरलाईनपेक्षा स्वस्त असते आणि चेकिन लगेज ची लिमिट पण जास्त असते (ज्या रूट ने मी प्रवास करतो त्या रूट वर).
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to >>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० by राजाभाऊ
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
खासदाराने विमान कंपनीच्या कर्मचार्याला चपलेने (२५ वेळा) मारणे व त्याचे उघडपणे समर्थन करणे निंदनीय आहे हे मान्य आहे की नाही?हे मान्यच नाही हे दिसतं आहे.
मुंबईतील रस्त्यांवर असंख्य खड्डे असतात. त्याबद्दल सेनेच्या नगरसेवकांना चपलेने लोकांनी हाणले तर चालणार का?हा हा हा! मस्तं प्रश्न! पण उत्तर "इतर शहरातलं काय" असं येईल.
In reply to खासदाराने विमान कंपनीच्या by अनुप ढेरे
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई साहेब by सुबोध खरे
Air India and the member airlines of the Federation of Indian Airlines (FIA) that includes IndiGo, Jet Airways, SpiceJet and Go Air, condemn the assault on an Air India staff member by a passenger who happens to be a Member of Parliament on March 23, 2017. The airlines demand that strict action be taken against the Member of Parliament by law enforcement agencies. We believe that an assault on any one of our employees is an assault on all of us and on ordinary law abiding citizens of our country who work hard to earn a living. Air India and FIA member airlines have decided to ban this Member of Parliament from flying on all our flights with immediate effect. We believe that exemplary action should be taken in such incidents to protect employee morale and public safety. In the interest of the safety and security of our colleagues and other customers we also propose the promulgation of a "no fly" list which shall include the names of all unruly passengers. Such customers are not welcome on our carriers and we seek the support of the Government and security agencies to enforce such a "no fly" list.मला असे वाटते कि हि जी FIA (http://www.fiaindia.in/) आहे, तिला नो - फ्लाय लिस्ट चे अधिकार असावेत. आणि अजून पर्यंत नसतील तर मग प्रकरण कोर्टात जाईल आणि मग कोर्ट काय सांगेल त्याची वाट बघावी लागेल.
In reply to सॉरी , तुमचा प्रश्न मला by अत्रे
In reply to असेच अधिकार सरकारी by सुबोध खरे
असेच अधिकार सरकारी रुग्णालयांनी जर सरकारकडे मागितले तर चालेल काय?अत्यावशक सेवेसाठी सोडून इतर सेवेसाठी (जसे तुम्ही उदाहरण दिले एक्झिमाचे) असे डिसक्लेमर लावून सरकारी रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकांना बॅन करण्यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. पण हा निर्णय घेण्याएवढी एवढी एकजूट त्यांच्यात हवी. मी वाचलं होता कि इथून पुढे काही रुग्णालयात फक्त दोन नातेवाईक रुग्णासोबत जाऊ शकतील. त्या टाईपचे नियम मला वाटतं लावता येतील. कारण रुग्ण बिचारा डॉक्टरांना का मारेल? मारलं तर त्याचे नातेवाईक/ समर्थकच मारतील (नेता वगैरे असेल तर) . अशावेळी योग्य ती सुरक्षा पुरवली तर अशा मारहाण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त होईल. उडणाऱ्या विमानात कोणी गोंधळ घालत असेल (किंवा अशा गोधळाची पार्श्वभूमी त्याला असेल) तर परिस्थिती सोपी नसते. बाकी लोकांच्या जीवाचा ही प्रश्न असतो. विमानात गोळी पण चालवता येत नाही, विमानच खाली पडेल.
हे मला वाटते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.असेल. पण ट्रेडऑफ बघा ना.
In reply to असेच अधिकार सरकारी by अत्रे
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला विमानाचे तिकीटच नाकारणे हे बरोबर नाही असेच वाटतेसहमत. बादवे नो फ्लाय लिस्ट ची सुरुवात अमेरिकेत झाली असे वाचले. त्यावरही बऱ्याच केसेस सुरु आहेत . https://en.wikipedia.org/wiki/No_Fly_List#Lawsuits
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
In reply to आहेच हे उल्लंघन मूलभूत by हतोळकरांचा प्रसाद
आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार?असे खरेच झाले असेल - तर
Law will take its own course:D ;)
In reply to आत नेऊन तोंड फुटेपर्यंत by अत्रे
In reply to आता कसं बोललात बगा! अगदी हेच by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना by अत्रे
In reply to ते तर ते करतच आहेत हो, संसदेत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to माई साहेब by सुबोध खरे
मला एकच मुद्दा मांडायचा आहे कि या खासदारांना दोषी ठरवून त्यांच्यावर उड्डाण बंदी एकतर्फी आणण्याचा एअर इंडिया (सरकारी विमान कंपनी) ला कायदेशीर अधिकार आहे का? यात मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते आहे असे वाटते.विमानात गोंधळ करणे, मारामारी करणे, इतर प्रवाशांना धोका होईल असे वर्तन करणार्या प्रवाशांना बंदी करण्याचे अधिकार विमान कंपन्यांकडे आहेत. २-३ दिवसांपूर्वीच याबद्दल एके ठिकाणी वाचले होते. ती लिंक परत मिळाली तर देईन.
दोष सिद्ध न होता त्याला शिक्षा दिली जात आहे.आपल्या कृत्याची त्याने स्वतःच जाहीर कबुली दिली आहे. त्यावर विसंबूनच बंदी घातलेली आहे. समजा त्याने कर्मचार्याला मारहाण केली नसेल व विमानातून ढकलायचा प्रयत्न केला नसेल तर त्याने तसे कॅमेर्यापुढे येऊन जाहीररित्या सांगावे. शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीने तो फुशारक्या मारायला गेल्या आणि त्याच फुशारक्या आता अंगलट आल्या आहेत. आता मी तसे केले नाही हे सांगायला पण त्याच्याकडे तोंड नाही.
In reply to या खासदारांच्या वागणुकीवरही by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तो कार्यक्रम बसविलेल्या by श्रीगुरुजी
असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना असेच वठणीवर आणले पाहिजे. समजतात काय लेकाचे स्वतःला.मुजोर लोकप्रतिनिधींची तशी टक्केवारी काढायला गेली तर ती जास्त भाजप मध्येच आढळेल. पण भाजपने मिडिया वगैरे सगळं हायजॅक केलं असल्याने ते दाखवत नसतात. उगाच निरीक्षण करीत होतो,ते हिंदी चॅनेलवाले किती तिरस्काराने गायकवाड प्रकरणाची बातमी प्रेझेंट करत होते,हरामखोर लेकाचे आहेत सगळे.तो योगी तिकडे कायतरी गोमाता,मानसरोवर,इ.थेरं करत बसला आहे,त्याचे ह्यांना फार कौतुक.
In reply to उस्मानबउस्मानबदद by इन्द्र
In this case, the MPs' anger was provoked at a range of grievances that might turn out to be legitimate, though the person on whom they vent their anger could hardly be held responsible for them. But through the years, their anger has been provoked by anything, from Muslims/Dalits demanding their rights or merely asserting themselves, to officials refusing favours, to a railway station being painted green. For Shiv Sainiks see themselves as Maharashtra's first citizens, and also as inheritors of Shivaji's legacy. For them, Shivaji is a symbol of Marathi Hindu pride, of independence from a perpetually hostile Delhi. Thus, being treated as nobodies in Delhi's Maharashtra Sadan, and that too by a non-Marathi official (Resident Commissioner Bipin Mallick), was the ultimate insult. It had to be avenged by the 'mards', as the Saamna editorial described them.बाकी या पूर्ण प्रकरणात सामना मधे जी "स्मशानशांतता" आहे ती बघून थोडे चांगले वाटते. नशीब तिथे तरी समर्थन केले नाही.
In reply to Why the Shiv Sena won't say by अत्रे
In reply to एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच by हतोळकरांचा प्रसाद
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
In reply to ओक्के! बाकी ही शांतताप्रियता by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अत्रे
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :)
वेगळा कसा, धागाच पक्षसापेक्ष अन खुनशीपणाने काढलाय की.
पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे.
कशाच्या तुलनेत कमीय? स्व. बाळासाहेबांच्या काळात अन नंतर अशी का? का इतर पक्षाच्या तुलनेत? ते टोटल तुमचे वैयक्तिक मत झाले. रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?
यावर चिंतन त्यांनीच करावे,
ऑ..
म्हणजे थोड्या अजून निवडणुका जिंकतील. जाऊदे.
आता काय एक राष्ट्रपतीची इलेक्शन सोडली तर दुसरी काय नाय दृष्टीपथात. मध्यावधी वगैरे झाली तर बघतील त्यांचे ते.
अन धागा काढायच्याच आधी जाऊ दे म्हणून सोडायचे असते हो. इतकी पूर्वग्रहदूषित धुळवड आटपल्यावर कीती ती घाण असा आव कशाला?In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अभ्या..
रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?फेसबुक लाईक्स मधून तरी मोजता येईल असे वाटते. या प्रकरणावर आलेल्या बातम्या आणि त्यावरच्या देशभरातून आलेल्या लाइक्स, प्रतिक्रिया बघून रिस्पेक्ट बद्दल निष्कर्ष काढता येईल .
धागाच खुनशीपणाने काढलाय की.सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
In reply to आगाऊ सल्ला..!! by विशुमित
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)अरारारारा, अहो ते स्वतःचे नाव पत्ता देऊन लिहून छापणारे पब्लिक आहेत हो. काय झाले गेले तर निस्तरायची धमक आहे त्यांची. कशाला उगा न झेपणारे आदर्श घेताहात?
In reply to सामना चे अग्रलेख वाचूनच by अभ्या..
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते.
ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात.
असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.
In reply to जे वाटते ते टुकार पक्षाच्या by अभ्या..
मग डायरी ठेवा ना.कशाला. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे ना मला! फुकट कशाला घालवू ते. आणि इतरांना व्यक्त होताना बघून जे व्यक्त झाले नाहीत त्यांनाही हुरूप येईल.
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.
नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या.
२००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले.
सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे. In reply to मला माझा जीव प्यारा आहे आणि by श्रीगुरुजी
In reply to पक्षात सर्वसाधारणपणे कीती by अभ्या..
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी
In reply to अहो माझा नाही हा युक्तीवाद. by अभ्या..
In reply to अहो माझा नाही हा युक्तीवाद. by अभ्या..
In reply to मला माझा जीव प्यारा आहे आणि by श्रीगुरुजी
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
In reply to कोण कोण आहेत by वरुण मोहिते
In reply to जाऊ द्या ना बाळासाहेब! by अत्रे
In reply to तंतरली वाटते धागा लेखकाची. by विशुमित
In reply to शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात by अत्रे
In reply to शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात by अत्रे
In reply to एकदा नावगाव लपवले की by अभ्या..
In reply to एक विचार by मराठी_माणूस
In reply to एक विचार by मराठी_माणूस
त्या अधिकार्याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?
चूक मान्य केली असती???????
त्या कर्मचार्याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?
In reply to अभ्या / मोहिते / विशुमित by अमर विश्वास
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
In reply to प्रत्येकाने चपलने मारण्याचा by अप्पा जोगळेकर
In reply to चिंचवड मध्ये कोठे? by विशुमित
In reply to . by विशुमित
In reply to . by विशुमित
अप्पा आपली लायकी आणि लेवल समजली...!!हे आणि
संपादकांनी लक्ष घालावे..हे ही दोन वाक्ये एकाच दमात कसे लिहू शकता हो?तुमच्या कॉन्फिडन्सचे (की फाजील आत्मविश्वासाचे) खरोखरच कौतुक वाटते.
In reply to लायकी आणि लेवल!! by गॅरी ट्रुमन
In reply to सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना by हतोळकरांचा प्रसाद
उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना?सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का?
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना by हतोळकरांचा प्रसाद
In reply to . by विशुमित
In reply to चिंचवड मध्ये कोठे? by विशुमित
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
In reply to विशुमित by अमर विश्वास
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ?
गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क साधून अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे.
मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे.
In reply to अधिकाऱ्याने मोदींना कशाला by श्रीगुरुजी
In reply to मोदकजी, मोदींचं नाव हे त्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दुरुस्ती : चुकून मोदकजी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to काय राव हतोळकर... माझ्या by मोदक
In reply to मोदकजी, मोदींचं नाव हे त्या by हतोळकरांचा प्रसाद
"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे.
ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?
In reply to "आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो by श्रीगुरुजी
In reply to चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मी कर्मचाऱ्याला २५ वेळा by श्रीगुरुजी
In reply to परत वाचा. आपल्याला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इथे मला कोणता अर्थ हवा आहे हा by श्रीगुरुजी
In reply to का बुआ, "मी मारले" हा त्यांचा by हतोळकरांचा प्रसाद
का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी.
एक सांगा. त्यांनी कर्मचार्याला चपलेने मारले का नाही मारले. त्यांनी मारले हा आरोप त्यांच्यावर इतर कोणीही करत नसून त्यांनी स्वतःहूनच हे सांगितले आहे. या क्षणापर्यंत त्यांनी ते नाकारलेले नाही. त्यांनी कर्मचार्याला खरंच मारले होते का हे सिद्ध करण्याची जबाबदारी इतरांवर नाही कारण इतर कोणीही हा आरोप केलेला नाही. त्यांनी स्वतःहूनच कबुली दिल्याने आता त्याच्यात कोणीही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.
परंतु कर्मचारी बेताल वागला, अपशब्द वापरले हे आरोप त्यांनी कर्मचार्यावर केले आहेत. जो दुसर्यावर आरोप करतो, त्याच्यावरच ते आरोप सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी असते. ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर ही जबाबदारी नसत. त्याने नुसते आरोप नाकारले तरी ते पुरेसे असते. त्यामुळे खासदार महाशय कर्मचार्यावर जे आरोप करीत आहेत, ते सिद्ध करणे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर बंधनकारक आहे.
परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.
आपल्याला धक्काबुक्की व शिवागीळ झाली हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी खासदार महाशयांवर आहे. त्याचवेळी विमान कंपनीने आपल्या कर्मचार्याला मारहाण केल्याची व विमानाला खोळंबा केल्याची केस टाकली आहे त्यात फार काही सिद्ध करण्यासारखे नाही कारण दस्तुरखुद्द खासदार महाशयांनीच कॅमेर्यासमोर या गुन्ह्याची जाहीर कबुली दिली आहे व ती कबुली न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईलच. अर्थात शिक्षा टाळण्यासाठी, "मी मारहाण केलीच नव्हती. फुशारक्या व पोकळ बढाया मारणे ही आमच्या पक्षाची व पक्षनेतृत्वाची संस्कृती आहे व त्याला अनुसरूनच मी मारहाण केलेली नसतानाच कॅमेर्यासमोर मारहाण केल्याच्या फुशारक्या मारल्या. अशा फुशारक्या मारल्या तर माझा व माझ्या पक्षाचा भाव वाढेल असे मला वाटले." असा खासदार महाशयांनी न्यायालयात स्टँड घेतला तर मात्र मारहाण झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी कर्मचार्याची राहील.
In reply to का बुआ, "मी मारले" हा त्यांचा by श्रीगुरुजी
In reply to मग हाच तर मुद्दा सांगण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम.
चुकीची माहिती आहे. कोणत्याही खटल्याची सुनावणी सुरू होताना सर्वात प्रथम न्यायाधीश आरोपीला त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवितात व त्यावर "गिल्टी ऑर नॉट गिल्टी?" असे त्याला विचारतात. जर "नॉट गिल्टी" असा त्याने दावा केला तर पुढील सुनावणी सुरू होतो व फिर्यादीला आरोपीच्या विरूद्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर आरोपीने या प्रश्नावर "गिल्टी" असे पहिल्याच फटक्यात कबूल केले तर खटला पुढे चालविण्याची गरजच नसते.
हा खटला भविष्यात कधीकाळी सुरू झाला व खासदार महाशय आपल्या दाव्यावर ठाम राहिले तर एका मिनिटात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा ठोठावली जाईल. "आपण मारहाण केलीच नाही. कर्मचार्याला मारहाण केल्याची नुसती फुशारकी मारली." असा त्यांनी न्यायालयात दावा केला तर मात्र आपल्याला मारहाण झाली हे कर्मचार्याला सिद्ध करावे लागेल.
जोपर्यंत खासदार आपल्या कबुलीला चिकटून आहेत तोपर्यंत पुरावे, साक्षीदार इ. ची गरज नाही.
आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे?
दोन्ही गोष्टींचा राग आहे. परंतु फुशारक्या मारणे हा कायदेशीर गुन्हा नाही. ही एक मानसिक प्रवृत्ती आहे. परंतु मारहाण करणे हा गुन्हा असल्याने याच गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत का? हवाईसुंदरीने विमान अधिकाऱ्याच्या तोंडून काहीतरी अपमानास्पद गेले आणि मग भांडण सुरु झाले असे सांगितले नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा न्यायालयात होणे गरजेचे आहे. त्याआधीच तुम्हाला शिवसेना आवडत नाही आणि सदर प्रकरणातील खासदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणून लगेच त्यांच्यावर आसूड ओढणे मला तरी पटत नाही.सदर प्रकरणातील खासदार कोणत्याही पक्षाचे असते तरी मी टीका केलीच असती. हवाईसुंदरीने जे काही सांगितले ते फक्त मटा, लोकसत्ता याच वृत्तपत्रातील आंतरजाल आवृत्तीत दिसले. त्यांच्या छापील आवॄत्तीत त्यांनी हे छापलेले नाही. इतर माध्यमांनी सुद्धा त्या निवेदनाची दखल घेतल्याचे वाचण्यात आले नाही. तिची ओळखही लपविलेली आहे. त्यामुळे ते जे निवेदन होते ते कितपत जेन्युईन आहे याविषयी साशंक आहे.
बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.
शिवसेनेवर माझा राग आहेच व मी तो कधीच लपविलेला नाही. परंतु हा राग विनाकारण किंवा अनाठायी नाही हे या व आधीच्या इतर अनेक प्रकारणांवरून सिद्ध झाले आहे. शिवसेनेवर टीका करण्याची संधी शिवसेनेच्याच खासदार महाशयांनी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला नावे का ठेवता हा इतरांना प्रश्न न विचारता शिवसेनेलाच विचारणे योग्य ठरेल.
In reply to मग हाच तर मुद्दा सांगण्याचा by श्रीगुरुजी
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?
बापरे. म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे.
खरं तर त्या कर्मचार्याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.In reply to प्रत्येकाने चपलने मारण्याचा by श्रीगुरुजी
म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे.यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते. २.
खरं तर त्या कर्मचार्याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती. आ.न., -गा.पै.
In reply to नेमकं हेच वेगळ्या प्रकारे लागू पडतं by गामा पैलवान
In reply to नेमकं हेच वेगळ्या प्रकारे लागू पडतं by गामा पैलवान
यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते.
विमानात मुळात बिझनेस क्लासची आसनेच नसताना केवळ हे महाशय विमानात येणार म्हणून त्यांच्याकरता आयत्यावेळी तशा आसनांची सोय करायची होई का? व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार? जर त्यांना जनता क्लासमधून प्रवास करायची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या विमानातून दिल्लीला न जाता ज्यात व्यवसायवर्गाची सोय आहे असे विमान बघून त्यातून प्रवास करायला हवा होता. ते न करता हे जनता क्लासमध्ये बसून दिल्लीला पोहोचले आणि नंतर मला व्यवसाय वर्ग का दिला नाही म्हणून वादविवाद सुरू केला.
जर विमानात व्यवसायवर्गाची आसने असतानासुद्धा यांना ते आसन न देता जनता क्लासमधून प्रवास करायला लावला असेल तर ते नक्कीच चु़कीचे आहे व त्यांची तक्रार योग्य आहे. पण विमानात तशी आसने नसताना सुद्धा हे त्याबद्दल तक्रार कसे करू शकतात. मुंबईत बोरीबंदर स्थानकावरून फास्ट लोकलची घोषणा ऐकूनसुद्धा फास्ट लोकलमध्ये बसून नंतर ती लोकल दादरनंतर थेट अंधेरीलाच थांबली, मला तर माटुंग्याला उतरायचे होते, पण यांनी मुद्दामच लोकल माटुंग्याला थांबवली नाही अशी तक्रार एखाद्याने केली तर ते हास्यास्पद होणार नाही का? किंवा "शुद्ध शाकाहारी भोजन" असा फलक लावलेल्या उपाहारगृहात शाकाहारी थाळी चेपल्यानंतर बिल द्यायची वेळ आल्यावर "माझ्यावर अन्याय झाला. मला मटण वाढलेच नाही. मला तक्रार करायची आहे." अशी भूमिका किती हास्यास्पद होईल. इथेही तसेच झाले आहे.
खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.
मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे. त्यामुळे मोदींचे नाव सांगणे अजिबात चुकीचे नाही. खासदार ज्या शाळेत जातात त्या शाळेचे मोदी मुख्याध्यापक आहेत. या महाशयांनी अत्यंत हास्यास्पद कारणावरून विमान अडवून धरले होते व त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे कर्मचार्याने योग्य तेच केले आहे.
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
In reply to अमित शहा यांचा हरामखोरपणा by वरुण मोहिते
उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाच
मी काय म्हणतो मोहिते साहेब.. तुम्ही सतत दुसर्याला लेख लिहायला का सांगता..?
तुम्हाला एखादा विषय / व्यक्ती / घटना टोचत असेल तर तुम्ही अभ्यास करून लेख लिहा आणि मग जी काय चर्चा व्हायची ती होवूदे.
लोकांनी लेख लिहावेत मग मी मते मांडणार ही भूमीका किती दिवस चालणार..?In reply to उद्दाम आणि सडकछाप अमित शहा by मोदक
In reply to लेख लिहा लेख लिहा हि by वरुण मोहिते
लेख लिहा लेख लिहा हि भूमिका आपली असते मोदक साहेब .
हो असते आणि फक्त तुमच्या बाबतीत, कारण तुम्ही स्वत: दुसर्याला तशी आवाहने करता म्हणून.
अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे .
हे नक्की काय लिहिले आहे ते मला कळाले नाही. प्रतिसादांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भूमीकेसाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी लेख लिहावा असे पूर्वी / आत्ता सुचवले आहे.
आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते .
तेच. जे काही टोचत असेल त्यासाठीच सांगतोय. लेख लिहा आणि मग टोचणे बंद होते का ते बघा. तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टींवरपण दुसर्याने इलाज शोधावा अशी अपेक्षा आहे का..?
मी भाषा सोडून पण बोलत नाही कधी
हे मी बोललो नाहीये. त्यामुळे पास.
In reply to लेख लिहा लेख लिहा हि भूमिका by मोदक
In reply to अशी मी by वरुण मोहिते
In reply to उद्दाम आणि सडकछाप अमित शहा by मोदक
In reply to वरच्या प्रस्तावाला आमचे by अत्रे
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
त्यामुळे कर्मचार्याने योग्य तेच केले आहे.कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?
In reply to त्यामुळे कर्मचार्याने योग्य by हतोळकरांचा प्रसाद
कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?
नाही. कर्मचार्याने असे केले आहे हे सिद्ध झालेले नाही किंवा मी हे केले अशा फुशारक्या कर्मचार्याने मारलेल्या नाहीत.
In reply to कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, by श्रीगुरुजी
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार?मग 'जे' वर्गाचं चढपत्र (=बोर्डिंग पास ) कशाला छापलं? प्रवाशांना योग्य माहिती का दिली गेली नाही? ही सुविधा न पुरवल्याने गायकवाडांना तक्रार करावीशी वाटली असेल असं मानण्यास जागा आहे. २.
मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे.हा विश्वास मोदींनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी पीडितांची तातडीने दखल घेतल्याने कमावला आहे. मात्र प्रस्तुत प्रसंगात मोदींचं नाव घेणारा पीडित नाही. आ.न., -गा.पै.
In reply to मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक by अत्रे
In reply to राडा व्हावा हीच 'श्रीं'ची by विशुमित
नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत याचे भान विसरले आहेत बहुदा.मिपावरच्या कमेंट वाचून कोणी माथेफिरू सैनिक हल्ले करणार असेल, तर त्याला लगेच कोठडीत पाठवण्यात येईल :) ही २८ मार्च बातमी वाचा - http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-ban-from-airlines-1441220/lite/
मुंबई विमानतळावर राडा करण्याचा गर्भित इशारा शिवसेनेने दिल्याचे समजते.एअरपोर्ट युनिअन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत म्हणून राड्याबदल बोलण्याची हिम्मत झाली असावी. एकदा चोप बसला आणि कामावरून काढून टाकले कि बसतील बोंबलत!
In reply to नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी by अत्रे
एकदा चोप बसला आणि कामावरून काढून टाकले कि बसतील बोंबलत!"राडा केला तर" जे शब्द आधी घालायचे राहिले.
In reply to मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक by अत्रे
In reply to माफ करा by किसन शिंदे
In reply to काय करू सांगा मला! by अत्रे
आपण काही नेतेलोकांसारखे चपलेने बडवू शकत नाही इतरांनाआणि बडवण्याची भाषाही कोणी करू नये, कृती तर लांबच राहिली.
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे पण by अत्रे
In reply to काय दुर्दैव आहे मिपाकरांचे..... by शार्दुल_हातोळकर
तर इथे हा असा धागा काढायला आलातच कशाला?यायचे होते म्हणून :) तुम्ही पण आपल्या प्रतिसादांनी धाग्याला हातभार लावलात म्हणून आभार.
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या उद्दामपणाच्या बातमीकडे दुर्लक्ष झालेले दिसते.माफ करा. तेवढी बॅण्डविड्थ माझ्याकडे नाही. तुम्ही पाहिजे असल्यास नवीन धागा काढा त्या तिवारीवर आणि जे वाट्टेल ते लिहा.
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by अत्रे
In reply to का बुआ? नवीन धागा का काढू मी? by हतोळकरांचा प्रसाद
बॅण्डविड्थचा काय संबंध?मेंटल बॅण्डविड्थ हो! मला हे तिवारी प्रकरण काय आहे ते माहित नाही आणि आत्ता त्यावर वादविवाद करण्यात मी वेळ खर्चू इच्छित नाही. इथे फक्त मी चप्पल आणि प्रवासबंदी यावर काँसंट्रेट केलं आहे. बाकी तुम्हाला जी चर्चा करायची ती करा. ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.
In reply to तुम्हाला पाहिजे ते करा by अत्रे
ज्यांना इंटरेस्ट असेल ते प्रतिसाद देतीलच.बास, हे समजलं की झालं! बाकी गोंधळ आणि राडा मग तो शाब्दिक का असेना घालण्यात मला काडीचाही रस नाही, तुम्हाला तो आहे हे वर तुम्ही सांगितलेच आहे. त्यामुळे, चालू द्या!
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तिवारीच्या बातमीवर मी आधीच by श्रीगुरुजी
In reply to तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दोन घटनांमध्ये बराच फरक आहे. by श्रीगुरुजी
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही?
विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते.
__________________________________________________________________________________________
कर्मचार्याचे व्हर्जन असे आहे.
Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight.
He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next.
“When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,” he recalled.
Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added.
“I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said.
“He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added.
The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise.
- आपण त्या कर्मचार्याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे.
- गायकवाडांनी त्या कर्मचार्याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे.
- http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push-air-india-staff-member-off-the-plane/58017
The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft.
"No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight.
Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day.
"Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers,"
Gaikwad had even demanded an apology from Air India.
"I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by श्रीगुरुजी
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.
तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत.
शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.
कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही.
"The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."
मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by श्रीगुरुजी
:)