तोच चांद नभी अन्
रात आज तीच ती
सागराच्या लाटेवरची
गाज देखील तीच ती
तोच वारा... तीच नशा
तेच धूसर क्षितिजही.....
त्याच त्या नभामधुनी
चांद किरणे तीच ती....
मात्र आज नको मज हे
आठव तुझी दाटते.....
साय-ओल्या वाळूमधली
पाऊल खुण बोलावते....
तू असशी जर इथे तर....
सर्वकाही हवेसे!
तूच नाही जर इथे तर....
जीणे अर्थहीन... नकोसे!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1462
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
कविता थोडी रिपेअर करायला हवी...
मस्त. खूप आवडली दुरुस्त
In reply to कविता थोडी रिपेअर करायला हवी... by संजय क्षीरसागर
धन्यवाद!
In reply to मस्त. खूप आवडली दुरुस्त by ज्योति अळवणी
धन्यवाद!
In reply to मस्त. खूप आवडली दुरुस्त by ज्योति अळवणी
आवडली
छान